गग !
|
|
क
ल *-....->->>>>>.-> ४५.
रमणी!
! त्मक, ष
0800000007
वच
र
ह
4
क
चनक. कच
- नड
प लक जजन व्र
प तन
अण ७ नक
यल स्वी
क -
> २२ उभ
निदा २.
रा
“८
स्स्स्स्््यॉ
शत
/॥॥
टिळा
शि
0000002000
ह)
0
(टी
(८000000002
च
3
7000.
शर
रद
रि
ऱ्झ
ऱ्
0///
7
/
स्स
टि
77
/
र
तल्णाणाफ-
व्या ८०००५०५
म्य व्य -
ल 1) व
। ९... गि र
कि
क
दक ७200101 रड टले >> टॅ -2“ ७७.५१ र ण प पष पपरी ५ ५९. //; गैर |
९" र र व्या (>“““ वरो 00 भट ये पसमरकधा ताया मयत एटा दद क ओड, री
रोजे श ळी कश, स्यू ब्यारकातकवकातरपऱचपडा गि क ण > - र्ं र
स्््ड $ श्रिजळ मळ्यात की पक टो क > व
डे टा गील ल ू शी व स्व
छेखक १ यतावतेर प 1 >
क ट्के व द्व ऱ्ट
पी व पशर-म्ट._ र
टाचा क णणायळ पक्क
"क्व
संबंधीं सर्वे प्रकारचे मालकोहक््क
सौ. व्रेजयंती हडप यांच्या स्वाधीन
व आहेत
ष्र १७६९४९७७९6 € &६ €९6९८€ €8€6€
;
?
;
“ कादंबरीमय पेशवाई”मधीळ र गंवारांवी
१ याच लेखकाच्या पूवीच्या 9 बळवंत विष्णु परचरे
बारा कादंबऱ्या _ परडुरे पुराणिक आणि संडळी
| वड वानी १ बुकसेलसे व पब्लिशर्स, माधवबाग,
पेशवाईचें पुण्याहवाचन ? री
र पेशवाईची प्राणप्रतिष्ठा ;
; पेशवाईचे घ्रवदरीन र
पेशवाईचा ध्रुव ढळला १ ्
पेशवाईचा पुनर्जन्म 1. कादुधी नव
५ पेशवाईचें पुनबेंभव 2 ;
पेशवाईचा दरारा १ रि _---ऱ श
9 पेशवाईतील दुर्जन 2 > टा
पेशवाईतील पश्चिमदिग्विजया./ 7!
पेशवाइंतीळ धर्मसिस्स्कार्रा ॑
हि »सेन्वरावाईतीळ उत्तरदिग्विजनय टं
) पेशवाईवरीळ गण्डान्तर |
लककेकतकेकेकककऊपकेकळलेकननिवोह
४“ कादंबरीमय पेशवाई'चें पुन-
मुद्रण भाषांतर, रूपांतर वगेरे- करर: कती
शंकर रामचंद्र दाते
अ. वि. ग्रहू-लोकसंअह प्रेस;
६२४ सदाशिव, पुर्णे,
भूमिका
५०८७-८६
"पेशवाईचे मन्वंतर! ही 'कादंबरीमय पेशवाई' माळेतीळ तेरावी कार्द
बरी होय. या मालेतील यापूर्वीच वारा कादंबर्यांहून या कादंबरीचें स्वर्प
जरासे भिन्च आहे. तें असें कीं, यापूर्वीच्या कादंबर्यांत बहुश: पेशव्यांचा प्रामु-
ख्यानें उल्लेख व संबंध आलेला आहे; व प्रस्तुत कादंबरींत तसा खुद्द पेश-
व्यांच्या मदुंमकीचा फारसा अंश नाहीं. थोरले बाजीराव पेशवे निधन पावल्या-
वर् त्यांच्या पश्चात् पेशवाईची वस्त्रें कोणाला द्यावीं याविषयीं सातार्याला
याहूमहाराजांच्या दरबारांत फारच मतभेद माजून राहिले होते, त्याच
सुमाराला रघूजी भोंसले व फत्तेसिंग भोंसळे वगेरे पराक्रमी वीरांच्या नेतृत्वा-
खालीं कर्नाटकची मोहीम जोरानें सुरू होती. वस्तुतः अर्काटचा नबाब व
तंजावरचे राजे यांच्यांतील कटकटी नबाबाच्या अघोर राज्यतृष्णेमुळें त्या-
पुर्वीच फारां दिवसांपासून अधिकाधिक विकोपाला जात होत्या. नबाब
हळूहळू कर्नाटकांतील सर्व हिंदु राजा--महाराजांना व पाळेगारांना मातीला
मिळवून व त्याबरोबरच हिंदु धर्माची श्रेष्ठता नष्ट करून कर्नाटकांत एकट्या
स्वतःची इस्लामी सावेभोम सत्ता प्रस्थापित करण्याच्या खटपटींत होता-
हिंदुपदपादशाहीचा जगड्व्याळ उद्योग जो मराठ्यांनी व पेशव्यांनीं आरंभिला
होता, त्याला विघातक असाच हा अर्काटच्या नबाबाचा उद्योग होता. तो
उद्योग तसाच वाढूं दिल्यास हिंदुपदपादशाहीचा उद्योग निदान कर्नाटकांत
तरी स्वप्नवत् ठरून श्रीछत्रपति शिवाजी महाराजांनीं अ्हनिश परिश्वमांनीं
आचरून नांवारू्पाला आणलेले गो-ब्राह्मण-प्रतिपालनाचें महान् ब्रत विफल
ठरणार; तें संकट टाळण्यासाठीं मराठझाहीच्या कर्त्या पुरुषांना कर्नाटकावर
स्वारी करून तेथील यावनी .जुळूम-जबरदस्तीला आळा घालून आपला
दरारा तेथें बसविणें प्राप्तच होतें. असा हा कर्नाटकांतील मोहिमेचा चिर-
स्मरणीय ऐतिहासिक प्रसंग प्रत्यक्ष पेशव्यांच्या य्षोगानांत पूर्णत्वाने सामाव-
णारा नसला तरी तो 'कादंबरीमय पेशवाई'च्या कथाविस्तारांतून बाजूला
ठेवण्याजोगा खास नव्हता. त्या मोहिमेंत मराठे विजयी न होते तर, त्यांच्या
9 भमिका
९
-€५-५१८५/४-/४५८//% /५.४४४४-/%५ ४-८ ५-./४./४- ९.७» ४४” ४१.४.” ४./९_/९ /" १५५४-५१. ४५.५/५.५५./९./ ४४१५ ४५८१४. ९४ ५४ ९.५५. ५५.४. १.० १५.५. ६./१
हिदुपदपादद्याहीच्या महत्तव महत्त्वाकांक्षा, ज्या पुढे क्रमाक्रमाने उत्कर्ष पावून
सुमारे पाऊण शतकानंतर कालगतीप्रमाणें अपकर्षही पावल्या, त्या मुळांतच
फोल ठरल्या असत्या. इतका आणीबाणीचा प्रसंग तो होता; म्हणूनच पेश-
व्यांचीं यशोगीतें गाण्याला त्यांत फारसा अवसर नसतांही पेशवाईचे महत्त्व
अप्नत्यक्षत: वाढविणारा तो प्रसंगविशषेषच प्रस्तुत कादंबरीसाठी निवडावा
लागला. या प्रसंगांतही इतक्या खरोखरीच्या अद्भुत व रोमांचकारी घटना
घडलेल्या आहेत कीं त्यांचें नुस्ते यथावत ऐतिहासिक निवेदनही वाचकांना
विस्मयचकित करून सोडील.
या कादंबरींतील मुरारराव घोरपडे, रघूजी भोंसळे, मानाजी, कोयाजी
घाटगे, प्रतापसिह महाराज, सफ्दरअल्ली, मीर असद, वगेरे महत्त्ववान्
पुरुष तर पुर्ण ऐतिहासिक आहेतच. पण चंदासाहेबाच्या रूपयौवनावर भाळून
सर्वस्वी फंसळेली व त्रिचनापल्लीरचे महत्त्ववान् हिंदी राज्य चंदासाहेबाच्या
पचनीं पडण्याला कारण होणारी त्रिचनापल्लीची राणी मीनाक्षी, तंजावर-
च्या राजवटींतीळ यवन मुृत्सही' सय्यदखान याच्या अत्याचाराला बळी पडून
भ्रष्ट झालेली एका देवाल्यांतील देवदासी मोहना, स्वत:ला पुत्रसंतति नसतां
रूपी नांवाच्या बटकोचा एक मुलगा जवळ करून तो आपलाच पुत्र असें सांगून
कोयाजी घाटग्याच्या कुटिल संमतीनें त्या दासीपुत्राळा ( तो इतिहासांत
काटराजा या नांवानें प्रसिद्ध आहे ) तंजावरच्या गादीवर बसविण्यासाठी
नान्ना कारस्थाने करणारी अपरूपा राणी, या स्त्री-भूमिकाही पूर्णपणें ऐति-
हासिक आहेत. करुणा राणी, झंझारराव, सच्चिदानन्द वगैरे अवान्तर व्यक्ति
काल्पनिक असल्या तरी त्या इतर प्रमुख ऐतिहासिक व्यक्तींच्या व मुख्य इति-
हासम्रसंगाच्या पुरक आहेत. त्यामुळें कथानकांतील ऐतिहासिक ओघ बद-
लणार नाहों व त्याला वैगुण्यही येणार नाहीं, अशी शक्य ती खबरदारी
घेण्यांत आली आहे. शिवाय ऐतिहासिक कादंबरी म्हणजे खरा इतिहास
नसून इतिहासाची आभासात्मक स्थूल रूपरेखा होय, इतकें विस्तृत कथाक्षेत्र
म 'कादंबरीमय पेशवाईच्या पहिल्या कादंबरीपासून आंखून घेतलेले आहे,
हे. माझ्या वाचकांना माहीत आहेच.
'पेशवाईवरीळ गंडांतर' ही 'कादंबरीमय पेशवाई'मधील बारावी कादंबरी
भ्रसिद्ध झाल्यानंतर ही तेरावी कादंबरी प्रसिद्ध होण्याला दोन वर्षांपेक्षा जास्त
भमिका घु
अवधि लागला व त्यामुळें या कार्याविषयीं अनेकांना शंकाकुदंका काढण्याला
अवसर मिळाला. कांहींदी अशी गेरसमजूतही होऊन बसली कीं-गेल्या वर्षी
त्यांपेकीं एका गृहस्थाने महाराष्ट्र-वाऊमयाचा सांवत्सरिक आढावा घेतांना
“मराठींत ऐतिहासिक कादंबऱर्यांविषयीं लोकांना आतां विशेष आवड
राहिली नाहीं. त्यामळे ऐतिहासिक कादंबऱ्या मराठींत अलीकडे प्रसिद्ध
होत नाहींत. याचें प्रत्यंतर म्हणजे श्री. हडप यांच्या कादंबरीमय पेशवाई
मधील एकही कादंबरी' या वर्षी प्रसिद्ध झाली नाहीं.” अद्या आशयाचे उद्गार
आपल्या लेखांतून काढले. दुसर्या कांहींनीं मला लेखकालाच दोष दिला;
द खुट्ट माळेचा वाचकवर्ग तर मी आणि 'कादंबरीमय पेशवाई'चे प्रकाशक या
दोघांवरही थोडा फार रुष्ट झाला आहे. हा रुष्टपणा अर्थात् आपुलकीचा
आहे; मालेंतून साधारणत: दर तीन महिन्यांनीं एक कादंबरी प्रसिद्ध करा-
वयाची या आमच्या पुर्वसंकल्पानुसार कार्य मुळींच होत नाहीं याबद्दलचा
तो रुष्टपणा आहे. त्यांत वाचकांची '“कादंबरीमय पेशवाई” विषयींची
उत्कंठा व आपुलकीच ठळकपणें दिसून येत आहे. व म्हणूनच आम्ही--
लेखक व प्रकाशक दोघेही वाचकांचा तो रुष्टपणा शुभाशिर्वाद म्हणून अत्या-
दराने शिरीं धारण करून हें कार्य आजवर अपरिददार्य कारणांमुळे दिरंगाईवर
पडलें होतें त्याबद्दल वाचकांची मनःपुर्वक क्षमा मागतों व यापुढे अशी दिरं-
गाई वाचकांना अनुभवावी लागणार नाहीं असें त्यांना आश्वासन देतों.
सात्र * सरासरी गुडघाभर पाणी ' अशी वाडमयाची सरासरी काढण्यासाठी
'कादंबरीमय पेशवाई'चा आधार घेऊन, ज्या अर्थी या मालेंतील कादंबऱ्या
अलीकडे प्रसिद्ध झाल्या नाहींत त्या अर्थी वाचकांची ऐतिहासिक कादंबऱ्यां-
विषयींची आवड ओसरत चाळली असे अदूरदर्शीपंणाचे अंदाज काढणाऱ्या
व इतर सर्वे शंकेखोरांना आणि टीकाकारांनाही मी येथें स्वानुभवाने नम्गरतापूर्वक
सुचवूं इच्छितो कीं त्यांचा हा युक्तिवाद सुतराम् खरा नाहीं. एवढें खरें आहे
कीं, काळ झपाट्याने पालटत आहे, त्याप्रमाणेंच नव्या पिढीची रुचिपालटही
होत आहे; तरुण पिढी झपाट्यानें प्रगतिपथाचें आक्रमण करीत आहे.
अश्या वेळीं पुराणेतिहासांतील “ शिळोप्याच्या गोष्टी ' वाचण्यापेक्षा आज-
कालचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न ज्यांत करण्यांत आला आहे अश्या सामाजिक
केथा--कादंबऱ्या वाचकांना वाचावयाला आवडतात. आणि वाचकांकडून मजवर
न भूमिका
*“१४५-४0%.४४-४१५-४ १.” ४५//. ४_१५, ५,५१५ ११५ ८ ४ ८४५0९. १.५४. ४_५९./१५ /0५/०१.” १५ ४. १ “0-४ ४८४४.” १५/%- ८ण- “६.४५. ४ ४० ४.४ ४.४ ४-0 “५८ “४६-४४.” ५-/"-/४*-०" ४" “0४-१४ ४८८४-४४. ४८४ ७-८ ६. ४८४ ची
आत्मप्रोढीचा आरोप लादला जाणार नाहीं अशा भरंवश्ानें मीही सांगतों कीं
मला स्वतःला देखील “शिळोप्याच्या गोष्टी' मुळींच आवडत नाहींत. तथापि
प्रगमनश्ील कुशल लेखक जर पुराणेतिहासांतील परंपरागत शिळेपणा दुर
करण्यासाठीं देश-काल-परिस्थितीशीं त्या शिळ्या गोष्टींचा योग्य समन्वय
करून आणि वर्तमानकाळ व भविष्यकाळ यांकडे तजर देऊन आज व उद्यांही
मार्गदर्शक होईल असें पौराणिक व ऐतिहासिक कथावाडमय निर्माण करील,
तर तें निःसंशय लोकमतप्रवर्वक होतें व तें वाचकांना आवडतेंही. 'कादं-
बरीमय पेशवाई मधील कादंबऱ्यांची रचना मी प्रारंभापासून याच जाणि-
वेनें करीत आलों आहें, व त्यामुळेंच सहस्त्रावधि वाचकांना ही माला
कधीं एकदां यथावत पूर्ण होते आणि या मालेंतील संकल्पित पंचवीस
कार्दबर्यांपैकीं तव॑ कादंबऱ्या कधीं एकदां वाचावयाला मिळतात अद्यी तळ-
मळ लागून राहिली आहे.
इतर सामाजिक कथा-कादंबर्या लिहिण्यापेक्षा ऐतिहासिक कादंबऱ्या
सूळ इतिहासांतीळ शिळेपणा दूर करून पण ऐतिहासिकता कायम ठेवून
व सत्यविवेचनात्मक परंतु जिवंत अद्या पद्धतीनें लिहिणें बरेंच अवघड आहे.
सामाजिक कथा-कादंबऱ्यांतून लेखकाला आपल्या कल्पनांच्या खेळाचा पसारा
जसा निरंकुशपणें मांडतां येतो, तसा ऐतिहासिक कादंबऱ्यांतून मांडतां येत
नाहीं. यामुळें सामाजिक कथा--कादंबरी-लेखन जितक्या झपाट्याने करतां
येते, तितक्या झपाट्याने ऐतिहासिक लेखन करतां येत नाहीं. गेल्या दोनतीन
वर्षांत पेशवाईवरील कादंबरी एकही निघाली नाहीं,पण माझा इतर वाडःमय-
पसारा बराच वाढला याचें कारण हेंच होय. तथापि यापुढें कादंबरीमय पेशवाई'
मधील कादंबऱ्या आतां नियमितपणे दर तीन महित्यांनीं एक याप्रमाणें पूर्व-
संकल्पानुसार माझ्या हातावेगळ्या होतील असें मी येथें माझ्या प्रिय वाचकांना
आडइवासन देऊं शकतों. कारण ही तेरावी कादंबरी हातावेगळी करतांना
'पेशवाईचा पुनर्विकास' ही माढेंतीळ चौदाबी कादंबरी लिहून तयार
असून पुढील पंधरावी कादंबरीही बहुतेक पुरी झाली आहे. कोणत्याही
कारणाने कां असेना, एकदां रेंगाळत पडलेळें माठेच्या प्रसिद्धीकर-
णाचें काम पुन्हां सुरू करावयाचे तें “याला पुन्हा अस्थानी विलं-
बांचे गालबोट लागूं नये अह्या तयारीतेंच सुरू करावयाचे असें मीं
भमिका ७
प्रकाशकांच्या, माझ्या व वाचकांच्या वतीर्ने ठरवून ही नियमित-
पणाची पूर्वतयारी केली आहे, अर्थात यापुढे 'कादंबरीसथ पेशवाई'
मधील कादंबरत्रा नियसितपर्णे यथासकल्प प्रसिद्ध होत जातील असा
भरंवसा वाचकांनी बाळगावयाला मुळींच हरकत नाहीं असें वाटते.
वाचकांपेक्षा प्रकाशकांना व प्रकाशकांपेक्षां मला हें कार्य शक्य तितकें सर्वांग-
सुंदर व शक्य तितर्क्रे लवकर हातावेगळें केव्हां होतें अशी तळमळ लागून राहिली
आहे. 'कादंबरीमय हिददी' हें माझे अत्यंत प्रिय असें जीवितकार्य आहे, व
* कादंबरीमय पेशवाई' हा त्या जगड्व्याळ कार्याचा एक भाग आहे.
चाचकवंदालाही माझी ही वाड्मयसेवा अत्यंत प्रिय होऊन बसली आहे.
हें कार्य नियमितपणे झाले तरच माझ्या या जन्मीं हातावेगळें होईळ एवढें
विराट आहे, व हें कार्य केल्याशिवाय मी इहलोकची यात्रा संपविण्याला तयार
नाहीं. ऐन तारुण्यांत मीं एथवरची मजल गांठली आहे, त्या अर्थी ह॒यातींत एवढं
हे 'कादंबरीसय हिंदवी'मधील सुमारें चाळीसपन्नास ऐतिहासिक कादंबऱ्यांचे
लछेखनकार्य मी माझे इतर सर्व साहित्यविषयक व्याप सांभाळून पूरे करीन अज्ञी
उभेद बाळगल्यास ती अस्थानीं खास होणार नाहीं.
आदर्श वाडमय प्रकाशन |
अक्षतवितीया, शके १८५६ - गि सर्वांचा नम्तर,
_ पुणे २. | विठ्ठल वामन हडप
'कादेबरीमय पेशवाई'ची पुढील चौदावी कादंवरी
पेशवाईचा पुनर्विकास
ह्या,
थोरल्या बाजीरावांच्या निधवानंतर राजवटीं-
तल्या प्रमाणेच शाहु महाराजांच्या राजवाड्यांतही
सवतीमत्सरामुळें व अधिकारतृष्णेमुळे दोन
राण्यांतील अंतःकलहाची परमावधी झाली.
रघूजी भोसले व बारामतीकर नाईक यांनीं
थोरल्या राणी सकवारबाईच्या छायेखालून
नानासाहेबांना पेशवाईपदावरून भ्रष्ट करण्याची
शिकस्त केली. त्या विरोधकांच्या संघटित
प्रयत्नांना कांहीं काळ यश आलें, तरी पुन्हां
नानासाहेबांनाच बोलावून आणून राज्यकारभार
त्यांच्या हातीं सोंपविणें महाराजांना प्रास्त झाले.
त्या हूदयस्पर्शी प्रसंगावर ही कादंबरी विरचिली
गेली आहे.
शं
१- 4१-०9 तव......2>४७>& >४..:2 > ०-.--:51.352 “च्य -म्स्नन्य २ 5290 मळ ::&.102..99ााळानाळाळळळा र
2०70-27 -.--_:-:--.----न्-
४ ७६... अक काक
प्रकरण १ लं
राणी मीनाक्षी फंसली !
न्यिचनापल्लीचा किल्ला* एवढा अजिक्य-कर्नाटकांत फार पुर्वीपासून केक
दतरके अजिक्य म्हणून जे किल्ले प्रख्यात होते,त्यांत अग्रस्थानी चमकणारा
मी मी म्हणणारे एकाहून एक कर्दनकाळ शत्रू अनकदां तो किल्ला पाडाव
करण्याच्या ईषेनें जिवावर उदार होऊन चालून आले. त्यांतले कांहीं किल्ल्या-
बाहेर बळी पडले तर कांहीं किल्ल्याच्या दरवाजांत हात टेकून माधारे गेले;
पण शत्चूकडील मुंगीलादेखील कधीं आंत रीध मिळाली नाहीं. त्याच किल्ल्याचा
दरवाजा एके दिवशीं एका अधमाधम म्हणून गाजलेल्या अविधासाठीं एका
लर्णांत सताड उघडा झाला व त्या अविधाला आपल्या बरोबरच्या लढवय्या
__ & त्रिचनापल्ली एथे नायक राजे राज्य करीत पस्य एर्थे नायक राजे राज्य करीत असतां तेथील
शेवटचा राजा विजयरंग हा इ. स. १७३१ त मृत्य पावला व त्याच्या गादी-
विषयीं त्याची राणी मीनाक्षी आणि दुसरा वारस वंगारू तिरुमल यांच्यामध्ये.
तंटे सुरू ज्ञाले. ही उत्कृष्ट संधि साधून अर्काटच्या नवावानें आपला मुलगा
सफदरखान व जांवई चंदासाहेब यांस त्रिचनापल्ली एथील तंटा मिटविण्या-
करितां पाठविलें. चंदासाहेबाने तेथें जाऊन मोठ्या युक्तीनें राणी मीनाक्षी
हिला अनुकूल व वद्य करून घेतलें; आणि त्रिचनापल्ठीचा किल्ला व फौज
आपल्या ताब्यांत घेऊन त्या राजस्त्रीला विशवासघातानें बंदिवासांत टाकलें.
याप्रमाणे चंदासाहेब त्रिचनापल्लीचा स्वसत्ताधारी नबाव बनळा आणि
राणी मीनाक्षी ही बंदिवासांत दु:खाश्चू गाळीत आपल्या आयुष्याचे दिवस
कॅटू लागली... .. अशा प्रकारें इ. स. १७३६ मध्ये तंजावरच्या शेंजारचें
त्रिचनापल्लीचे प्राचीन हिदु संस्थान चंदासाहेबाच्या ताब्यांत गेल्यामुळें
त्याचें नांव दक्षिण हिंदुस्थानामध्यें प्रसिद्धीला आले व तिकडील राजकारणा-
मध्ये त्याचे महत्त्व फार वाढलें. "णइतिहाससंग्रह.
२ पेशवाईचे मन्वंतर
सेन्यासह हंसत खेळत किल्ल्यांत प्रवेश मिळाला ! इतकेंच काय ? पण
तो अविध आंत जातांच अनेक सृंदर व तरुण राजदासींचा ताफा त्याला पंचा-
रत्या ओंवाळण्यासाठीं पुढे आला, व त्या दासीजनांनीं कुंकुमाक्षतादि मंगल
चिन्हांनी अलंकृत केलेल्या त्या अविधाचें स्वागत करण्यासाठीं स्वतः राशी
मीनाक्षी देखील सस्मित वदनानें किल्ल्यांतीलळ राजमहालाच्या महादार्रांत
उभी होती ! |
असें कसें झालें ? याचें कारण असें कौ, अर्काटचा नबाब दोस्तअल्ली
_ हा तर अखिल भारतवर्षातील हिंदवीला मूठमाती देऊन जिकडे तिकडे इस्लामी
दुनियेचा जगडूव्याळ पसारा मांडण्यासाठी हरयुक््तीनें झटणाऱ्या बादशाही
सत्ताधारी यवनांत अग्रमालिकेंत शोभणारा. आणि तोदेखील बादशाही
सत्तेच्या उत्कर्षासाठी झटत नसून स्वतःच्या वेयक्तिक उत्कर्षासाठी झटत
होता. 'मी अर्काटचा नबाब आहें तो उभ्या कर्नाटकाचा नबाब होऊन स्वतंत्र-
. पणे अपार राजवेभव कधीं उपभोग लागेन' हया महत्त्वाकांक्षेचें वेड त्याच्या
अंगीं पुरेपूर बाणलेलें. तो कर्नाटकांतील सर्वेच लहानमोठ्या हिंदु राजसत्तांना
रावंदिवस पाण्यांत पहात होता. त्याचा जांवई चंदासाहेब हा तर आपल्या
सासऱ्यालाही सहस्रवार बरा म्हणविणारा होता. त्याची तडफ व हिंदु राज्यें
बुडवून सवेत्र एकजात मुसलमानी सत्तेचा वरवंटा फिरविण्याची दुर्देम ईर्षा
पाहूनच दोस्तअल्ली नबाबानें त्याला आपली मुलगी देऊन घरजांवई केलें होतें
व आपल्या दिवाणपदाचीं वस्त्रे देऊत त्याला मोठ्या मान्यतेला चढविले होतें.
नबाबाचा धघरजांवई झाल्यापासून चंदासाहेबानें कर्नाटकांत जीं अनन्वित
कृत्यें केलीं होतीं त्यांचा दुष्कीतिमय दुर्गंध नुसत्या कर्नाटकांतच नव्हे, तर
जवळजवळ आसेतुहिमाचल दरवळूं लागला होता. हिंदु काय, मुसलमात
काय किंवा इंग्रज-फ्रेंच वगेरे वणिग्वत्तीच्या ब्रख्याखालीं आपल्या राज-
सत्तेचें जाळें हिंदुस्थानभर प्फॅकण्याला टपून बसलेले परद्धीपस्थ लोक काय,
सर्वांनाच चंदासाहेब हें एक सर्पाचे पिल्लं आहे असें खात्रीपूर्वक वाटत होतें
अश्या कलिपुरुषाला त्रिचनापल्लीच्या किल्ल्यांत अनिरुद्धपणें प्रवेश मिळालेला
पाहून कोणालाही आइचर्ये वाटणें अगदीं स्वाभाविक होतें
पण ह्या प्रकारामुळे किल्ल्याबाहेरच्या लोकांना जितर्के आश्चर्य वाटलें
तितकें किल्ल्यांतल्या लोकांना वाटले नाहीं. ' चंदासाहेबाला किल्ल्यांत
राणी मौनाक्षी फेसली ३
प्रवेश कां मिळाला हें त्या लोकांना माहित होतें. तेथली तरुण, विधवा व
विलासप्रिय राणी मीनाक्षी चंदासाहेबाच्या मोह॒जालांत गुरफटली गेली आहे
हें त्यांतील इंगीत किल्ल्यांतल्या बहुतेक लोकांना कांहीं दिवसांच्या प्रत्यक्ष
अनुभवानें कळून चुकलें होते. तेथला राजा विजयरंग हा मृत्यु पावल्या-
दिवसापासून त्या तरुण रागीच्या वर्तनाविषयीं लोकांना संशय घ्यावयाला
भरपूर अवसर मिळण्याजोग्या अनेक गोष्टींचा बोभाटा झाला होता. राजाच्या
मृत्यूनंतर कांहीं काळ राणी मीनाक्षीच राज्य करीत होती. असा प्रकार
कांहीं वर्षे चालल्यानंतर वंगारू तिरुमल या नांवाचा दुसरा एक वारस पुढे
येऊन गादीसाठीं भांडं लागला व ही भाऊबंदको राज्याचे अंतरंग दिवर्से-
दिवस चांगलेंच पोंखरून खाऊं लागली. ही संधि तें राज्य गिळंकृत करण्याला
फार नामी आहे असें पाहून नबाब दोस्तअल्लीनें चंदासाहेबाला त्रिचनापल्ली-
कडे तिर्ऱ्हाइती करून तेथली भाऊबंदकी मिटवण्याच्या मिषाने पाठविलें.
नवाब मोठा धूर्ते व अतुभवी माणूस होता. विजयरंगाच्या मृत्यूपासून पुढे
वांगलीं पांचसात वर्षे त्यानें त्या राज्यांतील घडामोडींकडे डोळ्यांत तेल
घालत लक्ष ठेवलें होतें. त्यासळे तरुण राणीची विषयांधता व वत्तिचांचल्य
आणि तिला प्रतिस्पर्धी म्हणन पढे आलेल्या तिरुमलाची असहायता त्याला
चांगली माहीत झाली होती. चंदासाहेबाची स्त्रियांच्या बाबतींतील नेसगिक
अधम वृत्तीदेखील नबाबाच्या पूर्ण परिचयाची होती. असे असतां पांचसात
वर्षांपावेतों नबाबानें ह्या बाबतींत कांहींच हालचाल केली नाहीं याचें कारण
राणी व तिरुमल यांपैकीं कोणता घांस आपणाला दांत लावण्याचे देखील
श्रम न घेतां घशांत टाकतां येईल याचा अचूक अंदाज त्याला मिळाला नव्हता
राणी कशी झाली तरी बायको माणस, तिच्या अंगीं राज्यकतेत्व तें काय
असणार ! तिचा प्रतिस्पर्धी तिला आज ना उद्यां बाजला लोटन स्वतः:
राजा होण्याइतका चतुर व कर्तबगार होता. न जाणो, आज त्याला दृखवन
राणीला पाठीशीं घालावे, आणि उद्यां त्याचीच सरशी झाली तर! ह्या
भीतीस्तव नबावाच्या मनांतून तिरमलालाच शक्य तों आपल्या पंखाखाली
ओढावयाचें होतें. परंतु जाणूनबुजून शत्रूच्या जवड्यांत शिरून तेथें झोंपी
जाण्याइतका तिरुमल भोळा नाहीं असें आढळून येतांच राणीला व तिच्या
निमित्ताने त्रिचनापल्लीच्या राज्याला घक्यांत टाकण्याचा त्याचा निश्चय
9 पेशवाईचे मन्वंतर
न“ > >“ ">
कायम होऊन त्याने त्या कामगिरीवर आपला जांवई चंदासाहेव आणि मुलगा
वाजूंनी सफदरअल्लीपेक्षां पुष्कळच उजवा असल्यानें राणीला वश करण्याच्या
कुटिल कारस्थानांत तोच अखेर विजथी झाला व सफदरअल्लीला हिर-
मसल्या वृत्तीनं माघारें यावें लागलें.
चंदासाहेबानें आज उघडपणें त्रिचनापल्ल्लीच्या किल्ल्यांत प्रवेश करण्या-
पूर्वीच परस्पर संन्या्याच्या हातून विचू मारावा त्याप्रमाणें राणीकडून तिचा
प्रतिस्पर्धी तिरमळ याला हहपार करविले होतें. तिरुमलाला नबाब व
चंदासाहेब यांच्या ह्या कृष्णकारस्थानाची चांगली ओळख पूर्वीच झाली
असल्याने त्यानें हद्दपार होण्यापूर्वी एकदां राणीपाशीं त्याचा आपलेपणाने
परिस्फोट करून तडजोडीची इच्छाही दर्शविली होती. पण कामांध राणीला
ती आपल्या प्रियकराची वृथा निदाशी वाटली, व तिनें तिरुमलाशीं तडजोड
न करतां उलट त्याला हह्पार केलें.
मात्र राणी जरी विषयांध होती तरी भोळी नव्हती. ती चंदासाहेबासारख्या
प्रियकराच्या सहवाससोौख्यासाठीं आपल्या राजवेभवावर लाथ मारायला
तयार नव्हती. चोहोंकडून लोक चंदासाहेबाच्या कृष्णकारस्थानाविषयीं बोल्यू
लागले, त्याचा तिच्या मनावर मुळींच परिणाम झाला नाहों अर्से नाहीं.
पण मुसलमान लोक हे एरव्ही लबाडी, फंसवाफंसवी व क्र्रपणा अशीं कितीही
अनन्वित कृत्ये करायला तयार झाले तरी ते आपल्या धर्माशीं कधींच बेइमान
होणार नाहींत, असा तिचा प्रामाणिक समज होता. तिनें चंदासाहेवाला
किल्ल्यांत प्रवेश देण्यापूर्वी एके दिवशीं एकान्तांत ' तुम्ही किल्ल्यांत आल्यावर
माझ्याशी बेइमानी तर करगार नाहीं ना?” असें विचारलें व त्या निमित्ताने
आपल्या कानांवर आलेले सारे लोकप्रवाद त्याच्या कानांवर घातले. चंदा-
साहेबानें अर्थात् त्या सर्वे आरोपांचा इन्कार केला. इतकेच काय पण आपल्या
निर्दोषतेर्चे नाटक यथावत् रंगावें म्हणून कुराणाच्या शपथेवर राणीशीं इमान
राखण्याचें वचन देण्याला तो तयार झाला. त्याला वाटलें होतें कीं राणी
त्या थराला प्रसंग आणणार नाहीं. पण राणीला तें पाहिजेच होतें. तिनें
कुराणाची दापथ घ्यावयाला सांगतांच त्यानें आपल्या एका नोकराला अंमळ
वाजला घेंऊन प्रथम हळुहळू कायसे त्याच्या कानांत पुटपुटून लगेच राणीला
राणी मीनाक्षी फंसली प्र
0१-0४". ५-८ ६.५ १५८४१७५ १. 00०४-०१-४१ ४४७४७०४७७० “0४-०९” ४०००५ ४-०"४/४५७४७४ ४७४४५४७ ४” मिरा क्य
एकू जाईल अद्या मोठ्याने त्याला कुराण आणावयाला सांगितलें. नोकराने
भरजरी बासनांत बांधून आणलेलें कुराण (? ) हातीं घेऊन त्यार्ने राणीच्या
देखत नतमस्तकपुर्वेक शपथ वाहिली, “ हया माझ्या पवित्र क्राणाला स्मरत
मी आपणाला वचन देतों, राणीसाहेब मी आपणाशीं आजनत्भ विदवासानें
वागेन व त्रिचनापल्लीची सारी राजसत्ता! आपल्या हातीं अव्याहतपणे राहील
अशी तजवीज सी करीन. ”
त्याच वेळीं राणीने पुढेमागे आपल्या मांडीवर दत्तक घेऊन त्याच्या नांवानें
राज्य चालविण्याचा आपला मनोदय व्यक्त केला,व त्या तिच्या धूर्ते प्रियकराने
त्याही गोष्ठीला कुराणाच्या शपथेनें संमति दिली. आतां राणीला अविश्वास
बाळगण्याचे कारण कोठें उरलें ? इतकेंच काय पण राणीतें आपल्या सर्वे
कारभार््यांनाही आपली ही सर्व मसलत कळविली व त्यांपैकीं बहुतेकांनी
तिच्याप्रमाणेंच भोळेपणानें चंदासाहेबाच्या शपथेविषयीं विश्वास दाखविला.
ज्या थोड्या महत्त्वाच्या लोकांनीं याविषयीं अविश्वास दाखविला, त्यांच्या
वाट्याला तुरुंगवास आला, व कांहींचा तर किल्ल्याच्या तटावरून कडेलोटही
करण्यांत आला.
इतक्या खुल्या दिलाने एकमेकांच्या आणाभाका झाल्यावर त्रिचनापल्लीच्या
किल्ल्यांत चंदासाहेबाला राजरोसपणें घरच्या मालकाप्रमाणें प्रवेश मिळाला
यांत नवल तें काय ? पण किल्ल्याच्या आंत प्रविष्ट होतांच सूर्यास्ताच्या
पुर्वीच चंदासाहेबानें आपलें खरें स्वरूप प्रगट केलें. किल्ल्यावरील कोणते लोक
आपणाला अनुकूल आहेत व कोणते प्रतिकूल आहेत हें त्याला इतक्या दिव-
सांच्या अनुभवानें चांगलें माहीत होतें. जे लोक अनुकूल होते, त्यांना त्यानें
ज्याच्या त्याच्या अपेक्षेप्रमाणे खूष केलें. जे अर्धवट निश्चयाचे पण स्वार्थ-
साधू होते, त्यांनाही त्यानें हां हां म्हणतां आपल्या बाजूला वळवून घेतले
मात्र जे विरुद्ध होते, त्यांची सर्रास कत्तळ करून आपल्या प्रतिस्पर्धी पक्षाचा
नायनाट करायला त्याने कमी केले नाहीं. राणीला हा अनर्थ पाहून अत्यंत
विस्मय वाटला. तिनें त्याला त्या कृत्याचा जाबही विचारला, “ माझ्यावर
तुमचें प्रेम होतें, त्या प्रेमाचा हाच अर्थ काय? ”
यावर त्यानें खुनश्शीपणानें हंसून तिला उत्तर दिलें, “ राणीसाहेब !
माझें प्रेम तुमच्या दोलतीवर होतें, तुमच्यावर नव्हतें. मला विलासविहारांची
न पेशवाईचे मर्न्वंतर
ञवड आहे खरी; पण माझ्या जनानखान्याला पुरून उरण्याईतक्या सुंदर
व तरुण मुली तुमच्या राज्यांत मळा मिळण्याजोग्या असतांना मी तुमच्या
ठायींच कां म्हणून आसक्त राहुं ? रोज तीनत्रिकाळ ताज्या ताज्या सुवासिक
फुलांची पखरण पायांवर पडावी इतका मी थोर भाग्यवान् असतांना निर्माल्यां-
तीळ कोमेजलेल्या फुलावर मीं संतोष कां म्हणून मानावा? ”
त्याच्या त्या परमावधीच्या निष्ठुर बोलांनीं बिचाऱ्या राणीच्या हृदयाचे
दातशः तुकडे तुकडे केले. आपण फंसलों, ह्या विश्वासघातकी चांडाळानें
आपला केंसानें गळा कापला, हें ती पक्के ओळखून चुकली. तिनें त्याला
काकुळतीला येऊन विचारलें, “ विदवासघातक्या, तूं माझ्याशीं बेइमान
झालास तो झालास; पण आपल्या धर्माशींदेखील बेइमानी करतोस! तृ
अस्सल मुसलमान नाहींस. ”
“मी अस्सल मुसलमान आहें. मीं माझ्या धर्माशी बेइमानी केलीही
नाहीं व मरेतों करणारही नाहीं. ”
“ तर मग तूं सकाळींच माझ्यापाशी कुराण हातीं घेऊन शपथ घेतलीस
त्याचा अर्थ काय? ” ज्या महालांत त्या दोघांची सकाळीं भेट होऊन शपथेचा
खेळखंडोबा झाला होता, त्याच महालांत त्या दोघांचे आतांचें संभाषण
चाललें होतें. सकाळचे तें भरजरी बासनांतलें कुराण अजून तिथेंच पडले
होतें. तें हातीं घेऊन राणीनें चंदासाहेबापुढे करून विचारलें, “ ह्या तुझ्या
पवित्र धर्मंग्रंथाची तरी कांहीं लाज राख! ”
चंदासाहेबाने विकट हास्य करीत राणीच्या हातांतून तें बासन हिसकावून
घेतलें व तें उलगडून तिच्यापुढे फेकीत म्हटलें, “ज्या कुराणाची शपथ मीं
सकाळीं घेतली तें हें कुराणपहा ! ”
तें कुराण नव्हतें; ती जरीच्या वासनांत गुंडाळलेली मातीची वीट होती !
राणी तो प्रकार पाहून जास्तच खवळली व चंदासाहेबाळा अगणित शिव्या-
शाप देऊं लागली. पण त्याचा परिणाम काय झाला? त्याच क्षणीं त्या
विश्वासघातक्याच्या मुखांतून निघालेल्या हुकुमासरसा बिचारीच्या कपाळीं
जन्माचा बंदिवास आला. शिपायी तिला धरून केदखान्याकडे नेऊं लागले
तेव्हां जखमेवर मिठाचे पाणी शिपडावें त्याप्रमाणें त्या मदोन्मत्ताने आणखी
उ गार काढले, “ मूर्ख स्त्रिये, मला विरोध करणाऱ्या सवे मकेटांचा जसा
राणी मीनाक्षी फसली ७
मीं आज कडेलोट केला, तसाच तुझाही केला असता. पण ह्या एथली
राज्यसत्ता एकतंत्री माझ्या हातीं येईपावेतों मला तुझी गरज आहे, म्हणून
तुला जिवंत ठेवीत आहें. ”
अश्या प्रकारें ती अभागी राणी आपल्या राजधानींत बंदिवान होऊन
पडली; व दुसर्या दिवशीं सकाळीं सारे लोक पहातात तों किल्ल्यावर नायक
राजवंश्याचा झेंडा जो नेहमीं हवेंत फडकत असे, तो नाहींसा होऊन त्या जागीं
अर्काटच्या नबाबाचा रंगीत झेंडा फडकं लागला ! अवघ्या ओट
छटकांत त्या प्राचीन हिंदु राज्याचा असा विध्वंस झालेला पहाण्याचे सहखररिम
सूर्याच्या जिवावर आलें म्हणूनच कौ काय, दुसर्या दिवशीं आकादह्यांत
काळ्या कुट्॒ ढगांचे काहर उसळून एक प्रहरभर सूर्यदर्शनही झालें नाहीं !
टॅ पेशवाईचे मन्वंतर
"१-८ ५७४५४ ४-९ ०८१४” 0. ५-/५” "५१५ "५ ५८ ५.८ - ४-८ ५ ४-५ ५९१.” * “% ८ ८. ५५ १-८ ४५ ८. * ८ १.० ५.८ ४. ५.» ४-० ४८-१५. १.८१ ४८.८ ९-० ७.० ४-४ ४-७ यची 39.०. ६/१/५/२०८१
प्रकरण २ रं
तंजावरची कहाणी
४; चनापल्लीच्या हिढू राज्याची दुर्दशा करण्यांतच चंदासाहेबाचा ग्रमुर
हात होता असें नाहीं, तर जवळचेंच तंजावरचें हिंदु राज्यदेखील त्याच्य
किवा याहीपेक्षा स्पष्ट भाषेंत बोळावयाचें तर बांडगुळाप्रमाणें हिंदु समाजाच्य
प्रचंड वृक्षाचा जीवनरस शोषण करून सामर्थ्येवान् झालेल्या अनेक सत्ताधार्र
मदोन्मत्त मुसलमानांच्या डोळ्यांत सलत होतें व हिंदवीचें निर्मूलन कोणत्य
उपायांनीं करतां येईल याविषयीं जो तो डोळ्यांत तेल घालून झटत होता
या बाबतींत कोणताही पाशवी प्रयत्न करण्यांतदेखील त्या प्रांतांतील मुसव्ल
मान कोणाला हार जाणारे नव्हते, हें वाचकांना चंदासाहेबाच्या उदाहरणावरून
आढळून आलेंच आहे. तसाच तंजावरच्या राज्याविरुद्धही ह्या मानर्व
प्राण्यांनी कसा बेमालूम व्यूह रचिला होता व त्याचीं पाळेंभुळें किती खोर
गेलीं होतीं, याचें यथावत् ज्ञान करून देण्यासाठीं एथें प्रथम तंजावरची कहार्ण)
तिवेदन करणें अवश्य आहे.
शिवद्याहीच्या प्रथम चरणांत कर्नाटकांत मराठ्यांचा दरारा चांगळा*च
गाजला व शिवशाहींत छत्रपति म्हणून दिगंतीं प्रख्याति पावलेल्या भोंसले
राजवंशांतील कांहीं पराक्रमी पुरुषांच्या हस्ते तंजावर एथें मराठी राज्याःची
स्थापदा झाली. त्यावरोबरवच इतर अनेक कर्तेबगार मराठ्यांनींही
अपार मान-धन-वैभवाची जोड संपादन करून त्या प्रांती वास्तव्य केलें. त्यांतच
घोरपडे वंक्षाची प्रासुख्यानें गणना होते. मराठी अंमलाची ही भरभराट
कर्नाटकांत संभाजी व राजाराम ह्या दोघां छत्रपतींच्या अमदानींत ओहोटीला
लागली, व मराट्यांच्या उद्योगाला आळा बसल्यानें कर्नाटकप्रांतीं बादद्याही
सत्तेला पुन्हा डोकें वर काढण्याला अवसर मिळाला. वस्तुत: मोगलांचा
कर्नाटकांतील उद्योग मराठ्यांच्या पुर्वीचा होता. फार प्राचीन काळापासून
दक्षिण हिंदुस्थानांत अनेक प्रबळ हिंदु राजांची सत्ता होती, त्यावेळीं निरनिराळ्या!
ठिकाणीं जमाबंदीच्या वगेरे कामावर जे अंमलदार नेमण्यांत याले
होते, ते तीं राज्ये नष्ट झाल्यावर देखील तेथेंच वंशपरंपरागत वतने सांभा-
तंजावरची कहाणी न
२. /* “४ ४ “0१५ 770१-४१.” * “०४-५४.” “ ४४ “7"./0४५/*%./५ “४५१५ “0४५0 0 रोक कॉमेडियन अक
ळून राहिले. त्यांना पुढें पाळेगार अथवा संस्थानिक ही संज्ञा प्राप्त झाला
अवरंगजेव बादशहानें कर्नाटकावर बादशाही सत्ता प्रस्थापित करण्याचा
प्रयत्न केला. पण त्याला मराठ्यांनीं महाराष्ट्रांतच सवे बाजूंनीं दे माय
धरणी ठाय करून सोडल्यामुळें कर्नाटकांत आपला यथास्थित अंमळ बस-
विण्याला त्याला पुरेसा अवसर मुळींच मिळाला नाहीं. तेथल्या पाळेगारांनी
त्याला मुळींच दाद दिली नाहीं. परचक्र आलें कीं तेवढ्यापुरती नमाता
दाखवून खंडणी वगेरे देऊन आपला बचाव करावयाचा व मागे आपलें ये रे
माझ्या मागल्या आहेच. मराठ्यांनादेखील त्या प्रांती हाच अनुभव आला
त्यांनीं त्या प्रांती आपला दरारा वसविला खरा; पण तो अगदींच विस्कळित
स्वरूपाचा होता. वादश्ाही अंमलाची वावटळ जरी त्यांनीं थोपविली,
तरी बादशाही अंमलदार जे ठिकठिकाणीं आपले पाय रुजवून वसले होते;
त्यांची उठावणी करण्याचें राहन गेलें. औरंगजेब वाददाहाच्या पक्ध्चात
मृत्युपंथाला लागलेल्या दिल्लीच्या बादशाही सत्तेंत नवजीवन ओतण्याचे
कार्य निजामउल्मुलकानें केलें. पण हां हां म्हणतां निजाम इतका वलाढय
झाला कीं शेताची राखण करण्यासाठीं रोंवण्यांत आलेल्या कुंपणानेंच लेत
खाऊं लागावे, त्यांतली अवस्था निजाम व दिल्लीची वादह्याही सत्ता यांच्या
परस्पर संबंधाची झाली. मोडकळीला आलेल्या वादशहातींत निजाभानें
सवेसत्ताधारी होण्याच्या महत्त्वाकांक्षेनें प्रेरित होऊन आपला स्वतंत्र पंथ
काढला व दक्षिणेतील सहा बादशाही सुभ्यांचें राज्य त्याच्या ताब्यांत आले-
पण निजामाचीही वरीच शक्ति थोरल्या बाजीरावाच्या कारकोर्दीत
नर्धिष्णु मराठी सत्तेशीं झगडण्यांत खर्च होऊं लागली व त्याच सुमाराला
दिल्लीच्या मध्यवर्ती राजकारणांत हात शिरकवण्याची संत्रि मिळाल्याने
निजामार्चे बहुतेक सारें लक्ष तिकडे गुंतलें. त्यामुळें औरंगजेबाच्या अम-
दानींत दक्षिणेत जे सुभेदार नेमिले होते त्यांच्या हाताखालच्या अधिकाऱ्यांना
प्राचीन हिंदु राज्यांतील पाळेगारांप्रमाणेंच आपापल्या हुकमतीखालीळ
प्रदेशांत पाय रुजविण्याला फावलें. सुभेदारांच्या हाताखालील प्रांताधिकाऱ्यांना
नबाब अशी संज्ञा होती. असे नबाब अर्काट, शिरें, कडपें, कनूल व सावनूर
अशा पांच ठिकाणीं बळी तो कान पिळी? या न्यायाने जबरदस्त सत्ताधारी
होऊन वसले. पेकीं अर्काटचा नवाब हा त्रिचनापल्ली व तंजावर ह्या हिंडू
१० पेशवाईचे मन्वंतर
५९४५ ५» १.४४. » १ “९. “४.५५ ५7४.” १४७ “७ €% १४-४७
राज्यांना अगदीं नजीक असून विशेष तडफदार, हिंदुत्वाचा द्वेष करण्यांत
विशेष नि्ढवलेला, विशेष महत्त्वाकांक्षी असा असून शिवाय त्याला चंदा-
साहेबासारख्या समस्वभावी, अनेकावधानी व चतुर अश्या नातलगाची साथ
मिळाली. मग त्यार्ने कर्नाटकांत पाणी जाळण्याला सुरुवात केली यांत
नवल तें काय ?
चंदासाहेबांचें त्रिचनापल्ली एथील कुटिल कारस्थान जें पूर्वी निवेदन
करण्यांत आलें आहे, त्या कारस्थानाच्या उभारणीपूर्वीच अर्काटच्या नबाबाने
'कुऱ्हाडीचा दांडा गोताला काळ ' शोभणाऱर्या एका नीच वृत्तीच्या देशद्रोही
मराठ्याला हाताशीं धरून त्याच्यामाफंत तंजावरचे राज्य घशांत टाकण्याचे
एक कृष्णकारस्थान उभारळें होतें व त्याचें जाळे तंजावरच्या राजघराण्यांत
अंतस्थ रीत्या अत्यंत खोलपावेतों पसरलें होतें. जशी त्रिचनापल्लीच्या
नाशाला राणी मीनाक्षी कारण झाली, तशीच अपरूपा या नांवाची तंजावरची
एक अवलक्षणी राणी आपल्या मतें त्या कारस्थानाची सूत्रधार पण वास्तविक
यूत्रधारी नबाबाच्या हातांतील कळसूत्री बाहुली बनली होती. अपख्पा ही
तंजावरचे राजे सरफोजी महाराज यांची एक राणी. सरफोजींना आणखीही
कांहीं राण्या होत्या. पण त्या बिचाऱ्या सरळ वृत्तीच्या होत्या. पण
दुधाच्या हंड्यांत मिठाचा खडा पडावा आणि त्या एका खड्यामूळें हांडाभर
दुध नासून जावें, त्याप्रमाणे राणी अपखर्पा ही एकटीच त्या राजधराण्यांत
भाऊबंदकीचा वणवा पेटविण्याला पुरून उरली. सरफोजी राजांना तुकोजी
या नांवाचा एक धाकटा भाऊ होता. त्याला ईशकूपेने संततिसोख्य चांगल्या-
थेकीं होते. आणि सरफोजी राजांना मात्र संतति कांहीं नव्हती. संतति
नाहीं म्हणून जसें राजांना तसेंच त्यांच्या सर्वे राण्यांनाही वाईट वाटणे साह-
जिक होतें. परंतु अपख्पा राणीप्रमाणें इतरांनीं कधीं तुकोजीच्या संतति-
सुखाबद्दल मत्सर केला नाहीं. अपरूपा राणी मात्र आपण राजमाता व्हावें
ह्या महत्त्वाकांक्षेनें माथेफिरूसारखी वागू लागली. दु्देवाची गोष्ट ही को
ही राणी रूपवान व तरुण असल्यानें सरफोजी राजांची तिच्यावर फार मर्जी
होती. त्या मर्जीचा उपयोग अपरूपा राणीनें सरफोजी व तुकोजी ह्या बंधूंत
वितुष्ट आणण्याच्या कामीं करून घेतला, व तुकोजीला आपल्या कुटुंब-
परिवारासह तंजावरपासून दूर महादेवपट्टण एथें जाऊन रहावयाला भाग पाडले»
तंजावरची कहाणी ११
पण तुकोजीला घरभेंदेपणानें दूर लोटणें राणीच्या हातीं होतें तसें राजमाता
होशें कोठें होतें ? तरीही त्या बाबतींत देखील अजब कारस्थान रचण्याला
तिनें कमी केलें नाहीं. राजवाड्यांतील व बाहेरच्या कांहीं दुष्ट स्त्रियांची
संगत तिला होतीच. शिवाय तिचा माहेरकडून जवळचा आप्त कोयाजी
घाटगे हाही तिचा पाठीराखा होता. ह्या कोयाजीला हाताशीं धरून अर्का-
ट्या नबाबानें तंजावरच्या नाशाचें कृष्णकारस्थान कसे रचिले याचा
उलगडा पुढें यथाकालीं होईलच. ह्या कारस्थानाच्या जाळ्यांत अपख्पा
राणी गुरफटून गेली असतां कोयाजी घाटग्याच्या संमतीने तिनें स्वतः राज-
साता होण्याची शक्कल शोधून काढली. तिनें आपण गरोदर आहों असें कांही
दिवस ढोंग करून नऊ महिने जाऊं दिले व नऊ महिन्यांनंतर प्रसूत झाल्याचा
बहाणा करून एका कृत्रिम बालकाला ' जन्म! दिला. तंजावरच्या गादीला
वारस निर्माण झाला याचा सर्वांना अत्यानंद झाला. राजधानींत व राज्यांत
सवंत्र आनंदोत्सव झाले. बारश्याच्या दिवशीं अपूर्वे समारंभ होऊन ह्या
तान्ह्या राजपुत्राचें नांव “सवाई शहाजी' राजे? असें ठेवण्यांत आलें. परंतु
थोड्या दिवसांनीं राणीचें हें कृत्रिम प्रकाशांत येऊन सरफोजी राजांनी
त्या तान्ह्यासह कोयाजी घाटग्याला हद्दपार करून राणीला प्रतिबंधांत ठेवलें-*
सरफोजी राजे कालवश झाले तेव्हां तुकोजी राजे गादीवर बसले. हे
सरफोजी राजांपेक्षांही विशेष राजकारणपटु, धर्मनिष्ठ व विद्यामिलाषी
* सरफोजी राजांच्या अनेक राण्यांपँकी अपरूपाराणी हो
एक असून ती घाटगे वंशांतील होती. तिच्या उपरोक्त कारस्थानाचा स्पष्ट
. उल्लेख इतिहाससंग्रह' मासिकांतून प्रसिद्ध झालेल्या तंजावरचे राजघराणे
नामक पुस्तकांत करण्यांत आला आहे. कोयाजी घाटगे हा तिचा ह्या
कारस्थानांतील पाठीराखा होता. राजकारणांत-व तेंदेखील स्वतः अस्सल
मराठे असून मराठ्यांच्या राजकाणांत-बिघाड करणारे अनेक पुरुष व स्त्रिया-
देखील ह्या घाटगे वंद्यांत उत्पन्न झाल्याचें इतिहास सांगतो. बाळाजी
विश्वनाथ पेशव्यांच्या कारकीर्दीत प्रथमच चंद्रसेन जाधवाबरोबर फितूर
होऊन मोंगलांना जाऊन मिळाणारा सर्जेराव घाटगे! पेशवाईच्या अखेरीला
मराठशाहीच्या नरडीला फितुरीचें नख लावणारा त्याच वंशांतला दुसरा
सर्जेराव घाटगे ! तसाच हा कोयाजी घाटगे! शाहू महाराजांशीं स्पर्धा
करून मराठशाहीचीं मुळांतच दोन शकले करण्यांत देखील घाटगे रक्तच
प्रभावी ठरलें! !
५ ५१-५४ $/ ४६. १.१४
२२ पेशवाईचे मन्वंतर
५ १-४ ९ ४ ९८ १. ५४,४८१. ८ ७7 » ५,०१0 ४ “५-०, ५7 क र खा
होते. त्यामुळें दूरदूरचे विद्ान् पंडित व फकीर वगैरे त्यांच्या भेटीला येत
व पुरस्कार घेऊन आनंदानें माघारे जात. असाच एक अवलिया फकीर
एकदां त्यांच्या भेटीला आला. त्यानें राजांच्या सद्गुणांवर प्रसन्न होऊन
त्यांना आपला प्रसाद म्हणून नागिणी व पद्मिनी अक्षया दोन तरवारी नजर
केल्या. * त्या तरवारींच्या प्रभावाविषयीं त्या फकिरानें राजांना सांगितल,
“राजा, ह्या दोन तरवारी म्हणजे कडिसिद्धी आहेत असें समज. यांच्या
अंगीं असें अचाट सामर्थ्य आहे कीं ह्यांचे वास्तव्य जेथें असेल, तेथें सामर्थ्य
समृद्धि-शान्ति यांचें अखंड साम्राज्य तांदेल. परंतु ह्यांची पाळणूकही तशीच
कठीण आहे. ह्या तरवारी धारण करणारा सनृष्य सदाचारी व धर्मात्मा
असला पाहिजे; त्यानें सज्जनांचा प्रतिपाळ व दुर्जनांचा संहार करण्याकडेच
' नीतिधर्मारने ह्यांचा उपयोग केला पाहिजे. ह्यांच्या अंगीं आणखी असा एक
चमत्कार आहे कीं, सनांत दुर्वुद्धी धारण करून कोणी ह्या तरवारींना स्पर्श
केल्यास ह्यांचें तेज व पाणी तत्काळ नष्ट होतें व त्या धारण करणाऱ्या
माणसाचा कार्यनाश होतो. त्याप्रमार्णेच ह्या धारण करणारा किंवा संत्रहीं
ठेवणारा माणूस दुर्मति असल्यास यांच्या प्रभावाचें त्याचा समूळ नाळ नात्र
होईल. पण ह्या धारण करणार्या माणसाने नीतिधर्माचें यथावत पालन केल्यास
त्याला यांचा वजकवचाप्रमाणे व कामधेनूप्रमाणें उपयोग होईल. अजी ही
साक्षात् राजलक्ष्मी राजा, मी तुला आज अर्पण करीत आहें. हिचा तूं नीति-
धमर्नि वागून वंशपरंपरेने उपभोग घे. मात्र त्याबरोबर तूं हेंही. लक्षांत ञेव
को, कोणत्याही कारणानें ह्या तरवारींना तूं किवा तुझा राजवंश मुकला,
तर राजलक्ष्मी रुष्ट होऊन बाहेर गेली असें निश्चयपूर्वक समज; आणि
म्हणूनच यांना तूं तुझ्या
१५७४४५५0०४ प कताट००८.८ १-८...
तंजावरची कहाणी १३
ह्या दोन प्रासादिक तरवारींच्या प्रभावामुळे व त्याला तुकोजीराजांच्या
अंगच्या लोकोत्तर नीतिधर्म-प्रियतेची जोड मिळाल्यामुळे तुकोजी राजांची
कारकीदे चांगली भरभराटीची गेली. त्या तरवारींवर त्यांची इतकौ
जबरदस्त श्रद्धा होती कीं निश्चित पुराव्याच्या अभादीं एखादा न्याय करा-
वयाचा झाला तर तो करण्याच्या कामीं त्यांनीं ह्या साधनाचा उपयोग
करावा. फिर्यादी व आरोपी अथवा वादी व प्रतिवादी ह्या दोघांना
ईशस्मरणपूर्वक ह्या तरवारी उचलण्यास सांगावे व ज्याच्या हातानें
त्या काळ्या ठिक्कर पडतील त्याला अपराधी समजन शासन करावे
परंतु तुकोजी राजांच्या ठायीं जी दानत होती, तिला त्यांच्या निधनाबरो-
वरच मूठमाती मिळून त्यांच्यामागे पुन्हां आपसांतील भाऊबंदकीनें डोकें
दर काढलें. त्यांच्यामार्ने त्यांचा वराच मोठा परिवार होता. त्यांपैकी
वडील पुत्र बाबासाहेब हा व्यंकोजी हें नांव धारण करून गादीवर बसला
तो फार संशयी स्वभावाचा व भोळसर असल्यानें त्याच्या कारकीर्दीत राज्यांत
फारच वजबजपुरी माजून स्वार्थपटु व मतळबी लोकांचे दरबारांत फार
प्रावल्य झालें. त्या लोकांत सय्यद खान व सय्यद कासीम हे दोघे मुसलमान
बंधु प्रमख होते. त्यांनीं जवळजवळ सर्वे राजसत्ता आक्रमण करून राजाला
केवळ नामधारी बनवून ठेविलें होतें. व्यंकोजी राजाच्या परचाद् त्यांना
मूलबाळ वगेरे कांहीं नसल्यानें सय्यद बंधूंनी तें राज्य पुढेमागे आपल्या घक्षांत
टाकण्याचा अंतस्थ डाव तडीला नण्याचा उद्योग आरंभिला. पण राजवटीशी
एकनिष्ठेने वागणारे व पराक्रमी असे इतर कांहीं कारभारी दरबारीं होते;
त्यांत मानाजीराव जगताप हा वीस वर्षांच्या उमरीचा एक तडफदार मराठा
सरदार असून शिवाय मल्हारजी गोडेराव या नांवाचा राजघराण्याचा आप्त-
संबंधी प्रोढ सरदार व अण्णाप्पा शेंटगे वगेरे कांहीं मंडळी होती. ह्या मंडळीने
सय्यद वंधूंची मसलत बेमाठू्मपर्णे वाजूला सारून व्यंकोजी राजांच्या राग्यां-
पेकीं सुजानवाई नांवाच्या तरुण, चतुर व सदाचारी राणीलाच गादीवर
बसविलें. सय्यद बंधूंचा हा एक डाव फंसला तरी त्यांनीं नाउमेद न होतां गुप्त-
पर्णे नवे नवे डाव खेळण्याला सुरुवात केली. अपरूपाराणीचें ह्या कार-
स्थानांत शत्रूला पाठबळ मिळू नये म्हणून मानाजीराव वगेरे कर्त्या मंडळीने
नव्या राणीच्या सल्ल्याने जरी तिला सक्त बंदोबस्तांत ठेविलें होते तरी कोयाजी
१४ पेशवाईचे मन्वंतर
४ ५ ४८९ ४८ ४८०५0 ४४८५ ४-९ १५४५-०0, ७५९७.” ७५५१-१८-१0 ५.०0...” २./% > ९००५-०८ -८६.> ४-५ “>. ४८ ८४, ४५-९४. ४-१ 0-0 -*१५/४-४.-€ १५ “-
५-७ ४.० ४५-४० ४१५७०९ ७८००0 ८ फिल ७५४१. कल
" घाटगे मन भानेल तसे उपद्व्याप करण्याला मोकळा होताच. त्यानें एका
बाजूनें सुजानबाईचा कारभार अयशस्वी करण्यासाठीं कंवर कसली; सय्यद
बंधू दुसर्या बाजूनें कंवर कसून उभे होते. ह्या दोन प्रतिस्पर्धी शक्तींपुढे
सुजानबाईचा नाइलाज होऊत तिला राज्याचीं अधिकारसूत्रे खालीं ठेवादीं
लागलीं. शेवटीं सय्यद बंधूंचे राजकारणच यदस्वी होऊन त्यांनीं सयाजी
- या,नांवाच्या तुकोजी राजांच्या दुसऱ्या एका मुलाला सामील करून घेतलें
व त्याला तंजावरचा नामधारी राजा बनवून सवे राज्यसूरत्रे आपल्या हातीं
. घेतलीं. कलहाचा नवा वणवा पेटण्याला आणखी काय पाहिजे?
तंजावरची कहाणी १"
. ७ ५) ४७.८७ “/ ५८७ ४७५४ ७८% ७७.७0 “४ “0 ७७ “0, शा &0% /0७ “6७, “१७ /ह »%,” ४७ ७ “0७ ४७ “0 / “७ ७ ७१% “00 “ ४ “ १ 209 “% ७९% 00७ “४ 0१ 0 ह" -.& 7७. १५ 2 १. -ीषे ८00५ 2५ 20.५
प्रकरण ३ २
तंजावरची कहाणी (पुढें चालू )
१-८ १-५ ५८ ५.८
सल्द बंधूंचा हा उपद्व्याप मानाजीराव वगेरे तंजावरच्या राजवटींतील
नष्ठावंत मंडळीला मुळींच मान्य नव्ह्ता. आणि राज्यांतील बहुजन समा-
जाचा ओढाही त्यांच्याकडेच होता. त्यामुळें त्यांनीं कांहीं बेमाळूम नवी
योजना मनाशीं ठरवून लोकरच तुकोजीराजांची अन्नपुर्गाबाई या नांवाची
एक सुशील व सदाचारी प्रियतमा होती, तिला व तिच्यामाफत प्रतापसिह्
या नांवाच्या तिच्या तरुण पुत्राला आपल्या वाजूला वळवून घेतलें. प्रताप-
सिह आपल्या मातापितरांप्रमाणेंच सदाचारी, चतुर व सुविचारी होता,
व तुकोजीराजांच्या इतर पुत्रांच्या अंगीं न चमकणारें अनन्यसामान्य राजतेज
त्याच्या अंग्री चमकत होतें. तो वयानें जरी तेव्हां पंचविशीच्या आंत होता,
तरी त्यानें जनतेची प्रीति चांगलीच संपादन केली होती. त्याच्या नेतृत्वाखाली
मानाजीराव वगेरे मंडळीनें राज्यप्राप्तीचा जो डाव रचिला, तो सर्वांच्या
कल्पनेबाहेर फलट्रप होऊन जनतेनें मानाजीरावाच्या नेतृत्वाखालीं तंजा-
वरचा राजमुकुट प्रतापसिहाळाच अपेण केला. सय्यद बंधूंनीं-विशेषत:
सय्यद खानानें 'हा दासीपुत्र, याला राजा कसा करावयाचा वगेरे अपवादांच्या
झाडीआडून विरोधाच्या गोळया झाडण्याची शिकस्त केली; पण त्याचा .
कांहींच उपयोग झाला नाहीं.
याप्रमाणें प्रतापसिह तंजावरच्या गादीवर आला; व त्यावरून आतांतरी
आपल्या राज्याला बरे दिवस येतील असें मानाजीराव, मल्हारजी गाडेराव
वगेरे मंडळीला वाटं लागलें. पण सय्यद खान वगेरे मंडळीचा अंतस्थ रीत्या
विरोध सुरूच होता. इतकेंच काय पण सय्यद खान हा तर दुखावलेल्या
विषारी नागाप्रमाणें मनांत दावा धरून प्रतापसिह् व त्याचा पक्ष यांचें समळ
उच्चाटण करण्यासाठीं गुप्तपणें भगीरथ प्रयत्न करीत होता. हें प्रताप-
[सिहाला माहीत होतें व प्रतापसिह आपणाला ओळखतो हें सय्यद खानाला
माहीत होतें. मानाजीराव, मल्हारजी, अप्पाण्णा वगेरे मंडळी प्रतापसिहाच्या
पेशवाईचं मन्वतर
76)
- 2२ ८४७० २८० टा “५. २ 2५०५-०० 2४९८१. 2५ 20५ हाण 2० टो: ८० “५.00 “७ ०२०.” आ. ला
पदरीं आहेत, ते आपले आज ना उद्यां उच्चाटण केल्याखेरीज रहाणार नाहोंत
हेंही त्याला माहीत होतें. तरीही तो राज्यलोभ सोडावयाला तयार नव्हता.
मानाजीराव वगरे मंडळी सामान्य नव्हती, व प्रतापसिहाशीं त्या मंडळीचा
पर्ण मिलाफ होता. पण एक तर मधल्या बजबजपुरीचा सय्यद खानाने सर्व
सत्ता आपल्या मुठींत आणण्याच्या कामीं भरपुर उपयोग करून घेतला होता,
व प्रतापसिहाच्या हीनकलोत्पन्नतेची हाकाटी करून त्या जोरावर जनतेचीं
मने कलषित करण्याचा त्याचा उद्योगही अत्यंत गप्तपर्णे आणि तितक्याच
यशस्वितेने सुरू होता. तेथे राजवंशाचा एकतर्फी दुरभिमान बाळगणाऱ्या लोकां-
चीही. अगदींच वाण होती अश्यांतली गोष्ट नाहीं. शिवाय अपरूपाराणीचा पक्ष
अधिकारारूढ होण्यासाठीं इरेला पडून काय पाहिजे त्या भल्याबर््या गोष्टी करा-
वयाला हा लोककंप् एका पायावर उभा होता. अशा लोकांना सय्यद खानाचा
मोठा पाठिबा मिळाला; व त्यांनीं राज्यक्रान्तीचा एक व्यहही रचिला.
कांहीं वर्षांपूवी सरफोजी राजांच्या कारकौर्दीत त्यांचा अर्थात् अपरूपाराणीचा
पुत्र म्हणून पुढें आलेला व कृत्रिम राजपुत्र ठरल्यामुळे कोयाजी घाटग्याबरोबरच
हृद्पार झालेला बाळक* तिकडे कोयाजी घाटग्याच्या कृपाछत्राखालीं वाढून .
लहानाचा मोठा झाला होता. तो आतां सुमारें वीस वर्षांचा तरणा बांड
गडी शोभ लागला होता. त्यालाच सय्यद खानार्ने कोयाजी घाटग्याच्या
% सुजानबाईच्या कारकोर्दीत गादीसाठीं प्रयत्त करणारे अनेक शत्र
निर्माण झाल्यामळे तिला राजपदाचा अधिकार फार दिवस उपभोगितां
आला नाहीं. तिची कारकोर्द पुरी तीन वष झाली नाहीं तोंच सवाई
शहाजी या नांवाचा कोणी इसम कोयाजी घाटगे या नांवाच्या सरदाराच्या
साहाय्यानें तंजावरच्या गादीचा हकक सांगण्याकरितां तोतया निर्माण झाला
आणि त्याने तंजावर येथील किल्लेदार सय्यद खान यास फितवन तंजावरची
गादी वळकावली. तंजावरच्या इतिहासांत काटराजा या नांवानें हा तोतया
प्रसिद्ध आहे. त्यानें इंग्रज व फरेंच लोकांस द्रव्य देऊन त्यांचें सेन्य आपल्या
मदतीस बोलावले व तंजावरच्या गादीचे आपण अस्सल वारस आहों असा
सर्वांच्या मनांत भ्रम उत्पन्न केला. परंतु हा काटराजा रूपी नामक बटकीचा
एक मलगा असून याचा तंजावरच्या गादीशीं कांहींही संबंध नाही, अशी
तंजावरचा किल्लेदार व मख्य सरदार यांची लवकरच खात्री झाली
यामुळें त्यांनीं या ढोंगी काटराजास तात्काळ काट दिला. -<-इतिहाससंग्रह-
तंजावरची पूर्व कहाणी १७
नामधारी पुढारीपणाखालीं स्वतः बाह्यतः अगदीं नामानिराळा राहून,
तंजावरच्या गादीचा खरा वारस सरफोजीराजांचा औरस पुत्र म्हणून पुढें
आणण्याचा उद्योग आरंभिला होता. अपरूपाराणी तर ह्या कारस्थानांत
गुप्तपणे सामील होतीच; कारण तिला त्या निमित्ताने राजमातेचा अपूर्व
मान मिळणार होता. पण राजघराण्यांतील बाकीचे बहुतेक जवळचे अगर
दूरचे वारस व त्यांचे अलवतेगलबते सुद्धां, सय्यद खानासारख्या सामर्थ्येवान्
माणसाने राजा होऊं घातलेल्या ह्या नव्या वारसाचा पक्ष धारण केल्याचें
पाहून त्यालाच अखेर यश मिळणार असें धोरण बांधन त्याचे पक्षपाती बतळे
होते. हा कट हां हां म्हणतां इतक्या परिपक्व देला पोंचला कीं प्रतापसिह
राजे, मानाजीराव वगेरे मंडळीला त्याचा सुगावा लागून देखील त्याचा नायनाट
करण्याचा कांहीं उपाय सांपडंना.
त्याच सुमाराला चंदासाहेबानें त्रिचनापल्लीचें राज्य बेमाळूम कपट-
कारस्थानाच्या जोरावर कसें घशांत टाकलें, याच्या रसभरित वार्ता सवंत्र
रूढ झाल्या होत्या, व तो गवगवा तंजावरपर्यंत आपोआपच येऊन पोंहोंचला
होता. इतकेंच काय; पण चंदासाहेबाचीं एकाहून एक कपटप्रचुर कृत्यें
पाहून किवा एंकून हा महाकारस्थानी पुरुष हळुहळू आपल्या आंगच्या कृष्ण-
कारस्थानपट्तेच्या जोरावर सर्वे कर्नाटक आपल्या कह्यांत आणणार असेंही
जाणते लोक बोलं लागले होते. न जाणो, पुढेमागे त्याची वक्रदृष्टि तंजा-
वराकडे वळली तर आपली धडगत लागावयाची नाहीं, हा कयास बांधून
सय्यद खानाने त्यालाच आपला दोस्त बनविण्याचें व नंतर आपल्या कपट-
कारस्थानांत त्याची हक्कानें मदत घेण्याचें धोरण आंखून आपली मुलगी
त्याच्या मुलाला देऊं केली. याच्या उलट चंदासाहेबानेंही तंजावरच्या
राजकारणांत हात शिरकविण्याला व त्रिचनापल्लीचें राज्य निश्चितपणे
अलूग घशांत टाकण्याला सय्यद खानाची आपुलकी पुष्कळच उपयोगी पडेल
असा दूरवर विचार करून त्या सोयरिकोला तेव्हांच रुकार दिला.
याप्रमाणें एक ठक व दुसरा महाठक अशी' ही गट्टी जमल्यावर तंजावरच्या
राज्याची इतिश्री होणार हें जवळजवळ निश्चितच होतें. परंतु ह्या अरि-
ष्टांतूत तरी तें राज्य वांचावें अशी विधिघटना असल्यामुळें म्हणा, किवा
आजवर आपले राज्य टिकले तें त्या दोन प्रासादिक तरवारींच्या देवी बलावर
र
१८ पेशवाईचें मन्वंतर
टिकळें अशा विश्वासार्ने प्रतापसिह्राजांनीं सदाचारपूर्वक त्या अमोघ आय-
धांवे आपल्या प्रागापलींकडे रक्षण चालविल्यामुळें म्हणा, सय्यद खानाच्या
कटांत फूट पडण्याला एक आकस्मिक कारण घडून आलें. महाभारतकालीं
संदोन*मत होऊन देवादिकांनाही त्राठि त्राहि करून सोडणाऱ्या सुंदोपसृंदांचा
नाश करण्यासाठीं ईश्वरी प्रेरणेचे एक मोहिनी जशी उत्पन्न झाली व तिच्या
अभिलाषार्ने ते मदांध देत्य आपसांत भांडून जसे एकमेकांच्या नाशाला कारण
झाळे, तशीच मोहुना* या नांवाची एक संदर कुमारिका राजधानीच्या लगतच्या
श्रीरंगाच्या देवालयांत देवसेवेसताठीं येऊन वास्तव्य करू लागली. तिच्या
सौंदर्याची ख्याति हां हां म्हणतां सवेत्तर पसरली, व दोघेही सय्यदबंध्
तिच्यावर एकदम आषक झाले. दोघांनींही आपापल्या परीनें त्या मोहनसाठीं
प्रियाराधनाची शिकस्त केली. पण ती सच्छोळ कुमारिका त्या दोघांपैकी
कोणालाच वश होईना. अखेर सय्यद खानानें देवालयांत शिरून तिला
बलात्काराने ष्ट करून आपल्या वाड्यांत नेऊन ठेविलें. ह्या अतिप्रसंगा-
मुळें सवे हिंदु जतता तर त्याच्यावर मनस्वी चिडलीच; पण सय्यद कासीमही
बिथरून त्याच्या कटांतून फुटला व गुप्तपणे प्रतापसिहराजांच्या पक्षाला
जाऊच मिळाला. चंदासाहेब व सय्यदखान यांचीं कसकशीं कारस्थाने चालली
आहेत' याची बित्तंबातमी प्रतापसिह्राजांना सय्यद कासीमपासून मिळतांच
त्यांनी मोठ्या युक्तीनें सय्यद खानाला जगांतून नाहींसा करण्याच्या कामीं
त्या बातमीचा उपयोग करून घेतला. सय्यद कासीमदेखील आज
आपल्याला सामील झाला तरी तोसुद्धा आजना उद्यां आपल्या वडील भावाच्या
वळणावर खास जाणार हें ओळखून त्याचाही गुप्तपणे अचानक वध करण्यांत
आला. अशा प्रकारें सय्यद बंधूंचा नायनाट झाल्यामुळें त्यांचें कारस्थान
तेवढ्यापुरतें तरी फिसकटलें. त्या दोघांप्रमाणेंच त्यांच्या अनुयायांनाही
गांठून ह्या जगांतून नाहींसे करण्यासाठीं मानाजीराव वगेरे मंडळीनें शिकस्त
केली व कांहीं लोक सांपडले त्यांची तशी वासलात लावलीही. परंतु कोयाजी
घाटगे व त्यानें निर्माण केळेला राजपुत्र ह्या दोन व्यक्ती कांहीं केल्या त्यांच्या
हातीं लागल्या नाहींत. व तद्यांत अपरूपाराणीनें साळसूदपणें रडून, ओरडून
ह्या कारस्थानांत आपलें मुळींच अंग नव्हतें असें भासविल्यामुळे, आणि
आब णाा//४७४७४000यनमाधणढणढढढट्टटटक्र्००५0000100010000000ली णा यजमानाने कलन,
तेजावरची पूवेकहाणी 9९
त्यांतल्या त्यांत अब्रला भिऊन प्रतापसिहराजांनीं तिला कोणत्याही' प्रकारें
शासन करण्याचें नाकारलें. सय्यद बंधूंचा मात्र समूळ निवेश करण्याचा
त्यांचा मानस होता. परंतु त्याच्या कुटंबांतील सर्वे मंडळीला चंदासाहेबारने
ऐनवेळीं गुप्तपणे त्रिचनापल्लीच्या किल्ल्यांत आपल्या कृपाछत्राखालीं नेऊन
ठेविल्यामुळें ती सर्वे मंडळी बचावली. बिचार्या मोहनेची स्थिति मात्र
त्यामुळें आगींतून उठून फुफाट्यांत पडल्याप्रमाणें झाली; चंदासाहेबाच्या
जनानखान्यांत त्याची विलासदासी होऊन रहाण्याचे तिच्या नशिबीं आलें!
आपला पक्ष सय्यदबंधुंच्या नाशामुळें दुबळा झाला, म्हणून हातपाय
गाळून स्वस्थ बसणारा कोयाजी घाटगे नव्हता. त्यानें पुन्हां अर्काटच्या
नबाबाशीं संधान बांधलें. अपर्पाराणीची त्याला आंतून भरपूर फूस होतीच
नबाबालाही तंजावरच्या राजकारणांत हात शिरकवण्याला अद्या कोणातरी
घरभेद्याचें साह्य पाहिजेच होतें. त्यानें आपल्या जांवयाला-चंदासाहेबाला
त्या कामगिरीवर नेमलें. त्रिचनापल्लीच्या राज्याचा घांस दांतदेखील न
लावतां घशांत टाकण्यांत चंदासाहेबानें जें अपूर्व कुटिल कत् त्व दाखविलें
होतें, त्यामुळें धर्मवेड्या मुसलमानी समाजांत त्याची फारच चहा होऊं
लागली होती; व अकटिच्या दरबारांतही त्याचें चांगलेंच वजन वाढलें होतें
“हिंदु लोक भोळे; त्यांना आपण आपल्या करांगुलीच्या टोंकावर नाचवूं
दकतों; आपण कितीही अत्याचार केले तरी ते ते लोक निमूटपणें सहन
करतात; आणि त्यांना धर्मभरष्ट करण्याची कामगिरी इतकी सोपी आहे कीं
कोणीं फाटक्या मुसलमानानेंदेखील भराभर हवे तेवढे हिंदु बाटवावे” वगेरे
स्वानुभवाचा आत्मविश्वास चंदासाहेबाच्या ठायीं व त्याच्या निमित्ताने
नबाबाच्या ठायींही उत्पन्न झाला होता. “हिदू राजे काय, आम्ही पटावरील
सोंगट्यांप्रमाणें मनाला मानेल तसे नाचर्व. दिल्लीची मध्यवर्ती राजसत्ता
आम्हां मुसलमानांची असतांना ठिकठिकाणीं उगाच चिरीचिरि करणार्या
ह्या तळहाताएवढ्या हिंदु संस्थानांचा नायनाट करण्याला आम्हांला कोण
आडकाठी करणार आहे ?” अशा प्रकारच्या घमेंडीने नबाबही अगदीं फुगून
गेला होता. त्यानें तंजावरचें राज्य पादाक्रान्त करण्याची कामगिरी चंदा-
साहेबाला सांगितली व कोयाजी घाटग्याशीं त्याची गांठ घालून दिली. या
बाबतींत नबाब, कोयाजी व चंदासाहेब यांचे आपसांत कांहीं संकेत व करार-
२० पेशवाईचे मन्वंतर
मदार ठरले होते. परंतु त्यांची त्या तिघांशिवाय चौथ्या कोणालाही दाद
नव्हती.
प्रतापसिह व मानाजीराव वगेरे त्याच्या पक्षाची मंडळी यांना इकडे
समाधान वाटलें; आपण पाताळयंत्री सय्यदबंधूंचा नायनाट केला आतां
आपलें राज्य निर्वेध झालें. कोयाजी वगेरे मंडळी बाकी होती; पण त्याची
अवस्था पंख कापलेल्या पक्ष्यांप्रमाणे झाली आहे, ते राजवटींत काय बखेडा
करणार! -अद्या भोळ्या आत्मविश्वासाने त्यांच्याकडे दरबारी मंडळीने
दुलक्ष करून राज्याची अंतर्व्येव्यस्था लावण्याचे कार्य हातीं घेतलें.
ही व्यवस्था सुरू असतांच एके दिवशीं अपरूपा राणीला माहेरीं जाण्याची
इच्छा झाली. तिच्या माहेरीं जाण्यांत प्रतिपक्षाचें कांहीं राजकारण निगडित
झालें असेल अशी शंकादेखील कोणाला आली नाहीं; इतकें तिचे राजवाड्यां-
तील वर्तन अलीकडे चोख, प्रेमळपणाचें व सलोख्याचे दिसत असल्यानें
प्रता्पासह राजांनीं तिला कोणत्याही प्रकारें माहेरीं जाण्याला विरोध केला
नाहीं. त्याच्या पक्षाच्या मंडळींत मानाजीराव महा धर्त होता; त्याला
कशी न कळे, राणीच्या ह्या माहेरवासाबद्दल शंका उत्पन्न झाली. परंतु
कशी झाली तरी ती राणी पडली, तिच्याविषयीं मानाजीरावानें तरी भलताच
संशय पुराव्याखेरीज कसा बोलून दाखवावा ? अपख्पा राणीने आपल्या
मायावी प्रेमळपणाच्या जोरावर राजांना आपलेसे करून घेतलें होतें, हें
मार्गे सांगण्यांत आलेंच आहे. ती त्या उभयतांची आपुलकी अलीकडे तर
इतकी वाढली होती कीं राणी राजांना आपलाच पुत्र मानूं लागली होती,
व राजांनाही तिला 'आईसाहेब” असें संबोधण्यांत संतोष वाटत असे. इतकेंच
काय पण राणीने राजांच्या नांवाला जन्माचा चिकटलेला अकुलीनतेचा
डाग कायमचा धुवून टाकण्यासाठीं त्यांना दत्तक घेण्याचेही ठरविलें होतें,
व राजांना त्याप्रमाणेंच मानाजीरावांखेरीज इतर कारभाऱ्यांना तो विचार
संमतहि होता. मानाजीराव मात्र प्रथमपासूनच सर्वांना कानींकपाळीं
ओरडून सांगत होता कीं “ राणीचे हें सारें वर्तन मायावी आहे, तिच्यावर
विश्वास ठेवणें सुरक्षितपणाचें नाहीं? पण मानाजीराव पडला पोरसवदा.
त्याचे बोल इतर प्रौढ अनुभवी कारभार्यांना कसे पटावे ? व राजांनीं तरी
त्या अनुभवी साह्यकार्यांच्या विरुद्ध कसें वागावें ?
तंजावरची पूवेकहाणी २१
असे कांहीं दिवस गेल्यावर एके दिवशीं अपरूपाराणीनें कांहीं दिवसांसाठी
माहेरीं जाण्याची इच्छा दर्शविली. तिला नको म्हणण्याचें कोणालाच कांहींच
कारण नव्हतें. असें असतां मानाजीरावाला मात्र कां त कळे, संशय आला
कीं: हिच्या माहेरीं जाण्याच्या मुळाशीं कांहींतरी कारस्थान शिजत असलें
पाहिजे. पण ती राणी, राजांच्या मर्जीतली व सर्वांच्या आदराला पात्र
झालेली, तिच्याविषयीं माताजीरावातें मुहेसूद पुराव्याशिवाय अविद्वास
बोलून तरी कसा दाखवावा!
पण कांहीं झालें तरी मानाजीरावाची संशयनिवृत्ति कांहीं केल्या होईना.
त्यातें एकदां राणीच्या कारस्थानाचा अचूक छडा लावून ह्या वाढत्या
थोतांडाचा सोक्षमोक्ष करण्याच्या निर्धाराने चौकशीसाठीं बाहेर जावयाचें
ठरविलें व राजांना आपला बेत कळविला. स्वतःला मातेप्रमाणें पुज्य
असणाऱ्या राणीविषयीं मानाजीरावानें अजूनही असा संशय घेणें राजांना
सचलें नाहीं हे तर खरेच. पण तो सहजासहजी उपेक्षा करण्याइतका सामान्य
माणूस नसल्यानें परस्पर स्वानुभवाने त्याचा संशय फिटलेला बरा असा
विचार करून त्यांनीं त्याला तसें करण्याला मोकळीक दिली.
२२ पेशवाईचे मन्वंतर
“ह कद रायकर “असक मोक कणतेकारकीी किक किचन अलक िधट ७.७ ७ क कळक कलक“ 2४४००५००८९ ४४0 0५0700/027 0.८१. ४१४०५ १५१७४ १ १
प्रकरण ४ थं
प्रसादचिन्हांची चोरी
-_7ाऱपयप्>र्ा---
साशाजीरावाप्रमाणेच अपरूपा राणीविषयीं संशयी वृत्तीने वागणारी आणखी
एक व्यक्ति राजवाड्यांत होती. ती प्रतापसिह राजांची धाकटी पत्नी
करुणाराणी होय. करुणा वयाने तेव्हां अठरा वर्षांची असून रूपानें इतकी सुंदर
होती कों तिच्या सोंदर्याचिं वर्णन करतांना वर्णनकाराला आपल्या कल्पकतेची
लेणीं त्या सौंदर्यावर चढविण्याची कांहींच आवश्यकता नव्ह्ती. आणि
ती राणी झाली तीही केवळ आपल्या सौंदर्याच्या जोरावरच झाली. नाहीपेक्षां
ती एखाद्या सामान्य अकुलीन मराठा सरदाराच्याच गळ्यांत पडावयाची-
याचें कारण ती तेव्हां अज्ञात मातापितरांची मुलगी होती. अर्काट्जवळच्या एका
लहानशा जहागिरदारानें आपल्या आतेबहिणीच्या दोन जुळ्या मुली मातृ-
पितृनिधनामुळे अनाथ होऊन उघड्यावर पडलेल्या आणून पाळल्या, त्यांतली
एक मुलगी हो करुणा होय. जशी करुणा तशीच तिची बहीणही रूपवान
होती असें लोक सांगत. तिचा कोणालाही पत्ता नव्हता. लोक बोलत त्यावरून
कांहीं कांहीं लोकांना माहीत कीं त्या दोन मुलींचा बाप अर्काटच्या नबाबाच्या
पदरीं शिळेदार होता. त्याची बायको अर्थात् करुणेची आई वासंती या
नांवाची होती तीही करुणेसारखीच संदर होती. तेव्हांचा कर्नाटकचा नबाब
सादतुल्लाखान अत्यंत स्त्रेण होता व वासंतीचा पति दौलतराव हा त्याच्या
पदरीं शिलेदार होता. दोलतराव एकदां दूर लढाईत गुंतला असतां इकडे
नबाबानें त्याच्या घरावर छापा घालून बलात्कारानें वासंतीला नेऊन आपल्या
जनानखान्यांत ठेवलें. यानंतर त्या दोन मुली त्या जहागिरदाराच्या पदरीं
कश्या आल्या याविषयीं कोणाला कांहीं माहिती नव्हती. त्या जहागिर-
दाराचें नांव बुवासाहेब असें होतें. तोही कोणाला फारसा माहीत नव्हता.
कांहीं वर्षापूर्वी राजद्रोहाच्या आरोपावरून नबाबानें त्याला पकडून हत्तीच्या
पायांखालीं देऊन ठार मारलें व या मुलींच्या कल्याणाचा भार झुझ्ारराव ह्या
विश्वासू सेवकावर येऊन पडला. त्यांपैकी करुणा एकटीच झुंझ्वाररावाच्या
प्रकादचिन्हांची चोरी २३
हातीं सांपडली. तिच्या बहिणीचें त्या संकटांत काय झालें तें परमेश्वराला
माहीत ! असा तिचा वृत्तान्त मानाजीराव सांगे व तोही आपल्या वडिलांच्या
एका गरीब लंगोटीयार मित्राच्या तोंडून ऐकलेला म्हणून ! मानाजीरावाला
त्या गोष्टीचें एवढें महत्त्व वाटण्याचें कारण प्रता्पसह राजांशी करुणेचें लग्न
होण्यापूर्वी तिचे मानाजीरावाशीं लग्न व्हावें अक्षी वाटाघाट चालली होती.
झु्षारराव व मानाजीरावांचे वडील हे अत्यंत जिव्हाळ्याचे दोस्त असल्या-
नेच त्या दोस्तीस पुढेंही अढळ स्थान मिळावें यास्तव झुश्षाररावानें करुणा
मानाजीरावाला देऊं केली होती. परंतु करुणा ही झंझाररावाची केवळ
पाळलेली मुलगी. बुवासाहेब सांगे म्हणन तिला त्याच्या बहिणीची मुलगी
मानावयाचे इतर्केच. बरें; करुणेची आई यवनांच्या हातीं भ्रष्ट झाल्यामुळें
तो कधींही न पुसला जाणारा डाग तिच्या कपाळीं लागलेला ! अश्या स्थितींत
मानाजीरावाच्या पित्याने त्या मागणीला रुकार दिला नाहीं यांत कांहीं
नवल नाहीं. झंझाररावानें देखील एरव्हीं ह्या सोयरिकीचा प्रश्न काढण्याचे
धाडस केलें नसतें. पण मानाजीराव व करुणा यांचें एकमेकांवर मुग्ध प्रेम
असल्याचें त्याला नक्की आढळून भाल्यामुळेंच त्यानें एवढें धाडस केलें होतें.
परंतु मानाजीरावाच्या पित्याने त्या संबंधाला नकार दिला, तेवढ्या-
वरच तो प्रश्न लौकिक दृष्ट्या संपला. करुणा व मानाजीराव यांना त्याबद्दल
अत्यंत खेद वाटला. पण त्याची पर्वा कोणाला? सुदेवानें प्रतापसिह राजे
गादीवर आल्यावर करुणेचें भाग्य उदयाला आलें. आपणां उभयतांच्या नशिबी
विवाहग्रंथीनें बद्ध होऊन संसारसुख भोगावयारचें नाहीं तर नाहीं, करुणा
कोणीकडून तरी सुखी झाली कीं तेंच आपले सुख, असें मानून खुद मानाजी-
रावानेंच करुणेला पदरांत घेण्याविषयीं राजांना एकदां विनंति केली, व
करुणेचें सौंदर्य पाहून राजांनींही तत्काळ त्या विनंतीला मान्यता दिली. अर्थात्
राजे हे दासीपुत्र असल्यामुळेंच संशयित जन्माच्या करुणेला त्यांनीं पदरीं
घेतलें हें सांगणें नकोच. या प्रकारें करुणा तंजावरची राणी झाली होती. त्यानंतर
मानाजीरावाच्या नाशयावर टपलेल्या कांहीं मंडळीने करुणा व मानाजीराव
यांच्या एकमेकांवरील प्रेमाचा विकृत अर्थ करून ती दुर्वार्ता राजांच्या कानांवर
जाईल अशी तजवीज केली. परंतु राजांनीं तें मुळींच मनावर घेतलें नाहीं.
दुधाच्या पेल्यांत खडीसाखर घालावी त्याप्रमाणें करुणेच्या ह्या सुखमय
२९ पेशवाईचें मन्वंतर
00.00: १-० १ ८४-५५ श्री शण 2१ ६.१ र. पटा २४८0०2१ १... ४१ २
जीवनांत परमेश्वरानें लौकरच एका नव्या परमसुखाची भर घातली. ती
अलीकडे गर्भवती होती; त्यामुळें ती राजांची अगदीं जीव कीं प्राण होऊन
बसली होती. तिच्या पोटीं राजपुत्र यावा अशी सर्वांचीच इच्छा होती;
व तो राजपुत्र आपणापेक्षांही परमभाग्यशाली व्हावा यासाठीं राजांनीं मृदहाम
तिला त्या दोन प्रासादिक तरवारींची पुजा करावयाला सांगितलें होतें
त्यासाठीं त्या रत्नखचित पेटीच्या किल्ल्याही जामदारखान्याच्या किल्ल्यां-
बरोबरच तिच्या स्वाधीन केल्या होत्या.
अपरूपाराणी जशी राजांवर आत्यंतिक प्रेम करी,तश्ीच ती आपल्या मतें
करुणेला प्रेमाने वश करण्यासाठीं शिकस्त करीत होती. पण काय असेल तें
असो, करुणा कांहीं तिच्या आहारीं गेली नाहीं. मानाजीरावानें तिला
सांगून ठेविलें होतें; कौ, “ करुणे, अपरूपाराणी ही राजा दशरथाच्या राणी
केकेयीप्रमाणें कुटुंबबात व राज्यघात करणारी आहे. महाराज तिच्या
मोह्पाशांत सांपडले आहेत हों कांहीं बऱ्याची चिन्हें नाहींत. राजे माझा हिताचा
शब्द एंकायला तयार नाहींत; तिथें माझा नाइलाज झाला आहे. पण तूं
तरी त्या मायाविनीच्या मोहजालांत सांपड नकोस. आणि राजांनाही त्या
मोहापासून परावृत्त करणें हें त्यांची अर्धांगी या नात्यानें तुझें कर्तव्य आहे.
करुणेला भानाजीरावाचा हा उपदेश सोळा आणे पटला होता; व त्याला
अनुसरून तिनें राजांना हितबोध करण्याचा प्रयत्नही अनेक वेळ करून पाहिला.
परंतु पालथ्या घागरीवर पाणी ओतल्याप्रमाणें त्या बोधाची अवस्था होती.
राजे उलट आपणालाच संशयी व कुढ्या मनाची ठरवून अपरूपाराणीची
थोरवी आपल्या मनावर बिबविण्याचा प्रयत्न करतात, प्रसंगविशेषीं “असले
घरभेदेपणाचे विचार यापुढें तरी तूं माझ्यापाशी कधींच बोलून दाखवू नकोस
असेंही किंचित रागाचा आविर्भाव आणून सांगतात; त्याप्रमाणेंच मानाजी-
रावारचे असेंच मत आहे असें सांगतांच त्याच्यावरही आपल्या रागाची आग
पाखडावयाला कमी करीत नाहींत, असें पाहुन तिनें अलीकडे तो नाद सोडून
दिला होता. राजांची जरी ती जीव कीं प्राण होती आणि राजे एरव्ही
प्रत्येक बाबतींत जरी तिचा एकही शब्द खालीं पडूं देत नसत, तरी ह्या एका
बाबतींत ते आपलें कधींच एंकणार नाहींत व आपण त्यांना सावध करण्याचा
जास्त प्रयत्न केला तर तो आपल्या संसारसुखाची माती करण्यालाही वेळीं
प्रसादर्चिन्हांची चोरी २५"
रि १५८५ ५५७१ ७७. 6७ करी
"४८% आड चे र, 000. 2१७ ०० कर के » ६० २-० २-८ ५८ १-० ७८८ £- ४- ६ -८१- ७-7 ४५४ ७ ४५०४-८८ ५८ ५: “४ ४ र “८ वि
कारण होईल अशी खात्री झाल्यामुळें ती स्वतःशी फार भिऊन वागूं लागली होती
परंतु विधिघटना थोडीच कोणाला कधीं टाळतां आली आहे, मानाजीराव
बाहेरगांवी गेला, त्याच्या दुसर्या दिवशीं झुंझ्ाररावाकडून एक जासूद निकडीचें
पत्र घेऊन राजांकडे आला. त्या पत्रांत पुढीलप्रमाणे मजकूर होताः
मी आसन्नमरण स्थितींत आहें. ह्या आजारांतून मी जगंन असा
मला व वंद्य-हकिमांनाही मुळींच भरंवसा वाटत नाहीं. ह्या आयुष्यांत
माझी कोणतीही इच्छा उरळेली नाहीं; फक्त साझ्या करुणेची
अखेरची दृष्टभेट व्हावी अशी इच्छा आहे. तरी आपण एवढी छुपा
करावी अशी विनंति आहे. ”
राजे सदय अंत:करणाचे होते. पण दयाळू माणसाला स्वार्थ नसतो असें
थोडेच आहे! करुणा त्यांची अत्यंत लाडकी असून ती आतां थोड्याच
दिवसांत तंजावरच्या राजपुत्राला जन्म देणार होती. ही पहिलीच वेळ
असल्यानें पहिलारू गर्भेवतीप्रमाणें तिलाही नाना परींच्या डोहाळ्यांनीं
बरेंच हेराण केलें होतें. अशा स्थितींत राजवाड्यांत सर्वे सुखसोईत देखील
तिची प्रकृति नीट राखणें अवघड जात असतां प्रवासांत-आणि म्हातार्याच्या
आजारीपणांतील प्रत्यक्ष दुः:खभरांत तिची प्रकृति नीट रहाणें शक्यच नाहीं.
तिला तिकडे कशी पाठवावी ?-ह्या प्रश्नाचें नकारार्थी उत्तर राजांना
मनोमय मिळालें व त्यांनीं तेथें कोणी माणूस नसतांही स्वतःशीं विचार करतां
करतां नकारार्थी मान हलविली. तोंच अपख्पाराणी अकस्मात् तिथे आली.
“ झुझारराव फार आजारी आहेत ना? ” तिनें विचारलें. राजांच्या
मनांतून तें पत्र तसेंच गुप्त राखावयाचें होते, “आपण आपल्या राजवद्याला
तिकडे पाठवूं, झंझाररावांच्या प्रकृतीची अन्य प्रकारें जेवढी काळजी घेतां
येणें शक्य आहे तेवढी घेऊं. त्यांना अंमळ आराम पडल्यावर इकडेच आणचवं,
म्हणजे अनायासे करुणेची व त्यांची भेटही होईल, आणि करुणा एथल्याएथें
राहुनही दोघांचा काळ सुखांत जाईल. बरे; दुदैवाने ह्याच दुखण्यांत त्यांचा
शेवट झाला तर ईश्वरी इच्छा! त्यापुढे कुणाचा काय इलाज ! मग करुणेला
ही बातमी कळवणेंच भाग आहे.-” असे विचार त्यांच्या मनांत घोळत होते.
पण अपरूपाराणीला ती बातमी कळली, आतां ती ग॒प्त रहाणें शक्यच नव्हतें.
“ मग करुणेला पाठवायला पाहिजेच नाहीं का ? ”
२६ पेशवाईचे मन्वंतर
११८ ७५४१० १८० कजा १५ भन 2 कट कही कट दट जोक २ ८८ “८ ०» १-८१-८४%-/१-० ५-० ७ ४-० २2९५८८ 2“ ८५-- 5 “४४५८ ७५१४८४४०४० सट पावल ९८९.» ५.६ छी
“ती जाऊन तरी काय करणार? तो त्यांच्या आयुष्याची दोरी जास्त
बळकट करणार आहे कौं काय? ”
“ही काय माणसाची बोलण्याची रीत झाली ? सोन्यासारखा दुबळा
जीव उघड्यावर पडला होता, त्याला त्यांनीं स्वत:च्या जिवापलीकडे जपून
वाढवून लहानाची मोठी केली. त्यांना मरणघटकेला तिची दृष्टभेट घेण्याचा
देखील अधिकार नाहीं कीं काय? आतां, तुम्ही राजे आहां व ते एक सामान्य
माणूस आहेत हें खरें; पण राजे लोकांनीं झालें तरी माणुसकीला सोडून
वागावें असें कोणत्या शास्त्रांत सांगितले आहे ? तें कांहीं नाही. करुणा
जाऊन त्यांना भेटून आलीच पाहिजे. ”
आईसाहेबांचा हुकूम झाल्यावर त्याविरुद्ध वर्तन करण्याचें धेर्य राजांच्या
अंगीं मुळींच नव्हतें. तरी पण त्यांनीं धाडस करून करुणेच्या डोहाळ्यांचा
पुरुषी भाषेंत शक्य तेवढा आडपडदा ठेवून अर्थात् * करुणा आतांशा आजारी
आहे ' असा चांचरत चांचरत उल्लेख केला.
राणी त्यावर पूर्ववत् अधिकारयुक्त वाणीने उत्तरली, “ त्या आजारी-
पणाची परीक्षा तुम्हां पुरुषांपेक्षां आम्हां बायकांना जास्त असते. आणि
झुझाररावांची दृष्टभेट देखीळ झाली नाहीं तर तिच्या मनाला तरी बरें
वाटेळ का? तें कांहीं नाहीं. तिला गेलेंच पाहिजे.”
शुझाररावाच्या आजारीपणाची बातमी करुणेला नुकतीच राणीकडून
कळली होती व त्या क्षणापासून तिच्या डोळ्यांवाटे गंगायमुना वाहुं लागल्या
होत्या. राजे आपल्याला विद्षेषत: ह्या गरोदरपणांत किती जपतात हें तिला
स्वानुभवावरून माहीत असल्यानें ते या वेळीं आपल्या पालक पित्याची व
आपली भेट होऊं देतील अशी तिला मुळींच आशा नव्हती. परंतु अपर्पा-
राणी कनवाळूपणानें आपल्या पदरानें तिचे अश्न पुसून तिच्या वतीनें अधि-
कारयुक्त वाणीनें राजांना दोन शब्द सांगावयाला इकडे आली, तेव्हां तिला
आह्या वाटू लागली कीं आपणाला आपले पिताजी भेटणार. त्या उत्सुकतेच्या
भरांत करुणा तशीच. घाईघाईने राणीच्या पाठोपाठ येऊन अंतर्महालांतील
दरवाजाबाहेर उभी होती. तिनें त्या दोघांचे संभाषण ऐंकलें तेव्हां तिळा
कधींहि वाटला नव्हता इतका आपलेपणा अपरूपा राणीविषयीं वाटला.
आपली बाजू राणीनें उचलून धरल्या कारणानें तिला धीरहि आला होता व
प्रसादचिन्हांची चोरी न
राणीविषयीं बराच आदरही वाटूं लागला होता. तद्या विमनस्क स्थितींतदेखील
'सासूबाईची मनोवृत्ति निवळत चालल्याचें हें गमक आहे' अशी खणगांठ
आपल्या मनाशीं मारून ठेवावयाला ती चुकली नाहीं. ती आंत गेली ती
पदरानें डोळे पुश्ीतच गेली. राणीनें तिला जवळ घेऊन * वेडीसारखी रडतेस
काय ? झंझाररावांना लौकर बरें वाटेल, कांहीं काळजी करायर्चे कारण
नाहीं. तं आजच्या आज त्यांना भेटायला जा. असें तिचें शांतवन केलें व
राजांकडे वळून पुन्हा विचारलें, “ हिला आज पाठवणारना ? ”
*“ जाऊं द्या. पण जरा जपून वागा म्हणजे झालें. ” राजे म्हणाले.
य अ ऱ€
करुणाराणी त्याच दिवशीं प्रहर दिवसाला माहेरीं निघून गेली. जातांना
तीं प्रासादिक खड्गें ठेवलेल्या देवघरांतील रत्नखचित पेटीची किल्ली तिनें
अपरूपाराणीपाश्ीं दिली. राजे त्यावेळीं जवळ उभे होतेच. राणीनें ती
किल्ली तश्शीच राजांच्या स्वाधीन करून म्हटलें, “ नीट जपून ठेवा. ”
करुणा माहेरीं गेली, व राणीनें दुसऱ्या दिवशीं माहेरीं जाण्याचा बेत ठर-
विला. जातांना एकदां त्या प्रासादिक तरवारीचें दर्शन घ्यावें अशी इच्छा तिला
झाली; म्हणून तिनें राजांना पूजेच्या वेळीं तसें सांगितलें. राजांनीं पूजेच्या
वेळीं पुजाऱ्यापाश्ीं किल्ली देऊन पेटी उघडण्याला सांगितलें. पुजार्यानें
त्यांच्यादेखत पेटी उघडली. तों काय ? पेटी रिकामी! तिच्यांत त्या तर-
वारी नाहींत !
२८ पेशवाईचे मन्वंतर
१४7 ४० १.ल ह) “०.2 का य हक त कक हक. २ *% ७ २ शल १ १ १.५५, ७.
प्रकरण ८ वें
कठोर राजाज्ञा
किव. रन्काकाकाया
रू कातर एखादा कडा कोसळून पडावा तसें सर्वांना त्यावेळीं वाटले.
राजांची तर कंबरच खचल्यासारखी झाली.ते शून्य दृष्टीनें राणीच्या
तोंडाकडे पाहुं लागले, व राणी त्यांच्याकडे पाहु लागली. पुजारी तर देवा-
समोर बळी द्यावयाला नेण्यांत आलेल्या अजापुत्राप्रमाणें भीतीनें थरथर
कांपत होता. तरीही त्यांतल्या त्यांत तो स्वत:शीं समाधान भानीत होता,
“ माझें नशीब थोर, म्हणून ती पेटी उघडतांना महाराज समक्ष हजर होते.
त्यांच्या गेरहूजेरींत ती पेटी उघडली असती आणि असा प्रकार आढळुन
भला असता तर साझें मुंडकें कांहीं जाग्यावर राहिलें नसतें. ”
“तुम्ही किल्ली कालपासून बेसावधपणें कुठें ठेवली होती ? ” राणीने
विचारलें.
“ती माझ्यापाशींच होती ” राजे उत्तरले.
“मग हा प्रकार असा कसा झाला ! ” राणीने पुन्हां विचारलें.
सांगण्याचे तात्पर्य काय कीं ही जी ठिणगी पडली, तिचा हां हां म्हणतां
सार्या राजवाड्याभर वणवा भडकला. सर्व दासदासांची कसून चोकशी
सुरू झाली. आपसांत एकमेकांचे वेमनस्य करण्याऱ्या रोगापासून
राजवाड्यांतील दासदासीवर्ग अलिप्त होता अशांतला प्रकार नाहीं. उलट
ह्या राजवाड्यांत तर त्या प्रकाराचा कळस झाला होता. त्यांतल्या विघ्न-
संतोषी लोकांपैकी ज्यांचे साधले त्यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यावर सूड घेण्या-
साठीं ह्या वाहत्या गंगेच्या लोंढ्यांत हात धुवून घेण्याला कमी केलें नाही. कांहीं
लोक नोकरीवरून काढून टाकण्यांत आले, कांहीं जे पक्के वहिमी ठरले त्यांच्या
वांट्याला तुरुंगवास येऊन चोरीचा तपास लावण्यासाठीं त्यांचा अमानुषपणे
नाना प्रकारे छळ सुरू झाला, कांहींच्या धरादारांवरून तर गाढवांचा नांगर
फिरला. इतकें सारें झालें, दोन दिवस हा धुडगूस चालला, तरी चोरीचा
यत्किचितदेखील तपास लागेना. आणि खरा गुन्हेगार शासन झालेल्या
किवा केदेत हाळ भोगीत असलेल्या अभागी लोकांतच होता किंवा अगदी
कठोर राजाक्षा २९
१८ ८ १५-१०” *. "च १ जये. बाळका अभ केळन १४८ ५ “४० ५/7५-०-००-- ८. । “. - 5
नामानिराळा राहिला होता, याचा तरी काय नेम ?
इतक्या अतिचिकित्सेबरोबरच कांहीं शंकेखोरांच्या मनांत असाही
विचार आला कीं करुणा राणीच्या ताब्यांत ज्याअथी इतके दिवस किल्ली
होती, त्याअर्थी तिनें तर त्या तरवारी बरोबर नेल्या नसतील किवा अन्य
उपायाने लांबविल्या तर नसतील ? ह्या शंकेचा विस्तार होतां होतां ती
राजांच्या कानांपावेतों जाऊन पोंचली. त्याबरोबर त्यांनाही वाटले,
“करुणेचा ग्रह आईसाहेबांविषयीं अनुकूल नाहीं. त्यांच्याविषयी माझें मन
कलुषित व्हावें एवढ्यासाठीं करुणेने तर हा एखादा डाव आरंभिला नसेल?
करुणेने जातांना ती किल्ली मुद्दाम अपरूपाराणीच्याच स्वाधीन केली, त्याची
राजांना आतां नेमकी आठवण झाली. त्यांनीं राणीपा्ी जाऊन ही शंका
बोळून दाखविली. राणीर्ने त्याला मान्यता दिली नाहीं. परंतु “ खरें खोटें
काय असेल तें देव जाणे. पण त्यावेळीं तिथल्या तिथें ती किल्ली तुमच्या
स्वाधीन करण्याची बुद्धि मला सुचली, ती सुवेळीं सुचली म्हूणावयाची ”
एवढे मात्र म्हणावयाला कमी केलें नाहीं. ह्या बाबतींत त्या मानलेल्या
मायलेंकरांचें असें संभाषण चाललें आहे, तोंच द्वाररक्षकानें राजांच्या नांवचें
आणखी एक पत्र आणून दिलें. राजांनीं तें राणीच्यादेखत उघडून वाचले.
त्यांत पुढीलप्रमाणें मजकूर होता.
“ महाराज, मानाजीराव हा आपल्या राजवैभवाला त्याप्रमाणेंच
संसाराला लागलेला भूंगा असून त्यानें आपल्या संसाराची घडी तर
केव्हांच बिधडवळी आहे व राजवेभवाचा डोल्हारादेखील आंतून
इतका पोंखरला आहे कीं तो केव्हां आपल्या मस्तकावर कोसळून
पडेल याचा नेम नाहीं. करुणा राणीशीं आपला विवाहसंबंध जुळवून
आणण्यांत मानाजीरावार्ने पुढाकार घेतला तो कां, करुणा त्याच्यावर
इतकें प्रेम कां करते, त्या दोघांचें एकमेकांवरील प्रेम खरोखरच बहीण-
भावंडांच्या प्रेमाप्रमाणें शुद्ध आहे कीं काय, वगेरे गोष्टींची वाच्यता मी
करीत नाहीं. तें ज्यानें त्याने आपल्या मनाशीं ओळखावें. परंतु आपल्या
आजवरच्या भाग्योदयाला कारण असणार्या व आपल्या राज्याच्या
भरभराटीला कारण अश्या आपल्या दोन्ही तरवारी करुणाराणीमाफंत
आजच मानाजीरावाच्या स्वाधीन झाल्या असून त्या तरवारींच्या
३० पेशवाई'चें मन्वंतर
आधारावर मानाजीराव तंजावरचे राज्य कसें बळकावतां येईल हया
धालमेलींत गुंतला आहे, यावरून आपण काय धोरण वांधावयाचे तें
> ८१..२५./१* “८१% »
पाहिजे असेळ, तर मी आपणाला सांगतो, राणी आपल्या पित्याच्या
आजारीपणामुळें माहेरी आली हें निव्वळ खोटें. आपण थाचा कसून
तपास करा; आणि सावधपणानें वागा. ” |
ह्या पत्राखाठीं आपला एक हितकर्ता? एवढीच सही होती. हा 'हितकर्ता?
कोण ह्या प्रश्नाला अर्थात् फारसें महत्त्व नव्हत. प्रश्न त्या पत्रांतील भज-
कुराच्या खरेखोटेपणापुरताच होता. मानाजीराव व करुणा यांची करु-
णेच्या लग्नापूर्वीपासून मैत्री होती हें राजांना माहीत होतें, व एकदां त्या
दोघांचें लग्न ठरू पहात होतें असेंही त्यांना ओझरतें ऐकू आलें होतें. मानाजी-
राव व करुणा यांचे एकमेकांवर प्राणापलीकडे प्रेम आहे याचा त्यांना प्रत्यक्ष
अनुभव होता व सख्या बहीणभावंडांत देखील इतकें निर्व्याज प्रेम जगांत
क्वचितच पहावयाला मिळतें अशी ते आपण होऊन प्रशंसा करीत असत.
त्या प्रेमाच्या पवित्र पाटवाला त्या दोघांच्या दुर्वर्तनाचे डाग पडलेले राजांना
आतां स्पष्ट दिसू लागले. त्यांची मनस्थिति अगदीं भांबावल्यासारखी झाली.
तशा स्थितींत 'आपण ताबडतोब करुणा व मानाजीराव यांना पकडून आणून
शासन करावें ' असाही विचार त्यांना पुचला, व त्याची अंमलबजावणी
पत्नाचा वृत्तान्त तिच्या कानावर घातला, त्याबरोबर तिनें तोंडांत बोटें घातली.
“माझी तर ह्या पत्रावरून अशी ठाम कल्पना झाली आहे कीं देवघरां-
तील चोरीच्या मुळाशीं करुणा आणि मानाजीराव यांचें अंग मुख्यत्वे असावें.”
राणी.यावर कांहीं उत्तर न देतां जणू काय एकंदर घटनेविषयी-विशेषत-
त्या पत्राविषयीं आइचर्यसागरांत बुडून गेली होती. तिचें आपणाकडे लक्ष
वेधण्यासाठी राजे किचित् मोठ्यानें पुढें म्हणाले, “मीं ह्या दोन्ही गुन्हे-
गारांना ताबडतोब शासन करण्याचा निश्चय केला आहे. ” |
“ पण अपराधाची शावबिती होण्यापूर्वीच शासन ? ”
“अपराधाची शाबिती व्हावयाची आणखी काय बाकी आहे! त्या
कठोर राजाज्ञा ३१
४४ ४५८८४४-११-/७%- ४०८१५५.” ४.” ४.7. ४-४. ७.० ४८ ७०० २ ७ 4८२०१४० ७७८ ४ ५.० १-० ५.० ४०७0४७० भाट क्ट - ४. ० ८०७ ४.० ४०० १-० फायल 2 ५-०
क्र क्ल डी
दोघांचें एकमेकांवर किती प्रेम व किती विश्वास आहे, हें तुम्हीदेखील पहातच
आहां. मानाजीराव परवां जो बाहेरगांवीं गेला तो तिच्याशीं संगनमत
ठरवूनच गेला असला पाहिजे; आणि त्याच्या मागोमाग ही मुलुखभवानी
काल गेली. झंज्ञारराव खरोखर आजारी आहेत कीं नाहीं याचीदेखील
मला आतां शंका येऊं लागली आहे. आणि जातांना त्या कुलटेनें तुमच्या
गळ्याला फांस लावण्याचा कसा बेमाल्म बेत केला होता पाहिलात ना ?
तिनें किल्ली मुद्दाम तुमच्या स्वाधीन केली. तुम्हीं ती लगेच माझ्यापाशी
दिली व तेव्हांपासून ती माझ्यापाशींच होती म्हणून ठीक; नाहींपेक्षांहा आरोप
तुमच्यावर यावा व तुमच्या माझ्यांत वितुष्ट यावें असा तिचा बेत होता."
“ करुणा इतको पाताळयंत्री असेलसें मळा नाहीं वाटत. भाबडी मुलगी,
तिला इतके डावपेच कुठचे सुचायला? आतां, भानाजीरावाविषयीं मात्र
कांहीं खात्री देववत नाहीं. त्याचें तिच्यावर वजन आहे, ती पुष्कळदां त्याच्या
तंत्राने वागते, हें मात्र खरें. पण त्यानेंच तिच्या भोळेपणाचा फायदा घेऊन
तिला फंसवलें असेल !.. ..
“ हे पत्र सांगते कीं तीं दोघेही आमचा विवाह होण्यापुर्वीपासून पापें
पुजीत आहेत. ” राजांनीं तें पत्र राणीच्या पुढ्यांत आदळून आविक्यानें म्हटलें.
त्यावेळची त्यांची तप्त मुद्रा पाहन पहाणाराला भीतीनें कांपरें भरलें असतें.
पण राणी शांतपणानें म्हणाली, “हें पहा, पदरीं पडलें आणि पवित्र झालें.-
माझ्या मतें करुणा तशी नाहीं. पण माणसाच्या पोटांत कोण रिघ शकणार?
ती कशी असली तरी आतां राणी झाली आहे, आणि उद्यां राजमाता व्हायची
आहे. तिच्याविषयीं असे अनुदारपणाचे उद्गार काढणें आणि तिला शासन
करणें म्हणजे आपलीं गृहछिद्रे आपणच दिव्यावातीनें दुसऱ्याला दाखवून
देण्यासारखे आहे. तरुणपणाच्या पहिल्या जोरांत अपराध अनेकांच्या हातून
घडतात. मात्र ती त्या कारस्थानांत कितपत मानाजीरावाच्या आहारी
गेली आहे, त्याप्रमाणेंच त्या तरवारी तिनेंच खरोखर नेल्या कीं काय-”
“ शंकाच नको. तिनेंच नेल्या असल्या पाहिजेत. ”
“ तिनें नल्या असल्या तरी त्या तिनें खरोखरच मानाजीरावाच्या स्वाधीन
केल्या किवा कसें याचा अगोदर तपास करायला हवा. उगाच एखाद्या
मार्थेफिरूप्रमाणें त्या निनांवी पत्रावर विश्वास ठेवून कसें चालेळ? मला
३२ पेशवाईचे मन्वंतर
तर वाटतें कीं कुणींतरी केवळ सूडबुद्धीने तें पत्र लिहिलें आहे. ”
“ते सुडबुद्धीनें लिहिलें असो कीं प्रेमबुद्धीने लिहिलें असो. त्यांत ग्राह्यांश
असेळ तेवढा आपण घेतलाच पाहिजे. ”
“ एण॒ त्या माणसाला तरी इतकी लावालावी करायची काय गरज होती?
ज्याचा अपराध असेल त्याला ज्यासन झालें पाहिजे आणि होईलही. इतक्या
उजेडांत आलेल्या भानगडी मधल्यामध्यें जिरत नाहींत खास. पण असलीं
चृगल्खोर माणसें कोणत्याही परिस्थितींत घातकच. आपल्या रामराज्यांत
असल्या आगलाव्या लोकांचा सुळसुळाट मळा नको आहे. ह्या चृगलखोरांचा
प्रथम तपास करून त्याला शासन झालें पाहिजे. ”
राणी आपल्या भतें राजाचें शांतवन करण्याचा प्रयत्न करीत असली तरी
राजांच्या मनावर क्षणोक्षणी त्याचा विपरीत परिणाम घडून येत होता.
राणी करुणेच्या अन्यायावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न करीत आहे असा
राजांचा पक्का ग्रह झाला होता. ते पुर्ववत् कड्या स्वरांत तिला म्हणाले,
“ आईसाहेब, दया, ममता, आपलेपणा हे सद्गुण खरे; पण त्यांचा
अस्थानीं उपयोग केल्यानें सद्गुणी मनुष्याला त्याचे दुष्परिणाम भोगावे
लागतात. तुम्ही करुणेविषयीं ममताळूपणा दाखवीत आहां तो असाच
अस्थानीं आहे. तेव्हां तुम्हांला माझी विनंति आहे कीं ह्या बाबतींत तुम्ही
कांहीं बोळूं नका; आणि राज्याची आबादानी' राखण्यासाठी मला कांहीं
कांहीं बाबतींत थोडेफार निष्ठुर व्हावें लागलें तरी त्याबद्दह मला दोष
देऊं नका. ”
“ आतां तुम्ही क्तेसवरते झालां. तुम्हांला मी यापेक्षां जास्त काय सांगूं?
हो! मुलांनीं शब्द मानला तर बरें; नाहींपेक्षां वडीलमाणसांची शोभाच व्हायची!
त्यापेक्षां जास्त कांहीं न बोललेले बरें-बाकी, तुमचादेखीलळ जीव कळवळला
तो उगाच नाहीं. त्या तरवारी चोरीला गेल्या हा राज्याला केवढा मोठा
अपशकून ! काय वाटेल तें करून चोरीचा तपास लावलाच पाहिजे. ”
असें म्हणून राणीनें आपल्या भाषणाचा समारोप केला. व माहेरी जाण्या-
साठीं राजांचा निरोप घेतला. आणखी' अंमळझ्यानें ती आपल्या थोर पदाला
साजेशा लव्याजम्यासह माहेरीं जावयाला निघाली.
त्याच दिवशीं सूर्यास्ताच्या सुमाराला चंदासाहेबाकडून एक निर्वाणीचा
कठोर राजाज्ञा ३३
..०६.० ५.५... ४५-५८ /५-/४-४६-॥ ->६५-४-४४-८% ४५-०४ ह: ४-८ ४-0 ह “7-0: - 0१-"०५१-१-५-/६-/८६४४-”--
४ ५ &४%-०११४-/१//१. '७-/०५८ ४४” १ 1 00५ 0 /7 ४७७ ४-0 ऑरल
खळिता येऊन धडकला. त्या खलित्यांत पुढील आशयाचा मजकूर होता:--
“ तुम्ही तंजावरची गादी अनधिकारानें बळकावली आहे अशाबद्दल
तुमच्या प्रतिस्पर्धी मंडळींतील गादीच्या योग्य वारसाकडून आमच्याकडे
बरेच दिवस तक्रारी येत आहेत. तुम्ही उघड उघड दासीपुत्र असून
गादीवर बसल्यानें गादीचा अक्षम्य अपराध झाला आहे. शिवाय तुम्ही
आमचे व्याही व तुमचे कर्तबगार दिवाण सय्यदखान यांचा विश्वास-
घातानें खून केला आहे. तुमच्या व कर्नाटकांतील इतर हिंदू राज्यांवर
वास्तविक बादशहाची सत्ता असून तुम्हीं बळजबरीने त्या सत्तेचे तुमच्या
राज्यापुरतें अपहरण केलें आहे. ह्या तुमच्या अक्षम्य गुन्हेगारीबद्दल
बादशाही सत्तेचे प्रतिनिधि व आमचे श्इवशूर नबाब दोस्तअल्ली
यांनीं तुमची चौकशी करून न्याय करण्याची कामगिरी आम्हांला
सांगितली आहे.
“ यास्तव हया हुकुमान्वयें आम्ही तुम्हांला असे फर्मावितो कीं तुम्हीं
आमच्याशीं आम्ही सांग त्याप्रमाणे तह करून गादीवरील आपला हक्क
सोडून देण्याला तयार व्हावें व तसें आम्हांला तीन दिवसांचे आंत कळवावें.
तुम्हीं शरण येऊन सामोपचाराचें धोरण राखल्यास तुम्हांला मान्यता-
पुर्वक सरदारी बहाल करण्यांत येऊन तुमच्याशीं दोस्तीचा तह करण्यांत
येईल. त्याप्रमाणेंच तुमच्या गादीवर तुमच्या मागाहून येणाऱ्या वारसा-
पासून किवा त्याच्या वतीने हरकोणापासून तुम्हांला उपद्रव होणार
नाहीं अशीही तजवीज करण्यांत येईल. याम्रमाणें वर्तेन तुमच्याकडून
तीन दिवसांच्या आंत न घडल्यास मात्र लगेच आमच्या सेन्याचा तुमच्या
राजधानीसभोंवार वेढा पडेळ व ह्या प्रकरणाचा जो काय
आम्हांला योग्य वाटेल तो निकाल आम्ही तरवारीच्या जोरावर तात्काळ
करून घेऊं, याची तुम्हांला दखलगिरी असावी ... ”
3 शी डी ्श्
राजांचा नेहमींचा परिपाठ असा कीं असे कोणतेंही महत्त्वाचे राजकारण
उपस्थित झालें कीं प्रथम आपल्या विश्वासांतील सर्वे कारभारी मंडळींचा
विचार घ्यावयाचा व मग काय तो बेत नक्की ठरवून त्याची अंमलबजावणी
करावयाची. इतकेंच काय पण कोणाला एखाद्या अपराधाबद्दह जबाबदार
३
३४ पेशवाईचे मन्वंतर
“१-५.” 00” ४.१४" “४६.४४. “४ 20५ “४.५५.” ५//५/५-/५-/५ “०-१ ६ २.१ “>. ४२.५४ ८००१ “४५४०९४०४५० ७
१7०१५९७ ४९१५५0१ शा. र पी
धरून शासन करावयाचें झालें अथवा कोणाला एखाद्या उपयक्त कामगिरी-
बहल कोणत्याही महत्पदाला चढवावयाचें झालें तरी सहकारी मंडळींचा
विचार घेतल्यावाचून त्यांनीं कांहींदेखील करूं नये. ह्यामुळें मानाजीराव,
मल्हारजी, सखोजी नाईक वगेरे मंडळी प्रत्यक्ष राजदाकतीचे घटक बनून गेली
होती. मानाजीरावाविषयीं तर बोलावयाळाच नको. त्यानें स्वतःच्या
अंगच्या लोकोत्तर गुणांमुळे सर्व दरबारी मंडळीला-खाज्या कारभार्यांनादेखील
मार्गे टाकलें होते. सखोजी नाईक हा दिवाण ना; पण मानाजीरावाचें एवढें
प्रस्थ राजांपाशीं माजलेळें पाहून त्यालादेखील जेव्हां तेव्हां अंमळ भिऊन
वागणें भाग पडे. सखोजी व मानाजीराव हे अगदीं जीवरच कण्ठरच स्नेही
खरे. परंतु सखोजीलाही मानाजीरावाची एवढी चलती. पाहून-आणि
कदाचित् दुसर्या कोणीं सांगितल्यामुळेंही असेल-संशयात्मक धास्ती वाटूं
लागली होती कीं, मानाजीराव स्वार्थाला वळी पडन मित्रद्रोहाचें पाप जोड-
ण्याला तर उद्युक्त होत नसेल ना? अशा संशयानें मनुष्याला एकदां पछाडले,
कीं त्या मनुष्याच्या हातून मित्रद्रोहाचें पापदेखील त्याला स्वतःला नकळत
घडूं शकतें. मात्र एवढें खरें कीं, मनदुबळेपणाची मऊ मऊ भुसभुशीत जागा
सांपडल्याशिवाय कोणाच्याही मनांत संशयाचें बीज कधींच रुजत नसतें.
सखोजी असा कांहींसा मनदुबळा होता.
आज राजांनीं तें पत्र वाचावयाला व सखोजी तेथें यावयाला एक गांठ
पडली. वास्तविक सभोवारच्या सहाय्यक मंडळींत राजांना सल्ला-मसलत
देण्याचा पहिला मान मानाजीरावाला मिळावयाचा, व मग मानाजीरावानें
इतर मंडळींना पाचारण करून पुढील विचारविनिमय करावयाचा, असा
अलीकडील परिपाठ होता. पण एकतर आज मानाजीराव राजघानींत
नव्हता व दुसरे, आजच तो तरवारीची चोरी झाल्याविषयींच्या संशयामळें
राजांच्या अवकुपेला पात्र झालेला असल्यानें तो जरी वेळीं जवळ असता तरी
राजांनीं त्याचा विचार प्रथम घेतलाच असता असें नाहीं.
सखोजी तेथें येतांच राजांनीं त्याला चंदासाहेबाचें तें निर्वाणीचें पत्र दाख-
विले. आंत येतांच राजांची गंभीर व चिंताक्रांत चर्या पाहून असा कांहींसा
संशय सखोजीला आलाच होता, त्याला त्या पत्राने दुजोरा मिळाला. तो
पत्र वाचूं लागला तेव्हां राजे एकसारखे त्याच्या चर्येकडे टक लावून पद्दात
कठोर राजाज्ञा ३"
होते. पत्र वाचून होतांच त्यानें त्यांच्याकडे वळून म्हटलें, “ चंदासाहेबाचा
असा कांहींतरी दुष्ट बेत चालल्याबद्दलचा सुगावा मला लागला व तें महा-
राजांच्या कानांवर घालण्यासाठीं मी आलों होतों. तों ह्या पत्राने खात्रीच
करून दिली.”
“ सानाजीचें ह्यांत कांहीं अंग असं शकेळ का?” राजांनीं विचारले.
वस्तुतः त्यांची तशी खात्रीच होती. पण इतका आपल्या गळ्ांतला ताईत
मानाजीराव, त्याच्यावर एकदम भयंकर आरोप आपण केल्यास लोक काय
म्हणतील ह्या भयानें ते कांहीं हातचे राखून बोलत होते.
सखोजीची जरी मानाजीराव अपराधी असल्याबहल यत्किचित् खात्री
नव्हती, आणि जरी तो स्वार्थासाठी काय पाहिजे तें भलेंबुरें करण्याला धजण्या-
इतका बेरड वृत्तीचा नव्हता, तरी कावीळ झालेल्याच्या डोळ्यांना सर्वच पिंवळे
दिसतें त्याप्रमाणें त्याला मानाजीराव दोषी असावा असें वाटले. एखाद्याला
कोणत्याही कारणानें जें मनुष्य नावडते झालें असेल, त्याच्याविषयी उण्या
गोष्टी बोलण्याकडे आणि करण्याकडे एखाद्याचा कल स्वाभाविकतःच असतो-
सखोजीनें त्या वहात्या गंगेंत हात धुवून घेतले. तो म्हणाला, “ महाराजांना
तसा कांहींतरी नक्की सुगावा लागला असल्याशिवाय आपल्या आवडत्या
मानाजीविषयीं महाराजांच्या तोंडून असे उद्गार कसे निघतील पण त्याच्या
हातून अज्ञानाने एखादी चूक घडली असली तरी तिकडे महाराजांनीं काना-
डोळा करावा. माणसें तोडतां फार लौकर येतात पण जोडावयाला महा
सायास पडतात. तशांत तो अजून हड आहे..” बोलतां बोलतां सखोजीनें
राजांच्या दृष्टीला दृष्टि भिडविली. त्यांच्या दृष्टींत निश्चयपूर्ण संतापाचे
पाणी खेळत असलेलें पाहून तो जरा दचकून बोलावयाचा थांबला. खाई
त्याला खवखवे या न्यायाने त्याच्या मनांत अशीही शंका आली कौ, महा-
राजांनीं आपल्या आवडत्या मानाजीविषयीं माझें मत पहाण्यासाठीं हा संदिग्ध
प्रश्न ठाकला असावा; व आपण कोणत्याही पुराव्याच्या अभावीं निष्कारण
होला हो ठोकून दिल्यामुळें त्यांचा गेरसमज होऊन घुस्सा झाला असावा !
परंतु दुसर्याच क्षणाला सखोजीची संशयिनिवृत्ति झाली. राजांनीं,
आवेद्याच्या भरांत त्यांना आज्ञा केली, “ बस्स! तुम्ही आतांच्या आतां
मानाजीराव व राणी ह्या दोघांना पकडून आणण्यासाठीं माणसें रवाना करा.”
३६ पेशवाईचें मन्वंतर
क ०५. ८0१४५४४५४५”
री री 6 “० ०४४४४ प्या. काना: 01-21: ८८००-००... ९४४१-४४-0१ 0४.0४” ५/ ४”-/
2१ ८- 7५ 7५... . “५ 7
यावरून सखोजीची खातरजमा झाली कीं महाराज खरोखरच मानाजी-
सावावर रागावले आहेत. त्याला पकडन आणण्याची महाराजांची आज्ञा
सखोजीला तितकीशी विस्मयजनक वाटली नाहीं. पण राणीलाही पकडून
आणण्याविषयीं महाराजांचे फर्मान सुटलेले ऐकून मात्र त्याच्या अंतःकरणाला
वकक वसल्यासारखा झाला. कारण त्याच्या स्वत:च्या मतें राणी ही तंजा-
वरच्या राज्यांतील मूतिमन्त राजलक्ष्मी होती; तिच्याच पुण्यप्रभावानें राज्यांत
आबादीआवाद चालली आहे असा तिच्या ठायीं एकट्या सखोजीचाच नव्हे
तर अनेकांचा पुज्य भावाचा विश्वास होता. सखोजीच्या मनांत त्याच-
क्षणीं असेंही आलें कीं आपण राजांना हिताचे दोन शब्द सांगून त्यांना राणीच्या
छळापासून निवृत्त करावें. परंतु उसर्याच क्षणाला राजांच्या मुखांतून
पुर्वीच्याहनही निरिचित अशी आज्ञा उच्चारली गेली,” आणि राणी व मानाजी-
राव यांच्याविषयीं ज्या कोणाच्या मनांत मदर वसत आहे असें आढळून
येईल अशा सर्व वहिमी मंडळीलाही पकडून आमच्यासमोर घेऊन या. आमच्या-
विरुद्ध उभारण्यांत आलेल्या ट्या राजकारस्थानाचा पाळांमुळांसह शेवट
आम्हांला वेळींच केला पाहिजे.. जा प्रथम आतांच्या आतां राणी व मानाजी-
राव यांना पकडून आणण्याची तजवीज करा, व काय तजवीज केली तें ताबड-
तोव इकडे येऊन कळवा. ”
'' महाराज, मी जरा स्पष्ट बोलतो याबद्दल क्षमा असावी. पण आपण
शूर्चे पारिपत्य करण्याचा विचार शरथम करावयाचा सोडन हें भलतेंच काय
आरंभिले आहे?” सखोजीनें मना'चा हिय्या करून विचारलें.
राजे थावर निग्रहपुर्वक उद्गारले, “ ह्या घरभेद्यांपा्शींच शत्रुकारस्था-
नाचे मूळ आहे. त्यांचें निर्मूलन केल्याशिवाय त्या रशत्रुकारस्थानाला आळा
“सावयाचा नाहीं. तुम्हांहा राणीविषयींची माझी आज्ञा ऐकून चमत्कारिक
वाटलें असेल-” राजे क्षणभर थांबून पुन्हा म्हणाळे, “पण राणीचें नशीब!
तिला भिकेचे डोहाळे आठवले ? त्याला कोणाचा काय इलाज? ”
सखोजी दिवाण झाला तरी तो राजांचा नोकर ! राजांच्या आज्ञेपुढे
त्याच्या सारासार विचाराला कसली किमत? |
ववेदासाहेब आणि मोहना ३७
“ ४५४ १४१४५१५" (१८ ४-० १.१४ -८ ४५१. ६५ ५८५ ४7 ५-५. ५/*८-- -/*-/%- ४-४ ५ ७४ ५-४-/ ५८१४ ५-५ ५-४१- ४. ५2 १-१४- 7 20 ४८०४८० ५-८ १८ धट १७० ८-० ४०७ 0 १-० ४ १०४०
प्रकरण ५ वें
चैदासाहेब आणि मोहना
क
भोंवारच्या जगांत एथवरच्या घडासोडी होईतों सुमारें तीन वर्षांचा
काळ लोटला. एवढ्या काळांत त्रिचनापल्लीच्या राज्यांत पुष्कळच
उलथापालथ झाली होती. सर्प गाईच्या पायांना वेटोळीं घाळून पाय घट्ट बांधून
मनसोक्त दुग्धपान करतो त्याप्रमाणें चंदासाहेबाचा कारभार चरिचनापल्लींत
चालला होता. मीनाक्षीराणी मात्र विचारी त्या बंदिवासांतच खितपत
पडळी होती. भात्र तिच्यामुळे तिचा रंगसहाल-जेथें तिर्ने मनोविकारांना
बळी पडन चंदासाहेबासारख्या यवन नराधमाच्या संगतींत दुराचाराचीं
पापें पुजलीं तो रंगमहाल तिच्या गेरहजेरीमुळें रिकामा पडला होता असें नाहीं!
मग काय? चंदासाहेबाच्या बेंगमेला तो रंगमहाळ लाभला होता ?-
नाहीं. चंदासाहेबाच्याच काय पण दिल्लीशवराच्या बेगमेलाही भूषवील
इतका मीनाक्षीराणीचा तो रंगमहाल सर्वे प्रकारच्या विलासोपयोगी साहि-
त्यानें सुसज्जित व वेभवसंपन्न असा होता. त्याच्या वभवार्चे वर्णन करा-
वयाचे तर त्याला थोड्याशा फरकानें पांडवकालीन मयसभेचीच उपमा
द्यावी लागेल. मीनाक्षीराणी ही आपल्या पतीची अत्यंत लाडकी राणी,
तिच्या होशीप्रमाणे राजानें लक्षावधि रुपये,; लाखों रुपये किमतीचे
सुवर्ण, हिरे-माणके वगेरे रत्ने खर्चन 1! तो नुसता एक रंगमहाल
सजविला होता. असें असतांही मीनाक्षीराणीला बंदिखान्यांत कोंडल्या-
पासून आजवर एकदांही त्याच्या बेंगमेला त्या रंगमहालांत घटकाभर विश्रांति
घेण्याची संधि मिळाली नव्ह्ती. परंतु बेंगमेला त्याबद्दल नाराज होण्याचें
कांहींच कारण नव्हतें. तिच्यासाठीं चंदासाहेबानें अडीच वर्षांपूर्वी म्हणजे
मीनाक्षीराणी केदेंत पडून त्रिचनापल्लीच्या राज्याचीं सर्वे सूत्रे पुर्णपणे
त्याच्या हातीं येतांच राजप्रासादादेजारींच सुमारें पाव कोटि रपये खर्चून
व त्रिचनापल्लीच्या खजिन्यांतील बहुमोल रत्ने उपयोगांत आणून बेगममहाल
या नांवाचा एक नवा रंगमहाल बांधला होता. तेव्हांपासून त्याच्या मुख्य
बेंगमेचें तेंच वास्तव्यस्थान होतें.
३८ पेशवाईचें मन्वंतर
आणि मौनाक्षीराणीच्या रंगमहालाचा उपयोग काय? तेंही चंदासाहेबारचें
विलाससंदिरच होतें; परंतु सहध्भिणी बेंगमांशीं विलासविहार करण्याचें
तें स्थान नव्हे! तेथें फक्त नाटकशाळांना प्रवेश होता ! आणि तो देखील
संदे नाटकळाळांना नव्हे, तर-दिव शिव! त्या गोष्टीचा उच्चार करतांना
जिव्हा अडखळते व लेखणी थरथर कारू लागते.- आपल्या पूर्वायुष्यांत पति-
सेवापरायण म्हणून सर्वांना परिचित असलेल्या मीनाक्षीराणीसारख्या मान्य-
तेच्या हिंदु महिलांना भरष्टवून आपल्या मुसलमानी धर्माची महति वाढ-
दिण्याचा त्या नरपश्ूला मोठा नाद! व त्या आपल्या अजब करामतीचें मतिमंत
स्मारक म्हणून त्याने आपल्या तसल्या पापांची परवड रचण्यासाठीं तो रंग-
महाल खास राखून ठेविला होता! त्या रंगमहालांत मीनाक्षीच्या मागाहून
अनेक हिंदु महिलांच्या अब्रूची होळी पेटविली गेली असून तूर्त तेथें मोहना
या नांवाच्या एका सोळासतरा वर्षांच्या रूपवती युवतीचे वास्तव्य होतें
मोहना त्या महालांत नुकतीच प्रविष्ट झाली होती, व प्रथम प्रथम तिनें
चंदासाहेबाळा वश होण्यांत आढेवेढे घेतले असले तरी आज ती पूर्णपणें
त्याची विळासदासी बनण्याला मान्यता देऊन चुकल्यामुळें त्या दोघांच्या
प्रणयी हितगुजाला आज नवा रंग चढला होता.
त्या रंगमहालाच्या सजावटींतील एथें विषयपरत्वे प्रामुख्यानें उल्लेखिण्या-
सारखा विशेष म्हणजे तेथील सोनेरी मलाम्याच्या नक्षीदार भितींवर
व पलंगासर्भावार जरतारी रेशमी काढण्यांनीं टांगण्यांत आलेलीं भव्य तेल-
चित्रे होत. त्या चित्रांत फक्त एकच चित्र पुरुषाचे होतें, व वाकीचीं यौवन-
सोंदर्यसंपक्च स्त्रियांची होतीं. पुरुषाचें जें भव्य चित्र तेथें होतें, तें कोणातरी
राजपुरुषार्चे व तेंहि हिंदु राजपुरुषाचें असावें, त्याप्रमाणें इतर सर्वे चित्रे
हिंदु स्त्रियांची असावीं, असें वर वर पहाणार्या कोणालाही कळन आलें असतें
चेंदासाहेबाच्या आग्रहाने मोहना त्या रात्रीं चार घटका रात्रीला त्या
रंगमहालांत प्रविष्ट झाली, ती तेथील चित्रांकडे टकमक पहात उभी राहिलेली
पाहून चंदासाहेबानें दोन पावलें पुढें होऊन तिच्या हनवटीला हात लावन
लाडक्या भाषेत तिला विचारलें, “ प्यारी, त्या चित्राकडे इतकी टक लांवन
काय पहातेस ?”
चंदासाहेबाच्या हाताचा स्पर्शे होतांच मोहनेचें सर्वांग विजेचा धवका
ववंदासाहेब आणि मोहना ३९
२ ७१९ ४४७७६७४१५८ ७० १५,/५./७१७...७०१७ ४७ *१४.४१४७ (७. 600९५७७ “५-५५-/९५.८४-0५०५९५५//५-०५०/५-/४०”०५//” ४०-०४"
बसल्याप्रमाणें थरारलें, ब जाईच्या कोमल पुष्पाला आगीची झळ लागतांच
तें कोमेजून जावें त्याप्रमाणें तिर्चे मुखकमल त्याच क्षणीं कोमेजून गेलें. परंतु
कामांध चंदासाहेबाच्या तें मुळींच ध्यानीं आलें नाहीं; मग तिच्या अंत-
रंगांतील कालवाकालवीची त्याला काय कल्पना असणार ! बाकी, मोहनेच्या
मनांत त्या क्षणीं कोणतेही विचार घोळत असोत, बाहेरून दिसावयाला ती
त्या अतिप्रसंगाविषयीं तिरस्कार प्रदशित करीत आहे असें सहसा कोणाच्याही
ध्यानीं आलें नसतें. चंदासाहेबानें तिच्या हनुवटीला हात लावला, तो उजव्या
हातानें हलकेच दुर सारीत तिनें पुन्हां एकवार त्या चित्रमालिकेकडे निरीक्षून
पहातां पहातां त्या राजपुरुषाच्या चित्राकडे अंगुलीनिर्देश करून विचारलें,
“दु चित्र कोणाचे ? ”
चृंदासाहेब मोहनेच्या स्कंधावर वाढत्या लडिवाळपणानें हात ठेवून उद्-
गारला, “मला वाटलेंच होतें त॑ मला असाच कांहीं तरी प्रश्न विचारशीलसें.
तिचें लक्ष तेथल्या चित्रमालिकेकडे पूर्णपणें वेधलें गेळें असून तिची तौक्ष्ण
दृष्टि मधुपानाला आतुर होऊन ह्या पुष्पावरून त्या पुष्पावर झडप घाल-
णाऱ्या भमराप्रमाणें तेथील मानिनींच्या चित्रांकडे क्रमाक्रमाने वेधलळी जात
आहे हें तेव्हांच त्याच्या ध्यानी आलें. तो पुढें म्हणाला, “त्याबरोबरच हीं इतकीं
सुंदर स्त्रियांची चित्रे इथें टांगण्याचें कारण काय असाही प्रश्न तुझ्या मनांत
उत्पन्न झाला असेल नाहीं? ”
“ आपण एखाद्याच्या मनांतली गोष्ट अचूक ओळखण्यांत मनकवड्या-
सारखे वाकबगार आहां, हें मला माहीत नव्हतें ! ” मोहना किंचित् अधोमुख
होऊन आपली दृष्टि एखाद्या सर्व दिश्यांना चकाकणाऱर्या पाचूप्रमाणें नेत्रांच्या
एका कोंपऱयांतून ओझरती चंदासाहेबाकडे वळवून पहात म्हणाली.
“ त्यांत एवढे अचंबा करण्याजोगे काय आहे ? स्त्रीस्वभाव हा इथून
तिथून सारखाच आहे. चंदासाहेब मुसलमान असून आपल्या धर्माचा कट्टा
अभिमानी आहे, व इतर धर्माचें ज्या ज्या उपायांनीं खंडन करतां येईल त्या त्या
उपायांनी तें करण्यांत तो सदा तत्पर असतो, ही गोष्ट सूर्ये-चंद्राइतकी स्पष्ट
आहे. त्याच्या रंगमहालांत हीं अशीं हिंदुधर्मीय व्यक्तींचीं चित्रे पाहन कोणालाही
आश्चर्ये वाटणारच. हा रंगमहाल तुला नवीन आहे; व तुझ्याप्रमाणेंच ह्या
चंदासाहेबाच्या प्रेमाला पात्र ठरलेल्या प्रत्येक स्त्रीला ह्या रंगमहालांतील
2० पेशवाईचें मन्वंतर
"**४-१-/४५/€४-५-४४५/१४५४४० २"-९* €४-४"-१-/"-५४१-€”" €५५-१--८४८/५-१५-४४४/-४५१/१- ०१५ -“५/१५ .»९१०//१.९४५ -/7१५./0५.०९५ ७. ०१५ ०९५७७ .“7% ०००५ ,//० »_/0५ १ (५७०१५, ७९७४०४ ४ कक टल
आ.
प्रथमप्रवेश्शाच्या वेळीं तुझ्याप्रमाणेच आश्चर्य वाटलेलें मीं पाहिलें आहे. आणि
एथला हा एकंदर देखावाही आदचर्य वाटण्याजोगा आहे खरा. ” तो प्रथम
त्या राजपुरुषाच्या चित्राकडे बोट दाखवून म्हणाला, “ हें चित्र ह्या देशच्या
अखेरच्या राजाचें. ह्याच्याच रूपवती मीनाक्षीराणीला मीं माझ्या प्रेमपाश्यांत
गुरफटून टाकून माझी नाटकशाळा बनवून सोडलें, व अखेर तिला केदखान्यांत
डांबून एथल्या राजसिहासनावर आरूढ झालों. हा पहा रत्नखचित सुवर्ण-
पर्यक व हें विळासोपयोगी बहुमोल साहित्य पहा! हें सारें एथे राजेश्वर्य-
त्याचा भोक्ता आतां मी आहें. त्याप्रमाणेंच इथें हया इतक्या सोंदर्यसंपन्न
हिंदु य्वती तेलचित्रांच्या रूपानें वास करीत आहेत ह्या सार्या माझ्या विलास-
दासी शोभून गेलेल्या आहेत. एखादी मानिनी हिंदु सुंदरी ह्या रंगमहालांत
प्रविष्ट होतांना रुष्ट झालेली असली किंवा लाजत असली तर मी तिला एथे
आणून हा देखावा दाखवितों व अभिमानपूर्वक तिला विचारतो, (“ह्या पहा
तुझ्या देशांतील थोरामोठ्यांच्या लेंकी-सुना-बायका! यांच्या हिंदुत्वाचा व
पावित््याचा दिमाख जर इथें चालला नाहीं, तर तुझा तरी रुष्ट होऊन कसा
निभाव लागणार ?” त्याप्रमाणेच एखाद्या सुंदरीला नीतिधर्माचिं भय वाटं
लागलें व त्या भयामुळें लज्जा उत्पन झाली तर तिला मी ह्या चित्राकडे
बोट दाखवून विचारतो,” -तो त्या चित्रमालिकेमधील राजपुरुषाच्या चित्रा-
शेजारीं टांगलेल्या भव्य व सूंदर चित्राकडे अंगुलिनिदेश करून म्हणाला,
'ही पहा राणी मीनाक्षी. हो राणी देखील जिथे माझी विलासदासी होण्याला
लाजली नाहीं, तिथे माझी विलासदासी होण्याला तृ कशाला लाजतेस?'
ह्या सवे स्त्रिया मीं मोहित करून किवा बलात्काराने हरण करून आणल्या
असून जव्हां जेव्हां त्यांच्या पुरुषांनी मळा विरोध केला, तेव्हां तेव्हां त्यांची
कत्तल करण्यांत मीं मुळींच दिरंगाई केलेली नाहीं. ”
“ यांच्याच पंकतींत आज मी बसत आहें, असाच ना याचा अर्थ ? ” मोह-
नेने चर्या गोरीमोरी करून विचारलें.
“ होय. असेंच म्हूणेनास ! ” चंदासाहेब निर्भयपणे उत्तरला.
“ आणि राणीची जी गत झाली तीच इतर स्त्रियांची झाली असेल
नाहीं? ”
“ नाहीं. राणीची गोष्ट निराळी आणि त्यांची निराळी. राणीची भला
चैदासाहेब आणि भोहना ४१
अजून माझ्या कार्यासाठी आवश्यकता आहे. त्रिचनापल्लीच्या राज्याचा
घांस जरी माझ्या गळ्याखालीं गेला असला, तरी तेवढ्यावरून तो पचनीं
पडला अर्से म्हणवत नाहीं. तो पूर्णपणें पचनीं पडेपावेतों मला राणीची
गरज आहे. म्हणनच राणीच्या अब्रला लौकिकांत धक्का लागं नये यासाठीं
मीं तिला बंदिवासांत कोंडून ठेवलें आहे. पण इतर स्त्रियांपैकी कांहीं दासी
बनून साझ्या बेंगमेची सेवा करीत आहेत, कांहीं अब्रसाठीं आत्महत्या करून
मरून गेल्या, आणि कांहींचीं मीं बळजबरीने हाताखालच्या मसलमानांशीं
कर्गने लावन दिलीं.
मग ह्या पंक््तींत माझे स्थान कोणतें? ”
“तें आतां तुझें तूं ठरवावयाचें आहे. स्त्रीजातीवर-इतकेंच काय पण
त्यांतल्या निवडक भमानवती व रूपवती स्त्रियांवर विजय मिळवन त्यांना
माझ्या विलासमंदिराचीं भूषणें बनवून सोडण्यांत मी किती भाग्यवान आहें
याचा पुरावा हा पहा-ह्या सोंदर्यसंपन्न स्त्रियांच्या चित्रांच्या रूपानें तुझ्यापुढे
उभा आहे. ह्या सर्वे स्त्रियांहून जरी तूं जास्त रूपवान नाहींस तरी तं जर
माझी मर्जा राखलीस, तर तुला मी माझी मुख्य बेगम करावयाला तयार आहें.”
तू माझ्या पदरीं आलीस त्याच दिवशीं माझ्या मर्जीप्रमाणे वागावयाळा तयार
झाली असतीस तर आज हा 'जर' तर! चा प्रश्नच उत्पन्न झाला नसता. पण
अजूनही वेळ गेलेली नाहीं! अजूनही तं मनांत आणशील तर माझी मर्जी
संपादन करूं शकशील. ”
“मीं आपल्या इच्छेप्रमाणे आपल्या सेवेंत रुजू होण्याचें मान्य केल्यावर
साझा दोष कोणता शिल्लक राहिला? ”
“ माझी सेवा करावयाला तृं राजी आहेस हें एका परीने फार चांगलें झालें.
पण तसें करण्यांत तू माझ्यावर कांहीं उपकार करीत आहेस असें मात्र मला
मुळींच वाटत नाहीं. समज, तृं अखेरपावेतों माझ्या इच्छेप्रमाणे वागण्याला
कबूल झाली नसतीस किवा अजनही कबूल झाली नाहींस, तर सत्तेच्या जोरावर
स्वतःची इच्छा पूर्ण करून घेण्याला मी समर्थ आहें. ह्या इतक्या खुबसू्रत
प्यारी माझ्या विलासदासी झालेल्या तुला आढळून येतात, ह्या सर्वे मला
स्वसंतोषानें वश झाल्या असें नाहीं. परंतु ज्यांनीं माझ्या खषीच्या मागणीची
पायमल्ली केली, त्यांना मीं सक््तीनें माझ्या पायांशीं नमविले. हें माजे
9२ पेशवाईचें मर्न्वंतर
१८१४१४४ ९ ॥040,0060000.0090040300,000.0000000000:000 या बा कक का णाऱ्या ४४१४०५१४५४ ४४-४५-॥४५१८/ ४५४५-५५-२३ ५-/५-०-०००५०७७५ ०-४. रळ.
अमोघ सामर्थ्ये नाकबूल करण्याची तुझी छाती आहे का ? बोल. ”
नाहीं. नाहीं. साक्षात् कृतान्तकाळालाही चळचळ कांपविणारे आपण
मपल्या सामर्थ्याविषयीं मी शंका कशी घेईन ? पण मी स्वखषीनें आपल्या
सेवेंत रुजू झाल्यावर आणखी काय करायचें बाकी राहिलें कीं, तें केल्यावर
भपण सला पुर्णपण प्रसन्न व्हाल ? ” समोहनेनें भयचकित वत्तीनें कांपत विचारलें
बोलतां बोलतां तिचा स्वरहि कांपत होता, इतकें तिला चंदासाहेबाचें भय
वाटत होतें
चंदासाहेब तिची ती केविलवाणी स्थिति पाहून तिच्या मनांतील भय
घालविण्यासाठी तिला जवळ ओढून आपल्या हृदयाशीं धरून सौम्य शब्दांत
उद्गारला, प्यारी, अशी भिऊं नकोस. मी काय बोलतों तें नीट ऐकन घे
आपण मला अर्से तरवारीच्या धारेवर धरल्यावर मळा भय वाटणार
नाहो तर काय होईल? जाईच्या कोमल फुलाचा सुवास घ्यावयाचा तर तें
हलक्या हातानें तोडावें लागतें.” मोहना अश्रू पुशीत गद्गद कंठाने उदगारली
त मला कळते. म्हणूनच मी हें जाईचे फल असे नाजक हातानें खडन
अलग हृदयाशीं धरीत आहें. ” चंदासाहेब तिला हृदयाशी उत्कटतेने बिलगन
धरीत म्हणाला, “ पण प्यारी, तूं चतुर आहेस; तुळा एवढें कळावेयाला
पाहिजे कीं मीं तुला जी मुहाम माझ्या सासुरवाडीहन सासऱ्याच्या जनान-
सान्यातून इकडं आणली, ती केवळ विलास-विहारांच्या लालसेनें आणलेली
नाहीं. मळा माझा हा रंगमहाल शुंगारावयाचा झाला तर ह्या अफाट राज्यांत
लावण्यवति युवतींना दुष्काळ नाहीं. मी ह्या राज्याचा धनी आहें, माझ्या
प्रजाजनांतील तुझ्याहून केकपटीनें सुंदर अश्या कोणाही स्त्रीला ह्या रंगमहालांत
ओढून आणण्याचे मीं मनांत आणलें तर मला विरोध करणारा कोण आहे?”
मग मला इकडं आणण्यांत आपला हेतु तरी काय? ”
अशी नीट ताळ्यावर येऊन विचार. तंजावरच्या राजवाड्यांत माझ्या
व्याह्याचा अर्थात् तुझ्या प्रियकराचा खून झाला, खरेंना? ”
“खरें. ”
त्या खुनाची भरपाई करून घेण्यासाठीं मला तंजावरचें राज्य धळीला
मिळवावयारचें आहे; तें जिकन मला तेथल्या सिहासनावर आरूढ व्हावयाचें
आहे. तू वरेच. दिवस. माझ्या व्याह्याच्या पदरीं असल्यानें तंजावरच्या सर्व
चैदासाहेब आणि मोहना ४३
१.“ “१.४ ४५५४-१५ ४४९५-५५. ८५५५१५४" ४१५०४१४४१५ 0४५८८१
वी नष शबल
४४-१0" €-0५५-४०४४शाधश “४2 -श*-ट४शा४-2४०” ४४० लनल ४४ ४०१०४४४५४०
अंतर्गत राजकीय घडामोडी तुला माहीत असल्या पाहिजेत. त्या मदान्थ
प्रतापसिह राजानें माझ्या सय्यदखानाचा विशवासघातानें खून केला, याची चीड
जेवढी मला आहे त्यापेक्षांही तुला जास्त चीड असली पाहिजे. कारण खान
भाझा नुसता व्याहीच होता पण तुझा जिव्हाळ्याचा प्रियकर होता. एवढी
कामगिरी तूं केढीस तर मी तुज्ञा नुसता प्रियकर व्हावयपालाच काय पण
धर्माच्या साक्षीने तुझें पाणिग्रहण करून तुला त्रिचनापल्ली व तंजावर ह्या
संयुक्त राज्याची स्वामिनी-माझी सुख्य बेगम करावयाला तयार आहें- ”
विचारी व सावधानचित्त माणसाला चंदासाहेबाच्या उपरोक्त भाषणांतील
ढोंगीपणा तेव्हांच कळून चुकला असता. मोहनेला आपल्या प्रियकराच्या
हत्येचा सूड घ्यावयाला सांगतांना तिला आपली प्रियतमा होण्याची विनंति
त्यानें केळी. ती ऐकून मोहना सय्यदखानाची खरोखरच प्रियतमा असती तर
तिला संताप आला असता. परंतु तिच्या चर्येवर तसा कोणताच भाव त्यावेळी
तरी उमटलेला चंदासाहेवाळा दिसून आळा नाहीं. मग काय ? मोहनेचें
तिच्या प्रियकरावर खरें प्रेम नव्हतें ? किवा चंदासाहेबाच्या संगतींत तिला
त्या दु:खाचा विसर पडून चंदासाहेबाचा लळा लागला होता :
मोहनेच्या मनाची त्यावेळीं काय स्थिति होती तें एक ती जाणे व दुसरा
परमेश्वर जाणे. त्या गूढावर त्या वेळेपुरता तरी पडदा पडावा असा योगा-
योग असल्यामुळेंच चंदासाहेबाच्या तोंडून निघालेल्या प्रश्नवाचक उद्गारांना
मोहनेकडून उत्तर ' मिळण्यापूर्वीच एक दासी आंत येऊन चंदासाहेबाला
नम्रतापूर्वक अभिवादत करून म्हणाली, “ कोणी एक मुसलमान सरदार
सरकारांच्या भेटीसाठीं बाहेर तिष्ठत उभा आहे. ”
त्या दासीने आपला प्रणयभंग केला असें चंदासाहेबाला वाटलें. तो
रागारागाने तिच्यावर खेंकसून म्हणाला, “ दिलावर, यावेळीं तूं मरायला
इकडे कशाला आलीस? ”
दिलावर भीत भीत हात जोडून उद्गारली, “ सरकार, मीं त्या सरदाराला
पुष्कळ समजावून सांगितले कीं यावेळीं सरकारांची भेट व्हायची नाहीं, उद्या
सकाळीं ये. खुदादादरने त्याला अशा रात्रींच्या वेळीं आंत प्रवेश दिला म्हणून
त्याला देखील मी पुष्कळ रागें भरल्ये. पण तो सरदार आपणाला भेटल्या-
शिवाय माघारा जायला तयार होईना, व खुदादादर्ने मला अंमळ बाजूल
४9 पेशवाईचें मन्वंतर
ळे व क ी क री र ८८८ ७.०० १८ ७ ७०७
१.५५ “0१./८%५ “० “0 ४00 0 0५ “हो, "०. “७९ क क “क 2१. “टी २ “0 १८-५४.” ५ ४. ४-४.” ४.” ९.४. २. *- ४-८ ४-८ ४ ५४% ४. ४. १९.० ९.० ४-८ ४४ ४.४४ ८८ १४८ ५.९ ७. ९-० १.० ६० ४८ २ ५. १-७ १. । ७७.७ ७ र्ल
घेऊन माझ्या कानांत सांगितलें, “-बोलतां बोलतां दिलावर मोहनकडे पाहून
चपापली.
“त्यानें काय सांगितलें?” चेदासाहेवानें विचारलें.
“सरकारांनीं अंमळ बाजूला यावें म्हणजे सांगते. ” दिळावर भोहनेकडे
संशयित मुद्रेने पहात म्हणाली.
" साझी अड्चण वाटत असेल तर मी बाहेर जातें. ” असें म्हणन मोहना
अंतर्महालांत जाऊं लागली. |
दिलावरच्या मनांत आलेली शंका अस्थानी नव्हती. रंगमहालांत येणाऱ्या
स्त्रिया आपल्या धन्याच्या विश्वासाला पात्र नसतात हुं तिला माहीत होतें.
चंदासाहेबालाही मोहनेविषयीं अजन तितका विश्वास वाटत नव्हता.
इतकेंच काय पण ती त्या रंगमहालांत विलासविहारांची वांटेकरीण किवा
धनीण झाल्यावर आणि तिले त्याच्या अपेक्षेप्रमाणे त्याला तंजावरकडीळ
महत्त्वाच्या गुप्त वातम्या पुरविल्यानंतरदेखील त्यानें तिच्यावर कितपत
विश्वास टाकला असता होही एक प्रश्नच होता. परंतु मोहनेकडून त्याचा कार्य-
भाग अजून साध्य व्हावयाचा होता; तोंपर्यंत तरी तिळा न दुखवण्याइतकी खबर-
दारी घेणें त्याला प्राप्त होतें. गाईच्या सडांतून दूध काढून घ्यावयाचें तर तिला
पसच्च करूनच तें काढून घेतलें पाहिजे हें तो ओळखून होता. मोहनेच्या मनांत
दिलावरच्या बोलण्यामुळे विकल्प आला आहे असें पाहुन व तिच्याकडून
तंजावरकडील बातस्या अजून काढून घ्यावयाच्या आहेत ह्या पुढील साधना-
कडे दृष्टि देऊक तो दिलावरला म्हणाला, “ मोहना कोणी परकी नाहीं,
ती तुझी उद्यांची धनीण आहे. लोकरच ती माज्ञी मुख्य बेगम व्हावयाची आहे.
तिच्यादेखत बोलावयाला तुळा कोणतीच हरकत नाहीं. ”
चंदासाहेबाच्या तोंडचे हे उद्गार मोहनला नवीन असल्यानें ती ते एंकून
आनंदित झाली. मग तो आनंद चेंदासाहेब आपल्या खासा मुठींत आला
अशा कावेबाज अर्थाचा असो, कीं आपलें भाग्य उदयाला आले-आपण आतां
खरोखरच एवढ्या मोठ्या राजपुरुषाची अर्धांगी होऊन एथल्या राजविला-
सांची धनीण होणार अज्ञा अर्थाचा असो. पण चंदासाहेबाची ही देखत-
भुलीची भाषा दिलावरच्या पुर्ण परिचयाची होती. मोहूना त्या रंगमहालां-
तील नवीन उतारू होती, पण अज्ञा केक मोहना तेथें येऊन गेलेल्या दिलावरनें
चवंदासाहेब आणि मोहना ४१५
ळे
त क द
१८५ करिशी कळला ४-५८९४"४-४-१*- ५८-८४ ५८-०४ ५८५४-५४-५८ ४८८ ५८ ५८०८-०४-०० ५८० ७० ४८००. ८७-५५ ४८-४५ ५-० > ा मिड
पाहिल्या होत्या. अशा प्रत्येकीला वश करून आपला कार्यभाग साधण्याच्या
कामीं चंदासाहेबाची बुद्धि किती चलाखीनें चालते याचे अनेक दाखले तिनें
आजवर पाहिलेले असल्यानें प्रस्तुतच्या त्याच्या बोलण्याबद्दह तिला मुळींच
आश्चर्य वाटलें नाहीं. पण तिला त्याच्या अंत:करणांतील कारस्थानांशीं
काय करावयाचें होतें ? आपल्यावर त्याचा घुस्सा होऊं नये एवढ्यापुरती
खबरदारी तिनें घेतली, तिचा कार्यभाग झाला. * इतक्या स्त्रिया आजवर
फंसल्या त्यांतील ही एक एवढी मनाशीं खूणगांठ मारून ती चंदासाहेबाला
म्हणाली, “तंजावरच्या राजकारणाविषयीं आपणाशीं चर्चा करण्यासाठीं
तो सरदार आलेला आहे असें खुदादाद मला म्हणाला. ”
तंजावरचे राजकारण... .. आणि त्याविषयी माझ्याशीं चर्चा करण्या-
साठा यंणारा तो मुसलमान सरदार कोण बरें असावा? ?” असा स्वतःच्या
मनाशी प्रश्न विचारून चंदासाहेब क्षणभर स्तब्ध राहिला. त्यावेळीं त्यानें मोहने-
कडे वळून पाहिलें नाहीं म्हणून! तें पाहिलें असतें तर तोच प्रश्न त्याहीपेक्षां
जास्त उत्कटतेनें तिच्या मनांत घोळत असल्याचें तिच्या चर्येवरून त्याला
हटकून अजमावतां आलें असतें. त्यानें लगेच दिलावरला आज्ञा केली, “त्या
सरदाराला आंत पाठवून दे जा. ”
“मी आंत जात्ये. ” दिलावर बाहेर जातांच मोहना म्हणाली-
चेंदासाहेबानें स्मितहास्यपुर्वक तिला म्हटलें, “ ठीक आहे. उद्यांच्या
आमच्या बंगमसाहेबा तुम्ही, यास्तव एवढा गोषा राखणे तुमच्या थोर पदवीला
भूषणदायकच आहे. ”
मोहना यावर जास्त कांहीं न बोलतां अंतर्महालांत निघन गेली व तो
सरदार आंत आला. ती दरवाजावरील पडद्याआडून पहात सावधपणे उभी
होती. त्या सरदारानें आंत येतांच चंदासाहेबाला प्रथम लवन मजरा करून
विचारलें, “ आपण मला ओळखलें नसेल! ”
चेंदासाहेबानें खरेंच त्या सरदाराला ओळखले नाहीं. तो आश्चर्यचकित
मुद्रेने त्याच्याकडे पहात उभा होता. मोहनाही त्या सरदाराला पहातांच
बुचकळ्यांत पडली. तिला चेहरा ओळखीचा तर वाटे. पण हा तर
मुसलमान आहे. असें कसें ?-हा प्रश्न सोडवितां सोडवितां ती जास्त लक्षपुर्वक
भेदक दृष्टीनें त्याच्याकडे पाहु लागली
9६ पेशवाईचें मन्वंतर
“मीं तुम्हांला ओळसलें नाहीं. तुम्ही आमच्या खानसाहेबांच्या परिवारा-
कीं कोणी आहां काय? ” चंदासाहेबानें विचारलें.
“ सांगतों. पण अगोदर मला थोडा खुलासा पाहिजे आहे. मोहना
॥तां आपल्या महालांत होती ना? ”
“होय. कां बरें ?”
“ती कुठे आहे? ” |
“ कां? आंत आहे. ती तुमच्या परिचयाची आहे काय ? तिच्याविषयी
हीं वाटाघाट करण्यासाठीं तर तुम्ही आलां नाहीं?” असें म्हणून त्यार्ने
गें वळून पाहिलें. तों अंतर्महालाचा दरवाजा लावलेला होता. त्यानें उठून
| अर्धवट उघडून आंत डोकावून पाहिलें. मोहना तेवढ्यांत बाजूला
पली. पग तिची दृष्टि दरवाज्याच्या फटींतून पडद्यापलीकडे त्या सर-
राच्या चर्येकडे खिळून बसली होती व तिचे टंवकारलेले कान पुढील संभाषण
कण्याची आतुरतेनें वाट पहात होते. कोणीं तिला तेव्हां पाहिलें अस्ते
र ती संतापाने लाळ झालेली दिसली असती. कांबरें?
०. ८८०८४५४ १-/४///७/
कोयाजी घाटगे 2
*>>€*४५.- -“*-/५-४४- ४५-५० ४-८ ५-८ ४५८ ६ ०८१८-/५-४१-/--८*०-/ ५-४" ८५-०4 ४ ९ ४7
प्रकरण ६ वें
कोयाजी घाटगे
६४0४० ७-० ०८० 0००७८ १६८७१ ४७०० ७७७००0 फल ७ ४-० क. ७.९0 “0४४७ ५४
तो कोयाजी घाटगे होता, एवढें सांगितल्यावर वाचकांना त्याचा निराळा
परिचय करून देण्याचें कारणच नाहीं. मोहना तेथें नाहीं असें कळल्या-
वर कोयाजी म्हणाला, “ मीं मोहनेविषयीं संशय घेतल्याचें पाहून आपणाला
कदाचित् विस्मय वाटला असेल. पण तिचा आम्हांला जेवढा अनुभब
आहे तेवढा आपणाला खास नाहीं. विलासदासी ह्या नात्यानें त्या स्त्ी-
रत्नानें आपल्या रंगमहालाला अपूर्वे शोभा आणली असेल व आपलें चित
तिच्या ठायीं पूर्णपणें रिझत असेल. परंतु आपण एवढें विसरतां कामा नयें
कीं ती एक जलाल नागीण आपल्या उद्याशीं आहे. ”
चंदासाहेबाला त्या गोष्टी नवीन नव्हत्या, व तो कोयाजीला वाटला
तितका बेसावधही नव्हता. तो त्या वेळीं मनांत म्हणाला, “ प्रत्यक्ष अल्लावर
देखील वाजवीपेक्षा जास्त विश्वास न टाकणार्या मला हा दीडशहाणा व्यव-
हारज्ञानाच्या गोष्टी शिकवतो आहे! पण म्हणावें बेट्या, तू देखील कामा-
पुरता मामा आहेस असेंच मी धरून चालतों हें तरी तुला कुठें माहीत आहे! ”
ही अर्थात् त्याच्या मनांतली भाषा झाली. पण त्याचे दाखवावयाचे दांत
निराळे होते आणि खावयाचे निराळे होते. “ तुम्हीं मला ही बहुमोल सूचना
दिलीत, याबद्दल मी तुमचा फार आभारी आहें. बरें ; आणखी काय
खबरबात?
“: आणखी खबरबात आहे. ती इतकी महत्त्वाची व आनंदाची आहे की
ती आपणाला निवेदल करण्यापूर्वी आपण मला एक वचन दिलें पाहिजे. ”
*“ काय वचन दिलें पाहिजे? ”
“ पहिली गोष्ट, तंजावर आपल्या हातीं आल्यावर मला त्या राज्याचा
मख्य प्रधान केलें पाहिजे
तुमच्या ह्या गोष्टी मला शक्य कोटींतील वाटत नाहींत. तंजावर्सर्चे
राज्य इतक्या सहजगत्या बडवितां येण्याजोगें तकलुपी आहे असे मानण्य£-
इतका मी भोळा नाह
४८ पेशवाईचें मन्वंतर
म्हणूनच मी एवढी मागणी आगाऊ करीत आहें. आपणाला ज्या
गोष्टी असाध्य वाटतील, त्या साध्य करून दाखविण्याचें बळ त्या श्रीरंगानें
हया कोयाजीला दिलें आहे. मीं करावयाची ती सारी सिद्धता केली आहे.
आतां निमित्तमात्र कांहीं गोष्टी केल्या पाहिजेत व कांहीं बाबतींत लोकांच्या
डोळ्यांत धूळ फेकली पाहिजे. तें सवे करण्याला मी समर्थ आहें. हें कार-
स्थानाचे मंदिर मीं मोठ्या हिंमतीने उभारले आहे. आतां त्यावर कळस
चळढवावयाचा आहे; तो आपल्या हातून चढवावयाचा.”
“ एकूण तुम्हांला वचत पाहिजे म्हणतां? ”
“ हेय. मला तंजावरच्या उद्यांच्या अधिपतीर्चे वचन पाहिजे आहे.
“हृंघ्या वचन. ” चंदासाहेबानें कोयाजीच्या हातावर हात देऊन सांगितलें,
आतां सांगा तुम्हांला काय सांगावयाचें ते. ”
बाजीराव पेशवे वारले% ही ह्कोगत आपणाला कळलीच असेल. ”
“ काय, पेशवे वारले ? ” चंदासाहेब हुर्षातिरेकानें उद्गारला, “ फार
छान झालें. एकूण खुदाची आमच्यावर मेहेरनजर आहे म्हणावयाची.
उभ्या हिंदुस्थानांत आम्हां मुसलमानांना आजकाल खरा विरोध करणारा
व दिल्लीच्या बादशाही सत्तेलादेखील पायांखालीं तुडवून पुढें जाणारा गाजी
जर कोणी असेल तर तो एकटा बाजीराव पेशवा. तो खलास झाला, त्याच्या
बरोबरच उगवती हिंदुपदपादशाही खलास झाली असें म्हणावयाला
हरकत नाहीं.
एखाद्या कसलेल्या वीराने आपला भरधांव वारू समोर एखादें अरिष्ट
पाहून एकदम आवरावा त्याप्रमाणे चंदासाहेबानें त्याच क्षणीं आपली जीभ
आवरली. परंतु चोराचीं पावलें चोराने ओळखावीं त्याप्रमाणें कोयाजीनें
त्याचा अर्थ ओळखून म्हटलें, “ सरकार, सरकार, आपणाला संशय उगीच
आला. ”
“ नाहीं. मला संशय आला नाहीं.
४8 ३
हें पहा, असली लपवालपवीची भाषा ह्या कोयाजी घाटग्यापाशीं
% थोरले बाजीराव पेशवे ता. २६ एप्रील, सन १७४० रोजीं
नर्मदा कांठीं रावेरखेड नांवाच्या गांवी मरण पावले. त्या प्रसंगावरची
'पेशवाईवरील गंडान्तर' ही कादंबरी पहा.
कोयाजी घाटगे ४९
बोलावयाचे कांहींच कारण नाहीं. आपल्या तोंडन पेशव्यांविषयीं व हिंदु-
पढदपादशाहीविषयीं कठोर उद्गार निघाले, ते मला रुचणार नाहींत अशी
भीति आपल्या मनांत उत्पन्न झाली आहे. खरें ना? ” यावर चंदासाहेब
काहींच बोलला नाहीं. कोयाजी पुढे म्हणाला, “ ती आपली भीति अस्थानी
आहे. इतर मराठ्यांविषयीं मी कांहीं बोळ दकत नाहीं. पण घाटगे हे
प्रथसपासूनच पेशव्यांचे हाडवेरी व बादशाही सत्तेचे दोस्त आहेत, व ते
आजपर्यंत मार्थेफिरूप्रमाणें कधींच वागलेळले नाहींत. आपणाला कदाचित्
माहीत नसेल तर आठवण करून देतों, बाळाजी विश्वनाथ पेशव्यांच्या शिर"
जोरपणाला विदून सेनापति चंद्रसेन जाधवावरोवर थेट मोंगलांना जाऊन
मिळणारे दुसरे निधड्या छातीचे वीर सर्जेराव घाटगेच होत. घाटग्यांना
मराठेशाहीपेक्षां मुसलमानशाहीच जास्त प्रिय व जास्त जवळची आहे.
इतकेच काय, पण पेशव्यांच्या हातून हिंदुस्थानचे रेंसभरदेखीळ कल्याण
न होतां उळट वाटोळेंच होईल व त्या अनर्थापासून हिंडुस्थानाला वांचविणारी
बादशाही सत्ताच होय, असा माझा प्रामाणिक ग्रह आहे. तंजावरचे राज्य
आम्हां मराठ्यांचे ना, पण तेथेंही मराठेपणाचा अभिमान न धरतां आपली
सत्ता तेथें प्रस्थापित करण्य़ासाठीं काया-वाचा-मनें करून झटणार्या माझ्या-
इतका एकनिख मित्र आपणाला उभ्या कर्नाटकांतदील भराठ्यांत दुसरा
सांपडणार नाहीं. वाजीराव पेशव्यांच्या निधनामुळे त्यांच्याबरोबरच
हिदुपदपादशाहीरचे थोतांड आतां आपोआपच कमी होणार यांत मलादेखील
सनापासून आनंद आहे. याउप्पर आपला माझ्यावर विदवास बसो अगर
-न बसो. ”
" तुमच्यावर माझा पूर्णे विश्वास आहे. तुमच्यासारखे जिगरदोस्त
मिळाल्यावर त्यांच्या बळावर मी तंजावरचें राज्य जिकीन; इतकेंच काय पण
दिल्लीचे सिहासनदेखील साध्य करूं शकेन.
त्या दूरच्या गोष्टी आहेत. आपणांला तूर्त तंजावरपुरता विचार करा-
.वयाचा आहे. पेशवे निधन पावल्यामळें आम्हां सर्वांचेंच काम फार हलकें
झालें आहे. या बाबतींत आमच्या थोरल्या राणीसाहेब व मीं मिळून जो बेत
ठरविला आहे, त्याला मूर्त स्वरूप देण्याच्या कामीं आम्हांला आपली मदत
पाहिजे आहे. येऊन जाऊन आपल्या वाटेतील मुख्य अडचण रघजी भोंसले
शध
७० पेशवाईचें मन्वंतर
आणि मुरारराव घोरपडे यांची. पेकीं रघूजी भोंसले पेशव्यांच्या निधनाची
वार्ता ऐकून ताबडतोब सातार््याकडे रवाना झाले.”अ
“ काय रघूजी भोंसले इकडील मोहिमेचें काम अर्धवट टाकून निघून गेले ?”
“ होय.
“ते कां म्हणून? ”
“ त्यांना पेशवा होण्याची हांव सुटली आहे. ”
“म्हणजे? ”
“ बाजीराव पेशव्यांच्या पश्चात्ू आपणाला पेशवाईची वस्त्रें मिळावी
अशी त्यांची अपेक्षा आहे, व तीं साध्य होण्याचीं चिन्हेही दिसत आहेत. आज
बरींच वर्षे त्यांचा पेशवाईपदावर डोळा आहे. पेशव्यांचा आप्त बाबूजी
नाईक बारामतीकर हा घालमेल्या गृहस्थ त्यांचा साथीदार असून शाहूमहा-
राजांच्या दरबारांत त्यार्चे चांगलें वजन आहे. शिवाय शाहूमहाराज आणि
भोंसले हे साडू असल्यानें महाराजांच्या राणीकडून देखील त्यांचा चांगलाच
वशिला लागण्याचा संभव आहे.ह्या उलाढालींत कदाचित् असेंही होण्याचा संभव
आहे, बाबूजी नाईक पेशवे होतील व रघूजी भोसल्यांच्या पुत्राला शाहूमहारा-
जांच्या मांडीवर दत्तक देऊन छत्रपति बनवितील. कांहीं झालें तरी नाईक
आणि भोंसले ही राहु-केतूंची दुक्कळ एकदां पेशवाईच्या राशीला बसली
आहे ती पेशवाईचे समूळ उच्चाटन केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीं खास.
आपला त्याच्याशीं अर्थाअर्थी फारसा संबंध नाहीं. आपणाला तूर्त एवढेंच
पहावयार्चे कों कर्नाटकावर आलेलें मराठ्यांचें अरिष्ट देवाच्या दयेनें द्र
झालें आहे; व आतां पेशवाईच्या अधिकाराबाबत मराठ्यांत लाथाळी लाग-
णार असल्यानें त्यांना इकडील राजकारणांत लक्ष घालावयाळा अवसर
ईॅकणारशिर्शिशिशशिशिशिशिशशससलॅलिलॉशॉशॉ0ॉ-न-ैतैन----.._______
* थोरले बाजीराव पेशवे मृत्यु पावल्यावर त्यांची पेशवाईचीं
वस्त्रें बाळाजी बाजीराव यांना न मिळतां बाबूजी नाईक बारामतीकर यांना
मिळावी असा रघूजी भोंसले यांचा मानस होता. त्यामुळेंच बाजीरावाची
निधनवार्ता ऐकतांच ते ताबडतोब कर्नाटकांतील मोहीम अपुरी सोडून मरा-
त्यांच्या सेन्याचा तळ शिवगंगा येथें देऊन साताऱ्यास परत आले.
-॑ण्डतिहाससंग्रह,
| पेशवाईवरील गंडांतर' पहा.
कोयाजी घाटगे ण१
मिळणार नाहीं. तोंवर आपणाला आपली ढांसळती सत्ता मजबत करतां
येईल. एक तंजावरचे राज्य आपल्या हातीं आलें कीं आपण अर्काटच्या
नबाबाचेही नबाब झालां असें समजा. मग आपणांला दिल्लीदरबारांत देखील
एवढा मान मिळेल कीं त्या शिरजोर निजामाला देखील आपल्या कुपेची अपेक्षा
करावी लागेल. आपणाला माझें आणि अपख्पाराणीसाहेबांचें साह्य अस-
ल्यावर आणखी काय पाहिजे ? ” चंदासाहेब स्वतःशीं विचार करीत
असलेला पाहून कोयाजी पुढे म्हणाला, “ आपण कदाचित् म्हणाल कौं सवे
सत्ता प्रतापसिहाच्या हातीं असतांना व मराठे त्याचेच पक्षपाती असतांना हें
कर्से शक्य होईल. खरें ना? ”
“ तुमच्यासारखे धोरणी पाताळयंत्री तुम्हीच, ही अडचण दूर करण्याचा
मार्गदेखील तुमच्याशिवाय दुसऱ्या कोणाला दाखवितां यावयाचा नाहीं.”
“तो मार्ग निश्चित करून नंतरच मी आपणापाशीं आलों आहें. प्रताप-
सिंहाची आज जी एवढी घडी बसलेली दिसते, ती कशाचा परिणाम हें आप-
णाला माहीत आहे? ”
“ नाहीं. पण तुमच्यासारख्या कर्त्या पुरुषांचे त्यांना पाठबळ असून
थोरल्या राणीसाहेबांचीही आतांशा त्यांच्यावर कृपादृष्टि आहे असें एकतों. ”
“ आपण ऐकतां तें एका अर्थी खरें आहे. आम्हीं उभयतांनीं आमचा कार्येभाग
बिनबोभाट साधावा यासाठीं तसें वातावरण तिर्माण केलें आहे खरें.
आपणाला माहीतच आहे कीं आपणाला काशीला जावयाचे असेल तर रामे-
इवराकडे जात असल्याचा मारे बोभाटा करावा, कों आपला शत्रू रामेश्वराच्या
रस्त्याने आपल्या पाठोपाठ धावं लागतो व आपण सुखरूपपणें काशीला जाऊन
पोचतो. |
“ इतकेंच काय; पण शत्रु रामेश्वराच्या वाटेला लागला कों मागाहून
त्याच्यावर चाल करून त्याचा बीमोड करणें देखील आपणाला फार सोपे जातें.”
“ आतां कसें आपण ओळखले! तरवारीनें गळा कापण्यापेक्षां केसानें
गळा कापण्यांत खरें कौशल्य व कमी धोका असतो. आम्ही आजवर प्रताप-
सिहाचा नक्षा उतरला जावा व त्याला गादी सोडणें भाग पाडावें यासाठीं
कसा व्यूह रचिला आहे हें आपण ऐकाल तर आइचयर्नि थक्क होऊन जाल. ' क
“सांगा तर खरें!”
*7%- 27%
२ पेशवाईचे मन्वंतर
“ सांगतों. पण त्यापूवी आपणाकडून खुलासा पाहिजे आहे. समजा,
याचा राजमार्ग आपणाला आम्हीं दाखवून दिला, तर आपण आमच्या
मागण्या पूर्ग करावयाला तयार आहां का? ” |
“ अलूबत् ! हें काय विचारणें! तंजावर माझ्या हातीं येतांच तुम्हांला
त्या राज्याचे मुख्य प्रधान करावयाचें एवढीच ना तुमची मागणी? ”
“ती माझी एकट्याची मागणी झाली. परंतु थोरल्या राणीसाहेबांच्या
साह्याशिवाय आपलें कांहीं चालावयाचें नाहीं हें आपण जाणतांच. यास्तव
त्यांना प्रसन्न राखणें हें आपलें पहिलें काम आहे. ”
* त्यांना प्रसन्न राखण्यासाठी मीं काय केलें पाहिजे ?”
“ राजा होण्यापेक्षा राजांचा राजा होणें आपणाला जास्त आवडेल कौ
नाही? ”
अर्थात!”
“ झाले तर. थोरल्या राणीसाहेबांची इच्छा राजमाता म्हणून मिरव-
ण्याची आहे. ”
“ पण त्यांना पुत्र नाहीं ! मग त्या राजमाता कद्या होणार ? ”
“ कोण म्हणते त्यांना पृत्र नाहीं म्हणूनः त्यांनीं एकवार ज्याचा पुत्र
म्हणून स्वीकार केला, तो त्यांचा पुत्रच झाला. दत्तक पुत्र तरी निराळा काय
असतो? आपणापाहीं म्हणून हा खरा प्रकार मीं सांगितला. एरव्हीं जगांत
आम्ही तो औरस राजपुत्र असेंच सांगत असतों व म्हणूनच त्या राजपुत्राला
राज्यावर बसविण्याचा आमचा बेत एकदां जरी फंसला तरी आम्ही त्या
कामीं निराश झालों नाहीं. रयतेपेकींही बऱ्याच जणांचा आम्हांला पाठिबा
आहे, व त्या पाठिव्याच्या जोरावर आम्ही राज्यक्रांति देखील घडवून आणु
गक. पण आपला व आमचा सलोखा पुर्वीपासूनचा आहे. आपण आम्हांला
पाठीशीं घातल्यास सर्व गोष्टी बिनबोभाट पार पडणार आहेत. आपण
आसच्या राजपुत्राला तंजावरच्या गादीचा खरा वारस मानावयाला व त्याला
न्याय मिळवून द्यावयाला तयार व्हा. भी त्या राजपुत्राच्या व थोरल्या
राणीसाहेबांच्या वतीने बोलत आहें असें समजा. आपली सावेभोम सत्ता
आम्हांला मान्य आहे व आपणाकडे आम्ही दाद मागण्यासाठी आलों आहों.
राजपुत्र सयाजीरावाला एकदां राज्याभिषेक झाला असतांना प्रतापसिहाच्या
कोयाजी घाटगे ८५3
कारवाइन त्याला राज्यभष्ट व्हावे लागले; त्यालाच पुन्हा तंजावरच्या
गादीवर आणण्याचें आपण कबूल करीत असाल तर सांगा, कीं आम्ही-थोरल्या
राणीसाहेब आणि मी आपल्या साह्यार्थ सिद्ध आहों. ”
तुम्हा म्हणतां त्या सवे गोष्टींना माझी पूर्ण अनुमति आहे. ” चंदासाहूब
भमान तुकवीत म्हणाला. त्याच वेळीं तो मनांत म्हणत होता, “ अपख्पा
राणी काय, बोलून चालून स्त्री. मीनाक्षीसारख्या चतुर स्त्रीला देखील
मी पुरून उरलों, तो ह्या राणीला थोडाच जुमानतों ! तसाच हा थेरडा,
आणि ह्यानें निर्माण केलेला तो सयाजीराजा ! अपेक्षित वैभवशिखराच्या
मार्गानें जातांना मार्गातील कांटे पायांना बोंच् नयेत यास्तव तेवढ्यापुरतीं
पायीं घालावयाचीं पादताणें हीं ! आपलें कार्य ज्ञालें कीं तीं फेकून दिलीं! ”
“ नुसती अनुमति देऊन चालावयारचें नाहीं. माझ्याबरोबर चला, आणि
मलिदींत उभे राहून मला अगोदर तसें वचन द्या. ” चंदासाहेबाची चर्या ते
अपमानकारक शब्द ऐकून कांहींशी कडवट झालेली पाहन कोयाजी पुढें म्हणाला,
“ केवळ एवढ्याचसाठीं आपण वाहेर यावें असें मी म्हणत नाहीं. प्रताप-
सहाच्या यद्याचे मम कशांत आहे हें मीं अजून आपणाला सांगितलेले नाहीं.
त्याच्यापाशीं दोन प्रासादिक तरवारी आहेत व त्या तरवारींच्या प्रभावानेंच
तो आजवर निर्भयपणें राजवेभव भोगीत आहे हें मीं आपणाला मागेच सांगि-
तले होतें ते आठवते का? ”
“हो! आठवते.
“त्या तरवारी घेऊन थोरल्या राणीसाहेब आपल्या भेटीला आलेल्या
आहेत. त्या नगराबाहेरील एका ग॒प्त ठिकाणीं सध्यां थांबल्या आहेत.
त्यांची मी आपणाला भेट करून देणार आहे व त्या तरवारी स्वत: राणीसाहेब
आपणाला अर्पण करणार आहेत. परंतु आपण प्रथम मशिदींत माझ्याबरोबर
येऊन शपथ घेतली पाहिजे. आपलें ठरल्यावर ह्या कारस्थानाला आरंभ
कोठून करावयाचा याविषयींही आमचा नक्की बेत ठरळा असून तो वेत्ही
आपणाला थोरल्या राणीसाहेब कळवतील. ”
शपथा घरणे आणि शपथा मोडणे हा चंदासाहेबाच्या हातचा मळ होता.
तो कोयाजीच्या शब्दाला तेव्हांच कबूल झाला व तसाच त्याच्यावरोवर
निघाला.
रु ६2 पेशवाईचे मन्वेतर
८ कक.
दोन प्रहर रात्रीच्या घुमाराळा चंदासाहेब माघारा आला. मोहूना
अर्थर्तत् तोंवर जागी होती. ती अंतर्महालांतील एका मऊ मऊ पण पायां-
सळ्ठऱर्च्या गालिच्यावर पहुडल्या पहुडल्या विचार करीत होती. चंदासाहेवाला
ययटलळे, ती आपलीच मार्गप्रतीक्षा करीत आहे. ती आपल्या विचारांत इतकी
गळून गेली होती कीं चेंदासाहेब आंत केव्हां आला याचीदेखील तिला दाद
नर्डली. त्यानें आंत येतांच तिला गालिच्यावर पहुडलेली पाहून तिच्या
जवबळ'च गुडघ्यांवर बेसून तिचा उजवा हात आपल्या उजव्या हातीं घेऊन
अपल्या गळ्यापाशी नेत तिला विचारलें, “ प्यारी, तू इतका वेळ माझी
काट पहात जागी राहिलीस ? ”
मोहना उत्तरली, “ आम्ही बायका. वेलीचे वृक्षासाठीं अडते, तसें वक्षाचें
वेळो साठी कुठे अडतें! 7
*“* पण त् अशी खाली झोंपलेली कां? हा रंगमहाल आतां तुझा आहे.
हा फर्यक तुझ्यासाठी आहे ! त्याचा उपभोग तं नाहीं घ्यायचा तर दुसर्या
कोप्णीे घ्यायचा? ” चेंदासाहेबानें तिचा हात आपल्या गळ्यांत घालून तिच्या
पुली गालांना हाताचा स्पर्धे करीत विचारलें.
ली. उत्तरली, “ खाविद, देजापात्रांतळें पुजासाहित्य देवाची पुजा करण्या-
साठीं असतें, स्वत:ची देजा बांधून घेण्यासाठीं नसतें. मी आपली दासी आहें.
अआपफणांपुर्वी मी एकटीने हेथा शय्येचा उपभोग घेतला तर मीं आपला आणि
त्या शाय्येचादेखील अपमान केल्यासारखें होईल. ”
एवर्ळे त्या दोघांचे संभाषण चाललें आहे तोंच खुदादादनें भरजरी मखमली
म्यानांनी वेष्टित अशा दोन तरवारी तेथे आणून ठेवल्या.
मोहनेनें थोड्या वेळापूर्वी कोयाजीच्या तोंडून तरवारींविषयीं वृत्तांत
ऐंकल्काय होताच. परतु तिनें पुन्हां चंदासाहेबाला विचारलें, “ ह्या तरवारी
कसल्या ? ”
“* प्यारी, मला कर्नाटकचा बादशहा आणि तुला बादश्याहीण बनवून
सोडणप्णारीं हीं प्रसादचिन्हे आहेत. तू सय्यदखानाच्या पदरीं असतांना अनेक
वेळां यांच्च्या प्रभावाविषयी ऐकलें असशील. ”
“* होय . पण त्या आपणाला कला मिळाल्या ? ”
चंळासाहेबानें अपरूपाराणी व कोयाजी' यांच्याशी तंजावरच्या राजकारणा-
४४-४४ .। १२८” ४.- 00९. 709५ ५. “0$-८४-/१५> १८०५-१७, ल
कोयाजी घाटगे "ण्
३ ४७/४६/४४४७ ४.७७.” ७ १४.४१. ”0५-४--”- *%>.”/*६. ८९ . १, “९४९. “१..४१./५... “१७ ४४.
बाबत झालेल्या वाटाघाटी मोहनेला निवेदन केल्या. त्यावरून अपख्पा
राणी व कोयाजी ह्या दोघांनीं गफलतीनें त्या तरवारी तंजावरच्या राज-
वाड्यांतून चोरून आणून चंदासाहेबाच्या स्वाधीन केल्या हें तिला कळून
आलें. त्याविषयीं तिला मनांतून कांहीं का वाटेना ! बाह्यात्कारी ती एवढ
मात्र म्हणाली खरें, “ एकूण माझा पायगुण इतका शुभकारक आहे !
“ आहे खरा. ही वेळाच एकंदरींत शुभ वेळा आहे, म्हणूनच माझ्या
कर्नाटकांतील साम्राज्यस्थापनेंच्या महत्त्वाकांक्षेला मूर्तेस्वरूप देण्याला व त्या
अनरोधानें राजकारणाचे डाव खेळण्याला याच मुहर्तापासून मी प्रारंभ
करणार आहें. पेशवे मेले, त्याबरोबरच आमच्या सर्वे अडचणी मेल्या असें
मानावयाला हरकत नाहीं. कारण त्यामुळें रघूजी भोंसले इकडील मोहिं-
भेची आवराआवर करून साताऱ्याकडे निघून गेला, आणि आम्हांला कर्ना-
टकचें सारें रान मोकळें सांपडलें. नाहीं म्हणावयाला मुरारराव घोरपडे
तेवढा शिरजोर आहे. त्याला एकदां जाळ्यांत अडकवून नेस्तनाबूत करून
सोडला कीं काम झालें.
*“ घृण त्याला अडकवणें हेंच तर महाकर्म कठीण आहे. आपणाला वाटतो
तितका तो भोळा नाहीं. ”
“ त्याला अडकवण्याची बेमालूम युक्ति अपख्पाराणी व कोयाजी यांच्या
विचारानें मीं शोधून काढली आहे. ” चंदासाहेब लगेच बाहेर जाण्यासाठीं
उठतां उठतां म्हणाला, “ मीनाक्षी राणीला मीं आजवर जिवंत कां ठेवली
यांतलें रहस्य प्यारी, तुला मी आणखी एका घटकेनें सांगतों.
चृंदासाहेब एवढें बोलून बाहेर निघून गेला. मोहना मात्र तेथेंच विचार
करीत स्वस्थ बसली. बराच वेळपावेतों ती तक्षा स्थितींत विचार करीत
बसली होती. तिला कळेना कीं चंदासाहेब अश्या अपरात्री मीनाक्षी राणीकडे
कश्यासाठीं गेला असेल !
६ पेशवाईचे मन्वंतर
न. क कक (७ ० वक ७७ वळ जक 2: ओक ०2 कज न. (७२? (७0% कक, ४७७ ०७%. कटे जह सक ळक क चळे १५ ८ ५५ ४-० ५.० ९ २ १-० ब“ ४८ << २८: 5९
भ्रकरण ७ घें
मीनाक्षी राणांचा बंदिवास
वुपाळी वेंदिवास आल्या दिवसापासून तीं तीन वर्षे मीनाक्षी राणीतें किती
हालअपेष्टांत काढलीं असतील, तें तिचे तीच जाणे ! चंदासाहेबा'वे-
तिच्या विश्वासघातकी प्रियकराचे पाय त्रिचनापल्ल्लीच्या किल्ल्याला अधिकृत
रीत्या लागले, त्याच दिवशीं सूर्यास्ताच्या सुमाराला त्या दोघांची जी भेट
झाली, त्या दिवसापासून पुढे तीन वर्षांत चंदासाहेबानें तिचें मुखावलोकन देखीळ
केलें नव्हतें. रयतेनेंही त्या इुराचारी स्त्रीची फारशी चौकी पुढें केली नाहीं.
केदेत असतांना ती सर्व पकारच्या राजोपचारांना सर्वस्वी मुकली होठी.
इतकेंच काय पण तिला जरूरीपुरत्या अनवस्त्रासाठीं देखील अत्यंत आबाळ
सोसावी लागे. अद्या हालअपेष्टांत मला कुजत ठेवण्यापेक्षा एकदां गोळी
पाठून ठार तरी करा अशी तिनें अन्नपाणी यावयाला येणार्या नोकरांच्या
हातीं चंदासाहेवाला अनेकवार विनवणीही केळी. पण त्या विनवणी'चा
देखील कांहीं उपयोग झाला नाहीं. ती चंदासाहेबासारख्या यवनाच्या प्रेम-
पाशयांत सांपडून पतित झाली होती, ही एक गोष्ट बाजूला ठेवली, तर तौ.
एरव्ही फार देवभोळी होती. किल्ल्यांतील एका अत्युच्च शिलाखंडाच्या
अप्रपृष्ठावर नायक राजांच्या कोणा शिवभक्त एर्वेजानें एक सुंदर शिवमंदिर
बांधलें होतें; त्या मंदिरांत रोजच्या रोज शिवदर्शनाला जाण्याचा तिचा
नियम होता, व ती अपरिहार्य कारणाखेरीज तो नियम कधींही मोडीत नसे.
घाईच्या वेळी ती दुरून तरी शिवमंदिराच्या शिखराचें तरी दर्शन घेत असे. पण
वंदिवासांत पडल्या दिवसापासून ती त्या शिवदर्शनाला आंचवली होती.
तरी त्यांतल्यात्यांत तिचें सुदेव एवढेंच कीं तिला शिवमंदिराजवळच किंचित्
व तेथें केदखाना म्हणून जी एक लहानशी खोली तिच्या वांट्याला आली होती,
त्या खोलीला असलेल्या झरोक्यांतून तिळा शिवमंदिराचा सुवर्णाचा कळस
दिसत असे. त्या कळसाकडे पहात्र तिने रोजच्या रोज त्या झरोक्याशीं बसावें,
मीनाक्षी राणीचा बंदिवास प
*५८ * ८0% /क् अँ
२ 0०४७८ -४१-्टी च ५-५ ४५-४१ 0१० १ -“श४ ला 0 ९०--
क्र
व प्रहरचे प्रहर घळघळा अश्रू ढाळावे. पण त्या अश्रुपातांतही तिला समाधान
ए वढेंच वाटे कों आपण सोहवश होऊन एका अविधाधमाच्या संगतीने बाटलो
व देद्याचा सर्वस्वी नाश होण्याला कारण झालों, त्या महत्पापाचा आपल्या
चारित्र्यावरचा डाग धवन काढण्यासाठींच परमेश्वराने आपणाला अक्या
केदत तीन त्रिकाळ रडत वसविले आहे!
अद्या प्रकारे राणी मीनाक्षी तीन वर्षांतंतर एकरे दिवशीं मध्यरात्रीच्या
सुमाराला त्या झरोक्यांतून चांदण्याच्या प्रकाशांत त्या महादेवाच्या% शिखराचें
दर्शन घेत बसली असतां एकाएकीं तिच्या वंदिखान्याच्या दरवाजाची कडी
वाजली. इतक्या अपरात्री आपणाकडे कोण आलें अर्से मनाशीं म्हणून
मीनाक्षी एकदम दचकून दरवाजाकडे पाहु लागली. प्रथम तिला वाटले कीं
या वेळीं अक्या अपरात्री आपणाकडे कोण येणार ? कांहींतरी भास झाला
असेळू. त्याच वेळीं दुसर्याच क्षणाला पिश्याच्वलीलेची कल्पना तिच्या डोक्यांत
येऊन तिला भयही वाटलें. तेवढ्यांत दरवाजाच्या फटींतून बाहेरील प्रकाश
आंत डोकावूं लागलेला पहातांच तिची ती भीति दूर झाली. पण तेवढ्यांत
त्याहूनहि दारुण अक्षी नवी भीति तिच्या मनांत उत्पन्न ज्ञाली, “ त्या चांडाळ
नरपचूर्ने माझा घात करण्याचें तर योजिले नाहीं ता ? एरव्हीं इतक्या अपरातचीं
माझ्याकडे कोण येणार? '
मीनाक्षीची ही भीति अगदींच अयथाथे होती असें नाहीं. चंदासाहेबानें
यापूर्वी आपल्या कांहीं प्रतिस्पर्थ्यांचा कडेलोट केला होता तो अक्षया मध्यरात्रीच्या
वेळींच केल्याचे तिळा माहीत होतें. तिला ज्या महालांत कोंडन ठेवण्यांत
आलें होतें, त्याच महालांत आणखीही कांहीं राजवंदी पूर्वी होते. त्यांपैकी
कांहीं स्वतः तिनें केदेंत कोंबलेळे होते, व कांहींना चंदासाहेबानें ती शिक्षा
दिली होती. त्यांपैकीं दरएकाला केदखान्यावाहेर काढण्यांत आलें तें अशा
मध्यरात्रीच्या वेळींच काढण्यांत आल्याचें तिला माहीत होतें, व तितक्या
सर्वांचा उजाडण्यापुर्वी कडेलोट झाल्याचेंही तिनें रोज अन्नपाणी द्यावयाला
यंणार्या दासदासींकडून ऐंकले होतें. त्यांच्या कडेलोटाविषयीं यापेक्षां
जास्त कांहीं माहिती तिला नव्हती. परंतु केदसान्यांत कोंडण्यांत आलेली
_* *त्रिचनापल्ल्लीच्या किल्ल्यांत मध्यभागी एक प्रेक्षणीय खडक उचच्या एक प्रेक्षणीय खडक उंचच्या
उच उभा असून त्या खडकावर पुराणप्रसिद्ध असें हें महादेवाचे मंदिर आहे.
ण्ट पेशवाईचे मन्वंतर
२०%.” -/% “९५-४९ १४५ “0५५-/४५५-% “५८% ४६/४६/०१५४ ८0५५८५0११0 ४00७७७ हहत पत्लतो अलीच्या
१४१४४४४ १४५.४४७. ४९०७४१४.“ 09.“ ४८-0७,” ४.४१. 00 “४ 0१७ .00, . ४७/५७/१७६७. ७७ ७७.४ “0.०, > ७०७ _७७९, र.
सारीं नररत्नें अतुल स्वार्थत्यागी व परम राष्ट्रतिष्ठ होतीं हें तिला माहीत
होतें. अशा पुण्यशील जीवांच्या कपाळीं कडेलोटाची शिक्षा आली, ती त्यांच्या
अढळ राष्ट्रनिष्ठेमुळेंच होय, अशी मीनाक्षीचीच काय पण कोणाचीही
स्वाभाविकपणे कल्पना झाली असती.
तेच दुर्धर भोग आपल्या वांट्याला आले कीं काय असें वाटून मीनाक्षी
भयचकित मुद्रेने दरवाजाकडे पहाते, तोंच दरवाजा उघडला गेला. त्याबरोबर
दरवाजाच्या आंत पाऊल टाकणार्या व्यक्तीकडे ओझरतें पाहून ती स्वतःच्या
मनाशीं म्हणाली, “ आला-काळ आला ! ”
तो काळ-नव्हे, कर्दत काळ एका काळीं मीनाक्षीचा प्रियकर असलेला
चंदासाहेब ! होता मीनाक्षीला त्याचें मुखावलोकन देखील करूं नयेसें वाटलें,
म्हणून तिर्ने तोंड बाजूला फिरविलें. चंदासाहेबानें तें पाहिलें. पण त्या-
विषयीं मनाशीं मुळींच पर्वा न करतां बेदरकारपणें तो आपले दोन्ही हात कमरे-
वर ठेवून आढयतेनें दरवाजांत उभा राहून हंसत हंसत म्हणाला, “ मीनाक्षी,
आज तीन वर्षांनंतर प्रथमच अक्या रात्रीच्या वेळीं मी तुझी भेट घेत आहें,
हें पाहून तुला आश्चर्य वाटत असेल, नाहीं ?” ह्यावर मीनाक्षी कांहीं
बोलते किवा कसे तें पहाण्यासाठी तो कांहीं क्षण स्तब्ध राहिला. पण मीनाक्षी
कांहीं ने बोलतां जास्तच तिरस्काराने त्याच्याकडे पाठ फिरवून उभी राहिली
तें पाहुन तो चार पावलें पुढें जाऊन पूर्ववत् हुंसतमुखानें म्हणाला, “ मीनाक्षी,
तुला त्या प्रसंगापासून माझ्याविषयीं संशय वाटं लागला असेल व माझा तुला
रागही आला असेल. तुला मीं एकाएकीं ह्या तुरुंगवासांत डाम्बून तुझ्याशी
विश्वासघात केला हें कांहीं अंशी खरें आहे. पण तो प्रसंगच असा होता कीं
मला त्यावेळीं त्से करण्याशिवाय गत्यंतर नव्हतें. माझा सासरा किती कडवा
मुसलमान होता हें तुला माहीत आहे. दक्षिणेतील सर्वे हिंदू राज्यें नामदोष
करून आपली एकतंत्री सत्ता दक्षिणेंत स्थापन करावयाची, ह्या महत्त्वा-
काँक्षेच्या भरीं पडूनच त्यानें त्रिचनापल्लीच्या राजकारणांत माझा हात
शिरकवून दिला होता. त्यावेळीं जर मी तुझ्या तंत्राने वागलो असतों, तर
त्या क्ूरानें मला जबरदस्त शासन करून वर आणखी तुझ्या राज्याची पाळें-
मुळे खणून काढण्याला कमी केलें नसतें. इतकेंच काय पण तुला देखील त्यानें
आपल्या जनानखान्यांतली बटिक बनवून सोडलें असतें. मी प्रारंभापासूनच
मीनाक्षी राणीचा बंदिवास ५९
त्रिचनापल्लीच्या हिदु राज्याचा पुरस्कर्ता आहें अशी त्याची खात्री असल्या-
मुळेंच त्यानें एथील घडामोडींच्या बाबतींत माझ्यावर सर्वेस्वीं विश्वास न
टाकतां आपल्या मुलाला सफदरअल्लीला माझ्याबरोबर पाठविलें होतें. तो
मेहुण्याचा कांटा मीं माझ्या वाटेतून दूर सारला. पण नबाबापुढें माझा नाइलाज
झाल्यामुळें मला तुझ्या बाबतींत आजवर इतकें निष्ठुर व्हावे लागलें. अल्लाच्या
कुपेनें तोही कांटा मराठ्यांनीं परस्पर माझ्या वाटेतून दूर केला आहे. आतां
माझ्याशीं शत्रुत्व करावयाला सफदरअल्ली तेवढा जिवंत आहे. पण मरा-
ठ्यांच्या हातीं त्याची देखील परस्पर चांदी आटेल अशी तजवीज करण्या-
साठींच मी एथें आलों आहें. एवढें माझें कारस्थान सिद्धीला गेलें, कीं अर्काटरचे
राज्य त्रिचनापल्लीच्या हुकमतींत आणून मी तुला त्या संयुक्त राज्याची मुख्य
राणी करावयाला व तुझ्या हुकमतींत तुझा मांडलिक या नात्यानें दोन्ही राज्यें
सांभाळावयाला माझी तयारी आहे. हे सर्वे मनोरथ तडीला जाणें अथवा
न जाणें आतां केवळ तुझ्यावर अवलंबून आहे.” लगेच त्यानें आपल्या अंगरख्या-
च्या खि्यांतून एक कागद काढून तिच्या हातीं देण्यासाठीं पुढें करीत म्हटलें,
“हया कागदावर मला तुझी स्वदस्तुरची सही पाहिजे आहे. ”
मीनाक्षीचें मन चंदासाहेबाविषयीं आतां मुळींच अनुकूल नव्हतें. तशांत
त्यानें आपल्या सासऱ्याच्या नाशाविषयीं संतोष प्रदर्शित केला, व मेहुण्याच्या
नाशाचा नवा व्यूह रचण्याच्या बेतांत तो आहे असें त्याच्या तोंडून कळतांच
तर ती मनांत म्हणाली, हा मनुष्य आहे कीं राक्षस आहे? परंतु तिनें
तो कागद वाचून पाहिल्यावर स्त्रीच ती, आणि ईदवराच्या घरचा योगा-
योगही तसाच होता, त्यासरसा तिला मोह पडला कीं यांतच आपलें खरें
कल्याण आहे. ती तो कागद वाचं लागली तेव्हां चंदासाहेब मशालजीच्या
हातांतील मशाल आपल्या हातीं घेऊन तिच्यापाशी उभा राहिला; व वाचतां
वाचतां मधून एकदोन वेळां तिनें वर मान करून त्याच्याकडे पाहिले तेव्हां
त्यानें अशा कांहीं स्नेहपूर्ण-प्रेमपु?्णे कोमल नजरेनें तिच्याकडे पाहिलें कीं
त्यासरशी मोहिनी तिच्या मनावर पड लागावी. पण ती आपल्या मतें फार
सावधानचित्त रहाण्याचा प्रयत्न करीत होती. आपण एकवार त्या विश्वास-
घातकी अविधाच्या मायावी बोलांना व विषारी सौंदर्याला भुलून फंसलो,
त्यामुळें आपल्या राज्याची-अब्रूपरी अत्रूची-सर्वस्वाची राखरांगोळी होऊन
६० पेशवाईचे मन्वंतर
टया तुल्गवासांत कुत्र्याच्या सोतीनें आयष्य कंठणें आपल्या नगिबीं आलें
याचा तिला विसर पडणें तर शक्यच नव्हते. त्या अनुभवाचा उपयोग करू
नच पुढ वागावयारचें हा सावधगिरीचा विसर त्या क्षणालाही तिच्या डोक्यांत
बोळत होता. तद्या स्थितीत तिर्ने तो कागद वाचला तेव्हां आापण आजवर
अविचारानें केलेल्या अक्षम्य दुकाच अंशत: तरी परिमार्जन होण्याला हा
उपाय चागला उपयोगी पडेल व आपणाला आजवर सववस्वी बडविणाऱर््या
नराधमाला यथायोग्य शासन देखील दवदया झाली तर आपण करूं शक झं
अश्या आज्या तिला वाटं लागली माणसाच्या मनांतील विचाराचे प्रतिविम्ब
याच्या चयवर उमटलेले अनेकवार आढळन येते, व चंदासाहेबासारख्या
रेत माणसाला तर तें अचूक ओळखतां येत असे मीनाक्षीची समाधानवत्ति
तिच्या चर्येवर प्रतिबिम्बित शालला तो आपल्या तीक्ष्ण नजरेने लक्ष्यपू्वेक
पहात होता. त्यावरूनच त्यानें जापल्या भनाशीं खूणगांठ मारली कीं आपलें
काम ज्ञाळे; भोळी रागी पन्हा आपल्या माहूजालात सांपडली यांत संशय
नाहीं. जर राणीवर आपला पगडा वसला नाहीं तर तिचा त्याच घटकेला
कडेलोट करण्याची त्याची तयारी होती, व वहुशः आपणाला त्या प्रसंगाला
तोंड द्यावे लागणार अत्या भाःवदन त्याने कडेलोटाच्या कामांत निर्ढावळेल्या
बेरड क्षिपायांनाही आपल्याबरोबर आणलें दात. परतु आतां आवश्यकता
नसल्यामुळें त्यानें त्या शिपायांना रजा दिली. तेवढ्यांत मीनाक्षीने तो
कागद वाचून संपविला ब ती त्याची घडी करीत होती त्यादरून अंदाजून
ह्यानें तिला विचारलें, “माझी हो याजना तुला मान्य आहे ना? ”
इगडाखाय सांपडळेला हात मोकळा करून घेणेच शेयस्कर असतें, हा
व्यवहारशास्त्रांतील सामान्य नियम गीनाक्षीला त्या वेळीं अचक आठवला
तिनें मागील सार्या गोष्टी विसरून चंदासाहेबाला होकार डिल
तर मग त्या पत्रावर स्वाक्षरी करायला तुळा कांहीं हरकत नाहींना! ”
मा एक यःकरिचत दुबळी बायको साणस माझ्या विनंतीला मरारराव
तारपड्यासारखा कतेबगार व चतुर रणझंज्ञार कितपत मानील याचा
पाजझ्ञा मलाच भरंवसा वाटत नाहीं. त्यापेक्षां तुम्ही थोर, ते थोर ! तुम्ही
सत्ताधीश, ते सत्ताधीश! तुम्हींच त्यांच्याशीं सालोख्याची भाषा काढळी त्र
त्याचा जास्त उपयोग होईल असें मला वाटतें ”
नाक्षी राणीचा वंदिवास ६१
“खरे; पण मरारराव घोरपडे हा उघड उघड मराठ्यांचा पक्षपाती
आहे, व सर्वे मराठे अर्काटच्या नबाबाचे प्रतिस्पर्धी असल्यानें स्वाभाविक-
पर्णेच ते माझाही दृेंष करतात. ते माझ्या शब्दावर विश्वास कसा ठेवतील?
तुझ्या मध्यस्थीने त्याचा व माझा विश्वास एकवार पटला कीं मगच्या गोष्टी
सोप्या आहेत. तोंवरच काय ती खरी अडचण आहे. ”
यावर मीनाक्षीनें जास्त आढेवेढे धेतले नाहींत. चंदासाहेबाने स्वाक्षरी
करण्याचें साहित्य वरोबर आणविलेंच होतें, ते घेऊन तिनें स्वाक्षरी केली
या क्षणापासून त् तत्त्वत: बंधमुक्त झाली आहेर. ” तो कागद काळजी-
पुदेके आपल्या ताव्यांत घेऊन म्हणाला, “परंतु राजकारणाच्या दृष्टीनें
तुला वंधमुकक्त करण्याची वेळ अद्यापी न आल्याने मी तुला आणखी
कांहीं दिवस प्रतिवंधांत ठेवं इच्छितो. ”
स्हणजं ? ” मीनाक्षीने विस्मयचकित दृष्टीने त्याच्याकडे पहात विचा-
रले, “ मीं तुमचे इतके अपराध सहन करून देखील तुमच्यावर विश्वास
ठेवला आणि तुमच्या हातांतील कळसूत्री बाहुलीप्रमाणें तुमच्या शब्दावरहुकूम
वागल्ये, त्याचें हे फळ वाटतें ! ”
“मीं तुला एकवार सांगितलें ना; हें राजकारण आहे. राजकारणाचे
अवघड डाव अद्याच डावपेचांनीं खेळावे लागतात. तुझा नेम काय? पुन्हां
तू माझ्यावर उलटून माझ्या शत्रशीं सलोखा करून माझ्या नाद्याचीं
कारस्थाने उभारणार नाहींस कशावरून ? यास्तव तुला इरेला घालून
माझ्या सर्वे प्रतिस्पर्ध्यांचा मोड माझ्या हातून होईपावेतों आणि त्रिचनापल्ली,
अर्काट व तंजावर हया तिन्ही राज्यांवर माझा एकतंत्री अंमल प्रस्थापित
होईपावेतो तुझी मुक्तता होणार नाहीं. ”
मीनाक्षी त्या क्षणीं खवळलेल्या वाघिणीसारखी चंदासाहेबाच्या अंगावर
चवताळून गेली. त्या आवेद्याच्या भरांत तिनें वेळीं त्याच्या नरडीलाही हात
घातला असता इतकी ती संतापली होती. पण चंदासाहेबार्ने तिकडे यत्किचित्
देखील लक्ष न देतां बाहेर जाऊन आपल्या सेवकांना आज्ञा केली, “ कोट-
डीचा दरवाजा पूर्ववत् बंद करून घ्या. ”
शिपायांनी त्याच क्षणीं कोठ्डीचा दरवाजा वंद करून त्याला कुलूप ठोकले,
व किल्ल्या चंदासाहेबाच्या हातीं दिल्या. चंदासाहेब लगेच तेथून निघून
६२ पेशवाईचे मन्वंतर
“१ -“*.
*५ .४४-९.४/ ५ ५१५१४४९ “% “१४% ४0१९-४१. 0५-८४. “१४ “१ -टो£टी “२२४४-५०-0० “9
राजवाड्यांत गेला. मीनाक्षी ह्या देवदुविलासाबहल त्या अंधारकोठडींत
दरवाजाला डोकें टेकून कितीतरी वेळां ओकसाबोकशी' रडत होती. चंदासाहेबानें
आपला कांट्यारने कांटा काढण्याच्या कामीं मोठ्या धूर्तपणानें उपयोग करून
घेतला असें तिला आतां कळून आलें. पण तें ठेंच लागल्यानंतरचें शहाणपण
होतें. ठेंचाळण्याच्या वेदना हलक्या करण्याच्या कामीं त्याचा थोडाच उपयोग
व्हावयाचा होता !
त्या यातनामय बंदिवासांत देखील निद्रा घेण्याची संवय जरी मीनाक्षीला
गेल्या तीन वर्षांत झाली होती, तरी आज तिला उभी रात्र झोंप कशी ती
आली नाहीं. बराच वेळपावेतों ती आपलीं पूर्वकर्म व त्यांचे परिणाम आठवून
रडत बसली असल्यानें रडून रडून तिचे डोळे सुजले होते. कधीं कधीं असेंही
होतें कीं मानसिक श्रमांचा अतिरेक झाला कीं त्यांतच माणसाचा क्षणभर
डोळा लागतो. तशा पहाटेच्या दोन घटका रात्रीला मीनाक्षीचा डोळा
अंमळ लागतो न लागतो तोंच तिच्या कोठडीचा दरवाजा पुन्हां कोणीतरी
उघडूं लागल्याचा भास तिला झाला. मसौीनाक्षीच्या छातींत धस्स झालें;
तो काळ पुन्हां एखाद्या नव्या उपायानें छळण्यासाठीं आला कीं काय?
तोंच दरवाजा उघडला गेला, व एक वुरखेवाली व्यक्ति हातांत एक मंद
प्रकाश देणारी दिवटी घेऊन आंत प्रविष्ट ज्ञाली.
सातार््याकडील वर्तमान ६३
"४४४४४४१४५४ ५९ ४८४८ ९८ ८८४५-४८ ४८ ४८८८ ५८८५५५ -८-८५-४५-४५-/५८-५८-/५--८५-८१५-/५-/५/४-५-/५-/५-/५४४-/५-/१-/५-८५/१८--०८/-- ५८८४ ४४४४४शथ्ट४१ ४४४४४१0 ५"५0५१४५४९१"४/४४”*
प्रकरण ८ वें
सातार्याकडील वतेमान
(वडडड ळ अह 000 आच. 0 हि अय हवगाकळन
ज्या कर्नाटकांतील पूर्वोकत घडामोडींना मूर्त स्वरूप प्राप्त करून देणारी
सातारा एथील मराठ्यांची वधिष्णु साम्राज्यसत्ता ऊफे हिदुपदपाद-
शाही होय, त्याअर्थी आपणाला आतां तेथील राजकारण समजावून घेण्या-
साठीं तिकडे वळणें प्राप्त आहे. त्या वेळीं साताऱ्यांत चाललेल्या राजकीय
घडामोडीदेखील कांहीं कमी महत्त्वाच्या नव्हत्या. एक तर बाजीराव पेश-
व्याच्या मत्यनंतर सर्व शहर वास्तविक ढःखसागरांत ब॒डन गेलेलें असावयाचें
किवा आतां नवीन पेशवे अधिकारारूढ होणार म्हणून सवंत्र आनंदी आनंद
दिसावयाचा. मृत पेशव्यांच्या परचात् नवीन पेशवा अधिकारारूढ होणार
ही गोष्ट परंपरेने ठरल्यासारखीच होती; आणि नानासाहेब पेशवे हे शाह
महाराजांचे अत्यंत आवडते, लहानपणापासूनच महाराजांच्या कटिखांद्यावर
खेळलेले व अंमळ मोठे झाल्यापासून राजकारणांत मुरलेले असे असल्यानें
त्यांनाच महाराज पेशवाईची वस्त्रें देणार याविषयीं सामान्य प्रजाजनांत
झुळींच दुमत नव्हतें. परंतु इतर अनेक भानगडी ज्या राजधानींत व राज-
धानीबाहेर निरनिराळ्या ठिकाणीं उपस्थित झाल्या होत्या, त्यांनींच तर
नानासाहेबांना पेशवाई मिळण्यांत खो पडण्याचा मुख्य संभव होता
त्या सुमाराला कोल्हापूरकर संभाजी महाराजांचेंहि सातार्यांतच ठाणें होतें*
याप्रमाणेंच राजवटीचे इतर अनेक मात्तबर सरदारहि नव्या पेशव्यांच्या
अधिकारदानाच्या सोहळ्यासाठी म्हणून सातार््यांत एकत्र जमले होते.
*सातारकर आणि कोल्हाफ्रकर छत्रपती यांच्या या भंटीची कांहोंशी
हकोगत का. सं. प. या. लेखांक ४२९ च्या शेवटच्या कलमांत देण्यांत आली
आहे. कोल्हापूरकर संभाजीराजांच्या ह्या आगमनांतील हेतु जरी कोठें
स्पष्टपणे उपलब्ध नाहीं, तरी याच प्रसंगीं शाहूमहाराजांच्या पश्चात
संभाजीराजांनीं गादीवर बसावें असा बारा कलमांचा गप्त करार नानासाहेब
आणि संभाजीराजे यांच्यांत झाला, तो वरील पुस्तकाचा लेखांक ४२८ मध्यें
दाखल आहे .
६9 पेशवाईचे मन्वेतर
रघूजी भोंसले आणि वाबूजी नाईक हेहि कर्नाटकांतील यशस्वी स्वारी
अर्धैवरट टाकन व तिकडील बंदोबस्ताचा सर्व भार मुरारराव घोरपड्यांवर
सोंपवन घाईघाईने साताऱ्याकडे आले ते बाजीराव पेशव्यांचे निधन व त्यांच्या
ज्येष्ठ चिरंजिवांना अर्थात् नानासाहेबांना पेशवाईची वस्त्रे मिळण्याची
शक्यता या दोन गोष्टी एंकनच आले होते. भोंसळे आणि नाईक यांचा
निरनिराळया कारणांसाठी पेशवाईवर कसा डोळा होता हें वाचकांना या-
पूर्वी कळून चुकलेंच आहे. नाईक आणि भोंसळे जे सातार्यांत आले, ते
मुख्यतः त्याच गोष्टींविषयी वाटाघाट करूं लागले. गहू महाराजांची आव-
डती रक्षा लक्ष्मीबाई ही त्या दोघांना प्रथमपासूनच सामील होती आणि या
त्रिकुटांत आणखी इतर चिल्ह्र चळवळ्यांची भर पडून नानासाहेबांना पेशवाई
मिळण्याच्या विरुद्ध तो एक भयंकर गुप्त कटच उभारला गेला होता. नाईक
आणि भोंसळे सातार््यांत येतांच त्यांची व शाहू महाराजांची प्रथम गांठ पडली
आणि नानासाहेबांना पेशवाईची वस्त्रे देण्याविषयींचा महाराजांचा मनोदय
त्यांना स्पष्टपणे कळून आला. तेव्हांपासून तर त्या राजकारणाला अत्यंत मह-
त्वाचा रंग चढू लागला. बाह्यात्कारी या मंडळींना शाहु महाराजांच्या इच्छेला
विरोध जरी करतां आला नाहीं, तरी पडद्यामागून गोळ्या झाडून हा बेत
फिसकटून टाकण्याचे कार्य साधण्यासाठी ज्याची त्याची आपापल्या परी
शिकस्त चालली होती. मात्र आदचर्याची गोष्ट ही कीं लक्ष्मीबाई, नाईक
आणि भोंसले यांची पेशव्यांविरुद्ध जरी गट्टी जमली होती तरी त्या तिघांचे
| नानासाहेबांना पेशवाईपद न देतां तें बाबजी नाईक बारामतीकर यांना
दयावे, अशी खटपट बाजीरावाच्या मत्यनंतर रघजी भोंसले यांनीं केली
सन १७४० त रघूजी भोंसले कर्नाटकांतील स्वारींत असतां तिकडेच
बाजीरावाच्या मृत्यूची बातमी त्याला समजली. त्यावरोबर स्वारीचे
काम अधेच टाकून तो लगेच पेशवाईच्या खटपटीसाठीं उतावळीनें
साताऱ्यास आला. नानासाहेबांना पेशवाई मिळूं नये अशी खटपट करणारांत
भोंसळे व नाईक यांप्रमार्णेच महाराजांच्या राण्याही सामील होत्या असें
इतिहास सांगतो. रघूजी भोंसले शाहुमहाराजांचा चुलत साड असल्यामुळे
व वाबूजी नाईक हे पेशव्यांचे सावकार असल्यामळें दोघेही ह्या पेक्षवाई
प्रकरणी नानासाहेबांना चांगलाच शह देऊं ककले. तो शह पुढे फळाला आला
नाहीं ही गोष्ट निराळी
सातार््याकडील वर्तमान ६५
अन्तस्थ कावे एकमेकांविरुद्ध आणि अगदीं निराळे असे होते. लक्ष्मीबाईला
आपला वेडगळ मुलगा पुढें छत्रपति होण्याला मदत करील असाच पेशवा
पाहिजे होता, व ती मदत करण्याचें वचत त्यांना बाबूजी नाईकांनी दिलें
असल्यामुळें बावूजी चाईकांना महाराजांनीं पेशवा करावें असा तिचा महा-
राजांना आग्रह सुरू होता. याच्या उलट रघूजी भोंसल्यांना आपला मुलगा
छत्रपति व्हावयाला हवा होता व ती गोष्ट नाईकांच्या सहाय्याविना तडीला
जाणें शक्य नाहीं हें हेरून त्यांनीं नाईकांची कांस धरली होती. प्रसंग पडल्यास
पेशवेपदाची ज्षूल नाईकांच्या पाठीवर घालण्यासाठी महाराजांपाशीं आपलें
आणि आपल्या बायकोचे शकय तेवढें वजन खर्चे करण्यासाठीं त्यांनीं चंग
बांधला होता. रघूजी भोंसल्याची बायको ही शाहू महाराजांची चुलत
मेहुणी असल्यामुळें व शाहू महाराजांच्या कारस्थानी' राण्यांना पेशव्यांचा
कारभार डोईजड वाटूं लागल्यामुळें रघूजी भोंसल्यांच्या इच्छेला राणी-
वश्ांत मान्यता मिळणें मुळींच अवघड गेलें नाहीं. तात्पर्य, भोसल्यांचा हा
डाव जर साधला असता तर भोसल्यांचा मुलगा महाराजांच्या एखाद्या
आवडत्या राणीच्या मांडीवर बसवून भविष्यकाळीं सातारचा छत्रपति
झाला असता. |
मात्र मौजेची गोष्ट ही कीं ह्या पक्षाचे हे बेत जसे बाहेरील जगापासून
तसेच अंन्तःपुरांत लक्ष्मी बाईपासूनहि अत्यंत गुप्त ठेवण्यांत आले होते. यांत
अत्यंत कुचंबणा कोणाची होत असेल तर ती बिचाऱ्या बाबूजी नाईकांची!
: भोंसले स्वतः पेशवे होणार म्हणून म्हणाले तरी त्यांना नाहीं म्हणण्याची
नाईकांची छाती नव्हती. निदान मग दुय्यम कारभार तरी आपल्या हातीं
येईल, व भोंसले हे शिपाईगडी असल्यामुळे आपल्यासारख्या कलम-
कसायाची पेशवाई-राज्यकारभारांत त्यांना अवश्य गरज लागेल, असा
नाईकांचा होरा होता. भोसल्यांचा. मुळगा पुढेमागे छत्रपति. झाला तर त्यावेळीं
त्या छत्रपतींच्या नांवावर सर्वे राज्यकारभार आपल्याला गुंडाळून पदरीं
घेतां येईल अशीहि त्यांना हांव होतीच. पण भोंसल्यांचा हा डाव नक्की
साधेल्वच अशी नाईकांची खात्री नसल्यामुळें व विशेषतः शाहूमहाराजांचा
स्त्रेगपणा$ लक्षांत घेऊन त्यांनीं लक्ष्मीबाईपाशीं पूर्ववत् संधान राखले होतें,
पणा 0 ---*-.न०० कापा ीणणणापा ण? णी फनी
कनाल ऑप लनन चा
$ शाहुमहाराजांना अनेक राण्या व रक्षाही होत्या हें इतिहासांत महशूर
ण
६४ पेशवाईचें मन्वंतर
४.४५./२५/४५-/ ४.४४.
१४-७७ *./४ ४७ ५८.४१ ./"१० ०८४. /0१./४ ७.//१४ ४१९७ ८१९ .४७...४११./४0७ .»7%, //७ , ०१... ७...
*,/१-४१../४ ./ ४. '- ५1४/%४ १ ४0४. ५५५/१%.५४४.” *.४१- €% ८४.” ४. ५ 0 ४0%. १४१.”
लक्ष्मीबाईची अट एकच, कीं आपला मूलगा भविष्यकाळीं छत्रपति व्हावा.
आणि नाईकांनी ती अट मान्यहि केली होती. दुर्देवाची-नव्हे मराठ-
शाहीच्या दृष्टीनें सुदेवाची गोष्ट एवढीच कों नेहमीं बायकांच्या तंत्राने
वागणारे शाहुमहाराज ह्या पेशवेधदाच्या एका बाबतींत मात्र तितक्या
ढिलाईनें वागण्याला राजी नव्हते. त्यांनीं मनांतूत नानासाहेबांना पेर-
वार्दचीं वस्त्रे देण्याचा निर्धार केला होता व इतर कारभारी मंडळींच्या
विरुद्ध आग्रह परोपरीने पडला तरीसुद्धा त्यांचा तो बेत बदलला नाहीं. त्या
विरोधापासून फलनिष्पत्ति एवढीच झाली कीं पेशवाईचे अधिकारदान जें
ताबडतोब व्हावयाचे तें एक दोन आठवड्यांनी लांबणीवर पडलें.
ह्या इतर चळवळ्या मंडळींची गोष्ट सोडली तर खुद नानासाहेब तरी
महाराजांच्या या कृपेबद्दल भरपूर स्वामीभवतीचा मोबदला त्यांना द्यावयाला
तयार होते किवा नाहीं हाहि एक विचार करण्यासारखाच प्रश्न होता.
कोल्हापूरकर संभाजी महाराजांनीं सातार्यांत महाराजांचे पाहुणे या नात्यानें
जें ठाणें दिलें होतें तें बाह्यात्कारी भलेपणाचें द्योतक असलें तरी त्यांतील
'आन्तरः को$पि हेतुः ' निराळा होता व तो जर कोणाला माहीत असेल तर
तो एकट्या नानासाहेब पेशव्यांनाच. कारण इतिहास सांगतो कीं, याच सुमा-
राला पेशवाईचीं वस्त्रे कोणाला द्यावीं या भानगडी राजदरबारांत जोरानें
वाळू असतांना व नानासाहेबांनाच पेशवाईपद द्यावयाचें असा प्रयत्न शाह
महाराज जिवाभावानें करीत असतांना नानासाहेब तिकडे कोल्हापूरकरांशीं
गुप्त दोस्तीचा तह करण्यांत गढून गेले होते.*
आहेच. त्यांच्या राण्यांनीं राजकारणांत माजविलेळे केक अस्थानी घोटाळे
इतिहासांत प्रामुख्यानें नमूद आहेत. शाहूमहाराज हे करड्या स्वभावाचे
व पूर्ण कर्तव्यनिष्ठ असते तर त्यांच्या राज्यकारभारांत स्त्रीसाम्राज्य कधींच
माजलें नसतें. सुदेवानें विरूबाई ही त्यांची रक्षा अत्यंत सुशील व समजूत-
दार होती. तिच्या ह्यातीपर्यंत राणीवश्यांतील बखेडा मराठशाहीला फारसा
विघातक होऊं शकला नाहीं. पण तिच्या पड्चात् त्या बखेड्यांनीं जोरानें
वर डोकें काढलें व त्या बखेड्यांच्या आगीची झळ मराठदाहीला चांग-
लीच भोंवली.. ।
“ह्या महत्त्वाच्या करारनाम्याचा ओझरता उल्लेख पूर्वी करण्यांत
आलाच आहे. तो करारनामा नानासाहेब व त्याचे चुलते चिमाजीआप्पा
साताऱ्याकडीळ वर्तमान ६७
नानासाहेबांचें कोल्हापूरकराशीं पूर्वोक्त संधान सुरू होतें याची शाहू
महाराजांना अथवा इतर दरबारी मंडळींना दखळगिरी नव्हती असें नाहीं.
नाईक, भोंसले वगेरे कारभारी मंडळी; त्याप्रमाणेंच महाराजांच्या राण्या
आणि रक्षा लक्ष्मीबाई ही सर्व मंडळी नातासाहेवांच्या वर्तनांत त्यून सांपडतें
कोठें आणि नानासाहेबांविरुद्ध महाराजांचे मन कलुषित करण्यांत त्याचा
उपयीग आपण करून घेतों केव्हां यासाठीं अगदीं डोळ्यांत तेळ घालून टपून
बसली होती. प्रत्येकाचे गुप्त हेर नानासाहेबांच्या पाठीवर होते. त्या हेरां-
माफत नानासाहेब आणि कोल्हापूरकर संभाजी यांचें रहस्य जुळल्याची
बातमी हां हा म्हणतां नानासाहेबांच्या प्रतिस्पर्ध्यांना कळून षट्कर्णी ज्ञाली
व ती शाहू महाराजांच्या कानांपर्यंतहि गेळी. महाराजांनीं या बाबतींत
नानासाहेबांना बोलावून त्यांचा जाब विचारला. परंतु नानासाहेब हे अद्या
अनेक घडामोडींच्या प्रसंगांतून पार पडण्याच्या बाबतींत पक्के तरवेज होते.
एकोणीस वर्षांच्या पोरवयांत त्यांनीं आपल्या कारवाईने मराठ्यांच्या राज-
कारणांत पुष्कळच महत्त्व संपादन केलें होतें व म्हणूनच महाराजांचा विश्वास
इतर सर्व मंडळीविरुद्ध त्यांच्याच शढावर बसणें क्रमप्राप्त होतें. दुसरी
गोष्ट, आपणांवर एखादा आरोप येतांच त्याची निरवानिरव कशी करावी
हें तानासाहेब पूर्ण ओळखून होते. त्यांनीं महाराजांना स्पष्टपणें सांगितलें,
ह्या दोघांनीं कोल्हापूरकर संभाजी राजांना लिहून दिला आहे. (का. सं.
प. या. लेखांक ४२८) या करारनाम्यांतीलळ आशय पुढीलप्रमाणे आहे.
“सातारचे राज्य स्वामींचे (संभाजीराजांचे) व एकछत्री शिक्का महाराजांचा
(संभाजीराजांचा) चालावा. शाहू महाराजांचा जीवात्मा आहे, तों बाहया-
'त्कारी आम्ही त्यांचे सेवक, परंतु अंतर्यामी स्वामींचे. शाहूमहाराज यांनीं
केलासवास केल्यावर दोन्हीं राज्यें स्वामींची, आणि आम्ही सेवक स्वामींचे.
स्वामींच्या आज्ञेप्रमाणे वर्तणूक करूं शी शपथ घेतली होती. त्याभमाणें
दोन्हीं राज्ये एक करून एकछत्री स्वामींचा शिक्का चालावा; आणि आम्हीं
शाहूमहाराज यांचे कारकोदीप्रमाणें सेवा करून असावें, हें प्रमाण. यासी
अंतर करणार् नाहीं. ” शाहूमहाराजांच्या भृत्यूपुवी नऊ वर्ष पेशव्यांनीं हा
ठराव संभाजीराजांशीं केला होता; आणि शाहूमहाराजांच्या मृत्यनंतर तो
पुन्हां पेशव्यांनीं ताजा करून दिला. पुढे रामराजाची स्थापना होऊन हें .
कारस्थान संपळें, तेव्हां पेशव्यांना हा करार पाळण्याची आवश्यकता राहिली
नाहीं हें उघड आहे.
६८ . पेशवाईचें मन्वंतर
“आपण मला पेशवाईची वस्त्रे देणार हें ज्या मंडळींना सहन होत नाही
त्या मंडळींनी आपल्या कानीं माझ्याविषयीं वीष ओतण्याचा हा नवा उपाय
शोधून काढला आहे.”
“ मृग काय; तुमचा कोल्हापूरकर महाराजांशी कांहींच संबंध नाहीं ? "
महाराजांतीं आश्चर्ययुक्त मुद्रेने विचारलें |
“ नाहीं कसा? संबंध आहे; आणि जोंवर मला इमानेंइतबारे महा-
राजांच्या चरणांची सेवा करून राजवटीची इभत अबाधित राखावयाची
आहे तोंवर राजवटीच्या सवे शत्रुमित्रांशी सलोखा ठेवणें मला प्राप्त आहे.
महाराज मला पेरवाईचीं वस्त्रे देणार किवा नाहीं हा प्रश्न महाराजांच्या
मर्जीचा आहे. परंतु माझ्या वाडवडिलांतीं राजकारणांत जें अनुसंधान
राखलें तं राखण्याला मी महाराजांच्या आजवरच्या उपकारांबदहल उभा
जन्म बांधळेला आहें. कोल्हाप्रकरांचें आणि आपलें वेमनस्य मला माहीत
नाहीं असें नाहीं. असें असतां मी कोल्हाएरकरांशीं ये जा ठेवतो, त्यांच्याशीं
गोडी राखतों, यांतील अर्थ काय असेल हें महाराजांनींच ओळखावे. कोल्हा-
पूरकर जे नेमके या वेळीं येथें आले ते पेक्षवाईवरील संकटाचा फायदा
घेऊन येथल्या राजकारणांत ढवळाढवळ करण्यासाठी आले असले पाहिजेत
हें माझ्यासारख्या मुठीएवढ्या मुलानें महाराजांसारख्या मुरलेल्या राजकारण-
पटला सांगितलें पाहिजे असें मुळींच नाहीं.”
नानासाहेव जरी अंतःकरणापासून बोलत होते तरी महाराजांच्या
चर्यकडे त्यांची दृष्टि तीक्ष्मतेनें वेधून राहिली होती. मनुष्याच्या चर्येवरून
त्याच्या अंतःकरणांतदील निगडित भावना ओळखण्यांत नानासाहेब फारच
तरबेज होते आणि त्यांतल्यात्यांत महाराजांशीं' पेशव्यांचा गप्त बातमीदारा-
च्या नात्यानें त्यांचा नहमींच संबंध असल्यानें* महाराजांच्या प्रत्येक हाव-
“'६.//% .»7*. “क “"% “%* १ “0 ४0 “7 /४९..//११../ १५ ५९७७
णणणापण ण थिशिपि0िणिणिपणणिणा िशिरशिशिशिणिणाणिणीणाणीणा
*बाळाजी विश्वनाथ पेशव्यांच्या कारकीर्दीप्रमाणेंच शाहूमहा-
राजांच्या कारभारी मंडळींतील इतर कारभारी पेशव्यांना कांहीसें
पाण्यांत पहात असल्यामळे आणि श्रीपतराव प्रतिनिधि वगेरे वयस्क क्छणान-
बंधी कारभाऱ्यांचें शाहुमहाराजांपाशीं बरेंच प्रस्थ असल्यामुळें पेशवे नेहमीं
सातारच्या राजदरबारीं आपले प्रतिस्पर्धी कारभारी काय उलाढाली करतील
याविषयीं साशंक असत. त्या उलाढालींवर नजर ठेवण्यासाठी पेशव्यांचे गप्त
साताऱ्याकडीळ वर्तमान ६९
हि “6 4.
"7१% € १.८१. ४१४ ४१५१.” १.४ शं ४२. २४४१४ ४.७ ४ ४. “.७१७४ ४००” 4“ २... ४५.” ४-0. >€%.४ “४-४. /7*. “१५ *््&€ च क. त क) त
भावाचा, प्रत्येक नंत्रकटाक्षाचा, प्रत्येक अंगविक्षंपाच[ा-फार काय, त्यांच्या
प्रत्येक इवासोच्छवासाचा गूढार्थ काय हें ओळखण्यांत नानासाहेबांचा हात
धरणारा तेव्हांच्या दरवारी माणसांत दुसरा कोणी नव्हता. गोड आणि
एखाद्याच्या अंतःकरणाला पटेल असें भाषण बोलण्यांत आणि त्याप्रमाणेच
छेखणीनें कमालीची साखरपेर करण्यांत नानासाहेबांनी इतर कसलेल्या
'कलमबहाहरांना व वाचानिपुणांना हार खावयास लाविलें होतें. एखादा
निष्णात वेद्य ज्याप्रमाणें रोग्याच्या मुखचर्येवरून त्याच्या रोगाची चिकित्सा
करून योग्य ती उपाययोजना करितो त्याप्रमाणेंच नानासाहेब महाराजांच्या .
नुसत्या हाळचालीवरून त्यांच्या मनांतल्या गुप्त गोष्टी सहज ओळखूं शकत
व तझ्या प्रसंगीं महाराजांना पटेल तेंच बोलून किवा करून महाराजांची मर्जी
अधिकाधिक संपादन करीत असत. आजहि त्यांनीं तसेंच केलें. महाराजांना
आपलें बोलणें पट लागलें असें पाहतांच त्यांनीं जाणखी एका पाऊलानें पुढचा
पल्ला गांठला, “ ओघाला आलें म्हणन बोलणें प्राप्त झालें; महाराजांना
पुत्रलाभ व्हावा व मराठेशाहीची भरभराट व्हावी अशी मंगळ इच्छा मनांत
बाळगणारे महाराजांच्या जिव्हाळ्याच्या मंडळींतहि सध्या फारच थोडे-
कोणाची पेटे दाढी आणि कोण पेटवी विडी या न्यायानें नाईक काय, भोंसठे
काय आणि % % % पण महाराजांच्या राणीवंशांतील स्त्रिया मला मातेसमान
पूज्य आहेत, त्यांच्यावर कृष्णकारस्थानाचा आरोप करून मी माझ्या बाल-
पणाला दोष लावूं इच्छित नाहीं. त्या चुका झाल्या तरी राण्यांच्या अथवा
महाराजांच्या प्रियतमांच्या आहेत व त्या चुकांबद्दल त्यांना दोष देणें
म्हणजे अप्रत्यक्षपणे महाराजांनाच दोष देणें होय असें मला वाटतें,
म्हणून मी बोललों हे शब्द देखील माघारे घेतों व भलतेच शब्द तोंडावाटे
निघाल्याबददळ महाराजांची दोन्ही हात जोडन क्षमा मागतो. ” असें म्हणन
नानासाहेबांनी महाराजांना हात जोडन आपलें मस्तक त्यांच्या पायांवर
न्म्त्र
दूत सातारला व अन्यत्रही पसरलेले असत. नानासाहेब हे त्यांपेकीं एक दूत-
प्रमुख बातमीदार असून लहानपणापासून त्यांनीं सातार्यांत ठाणें दिलें होतें
त्यांनीं बालळवयांतही आपलें अनसंधान राखण्याचें काम बेमालम केलें व आपल्या
डावपेचांनीं शाहुमहाराजांची' मर्जी संपादन केळी. तीच पुढे त्यांना पेशवाईपद
मिळण्याच्या कामीं उपयोगी पडली
७० पेशवाईचे मन्वेतर
“१.४४ /१% “१ /7४ ८» ७ १ .“५ ८४.७ ८" /% »% ५ /* * “१.५५ /* ८५ ८१ // “€% ५४% ५» * “४.९७ /09.१७ / ७८0७ /
महाराजांनीं लगेच म्हटले, “ तुम्ही इतके कचरतां कां? आम्हो तर
म्हणतों कीं तुम्हांला आमच्या घरोब्यामुळें आमच्या राण्यांचीच काय पण
आमची देखील चूक दाखविण्याला पूर्ण मुभा आहे. तुमच्या कानीं जें काय आलें
असेल तें स्पष्ट बोळून दाखवा. ”
“ परंतु राजवटीची कारभारी मंडळी ही मला माझ्या तीर्थख्पांच्या ठायीं
पुज्य आहेत. त्यांच्याविषयीं उणेदुणे बोळ मीं बोलावे तरी कसे ? माझ्या-
सारख्यार्ने ल्हान तोंडीं मोठा घांस घेणें बरें नव्हे! ”
नानासाहेबांच्या पुर्वीच्या भाषणांत जो धूर्तपणा प्रतिबिबित झाला होता
तो या भाषणांतही होता. पहिल्या वेळीं त्यांनीं आपल्या एका वाक्याच्या
फटकाऱ्यासरसे महाराजांच्या राण्या व लक्ष्मीबाई यांच्याविषयी प्रामाणिक
मताचे विषविद्ध महाराजांच्या मनांत ओतले व या दुसर्या वाक्याने
कारभारी मंडळीविषयीं भलताच कितु त्यांच्या मनांत आणून दिला. महाराजांना
त्यांचे हे डावपेच कळणें शक्यच नव्हतें. त्यांनीं जास्त आग्रहपूर्वक सर्वे खरा
प्रकार काय आहे तो स्पष्ट करण्याबइळ नानासाहेबांना सांगितलें.
नानासाहेब नाहीं नाहीं म्हणून विनयाच्या लटक्या आविर्भावाने उत्तर देण्याची
टाळाटाळ करूं लागले, तेव्हां महाराजांनीं आपुलकीने संतापून त्यांना स्पष्ट
सांगितलें, “असले मनदुबळे पेशवे आम्हांला नको आहेत. आमच्या सारख्यांचें
छत्र शिरीं असतां घरच्या गुन्हेगा रांचे गुन्हे प्रत्यक्ष आमच्यापाशीं-राजवटीच्या
१
धन्यापाशीं बोलून दाखवावयाला ज्याला धीर होत नाहीं असला बावळट
मनुष्य उद्यां पेशवा होऊन मोठमोठीं राजकारगें काय तडीला नेणार? ”
अर्से म्हणून महाराज नानासाहेबांकडे पाठ फिरवन रागानें अंमळ
गप्प बसले.
प्रकरण नववे
सातार््याविषयी आणखी थोडे.
प गा.. > । य...
र्ऱा पल्यावर ही इष्टापत्तीच कोसळली असें नानासाहेबांना वाटलें. त्यांनीं
त्या संधीचा फायदा घेऊन भोंसळे,नाईक,उभयतां राण्या व लक्ष्मीबाई
. यांच्या कारस्थानाविषयीं शाहू महाराजांची जितकी म्हणून खात्री करणें शक्य
होतें तितकी करण्याला कमी केलें नाहीं. सुव्यावरोबर ओलेंहि जळतें या न्यायाने
प्रतिनिधींवरहि त्यावेळीं त्यांनीं चार शिंतोडे उडविले. पण ते फार सौम्यपणाचे
होते. कारण एक तर प्रतिनिधि हे. शाहूमहाराजांच्या गळ्यांतील ताईत.
त्यांना दुखविणें म्हणजे प्रत्यक्ष शंकराच्या दर्शनाला जाऊन नंदीला लाथा
मारण्यासारखेंच होतें. दुसरें असें कीं प्रतिनिधींनी या वेळीं तरी पेशव्याची
बाजू उचलून धरली होती. यांतहि प्रतिनिधींचा कांहीं कावा नसेल असें
नाहीं. त्यांना मनांतून असें वाटत असावें कौं नाईक किवा भोंसळे असला
परका सनुष्य पेशव्यांच्या गादीवर येऊन डोईजड होऊन वसण्यापेक्षां नाना-
साहेबांसारखा कोवळा तरुण पेशवा झाल्यास तो शक्य तों आपल्या तंत्राने
चाळूं लागेल व त्याळा आपल्या मुठींत ठेवणें आपणाला सोपेंहि जाईल. *
असो. महाराजांच्या मनावर ह्या स्पष्टीकरणाचा संभाव्य तोच परिणाम
झाला. त्यांनीं नानासाहेबांना पुन्हां वचन दिलें, “ हीं पेशवाईचीं वस्त्रे
कांहीं झालें तरी तुमच्याशिवाय अन्य कोणालाही आम्ही देणार नाहीं.
त्याबरोबरच त्यांनीं इतर अनिष्ट गोष्टींचा बंदोबस्त करण्याचें ठरवून त्या
000 1 य का स
*थोरल्या बाजीराव पेशव्यांना श्रीपतराव प्रतिनिधींनी प्रसंगीं
राष्ट्रकार्याची हानि करूनहि कसा जबरदस्त विरोध केला हें इतिहासांत
मझहशूर आहेच. थोरल्या बाजीरावांच्या पश्चात् पेशवे आणि प्रतिनिधि
यांच्यामधील हो तेढ तात्पुरती तरी मिटण्याचें कांहींच कारण नव्हतें. परंतु
ती तेव्हां तशी मिटली गेली व श्रीपतरावांनीं त्या वेळेपुरता नानासाहेबाच्या
पक्षाचा अंगिकार केला. यांतील हेतु वर निदिष्ट केला आहे त्यापेक्षां
विराळा असणे मुळींच संभवनीय नाहीं.
७२ पेशवाईचे मन्वंतर
६.४५. «९ २ ७ /0७ ७९५ ८७८९५7 ४.५ ०0, .2:५ »7९ ८१-५५ ८१२ ४४ “४ “१ ८0-८५ ५०% १५८ ०५ “५.०७ ४९... » ४४१७४१४ ४४-”% ४४५१ ४0४, ६.०० १_/ "०.४५... ०. > *-१ ७४४ ४ केरल ७८४ ७५०७१७४७४१ ८०१७८४७८४७ “0. कका
चौकशीची जबाबदारी नानासाहेबांवरच टाकली. असे दिवसांभागून दिवस
कोटतां लोटतां अखेर महाराजांनीं आपल्या कारभाऱयांच्या संमतीने नाना-
साहेबांना पेशवाई बहाळ करण्याचा शुभ दिवस मुक्रर केळा. नाईकांनी
अखेरचा रामबाण उपाय म्हणून पेशव्यांकडे असळेली आपली जुनी कर्जाऊ
रक्कम एकदम मिळविण्याविषयीं नेमका त्याच वेळीं तगादा लावला. परंतु
प्रतिनिधींसारख्या प्रौढ मंडळींनी मध्यें पडून ऐन वेळीं नानासाहेबांना जरूर
तें आथिक साह्य करून नाइकांचा तोहि डाव हाणून पाडला. नाइकांना
कर्ज परत मिळालें; पण दरबारीं त्यांची जी फजीति झाली तिची भरपाई
त्या कर्जाच्या रकमेच्या अनेक पटींनींहि होऊं शकली नसती. अखेर एकदांचें
ठरले दिवशीं नानासाहेबांना भर दरवारांत महाराजांनीं पेशवाईपद दिलें
च वस्त्रे अर्पण केलीं. त्या समारंभाला कोल्हापूरकर संभाजी राजे व दर-
बारांतील इतर मातबर मंडळीदेखील हजर होती. परंतु तो त्यांचा केवळ
जुल्माचा रामराम होता. संभाजी राजे मात्र नानासाहेबांच्या अन्त:करणाची
आणखी एकवार ओळख पटवून घेण्यासाठीं कदाचित् त्या ठिकाणीं हजर असतील
महाराजांनीं पेशवाईची वस्त्रें नानासाहेबांना अर्पण करतांना त्यांना
कळकळीचा उपदेश केला, “ नाना, तुमच्या आजोबांनी आणि वडिलांनी
राजवटीची अमोल सेवा करून राजवटीची भरभराट व स्वतःची अपरंपार
कोति यांचा यशोदुंदुभि हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत दुमदुमता केला
आहे; त्यांचेच पुत्र तुम्ही आहांत. तुमच्या घराण्याचा आणि आमचा आज
तीन पिढ्यांचा ऊणानुबंधा'वा संबंध आहे. तो संबंध चिरकाल टिकवून
गादीची इमानेंइतबारें सेवा करणें व राष्ट्राच्या आबादानीसाठीं आजोबा
आणि तीर्थरूप यांच्या पावलांवर पाऊल टाकून झटणें हें तुमचें कर्तव्य आहे.
तुम्ही पोरवय म्हणून इतर मातबर मंडळींनीं तुमची प्रत्यक्ष किवा अप्रत्यक्ष
उपेक्षा केली असली तरी ती तुम्हीं मुळींच मनावर घेऊं नये. त्यांना तुमची
खरी पारख असणें शक्य नाहीं. कारण त्यांचा तुमचा तेवढा सहवास नाहीं.
आणि दुसरें, त्यांनीं जो थोडाफार विरोध केला असेल तो केवळ महाराष्ट्राची
आबादानी इच्छूनच केला असेल. ”
नाइक, भोंसले वगेरे मंडळी त्या दरबारांत हजर होतीच. त्यांची कारवाई
त्यांच्याच मनाला खात होती. ते मनांत ओळखून चुकले होते कीं शिमगा
सातार््याविषयीं आणखी थोडें ७३
>>*./९.०./४५५./५/०५/५/५./५४-/५/५./४१./१ /४९ ४.८१ /१ ४४५ ४४.१४ ४४४४११ ४४-४१-४४४४-०/४€४/१ १ २८९०४९. .४% »४५.५४. ४४४८-१४-४१ 0४८१४१ २.१९. 0 09 ह$
जातो आणि कवित्व राहतें त्याभ्रमाणें पेशवाई आपल्या हातची गेली आणि
आतां नानासाहेबांना आपण केलेल्या विरोधाचे कवित्व तेवढे शिल्लक राह-
णार. आजवर नानासाहेब ही एक उपेक्षणीय व्यक्ति आहे असे ते मानीत होते.
परंतु इतक्या कारवाईतूनहि नानासाहेबांनीं घिम्मेपणानें मार्ग काढून पेशवाई
संपादन केली या एकाच गोष्टीवरून त्यांच्या चारित्र्याची व कर्तबगारीची
ओळख इतरांना पटण्यासारखी होती. आणखी असें कीं हें सर्पाचें पिल्ल
मोठें झाल्यावर संधि साधून दावा धरून आपला कधीं चावा घेईल याविषयींहि
विरोधी मंडळींना भरंवसा वाटत नव्हता. महाराजांनीं तरी त्यावेळीं सामोप-
चाराचे जे उद्गार काढले ते “रामाय स्वस्ति रावणाय स्वस्ति' याच न्यायाने
काढले. त्याबरोबर नाइक घाईने आपल्या बसल्या जागेवरून उठून महा-
राजांना हात जोडून म्हणाळे, “ महाराज अगदीं आमच्या मनांतली गोष्ट
बोलले. नानासाहेबांना पेशवाई मिळण्याच्या बाबतींत मीं व भोसले यांनीं
विरोध केला असें जगाला दिसलें खरें. पण त्याच्या मुळाशीं कोणती भावना
होती हें सहजासहजीं कोणाला कळणें शक्य नाहीं. नानासाहेबांना पेशवाईचीं
वस्त्रें मिळू नयेत असाच केवळ आमचा हेतु नव्हता. राज्याची आबादानी तर
आमच्या ध्यानीं होतीच. पण त्यापेक्षांहि महत्त्वाची अशी एक भीति आम्हांला
होती ती ही कीं साऱ्या कारभारी मंडळींत पेशव्यांच्या विरुद्ध जें काहुर उठलें
होतें व जें अजनही आहे त्याचा निरास करून देण्याचें काम आमच्यासारख्यां-
शिवाय दुसर्या कोणाच्या हातून आणि तेंहि असे डावपेच लढविल्याशिवाय
तडीला जाणें शक्यच नव्हते. ” आपण कितीहि बोललों तरी ऐनवेळी कर्जे
परत मागून पेशव्यांची अडवणूक करण्याचा प्रयत्न जो आपण केला त्याचें
समर्थन होणें शक्य नाहीं हें मनांत पक्के माहीत असतांहि फाजील आज्ा-
वादित्वाला बळी पडून ते पुढें म्हणाले, “ आम्ही पेशव्यापाशीं ऐनवेळी कर्जाची
मागणी केली ती तरी पेशव्यांचे आणि आमचें एकमत नाहीं असं पेशव्यांच्या
विरोधकांना भासवून त्यांच्या पोटांतील काळेबेरें काढून घेण्यासाठींच होय.
आणखी असें को नवीन पेशवा गादीवर आल्याक्षणापासूनच कर्जबाजारी
असावा ही गोष्ट जितकी पेशव्यांना लांछनास्पद आहे, त्यापेक्षांहि त्यांचे
निरंतरचे हितकर्ते या नात्यानें मलाहि लांछनास्पदच आहे.
नाइकांची चर्पटपंजरी अक्लीच आणखीही कांहीं वेळ चालूं शकली असती?
७४ पेशवाईचें मन्वंतर
परंतु इतर दरबारी लोकांना ती ऐकावयाला नको आहे असें अंदाजून त्यांनीं
स्वत:च आपले भाषण आवरतें घेतलें. लगेच भोंसल्यांनींहि उठन आपल्या
परीने आपल्या उपदृव्यापांचें लंगडें समर्थन केलें. परंतु त्याचाहि कोणाचे
मनावर फारसा परिणाम झाल्याचें आढळून आलें नाहीं. नानासाहेब लगेच
उठून महाराजांच्या उद््गारांवर उत्तरादाखल बोलले, “ महाराजांनीं अत्यं
कुपाळू होऊन माझ्या वाडवडिलांचें पेशवाईपद मजकडेच चालविलें याबद्दल भी
महाराजांचा जन्मोजन्मी कणी आहें. मला या अधिकारप्राप्तींत व्यक्तिश:वेगण्य
वाटत असेल तर तें एवढेंच कों वंशपरंपरेने ही पेक्वाई माझ्याकडे येत
आहे, त्यापेक्षां मला अगोदर राजवटीची सेवा करण्याची संधि मिळन त्या
पराक्रमाच्या जोरावर जर मला हें यश संपादन करतां आलें असतें तर मी
स्वत:ला आजच्या पेक्षांही धन्य समजलों असतों. ”
नानासाहेबांचें पुरतेपणी बोलून झाले नाहीं तरीही खाई त्याला खवखवे
या न्यायानें नाईक आणि भोंसले यांच्याच्यानें स्वस्थ राहवेना. ते एक-
सेकांच्या कालांशीं लागून कांहींतरी पुटपुटळे आणि लगेच नाईक आपल्या
बंठकीवरून उठून नम्रतापुर्वक महाराजांना म्हणाळे, “ हीच आमचीदेखील
छच्छा होती. पेशवाईपद मला किवा भोंसल्यांना कोणालाहि प्राप्त झालें
असतें तरी तें पेशव्यांच्या वतीनें तारण म्हणनच आम्हीं रक्षण करणार होतों
स्पग पेशव्यांनीं आतां इच्छिल्याप्रमाणें स्वत: पराक्रम गाजवून तें पद संपादन
वेले असतें तर त्यांच्या शत्रूलाहि त्यांच्याविरुद्ध तोंडांतून ब्र काढण्याला अवसर
इिळाला नसता. ”
नाइकांना पुरतेपगानें बोलूं न देतां महाराज मध्येंच म्हणाले, “ नाना-
साहेबांच्या क्तेबगारीची ओळख आम्हांला पूर्ण आहे. म्हणूनच आम्हीं
न्होणाच्या विरोधाला न जुमानतां त्यांना पेशवे नेमलें आहे.
नानासाहेबांना दुधांत साखर पडावी त्याप्रमाणें महाराजांच्या आतांच्या
उद्गारांनीं पूर्वीच्याहन जास्त आनंद झाला. आणि तो त्यांनीं यथोचित
राब्दांत व्यक््तहि केला. याविषयीं त्या बेठकींत कोणाला विदोष आढचर्य
वाटलें असेल तर तें कोल्हापूरकर संभाजी राजांना. त्यांना हेंच कळेना कीं
सा माणसाला परमेश्वरानें दोन अंत:करणें दिलीं आहेत कीं कसें? कींयाचे
व्हाखवावयाचे दांत निराळे आणि खावयाचे निराळे आहेत ? त्यांना भय
क य ची 4४ “7 “५ “0५ “0७ “१ /700. ८१५ ०७ “१ “४५-९६ - ५ “६.
सातार््याविषयीं आणखी थोडें ७५
गाटत होतें याचें कारण नुकतेंच नानासाहेबांनी त्यांच्याशीं परस्पर गुप्त
शोस्तीचा तह केला होता, ब त्या तहांत आपण यावज्जन्म सेवक स्वामींचे
(संभाजी महाराजांचे) असून वरपांगी आपणाला शाहू महाराजांची सेवा
करणें प्राप्त आहे, असे म्हटलें होते. या उद्गारावर विश्वास ठेवूं जावें तर
नानासाहेबांचें आतांचें आचरण त्या उद्गारांशीं पूर्णपणें विसंगत होतें. तरी
पण त्यांतल्यात्यांत संभाजीराजांना जिवाचा विरंगुळा करतां आला तो एव-
ढाच कीं, नानासाहेबांनी आपल्याशीं केलेल्या कारारनाम्यांत शाह महाराजांशी
स्वतःची वागणूक केवळ वरपांगीयणाची राहील असें जं म्हटलें आहे त्याचेच
प्रतिबिंब हें त्यांचें वतेन नसेल कशावरून ! नानासाहेबांनी कांहीं महित्यां-
पुर्वी राजकारणांत पुढाकार घेऊन थोरल्या बाजीराव साहेबांना-प्रत्यक्ष
आपल्या पित्याला घरगुती भांडणांत कसें धाय मोकलून रडावयाला लावले,
आणि त्या महापुरुषाला आपल्या पुत्राच्या कारस्थानासमोर हार जाऊन
कसें परागंदा व्हावें लागलें, ही गोष्ट तेव्हां जगजाहीर होऊन चुकली होती.
थोरामोठ्यांच्या घरच्या गोष्टी म्हणन लोक उघडपणे नानासाहेबांची चूक
बोलून दाखविण्याला धजत नसत. पण मनांत ते ओळखून होते कीं हें सर्पाचें
पिल्ल आहे; व्यव्ति सामान्य नाहीं. ते प्रतिस्पर्ध्यापेकीं कोणाचा कधीं व कसा
निकाल करतील याचा कांहीं नेम नाहीं. प्रत्यक्ष पित्याविषयीं जर नानासाहेबांची
वर्तणूक अशी, तर राजाला ते काय जमानणार, हें संभाजी महाराज ओळखून
होते. तरी पण त्यांना असेंहि वाटत होतें कीं पेशव्यांनी आपल्याशीं जो गुप्त
तह॒ केला आहे, व त्या तहान्वयें सातारा आणि कोल्हापूर ह्या दोन्ही गाद्यांचे
एकीकरण करून त्याची मालकी छत्रपति बा नात्यानें आपणाकडे देण्याचें
जें गभितपणें सूचित केलें आहे, त्यांत त्यांचा स्वतःचा स्वार्थ एवढा मोठा
जबरदस्त आहे कीं त्याच्या सिद्धीसाठीं तरी त्यांना आपल्याशी इमान राखलेंच
पाहिजे. नानासाहेबांना सातारा, कोल्हापूर ह्या संयुक्त मराठी सास्रा-
ज्याचा सर्वाधिकारी पेशवा बनावयाचें आहे, व तेवढ्यासाठी आपल्या
मार्गातील शाहू महाराज ही बोलतीबालती प्रचंड धोंड युक्तीने बाजूला
लोटून देण्याला ते कमी करणार नाहींत, एवढा संभाजीराजांनी त्या करार-
नाम्याचा निष्कर्ष काढला होता. या मनोमनच्या विचारांनीं त्यांचे त्याच
क्षणीं परस्पर समाधान झालें; आणि कांहीं कितु उरला असल्यास तो नाना-
भल
७६ पेशवाईचे मन्वंतर
"/१४-४ ५४४४१. ४४-१९ ५-/४१-४ ४८७ ५४.०४. ९.४. २११, /_/./ ९.९.” २. १.०५, ९.५४ * “२.८५ ४.४ / ४.८”५../१७_.%,”४ ८7%, ७५ ५.१९ ./४./”५..” १-४ १.०७५.८ १.१४ ४१../११ / १० ७.
“७
साहेबांची त्यांच्याशीं दृष्टादृष्ट होतांच दूर झाला. नजरेला नजर भिडली
आणि मुके बोल बोलून गेली कों, हा सारा घेतल्या सोंगाचा साजरेपणा आहे.
संभाजी राजे तें सारें नानासाहेबांच्या चर्येवरून ओळखून चुकले व त्यांनीं तसें
समाधानपूर्वक आपल्या दृष्टिक्षेपार्ने नानासाहेबांना भासविलेंहि !
पेशवाईपद कोणाला द्यावयाचें या निमित्ताने सातारा राजधानींत उठलेले
वादळ अश्या रीतीनें श्यांत झालें व आपापल्या डावपेंचांत पराभूत झालेल्या
प्रतिस्पर्थ्यांना-विशेषतः नाईक आणि भोंसळे यांना आतां तेथें राहण्यांत
स्वारस्य वाटेनासे झाळें. त्यांतूनहि ती मंडळी दुधाच्या हंड्यांत मिठाचा खडा
टाकून आपल्या वेयक्तिक हट्टासाठीं राष्ट्राचा कार्यना्य करण्याला मिणारी
नव्हती. किंबहुना तसे त्यांचे प्रयत्न सुरूच होते. परंतु आणखी एका विचित्र
योगायोगामुळें आपोआपच त्यांच्या कृष्णकारस्थानाच्या चालत्या गाड्याला.
खीळ पडली. त्या विचित्र योगायोगाचें स्पष्टीकरण पुढें होणार आहेच.
शरकरण १० वें
दोन अभागिनी
मनातली राणी त्या बरखेवाल्या व्यक्तीला पाहन एकदम दचकून 'भय-
चकित अन्तःकरणाने त्या कोठडीच्या एका कोपऱयांत अत्यंत सावधपणातें
उभी राहिली व तिनें खदिरांगाराप्रमाणें लाल झालेल्या दृष्टीनें समोर पहात
त्या व्यक्तीला कठोर प्रश्न केला, कोणतं? ”
ती बुरखेवाली व्यक्ति कांहीं न बोलतां स्तब्धपणें क्षणभर तशीच उभी
राहिली. तें पाहून जास्त संशय आल्यामुळेंच कीं काय त्या व्यक्तीवर झडप
घालण्याच्या हेतूलें मीनाक्षी राणीनें दोन पावलें पुढें सरून पूर्वीपेक्षांहि कठोर
स्वरांत पुन्हां विचारलें, “ कोण तूं ? बोलत कां नाहींस ? तुझी ही स्तन्घ-
ताच तुझ्या पापी अन्तःकरणांतील दुविचारांची साक्ष देत आहे. ”
ती बरखेवाली व्यक्ति न डगमगतां पवित्र्यावर उभी राहून निस्पृहपणे उद्-
गारली, “ अभागी राणी, ज्याला त्याला आपल्यासारखेंच सारें जग दिसतें
पण तं एवढें ध्यानीं ठेवलें पाहिजेस कीं ह्या त्रिचनापल्लीची एक राणी कपाळ-
करंटी निघाली, तिनें आपल्या बद्चालीर्ने आपल्या राज्याचा सत्यानाश
केला आणि विषयवासनेला बळी पडन हिंदुत्वविध्वंसक अविधाचीं पदलांछ्ने
या मातभमीच्या मस्तकीं उमटविलीं म्हणून या राज्यांतील प्रत्येक स्वा
तशीच स्वाभिमानशन्य आणि पशवत्तीची आहे असें तुला समजण्याचे कारण
नाहीं. ” त्या व्यक्तीला आणखीहि कांहीं बोलावयाचे होतें. परंतु संतापा-
तिरेकानें तिचा कंठ दाटून आल्यामुळें ती एकाएकीं स्तब्ध राहिली.
तारतम्यज्ञानानें मीनाक्षी राणीने ओळखलें कौं आपणासमोरील बुरखे-
वाली व्यक्ति स्त्री आहे. तेवढ्यानेंच अंमळ तिच्या मनाचा विरंगुळा झाला
आतां त्या बरखेवाल्या स्त्रीचे ते बोळ अत्यंत अपमानकारक होते हें तर खरेंच
व ते ऐकन सामान्य परिस्थितींत कोणालाहि चीडच आली असती. मग
प्रत्यक्ष मीनाक्षी राणीला चीड आली असल्यास नवल नाहीं. तरी पण
७9८ पेशवाईचे मन्बेतर
सत्याचे तेज आणि सामर्थ्य हें कधींहि असत्याच्या काळवंडलेल्या छायेखालीं
सांकळें जात तसतें. मीनाक्षी राणीतें त्या व्यक्तीच्या उदगारावरून एवढं
ओळखले कीं ती स्त्री असादी; आणि म्हणनच तिच्या उद्गाराचें राणीला
वेषम्य वाठावयाचें बाजूला राहुन उलट कौतुक वाटलें. एवढं मात्र खरे कीं
राणीचे अंतःकरण पशचात्तापाच्या प्रायश्चितानें पावन क्ाल्यामुळेंच विश्वां-
तील सत्य, शिव आणि संदर कोणतें हें ओळखण्याइतकी मागसकी तिच्या
ठायीं उत्पन्न झाली होती. ती गंभीर स्वरातें त्या स्त्रीला म्हणाली, “ बाई
तुम्ही कोणीहि असा. पण तुमचे आत्मविश्वासाचे बोळ एंकून माझ्या मनाला
अत्यंत संतोष बाटला कों अशी एक तरी पुण्यशील स्त्री माझ्या राज्यांत आहे
आणि तिच्या पुण्याईच्या बळादरच माझ्या पापांच्या परवडी नाहीशा होऊन
माझ्या देशाला आणि माझ्या धर्माला कांहीं बरे दिवस येण्याची आश्या आहे. ”
राणीच्या मनांतून त्या ब्रखेवाल्या स्त्रीशी पुढे बोलावयाचें होते. पण
एक धाव दोन तुकडे करावेत त्याप्रमाणे ती स्त्री मध्येंच वीज कडाडल्या-
प्रमाणें उद्गारली, “ तुझा देश आणि तुझा धर्म-अभागी राणी, आपलें
जीवनसर्वेस्व तृ त्या राक्षसी अविधाच्या पायीं अर्पण करून आपल्या राज्याला,
पावित्र्यापरी पावित्र्याला, लौोकिकापरी लौकिकाला, धर्मापरी धर्माला आणि
अब्रूपरी अब्रूला-सर्वेस्वाला गमावून बसली आहेस. तुझ्यासारख्या पापि-
णीला देवाधर्माचा उच्चार करण्याचा तरी काय अधिकार पोंचतो ? इतकेंच
काय पण तू जरी बाह्यात्कारी पश्चात्तापाचे बोळ बोलून दाखविलेस तरी
या क्षणीं तुझ्या अन्तःकरणांत आपल्या देशाचें व आपल्या धरमरचिं वाटोळे
करण्याचा घातकी विचार ठाणें देऊन बसला आहे याची मला पूर्ण जाणीव आहे. ”
“ त्याला इश्वर साक्ष आहे. ”
ईरवर कशाला? त्याला तुझे अन्तःकरण साक्ष आहे. विश्वासघातकी स्त्रिये,
आतांच कांहीं प्रहरांपूर्वी तू आपल्या राज्याच्या,-आपल्या धर्माच्या मानेला
नवा फांस लावला नाहींस काय ? यच ती स्त्री क्षणभर गप्प राहून
राणीच्या मुखाकडे पाहुं लागली. राणी त्यावर कांहीं बोलेना, तेव्हां लगेच ती
व्यक्ति पुन्हां म्हणाली, “ आतां बोलावयाला तुला लाज कां वाटते ? बोल,
थोड्या वेळापूर्वी तूंच मुरारराव घोरपड्यांना गोत्यांत आणून मराठ्यांच्या
ह्या प्रांतांतील स्वराज्यविषयक दीर्षोद्योगाचा फडशा करण्याच्या कामीं
दोन अभागिनी ७९
त्या नीच चंदासाहेबाला सामील झाली नाहींस काय? बोल-मला या क्षणीं
ह्या प्रश्नाचें उत्तर पाहिजे आहे. तं विचारशील कीं ह्या आगळकोबद्दल
भला जाब विचारणारी तं कोण ?-तर मी आतांच सांगून ठेवते, ज्या ज्या
ठिकाणीं मानवांनी निर्माण केलेले कायदे हे परमेश्वरी सत्याच्या शाश्वतीला
बाघ आणूं पाहतात आणि सृष्टीवर परोपरीच्या हिडीस पापांची परवड रचू लाग-
तात त्या त्या वेळीं सत्याचा जय करून मानव जातीला शक्य तों सुखांत लोट-
ण्यासाठीं-मानवी अत्याचारांना आळा घालण्यासाठीं स्वयंस्फूर्तीने पुढें येणें
हें प्रत्येक स्त्री-पुरुष नागरिकाचे पवित्र कर्तव्य असतें. तें कर्तव्य बजावण्या-
साठीं पुढें आलेली मी एक ह्या अभागी देशाची नम्बर सेविका आहे. तुला
कदाचित् वाटेल कीं चंदासाहेबाचा या चत्रिचनापल्लींत एवढा जंबरदस्त
दंरारा असतांना आणि हिंदूंना एक रेंसभरहि डोकें दर काढावयाला या
वेबंदशाहींत वाव नसतांना चंदासाहेबाच्या अधिकाराला लाथाडून इतक्या
निघड्या छातीनें मी पुढें कशी येतें ? मला शासनाचे भय कर्से वाटत नाहीं ?
तर त्याचें उत्तर मीं आधींच देऊन ठेवत्ये, अभागी स्त्रिये, एवढा चवदा चव-
कड्यांच्या राज्याचा धनी रावण पण तो सत्याला लाथाडून सत्तेच्या जोरावर
अनन्वित अत्याचार करूं लागला आणि प्रत्येक जीवाला त्याच्या अत्याचारा-
सुळें दे माय धरणी ठाय होऊन गेलें; त्यादेळीं त्याचा नाश करण्यासाठीं परमे-
शवरानें यःकश्चित् वानरांच्या बाहूंमध्येंही वज्जदेही वीराग्रणींचें सामथ्ये
उत्पन्न केलें, आणि श्रीरामांनी त्या सामर्थ्याच्या जोरावर सत्याच्या मार्गानें
त्या रावणाला धुळीला मिळवून देशाचें दास्य ल्याला नेलें. पुराणांतरीं
अक्षया मदांध राजांचा शोककारक दोवट झाल्याचीं ढळढळींत उदाहरणें अस-
तांना मला त्याच सत्याच्या मार्गानें जातांना भय कोणाचें ? ” बोलतां बोलतां
त्या वुरखेवाल्या स्त्रीने आपला बुरखा बाजूला सारून आपल्या कमरपट्ट्यांतील
जंबिया सरैकन् बाहेर काढीत राणीला विचारलें, “ पण त्या अवांतर गोष्टी
बोलण्याची ही वेळ नव्हे. मीं आतां विचारलें त्याचा मला या क्षणीं स्पष्ट
खुलासा पाहिजे आहे.
“ तुम्हाला कसला खुलासा पाहिजे आहे ? ” राणीनें त्या स्त्रीच्या चेहर््या-
कडे दिरखून पहात भयभीत चित्ताने विचारलें. ती एक सुमारें अठरा वर्षांची
गौरवर्ण व निताम्तसुंदर अश्ली युवति होती. तिच्या लावण्यानें राणीदेखील
८० ._ पेशवाईचे मन्वंतर
नट .»५०”१% “0 ४.“ '< "०-५ “१५% क्क 20 27%... “0१-१७ ८१.११ »/४ १6% 7 >” “९ २. ८१७ “७ नः ५.८१ /१४७/१५-४७ १00५८५ ११०४१४॥ दे
"२
क्षणभर स्तिमित ज्ञाली. मग तें लावण्य अन्य ठाय़ीं पुरुषी जगांत अत्यंत
प्रभावशाली ठरत असेल यांत नवल काय? त्या युवतीच्या ललाटाकडं
राणीनें सहज पण लक्षपूर्ण न्याहाळून पाहिलें तेव्हां तेथें कुंकुमतिळक झळकत
असलेला तिला स्पष्ट दिसून आला. तो पाहून राणी पुढें म्हणाली, “ मुली,
त हिंदू आहेस; मग तुला अज्ञा वेळीं ह्या धोक्याच्या जागीं येण्याची वासना
कां बरें झाली?
“ माझ्या देशाच्या आणि धर्माच्या कल्याणासाठी, त्याप्रमाणेच माझ्या
देशाच्या आणि धर्माच्या शात्रर्चे निर्दालन करण्यासाठीं पुढे पाऊल टाकतांना
मला साक्षात् कळिकाळाचेंहि भय वाटत नाहीं.
“ मली, तुला चंदासाहेबाच्या राक्षसी स्वभावाची कल्पना नाहीं म्हणून
तं निर्भयपणें असें बोलं शकतेस. पण प्रत्यक्ष माझें उदाहरण पहा ! स्वतःच्या
चारित्र्यावर विसंबन राहणारी व बड्धिबळाच्या पटावरील मोहऱ्यांप्रमार्णे
दूर देशच्या राजकारणी पुरुषांना खेळविण्याची ईर्षा बाळगणारी, ही या
त्रिचनापल्लीची अभागी मीनाक्षी राणी त्या चांडाळाच्या मोहपाशयांत सांप-
डत फंसून कशी बापुडवाणी बनली आहे पहा! ”
ती यवति इतक्या वेळांत मीनाक्षीराणीच्या सौजन्यपूर्णे वर्तेनानें जरा
समाधान पावन किचित् बहुमानपूर्वेक उद्गारली, “ पण राणीसाहेब, मीं
मधघाशींच आपल्याला सांगितलें ना; कीं ह्या देशांतील सर्वेच स्त्रिया राणी
मीनाक्षीसारख्या दुबळ्या अन्तःकरणाच्या नाहींत. कदाचित् असाहि योगा-
योग असेल कीं आपल्यासारख्या भल्या साध्वीला ज्या चंदासाहेबार्ते विश्वास-
घातानें फंसवून स्वतःचा डाव साधला, त्याला त्याच्या पापार्चे प्रायश्चित्त
देण्यासाठींच परमेदवरानें मला जन्माला घातलें नसेल कशाकरून ? ”
“< तसें असेल तर मी म्हणेन कीं जगामध्ये अजून परमेश्वर आहे, व
सुष्टांचें पालन आणि दृष्टांचें निर्दालन करून सृष्टीर्चे यथान्याय नियंत्रण
करण्याचें सामर्थ्यं अजून त्याच्या अंगीं आहे.
त्या तरुणीचें अंतःकरण राणीच्या ह्या उद्गारांमुळे आणखी द्रवलें. तिनें
आपला जंबियाचा हात किचित् मार्गे घेतला. तिचा संतापहि थोडा ओसरला
आणि कंठ सहानुभूतीच्या गद्गद् भावनेने दाटून आला. त्यामुळे ती अम्मळ
घोगऱ्या स्वरानें राणीला म्हणाली, “ राणीसाहेब, मी ज्या कठोर निश्चयानें
"दोन अभागिनी ८१
४५.४१... /€% /00.//
"१५-५४. %७./४४./४४../ ४५/४४/१५४७. “४.” ११.४
१-१ ४१%, १ ४७, ५१७./०७ 0७ “0७.४ २.४७ ४0 ४७५ ९९.०४. “१९४७ ४१%, ४१४७७७७९९७. ४०७९५४ “४0.४७ ७४ ४७/७९ ४0८ ३.
या ठिकाणीं आलें तो माझा निश्चय प्रत्यक्ष तुम्हांला पाहुन आणि तुमचे
कळकळीचे बोल ऐकून बराच पालटला आहे. पण ईश्वर करितो तें बर््या-
साठींच असा माझा त्याचे ठायीं पूर्ण भरंवसा असल्यामुळें या निश्चयाच्या
पालटण्यामध्येंहि कांहीं मंगळ अशी घटना निर्माण करण्याचें त्या परमेश्वराचे
मनांत असेल असेंच आपण घरून चालूं. आतां आपण मला पूर्वीइतक्या
परकी वाटत नाहीं. त्याअर्थी मला माझी ओळख देण्याला कांहींच हरकत
नाहीं. एका दृष्टीने आपण आणि मी सारख्याच अभागी आहोंत. ”
इतक्यांत रामस्वामी घाईघाईने दरवाजा उघडून आंत डोकावून म्हणाला,
“ बाईसाहेब, किती वेळ हा ! पहांटेची वेळ होत आली. तुरुंगावरील
पाहरा बदलण्याची वेळ झाली. आपण कोणाला न कळत इकडे आलला
आहांत हें विसरतां कामा नये! न जागो आधींच आपले ग्रह सध्यां वाईटा
आहेत; आपण इकडे आल्याची व मीं, आपणाला या कोठडीचा दरवाज
मोकळा करून दिल्याची नुसती चाहूल कोणाला लागली तरी राईचा पवेत
होऊन अनर्थ व्हावयाचा !' लोकर आटोपा- ”
“ खरेंच; बोलण्याच्या भरांत वेळ केव्हां निघून गेला हेंच मला समजलें
बाही. आणि मी मुख्यतः ज्या कामासाठीं आलें तें काम तर तसेंच राहून
गेलें आहे. राणीसाहेब, आतां आपण मुकाट्याने याच पावलीं माझ्या मागो-
माग चला. शत्रूच्या दृष्टीआड झाल्यावर आपणाला मनमुराद बोलतां येईल.”
“ पृण आपणाला आतां कोठे जावयाचे? ”
“ परमेश्वर रस्ता दाखवील तिकडे जावयाचें. सदिच्छा आपल्या अन्तः-
करणांत आहे, परशचात्तापाची नवी पुण्याई आपण जोडली आहे आणि सत्या-
चरण हा आपला मार्गदर्शक आहे; यापेक्षां आपणाला आणखी कोणाचें साहाय्य
पाहिजे ?; आपण मुकाट्याने माझे मागोमाग चला. ”
प्रकरण १९ वें
बंधमुक्त
स्य क्तप्याता कन
"्हू| णी तें ऐकून क्षणभर स्तब्ध राहिली. तिला त्या तरुणीच्या मनांतल्या
योजनेची कांहींच कल्पना करतां येईना. उलट ही बातमी जर चंदासाहेबाला
कळली तर तो आणखी काय काय अनर्थ घडवून आणील या भीतीच्या दडपणा-
खालीं त्या बिचारीच्या अंतःकरणाचा अगदीं चक्काचूर होत होता. त्या
तरुणीच्या सद्भावनेविषयीं तिळा जरी यत्किचित शंका नव्हती, तरी ती.
तरुणी केव्हां कशी फंसेल याविषयीं तिला भरंवसा वाटत नव्हता. त्या
तरुणीनें राणीच्या अंतःकरणांतील हो कालवाकालव अंदाजाने ओळखली
थाणि म्हटलें, “ राणीसाहेब, आपण कृपा करून एवढेंच करा; माझ्यावर
आणि परमेद्वरावर पूर्ण भडीभार घालून ह्या पावलीं माझ्याबरोबर बाहेर
चला. आपल्या मातृभूमीवर व आपल्या धर्मावर कोसळणारें संकट कसें
टाळावें या विषयींची उपाययोजना मीं माझ्या मनाशीं या पूर्वीच ठरविली
आहे. मात्र तिची सुलभ रीतीनें अम्मलबजावणी होण्यासाठीं मला आपल्या
साहाय्याची अत्यंत आवशयकता आहे. ”
आपण इतकी कानींकपाळीं ओरड्न समजत घातली तरीहि राणीसाहेब
बाहेर पडावयाला धजत नाहींत असें पाहून मात्र ती तरुणी संतापली आणि
त्या मरांत आपला जंबिया राणीवर रोखून कळवळ्यानें उद्गारली, ” राणी-
साहेब, अजूनहि माझ्या शब्दावर तुमचा विश्वास बसत नाहीं, तर मग आपण
भाझ्या शत्रू आहांत असें मानून मला माझ्या ध्येयाच्या मार्गाने जातांना प्रथम
हा आपला कांटा वाटेतून दूर करावा लागेल! ”
राणी सोम्यपणानें म्हणाली, “ मुली, तुझ्या इतर्के अलौकिक धेय माझ्या
अंगीं नसलें तरी तूं ज्याला भितेस तसला अप्रामाणिकपणा मात्र माझ्या अंगीं
मुळींच नाहीं. भो त्या; नरपशूला-ज्यानें माझ्या सर्वस्वाचें वाटोळे करून:
मला धुळीला मिळवले त्या' चांडाळाला अजूनहि वश्य असेल असें तुला वाटतें
काय ? तर लक्षांत ठेव, ही राणी अधोगतीच्या गर्तेत कितीही खोल गाडली
बंधमक््त ८२
येळी असली तरी ती हाडामांसानें हिंदू आहे. तिच्या नसानसांतून अद्यापिहि
बहिदुधर्माचा अभिमान सळसळत आहे. प्रतिकूल परिस्थितीमुळें मी फंसून
दुबळी झाल्यें असल्यानें स्वाभिमानाचे बोळ बोलणार्या माझ्या वाणीमध्यें
सामर्थ्य उरलें नसळें तरी माझी इच्छादक्ति कांहीं अजून मेलेली नाहीं.
इतकेंच काय पण आजवरच्या कट् अनुभवाने त्या इच्छाशक्तीच्या-त्या स्वाभि-
मानाच्या-त्या धर्माभिमानाच्या तरवारींना नवें पोलादी पःणी मिळालें आहे.
ईरवराची कृपा होऊन मी यावेळीं मोकळी असतें तर अळौकिक गोष्टी करून
मीं माझ्या पापाचे परिमाजेन केलें असतें, आणि माझ्या मायदेश्याचे पांग
'फेडले असते. पण आज परमेश्वर माझ्यावर कोपला आहे. मुठींत सोनें
घरले तरी त्याची माती होईळ इतकें माझें दुर्देव आज बलवत्तर झालें आहे.
ने जाणो, कदाचित् सी तुझ्याबरोबर आलें तर माझ्या पापाग्दीची झळ तुला
रछागून तुझ्याहि घ्येयसाधनांचा सत्यनाश होईल, म्हणून म्हणतें, मुली, तुझ्या
धर्मासाठी, तुझ्या देशासाठी आणि इच्छा असेल तर या अभागी राणीसाठीं
छे जे काय करावयादें असेल तें तें तू खुशाल कर. तुला माझा पूर्ण आशीर्वाद
आहे. मी शरीरानें नाहीं तरी मनानें तुझी पाठीराखीण, तुझ्या पाठीमरगें
उभी आहे. ” राणीच्याने पुढे बोलवेना. तिचा कंठ दाटून आला आणि
डोळ्यांत आंसवे उभीं राहिलीं. शोकाचा कड तिला आवरेनासा झाला.
'ती पदरानें तोंड झांकून घेऊन एका कोपऱ्यांत डोकें खुपसून स्फुंदून रड लागली.
'ती तरुणी तो प्रकार पाहून भगदीं किकतेव्यमूढ होऊन गेली. तिच्याच्यानेंहि
कांहीं बोलवेना.
इतक्यांत रामस्वासीनें पुन्हा एकवार किलकिल्या दरवाजांतून आंत डोका-
चून पहातां पहातां भीतिदायक कांपर्या स्वराने विचारलें, “ बाईसाहेब,
आपली इच्छा तरी काय आहे? आपल्या आणि माझ्या मानेला आपण एक-
दमच तांत लावणार आहांत काय ? हे पहा पहारेकरी बदलले देखील. आतां
इतक्यांत केद्यांची तपासणी सुरू होईल आणि जर का हा प्रकार उघडकीला
आला तर आपणां तिघांचाही सत्यनाश ज्ञाला असें समजा. मनुष्याची
इच्छा नुसती पवित्र आणि बलवत्तर असून यशाची जोड मिळवितां येत नाहीं;
त्याला तारतम्य आणि प्रसंगावधान यांची जोड अवश्य पाहिजे असते. सारा-
सार विचार न करतां दिव्यावर उडी घालणार्या पतंगाप्रमाणें आपण उज्वल
८9 पेशवाईचें मन्वंतर
१३.2 /€./”१७. १७ / 00९ » ४. “00७. ४09 . 0: .»०१ ५ /५ ,४% .७७ ३ - ५९. 000 “0 पी. च जि “*%”/१% ४७ ८0५ /% *४..४४% /00 १ “0७ /%, ७ »रर १ /४- ८५ “७ ८१५, १ /०१६, 7 >”. “१.७ /"
स्वाभिमानाच्या कथानिरुपणांत हा कसला अविचार मांडला आहे? प्रथम
बाहेर पडा, मी दाखवितों त्या गुप्त मार्गानें निर्भय स्थळीं चला आणि मग
काय करावयाचें तें करा किवा बोलावयाचें तें बोला. ”
रामस्वामीचे ते कळवळ्याचे बोल मात्रेच्या वळशाममाणें लागू पडले.
आपला हा पुरातनचा सेवक चंदासाहेबाला फितूर झाल्यामुळेच तर एथे
अशी लाजिरवाणी नोकरी करीत नसेल ना; असा तिला जो पुसट पुसट संशय'
होता तोदेखील आतां निःशेष झाला. त्या तरुणीचा रामस्वामीच्या ठायी
पूर्ण विश्वास होता हें तर सांगावयालाच नको. एरव्हीं तिला त्यानें अया
अपरात्री, आज तीन वर्षांत ज्या मीनाक्षी राणीला बाहेरील निर्जीव जगाचे
ओझरतें दर्शन घेण्याळाही चंदासाहेबानें पुर्ण प्रतिबंध केला होता त्याच राज-
बंदी राणीची भेंट त्या तरुणीला कशी घेऊं दिली असती ! आणि त्या तरु-
णीला तरी आपला जीव थोडाच भारी झाला होता! ती रामस्वामीवर प्णे
विश्वास असल्याशिवाय अज्या वेळीं त्या बंदिशाळेंत येणाऱ्या निमित्ताने
काळाच्या जबड्यांत चाठून जाईल !
तरीही मीनाक्षी राणीनें पुन्हां एकवार मनाची खात्री करून घेण्यासाठीं
रामस्वामीला विचारलें, “ रामस्वामी, तूं अजूनही पुर्वीप्रमाणेंच माझा
विश्वासू सेवक आहेस काय? ”
रामस्वामी गंभीर स्वरानें उद्गारला, “ राणीसाहेब, पापाची पुटे माण-
साच्या मनावर बसलीं कीं त्याच्या मनींमानसीं विश्वासाची दुनिया नाहींशी
होते. स्वामिभक्तीची दिव्य ज्योत ह्या रामस्वामीच्या अंतःकरणांत जर
अहनिश तेवत नसती तर अद्या लाजिरवाण्या परिस्थितींतून तरणोपायाचा
मार्गे शोधून काढण्यासाठी अविधांचें दास्य पत्करण्याची त्याला कांहींच गरज
नव्ह्ती. यावरून आपण काय तें समजा आणि बाईसाहेबांच्या शब्दावर
विश्वासून मुकाट्याने अगोदर पाय बाहेर काढा.”
“ एकूण ह्या तरुणीवर देखील तुझा पुर्ण विश्वास आहे म्हणावयाचा ! ”
राणीनें पुन्हां विचारलें. रामस्वामीनें तोंडानें त्या प्रश्नाचें उत्तर मुळींच
दिलें नाहीं; तरीही त्याच्या चर्येवरील समाधानवृत्तींत राणीला काय उत्तर
मिळावयारचें तें मिळालें. आपणाला जिचें नांवगांवसुद्धा माहीत नाहीं अद्या
एका अज्ञात स्त्रीबरोबर आपण निघून जाण्याचें धाडस केलें तर तें आपणाला
बंधमक््त टप
0२.५१.” ७४
'१.५४%०४४४.०/ ५,०७९...
दी डी डी
'नव्या संकटाच्या गर्तेत लोटावयाला कारण होईल कीं काय, या भयानें ती हा
वेळपर्यंत आढेवेढे घेत होती. पण आतां तिनें मनाचा निर्धार केला व त्या
तरुणीला आणि रामस्वामीला म्हटलें, “ इतकें ज्याअर्थी तुम्ही दोघेही आग्र-
हाचे सागत आहां, त्याअर्थी तुमच्या शब्दावर मला विश्वास ठेवलाच पाहिजे,
'न जाणो, परमेश्वराच्या मनांतून मला पुन्हां साह्याचा हात द्यावयाचा असेल
स्तो तुम्हां दोघांच्या मुखीं उभा राहुन मला तारण्यासाठीं पुढें आला असेल!
त्याचा अव्हेर मीं तरी कां करूं! चला, ही मी तुमच्याबरोबर निघाले. ”
असें म्हणून राणी मनांतून परमेश्वराची करुणा भाकून त्याच पावलीं त्या
सर्णीसह कोठडीच्या बाहेर पडली
“चला, माझ्या मागोमाग या. ” असंम्हणून रामस्वामी पुढें चाल लागला.
ती पुढें व त्या दोघी त्याच्या मागाहून चालत असतां रामस्वामीनें मधन
मधून माग वळून पहाण्याचा क्रम सुरूच ठेवला होता
राणी मीनाक्षी आणि ती तरुणी यांता आतां जास्त बोलण्याला अवसरच
नव्हता. कारण काळ त्यांच्यापुढे जबडा पसरून उभा होता. राणी निमट-
पण त्या तरुणीला म्हणाली, “ चल बाहेर. ” पुन्हां ती क्षणभर गोंघळल्या-
सारखी होऊन म्हणाली, “ पण भी आगींतून उठून फोफाट्यांत पडलें अशी
'तर माझी अवस्था तुझ्या संगतींत होणार नाहीं ना? ”
“राणीसाहेब,पिशाच्चाला नेहमीं रामनामाचे भय वाटणें स्वाभाविक आहे.
पण आपल्या मनाची ही चळबिचल आपल्या चित्ताच्या परिवर्तनाची साक्ष
देत आहे. समजा, मीं विदवासघात केला तरी आपला आजवर झाला आहे
यापेक्षां आणखी सत्यानाश काय होणार आहे? आपण माझ्यावर विश्वास
ठेवा आणि मनाशीं असा तिर्धार करा कीं आजवरची ती. परोपरीचीं पापें
पुजणारी मीनाक्षी राणी नामदेष झाली, आणि ही मीनाक्षी राणी नवा जन्म
घेऊन, प्रभु श्रीरंगाला साक्षी ठेवून नवा अवतार घेऊं पहात आहे. ”
यापेक्षां आणखी कांहींहि संभाषण करण्याच्या भराला न पडतां त्या
दोघी दरवाजाच्या बाहेर पडल्या. राणीच्या मनांतून त्या तरुणीर्चे नांव
तरी विचारून घ्यावयाचे होतें. परंतु अशा घाईच्या वेळीं तें विचारणें तिला
अनुचित वाटलें. मात्र दरवाजाबाहेर येतांच तिने रामस्वामीला विचारलें
रामस्वामि आतां तूं आम्हांला कोणत्या मार्गानें बाहेर काढून देणार ?”
८६ पेशवाईचे मन्वंतर
रामस्वामी त्या प्रश्नाचा अर्थ ओळखून चुकला. आपण योग्य रस्त्याने
राणीला पाठवून देतों किवा नाहीं याविषयीं शंकित होऊनच राणीने हा
प्रश्व विचारला असावा हें ओळखून तो म्ह्णाला, “ आईसाहेब, आपणाला
आपल्या राजवटींतळा एकूण एक गुप्त मार्ग माहीत आहे हें मी जाणतों. परंतु
त्या ग॒प्त मार्गापैकीं कोणता मार्ग आजच्या परिस्थितींत आपल्याला सुखकर
आहे हें अजमावण्यासाठीं आपण माझ्या शब्दावर विसंबून राहिलें पाहिजे.”
राणी किचित् खोंचक स्वरांत उद्गारली, “ सारी सृष्टि माझ्याविरुद्ध
फिरली असतां आणि माजे सारे नोकर खाल्ल्याघरचे वांसे मोजणारे निमक-
हराम निपजले असतां रामस्वामी, तृंच तेवढा एकटा प्रामाणिक कसा राहिला
यारचें मळा आश्चर्य वाटतें. आजवर पूर्वीच्या नोकर चाकरांवर विद्वासून
मी' अनेक वेळां फंसले आहें. त्याच आपत्तीची पुनरावृत्ति इथे होणार नाहीं
ना?”
ती तरुणी मध्येंच म्हणाली, “ राणीसाहेब, त्रिचनापल्लीच्या राणीने
दानत्त सोडून सं्वेस्वाचें वाटोळे करण्याचा प्रसंग आणला असतांही आज त्रिचना-
पल्लीच्या राज्यांतील प्रजेमध्यें स्वाभिमान, स्वदेशाभिमान व स्वधर्माभिमान
जीव धरून आहे, तो केवळ रामस्वामीसारख्या निमकहलाल नोकराच्या'
पुण्याईवरच होय.” ती तशीच रामस्वामीकडे वळून म्हणाली, “ चला लवकर
आम्हांला मार्गाला लावून द्या. ”
“ वला. ” असें म्हणून रामस्वामी घाईघाईलें कोठडीचा दरवाजा लावून
त्या दोघींसह डाव्या बाजूच्या वाटेनें चालू लागला. वास्तविक त्याला
उजव्या बाजूच्या वाटेने. जावयाचें होतें. परंतु त्या बाजूनें तुरुंगावरील'
बदललेले पहारेकरी तपासणीकरतां जवळ जवळ येत असल्यामुळें त्याला
विरुद्ध दिशेने जाणें भाग पडलें,
“ तृ मळा आतां कोणत्या वाटेनें नेणार ? ” राणीनें पुन्हा विचारलें.
रामस्वामी उत्तरला, “ येथून जवळच पलीकडच्या भितींतून भूयाराचा
एक मार्ग थेट किल्ल्याच्या तटाबाहेर जाऊन पोंचतो. तो भापणाला माहीत
आहे ना? ”
“ दोय. ” राणी उत्तरली
बँंधमक््त ८७
“ त्याच मार्गानें भापल्याला आतां जावयाचें आहे. ” रामस्वामी म्हणाला.
“ पण पुढें काय ?” राणीनें प्रश्च केला.
“ पुढची काळजी या क्षणीं काय म्हणून करतां? परमेश्वर आपला
- साहयकर्ता. आहे. भगवंताच्या कृपेनें आपोआप आम्हांला पुढचा मार्गे दिसून
येईल. ” तो तरुणी म्हणाली. आणखी थोड्या वेळानें रामस्वामी पुढें आणि
त्या दोघी मार्गे अश्लीं तीं तिघेंहि त्या विवक्षित भुप्राराच्या तोंडापाशीं येऊत
पोंचलीं तोंच तेथें मूतिमंत अरिष्ट उभें असलेलें त्यांना दिसून आलें. राणीच्या
अमदानींतला एक जुना पहारेकरी त्या भुयाराच्या तोंडाशीं खडा पहारा
करीत होता. त्यानें ती मंडळी तेथें आलेली पहातांच व विशेषतः: रामस्वामी
त्यांच्याबरोबर आहे हें पाहुन खंवचटपणाच्या वृत्तीने चेहरा अंमळ गोरामोरा
केला. रामस्वामीनें अंदाजाने ओळखले कीं हा पहारेकरी बखेडा करण्या-
साठीं येथें उभा आहे. तो निर्भयपणे त्या पहारेकऱ्याला दरडावून म्हणाला,
“ हरिसिंग, मार्गातून बाजूला हो. ”
“ सी वरिष्टांच्या हुकुमाचा ताबेदार आहें. मला बाजूला होतां येत नाहो. ”
इरिसिंग उत्तरला.
राणीनें त्याला ओळखले, आणि अधिकारयुक्त वाणीने त्याला आज्ञा
केली, “ हरिसिंग, मी ह्या व्रिचनापल्लींची राणी, तुझी धनीण तुला आज्ञा
करतें, तू बाजूला हो आणि आम्हांला मार्ग मोकळा करून दे. ”
“ राणीसाहेब, मला क्षमा करा. ” हरिसिंग दोन्ही हात जोडन म्हणाला,
“ जोंवर आपली सत्ता या राजवटींत चालू होती तोंवर मीं इमानेइतबारे
आपली सेवा केली. परंतु आतां तो मनू पालटला आहे. आतां मी आपल्या
हुकुमाचा ताबेदार नाहीं, आणि आपणहि येथील रागीसाहेब नाहीं. ”
रामस्वामीला हरिसिगाचे ते बेपर्वाईचे बोळ ऐकून इतकी चिड आली काँ,
त्याचक्षणी त्यानें आपल्या कमरेची कट्यार उपसून ती ह्रिसिंगाच्या छातींत
खुपसून म्हटलें, “ निमकहराम, दगलबाज, खाल्लेल्या घरचे वांसे मोजणार्या
तुळा हीच शिक्षा योग्य आहे. ”
त्या वारासरसा हरिसिंग प्राणांतिक वेदनांनी ओरडत जमिनीवर पडला.
तरीहि पडत पडत त्यानें आपल्या कमरपट्टयांतील कट्यार काढून रामस्वासी-
बर वार करण्याला कमी केलें नाहीं. रामस्वामीला सुदैवाने तो वार ओझर-
ट्ट पेशवाद्ेचे मन्वंतर
४५० ७-७४0 ७९०१०१००१७...
१५८४. ६.५०.” ९. ७,५७१... ५५४0४३. ४ ७७८७५७७ ७.१७ .४ 0८० ७७१७८० १७४९७७७... २. ७.७७ ३, ७७७. ७७३. 4९१९..७०११. /९९ 0 १.७
90१./००५/७१७१५. ४५७५७०७०७५ ४०६ ण. ४ ली री
ताच लागला. त्याला जखम झाली, पण हरिसिगाप्रमाणे जमिनीवर लोळण
घेण्याचा प्रसंग परमेश्वरानें त्याजवर आणला नाहीं. त्यानें सभोंवार पहात
हरिसिगाचा अर्धमेला मुडदा दोन्ही हातांनी ऊचळून दूर फेकून दिला व
त्याच्या कमरेच्या किल्ल्या जवळच पडल्या होत्या त्या घेऊन भुयाराचा दर-
वाजा मोकळा करून तो राणी आणि ती तरुणी या दोघींना म्हणाला, “ अगोदर
आंत चला. ” हरिसिंगाच्या ओरडाओरडीनें आजबाजचे पहारेकरी सावघ
होऊन त्या जागीं येऊं लागलेले पाहतांच राणी व ती तरुणी या दोघींचेंहि
चित्त बावरलें. रामस्वामी मनांतुत भ्याला कीं आतां आपली घडगत नाहीं-
परंतु त्या भीतीचा लवलेशहि आपल्या चर्येवर न दाखवितां त्यातें त्या दोघींना
देंडाला धरून बळेंच त्या भुयारांत लोटले व आपल्या हातांतील पलिता त्या
तरुणीच्या हातीं देऊन सांगितलें, “ प्रथम भूयाराचा दरवाजा आंतून बंद करून
घ्या आणि मग मार्गाला लागा. राणीसाहेबांच्या हा भार्ग चांगला पर्रि-
चयाचा आहे. आपण एकवार किल्ल्याच्या तटाबाहेर पडलां कीं आपले साह्य-
कारी तेथें हजर आहेत. आपण कांहीं काळजी करूं नका. ”
“ पण तुझी वाट काय ? ” राणीनें भयचकीत स्वरांत विचारलें.
“ माझी वाट परमेश्वर दाखवील ती. ”
“ पण तूं आमच्याबरोबर कां येत नाहींस? ”
“मी भलों असतों. परंतु संकटाचा लोंढा आपणांवर जोराने चालन
येण्याचा हा समय आहे. अश्या वेळीं मला येथेंच राहून तो लोंढा थोपवून
धरण्याची पराकाष्टा केली पाहिजे. ”
इतक्यांत पांचसहा लोक तेथें येऊन पोंचले. तोंच त्या दोघी भुयाराच्या
दरवाजाच्या आंत गेल्या व दरवाजा आंतून बंद झाला. रामस्वामीर्ने'
घाईघाईने भूयाराचे प्रवेशद्वार बाहेरून बंद करून घेतलें आणि सभोंवारचे
रोक हा काय प्रकार आहे अशी आइचर्यपूर्वक भावनेने चौकशी करीत भसतर्व'
त्यानें प्रथम अर्ध मेल्या हरिसिगापाशीं जाऊन त्याचें नरडें कापलें. सर्वे लोक
क्षणभर स्तंभित होऊन तो भयंकर देखावा पहात उभे राहिले.
प्रकरण १२ वे:
रामस्वामीचें चातुयं
आडत,
| तत्याभीने इतकी खबरदारी घेतली तरी त्या प्रकाराचा गवगवा व्हाव-
याचा तो झालाच. मात्र सुदेवानें तीं पांचसहा माणसें तेथें येईतो काय
प्रकार घडला हें एकट्या रामस्वामीशिवाय दुसऱ्या कोणालाहि माहीत
नव्ह्ते. कदाचित् हरिसिगार्ने त्या गौप्याचा परिस्फोट केला असता या
भयानेंच रामस्वामीतें प्रसंगावधान राखून त्याला या जगांतून नाहींसा केला
होता. अर्थात् आतां रामस्वामी सांगेल तोच खरा प्रकार होता. रामस्वामी
हा मीनाक्षी राणीच्याच नव्हे तर तिच्या पित्याच्याहि अमदानीपासूनचा
अत्यंत स्वामितनिष्ठ असा राजसेवक होता. आणि खुद्द त्याच्यारिवाय व
"फार तर दसऱ्या परमेदश्वराशिवाय कोणालाहि माहिती नाहीं अर्से एक रहस्य
रामस्वामीच्या जीवनाशीं निगडीत झालें होतें. तें रहस्य हेंच कों रामस्वामी
इतक्या सायासानें चंदासाहेबाच्या अस्मानी सुलतानींत नाक मुठींत धरून
राजवाड्यांतील सेवेकरी होऊन राहिला होता, तो आपल्या स्वामिनीचें
अंदतः तरी क्ण फेडण्यासाठी अनुकूल परिस्थितीची वाट पहाण्यासाठींच होय
त्या सहा पहारेकर्यांपैकीं प्रत्येकाने रामस्वामीला तेथल्या एकंदर प्रकारा-
विषयीं नाना तर्हेचे प्रन विचारून अगदीं भंडावून सोडलें. पण रामस्वामी
अश्या सर्वांना पुरून उरणारा होता. त्यानें त्या सवे घडामोडींच्या अपेशाचें खापर
'हरिसिंगाच्या माथी फोडून दांत ओंठ खात सर्वांना सांगितलें, “त्या बदमाषा-
नेंच ही दगलबाजी केली आहे. मला त्याचा पुरा सुगाला लागला नाहीं हें
खरें, परंतु मी रात्रीपासून पहातों आहें, याच्या चोरट्या घडामोडी एक-
-सारख्या चाल होत्या. आज बरेच दिवस मला संशय आहे कीं हा चोर बंदि-
वान् राणीचा साथीदार आहे, पण तो खाशा स्वारीचा अत्यंत विश्वासू सेवक
श्पडला; त्याच्या विरुद्ध मीं कोणत्या तोंडाने ब्र काढावा ?”
इतकें झालें तरी भुयारांत कोण मंडळी गेली हा मुद्याचा प्रश्न तसाच
९० पेशवाईचे मन्वंतर
शिल्लक राहिला. कारण रामस्वामीनें त्या बाबतींत पर्णपर्णे कानावर हात
ठेवला. इतर पहारेकरीहि वो अज्ञात प्रकार पाहून कांहींसे गोंधळून गेले
राजवाड्यांत चंदासाहेबानें चालविलेले कठोर कारस्थान त्यांना माहीत
होतें. त्या कारस्थानाशीं संबंध असणारी कोणी तरी महत्त्वशाली व्यक्ति
तेथून पसार झालो असावी असा सर्वांचा तके झाला. परंतु त्याचा दोष
आपणां सर्वांच्या माथी येईल कीं काय या भयानें त्यांनीं आपसांत ती गोष्ट
छपवून टाकण्याचे ठरविलें. त्यांपैकी एकानें शक्कल काढली कीं आपण
चंदासाहेजाला हा प्रकार सांगून आपल्यावरील जबाबदारींतून मोकळें व्हावें.
परंतु अजून थोडीशी रात्र होतीच; व चंदासाहेबालाही मीनाक्षी राणीशीं
राजकारणाच्या वाटाघाटो करण्याच्या निमित्ताने अगोदरच जागरण घडलें
होतें. अश्या स्थितींत त्याची झोंपमोड करण्याचें धैय कोणाला कसें व्हावें!
रामस्वामीला ती सवे परिस्थिति फारच सोयीची वाटली. त्यानें आपली
स्वामिसेवातत्परता दाखविण्यासाठीं त्या योजनेला मनमोकळेपणाने मान्यता
दिली. कारण चंदासाहेबाळा तरी फार लौकर म्हणजे प्रातःकाळींच हा
प्रकार कळणार होता. त्याच्या नंतर चौकशी होऊन खऱ्या अनर्थाचा शोध
लागणार, तोंवर मीनाक्षी आणि ती तरुणी सुखरूपपणें आपल्या निर्भय मार्गाला
लागतील याविषयीं रामस्वामीला मुळींच शंका नव्हती.
आणि पुढील प्रकारही थेट रामस्वामीच्या कल्पनेप्रमाणेंच घडून आला,
चंदासाहेबानें प्रातःकालीं उठल्याबरोबर प्रथम मीनाक्षी राणीच्या सहीचा
खलिता घेऊन आपल्या तफच्या वकिलाला सुरारराव घोरपड्याकडे रवाना
केला. त्या मराठा रणमर्दाला कारस्थानाच्या जाळ्यांत अडकवण्याची
तरतूद झाल्यावर अवान्तर गोष्टींकडे लक्ष देण्याला चंदासाहेबाला फावले,
तेव्हां कोठे पहांटेंचा गलबला त्याच्या कानीं गेळा. आणि आईचर्याची
गोष्ट ही कों ती तक्रार करण्यांत रामस्वामी हाच प्रमुख होता ! रामस्वामीनें
'अश्या कांहीं विलक्षण आवेद्यानें बोल बोलून चंदासाहेबाला जादूगाराप्रमाणें
भारून टाकळे कों त्या भरांत हरिसिंगाचा आपल्या हातून खून झाला हें
सांगूनहि त्याबद्दल त्यानें चंदासाहेबाकडून शाबासकी मिळविली! पुढील
प्रसंग ओळखून कीं काय, रामस्वामीनें आपल्या निवेदनाला आगाऊच पुस्ती'
*नोडून ठेविली होती, “ मालीक, माझ्या हातून रात्रीच्या पहाऱ्यांत थोडी
00 0011 अ र
४१-४४ ५०% १. €४..५/४../* .“ ७५.४९ ./”२./७७ ४९.४१ ४०७ ४ /१४ /%/११./
रामस्वामीचें चातुर्य ९१
कसूर झालो आहे त्याबद्दल मला क्षमा करावी. पहांटेच्या प्रहरीं मीं माझा
पहारा सोडला व हरिसिंग त्या कामगिरीवर रुजू झाला, त्यावेळीं त्यानें ज्या
काय भानगडी केल्या असतील तिकडे माझें लक्ष नव्हतें. ”
“.त्या भानगडींबद्दल त्याला देहान्त प्रायश्चित्त अल्लानें दिलेंच आहे.
तूं त्याबहल कां फिकोर करतोस ? ” चंदासाहेबानें विचारलें.
“ तसें नव्हे मालिक, मीं एरव्हीं फिकीर केली नसती. परंतु मला आज
बरेच दिवस असा जबरदस्त संशय येंत होता कीं हरिसिंग हा बंदिवान् राणीचा
पक्षपाती असावा आणि त्या भुयाराच्या वाटेनें कोणती मंडळी त्यानें बाहेर
काढून दिली हें जरी सला माहीत नाहीं, तरी आतां मला जास्तच संशय येऊ.
लागला आहे कीं त्यानें राणीलाच बंधमुक्त करून बाहेर लावून दिलें कौं काय! ”
राणीचें नांव निघतांच चंदासाहेबाच्या डोक्यावरचे केंस ताठ उभे राहिले;
ठो आइचर्य आणि संताप यामुळें थरारणार्या वाणीनें उद्गारला, “ काय,
'राणी बंधमुक्त झाली ? . चळ अगोदर माझ्याबरोबर. मला त्या गोष्टीचा
तपास केलाच पाहिजे. ” असें म्हणून चंदासाहेब त्याच पावलीं बंदीशाळेकडे
निघाला. तो जाऊन भुयाराचा दरवाजा उघडून पहातो तों आंत राणी कोठें
आहे! अर्थात् राणी निसटून गेली हें तर ठरळेंच. रामस्वामीनें तो भुयाराचा
संशयित मार्गही चंदासाहेबाला दाखवून दिला. चंदासाहेबानें तेथें जाऊन
आपल्या नोकरामाफंत तो दरवाजा उघडण्याचा प्रयत्त केला, परंतु आंतून
कडी असल्यामुळें तो उघडला गेला नाहीं! अखेर कुऱ्हाडी आणून दो दरवाजा
फोडून काढावा लागला. परंतु आंत दहाबारा पायर्या उतरून गेल्याबरोबर
त्या लोकांना तेथें पाणीच पाणी असलेलें आढळून आलें. इतकेंच नव्हे, पण
भरतीच्या वेळीं समुद्राचा किनारा पाण्याच्या वाढत्या लाटाबरोबर झांकत
जावा त्याप्रमाणें त्या भुयाराची एकएक पायरी आंतील जलप्रवाहानें हळूहळू.
झांकली जात होती. त्यामुळें त्या लोकांचा अगदीं नाइलाज झाला. त्यामुळें
तेथें चंदासाहेवाची मति कुंठित झाली. तो रामस्वामीला म्हणाला, “हा मार्गे
तर जलमय दिसतो! असें कसें? ”
रामस्वामी गंभीर चर्या करून म्ह्णाला, “परमेश्वर जाणे ! मीं आजवर
हा मार्गे कधींच पाहिला नव्हता. ”
“ तरी पण तूं किल्ल्यांतला अत्यंत जुना नोकर आहेस. हृदया रस्त्याचा
२७ पेशवाईचें मन्वंतर
“११०८७९१७८१ ९७० १६८०९११००0...
५८८९०५७७०८... ४९९७. “0२. ४७८५७४ ४ “१० १०/१७/६१५७ ७८४०
मानाची जागाहि मिळेल. परंतु याद राखून ठेवा, राणीचा शोध जर लागला
नाहीं, तर मी तुम्हां सर्वांचा महादेवाच्या टेकडीवरून कडेलोट करण्याला
कभी करणार नाहीं. ”
यंदासाहेब आपल्या शब्दाला जागण्याइतका निर्दंय मनाचा होता हें सर्वांना
माहीत होतें. आणि म्हणूनच ते आपल्या जिविताची आशा सोडून सभय
चित्ताने राणीच्या शोधार्थ दहा दिशांना निघून गेळे. मात्र जातांना त्यांनीं
आपल्या मनाशीं खूणगांठ मारली कों, राणीचा शोध लागला तर पुन्हां ह्या
किल्ल्याला आमचे पाय लागतील, नाहींपेक्षां जिकडे पुढा तिकडे मुलूख थोडा.
हा त्यांचा एकएकट्याच्या मनाचा निर्धार झाला, परंतु त्यांचीं बायकापोरें
तेथेंच बिर््हाडांत अडकलीं होतीं, त्यामुळें परागंदा व्हावयाचें झालें तरी
बायकापोरांची काय वाट करावयाची हा प्रश्न ओघानेंच त्यांच्या समोर उभा
राहिला, व त्यांनीं थोड्याशा विचारांती आपसांत संगनमत करून, आपल्या
मागोमाग आपल्या बिऱ्हाडांचें चंबूगवाळें आटोपलें जाईल अशी तरतूद केली.
चंदासाहेब बंदिशाळेतून माघारा राजवाड्यांत जाऊन पोंचला व घड-
"लेला एकंदर प्रकार मोहनेला निवेदन करण्यासाठीं तडक तिच्या महालांत
गेला. परंतु मोहना त्याला तेथें आढळून आली नाहीं ! त्याबरोबर तर
त्याचें अंत:करण आदचर्याच्या धरणीकंपारने पुरें हादरून गेलें. तो स्वतःशी
दांत ओंठ खात उद्गारला, “ हिंदू-हिंदू ! ही हिदंची अवलाद पट्टीची
विश्वासघातकी निमकहराम आहे. मोहने, तूं अखेर मला फंसविलेस काय?”
इतक्यांत त्यालाच वाटलें कीं, न जाणो मोहना कोठें तरी आजूबाजूला राज-
वाड्यांत किवा उद्यानांत फिरत असेल; म्हणून त्यानें तिच्या महालांतील
दासींपाशीं चौकशी केली. तेव्हां तिच्या तैनातींत असणार्या एका दासीने
सांगितलें, “ बेगमसाहेबा प्रहरभर रात्रीला ज्या महालाबाहेर पडल्या त्या
पुन्हां महालांत म्हणून आल्या नाहींत. आम्ही त्यांचीच वाट पहात आहो. ”
तोंच दुसरी दासी पुढें येऊन म्हणाली, “ बेगमसाहेबा खाविदांच्या महालांत
गेल्याचे मळा माहीत होतें, म्हणून मीं त्यांचा फारसा तपास केला नाहीं. ”
चंंदासाहेबानें जास्त संशय घेऊन मोहूनेचा सार्या राजवाड्यांत कसून
-तपास केला. परंतु ती कांहीं त्याला सांपडली नाहीं. ती 'काफर' असल्या-
मुळेंच तिनें आपणाला दगा दिला, असें त्याच्या मनानें पक्के घेतलें व आतां
बिचारा रतनसिंग ९५९
१०९९००९९१७
कोणत्या रीतीनें शोध करून तिच्यावर सुड उगवू असें त्याला होऊन गेलें.
इतक्यांत त्याच्या हृदयाच्या जखमेवर मीठाचें पाणी शिपडण्यासाठींच कीं काय,
त्याचा एक विश्वासू हुजर्या यामीन घाईघाईनें घाबरट चर्या करून तेथें
आला व त्रिवार त्रिवार मुजरा करून रडक्या स्वरांत उद्गारला. “ मालिक,
आपण रात्री माझ्या हवालीं केलेल्या त्या दोन तलवारी कोठेच सांपडत नाहींत.”
“ हरामखोर ! ” चंदासाहेब चिडलेल्या वाघाप्रमाणें यामीनवर डरकणी
फोडून म्हणाला, “ बदमाष, तूंच शात्रूला सामील आहेस ! ” त्यानें एका
झडपेसरशी यासीनची मान पकडून त्याला गदगदा हलवीत विचारलें, “ बोल,
त्या तलवारी तृं कोणाच्या स्वाधीन केल्यास ? ”
यामीन बिचारा गर्भगळित होऊन गेला. त्याच्या तोंडांतून शब्दच उम-
टेना. चंदासाहेबाच्या संशयग्रस्त मनाला वाटलें कीं हा आपणापासून तल-
वारींचा प्रकार छपवून ठेवितो आहे. म्हणून त्यानें संतापातिशयाच्या भरांत
कमरेचा खंजीर उपसून तो यामीनच्या छातींत जोरानें मारून म्हटलें,
“ निमकह्राम, तृंच त्या तलवारी शत्रूच्या स्वाधीन केल्या असल्या पाहिजेस.
तुला हेंच शासन योग्य आहे. ”
यामीन खंजिराच्या वारासरसा गतप्राण होऊन धाडकन् खालीं पडला.
तो सारा दिवस चंदासाहेबाची अवस्थ) एखाद्या मार्थेफिरूप्रमागें झाली
होती. काय करूं आणि काय न करूं असें त्याला होऊन गेलें होते. कावीळ
झालेल्याला सारेंच पिवळें दिसतें. त्याप्रमाणेंच त्या एका घटनेमुळे त्याला
सर्देच हिंदूंचा जबरदस्त संशय येऊं लागला होता. तद्ांत, आतां लवकरच
राणी मीनाक्षी आपल्या हिंदू अनुयायांना गोळा करून, आपले गेलेलें राज्य
परत मिळविण्यासाठी कसोशीने सामना देणार आहे अश्याहि बातम्या वारंवार
कानीं येऊं लागल्या व वार्याच्या सोंसाट्यासरसा आगीचा झोत पसरत
जावा त्याप्रमाणे त्या बातम्यांनी सारें त्रिचनापल्लीनगर दुमदुमून गेलें. त्या
बातम्या अगदींच खोट्या होत्या असें नाहीं. काय असेल तें असो, परंतु चंदा-
साहेबाला त्या दिवशींच्या घटनेमुळे जितका संताप भाला होता, तितकाच
प्रसभतेचा सुधावर्षाव तेथल्या हिंदू रयतेच्या व -लहान मोठ्या सर
कारी हिंदू अधिकाऱ्यांच्या हृदयावर झालेला सर्वच आढळून येत होता.
चंदासाहेबानें आपल्या हाताखालील सर्वे विश्वासू मुसलमान अधिकाऱ्यांना
९६ पेशवाईचें मन्वंतर
सभोंवारच्या परिस्थितीचा बंदोबस्त व मोहना आणि मीनाक्षी सांचा शोध
हीं दोन कामें निक्षून सांगितलीं. ते अधिकारीही आपल्या कार्यांत चुकवा-
चुकव करणारे नव्हते. ते बहुतेक 'कलमी' अर्थात् बाटून मुसलमान झाळेले
होते एवढें सांगितलें म्हणजें त्याच बाटगेपणाच्या जोरावर त्यांला सरकार,
दरबारीं मान्यतेच्या नोकऱ्या मिळालेल्या असून त्याच मार्गानें बढती िळण्या
साठीं त्यांचा अट्टाहास सुरू होता हें नव्यानें सांगावयाळा नको. त्यांना प्रथम
वाटलें कीं आपलें नशीब काढण्याची ही खास पर्वणी आली, पर्टलु रो मत्यक्ष
कार्याला लागतांच त्यांना अनुभव मात्र विपरीत येऊं लागला. छते दिवस
चंदासाहेब व त्याचे अविध अधिकारी यांच्या ताटाखालील मांजरांप्रसाण दुबळे
होऊन बसलेले हिंदू लोक आज कसे न कळे,एकाएकीं घिटाईनें वागू ळाराळे. फार
काय, त्या मुसलमान अधिकाऱयांच्या हाताखालील दुय्यम लोकदेखी लक--अर्थात् ते
बरेचसे हिंदु होते-आपलें काम नेहेमीप्रमाणे झटून करण्याला तयारच छोेनात;
जणूकाय या रेंवटच्या चक्रापासून चंदासाहेबाचें राज्ययंत्र बिघडून बंद जडण्याच्या
पंथाला छागलें. सूर्योदयाच्या सुमाराला फक्त मोहना आणि मीन्राव्ली हवा
दोघीच गुन्हेगार होत्या, तीच संख्या सूर्य चार घटका वर येईतो सहज सक्षासांवर
गेली; आणि तरीहि चुगलखोर स्वार्थेसाधूंच्या आगलावेपणामुळे ली. राख्या
सारखी फुगतच होती. असें असूनहि आश्चर्याची गोष्ट ही को, सकुकारच्या
दृष्टीनें अपराधी ठरलेले फारच थोडे लोक त्या दिवशीं सरकारी अधिका
ऱ्यांच्या हातीं लागले.
चंदासाहेबाला कळून चुकले को, आपला बोज आतां पूर्ववत् कायम राहिल,
नाहीं. काफर अर्थात् हिंदू आपली आज्ञा उघड उघड पायांखालीं लुड्यू लागटे
हें पाहुन त्याला पराकाष्टेचा विषाद वाटला व तितकाच संतार्पाषडि आला
. “काय, ज्या चंदासाहेबानें या त्रिचनापल्लीच्या किल्ल्यांत पाऊल ठढाकल्या'
पासून आपल्या इच्छेसमोर साक्षात् अल्लालाहि वांकायला लास्वळे, पंच
महाभूतांचें एकवटलेलें सामर्थ्ये ज्या ह्या माझ्या वाणींत आजवर खांठवलेले
होतें, माझी नुसती नजर फिरल्याबरोबर जेथें सर्व लोक अत्यंत आलज्झाधारक
पणानें माझी जुलमाची आज्ञादेखील शिरसामान्य करावयाला खुषीोर्ले किव
सक्तीने तयार असत, त्याच मला आज येथें कोणीहि जुमानीत नाहीं ना!
बरेच दिवस या काफर हिंदूंच्या अंतःकरणांत माझ्याविषयीं ध्युमसगणार
बिचारा रतनसिंग ९७
'“.. ल0.क
रीओ कसिशबकय्क्कल्काककाक्कका १४-११" ९४४४४१४" ९१४४५४५१४९१५-४-४-//% ४० ४४-८५ ५५.५५ /५.८0 ५.८५ “००/५०/९५८५ ./१०.०५ ०५ ०५.० -.“<
व्व्वानल आज शांति सोडून पेट घेऊं पहात आहे. पण त्यांना म्हणावें, माझा
व्हा तानल एकदां भडकला म्हणजे तुमची सारी जात तुमच्या देवाधर्मांसह
रव्रेचिराख करून सोडील. ” हे त्याच्या मनांतले विचार झाळे; त्याच वेळीं
स्याएच्या कोपाची वीज प्रथम किल्ल्यांतल्या टेकडीवरील महादेवाच्या देवळा-
व्यार कडाडली. आपण काफरांना त्यांच्या सर्वस्वासह पायांखालीं कसें
सुड वूं शकतों याचा सर्वांना धडा शिकविण्यासाठी त्यानें आपल्या हाताखालील
स्टव्का सेनापतीला बोलावून आज्ञा केली, “रतनसिंग, आज सूर्यास्ताच्या आंत जर
"यकय्णी मीनाक्षी, मोहना आणि माझ्या राजवाड्यांतून चोरीला गेलेल्या त्या दोन
सतरत्वारी पुन्हां माझ्या हातीं आल्या नाहींत, तर सर्व हिदु रयतेला आज
ज्वाहीर करून ठेव कों उदईक सूर्योदयाच्या वेळीं ह्या अत्याचाराचा मोबदला
अ्छप्णून हिदूंच्या महादेवाच्या देवालयाचा विध्वंस करण्यांत येईल. ”
रतनसिंग चंदासाहेबाचा विश्वासू सेवक खरा, पण तो रक््तानें हिद्र होता.
आ्वन्हानें किंचित् दुबळा पडला म्हणून तेथल्या परक्यांच्या सेवेला चिकटून राहिला
त्वारी' इतका अमानुष जाच व इतकी अवहेलना सहन करण्याइतका तो नामर्द
न्वख्छता. तरी त्यानें मनांतला क्रोध मनांत दाबून चंदासाहेबाला विचारिले,
“<स्व्ाविद, पण आपला हिंदूवरच एवढा राग कां? तेच गुन्हेगार आहेत असें
उयपण कशावरून म्हणतां?”
““समजलों-समजलों, तूं देखील त्यांतलठाच काफर आहेस आणि तुझ्या
स्कंयांत अभिमानाचे वारे आतां संचारू लागलें आहे. यावेळीं मी गय केली तर
स्कल्त्ा ती डोईजड जाईल. ठिणगीचा हां हां म्हणतां वणवा पेटतो, म्हणून ठिण-
गवि प्रथम विझवून टाकिली पाहिजे. मला भळे बोल शिकविणाऱ्या नादान
म्हा फासा, थांब. उदईक सूर्योदयाच्या वेळीं महादेवाची विटंबना करतांना,
त्कुस्सर््च्या हिंदु-धर्मांत कोणत्याही सत्कार्याच्या प्रारंभीं देवाला सुपारी' ठेवण्याची
च्वााव्क आहे त्याप्रमाणें प्रथम महादेवाच्या टेकडीवरून तुझा कडेलोट केला
जाणपल, आणि मग इतर गोष्टी.” एवढें बोलून चंदासाहेब एखाद्या दुखवलेल्या
स्वपपासारखा फणफणत तेथून निघून गेला. रतनसिग मात्र किकतंव्यमूढ
सये स्कन किंचित् काल तेथेंच उभा होता. इतक्यांत अकस्मात चंदासाहेबाच्या
अ"रव्वी शिपायांनी पुढे येऊन त्याला गिरफदार केलें. रतनसिग आपल्या मनांत'
ऊोव्ठखून चुकला कीं, आपल्या आयुष्याचा कारभार आतां आटोपला.
च्प्ळे
प्रकरण १७ चें
९ बळ
सपे दुखावला गेला!
पलक तासात
संध्याने संशय वाढत गेला; चंदासाहेबातें त्याच रात्रीं मुरारराव घोर-
पड्यांकडे मीनाक्षी राणीच्या सहीचा खलिता रवाना केला होता, त्याचा तरी
दृष्ट उपयोग होतो किंवा नाहीं याविषयीं त्याला खात्री वाटेनाशी साली.
परंतु आपणाला तो प्रकार ओघानें कळणारच आहे. तोंवर राणी मीनाक्षी आणि
तिच्या बरोवरची ती कोण तरुणी, त्याप्रमाणेंच रामस्वामी यांची पुढें काय गत
झाली हें आपणांला प्रथम पाहिले पाहिजे.
तो भुयाराचा मार्ग मीनाक्षी राणीच्या चांगलाच परिचयाचा होता. तिचा
पति त्रिचनापल्लींत राज्य करीत असतां कांहीं घरगुती भांडणांतून उत्पन्न
झालेल्या महत्संकटामुळें त्या पतिपत्नींना त्याच गुप्त वाटेने आपल्या प्राण-
रक्षणासाठीं एकदां बाहेर जावें लागलें होतें. तो मार्ग बराच अवघड होता. भुया-
राच्या तोंडाने आंत गेल्यावर निरनिराळ्या बाजूनें आंत भुयाराला अनेक
फांटे फुटलेले असून त्यांतला कोणता फांटा कोठें जातो हें फक्त माहितगारा-
. शिवाय इतरांना कळणें शक्य नव्हतें. त्यांतले दोन फांटे तर थेट यमाच्या
दरबारीं पापिष्टाला नेऊन पोंचविणारे होते. एका वाटेच्या तोंडाशीं अत्यंत
खोल व निबिड अंधःकारानें व्यापिळेली अशी एक विहीर होती व त्या विहिरींत
कांटेकुटे, लोखंडी खिळे, मोडकों हत्यारें वगेरे प्राणघातक साहित्य भरपूर
टाकण्यांत आलें होतें. दुसर्या रस्त्याच्या तोंडाशीं एक खोलच खोल अंध:-
कारमय गुहा होती. अपरिचित मनुष्य त्या मार्गाने जातांच हटकून पाय चुकून
आंत पडावा अशीच घोटाळ्याची रचना तेथें करण्यांत आली होती. त्या
भुयाराच्या तळाशीं भयंकर लांबच लांब असे लोखंडी सुळके उभे ठेवण्यांत
आले असल्यामुळें, मनुष्य एकवार आंत पडला कीं तो जिवंत सांपडण्याची
आश्याच नसे. केक पिढ्यांपूर्वी त्रिचनापल्लीला कोणीएक व्यसनी व जुलमी
राजा होऊन गेला; त्यानें आपल्या गेरमर्जीतल्या लोकांना शासन करण्याचा
हा राक्षसी उपाय योजून ठेविला होता.
सर्प दुखावला गेला ९९
असो. राणी आणि ती तरुणी मार्ग न चुकतां त्या भुयाराच्या वाटेने
इष्ट स्थळीं जाऊन पोंचतांच प्रथम त्यांना भुयाराच्या दुसर्या तोंडाचा दरवाजा
खळा होईना. त्या दोघींनींहि शक्य तेवढ्या जोराने दरवाज्यावर आघात
करून तो उघडण्याचा प्रयत्न केला, परंतु तो अगदीं वाया गेला. जसजसा
त्यांना तेथे चास होऊं लागला व बंधमुक्त होण्याच्या आशेचा किरण मुळींच
दिसेना, तसतशा भळलभलत्या कुरांबा त्यांच्या मनांत डोकावं लागल्या. राम-
स्वामी शत्रूला तर फितूर नसेल ना, असा विचार मनांत येण्याइतकी त्या
तुदांकांची मजळ जाऊन पोंचळली. चंदासाहेबाने आपला नायनाट करण्याची
ही बेमाळूम यृुकिति शोधून काढली असें राणीने त्या तरुणीपाद्ली बोलूनहि
दाखविळें. अशा वांहीं बेळ त्या दोघीही चितानलांत होरपळत तेथें उभ्या
असतांना, एकाएकीं तो दरवाजा उघडला गेला. त्याबरोबर तेथल्या दार-
सक्षकार्ने राणीला पहातांच तिच्य़ा चरणांवर मस्तक नम्र करून आपणाकडून
झाळेल्या दिरंगार्ईबहल तिची क्षमा मागितली. त्या तरुणीकडे मात्र त्यातें
बारंबार भेदक दष्टीनें निक्षून पाहिलें. राणीला त्याचा संशय येऊन तिने
त्याला विचारलें “ कां? तुला बा मुलीचा संशय येंतो का ? ”
“ तसं नव्हे. पण आमच्या राणीला एका यःकशिचित् कलावंतिणीच्या
हातांत हात घाळून दहा दिशांना भटकण्याची पाळी यावी, या देवदुविलासाचें
मला आइचर्ये वाटतें आहे. “ तो द्वाररक्षक उद्गारला. त्मा तरुणीने त्याच
क्षणीं ळाजेनें खालीं मान घातली. राणी तो प्रवार पाहून आश्चर्यचकित
मद्रेने त्या दोघांच्याही तोंडाकडे आळटून पाळटून टकमवां पाहु लागली.
तिनें त्या तरुणीला बिचारळे, ' तूं कोण? ”
ती तरुणी कांहींही बोलली नाहीं. तो हाररक्षक पुन्हां तिच्याकडे तीक्ष्ण
दृष्टीनं पहात राणीला म्हणाला, * राणीसाहेब, ही आपणाला जन्मांतून
उठवणाऱ्या संतानाची रखेली आहे,ब आपणाला या जगांतून नाहींशा करण्यांत
तिना स्वार्थ आहे, हें आपणाला माहित नाहीं काय ? ” राणी पुन्हां संशयित
मद्वेनें त्या तरुणींच्या च्येकडे पाह लागली.
तो द्राररक्षक क्षणभर थांबून पुन्हां त्या तरुणीचे ताडण करूं लागला,
“ मोहने, बोळ-चांडाळणी, त मोदृनाच ना? श्रीरंगाच्या देवळांतील
कलावंतीण ती तूंचना ? ”
१०० पेशवाईचें मन्वंतर
“ होय, मी मोहना. ” असें म्हणून मोहनेनें आपलें अश्र॒ पुशीत राणीकडे
वळून स्फुंदत स्फुदत उद्गार काढले, “ राणीसाहेब, हा हाररक्षक म्हणतो.
त्याप्रमाणें मी पतिता नारी आहें हें तर खरेच. परंतु यानें मल आपली
प्रतिस्पर्धी स्त्री ठरविलें यावर मात्र आपण कृपा करून विश्वास ठेवं नका.
मी' परमेश्वराला साक्ष ठेवून पुन्हां सांगते, ती मोहूना-श्रीरंगाच्या देवाल्यां-
तुन त्या नराधम सय्यदखानार्ने बलात्काराने ओढून नेऊन बाटविलेली मोहना
वस्तुतः असहायपर्णे ज्या दिवशीं बाटली त्याच दिवशीं या जगांतून नाहींशी
झाली; आणि ह्या जुलमाचा सूड घेण्यासाठीं अहनिश तळमळणारी ही नवी
मोहना त्याच क्षणाला जन्माला आली. सय्यदखानाच्या सहाय्यानें त्या नर-
पशु चंदासाहेबाने मला आपल्या विलासमंदिराचा दरवाजा दाखविला, आणि
मीहि फारसा प्रतिकार न करतां मुकाट्याने आंत चाळून गेलें खरी; परंतु
ती त्या अविधाची नाटकशाळा होण्यासाठीं नव्हे, तर संधि सांपडेल तेव्हां
सांपडेल तसा फांसा टाकून त्याचा सत्यानाश करण्यासाठीं. डोळ्यांत तेल
घालून टपून बसणारी ही' आपली हाडवेरीण त्यानें मूढपणानें आपल्या विलास
मंदिरांत आपल्या शेजारीं उभी करून ठेविली होती. आतां परमेश्वराची
कृपा झाली तर माझी इच्छा सफल होईल. आपलाहि त्या सदिचन्छेला आलि
वाद आहेच. माझ्या कारस्थानाचा धागादोरा आपणाला अद्यापि मुळींच
कळलेला नाहीं. या द्वाररक्षकाला देखील माझी ओळख न पटण्याइतका
माझ्या कारस्थानांचा गुप्तपणा अभंग राहिला गेला आहे यांतहि मला संतोषच
आहे. आतां आपण बंधमक्त झालांच आहां; आणखी थोड्या वेळानें मी
काय म्हणतें याचें प्रत्यंतर आपल्या मनाला पटेल. ”
इतक्यांत यावनी पेहराव केलेला एक सेनिक आपला घोडा भरधांव फेकीत
तेथें येऊन पोंचला व त्यानें तेथें येतांच मोहनेला प्रथम वंदन करून दोन्ही
हात जोडन विनंति केली, “ बाईसाहेब, मी रामस्वामीच्या अनुज्ञेवरून येथे
आपला मागंदर्शक म्हणून आलों आहें. ' इतक्यांत जवळच उभ्या असलेल्या
राणीकडे त्याचें लक्ष गेलें; त्याबरोबर त्यानें राणीच्या पायांवर मस्तक ठेवून
प्रणिपातपूर्वक उद्गार काढले, “ आईसाहेब, प्रथम मी आपणाला ओळ-
खलें नाहीं याबहृल मला क्षमा करा. आपण बंधमुक्त झालां यावरून आमच्या
या अभागी देशाचें भाग्य आज पुन्हां उदयाला येऊं घातलें आहे असेंच मी
सर्प दुखावढा गेला १०१
। ह ७७0१ १०४०५०७ ४०४१५० ४.४७ ६८७९ ४.७१. ७..४९१..४ ७.४ ४.४७ ४./*१५५.४९७.” 0७.४0 ४५७१९... ७.”
समजतों. परंतु आतां येथें बोलण्यांत वेळ दवडण्याइतकी सवड आपणाला
नाहीं. तिकडे किल्ल्यांत या प्रकारामुळे संशयाचा व असंतोषाचा वणवा
भडकला असेल. त्या वणव्याची झळ आपणाला लागण्यापूर्वी आपण येथून
शत्रूच्या दृष्टिआड झालें पाहिजे. ”
द्वाररक्षक स्तब्धपरगे त्या सेनिकारचे तें भाषण ऐकत होता. त्यानें किंचित
ओशाळल्यासारखें करून त्या सेनिकाला विचारलें, “ मनमोहन, ही मोहना
आपल्या विश्वासाला पात्र आहे, अशी तुझी खात्री आहेना? ”
मनमोहन उत्तरला, “ तो प्रन आपला नसून आपल्या नेत्यांचा आहे.,
आपण आपलें कतेव्य करून शिस्त पाळावयाची आहे. तुला असें वाटतें का
कों इतक्या प्रयासांनी देशाच्या दास्यविमोचनाची योजना ज्या लोकनाय-
कांनीं उभारली त्यांनीं मोहनेसारख्या संशयित जिविताच्या' स्त्रीला तावूत
सुलाखून पाहिल्याशिवाय उगीच आपल्या कटांत सामील करून घेतलें असेल?
तोंच मोहना म्हणाली, “ मला याविषयीं मुळींच विषाद वाटत नाहीं;
उलट आनंद वाटतो कों आपल्या हिदुजनतेचा दास्यविमोचनाचा प्रयत्न
इतक्या सावधपणानें व पद्धतशीर रीतीनें सुरू आहे. पाया भक्कम असला
तर त्यावरची इमारत टिकते. ” ती द्वाररक्षकाकडे वळून म्हणाली, “ तूं
मला टाकून बोळलास याबद्दल मी तुझ्यावर मुळींच रुष्ट झालें नाहीं, उलट
तूं बेसावधपणें माझी कसून विचारपूस न करतां जर मला येथून जाऊं देतास,
तर असल्या महत्त्वाच्या गुप्त कारस्थानांत तुझ्यासारख्या नेभळटाला स्थान
मिळालेले अयोग्य आहे असेंच मीं म्हटलें असतें. ”
“ बरे, आतां लोकर एकदां आपण उभयतां माझ्या मागोमाग चला.
सम्ापली नौका पलीकडे तयार आहे. तिच्यांतून आपण एकवार शत्रूच्या
दृष्टीच्या टापूपलीकडे गेलों कौं बचावलों. ”
एवढें त्या मंडळीचें संभाषण होत आहे तोंच रामस्वामी अकस्मात् त्यांच्या-
समोर येऊन उभा राहिला. त्याला पाहून सर्वांना पराकाष्टेचें आश्चर्य वाटले.
राणी आणि मोहना त्याला कांहीं विचारणार, इतक्यांत त्यानेंच उलट त्यांना
हडसून खडसून प्रश्न केला, “ हें काय ? आपणाला देश्याचा उद्धार करा-
वयाचा आहे कीं शत्रूच्या हातून अधिकाधिक विटंबना करून घेऊन मरावयारचें
आहे ? इतका वेळ तुम्ही येथें उभ्या कशा ? ” तो उत्तराची वाट न पाहतां
१०२ पेशवाईचें मन्वंतर
पुढें म्हणाला, “ बरें; आतां अगोदर माझ्याबरोबर चला. किल्ल्यांत आपण
दोधीजणी अदृश्य झाल्यामुळें हाहाःकार उडाला आहे, व आपल्या शोधाचा
प्रयत्न जारीनें सुरू आहे. मी इकडे आलों तो तरी पडत्या फळाची आज्ञा
घेऊन आपला शोध करण्यासाठींच होय. ”
“ परंतु तुला तरी इकडे कसें येतां आलें ? मी इकडे येतांना जलाशयाचा
मार्ग मोकळा करून तें भुयार कायमचें निरुपयोगी केलें होतें. ” राणी म्हणाली.
“ते खरें; परंतु ज्या गांवच्या बोरी त्याच गांवच्या बाभळी. ” रामस्वामी
गालांतल्या गालांत किंचित् हंसून म्हणाला, आपल्या योजनेप्रमाणे आपला
हेतु पूर्णपणें सफळ झाला. आपल्या शोधासाठीं म्हणून, दोन वीर त्या जला-
शयांत उडी टाकून प्राणाला मुकले, मी तरी शक्य तों लवकर आपली भेट
घेणें अवश्य म्हणून आपला शोध लावण्याची कामगिरी चंदासाहेबाच्या
विनंतीवरून पत्करली, आणि त्या कामगिरीवर सध्यां मी इकडे आलों आहें.”
परंतु त्या जलप्रवाहानें हळूहळू किल्ल्यांत सवत जलमय होईल त्याची
वाट काय ? ” राणीने विचारलें.
“ त्याची आपणाला काळजी नको. मी जलप्रवाह बंद करून इकडे आलों
आहे. किल्ल्यांतल्या लोकांची मात्र कल्पना झाली असेल कीं जी गत पहिल्या
दोघांची तीच रामस्वामीचीहि झाली असावी. आणि त्यांची तशी कल्पना
होणें आपणाला इष्टच आहे. पण आपण खुळ्यासारखीं येथें काय उभें
राहिलों ? चंदासाहेबानें मरारराव घोरपड्याला जाळ्यांत अडकविण्या-
साठीं योजलेले कारस्थान पूर्ण होण्यापूर्वीच आपणाला मराररावची गांठ
घेऊन त्यार्चे रक्षण केलें पाहिजे. त्यानें एकवार आपणाला पाठीशीं घातलें
कों मग आपला राज्यक्रान्वीचा प्रयत्न फळाला येण्याला मुळींच उशीर नाहीं
एवढ संभाषण झाल्यावर रामस्वामीसह राणी व मोहना ह्या दोघीही
तेथून निघून गेल्या. थोड्या अंतरावर मोहना व रामस्वामी यांच्या पूर्वे-
योजनप्रमाणें नौका सज्ज होतांच त्या नौकेंतून ती मंडळी कोठें निघन गेली
याचा चवथ्या कोणालाहि पत्ता लागला नाहीं. आपलें प्रयाण अत्यंत गप्त
रहावें या हेतूनें कीं काय, रामस्वामीनें अन्य कोणाही माणसाला आपल्य़ा-
बरोबर घेतलें नाहीं. त्यामुळें नौकेवर वल्हे मारण्याची कामगिरी राम-
स्वामीबरोबरच राणी व मोहना या दोघींनाहि पतकरावी लागली; व त्यांनीं
0 .
. /
ह. र 1.
मोहना आणि मीनाक्षी गुत्तपणे प्रयाण करीत आहेत.
सर्प दुखावला गेला १०३
1 कयतात तीची
ती आनंदानें पतकरली. मोहना वल्हे मारतां मारतां राणीला म्हणाली,
राणीसाहेब, असली कठोर कामगिरी आपल्या वांट्याला परमेश्वराने
आणल्के 1! पण त्याला इलाज नाहीं. ”
स्थपथस्वामी तेवढ्यांत म्हणाला, “ राणीसाहेब ह्या आतां आपल्या अति-
विशाळ राज्यनौकेच्या कर्णधार होणार आहेत; त्यांनीं या लहानश्या नौकेचें
केण्बारत्क पतकरलें यांत वावगे असें कांहींच नाहीं ” इतका वेळ सूर्याला
गोंडा फुटला नव्ह्ता, किवा तो अभ्राखालीं झांकला गेला असेल; पण राम-
स्वामीर्च्या तोंडून ते शब्द निघावयाला व सुर्यबिबावरील अभ्राच्छादन दूर
व्हावयात्का गांठ पडली. सोनेरी बालार्कांच्या सौम्य प्रकाशाचें अभ्यंग स्नान
त्या नोव्केंतील मंडळींना घडूं लागलें. रामस्वामी त्या उगवत्या सूर्यबिंबाकडे
अंगु लिनििदेचा करून उल्हसित अंत:करणानें उद्गारला, “राणीसाहेब, माझ्या
भविष्यचक्ााणीला हा शुभशकून घडला पहा! ”
सत्या आनंदाच्या प्रसंगाला दृष्ट लागूं नये यास्तव परमेश्वराने गालबोट
लावण्याचे योजिले होतें म्हणून कों काय, राणीने सहज वर महादेवाच्या टेकडी-
कडे दुष्टि लाविली, तों तेथला अंगावर शहारे आणणारा देखावा पाहून
राणीचे अंतःकरण थरारून गेलें. ती कापर्या स्वरांत हळहळली, “ शिव!
शिक्त ! काय हा अनर्थ ! भगवंता, तूं माझ्या देशाच्या मस्तकीं उमटलेलीं
परदास्याऱ्की पदलांडनें पुसून टाकण्याच्या माझ्या प्रयत्नसिद्धीपूवीा अश्या
किती न्हिरपराधी व स्वाभिमानी सुपुत्रांचा बळी घेणार आहेस न कळे! ”
राणीचे ते शब्द ऐकून रामस्वामी व मोहना यानींहि वर पाहिलें, तों तेथे
कड्याच्या टोंकाशीं शू खलाबद्ध असे कांहीं अभागी जीव उभे असलेले त्यांना
दिसून आळे. त्या अभागी जीवांचा आतां इतक्यांत कडेलोट होणार हें
टरल्यासारखेंच होतें. परंतु त्यांच्यासाठी हळहळण्याइतकी देखील उसंत
राफझस्कामी', राणी वगेरे मंडळींना नव्हती. रामस्वामीनें प्रसंगावधान राखून
त्याच क्षणीं राणी व मोहना यांना बुरखे घेण्याला सांगून म्हटलें, “ कदेनकाळ
आपल्यावर घाला घालण्यासाठी आपल्या पाठीमागून पाळत राखीत आहे हे
ध्यानांत ठेवून सावधपणानें वागा- ” |
त्या*च वेळी किल्यावर चंदासाहेबानें कसा अनर्थ मांडिला होता याची' कल्यना
वाकान त्या अभागी बंदिवानांचा पूर्वोक्त ओझरता निर्देश ऐकून आलीच
१.५५. १९..”१४५..४०१ ४४.८ ७८४४७. ४ ४६.४ १९..४ ७.४ 0७ ४ ७८ 0.४ ७ ७७०४४०४ ७
१०४ पेशवाईचे मन्वेतर
असेल. चंदासाहेबाच्या भनांत हिंदूंविषयीं इतकी भयंकर तेढ उत्पन्न झाली
होती. परंतु या पूर्वीच त्या तेढीचा मासला वाचकांना स्थूलत:ः कळून
चुकला आहे, तेव्हां त्याची येथें द्विर्क्ति करण्याचें कारण नाहीं. ह्या चळ-
चळ्या हिंदूंच्या वर्मी घाव घालावा म्हणून चंदासाहेबानें प्रथम तेथल्या महा-
देवाच्या देवालयाचा विध्वंस करण्याचें ठरवून तशी जाहीर घोषणा केली
आणि ताबडतोब आपल्या विश्वासांतील यवन धर्माधिकार्यांना बोलावून
त्या घोषणेची अंमलबजावणी सुरू केली होती. त्या टापूंतील सवे हिंदूंना
अत्यंत पूज्य वाटणारे तें महादेवाचे देवालय गोहृत्त्येच्या निषिद्ध प्रकाराने
तर भ्रष्ट झालेंच; पण प्रत्यक्ष शिवलिंग देखील त्या निषिद्ध वस्तूर्ने भ्रष्ट
करण्याला यवन धर्माधिकाऱ्यांनीं कमी केलें नाहीं! चंदासाहेब तो सर्व
प्रकार समक्ष तेथें उभा राहून आपल्या डोळ्यांदेखत घडवून आणीत होता!
इतकेंच काय पण चळवळ्या हिंदूंना दहशत बसावी म्हणून त्यानें किल्ल्यांतील
बर्याच अधिकाऱ्यांना व प्रमुख नागरिकांना तेथें समक्ष हजर राहण्याला भाग
पाडलें होतें. सांगकाम्या मजुरांचा एक मोठा ताफा हातांत खोरीं व फावडीं
घेऊन वरिष्ठांच्या हुकूमाबरोबर तें देवालय जमीनदोस्त करण्यासाठीं उभा
होता. परंतु तसें नव्हे, खरें बोलावयाचे तर त्या गरीब मजूरांवर असा
आरोप एकाएकीं करणें बरें नाहीं. केवळ त्या देवालय-विध्वंसाच्या कार्या-
साठीं त्या अजाण लोकांना तेथें सरकारी अधिकार्यांनी वेठीला धरून आणलें
असेल, पण आपणांला आतां कोणतें काम करावयाचें आहे, याची त्यांना
खरोखर कल्पनाच नव्ह्ती. ते इतर हिद्ंबरोबरच विस्मयचकित चित्ताने
तेथल्या एकंदर प्रकाराकडे लक्षपर्वक पहात उभे होते. थोड्या वेळाने
चंदासाहेबाच्या हुकुमावरून शिवलिंग भ्रष्ट करण्यासाठीं कांहीं यवन पुढे
सरसावले; त्यावेळीं मात्र तेथल्या सर्वे हिंदूंच्या अंगावर कांटा उभा राहिला
व कांहीं प्रमुख हिंदूंनीं तर चंदासाहेबाच्या हातांपायां पडून तसा अनर्थे न
करण्याबददळ त्याला विनवलेंही. परंतु चंदासाहेबानें त्यांना माझ्या
'तोंडून निघालेले शब्द तडीला गेलेच पाहिजेत. चंदासाहेबाचे शब्द म्हणजे
वाऱ्यावरची फुकाची बडबड नव्हे अशी सर्वे लोकांची खात्री झाली नाहीं तर
माझा वचक येथल्या लोकांवर राहाणार नाहीं; यास्तव मला यावेळीं अंत:-
करण कठोर करून या सवे गोष्टी पार पाडल्याच पाहिजेत. असें निक्षून
सर्प दुखावला गेला १०५
सांगून आपला हेका चालविला. आणखी अंमळशानें जेव्हां त्यानें देवालयाच्या
गाभाऱ्यांतील शिवलिंग खणून काढण्याविषयीं वेठीच्या मज्रांना आज्ञा केली
तेव्हां ती ऐकून तेथल्या सर्व हिंदच्या-त्या पोटार्थी मजुरांच्याही हूदयांवर वज्रा-
घात झाल्यासारखे झालें. त्यांनीं त्याच क्षणीं आपलीं हत्यारें खालीं ठेवलीं
आणि हात जोडून सांगितलें, “ मालिक असलें अधमपणार्चे कृत्य आपण
आम्हांला करावयाला सांगू नका. आमच्या देवाची आम्ही अक्षी विटंबना
केळी तर आमच्या हिंदु या थोर नांवाला काळोखी लागेल. आम्ही आपली
अन्य काय वाटेल ती सेवा करूं, परंतु आमचा देव, आमचा धर्म आणि आमची
अद्रू यांवर घाला घालण्यासाठी साक्षात् सेतान पुढें आला तरी आम्ही त्याला
डरणार नाहीं व मारूं किवा मरूं अश्या निश्चयानें त्याच्याशीं दोन हात कर-
'ग्याला आम्ही कमी करणार नाहीं. आम्हांला असल्या आड मागनिं जाण्याला
आपण भाग पाडूं नये. ”
एखाद्या नवखंड पृथ्वीच्या समग्यबाटावर, तो खवळलेल्या सागरांतून दिमा-
खाने आपली नौका हांकोत चालला असतांना वादळामुळे जसा प्रसंग यावा
तसाच प्रसंग चंदासाहेबाच्यावर त्यावेळीं ओढवला होता. नवखंड पृथ्वीचा
'सस्राट झाला म्हणून खवळलेल्या महासागराच्या लाटांनीं त्याची नौका
उलळ्थी पालथी करून त्याला जलसमाधी देण्याचें मनांत आणल्यावर त्याची
'सम्राट्सत्ता तेथें काय कामाला येणार! चंदासाहेबाला त्रिचनापल्लीच्या
राज्यांत इतका मग्रूरपणा चढला होता कीं, मी माझ्या शब्दासमोर पंचमहा-
भूतांनाहि वांकवूं शकेन, असा फाजील आत्मविश्वास त्याला वाटत होता.
परंतु तो ज्या सेनिकांवर आपली अबाधित हुकमत गाजवण्यासाठीं दिमाखाने
'तेथें उभा होता, त्यांनींच त्याची आज्ञा अमान्य करून निस्पृहतेची शिकस्त
केल्यावर त्यांना पुन्हां हुकूम करण्याचें धेर्य त्याला झालें नाहीं. पुन्हां हुकूम
करण बाजूलाच राहिले, आतां त्या बिथरलेल्या लोकसमूहांत एकट्याने
उभें रहाणे देखील चंदासाहेबाला धोक्याचे वाटं लागलें. मनांतून तो मारे
खूप दांत ओठ खात होता कीं, जरा संधि सांपडतांच मी या सर्व बंडखोरांचा
नायनाट करून टाकीन आणि यांच्या घरादारावरून गाढवाचा नांगर फिरवन
त्यांचें एकहि घर अथवा देवालय नांवालादेखील उभें राह देणार नाहीं
'परंतु ह्या सर्व गोष्टी तेथून स्वतः तो बचावून गेल्यावंतरच्या होत्या. हा विवेक
१०६ पेशवाईचे मन्वंतर
त्याच्या डोक्यांत आला व तो एक चकार शब्दहि न बोलतां तेथल्या मंडळींना
तेथेंच सोडन तडक माध्णरा वळला.
“ हा दुखावलेला सर्प फोफावत दूर निघून जात आहे, हा केव्हां घात
करील याचा नियम नाहीं. ” त्या बंडखोरांपेकी एकजण दुसऱ्याच्या कानाशीं
लागून म्हणाला. दुसरा तेंच तिसऱ्यापाशीं बोलला. तिसरा चोौथ्यापाशी'
बोलला. असा हां हां म्हणतां त्या गोष्टीचा पराचा पारवा होऊन, चंदासाहेब
झाल्या अपमानाचा सूड उगविण्यासाठींच रागाने फणफणत चालला आहे
अश्या समजुतीने तेथल्या सर्व हिंदूची अंतःकरणें घेरून टाकिलीं. चंदासाहे-.
बाच्या अंगीं इतका दुष्टपणा असल्याबद्दल कोणालाहि शंका नव्ह्ती; व
आपण त्याची आज्ञा अमान्य केल्याबद्दल तो आपल्या सर्वांचे वाटोळे करणार
असें तेथला प्रत्येक हिट ओळखून चुकला होता. पण एकदां सर्वस्व मातीला मिळ--
णार अशी खात्री झाल्यावर त्या लोकांना भीति बाळगण्याचें कांहींच कारण
उरलें नाहीं. ' आपण केलें यापेक्षां कांहींहि अधिक केलें नाहीं तरीहि आपली
वाताहत करण्याला तो चांडाळ कमी करणार नाहीं, मग मरावयाचें तर
शक्य तितकी आपल्या देशाची आणि धर्माची सेवा बजावून कां मरू नये ?'
अशा निर्धाराने तो मजुरांचा तांडा हातांतील हत्यारें खांद्यावर टाकून चंदा--
साहेबाला तडक आडवा गेला आणि एकमुखार्ने त्याला म्हणाला, “ आपण'
महादेवाच्या देवालयाला किचित् देखील धक्का लावणार नाहीं असें आरवा-
सन दिल्याशिवाय आम्ही आपल्याला एक पाऊलदेखील पुढें टाकं देणार नाहीं.
चंदासाहेबानें एकंदर. रागरंग पाहून निरुपायानें तसें आश्वासन दिले व
आपला मार्ग एकदांचा मोकळा करून घेतला, परंतु त्याच वेळीं तो मनांतल्या-.
मनांत हंसून म्हणाला, “ मूर्ख ! नेभळट ! राणीसारख्या चतुर स्त्रीला
देखील खोटी शपथ देऊन मी रसातळाला नेलें, तेथें ह्या कुत्र्या-बकर््यांना '
मी थोडीच दाद देतों ! थांबा म्हणावें, आणखी एका प्रहराच्या आंत तुम्हांला
ह्या चंदासाहेबारचें खरें स्वरूप दिसेल. ”
चंदासाहेब गेल्यावर आजच्यापुरते तरी महादेवाच्या देवळांवरीळ संकट
टळलें अशा समजुतीनें सर्व हिंदू माघारे गेले. त्या प्रकाराला घटका दीड
घटका झाली असेल नसेल तोंच चंदासाहेबाचे लष्करी यमदूत कांहीं विशिष्ट
छोकांच्या घरांना गराडा घालून त्यांना केद करून महादेवाच्या टेकडीकडे
सर्प दुखावला गेला १ ०७
चालवू लागले. हे लोक अर्थातच चंदासाहेबाला देवालय-विध्वंसाच्या
बाबतींत प्रतिकार करणारांपैकीं प्रमुख होते अश्या निवडक लोकांना बंदिवान
करून कडेलोट करण्यासाठीं महादेवाच्या टेकडीवर सकत लष्करी पहाऱर््यांत
उभे करण्यांत आलें, त्याच वेळीं राणी, मोहना व रामस्वामा नौकेतून जात.
असल्यामुळें त्यांना तो भयंकर देखावा दिसला.
त्या बंदिवानांची पुढे काय द्या झाली असेल?
>
पकरण १९८ व
प्रसादचिन्हांचा स॒गावा
"व्वा
रर्[तारा व त्रिचनापल्ली एथील घडामोडींचा आपणाला स्थूलतः परिचय
झालाच आहे. आतां आपणाला प्रथम तंजावरकडील घडामोडींचा विचार
करावयाचा आहे. करुणाराणी आपल्या धर्मपित्याच्या अर्थात् झंझ्ाररावाच्या
आजारीपणामुळें राजाज्ञेने त्याची अखेरची भेट घेण्यासाठीं गेली, व मानाजी-
'राव देखील त्यापूर्वीच अपरूपाराणीच्या कारस्थानाचा शोध लावण्यासाठीं
कोठे तरी बाहेर निघून गेला होता, हें वाचकांना पूर्वीच माहीत झालें आहे.
प्रतापसिंह महाराजांनीं संशयग्रस्त चित्ताने करुणाराणी व मानाजीराव यांना
पकडून आणण्याचा हुकूम सखोजीला दिल्यानंतर हुकमाचा बंदा या नात्यानें
'सखोजीला राजाज्ञेची तामिली करणें प्राप्त होतें. त्यानें त्या कामावर सैनिक
'खवाना केलेही. करुणाराणीचा सुगावा प्रथम लागावयाचा म्हणजे तिच्या
माहेरी मध्यार्जुनांत अर्थात् शुक्षाररावांच्या गांवीं, म्हणून त्या कामगिरीवर
निघालेल्या सेनिकांनीं प्रथम मध्यार्जुनाला वेढा दिला. परंतु तेथें झंजार-
रावाच्या घरीं जाऊन पाहतात तों तेथें झुंजाररावहि नाहीं आणि करुणा-
राणीहि नाहीं ! वास्तविक राजकारणांत लक्ष घालण्याचें काम सैनिकांचे
नव्हे हें जरी खरें, तरी नजरेपुढून किवा कानांवरून जाणाऱ्या गोष्टींत निष्का-
'रण मन घालण्याचा मोह मनुष्याला कधीं आंवरत नाहीं, हा मनुष्यमात्राचा
'स्वभावसिद्ध गुणच आहे. कोणी पाहिजे तर त्याला चौकसपणा म्हणावा
किवा कोणी दुर्गुण म्हणावा. पण आहे हें असें आहे. झंजारराव व करुणा-
राणी तेथें न सांपडतांच त्या सैनिकांच्या तुकडीवरीक म्होरक््याला सक्रहर्शनीं
संशय आला कीं, राणी आणि झंजारराव हीं दोघेहि महाराजांना संशय आल्या-
'अ्रमाणें शत्रूला सामील झालीं असलीं पाहिजेत खास ! आणि झंजाररावाच्या
आजारीपणाचा खोटा बोभाटा करण्यांत तरी येन केन प्रकारेण करुणेला
तंजावरच्या राज्यांतून बाहेर बोलावून घेण्याचा त्याचा डाव असावा. ताबडतोब
त्या म्होरक्यारने गांवांत आपल्या सेनिकांमा्फत झुंजाररावाविषयीं
प्रसादर्चिन्हांचा सुगावा १०९,
कसून चौकशी चालविली, तेव्हां करुणाराणी चार-पांच दिवसांपूर्वी तेथें
आल्याचें व तिच्यासह झंजारराव कोठें तरी बाहेर गांवीं निघून गेल्याचे त्यांना
कळून आलें.
तरीहि ते सेनिक आणखी एक सबंध दिवस तेथें त्या मंडळींचा शोध करीत
व आल्यागेल्यावर पाळत ठेवीत राहिले होते. इतकें करूनहि कांहीं तपास
लागत नाहीं असें पाहतांच त्यांनीं आपसांत विचारविनिमय करून तके केला
कीं, 'ज्या अर्थी झंजारराव येथें नाहीं व राजवाड्यांतील प्रासादिक तरवारीं-
सह करुणा राणीहि बेपत्ता झाली आहे, त्याअर्थी कोणा तरी शत्रुपक्षाच्या माण-
साशीं संगनमत करण्यासाठीं तीं दोघें गेलीं असलीं पाहिजेत हें उघड आहे.'
चंदासाहेबानें प्रतापसिहाला लिहिलेलें धमकीवजा पत्र त्या सैनिकांना माहीत
होतें. त्यामुळे करुणा राणी, झ्ंजारराव व मानाजी ही मंडळी चंदासाहेबाला
सामील आहेत कीं काय, अशी शंका सकृतहरशंनीं त्यांच्या मनांत आली व त्यांनीं
त्या रोंखानें तपास करण्याचें ठरविलें. परंतु प्रवासांत त्यांच्या अनुभवाला
जो प्रकार आला तो अगदींच निराळा. त्रिचनापल्लीच्या रोंखानें मजल दर-
मजल करीत ते सेनिक चालले असतां त्यांना एका एकान्तवासाच्या ठिकाणीं
भर जंगलांत कोणी तरी माणूस वस्ती करीत असल्याची शंका आली; तसेंच
आपलीसुद्धां शच्तूला शंका येऊं नये म्हणून ते सैनिक आपल्या सेनापतीच्या
आज्ञेवरून दहा दिशांना पांगून त्या एकांत स्थलाच्या कारस्थानाचा सुगावा
घेऊं लागले. तोंच अपरूपा राणी आणि कोयाजी ही कारस्थानी जोडी आपल्या
थोड्याशा अनृचरांसह तेथें थांबून कांहीं खलबत करीत आहेत असें तंजावर-
कडून आलेल्या मृख्य सैनिकाच्या निदर्शनाला आलें. त्यानें अत्यंत सावध-
पणानें वेषांतर करून त्या वसतिस्थानांत प्रवेश मिळविला. त्यामुळें त्याला
त्यांचे खलबत ओळखण्याचा मार्ग बराच मोकळा झाला. आपणाविषयोीं
कोणालीहि संशय येऊं नये म्हणून त्या म्होरक्या सेनिकानें आणखी थोडें धाडस
करून आपण अपरूपा राणीचे पक्षपाती आहोंत असें नाना उपायांनीं तेथल्या
संडळींना भासविण्याला कमी केलें नाहीं. त्याला तेथें प्रवेश मिळाला त्यावेळीं
अपरूपाराणी आणि कोयाजी घाटगे यांचें पुढीलप्रमाणें संभाषण सुरू
असलेले त्याला ओझरते एऐंकावयाला मिळालें. कोयाजी म्हणाला, “मी
चंदासाहेबाची भेट घेऊन त्याला आपण दिलेली प्रासादिक तरवारींची देणगी
११.० पेशवाईचे मन्वतर
देऊन आलों आहें, व त्यानेंहि आपल्या इच्छेप्रमाणे प्रतापसिहाच्या राज्याचा
: नायनाट करून सयाजीरावाला तंजावरच्या गादीवर बसविण्याचें कबल केलें
आहे. अर्थात् तो एक प्रश्न मिटला.
राणी म्हणाली, “ पण मुरारराव घोरपड्यासारखा आपला जबरा रात्रू
: बलवत्तरपणें आजूबाजूला थेमान घालीत आहे त्याची वाट काय ? ”
कोयाजी म्हणाला, “ त्याचाहि बंदोबस्त चंदासाहेबानें अगदीं बेमालमपणे
केळा आहे. इतक्यांत मुरारराव घोरपडे चंदासाहेबानें फेकलेल्या कारस्था-
' स्थानाच्या जाळ्यांत अडकून पडला असेळ अथवा पडेल. त्याप्रमाणेंच
' मराठ्यांच्या फौजेची छावणी शिवगंगेला आहे, तिची' पांगापांग करण्याची
: मीं एक अजब युक्ति चंदासाहेबाला सुचविली आहे. ती जर अंमलांत आली
. तर आपणाला मराठ्यांच्या सेन्याची व सेनापतीची भीति बाळगण्याचे लव-
. भात्र कारण नाहीं. सुदेवानें रघोजी भोंसले वगेरे मंडळी सातार््याकडे
- गंतली आहेत. ”
राणी म्हणाली, “ पण ती मंडळी लवकरच नव्या तयारीने इकडे येतील
असें मला वाटतें. चंदासाहेबाच्या मनांत तंजावरच्या गादीविषयीं धुमसत
असलेला द्वेषभाव प्रतापसिहाला पूर्वीपासून माहीत आहे व त्यानें तसाच
प्रसंग पडला तर चंदासाहेबाचा प्रतिकार करण्यासाठीं सातार्याला जासूद
. पाठवून मदतीची योजनाही केली आहे.
“ तसें असलें तरी कुठें सातारा आणि कुठें तंजावर! एवढा मोठा
' मुळूख तुडवीत मराठे इकडे येईतों त्यांना मधल्या मध्यें गांठण्याची युक्ति
“आम्हांला सुचली नाहीं तर आम्ही कारस्थानीं माणसे कसलीं! राणीसाहेब,
आपण पूर्णपणें निश्चित असा. आगीच्या एका ठिणगींत ज्याप्रमाणें
: व्रम्हांडाचें भस्म करण्याचें सामर्थ्ये असतें त्याप्रमाणे या कोयाजी घाटग्याच्या
बचकभर मेंदूंत ब्रह्मांडाची उलथापालथ करण्याच्या इलमा ओतप्रोत भर-
' लेल्या आहेत. फक्त मला च्विता आहे ती करुणाराणी आणि मानाजीराव
. यांचीच. मानाजी मूळपासून आपणाला पाण्यांत पहातो, आणि करुणा
राणीवर त्याचें विशेष वजन आहे. तीं दोघें देशांतल्या देशांत जर
: ढवळाढवळ करूं लागलीं, तर मात्र आपणाला आपला कार्यभाग साधा-
: वयाला थोडेसें जड जाईल. कारण आपणाविषयीं काय किवा माझ्याविषयी
प्रसाद्चिन्हांचा सुगावा | १११
काय लोकमत फारसें शद्ध नाहीं, त्याचा फायदा घेऊन मानाजी आपणांसमोर
दंड ठोकून उभा राहूं शकेल.
अपरूपा राणी खदिरांगारांसारखे डोळे लाल करून तरवारीच्या वधारे-
'प्रमाणे तीक्ष्ण वाणीने उद्गारली. “ मानाजी दंड थोपटून आमच्या समोर
उभा राहिला तर त्याचे दंड मोडून त्याला जमीनदोस्त करण्याला हो अप-
रूपाराणी माघार घ्यावयाची नाहीं. करुणा तर बोलून चाळून भाबडी
'पौर आहे. तिच्या आयुष्याला मीं जी च॒ड लाविली आहे ती न विझतां तिचा
बळी घेईल याविषयीं मला मळींच रांका ताहीं, पण इतके कशाला ? झंजार-
राव, मानाजी व करुणा यांना पकडण्याचा हुकूम प्रतापसिहानें पूर्वीच सोडला
आहे. ती जाऊत कोठे जाणार ? माझे हेर त्यांच्या पाळतीवर आहेत.
'ती सप्तपाताळांत लपून वसली तरी तेथवर तलास लावून राजशयासनाच्या
'फांसावर त्यांना लटकावण्याला पुरेसे सामर्थ्ये माझ्या कारस्थानांत आहे.
हें संभाषण ऐकून त्या सैनिकाच्या सर्वांगावर रोमांच उभे राहिले. त्याच्या-
चित्तवृत्तींत एकाएकीं एवढा जबरदस्त फरक घडन आला कोौं त्या-
'च्यानें तेथें श्ञांतपर्णे बसवेना देखील. तो कसल्याशा जोमदार कल्पनेंबरोबर
तीरासारखा तेथून बाहेर निसटला व शून्य चित्ताने मार्गातून एकएक पाऊल
टाकोत मंद गतीनें चाल लागला. “ अपरूपाराणी इतकी पाषाणहृदयी आहे
काय ; आणि कोयाजी तिचा साथीदार. करुणाराणीसाहेबांना संकटाच्या
गर्तेत लोटण्यासाठीं यांनींच हें कृष्ण कारस्थान रचिले असें जर महाराजांना
कळलें, तर राणीसाहेबांवरचें संकट टळून त्या अपराध्यांना योग्य शासन व्हाव-
याला उद्यीर लागणार नाहीं. पण ही कामगिरी कोणीं करावी ! माझ्या-
सारखा सामान्य सेनिक महाराजांपाशीं जाऊन त्यांना हा प्रकार सांगूं लागला
बस्तर महाराज त्यावर विश्वास कसा ठेवतील ? बरें; महाराजांना न सांगावे
तर ही दुष्ट जोडी राणीचा व त्याबरोबरच महाराजांचाहि समूळ सत्याताश
“केल्याखेरीज रहाणार नाहींत. तो दीड दमडीचा कमअस्सल सयाजी राज-
वाड्यांतील एका बटकीचा पोर तंजावरच्या गादीवर बसलेला ह्या कुलटेला
'पाहवतो, यावरून मला संशय येतो कीं, खऱ्या राजवटीचा लवलेशहि या
चांडाळणी'च्या अंगीं नसावा. तंजावरच्या सबंध राजकारणाची आजवर
-वाताहात करूनहि हिचे समाधान झालें नाहीं, म्हणून ही आतां परक्या शत्रूला
११२ पेशवाईचें मन्वंतर
सामील होऊन तंजावरच्या राज्याला कायमची मूठमाती देऊं पहात आहे!
पण म्हणावे, तंजावरची हिंदु रयत असल्या कुटिल कारस्थानांत सहज फंसली
जाण्याइतकी भोळसट किवा प्रमादकारक राजाज्ञेला बळी पडण्याइतकी
षंढ खास बनली नाहीं. ” तो मध्येच एकाएकीं थांबला आणि डोकें खाजवीत
स्वतःशीं पुन्हां विचार करण्यांत गढून गेला, “ मीं याच पावलीं माघारा जाऊन
त्या दुकलीला ठार केलें तर काय होईल ? महाराज, करुणा राणीसाहेब यांच्या-
वरचें एक जिवंत संकट टाळल्यासारखें होणार नाहीं काय ? ” तो पुन्हां थांबून
पुन्हा स्वतःशीं विचार करूं ्लागला, “ पण ही एक दुक्कल जगांतून नाहींशी
झाल्याने महाराजांची संशयनिवृत्ति कशी होगार ? आणि त्यांची संशय-
निवृत्ति झाली नाहीं तर राणीसाहेबांवरचें संकट कसें टळणार ? महाराज
इतके ज्यासाठीं संतापळे व निष्ठ्र बनले त्या प्रासादिक तरवारींचाहि सुदेवानें
आतां तपास लागल्यासारखाच आहे. परंतु ही अपरूपा अवदसा महाराजांच्या
विशवासांतील पडली; तिला ठार मारून, तिचा अपराध मी महाराजांपाशीं
कसा शाबीत करूं | चंदासाहेबापाशीं प्रासादिक तलवारी आहेत असें मीं
टाहो फोडून महाराजांना सांगितलें तरी त्यांना तें खरें वाटणार नाहीं; उलट
माझ्यावर मात्र करुणा राणीसाहेबांना फितूर असल्याचा आरोप करण्यांत
येईल आणि ह॒कनाहक माझा संशयाच्या भरांत बळी घेतला जाईल. देश्यापरी
देशाची सेवा घडणार नाहीं, राजापरी राजाची सेवा घडणार नाहीं, राणीपरी'
राणीचें रक्षण हातून होणार नाहीं. अ्या कवडीमोलाने स्वत:चे जीवित
विकण्याइतका मी टाकाऊ मनष्य आहें काय? ” हे शब्द मनाशीं उच्चारतांना
त्या सैनिकाचे डोळे विस्फारित झाले होते व सर्वांग पुलकित झालें होतें. जणू
काय एखादी दिव्य शक्ति आपल्या अंगांत उत्पन्न झाली आहे, अश्या आत्म-
विश्वासाने उभा राहून तो परिस्थितीचे अंतनिरीक्षण करीत होता. ह्या
विचारांच्या ओघाबरोबर आपण कोठें वहात चाललों आहोंत व आतां कोठें
थांबलो आहोंत याचें देखील त्याला भान नव्हतें. तो स्वतःला पूर्णपणें विसरला
होता. आणखी थोडा वेळ तो तसाच गूढ विचारांत रंगलेला असतांनाच
रस्त्याने पुढे पुढ चालत गेला तोंच एका वृक्षाच्या बुंध्याशी त्याला कसली तरी
छाया दिसली व कांहींशीं चाहुळ लागली. ती रात्रीची भयाण वेळ असल्यानें
व ती जागाही निर्जन असल्यानें त्या सेनिकाला तो संशयित प्रकार पाहून
प्रसादचिन्हांचा सुगावा ११३
दचकल्यासारखें झालें. तो मनांत म्हणाला, “ येथें कोणी भतपिश्याच्च तर
नसेल कीं शत्रूचा कोणी मनुष्य येथें दबा धरून तर बसला असेल! ” असे प्रश्न
मनाशीं विचारीत विचारीत तो पुर्ण भानावर येऊन समोर पाहूं लागला, तों
त्याला दिसून आलें कों आपल्याला जी छाया दिसली ती केवळ छाया नव्हती,
तो एक घोडा वृक्षाच्या बुंध्याशी बांधळेला होता.
अर्थात् येथे जवळपासच त्या घोड्याचा मालक असला पाहिजे, असें त्या
सैनिकाच्या मनानें घेतलें व तो कोण असावा हें जाणण्याची जिज्ञासा त्याच्या
मनांत उत्पन्न झालो. त्याबरोबर, तो जर शत्रू असेल तर मात्र आपणांवर
कठीण प्रसंग ओढवला, या भीतीनेंहि त्याच्या मनांत थोडीथोडी कालवा-
कालव सुरू केली. त्याला एकदां मन सांगे पुढें जावें, तेथें कोण आहे हें पहावें
व कोणी नसल्यास त्या घोड्यावर मांड टाकून आपल्या मकाणाकडे निघून
जावें. तो सेनिक बराच श्रमलेला असल्यानें श्रमपरिहाराचा हा उपाय त्याला
प्रथम सुचला. पण त्याबरोबरच आपण पुढें गेल्यास आपल्या प्राणांवर तर
बेतणार नाहीं ना, असा प्रश्न त्याला तेंच मन निराळ्या भाषेंत विचारू लागलें.
आतां काय करावें आणि काय न करावें अश्या विचारानें त्याचें मन गोंधळून
गेलें. तोंच त्या झाडाच्या बृध्याजवळून कोठून तरी त्याला खड्या आवाजांत
सवाल केला गेला, “ कोण आहे. ?”
तो प्रश्न ऐकून त्या सेनिकाच्या मनाला अंमळ धक्का बसल्यासारखा झाला.
तो जरी भित्रा नव्हता तरी अचानक प्राप्त झालेल्या बिकट परिस्थिती-
मुळें तो गोंधळल्यासारखा झाला एवढें खरें. तो जागच्या जागीं स्तब्ध उभा
राहिलेला पाहून त्याला पुन्हां पूर्ववत् सवाल टाकला गेला, “तू कोण
आहेस ? लवकर उत्तर दे, नाहींतर प्राणाला मुकशील. ”
पुर्वीचा तोच हा देखील स्वर खरा, परंतु पूर्वी त्या सेनिकाला त्याची जी
ओळख पटली नव्हती ती आतां ओझरती तरी पटली. तो चार पावलें पुढें
येऊन चौकशी करणार, तोंच हातांत तळवार घेऊन एक धिप्पाड पुरुष अक-
स्मातू त्याच्या समोर येऊन उभा राहिला व तलवार उगारून दरडावून
त्याला विचारू लागला, “ तू कोण आहेस? ”
“ कोण मानाजीराव ? ” त्या सेनिकाने आश्चरयंपूर्ण पण कांहींशा निर्भय
वृत्तीने विचारलें. त्या प्रश्नांत असें काय अजब देवी सामर्थ्यं होतें न कळे,
टू
११४ पेशवाईचे मन्वंतर
समोरच्या तरुणाच्या हातांतील तलवार आपोआप हळुहळू खालीं आली व तो
त्या सेनिकाकडे निरखून पाहूं लागला.
अंमळशानें त्या तरुणाने-परंतु तो मानाजीराव होता हें आतां आपणाला
माहीत झालेंच आहे. त्याअर्थी त्याला त्याच नांवानें ओळखण्याला आपणाला
हरकत नाहीं. मानाजीरावानें त्या सेनिकाकडें कांहीं क्षण निरखून पहात
पुर्वीपेक्षा सोम्य शब्दांत विचारलें, “संभाजी, तूं का तो ? बहुधा मला
करुणाराणीसाहेबांना पकडण्याच्या कामगिरीवर तुझी योजना झाली असेल! ”
“ पण हें तुम्ही कशावरून ओळखलें ? ”
*“ त्यांत अवघड काय आहे ? तुम्ही सयाजीरावाचे पक्षपाती व कोयाजी
घाटग्याचे त्रद्ृणातुबंधी ! तुम्हीं राजांचे अन्नच खाऊत त्यांच्या नाशासाठी
झटलां नाहीं तरच आडचर्य !
“ तुम्ही म्हणालां ती गोष्ट खरी आहे. परंतु हा संभाजी मात्र त्याला
अपवाद आहे. निदान आतां तरी तो अपवाद ठरला आहे. यापुर्वी मी असल्या
हीन कामगिरींत सामील झालों तो केवळ फंसून, पण प्रत्यक्ष महाराजदेखील
जिथें कोयाजी' आणि अपरूपा राणी यांच्या कृष्ण कारस्थानाला बळी पडले,
तिथें माझ्यासारख्या य:करिंचत् माणसाची काय कथा? ”
“ बरें; आतां मला ही वायफळ गप्पांची लांबड नको आहे. तूं अद्या अप-
रात्रीं इकडे कां व कसा आलास त्याची मला खात्री करून दे, तरच तुझ्या
शब्दांवर माझा विश्वास बसेळ; नाहींपेक्षां तुला शत्रू समजून मला तुझें पारि-
फत्य करावें लागेल.” मानाजीराव उद्गारला.
“ आणि तुम्हांला कालत्रयींहि न मिळणारी माहिती मीं पुरवली आणि
त्यामुळें महाराजांच्या आणि राज्याच्या तरणोपायाचा राजमार्ग तुम्हांला
सांपडला तर तुम्द्री मला काय बक्षीस देणार?” संभाजीनें निर्भयपणे विचारलें.
त्याचा हा प्रश्न अर्थातच विनोदाचा होता. त्याच वेळीं त्यानें सखोजीकडून
आपली ह्या कामगिरीवर कशी नेमणूक झाली हा वृन्तातही निवेदन केला.
सखोजी देखील आपणावर उलटला याचा मानाजीला विस्मय वाटला. पण
तो त्यानें बाहेर दाखविला नाहीं. तरी बरें कीं महाराजांचे मन खरोखर किती
कलुषित झालें आहे याची संभाजीलाही माहिती नसल्यामुळें तो वृत्तांन्त
मानाजींला कळला नाहीं. त्रो कळला असतां तर त्याला षपराकाष्टंचा खेद
प्रसादचिन्हांचा सुगावा १ १"
झाला असता. असो. संभाजी आपण होऊनच पुढें म्हणाला, “ पण मानाजी-
राव, इतर कशावर नाहीं तरी माझ्या अस्सल हिंदुत्वावर-नेकजात मराठे-
'पणावर तरी तुमचा विश्वास असला पाहिजे. खऱ्या मराठ्याची' ओळख
खऱ्या मराठ्याला नाहीं, असें आजवर कधीं तरी झालें आहे? अपख्पा आणि
कोयाजी यांच्या कृष्ण-कारस्थानाचें बिंग मला अचानक कळून चुकले आहे-
त्यांना पायबंद कसा घालावयाचा याच चितेनें मला इतका वेळ घेरले होतें.
तोंच तुम्ही भेटलां, परमेश्वर पावला ! मीं जर त्या दोघांचा बेत आपणाला
सांगितला तर त्यांचा या क्षणीं बंदोबस्त करण्याची तुमची तयारी आहे काय?”
“ सांग, मला प्रथम त्यांचा पत्ता सांग. मी पुढच्या सवं गोष्टी' पहातों. ”
“ परंतु त्यांना दुखवणें म्हणजे सर्पाच्या शेपटीवर पाय टाकण्यासारखें
आहे हें तुम्ही जाणतांच. जर का तुमच्या हातून त्यांचें पारिपत्य झालें नाहीं,
तर तुमची आमची धडगत नाहीं हें पक्के समजा. ”
“त्याची काळजी तुला नको. सर्पाशीं खेळतांना त्याचे दांत पाडून खेळावें
एवढें व्यवहारज्ञान मला आहे; आणि दांत पाडण्याची कलादेखीळ भला
अवगत आहे. तूं मला फक्त त्यांचा पत्ता सांग म्हणजे झालें. ”
“ चला तर माझ्या मागोमाग. ” असें म्हणून संभाजी पुढें चाळू लागला.
मानाजीरावानें आपला घोडा झाडाच्या बुंध्यापासुन सोडून संभाजीच्या
मागोमाग आपल्याबरोबर चालविला. बरेंच अंतर चाळून गेल्यावर एका
पडक्या घराच्या आडोशाला संभाजीनें मानाजीरावाला नेलें व सांगितलें,
* आपल्या घोड्याला थोडा वेळ या ठिकाणीं डांबून ठेवा. किवा असें करा,
तुम्ही देखील येथेंच थांबा; मी एकवार चाहूल घेऊन येतों.
संभाजीने इतका मनमोकळेपणा दाखविला तरी देखील मानाजीराव
त्याच्यावर पूर्ण विश्वास टाकण्याला मनापासून राजी नव्हता. न जाणो, हा
राणीचा पक्षपाती, राणीला आपल्या आगमनाची खबर देऊन आपणाला
गोत्मांत आणणार नाहीं कशावरून? असें स्वतःशीं म्हणून ती संभाजीच्या
बरोबर चालू लागला. त्याला संशय येऊं नये म्हणून मानाजीनें आपल्या
कृतीचे समर्थन केलें, “ तुझ्याविषयी जर राणीला संराय आला असेल तर
ती तुला दगा दिल्याशिवाय रहाणार नाहीं. अश्या वेळीं एकाला दोन भाणसें
बरोबर असलेली बरीं. चल मीहि तुझ्यावरोबर येतों. ”
११६ पेशवाईचे मन्वेतर
संभाजीनें यावर जास्त आढेवेढे घेतले नाहींत. ते दोघेटि साजथगिरीनें
त्या विशिष्ट स्थळीं जाऊन पोहोंचल व जवळच्या गर्दे लाटींत लपून बसून
को न
तेथून त्य़ा मंडळीच्या हालचाली अवलोकन करू लागळे. तोंच ती मंडळी
पूढील मकाणाकडे निघण्याच्या तयारींत आहेत असें त्या दोषांना आढळून
आलें. त्या ठिकाणीं कांहीं लोकांच्या हातांत मशाली तेटबिळेल्या त्या दोघांना
दुरून दिसल्या, व अपर्पा राणी आणि कोयाजी हीं दोघेही दोन घोड्यांवर
स्वार झालेलींही त्यांनीं पाहिली.
““ही मंडळी तर निघाली 1 आतां कसें करावयाचें ? " संभाजीने माना-
जीला हळूच विचारले-
“ आता आपण असें करू, तूं हया मंडळींच्या मागोमाग राठ्न त्यांच्यावर
नजर ठेव; तोंबर मी त्य़ांचा बंदोबस्त करण्यानी तजवीज करतों. तुळा
जर शक्य असेल तर त्यांचा रोख कोणीकडे आहे याजी माटिती काढून मला
कळव. मी आतां जातों. ' असे म्हणून मानाजीराय मागे पसन चपळाईने
आपल्या घोड्यावर स्वार झाला.
“ चरंतु आतां तुमची माझी भट पुन्ट | कोडे होणार ? " संभाजीने विचारठे.
“ तुझी माझी मेट ! " मानाजीराव जातां जातां किवित् विचार करून
उद्गारला, “ बहुधा ही मंडळी कांचनगडच्या र गाने चाळी असाधी.
कारण अशा अपरात्री त्यांना अन्स ड्िकाणीं जातां येणे शक्यच नाही. कांबन-
गडचा किल्ळेवार अपख्पाराणीचा पक्षपाती आठे हे मठा माहीत आहे. तेथे
आपल्या कारस्थानाची उभारणी करण्यासाठीं ही सर्वे चांडाळ माणसे जमणार
असती असा माझा तर्क आहे. पणती कोळी जाणार असळी तरी तं कान
गडच्या अळीकडे हमरस्त्मानरच एत धर्मशाळा आरे, तेथन गा बाजरडा
जो मार्ग फुटतो त्या मागनिं वळलास, कीं तुळा पाथ कासाच्या अवरावर एक
देवाळय लागेल व त्या ठिकाणीं कांडी बेरागी तमी पेटयन बसकड तुळा आढळ,
तीळ. त्यांना तू खबर द म्हणजें मळा ती बळीचे मिळेल. त् शक्य तर तॅथच
थांब, किवा त्या मंडळीचा अखेरपर्यंत तुळा पाठलाग करता आला तर फारच
चांगले झाले. तुला घोडा पाहिजे असला तरत्ता देैवाठगातील बराग्यांता
सांग, म्हणजे ते तुझी व्यवस्था करतील. कदाषित् तू. अनीळणी म्हणून नै
तुझ्याशी विश्वासाने बोलणार नाहींत; यास्तव तू ही लण आपणापाशीं
प्रसादर्चिन्हांचा सुगावा ११७
उव आणि त्यांना ती दाखीव, म्हणजे बिनभोबाट सर्वे कामें होतील. ” असें
म्हणून मानाजीरावानें एक खुणेचें चिन्ह आपल्या कमरपटचांतून काढून
संभाजीला दिलें. त्या चिन्हावर काय खोदलेले होतें हें काळोख्या रात्रीं संभा-
जीला कळण्याला कांहींच मार्ग नव्हता. त्यानेंही तें जाणण्याचा प्रयत्न केला
नाहीं. मानाजीरावाला जरी त्याच्याविषयीं संशय वाटत होता, तरी त्याला
मानाजीरावाच्या उज्ज्वळ राजनिष्ठेबद्दह ब विश्वासूपणाबद्दळ लवमात्र
संशय नव्हता. तो अत्यंत आज्ञाधारक सेवकाप्रमार्णे मानाजीची आज्ञा
शिरसावंद्य मानून तेथून पुढे निघाला व मानाजीरावानेंहि आपल्या घोड्याला
टांच मारली. त्या काळोखाच्या गर्दीत संभाजीने अनेकवार मार्गे वळून पाहिलें.
परंतु मानाजीरावाचा घोडा कोणत्या दिशेला चालला होता हें कांहीं त्याला
कळलें नाहीं. त्यारनेंह्रि त्याविषयी जास्त उत्सुकता मनांत बाळगली नाहीं.
केवळ वरिष्ठांच्या हुकुमाची तामिळी करावयाची, यापेक्षां जास्त भानगडींत'
पडावयाचें नाहीं, अशा शिस्तीचा शिपाईगडी तो होता.
संभाजीच्या मनांतून त्या मंडळीचा तपास काढून, मानाजीरावानें सांगित-
त्याप्रमाणे इत्थंभूत बातमी काढावयाची होती. परंतु त्याला त्या मंडळी-
पासून आपलें अस्तित्व गुप्त राखतां आले नाहीं. त्याला आपल्या मनांतील
प्रामाणिकपणा मनांत ठेवून बाह्यात्कारी तरी त्या मंडळीच्या तंत्राने वागणें
भ्राप्त झालें.
“ संभाजी, इतवा वेळ तूं कोठे होतास ? ” कोय़राजीनें संभाजीला अचानक
आलेला पाहून विचारलें.
संभाजीने प्रसंगावधानपूर्वक उत्तर दिलें, “ धनी, मी स्वतःला कांहीं करा-
मत दाखवतां आली तर पहावी म्हणून शत्रूच्या तलासावर गेलों होतों
मर्ग, कांहीं तलास लागला का? ” अपख्पाराणीनें उत्सुकतापूर्वक
संभाजीकडे पद्टात विचारलें
या प्रश्नाला आतां काय उत्तर द्यावे, याविषयी क्षणभर संभाजीच्या मनांत
गोंधळ 'उडाला. परंतु दुसऱ्याच क्षणाळा तो तोंडाला आलें तें कांहींतरी उत्तर
देऊन मोकळा झाला, “ करुणाराणी व भझंंजारराव यांचें वास्तव्य सध्यां
कांचनगडावर असावें असा सुगावा मला लागला आहे.
“ आम्हांलाहि तोच संशय होता व म्हणूनच आम्हीहि तिकडेच चाललों
११८ पेशवाईचें मन्वंतर
“६.४ ५-./५/५-/%/५-५/* “४४४ «८४२ /* “7-८. “४.” “५. “४.८.” ८४ “१७ ७ /९१ ८ _/ "७
होतों. त्याला तुझ्या या बातमीने बळकटी मिळाली. ” कोयाजी म्हणाला.
त्या मंडळींना कांचनगडाकडे झुकवून मानाजीरावाच्या हातून त्यांचा
परस्पर बंदोबस्त होईल अशी व्यवस्था करावी म्हणून संभाजी सहज कांचन-
गडचा उल्लेख करून गेला. परंतु आतां त्याला हुरहूर वाटूं लागली कीं,
ह्या मंडळीच्या माहितीप्रमाणे खरोखरच जर करुणाराणी कांचनगडावर
असेळ, तर तिला ह्या चांडाळाच्या जबड्यांत लोटण्याचें पातक आपणाला
लागेल! परंतु एकवार तोंडांतून शब्द गेला, आतां तेथें संभाजीचा तरी कायः
इलाज होता! त्यांतल्या त्यांत तेवढ्यांत अपरूपाराणीनें कांचनगडच्या रोंखाने
पुढें जाऊन आपल्या सैनिकांनिशीं गडाची नाकेबंदी करण्याची कामगिरी त्याला
सांगितली, तेवढेंच त्याला समाधान वाटलें.' आपण जलदीने पुढे जाऊन जर
करुणाराणी तेथें असेळ तर तिला ताबडतोब सुखरूपपणे गडाच्या बाहेर काढून
देऊं असा त्याचा मानस होता.
परंतु कोयाजीनें त्याला अपशकून केला. त्याला संभाजीविषयीं संशय
आला म्हणून कीं काय न कळे, तो मध्येंच म्हणाला, “चल, मीहि तुझ्याबरोबर
येतों. न जाणों, किल्लेदार जर करुणा राणीला फितूर झाला असला तर तेथें
तुझा एकट्याचा पाड लागावयाचा नाहीं. ”
आतां प्राप्त परिस्थितीला मुकाट्यानें तोंड देणे संभाजीला प्राप्त होतें.
लगेच कोयाजी सैनिकांच्या एका तुकडीसह कांचत्तगडाकडे वळला व संभाजी-
लाहि त्याच्या बरोबरच जावें लागलें.
प्रकरण १६ वें,
करुणाराणीवर संकट !
वि शशश॒ाबाडआजजबखअाबाकककििबबशुशावावावाार बाय
काँ कांचनगड वरवर दिसावयाला जरी सामान्य किल्ला होता, तरी त्याला
ऐतिहासिक महत्त्व फार होतें. खुद्द किल्ला पहिल्या प्रतीचा लढावू नसला
तरी नकेबंदीच्या दृष्टीनें त्याचें महत्त्व कोणत्याहि पहिल्या प्रतीच्या लढावू
किल्ल्याइतकें होतें. दमलचेरीच्या घाटांत* शिरतांना व पुढील प्रवास
करतांना, ज्याप्रमाणें तेथल्या स्थायिक सत्ताधाऱ्यांना कांचनगड हा साक्षात्
परमेश्वर आपल्या पाठीशी उभा आहे असें वाटे, त्याप्रमाणेंच शत्रु
त्या तोंडानें गड चढून येऊं लागला किवा विरुद्ध दिशेनें गड ओलां-
डून येऊं लागला, तर हा प्रत्यक्ष कर्दनकाळ आपला अक्राळविक्राळ जबडा
पसरून आपणाला गिळंकृत करावयाला उभा आहे कीं काय, असें वाटून
शत्रूची छाती दडपून जाई. तेव्हां थोड्याच दिवसांपूर्वी दमलचेरीच्या घाटांत
मराठे आणि अर्काटचा नबाब यांची जी धुमश्चक्री झाली त्या प्रसंगीं कांचनगड
* इ. स. १७४० मध्यें शाहू महाराजांनीं भराठ्यांची जंगी फोज
रघूजी भोंसले वगेरे शूर सरदारांच्या नेतुृत्वाखालीं कर्नाटकांत अर्का-
टचा नबाब दोस्तअल्लीखान याच्याशीं सामना देण्यासाठीं रवाना केली.
तें सर्वे सेन्य त्या वर्षाच्या एप्रिल महिन्यांत अर्काट प्रांतांत येऊन दाखल झालें.
ते पाहून नबाब दोस्तअल्लीखान हा मराठ्यांशीं टक्कर देण्यासाठीं कडप्पा
आणि अर्काट या दोन जिल्ह्यांच्यामध्यें दमलचेरीचा जो घाट आहे ती सुरक्षित
जागा समजून तिथें आपले चार हजार घोडेस्वार व सहा हजार पायदळ घेऊन
दाखळ झाला. उभय पक्षांचे त्या घाटांत घनघोर युद्ध झालें. त्यामध्यें
मराठ्यांनी विश्षेष शौर्य गाजविले व अद्वितीय यश संपादन केलें. नबाब
दोस्तअल्लीखान पतन पावून शत्रूच्या हस्तगत झाल्यामुळें त्या सर्वे संन्याची
दाणादाण उडून गेली व तें सेरावेरा पळून गेलें. त्यामुळें मराठ्यांना अर्काट
प्रांतांत इतस्ततः आपला अंमल बसवतां आला.-इतिहाससंग्रह (तंजावरचे
राजघराणें. )
१२० पेशवाईचे मन्वंतर
मराठ्यांच्या हातीं आला. त्यापूर्वी तेथें अर्काटच्या नबाबाची सत्ता होती.
तो गड हातचा जाऊं नये म्हणून नबाबानें आपलें सहस्रावधी सेन्य इरेला
घातलें व मराठ्यांनींहि त्या गडाचें महत्तव ओळखून आपल्या नेकजात कडव्या
सेनिकांच्या प्राणांची पर्वा न करतां त्यांच्या रक्ता-मांसाचा चिखल करून,
किल्ला सर करण्याची वाट बांधून काढली, असें म्हणावयाला हरकत आहों.
नबाबावर विजय मिळवून देण्याच्या कामीं कांचनगडाचा इतका उपयोग
झाल्यामुळें मराठ्यांना तो गड आपल्या एखाद्या पुरातन देवालयाइतका
पवित्र वाटूं लागला होता.
परंतु पेशवाईतील उलाढालीच्या निमित्ताने, मराठ्यांच्या कर्नाटकांतील
सर्व हालचाली थांबून त्यांच्या सेन्याचा तळ शिवगंगेळा पडल्यापासून भ्रट्या
शत्रूंना पुन्हां दमलचेरीच्या घाटांत व त्याच्या आजूबाजूला दंगामस्ती करा-
वयाला हळुहळू फावूं लागलें होतें. त्यांतच कांचनगड्च्या बाटग्या मुसलमान
किल्लेदाराच्या नीचवृत्तीची भर पडन मराठ्यांचें-नव्हे, हिदवी-सर्वेस्वाचें
काळीज पोंखरून खाणार्या शत्रुशक्तीला तेथें हळुहळू आपलें ठाण मांडण्याला
अवकाश मिळाला होता. भमीरकासीम हा वास्तविक केवळ मराठ्यांच्या
जिवावर, आणि तोही दमलचेरीच्या घाटांतील लढाईत उदयासं आलेला.
त्यानेंच घाटांतील अनेक गुप्त मार््याच्या जागा व महत्त्वाच्या गुप्त वाटा
मराठ्यांना दाखवून देऊन त्या मोबदल्यांत तेथली किल्लेदारी मिळविली होती.
पण मराठ्यांना त्या दगलबाज मीरकासीमचा खरा स्वभाव काय माहीत!
तो जो मूळचा मराठा असतांना बाटून मुसलमान झाला होता, तो केवळ नबा-
बाची मर्जी संपादन करून सानमान्यता मिळवण्यासाठीं. त्याचीच गोष्ट
कश्याला? आणखी असेच कांहीं कुऱ्हाडीचे दांडे गोताला काळ होऊन बसलेले
होते त्यांतळा तो एक. त्यानें बाटून त्या बाटगेपणाच्या जोरावर नबाबाच्या
पदरीं शिलेदारी मिळवली होती. मराठे आणि नबाब यांचा सामना जपून
त्यांत नबाबाची धडगत नाहीं असा रागरंग दिसूं लागतांच तो विश्वासघातकी
लगेच नबाबाच्या विरुद्ध मराठ्यांना सामील झाला, आणि आतां मराठेहि किल्ला
आपल्या स्वाधीन करून तेथून सातार््याकडे निघून गेलेले पाहतांच त्याला
अशी हांव उत्पन्न झाली होती, “ आपण जन्मभर एवढ्या लहानश्या किल्ल्याचे
किल्लेदारच कां म्हणून रहावयाचें ! केव्हांपासून नबाब तिकडे फजीत पावून
करुणाराणीवर संकट १२१
*५४..४%./ ९.४५./१९.,/४.४११../१, ४. /४./४६. ४९.५४” ४१.” /५/0-४५१-४१५०/४-/ ४०-८४”. 00५ 0.”
हाय हाय करीत बसला आहे व मराठे घरचें भांडण भांडण्यासाठीं कर्नाटकांतील
मोहीम अर्धवट सोडून सातार््याकडे निघून गेले आहेत. यावेळीं आपणांला
लहानसे स्वतंत्र राज्य स्थापून दमलचेरीचा छोटासा सुलतान व्हावयाला
ही संश्रि फार नामी आहे.” आणि त्यानें त्या रोंखारने आपले सारे उपद्व्याप
चालविले होते. तो वृत्तान्त वाचकांना पुढें कळेलच. तृ्त येथें एवढें निवेदन
केलें म्हणजे पुरे कीं, कोयाजी आणि अपरूपाराणी यांच्या विषयींचा मानाजो-
'रावाचा तके कांहीं खोटा नव्हता. त्याच्या अटकळीप्रमाणें ती मंडळी रातोरात
नेमकी कांचनगडच्या रोंखानेंच गेली होती.
त्यावेळीं कांचनगडावर त्या काळोख्या रात्रीलाही लाजविणारा निराळाच
भयंकर काळोखा प्रकार चालला होता. पूर्वोक्त दुरात्मा मीरकासीम एका असहाय
सुंदरीला किल्ल्यांत कोंडून तिच्या अबरूवर घाला घालण्यासाठी टपून बसला
होता. मात्र बाहेरच्या मंडळींना त्या प्रकाराची दाद लागणें शक्य नव्हतें.
राजे लोकांच्या राजवाड्यांत काय, किवा अद्या थोरामोठ्यांच्या घरांत काय,
नेहमींच अश्या कांहीं अनन्वित गोष्टी घडत असतात कीं बाहेरच्या जगाला
त्याची दादही नसते. त्यांतलाच प्रकार त्या रात्रौ चालला होता. कोयाजी
व अपख्पाराणी यांच्या अटकळीप्रमाणें करुणाराणी व झुंजारराव दोघेहि
'त्या किल्लेदाराच्या आश्रयाला आल्याला पुरे चार प्रहरहि लोटले नाहींत,
तोंच मीरकासीमनें करुणाराणीचा छळ मांडिला होता. त्या छळाचें वर्णेन
स्वत:च्या शब्दांत देण्यापेक्षा त्यांच्या संभाषणांतच देणें इष्ट होय.
करुणाराणी व झ्ंजारराव हीं अकस्मात् घाबरींघुवरीं होऊन किल्ल्यावर
जीं आलीं तों मराठ्यांच्या आधाराला म्हणून आलीं; आणि भीरकासीमनें
त्यांना, आपण सराठ्यांचा किल्लेदार या नात्यानेंच आश्रय दिला.
*“* इतके भिण्याचें कारण काय? ” असें विचारतां झुंजाररावानें तंजावरचे
सैनिक कांहीं भयंकर गेरसमजुतीनें आपल्या व करुणेच्या मागें कसें हात
धुवून धांवत आहेत हें त्याला निवेदन केलें. आणि मीरकासीमनें शाब्दिक
सहानुभूति दाखवून त्यांचें रक्षण करण्याचें अभिवचन देऊन त्यांचें तोंडदेखलें
-समाधानहि केलें. पग रात्रीच्या वेळीं अकस्मात् तो सेतान चार सदस्त्र
सैनिकांना वरोवर घेऊन, करुणाराणी व झुंजारराव यांच्या वसतिस्थानाकडे
आला, तेव्हां सहाजिकच त्या दोघांना वाटलें कीं हा काय प्रकार आहे!
“0४-११. /११
१२२ पेशवाईचें मन्वंतर
“ मीरकासीम, तूं हें काय आरंभिलें आहेस ? ” करुणाराणीनें विचारले.
पण मीरकासीमनें करुणाराणीला उत्तर न देतां आपल्या सैनिकांना एकदम
आज्ञा केली, “ याला केदखान्यांतील अंधारकोठडींत नेऊन डांबून ठेवा. ”
करुणाराणी व झुंजारराव यांना त्याचा अर्थच कळेना. तीं जास्तच
घाबरलीं. झ्ुंजारराव शांतपणानें मीरकासीमला म्हणाला, “ मीरकासीम,
हें कोणींतरी कांहींतरी तुझ्या कानांत विष ओतलेलें दिसतें. परंतु त॑ असा
अविवेक करणें बरें नाहों. ”
“ थेरड्या, मीं काय करावें आणि काय न करावें हें मला चांगलें कळतें.
तुझ्यासारख्या निमकहराम फितुरानें तें मला सांगावयाळला नको आहे. त॑
जास्त बोलशील तर तुझी जीभ छाटून कलम केली जाईल, लक्षांत ठेव. तूं
आजपासून माझा बंदिवान् आहेस, व तंजावरच्या राजाकडून तुझा न्याय
होईपर्यंत तुला माझ्या बंदिवासांतच रहाणें प्राप्त आहे. ” असें म्हणून त्यानें
आपल्या शिपायांना झुंजाररावाला बंदिवान् करून अंधारकोठडींत नेण्याची
पुन्हां आज्ञा केली. त्या आज्ञेची अंमलबजावणीहि तेव्हांच झाली. प्रतापसिह
महाराजांकडून किल्ल्यावर बंदोबस्ताचा हुकूम आला असावा असें मनांतल्या
मनांत उमजून, झुंजारराव कर्माला दोष देत तेथून जातां जातां एकवार
अधूंनीं डबडबलेल्या नयनांनीं करुणेकडे पाहून उद्गारला, “ करुणे, आतां तुझें
रक्षण करणारा एक परमेश्वर मात्र आहे. माझ्याकडून जेवढे प्रयत्न करण्या-
सारखे होते तेवढे मीं केळे. परंतु आपलें दुर्देव त्या प्रयतलांपेक्षां बलवत्तर
ठरले, त्याला आपला काय इलाज ! आतां परमेश्वराचें नांव घे; तो तुला
अश्या संकटाच्या वेळीं हात देईल. ” झंजारराव आणखीहि कळवळ्याचे शब्द
बोलला असता, परंतु तेवढ्यांत शिपायांनी त्याला फरफटत ओढीत नेल्यामुळें
त्याचा नाइलाज झाला. तरीहि जातां जातां तो अंतःकरणाच्या ओढीने
आपले सवे सामथ्ये नेत्रांत एकवटून करुणेकडे पहात होता व करुणाहि तश्याच
जिव्हाळ्याच्या ओढीनें त्याच्याकडे पहात अश्रु ढाळीत होती. एखाद्या
जीवाचे अवयव छिन्नविछिन्न करून अलक अलग करतांना त्या जीवाला ज्या
प्रकारच्या वेदना होत असतील त्या प्रकारच्या वेदना करुणा व झुंजारराव'
यांच्या संलग्न आत्म्याची चिरफाड चालली असतां त्या दोघांना होत असतील.
परंतु त्यांची दाद कोण घेणार !
करुणाराणीवर संकट १२३
'“९४०-/४५०/१७-४-१.७१%. ८१७. ४४७४१ ४८७४४७० ७७४६८७७४१७ ७७ २८०११ ७४0९. ४६.०७१०७ ७ ७.५६ ७७०७७७ .७४ ४ ७७०७ ..४ ७.४७... _/०. ४७%,» ७. ७७४४४४ 0७.७४ “79 20७४९ ७-४ .»0. ७ ४ ७.७१. ८४0७४0७ ७0 कत आ फल
जी यी
मीरकासीम निश्चल दगडी पुतळ्याप्रमाणें करुणेसमोर उभा होता. त्याच्या
मनावर त्या पाषाणालाहि पाझर फोडणाऱ्या करुणामय दृश्याचा यत्किचितहि
परिणाम झाल्यार्चे करुगेला आढळेना. परंतु तिला वाटलें, महाराजांचा सक्त
हुकूम आला असेल, आणि त्या हुकुमाची तामिली' मीरकासीम करीत असेल.
तो हुकुमाचा बंदा पडला; त्याला यांत दोष देण्यांत काय अर्थ! तरीहि
ती केविलवाण्या स्वरानें त्याला म्हणाली, “मीरकासीम, या बाबतींत तुझा
दोष नाहीं हें जरी खरें, तरी त् माझ्या शब्दावर विश्वास ठेवशील तर मी तुला
ईश्वरसाक्ष सांगतें कोणीतरी महाराजांचें मन कोणीं कलषित केल्यामुळें त्यांचा
माझ्याविषयीं आणि बाबांच्या विषयीं गेरसमज झाला असावा; त्याचा हा
परिणाम असावा. महाराजांच्या ठायीं तुझी इतकी निस्सीम निष्ठा आहे
यांत मला आनंदच आहे. पण मी देखील त्याच महाराजांची अर्धांगी-तंजा-
वरची राणी-तुझी स्वामिनी आहें. तद्यांत मी यावेळीं असहाय आहें. राणी
ही रयतेची माय असते, हें नातें स्मरून निदान तूमला आपल्या पाठीची
बहीण मानून तरी पाठीशीं घातलें पाहिजेस. ”
“ असल्या मायावी बोलांनीं फंसण्याइतका हा मीरकासीम कच्च्या दिलाचा
नाहीं. राणीसाहेब, झाडावरून गळून पडलेळें फळ ज्याप्रमाणें पुन्हां झाडाला
चिकटूं शकत नाहीं त्याप्रमाणेंच तंजावरच्या राजसिहासनावरून कोणात्याहि'
कारणानें एकवार स्थानभ्रष्ट झालेली राणी पुन्हां त्या राणीपदाला पोच
शकणार नाहीं, तुम्ही पक्के लक्षांत ठेवा, एखादी निराधार सामान्य स्त्री
आणि तुम्ही यांत आतां रेसभरहि फरक उरलेला नाहीं. ” मीरकासीम पूर्ववत्
अधिकारयुक्त वाणीने म्हणाला.
“हे तुझे बोल माझ्या कानाला कसेसेच लागतात. मीरकासीम, विळ्याकाळ्या
अभांखालीं चंद्रबिब झांकून गेलें म्हणजे आकाशांतून चंद्र कायमचा लुप्त झाला
असा त्याचा अर्थे नव्हे. माझ्या आयुष्याच्या आकाशांत उत्पन्न झालेलीं व
मला ग्रासून टाकणारीं हीं संकटाची अभ्रे जशीं जमली तशीं दूर होतील आणि
मी निर्दोष ठरून माझ्या पदाला पोंचळेली तुला दिसेन. त्यांत तुला आनंद
होणार नाहीं का? ”
मीरकासीम फिदी फिदी हंसत पापी दृष्टीनें करुणेंकडे पहात म्हणाला,
“' राणीसाहेब, जो प्रश्न मी काढणार होतों तो तुम्हींच काढलात, फार आनं-
१२४ पेशवाईचे मन्वंतर
दाची गोष्ट आहे. माझ्या आनंदाविषयीं बोलाल तर माझा आनंद आतां
तुमच्या ठायीं एकवटलेला आहे. त्याच आनंदावर तुमचें पुढील सुखदुःख
अवलंबून आहे. बोला, मला आनंदी करून स्वतः आनंदी होण्याची तुमची
इच्छा आहे काय? ”
करुणेच्या कानाला ते शब्द कसेसेच कागले. मीरकासीमच्या अंत:करणां-
तील क्षुद्र पापबुद्धि त्याच्या वाणींतून डोकावूं लागलेली तिला स्पष्ट दिसून
आली. ती चिडून नागिणीसारखी' फुत्कारत उभी राहुन म्हणाली, “ मीर-
कासीभ, याद राख! -तूं पायरी सोडन वागू लागलास ! तूं कोणाशीं बोलतो
आहेस, तुला माहीत आहे ? वाविणीश्लीं असले पोरखेळ खेळणाऱ्या नरा-
धमाने प्रथम आपल्या जीवितावर पाणी सोडावें आणि मग पुढे पाऊल टाकावे.”
तरीही मीरकासीम पुन्हां निलंज्जपणानें म्हणाला, “ पण या वाघिणीचे
सुळे आणि नखें पूर्वीच उपटलीं गेलीं अ। हेत, व तशा दुबळ्या स्थितींत तिला
थिजर्यांत कोंडून मी तिच्याशी हा खेळ खेळत आहें. राणीसाहेब, मी तुम्हांला
अहो जाहोच्या बहुमानानें हांका मारतो हेंच भाग्य समजा, व हें नांव सार्थ
करावयाचें असेल तर या मीरकासीमच्या शब्दाला मान देऊन त्याला आपला
गुलाम करून सोडा. तंजावरची थोरवी तंजावरला राहिली! प्रतापसिह-
महाराजांनीं तुम्हांला मानाजीरावाच्या नांवानें दुराचारी ठरवलें असून,
त्यांच्या त्या संशयार्चे निरसन होणें आतां कालत्रयींही शक्य नाहीं. आतां
मला सांगा, महाराजांच्या कोपानलांत जळूं घातलेल्या मानाजीशीं मैत्री ठेवून,
कंगाल भिकारणीसारखें कवडीमोलाचें आयुष्य कटण्यापेक्षां ह्या कांचन-
गडच्या किल्लेदाराला तुम्ही आपला म्हटलें, तर तो तुमच्या प्रेमासाठीं-तुम्हांला
भानमान्यतेला चढवण्यासाठीं एका मनगटानें नबाबाला धुडकावील आणि
दुसऱ्या मनगटानें प्रतापसिंह महाराजांना धुडकावून स्वतःच या उभ्या कर्ना-
टकचा नवाब बनेल. तुम्हांला ही थट्टा वाटण्याचें कारण नाहीं. जगाचा
न्याय असा आहे कीं, जुनें मरावयाचें आणि त्याच्या उदरीं नवें जन्माला याव-
याचें. तंजावर काय, अर्काट काय, हे वठलेळे राजवंश आतां असेच नामदोष
व्हावयाचे, व रानोमाळ पडलेलीं आभच्यासारखीं कर्तबगार माणसें सत्ताधारी
म्हणूने पुढें यावयाचीं. ”
करुणाराणी संतापाने तडफडत, कडकडां बोटें मोडीत उद्गारली, “शिव!
करुणाराणीवर संकट १२५.
१.५०
शिव ! पाप्या, नराधमा, ज्या घरचे अन्न खाल्लस त्या घरचे वांसे तूं असे
मोजावेस काय? एका काळीं तृं त्रिचनापल्लीच्या राजाराणींना आपलीं
मातापितरें मानीत होतास, ती मी तुझी माता-नरपशू, माझ्यापाशी असे हलकट-
पणाचे उद्गार काढतांना तुझी जीभ कशी झडून पडली नाहीं ? ”
तरीदेखील मीरकासीम हंसून निलंज्जपणाची कमाल करीत होता. तो
निर्भय चित्ताने कुत्सितपणानें फिदीफिदी हंसत म्हणाला, “ राणीसाहेब,
सारीच दुनिया जर अशी खऱ्यानें चालली असती, तर या दुनियेत दुःखाचा
उगम कशाला झाला असता ? खऱ्याची एवढी प्रतिष्ठा गाणाऱ्या वेड्या
स्त्रिये, तं खऱ्यानें चालणारी आहेस ना? मग हा आपत्तीचा डोंगर तुझ्या
माथी कां कोसळला ? तें माझें ऐक, अल्लाच्या इच्छेपुढे कुणाचा कांहीं
इलाज नाहीं. अल्लाची इच्छा अशी आहे कीं हा मीरकासीम उद्यां उभ्या
कर्नाटकचा नबाब व्हावा, आणि तंजावरची राणी त्याची बेगम व्हावी. महा-
राजांच्या कोपामुळें मातीमोल झालेल्या तुझ्या आयुष्याला मी एवढी जबर
किमत द्यावयाला तयार झालों, याबद्दल तूं माझे उपकार मानले पाहिजेस !
तें सोडून तू जर अशी वाचाळता करूं लागलीस तर लक्षांत ठेव, बोललेले शब्द
कांटेतोल न्यायानें-नव्हे, त्याला आणकी पासंग लावून कृतींत वठवून दाख-
विण्याची ताकद या मीरकासीमच्या अंगांत आहे- ”
वेळ आली होती पण काळ आला नव्ह्ता. करुणाराणी मीरकासीमच्या
त्या पाशवी वासनेला हार गेली असती कोौं तिनें त्याला हरविले असतें, या
प्रश्नाचा निर्णय लागण्यापूर्वीच मीरकासीमचा एक सेवक त्याच्यापा्ली येऊन
सांगूं लागला, “तंजावरच्या थोरल्या राणीसाहेब आपल्या भेटीला आल्या
आहेत. त्यांना इकडे पाठवावयाचे का? ”
मीरकासीम तें ऐकून भांबावल्यासारखा झाला. करुणाराणीला तर
विस्मयाच्या खोल डोहांत बुडल्यासारखें भासू लागले. आजवर तिच्या मनांत
अपरूपारागीविषयीं जो आदर वसत होता, तो भोळेंपणाच्या आधारावर
अजूनहि तसाच पूर्ववत् टिकाव धरून होता. प्रतापसिह महाराजांनीं संशय-
ग्रस्तपणाने सोडलेले विचित्र हुकूम ह्या अपरूपाराणीच्या चिथावणीनें
सोडले असतील अशी शंंकाहि त्या साध्वीच्या मनाला हा वेळपावेतों शिवली
नव्ह्ती. आणि झुंजाररावहि अर्थात् तितक्याच निर्मळ मनाचा होता. करुणा-
*./४/६-४ ४-५५.0४६-४४-/१४/ ४.० ९८४ ८५% ७४१७-४९ ४.४च््
१२६ पेशवाईचे मन्वंतर
**५ ५४४४४४४४४४ ११४0४४00/४१५४१0 १0 ४१०९ ८४७0००५ ४५०४०० ०५०५०५ -०-८० ५-२ "४४४१४४४४४१ ४0४१0११४४४४ ४ टोल ४७४४ टसर ००००० > ४५%. ५ ८.
राणीला उलट अपरूपाराणी तेथें आल्याचें एकून धीर आला. ती मनांत
म्हणाली, “ सासूबाई या वेळीं माझ्या रक्षणासाठींच इकडे आल्या असल्या
पाहिजेत. देवानें त्यांना सुखी ठेवावें व त्यांच्या मुखीं उभें राहून माझा उद्धार
करावा. ' परंतु लगेच दुसर्या क्षणाला तिच्या मनांत विरोधी चिता उत्पन्न
झाली, “ पण हा चांडाळ अपरूपाराणीला तरी मान्यतेने वागवील कशावख्न ! ”
पण बिचार्या करुणाराणीच्या हातीं तरी अशी निष्फळ चिता करण्या-
पलीकडे काय होतें ! ती वार्ता ऐकतांच मीरकासीमचा मात्र कांहींसा विरस
झाला. तो मनांतल्या मनांत त्याबद्दल चडफडलाहि. परंतु नाइलाजास्तव
त्याला करुणाराणीचा नाद त्या क्षणापुरता तरी सोडावा लागला; व अपख्पा-
राणीची मुलाखत घेण्यासाठीं त्याला तेथून निघून जाणें भाग पडलें.
बिचारी करुणाराणी तेव्हां मनांत मांडे चुरीत होती कीं सासूवाईंच्या पुण्या-
ईने आपणावरील आतांचें संकट टळलें. इतकेंच काय पण ती आणखी अशीहि
जबरदस्त आशा आपल्या हृदयाशीं बाळ्गून होती कीं आवल्या पतिराजांच्या
मनांत उत्पन्न झालेलें संशयाचें वादळ आपणाला त्यांच्या मध्यस्थीने नाहींसें
करतां येईल. भोळी बिचारी ! तिला अपरूपाराणीचें कृष्णकारस्थान
व तिर्चे काळेकुट्ट अंत:करण यांची काय ओळख असणार! वाकौ एवढें
खरें कौ, करुणाराणीची पुण्याई प्रचंड पर्वतासारख्या पापराद्ींना पचनी पाडून
तिला विजयश्रीची जोड मिळवून देण्याइतकी अफाट होती. पण त्या पुण्या-
ईचा आधार करुणाराणीच्या बावरलेल्या मनाला त्यावेळीं कसा पटावा !
तिला फार तरत्या क्षणीं एवढेंच वाटलें असेळ कीं आतांचें मरण एक घटकाभर
तरी टळले.
प्रकारण १७ वें
सीरकासीसम ठार झाला!
समी कातीमने अपरूपाराणी व कोयाजी यांचें सामोरीं जाऊन यथोचित
स्वागत केलेंव त्यांना सर्व सुखसोग्रींनी सज्ज अद्या एका महालांत आणून
बसविलें. मंडळी श्रमून आलेली, म्हणून त्यांच्या श्रसपरिहाराथे डाळिबाचा
रस, सुवासिक मसालेदार सरबते वगेरे राजोपचारी सरबराई झाल्यावर
मीरकासीमनें कोयाजीला विचारले, “ आज अश्या अपरात्री राणीसाहेबांना
'घेऊन आपण इकडे कश्यासाठी बरें आलां आहां? ”
अपरूवाराणीला मोरकासीम आज प्रथमच पहात होता. ती एक उनाड
राणी आहे अशी तिची कीति फार दिवसांपासून तो एंकत होता. पण प्रत्यक्ष
भेट अशी आजचीच पहिली. परंतु सेवकाने आगाऊ वर्दी आणली' ती कोयाजी
व अपरूपाराणी यांच्या आगमनाचीच आणल्यामुळे आतां अनोळखीपगा
फारसा उरला नव्हता. तक्ांत मीरकासीम याहीपेक्षा अपरूपाराणीदीं
अदबीनें वागला असता. परंतु त्या राणीनें मराठ्यांच्या तत्कालीन गोषाचें
गांभीर्ये कायम राखून खर्या खुऱ्या राजस्त्रीसारखें वर्तन ठेवलें असतें तर!
पण ती तर एखाद्या चंचल स्त्रीप्रमाणे दिवसा व रात्रींही कोयाजीसारख्या
हलकट साथीदाराला बरोबर घेऊन हिंडत होती !
असो. मोर कासीमच्या प्रश्नावर कोयाजी उद्गारला, “ किल्लेदार,
आमच्या शत्रूला तूं आपल्या पदरीं थारा दिला आहेस अशी खबर आम्हांला
लागली आहे. हें खरें काय? ”
संभाजी निरुपायानें कोयाजीबरोबरच कांचनगडापावेतो. आला होता,
व आतां ही बित्तंबातमी मानाजीरावाला बेराग्यांच्या माफंत कळविण्या-
इतकी सवड आपणाला नाहीं तर नाहीं निळाली, एथला एकंदर प्रकार-
नजरेखालीं घालतां आला तर तोदेखील पुष्कळच फायद्याचा आहे, अशी त्यानें
आपल्या मनाची' समजूत चालविली होती. मात्र करुणा व झुंजारराव कांचन-
गडावर असल्याची लोणकडो थाप जी आपण ठोकून दिलीं, ती आतां आपल्या
१२८ पेशवाईचें मन्वंतर
आंग्राशीं येते कीं काय, हूथ! भथानें संभाजीचा जीव अगदीं मुंगीएवढा झाला
होता. तर्से झाल्यास आपणाविषयीं कोयाजीला जास्त संशय येईल कीं काय
हेंही भय त्याच्या अंत:करणाचे लचके तोडीत होतें. परंतु परमेश्वर त्याचा
साथीदार होता, त्याची भीति निराधार होती.
“ आपले शत्रु? आपले शत्र कोण? आणि त्यांना मी आश्रय कां.
म्हणून देईन ?” मीरकासीमनें संशय व भय ह्या दुहेरी दडपणाखालीं दडपून
गेलेल्या चांचपटत्या मनाला कसाबसा धीर देऊन प्रश्न केला. त्याला कोयाजी'
काय म्हणतो याचा उमजच पडेना. करुणा व झुंझारराव हे त्यांचे शत्त् कसे
हेंच त्याला कळेना. तंजावरचे सेनिक पाळतीवर असल्यामुळें तीं दोघें त्याच्या
आश्रयाळा कांचनगड हा मराठ्यांचा किल्ला म्हणून आलीं होतीं हें खरें.
पण कोयाजो व अपख्पा ह्यांची त्या दोघांशीं वेरगिरी असेल हें सहजासहजी
कोणाच्या कर्से ध्यानीं येणार ? कारण, अपरूपा प्रतापसिंह महाराजांशीं व
त्यांच्या राणीशींदेखीळ अलीकडे अत्यंत प्रेमळपणाने वागत असे असा सवेत्र
बोभाटा होता. व तो मीरकासीमच्याही कानीं आला होता.
“जे तंजावरच्या राज्याचे शत्रु ते आमचे शत्रु ” असें म्हणून कोयाजीनें
करुणा, झुंझारराव व मानाजीराव यांना रसातळाला नेण्यासाठी जें कुटिल
कारस्थान रचिले होतें, व जो सत्यप्रकार होय असें समजून प्रतापसिह महाराज-
देखील फंसून त्या निरपराधी जीवांचा सत्यनाश करण्याला सिद्ध झाले होते,
तोच सत्य प्रकार' त्यानें मीरकासीमला थोडक्यांत पण रंगदार भाषेत निवेदन
केला. भीर कासीमला तंजावरचे राज्य टिकलें काय किंवा बुडलें काय, पर्वा
तितपतच होती. कावळ्याची नजर क्षतावर असावयाची त्याप्रमाणे त्यांतली
मुद्याची गोष्ट तेवढी त्यानें ध्यानीं ठेवली कीं करुणाराणी आतां अगदीं निराधार
झाली आहे, तिला अतिप्रसंगानें आपण वश केलें तरी यावेळीं तिचा केवार
घेऊन भांडावयाला कोणीच पुढें येणार नाहीं.
अपरूपा राणीला कोयाजीच्या मुखानें करुणेची नालस्ती झाली ती अपुरी
वाटली म्हणून कौं काय, ती कोय़ाजीच्या भाषणाला उपसंहारादाखल उद्-
गारली, “तशांत आणखी राणी बद्चालीची आहे. तिच्या वास्तव्यातें
आमचा राजप्रासाद पुन्हा विटाळला जावा हें मी कधींच सहन करणार नाहीं. ”
मीरकासीमला अंमळ हायसे वाटलें. तो एका क्षणांत आपल्या मनो-
मीरकासीम ठार झाला १२९
राज्यांत भावी पापकर्मांच्या टोलेजंग हवेल्या उठवीत उद्गारला, “ धाकट्या
राणीसाहेब तितक््याशा पाक दिलाच्या नाहींत हें मलाही नाकबूल करतां
यावयाचे नाहीं. ”
“ कशावरून ? ” अपरूपेनें उत्सुकतेने विचारलें.
“ तें आपण मला विचारू नये आणि मीं आपणाला सांग नये. मात्र मला
यावेळीं आपणाकडून असें अभय वचन पाहिजे आहे कीं धाकट्या राणीसाहे-
बांच्या मोहपाशांत मी गुरफटला गेलों असलों तरी तो केवळ माझा एकट्या-
चाच अन्याय नसल्यामुळें त्याबहळ मला क्षनाच होईल. ”
किती नीचपणाचे मीरकासीमचे उद्गार होते हे! तो खरोखर उर-
फाट्या काळजाचा खरा, म्हणूनच त्या साध्वीच्या बाबतींत असें बेमालम
खोटें बरळूं शकला. त्यानें अपरूपा करुणेवर अत्यंत नाराज आहे असें पाहून
हे एका दगडानें दोन पक्षी मारले. पहिला हेतु, त्या मंडळीच्या मनांत करुणे-
विषयीं अणुमात्र आदर असेल तर ती मुसलमानाच्या नादीं लागली ह्यामळें
मन कलुषित होऊन तो नष्द व्हावा, आणि तिला कोणत्याही परिस्थितींत
तंजावरचा मार्ग बंद होऊन ती आपल्याच भक्ष्यस्थानी पडावी. आणि दररें
आतां यदाकदाचित् आपरूपा आणि करुणा यांची भेट होऊन करुणेनें तिच्या-
पाश गाऱ्हाण गाण्याला सुरुवात केली तरी करुणेचा तो निव्वळ मायावीपणा
ठरावा. मात्र करुणंची मत चळली याचा अपरूपाराणीला नीतिभावनेच्या
दृष्टीलें जरादेखील विषाद वाटणार नाहीं, हें मीरकासीम पक्कें ओळखून
होता. तशी शंका मनांत येतांच त्यानें तिचें मनोमय निरसन केलें, “ पति-
ब्रतेर्वे पातित्रत्य ढळलें म्हणून मुलुखभवानीच्या आंतड्याला थोडाच पीळ
पडणार आहे ! उलट ही देखील आपल्याच पंथांत सामील झाळी, आपल्या
उच्छू खल वतंनाबद्दह उघड उघड जीं माणसे बोलं शकतील त्यांपैकी एक
तरी कमी झालें असेंच अपरूपा मनांत म्हणेल. ”
मोरकासीमचा तो तर्के अक्षरश: खरा होता. अपख्पेला त्याची ती' वाचा-
ळता खरीच वाटली. तिनें आपणावरून करुणेची पारख केली करुणा मीर-
कासीमशीं उच्छ खलता करण्याइतकी निर्ढावळी असेंच तिच्या मनानें घेतलें
व त्या गोष्टीचा मीरकासीमप्रमाणेंच आपल्या परीने एका दगडाने दोस
पक्षी मारण्याच्या कामीं उपयोग करून घ्यावयाचे तिनें ठरविलें. तिच्या मनांतून
९
१२३० पेदवाईचें मन्वेतर
जरी मीरकासीमर्ने प्रतापसि्ठ महारा जांविरू्छ जाणणारा जापणल्या दोतया पुत्राला
तेंजावरचा राजा करण्याच्या कागी साय कराते असें होते, नेरी तसा प्रश्न
त्याच्यापाशी काढण्याला ती उतका बेळ भील होती. पण आतां तिच्या मरते
मीरकासीम वर्मी सांपडला. त्याला करुणा ठाभळी नर तो गण होईल ब
मिधाही होईल आणि काय पा्टिजे तें करण्याळा ससार टोळ ठे तिने नेरळें
करुणाराणीचा सर्वनाश करण्यासाठी लिळा श.यर बे दववेची ठरवून प्रताप-
सिह महाराजांकरवों तिळा जन्मार्चे शानन कारावयानं, त्यापेतां ती आज-
पासूनच मीरकारीमसारख्या आडदांडाच्या टोली कावमनी जगन पडली
तर सुंठीबांचून खोकळा गेळा, असा. विचार काशन अपस्या मानभाधी-
पणाने म्हणाली, “ ती कुळटा आपली पावरी सोन तुळा वन लाळी तर त्यांत
तुझा तरी काय अन्याय ! आलां ती देटाने नाही तरी गनाले बारटण्यासारथीच
आहे, तेव्हां ती तुशी तुळा ललळाभ झोवो. आमने नांडदलीळ गणणें नाही.
माचर हा तुझा अन्याय मां पोढडी घाडावयाचा पािय जगेल तर त॑ आमनी
एक कासगिरी केळी पाहिजेस." अर्शे ग "णन निर्ले पताणतिा गाणराजांच्या
ऐवजीं आपल्या बनावट पूजाला तंजावरच्या गादीथर वराधिण्याचा घेत मीर
कासीमला जरूर तेवढे होलने रागन निधेदन कळा. त्या कामी आपणाला
चंदासाहेबाचे देखीळ साठय यसे आहे प देलीळ त्याऊा सांगिनड, मारफामीगनें
त्या गोष्टीला आनंदार्ले संमति विळी. व्यांवदगीतठ त्याग अता स्वार्थ पाडिळा
कीं तंजावरच्या गांदीवाबत तसे उपस्थिय ऊन रेन मातबर त एुतेर्तंटे
मोडण्यांत अगर लढण्यांल गंलून पाड, को जापणणा्गा दगळभरीच्या आस-
मंतांत आपली एकतंत्री सत्ता प्रसथापिय करण्याचा मार्ग गेवडाचे सोणा शाळा.
“बरें; तो थेरडा शजारराने पुळे आ? " कोयाजीते निवारे.
“त्याला मीं संशयावरून देन टोगाठे जाट. " गे प्रकरण आपभपल्मावर
उलटतें कीं काय हया भसाने मीरकासीगर्धे ल्यावर आणखी मळडीनाथी केळी,
तो एथें येतांच आपणाविसद्ध मळा निथाथणी येळ ळागळा म्हणून त्याला
तशी शिक्षा देणें भाग पडळ. ''
“ ठोक केलेस. अगदीं छान केळेस. तोही आमना एका टाईवेरीन आहे.
त्याला नुसतें केदेत डाम्बून ठेवून भागावसाथं नाहीं, छ्या जगांतून त्याची
कायमची हकालपट्टी केली पाहिजे. ” अपखूपा म्हणाली.
मीरकासीम ठार झाला १२१
22002200 0-२ टी टक टपतयमनाभल
बर्टन ककट ०१० ४४४४0 एफशपे कक कक लनी ककट हिडिडिगगलास््य्स्ब्स्ा शनी
"४७ ४७०४८७७ ४ककीक कीन म फी
4५७५०४-९४*%*
संभाजी आपणाबरोबर आहे, त्याच्यादेखत असलें बोलभाषण होणें
सुरक्षितपणाचें नाहीं, असें तेवढ्यांत कोयाजीला वाटल्याने त्यानें अपरूपेला
जरा संभाळून बोलण्याविषयीं नेत्रसंकेत केला, आणि संभाजीला म्हटलें,
“ संभाजी, जवळच्या त्या राभनद खेड्यांत आमच्या बरोबरचे लोक वाट
पहात बसले आहेत त्यांना जाऊन कामगिरी फत्ते झाल्याचें सांग व सूर्योदया-
पूर्वी आम्ही तिकडे येतों म्हणावें; जा. ”
संभाजीचे मस्तक त्या दुर्मते माणसांचीं कुटिल कारस्थानें ऐकून अगदीं
'भणाणल्यासारखें झालें होते. तो स्वाभिनिष्ठ व आपल्या देशाचा कतंव्यदक्ष
नागरिक. आपण जगून आपल्या स्वामीसाठीं आणि आपल्या देश्यासाठीं कांहीं-
तरी सत्कार्य खास करूं अशी त्याचो मतोदेवता त्याला ग्वाहि देत नसती तर
त्याच क्षणीं तो त्या तिघांही दुर्जनांचे मुडदे पाडून वेळ पडल्यास स्वतःदेखील
त्यांच्याबरोबर यमसदनाला जावयाला तयार झाला असता. इतका तो चेवला
होता. अपरूपारागीनें आपखुषीनें करुणेविषयींच्या प्रश्नाला बगल देऊन एक
प्रकारें भीरकासीसलळा करुणेचा छळ करण्याला प्रोत्साहनच दिलें, त्या क्षणा-
पासून संभाजीच्या मनाला एकसारखी हुरहृर लागून राहिली होती कीं मी
वाय करू म्हणजे त्या साध्वीचें ह्या गिधाडापासून रक्षण होईल! त्यावरोबरच
तो हेंही ओळखून होता कौं, मीरकासीम जगांतून नाहींसा झाल्याखेरीज आतां
करुणाराणीला तरणोपाय नाहों. अशा प्रकारच्या विचारांच्या भोंवर्यांत
संभाजीरचें मन गरगर फिरत असतां त्या बेठकींतून उठण्याची संधि कोयाजीच्या
आज्ञेने मिळाली, तेव्हां त्याला परमावधीचा आनंद झाला. वतो तसाच निघाला.
आतां मीरकासीम, अपरूपा आणि कोयाजी यांना पुढील कृष्णकारस्थानांचे
मनोरे रचण्याला यथास्थित अवधि मिळाला. मीरकासीमला कसेहो करून
करुणा पचनीं पाडावयाची होती; व त्याच्या मतें ती पचनीं पडलीही होती.
सुमारे प्रह्रभर त्या त्रिकुटाच्या वाटाघाटी झाल्यावर अपरूपा आणि कोप्राजी
यांना सुसज्जित शय्यागृहांत पोंचवून तो करुणेचीं मनोहर स्मृतिचित्रे अंत:-
चक्षूंसमोर रेखाटीत तिच्य़ा महालाकडे वळला. मूर्ख कुठचा ! त्यानें सभो-
वारच्या परिस्थितीवर देखतभुली मात केळी खरी पण तो सर्वकष काळावर
थोडीच मात करूं शकतो ! पण कामातुर बनलेलीं पशुतुल्य माणसें सारासार
विचार करण्याइतकीं भानावर थोडींच असतात !
१२२ पेशवाईचें मन्वंतर
मीरकासीम प्रथम थेट भांडागारांत गेला, व तेथन उत्तमोत्तम बहमोल'
अलंकार व उंची उंची वस्थे बरोबर घेऊन लगेच स्वारीनें करुणेला ज्या
महालांत ठवण्यांत आल होते तिकडे मोर्चा वळविला. तेथे जाऊन पहातो
तों मार्ग अगदीं निष्कंटक ! सुग्रास पंचपक्वाननांचें ताट वाडून अगदीं तयार!
त्याला वाटळे होते कौ आपणाला करुणेची आणखी मनधरणी करावी लागेल
धाकदथटशा दाखवावा लागेल, व उतक्यानेंही ती. वठणीवर आली नाहीं
तरी तिच्यावर हात टाकून तिळा त्या रात्रीं आपलीशी करून वेण्याचाही
त्याचा निर्धार अगोदरच झालेला होता. परंतु तो तेथे जाऊन पहातो तों
सर्वेच परिस्थिति पूर्णपणे निवळछेळी ! कर्णा जागीच होती, व ती एखादया
संतुष्ट स्त्रीप्रमा्णे लीलेने इकडे तिकडे विठ्ठरत होती. मीरकासीम तेथें
आलेला पाहतांच मात्र तिनें अवगुंठनाखाळीं आपला मखचंद्र झाकन घेतला
तरी पण त्या अवगुंठनांतून चोरट्या उत्युक नजरेने मधत मधन त्याच्याकडे
पहाण्याला तिर्ने कमी केळें नाहीं. आपणावर ही फिदा झाळी असली पाहिजे
असा मीरकासीभर्ने तकं करून तिला प्यारी! ' अशी लाडकी हांक मारली.
शतका निर्भडपणा काय़ हा ! कोणी नोकरचाकर पहातील तर काय
म्हणतील ! ” अवगंठनवती करणा लाडवया स्वरांत म्हएणाळी
खास ही. आपणावर फिदा झाली आहे.” असें मनांत म्हणन मौरकासीमनें
वस्त्रालंकार खालीं ठेवून प्रथम त्या महालाचा दरवाजा लावून घेतला, वतो
तिच्या हनुवटीला होत लावून हळूटेळ अवशुंठन देर करण्यासाठीं चाळवाचाळब
करू लागला. तरीही करुणेने प्रतिकार केला नाहीं. तो वस्मालंकारांचा तबकां-
तील एक बहुमोल रत्नहार उचळून करुणेच्पा कंठांत घाडं लागला, तेव्ह
मात्र वरुणा जरा चाजूला बळली
मीरकासीमळा वाटलें कीं हा अनुराग आहे. म्हणून त्यानें 'प्यारी !
प्यारी, असा लघळपणा करीत तो रत्नहार करुणेच्या कंठीं घालण्यासाठी
पुढे पाऊल टाकळे. त्याबरोबर काय चमत्कार, त्या अयगंठनयती करुणेच्या
हातांतील जंबियानें एका घावासरसा त्या नराधमावा कोथळाच फोडून बाहेर
काढला, व तो तडफडत मरेतो वाट पाहून लगेच त्याच पावलीं बाहेरचा रस्ता
सुधारला !
असें कसें झालें ?
ग्रकरण १८ वें
मोहन
ष्य
"चंदासाहेबाकडून मीनाक्षीराणीच्या सहीचा खलिता घेऊन जे जासूद
रवाना झाले ते योग्य वेळीं मुरारराव घोरपड्यांकडे जाऊन पोंचलळे. त्या'
खलित्याप्रमाणे म्रारराव मीनाक्षीराणीचा साह्यकर्ता म्हणून त्रिचनापल्लीला
जाण्याच्या तयारींत आहे तोंच दोघे घोडेस्वार त्याच्या समोर दत्त म्हणून
उभे राहिळे- त्या दोघांपैकी एक घोडेस्वार तर अगदीं तरुण सुमारें वीशीच्या
आंत बाहेर असेल नसेल इतका कोवळा होता व त्याच्या चेहऱ्यावरील कोमलता
आणि सोंदर्य हीं पाहून तर 'विधात्यानें इतका नाजूक व सुंदर चेहरा पुरुषाला
दिला त्यापेक्षां एखाद्या स्त्रीला दिला असता तर' असेंही कोणा रसिकाच्या
मनांत आलें असतें. त्या तरुण घोडेस्वाराच्या सोंदर्याचें व चापल्यार्चे वर्णन
करून किती करावयाचें, एका शब्दांत सांगावयार्चे तर त्याला पहातां-
क्षणींच म्रारराव घोरपडे अगदीं मोहित होऊन गेला. दुसरा घोडेस्वारही
रूपानें संदर पण वयानें कांहींसा मोठा असावा. तो वयानें किती मोठा व किती
संदर असावा यार्चे अनुमान मुराररावांना प्रथम दर्शनीं करतां आलें नाहीं
याचें कारण तो जो आंत आला तो किचित् पाठ फिरवून अंमळ बाजूलाच
उभा राहिला होता. मुराररावांना तें जरा चमत्कारिक वाटलें, परंतु परिचय
नसल्यामुळें भीड पडून ते तिकडे बळेंच दुलेक्ष करून दुसर्या तरुण घाडेस्वाराला
म्हणाले, “ तुम्ही कुणीकडून आलां ? ”
“ मी त्रिचनापल्लीहन आलों. ” तरुण घोडेस्वार उत्तरला. त्याची
दष्टि मराररावाच्या चर्येवर सावधपणे खिळत बसली होती. जणूं काय
मुराररावाच्या चयेवर आपल्य़ा आगमनाने आणि आपल्या संभाषणानें कोण-
'कोणते मनोविकार प्रतिबिब्ित होतात याचेच तो तरुण कल्पकतापूवेक गूळ
सावधपणे करीत होता
“ तुमर्चे नांव काय ? ” मुराररावांनी विचारले
माझें नांव मोहन. मी आपणाकडे मीनाक्षी राणीसाहेबांकडून कांहीं
अत्ग्रंत निकडीच्या कामासाठीं आलों आहें. त्यांचा स्वदस्तुरचा खलिता आप-
णांला पोंबलाच असेल.
“ हो! आणि म्हणूनच मी आतां तिकडेच त्यांच्या साह्यासाठीं निघणार
१३४ पेशवाईर्चे मन्वंतर
९७/४१७.४४१ ४७, 0७ फण ५७" लभ
होतों. राणीसाहेबांना मी माझ्या पाठची बहीण मानतों. चंदासाहेबा-
सारख्या वसायाच्या सुरीखालीं मान सांपडळेल्या त्या गरीब गायीला वांच-
विणे हें माशे पवित्र कर्तव्य आहे. मला दाटते तुम्हीदेखील मला त्यांच्या
वतीने तातटीते बोलावणे करण्यासाठीं आलां असाल. ”
“चाही. मी आळों आहें तो अशासाठी कीं, आपलें साह्य मीोनाक्षी-
राणींना तर चाहिजेच आहे. परंत आज आपणांला मिळाळेला खलिता हा
चेंदासाहेबाच्या खोडसाळपणाचा एक मासळा आहे; त्यामुळे आपण फस नये
म्हणन आपणांला वेळींच सावध करण्यासाठीं मी हथे आलों आहे. ” असें
म्हणन मोहनन त्या खलित्याबाबत व्रिचनापल्लीच्या बंदिशाळेंत घन आठेला
सर्वे शोधताय प्रकार मुरारराबांना निवेदन केला. तो ऐकून मुराररावांना
अचंबा वाटला ब्र तितवाच चंदासाहेबाचा तिरस्कारहि आला. त्याच क्षणीं
त्यानें उद्गार काढळे, “अमे आहे काय? तो विश्वासघातकी हरामखोर मुसंडा
मला अथा डावपेथांनी जाळ्यांत अडकवन कर्नाटिकांतील मराठ्यांची सत्ता
नामरोष करूं पटातो काय? ठीक आहे. त्याला म्हणावें, वेट्या, ह्या मुरार-
राव घोरपड्याशीं गांठ आहे. तुझाच डाव तुझ्यावरच उलटवला नाहीं
भाणि त्याखाळीं तशी राखरांगोळी केली नाहीं तर मी' घोरपड्याचें नांव
सांगणार नाहीं.” ते किचित् वेळां स्वतःच्या मनाशीं कसला तरी विचार करीत'
उभे होते. त्यांच्या चर्येवर प्रतिबिवित होणाऱ्या भावना मोहनला स्पष्टपणें
वाचतां येते होत्या. चंदासाठेब्राचा सूड कोणत्या उपायानें बेमाळूम घेतां येईल
याचे संशोधन करण्यांत मुराररावांब्ें मस्तक पूर्णपणे भ्रमून गेलें आहे हें
मोहननेंचे काय पण त्या दोघांचा संवाद जवळच उभ्याने ऐकणाऱ्या त्या
दुतर््या घोटडस्वारानेंही ओळखले
पण सध्यां मीनाक्षी राणीची काय स्थिति आहे? समजा, मी चंदासाहे
बारचे पारिपत्य करण्याचें मनांत आणलें, तर त्याचा त्यांच्या आयुप्थावर कांहीं
विपरीत परिणाम तर होणार नाहीं ना? ”
कांही देखील विपरीत परिणाम होणार नाहीं. द्रोपदीचा भगवान श्रीकृष्ण
पाठिराखा तसे आपण पाठीराखे भाऊ भेंटलां असेंच राणीसाहेबांना वाटेल.
मोहून उत्तरला.
“ तुमचा आणि राणीचा काय संबंध ?” मुराररावांनी विचारलें. वास्त-
मोहन १२५
विक हा प्रश्न त्यांनीं प्रथमच करावयाचा. पण त्यांना प्रथद्देनींच मोहनविषयीं
इतका विश्वास वाटला कीं त्यानंतर त्याच्याविषयी कोणतीही शंका मुरार-
रावांच्या मनांत उद्भवणें शक्यच नव्हते. आणि आतां तर त्यांनीं तसा प्रश्न
केला तो केवळ कुतुहलाने राणीचा कुशल समाचार आपणांला यथावत
कळावा म्हणून. |
“ मी राणीसाहेबांचा एक विश्वासू अतुचर आहे. त्रिचनापल्लीवर
ओढवलेल्या सध्यांच्या महत्संकटांत माझ्यासारख्या राणीच्या केवाऱ्यांना
कसे जीव सठींत घेऊन वागावें लागतें आहे, भावी सत्कार्यावर दृष्टी ठेवून
कशीं नानापरींवीं संकटे सोसावी लागत आहेत, याची आपणांस[रख्या समथ
भाग्यवंतांना कल्पना यावयाची नाहीं. ” मोहन क्षणभर मार्गे वळून आपल्या
साथीदाराकडे पहोतत पुढें उद्गारला, “ आतां राणीसाहेबांच्या वतीने आप-
ल्याला माझी एवढीच विनंति आहे कीं आपण त्या दुष्टांचें यथावत् पारिपत्य
करा व त्रिचनापल्लीच्या जनतेला लाजिरवाण्या यवनदास्यांतून मुक्त करा.
त्या चांडाळानें त्रिवनापल्लींत कसकसा हलकल्लोळ भाजविला आहे, हिदृधर्म
हिंदू देवदेवता, हिंदु स्त्रिया यांची कसकशी विटंबना चालविली आहे-<हरहर !
त्या अघोर पापांचा उच्चार करतांना जीभ अडखळूं लागते. ” असें म्हणून
मोहननें एक दीघे उसासा सोडला. त्याच्या जोडीदाराची त्याविळीं तलीच
अनकंपनीय अवस्था झाली होती
बरें, पण राणीसाहेब सध्यां कुठें आहेत ? ” मुराररावांनीं विचारलें
त्यांनीं हरषयत्नांनीं त्रिचनापल्लीच्या बंदिशाळेंतून आपली मुक्तता
करून घेतली असून आपल्या एका मैत्रिणीसह त्या सध्यां कुठें तरी रानोमाळ
भटकत आहित. त्यांनीं मला आपणांकडे पाठविलें त्या वेळीं त्या नुकत्याच
त्रिचनापल्लीच्य़ा किल्ल्यापार होऊन मार्गाला लागलेल्या होत्या. कदाचित्
त्यांचा विचार आपल्या राज्यांतील कांहीं शेलक्या विश्वासू प्रजाजनांना
भेटन सैन्यसामग्रीची करतां येईल तेवढी उभारणी करून शत्रूशी सामना
देण्याचा असेल असें नला वाटतें. दहा-पंधरा दिवस तरी त्या असा प्रयत्न
करून पहाणार आहेत, व मग शिवगंगेला मराठ्यांच्या लष्करी छावणींत
जाऊन त्यांच्या व आपल्या विचारें पुढील धोरण ठरविण्याचा त्यांचा मानस
आहे. ” हे उद्गार काढतांना मोहून मधून मधून एकसारखा आपल्या साथी-
१२६ पेशवाईचे मन्वंतर
दाराकडे वळन पहात होता. मरारबराव मभ्नन मधून प्रच्नार्थक दष्टीनें
त्याच्या कड पहात होतेच. त्यांना संशय आल्याचे मोठननें त्याच्या चर्ये-
वरून ओळखलें तोंच मराररावांनी प्रश्न केला ' तुमचा साथीदार कांहींच
कां बोलत नाहीं? ”
खरदारसाहब, ता. माझा जनचर आहे. तो. फाय बोळणार अनु-
चराच काम क्षणाक्षणी धन्याच्या जब्दाची री ओढण्याचे नव्हे, धन्यावर
प्रसंग पडळ तेव्हांच निष्ठावंत अनचराची निष्ठा पाठच घ्यावी. ” > हब्द मोहन
इतक्या निर्भयतेने बोळून गेळा को, मरररावांर प्रा मत आतां संगयाला
मुळींच जागा उरी नाही. मोठनना तो अनुचर माज कां न कळे तें संभाषण
एकून क्षणोक्षणी जास्त ओशाळा होत ठोता.२ ॥टिनच्या त तेज्हांच ध्यानी आलें.
छो मराररावांना म्हणा टणाळा, सरदारसाठऐब, याला अंमळ बाहेर विश्रांति
घेऊ दया. अविश्रांत घोडदोडीनें दो फारच शमी जाऊिळ | दिगली म्हणन
मोहूननें त्य़ा अनुचराळा बाहेर जाऊन विश्रांनि घेण गाला सांगितलें. मरार-
रावांना वाटळें कीं, कांहीं विशेष मटत्वाच्या गोप | आपल्याशी बोलण्या-
साठीं मोहनळा एकान्त पाहिजे होता, तो मिळविण्पासाठ | त्याने टी युक्ति
योजिलो आणि कुला मोलाळा गांठ पडनत्यांचा ततक खरा ठरला. मोहननें
चेदासाहेबाचीं आजवरची राव छण्ण गव्ये व त्याच पुळाल बेत क्रमाक्रमाने
मु्सूद रीतीनें मुरारराबांना निवेदन केळे. त्याधरोबरच तजाबरांत महा-
सजाच्या सापत्न मातेने, ब तिचा एवा हरतवा कोयागी घाटगे यांनी तंबावरचें
राज्य एका बटकोच्या पोरासाठीं बळकावण्याचा कसा डा मॅ रुगला आहे हेंही
सविस्तर निवेदन केळे. मराररावांना त्याचे एवढ मोठसे आश्तर्य वाटलें
नाहीं. ते ओघानेंच बोळन गे यात नवल ते काथ ।!' ' अपझभपाराणीला
आणि कोयाजी घाटग्याळा नी आज ओळ [1 अस नव्धे. मराठ्यांच्या नांवाला
कळक लावण्यासाठींच तीं दोघे जन्माला आळी आतेत परंतु तंजावरच्या
राज्याचे भूपणसर्वस्व अश्या त्या दोन प्रासादिक तरवारी त्या बदफली' स्त्रीने
चोरून चंदासाहेबासारण्या दावूच्या घरीं पोबत्या कराऱ्या ही मात त्या
दोघांच्या नीचपणाची कमाल आजे खरी. ”
त्या तरवारी आपण दक्षतेने हस्तगत केल्या पाठिजेत कारण चंदासाहेब
त्याच महत्त्व पूर्णपणे ओळखून आहे व त्याची अशा देवी चमत्कारावर श्रद्धाही
मोहन १३७
१५५५०५५८४४ 0४११ 00५१७४८१५८ 000 00.” 3९९७ कदककी ४ १कसय कक ली कदवता रॉ 00. ७. करपे, के ४०७५७०७ कक. ९९.१५. “चकर ७७.० ७ “0७० 0९.७७ 4०१५७०२ ९४. क “७ -0% 20/60 - १-१ क ००00७0७ ७५20 कट ०९ --.पेदे “कळे 6९७७ णे. ९ ७००९७७८ 0७. १९, ४६८ ७ ७३0 ५२१. 00६ (चक पो १७000 कत कातळ आ लील कामि टानधाकका_.२/१. ओ. भल आळी काहपफलपकक
आहे. आपली हरकत नसेल तर मी आपल्या संमतीनें त्या तरवारी हस्तगत
करतां आल्यास पाहीन. ”
“ त्या कशा काय ? ” मुराररावांनी विचारले.
“ रामस्वामी नांवाचा माझा एक विश्वासू सेवक खालीं आहे त्याला
छुपा करून वर बोलावून घ्या. ” मोहन म्हणाला.
लगेच मुराररावार्ने रामस्वामीला हजऱ्याकरवीं बोलावणे पाठविलें. मोहननें
निवेदन केलेल्या वृत्तांतांत रामस्वामीचा उल्लेख येऊन गेल्यामुळें त्याच्या
कार्यक्षमतेबददळ मुराररावांना शंका येण्याचे कांहींच कारण नव्हतें. थोड्याच
वेळांत रामस्वामी वर आला व दरवारी' पद्धतीने अभिवादन करून नम्रता-
पुर्दक दूर उभा राहिला, मोहून त्याला म्हणाला, “ रामस्वामी, चंदासाहेबार्ने
खेळूं घातलेला डाव त्याच्यावर उलटवणें आतां सर्वस्वी तुझ्या स्वाधीन आहे
तूं आलां तांतडीते त्रिचनापल्लीला जा आणि मुरारराव घोरपडे मीनाक्षी
राणीच्या साह्याला घोडदोडीनें चाळून येत आहेत असा बेभाळूम बहाणा करून
तेथले सरदे वातारण आमच्या पुढील योजनेला अनुकूळ असें निर्माण करून
ठेव. आणि हें पहा, त्या दोन प्रासादिक तरवारींविषयीं तुळा माहीत आहेच.
त्या कोणत्या उयायानें हस्तगत केल्या जातील तें तुझें तूं पाहून घे. मुरारराव
तिकडे आल्यावर तूं त्यांची भेट घे म्हणजे पुढील आवश्यक त्या गोप्टी तुला
वेळोवेळीं कळून येतीलच. जा, कशी कामगिरी सोळा आणे करतोस पाहूं. ”
रामस्वामीरने संभतिदर्शक मान तुकवून पुन्हा एकवार अभिवादन करून
तिथून प्रयाण केले. आणखी थोडा वेळ मोहून आणि मुरारराव यांचे चंदा-
साहेबाच्या पारिपत्याविषयीं बेत चालळे होते. तोंच हारपालानें येऊन वर्दी
दिली, “ शिवगंगेहून जासूद थेळी घेऊन आला आहे. ”
मुराररावांनी ताबडतोब त्या जासुदाळा बोलावून धेतळें आणि त्याच्या
जवळची थेऊी घेऊन उघडून वाचून पाहिली. तों त्यांतही तोच मजकूर. प्रताप-
सिहभहाराजांकडून छत्रपती शाहूमहाराजांना साह्यार्थ केळेल्य़ा विनंतिपत्रा-
वरून रघूजी भोंसळे, बाबूजी नाईक वगेरे मंडळी नुकतीच चंदासाहेबाच्या
पारिपत्यासाठीं व तंजावरच्या रक्षणासाठी शिवगंगेळा आपल्या छावणीत
येऊन पोंचली होती ; व रघूजी भोंसल्यानें कर्नाटकची मोहीम अर्धवट थांबविळेली
फिरून ताबडतोब जोमाने सुरू करण्याची इच्छा त्या थेळींत दर्शविळी असून
मुखररावांवाशीं पुववत् साह्याची याचना करण्यांत आली होती.
१३८ पेशवाईचे मन्वंतर
विशाखा ककाकयाळयाम क स या यिड अ ेशवयक्शिशिशथशिकषा 20 22. करनार दा हट ७ ७0०0 स्ट “तका ल त क की वी वित गमती “नान्या क कारा
** योगायोग असा आहे पहा माझ्या मनांत चंदासाहेबाचें पारिपत्य कर-
ण्याची योजना यावयाला व तिकडून मातब्बर मराठ्यांचा पाठिबा मिळा-
वयाला एक गांठ पडली. आतां मला प्रथम जाऊन रघजी भोंसल्यांची भेट
घेतली पाहिजे. ते आणि मी एक जिवाने तंजावरप्रमाणेच त्रिचनापल्लीच्या
रक्षणाचोही निश्चित तजवीज करीत आहों असें तुम्ही राणीसाहेबांना सांगा.
बरें आतां तुमची आमची भेट पुन्हां केव्हा ? ”
आपण आतां शिवगंगेला जाताच आहां तेव्हां मी व शक््यतर राणी-
हेबसुद्धां आपणांला तिथेच येऊन भटू. मराठयांत्रे एवढ जबरदस्त साह्य
मिळाल्याचे ऐकन राणीसाहेबांच्या अंगावर डोंगराएवढे मांस वाढेल. ”
असे म्हणून मोहन मुराररावाचा निरोय घेऊन आपल्या अनुचरासह् माघारा
वळला. त्याच दिवशीं मुरारराव पूर्व संकल्पाप्रमाणे शिवगंगेकडे
जावयाला निघाले.
प्रकरण १९ वें
बैराग्यांच्या तांड्यांत करुणाराणी!
व मखख या ७ ााााााआाा
सातारी आणि संभाजी यांची अगदीं थोडी चुकामूक झाली तरी पुढील
दोन तीनं दिवसांत त्यांचा बेत कांहीं नक्को होऊंशकला नाहीं. संभाजीचा
त्या गोष्टीला नाइलाज होता. परंतु मानाजीला तें काय माहीत! तो पूर्वे
संकेताप्रमाणे त्या विविक्षित ठिकाणीं बराग्यांच्या तांड्यापाशी यंऊन संभाजी-
विषयीं चौकशी करूं लागला तों तिथें संभाजी आलाच नाहीं असे त्याला
कळन आलें. त्याबरोबर संभाजीविषयीं भलभलते विचार मानाजीच्या मनांत
येऊं लागले. तो फितूर तर नसेल ना? त्यानें आपल्या भेटीची अपर्पाराणी'
आणि कोयाजी यांच्याकडे चहाडी तर केली नसेल ना? असे अनक विचार
एका मागन एक मानाजीच्या डोक्यांत घोळूं लागले; पण जें झालें ते होऊन
गेलें त्याला त्याचा तरी आतां काय इलाज होता !
मात्र त्या बैराग्यांच्या तांड्यांत त्याला एक अनाथ अबला दोन दिवसां-
पूर्वीच आश्रयाला आल्याचे कळून आलें. त्याबरोबर त्यानें त्या स्त्रीची
जाऊन भेंट घेतली. भेट कसली ती? ती स्त्री दोन दिवसांपूर्वी जी तिथें आली
ती तेव्हांपासून या घटकेपर्यंत बेशुद्ध स्थितींतच होती. मानाजीनें जाऊन
पाहिलें तों तिच्या सर्वांगावर पुरुषांचे कपडे दिसून आले व केंस मात्र बेशुद्धा-
वस्थेंत मोकळे सुट्न अस्ताव्यस्त पसरलेळे दिसले. शिरस्त्राण नाहींसें
झाल्यावर ती कोणी तरी पुरुषवेषधारी स्त्री असावी असें कोणाही अपरि-
चिताला ओळखतां येण्याजोगें होतें; व त्याचमुळे बेराग्यांनीं ती स्त्री असावी
असें ओळखले होतें. मानाजीनें त्या स्त्रीला पहातांच त्याला तर तेवढादेखील
संशय वाटला नाहीं. त्यानें पहातांक्षणींच ओळखलें. ती करुणा होती. अशा
अकल्पित रीतीनें करुणेची भेट झाल्यानें मानाजीला इतका संतोष वाटला
कीं त्यामळें त्याचे दोन तीन दिवस सतत भटकल्यामुळें झालेले सर्द परिश्रम
जणं दर झाले. त्यानें त्या बैराग्यांच्या तांड्यांतील मुख्य बेराग्याला विचारलें
“ हो स्त्री इथें आली तेव्हां ती कोणीकडूत आली वगेरे चौकशी तुम्हीं केली
काय? ” बैरागी उत्तरला, “आम्हीं चौकशी केली. परंतु ती विशेष बोल-
ण्याच्या स्थितींत तेव्हां नव्हतीच. प्रथम आम्हांला वाटलेंकीं हा कोणीतरी वाट
चुकलेला तरुण रानावनांतीळ इवापदें किवा चोर लुटारू पाठीला लागल्यामुळें
१४० पेशवाईर्चे मन्वंतर
जीव घेऊन आमच्या आश्रयाला आळा आहे. मळा तांच्या , मळा वांचवा,
असाच लिनें पटिल्यानेंन टाडो फोडला ब मी चोकशी करतो तोंच त! ब्रेशुद्ध
होऊन खाळी पप्ळी. तेबळ्यांत तिच्या मस्का फटा सुटन मोकळा शाल्या-
मुळ तेर ली स्ती जाहे जशी माझी खानी परळी, तेण पासून तिला शुद्धीवर
आणण्याचे जमे कसून प्रथत्न नाळिद जपन. ती घणशर शुद्धीवर येते,
पुन्हां बेशुद्ध होते. शंद्धीवर जाळी की अरपाळ अर्सोवांशी च ४! बडबउते.
अपर्पाराणीला निनें अजाच तीन चार वेळा का मामन जा पणाशी वर
न साधण्याबहल विनंति केळी. त्याप्रमाणेच सांभाजी यांयाच्या कुणाची
तरी आठवण करूल त्याच्या विषनी त्टटळेल्यांचे उद्गार काढतांना दोन
तोनदां लिला आम्ही पके. "
मोनाजी त्या बराग्याच्या भुटिय शत्दांना स्वत:च्या भनाशी मेळ घाल
छागळा. संभाजी जाणि वरणा यांधी भेट लाडी वणला पाण. : अपस्पा-
राणी आपल्या नाझाळा दगुन बसल्याचे कारणेळा भाल असळे पाहिजे, एवढें
त्याने ओळखले. परंतु संभाजी १ जाडे, जाणि वारणा 1 जाळा याविषयी
त्याला काँह्रींच तव करतां येईला.बेराग्यांच्या स्गाळारांयनत्याचेप्रथम करणेला
शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न जोराने सुरू नळा. त्या प्रयत्नांना पुर्वीच्या दोन
दिवसांपेक्षा जास्त गदी आडे. बनस्पतिजन्य जोगधीी त्या मरप बरा-
ग्याला नांगळी माटिदी असल्याभुळेती आज दोन दिवस शभ उपवार परणेऊा
शुद्धीवर आणण्यासाठी करील होता, आणि एक रागबाण भोपी अरण्यांतून
कोठून आणण्यासाठी दोन दिवसांगूर्बचि त्यानं जापल्या एका शिष्याला पाठविलें
होते. तो शिष्यही ती ओषधी घेऊन थावणाळा "नका बळ ळाोगणा. त्या
ओषधी वनसातलीच्या मुळ्या ठेमून त्यांचा रस कोळून शो म.रणेच्या मरत-
काला चोळण्यांत आला. तिच्या सर्यागाळाहे तीच जोपधी लावणं आवश्यक
होतें व मानाजी तिथे आला नसला तर त्या रोग्याने निण्पाप भायनेने वर-
णेला आपली कल्या समजून विज्या जीवनरदागासाठी तिज्या अंगाला तेवढाच
स्पर्श करण्याला कमी केळे नसतें. परु मानाजी विथ जाला य त्यानें तिळा
पाहिळें, त्यावरून तिची मानाजीची नांगळीन ओळख असल्याचें हेरून त्या
सैराग्यानें मानाजीला सांगितळे, “तो रस घे, आणि त्या मुलीच्या छातीळा
त्यांचा लेप कर. तसेंच तिच्या पायाने तेळवेद्दी त्या रसानें चोळ कीं
बैराग्यांच्या तांड्यांत करुणाराणी १४९
ती ताबडतोब शद्ोवर आलीच म्हृणून समज. ” मानाजी तें एंकून अंमळ
ओशाळल्यासारखा झाला. परंतु गुरूची आज्ञा म्हणून त्याला तसें करणें
प्राप्तच होतें. त्यानें करुणेच्या पायांना स्वतः तो रस चोळला. त्याबरोबर
थोड्या वेळांत ती दिव्य औषधी आपला प्रभाव दाखवू लागली.
“तसाच तिच्या छातीलाही तो रस चोळला पाहिजे म्हणजे ती ताबडतोब
शुद्धीवर येईल." मख्य बेरागी म्हणाला. परंतु मानाजीला तसें करण्याला संकोच
वाटूं लागला. तो लाजूं लागलेला पाहतांच बेराग्यानें, “अरे, ती रुग्णाईत
आहे. अशा वेळीं स्त्री-पुरुष-भाव मनांत धरून चालावयार्चे नाहीं. आपद-
भ्रस्त जीव भेटला म्हणजे मग तो स्त्री-पुरुष कोणीहि असो त्याचा जीव रक्षण
करण्यासाठीं आपण कांहींहि केलें तरी तें पाप नव्हे. मीं स्वतः तसें केळें नाहीं,
याचें कारण तुझी आणि त्या मुलींची ओळख असावी अर्से मला वाटलें. ती'
शुद्धीवर आल्यावर मीं तिच्या अंगाला स्पर्धे केला असें तिळा कळून आलें असतें
तर तिला लाजल्यासारखें झालें असतें. म्हणून तुला तें काम मीं सांगितलें.” इतकें
तो बेरागी बोलतो आहे तोंच त्याचा एक दहा-अकरा वर्षांचा बालशिष्य हनमान
या नांवाचा तिथे आला. त्याबरोबर मानाजीनें त्याला हांक मारून त्याला
म्हटलें, “ हनुमान, गुरुजी सांगतात त्याप्रमाणें कर. तो रस घे आणि पा
बाईच्या सर्वांगाला चोळ.”
बेराग्यानेंहि हनूमानाला तशी आज्ञा केली. निष्पाप वृत्तीचा तो कोंवळा
बालक गुरुजींची आज्ञा प्रमाण मानून करुणेंच्या सर्वांगाला रस चोळूं लागला.
ते बेराग्यांचें वास्तव्यस्थान कांचनगडापासून अवघ्या दोनतीन कोसांवर
एका अगदीं एकान्त स्थळीं निबिड झाडींत एका जुन्या मोडकळलेल्या देवालयांत
होतें. तेथें बरेचसे बेरागी होते. त्यांतला एक मुख्य असून बाकीचे त्याचे शिष्य
होते व मानाजीदेखील त्यांपेकींच एक होता हें वाचकांना कळन चकलेंच आहे
यवनांनीं दाही दिशांना मांडलेल्या हलकल्लोळामुळे जे कांहीं धर्मात्मे हिंदू
वेतागून सर्वेसंग-परित्याग करून परागंदा झाले होते त्यांपैकींच पूर्वोक्त वेरागी'
हा एक अधिकारी ब्राह्मण होता. तो तंजावरचा राहणारा. तेव्हांपासून माना-
जीचा व त्याचा परिचय आणि तो सत्पुरूष गणला गेल्यामुळें मानाजीनें लहान-
पणींच त्याचें शिष्यत्व पतकरिळें होतें. पुढे अनेक कारणांमुळे तो बेरागी तंजावर
सोडून तपश्चर्या करीत देशोदेशीं हिडतां हिडितां आतां त्या ठिकाणीं वास्तव्य
१४२ _ पेशवाईचे मन्वंतर
करून राहिला होता. धर्भरक्षण हें त्याचे प्रधान कर्तव्य असल्यामळे आपल्या
परमपूज्य हिंदु धमरचिं जिवाभावाच्या मोलानें रक्षण करणारी तरुण पिढी हिंदं-
तून निर्माण झाल्याशिवाय गत्यंतर नाहीं असें त्याचे मत होतें, व म्हणनच अशी
तेजस्वी पिढी तिर्माण करण्यासाठीं त्यानें जे जे उपाय आंखळे होते त्यांतीलच
एक उपाय हा होता कीं. आपल्यासारखेच स्वार्थदान्य ब धर्मसेवापरायण असे
शिष्य गोळा करून त्यांना संन्यासदीक्षा द्यावयाची व त्यांना देशाच्या,देवाच्या व
धर्माच्या सेवेसाठी कार्यक्षस करावयात्रे. या व्येयाससार त्या वेराग्याचा उद्योग
चालला होता
त्या दिव्य औषधीने हां हां म्हणतां आपला प्रभाव दाखविला. करुणात्यापूर्वीच
हलचाल करूं लागली होती, ती आतां उठून बसण्याचा प्रप्रत्ल करूं लागली व
डोळे उघडून सभोंवार पाहुं लागली. मानाजी तिला म्हणाला, राणीसाहेब,
जागच्या हाल्ं नका. अंसळ तशाच स्वस्थ रहा. श्रम तुमच्या शरीराला सोस-
वणार नाहींत. करुणंनें मानाजीचा शब्द मानिला. ती किचित् स्वस्थपणे
करुणापूर्ण दृष्टीने त्याच्याकडे पाहात उद््गारळी, “ मालाजीराव, आपण
इकडे कूठे ?”
““ आणि आपण इकडे कूठे ?” मानाजीनें उलट विचारिलें.
“ काय या राणीसाहेब आहेत! ” बेराग्यानें आश्चरयंपुर्वक प्रश्न केला.
होय. या तंजावरच्या राणीसाहेब आहेत.” मानाजी उत्तरला.
करुणेने किंचित् ओशाळेपणानें मान जरा बाजूला फिरविली.
“हें मला माहीत नव्हते. एकूण आज आमच्या हातून राणीसाहेबांची बहु-
मोल सेवा झाली म्हणावयाची. मात्र या सेवेचा मोबदला आम्हांला मिळाला
पाहिजे, हें मी आमच्या राणीसाहेबांना वेळींच सांगून ठेवितों. आमच्या धर्माचा,
समाजाचा किवा राष्ट्राचा उद्धार कर्त्या राजपुरुषांच्या कतंव्यतत्परतेवर
अवलंबून आहे, आणि राजपुरुषांना कार्यक्षम करणें सर्वस्वी या त्यांच्या देव-
तेच्या हातीं आहे. ” बैरागी उद्गारला.
“पण ही देवतेची मूति तूर्त तरी भंगली आहे, दुष्टावली आहे.” करुणा विषण्ण
वित्तानें म्हणाली
भंगळेली सूति पुन्हां अभंगतेनें सांधली जाईल आणि दृष्ट लावणाराच्या
डोळ्यांत मीठ-मोहरी पडून पुन्हां सर्वे कांहीं पूर्ववत् आनंदमय होईल.
बैराग्यांच्या तांड्यांत करुणाराणी १४३
* »0-/ १७ /१%. आट २. ८१ ष्टी २.५ ६.४ १- शह
आपण ईदवराच्या ठिकाणीं अढळ श्रद्धा ठेवा, कीं तो आपल्याला कधींही अंतर
देणार नाहीं. पण आपण अगोदर मला सांगा, इकडे आपलें येणें कसें घडले? ”
मानाजीनें विचारिलें.
“ संभाजी मळा देवदूतासारखा भेटला म्हणून मीं हा दिवस पाहिला आहे,
नाहींपेक्षां तुम्हांला ही करुणा आज या जागेंत मुळींच जिवंत दिसली नसती,
पण संभाजी कुठे आहे ?
मानाजीला संभाजीच्या वर्तनाविषयीं संशय वाटूं लागला होता. पण
करुणेनें संभाजीची इतक्या आदरपूर्वक आठवण करतांच त्यानें मनांत खूणगांठ
बांधली कीं, संभाजी आपणाला वाटला तसा विशवासघातको नाहीं. तो
कांहीं तरी अपरिहार्य अडचणीमुळे कूठे तरी गुंतून पडला असला पाहिजे. एरव्ही
तो येथें येऊन घडल्या प्रकाराची खबर द्यायला च॒कला नसता. संभाजी कोणत्या
महत्त्वाच्या कामगिरींत गंतला होता याचा अर्धवट उलगडा करुणंच्या उद््गा-
रांवरून झाळाच होता. बाकीचा उलगडा करून घेण्यासाठीं मानाजीनें करुणेला
पुन्हां प्रश्न केला. तेव्हां तिनें तीन दिवसांचा वृत्तांत निवेदन केला, “ हें पहा,
माझ्या आयुष्याचा सत्यनाश करण्यासाठीं फारां दिवसांपासून खुद्द आमच्या
राजवाड्यांत सासूबाई आणि कोयाजी वगेरे त्यांच्या पक्षाचे लोक यांच्याकडून
भयंकर कारस्थान रचलें जात होतें; याची मला परवांपावेतो दाददेखील
नव्हती. बाबा आजारी असल्याचें एक पत्र कोठू्नर्स तंजावरांत माझ्या हातीं
आलें व सासूबाईनीं माझ्या वतीने तिकडे रदबदली करून मला बाबांच्या स मा-
चारासाठीं पाठविलें. पण मो बाबांना भेटन पाहाते तर ते मळींच आजारी
नव्ह्ते. माझ्या मागोमाग मला, तुम्हांला आणि बाबांना बंदिवान् करण्यासाठीं
राजदूत निघाले तेव्हां आपल्या रक्षणाचा भार परमेश्वरावर घाळून आम्ही
तशींच घरसोडन निघालो तों सुरक्षितपणासाठीं कांचनगडाच्या आश्रयाला गेलो
पण सहाराजांना तरी आपल्याविषयी किवा माझ्याविषयी संशय येण्याचे
व आम्हांला दोषी ठरविण्याचे काय कारण ?” मानाजीनें मध्येंच विचारिलं.
करुणा उत्तरली,“ तो सारा आमच्या हितशत्रंंचा डाव होता. सासूबाइनी
आमच्या देवघरांतील त्या प्रासादिक तरवारी तिथून चोरून नेल्या आणि
मानभावीपणानें त्या चोरीचा आरोप माझ्यावर लादला. तुम्ही माझ्यापुर्वीच
सासूबाईंच्या कारस्थानाचा तलास लावण्यासाठीं बाहेर पडलां होतां त्याचा
१४४ पेशवाईचें मन्वंतर
अ ता कल “". 70. १-१ ६७११ “न.
फायदा घेऊन माझा आणि तुमचा अनीतिकारक संबंध असल्याचा विषय
अप्रत्यक्षपणे महाराजांच्या कानीं घालण्याला त्या चांडाळणीनें कमी केलें नाहीं.”
बोलतां बोलतां करुणेचा कंठ दाटून आला. ती क्षणभर स्तब्ध राहिलो.
मानाजीचे नेत्र संतापाने खदिरांगरांसारखे लाळ झाले. तो आवेशानें म्हणाला,
“ माझ्याविषयीं ती कुलटा अशा पापी संशयाचा फैलाव करते काय? थांब,
म्हणावे, हा मानाजी जर अस्सळ मराठ्याच्या पोटचा असेल तर कुलटे, तुला
आणि तुझ्या साथीदारांना या अघोर अपराधाबद्दल यथायोग्य शासन करील.
करुणेसारख्या पतिब्रतेची निदा म्हणजे त्यांना पोरखेळ वाटला काय?”
करुणा पुढ म्हणाली,” आम्ही' कांचनगडावर आलों पण तेथला किल्लेदार
मीरकासीम इतका नीच विश्वासघातकी असेल याची आम्हांला तेव्हां कल्पना
नव्ह्ती. त्यानें पापवासनेनें प्रेरित होऊन मला जन्मांतून उठविण्यासाठी प्रथम
बाबांना केदेंत लोटळें आणि तेव्हांच त्या नरपशूच्या हातीं माझ्या स्त्रीजन्माची
इतिश्री व्हावयाची! पण तेवढ्यांत सासूबाई आणि कोयाजी किल्ल्यावर आलीं.
त्यांना भेटण्यासाठी मी रकासीमला तेथून माझा छळ अर्धवट सोडून बाहेर जावें
लागलें. मळा प्रथम सासूबार्शचा मोठा आधार वाटला. पण अंमळशानें संभाजी
अकस्मात माझ्या महालांत आला व मला जेव्हां सांगूं लागला कीं, माझ्यावर
मन मानेल तसा अत्याचार करण्याला सासूबाईकडून मीरकासीमला मुभामिळाली
आहे, तेव्हां मी सर्व बाजूंनीं हतवल होऊन गेलें. मीरकासीमनें महाराजांना
स्थानभ्रष्ट करून सासुबाईच्या आवडत्या दासीपुवराला तंजावरचा राजा कर-
ण्याचे कबूल केल्यामुळेंच त्याला लांचेदाखळ माझा बळी द्यावयाला व त्या
निमित्ताने आपल्या वाटेंतला माझा काटा दूर करावयाला सासूबाई तयार झाल्या.
आमच्या राजवाड्यांतून चोरीला गेलेल्या प्रासादिक तरवारीही कोयाजीमाफंत'
त्यांनीं चंदासाहेबाच्या हुवालीं केल्या आहेत आणि त्यांचें चंदासाहेबाशीं संगन-
मत झालें आहे, असेंही' संभाजीनें मला सांगितठें. त्यानें लगेच मी नको नको
म्हणत असतां आपले कपडे उतरून मला दिळे आणि त्या पुरुषी वेषांत मला
हरयुक््तीनें महाळाबाहेर काढून दिलें. कदाचित् मीरकासीमला तेवढ्यांतच
महालांत येण्याची इच्छा होईल आणि मी तिथून नाहींशी झाल्याचें कळल्यास,
तो मी कुठें तरी सुरक्षित ठिकाणीं पोंचण्यापूर्वीच माझा पाठलाग करील, या
भयानें स्वत: संभाजी माझीं वस्त्रें नेसून बुरखा घेऊन त्या ठिकाणीं बसला.
बैराग्यांच्या तांडयांत करुणाराणी १४५
सी पुरुषी वेषांत किल्ल्यांतून बाहेर पडल्यें तों संभाजीने सांगितल्याप्रमाण
याच बेराग्याच्या वसतिस्थानाचा शोधे करीत सतत तीन दिवस रानोमाळ
हिंडत होत्यें; पण शोध कांहीं लागला नाहीं. उलट माझा सुगावा लागल्यामळें
शत्रू मात्र माझा पाठलाग करूं लागले. म्हणून मी जीव आणि अन्रू बचावण्या-
साठीं सेरावरा पळूं लागळे तों धापा टाकोत इथें येऊन पोंचलें. त्यापुढे काय
घडले हें मला माहित नाहीं. “ करुणेचें निवेदनही संपले आणि तिला अशक््त-
तेमुळे ग्लानीही आली. ती किंचित् मान टाकून स्तब्ध राहिली. आतां संभा-
जीचा शोध कसा लागणार या फिकिरींत मानाजी होता; तोंच अकस्मात्
तेथें संभाजी हजर
प्रकरण २० वें
संकट आलें पण टळलें
ण्णा१ण-<<'*ः>-“-<>*यबाण्---
संततीला पाहातांच मानाजीला जितका आनंद झाला, त्यापेक्षां करुणेला
जास्त आनंद झाला. संभाजीला तर करुणा तेथें सुखरूप येऊन पोंचली
असें पाहून इतका आनंद झाला कीं, त्याला योग्य अश्ली उपमाच नाहीं.
“ संभाजी, तूं सुखरूपपणें त्या राक्षसाच्या जबड्याबाहेर पडलास?
"परमेश्वरा, तुझी लीला अगाध आहे! ” करुणा संभाजीला पाहून कृतज्ञ अन्त:-
करणानें आकाशाकडे पहात हात जोडून म्हणाली.
“ राणीसाहेब, ही आपल्या-पतित्रतेच्या पुण्यब्रताची पुण्यायी माझ्या
रक्षणाला धांवून आली. ” असें उद््गारून संभाजीने तात्काळ करुणेसमोर
मस्तक नमविले.
“ पण तुझी सुटका तेथून कशी झाली? ” मानाजीनें विचारिलें.
“ तुम्हांला तो सर्व प्रकार राणीसाहेबांकडून कळला आहे एकूण! ” संभाजी
उद्गारला.
“होय. राणीसाहेबांना बंदिवासांतून मुक्त करून तं तिथें ओलीस राहिलास,
त्यानंतर काय झालें तें सांग. ”
“ त्यानंतर काय, अगदीं माझ्या अपेक्षेसारखें झालें. त्या नीच राणीची
अत्याचाराला मान्यता मिळालेली मीं ऐकली, तेव्हांच अंदाज केला कीं, रातो-
रात आतां मीरकासीम राणीसाहेबांना गांजावयाला येणार. त्याप्रमाणे तो
आलाच व पशूसारखे नाना चाळे करूं लागला. मींदेखीळ त्याला प्रथम हुल-
कावण्या दाखवून तो अंमळ बेसावध आहे असें पाहतांच त्याला यमसदनाला
पाठविलें व तसाच स्त्रीवेषांत बाहेर पडलों.... ”
“ स्त्रीवेषांत तुला कोणींदेखील ओळखले नाहीं? ” करुणेने मध्येंच विचारिले.
“ नाहीं. उलट माझा स्त्रीवेषच माझी जिवंतपणी तेथून मुक्तता करूं
शकला. जसा धनी पागल तसे त्याचे सेवकही झाडून सारे पागलच. शिवायस्त्री
ही वस्तू अशीच आहे कीं, ती विचारवंत पुरुषाला देखील पागल बनव शकते.
संकट आलें पण टळले १४७
९७.५ ४.४ ४५४४-४४-४४. ७.५१..५१.४५ ४४, ४४,॥४१ ./0 ” १.४४.» ९ ८ * ॥7४..»0७.०९..४ २ .४0९.४ ४0७४१ ४१७ / ७ »/71७_/ “0
-““४./%-/ * ५ “५.४१. ४४ ४४../१. ९७.७. ४” ७ .४४९...७४१./४/२..
मीं जो जो माणूस भेटला त्याला त्याला त्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणें थापा
देऊन माझी मुक्तता करून घेतली. शेवटच्या दरवाजावरील पहारेकरी मात्र
जरा खमंग भेटला. त्यातें मी स्त्री नाहीं हें जरी ओळखले नाहीं तरी ही
किल्ल्यांतली कोणीतरी दासी-बहुधा हिंदु दासी नुकतीच बळजबरीनें बाटव-
छेली अश्टी पळून जात आहे असें त्याच्या मनानें घेतलें, व लगेच मला घेरून
“ हुरामजादी! असें पळून जावयाचे होतें तर प्रथमच सुखाच्या नादाने
बेहोष होऊन इथें कशाला मरावयाला आलीस! थांब. किल्लेदार साहेबांना
सांगून तुझी चांगली गाढवावरून धिड काढावयाला लावतों. असें तो म्हणाला,
त्यावरून मीं त्याचा मानस ओळखला. मीं अंमळ गयावया करतांच व मला तं
जीवदान देशील तर मी तुज्ञी जन्मभर दासी होऊन रहावयाला तयार आहें
असें सांगतांच तो मूख हुरळला, व" तसें असेल तर चल मी तुला माझ्या घरांत
नेऊन लपवून ठेवतों व उद्यां रात्रो आपण येथून मोंगलाईत पळून जाऊन तेथें
आपला टुणट्णीत नवा संसार थाटूं' असें म्हणाला. मी त्याच्याबरोबर त्याच्या
घरापावेतों गेलों आणि तो किचित् बेसावध असतांना त्याला खंजीराच्या एका
घावाबरोबर यमसदनाला पाठविलें. ”
“ ताः! वाः! तूं फारच बहार केली म्हणावयाची! याबद्दल तुला काय बक्षीस
पाहिजे बोल.” करुणा हर्षभरित होऊन म्हणाली.
“एका तर खरें! ” संभाजी पुढे सांगू लागला, “एथवर झालें तें कांहींच नाहीं
असे दुर्धर प्रसंग मला पुढे गेल्या तीन दिवसांत सहन करावे लागले व त्या प्रसंगां-
तून पार पडतांना माझ्या हातून' अश्या कांहीं चुका घडल्या आहेत कों, त्यांबद्दल
आपण--आणि मानाजीराव तुम्हींही मळा अगोदर क्षमा केली पाहिजे.
“ सांग सांग काय काय घडलें तें सारें सांग! तूं कांहींही केळे असलेस तरी
तें सद्धेतूने केलेलें असल्यानें तुला सात खून माफ! ” असे उद््गारून मानाजी
संभाजीच्या तोंडचा पुढील वृत्तांत ऐकण्यासाठीं कात टंवकारून बसला.
संभाजी सांगूं लागला, तसें पाहूं गेल्या मीच त्या अपराधाबद्दल जबाबदार
आहें असे नाही. आणि एका परीनें तो अपराधही नाहीं. दुर्जन म्हटले कीं
ते मग कोणीही असोत, त्यांना यथायोग्य शासन झालेंच पाहिजे. ईरइवराला
तो न्याय तांतडीनें करावासा वाटला, म्हणून तो माझ्या आणि इतर हिंदूंच्या
मुखीं उभा राहून न्याय करूं शकला. ”
१४८ पेशवाईचे मन्वंतर
“ पण काय झालें तें तर सांग ना! ” करुणा अधीर होऊन म्हणाली,
*: अगोदर मला बाबांविषयीं कांही खबर असली तर ती सांग. ”
“ युंझाररावांची मुक्तता झाली व ते आतां आपल्या साह्याप्रीत्यथं सेन्य
जमविण्याच्या उद्योगावर गेठे आहेत. ”
“ एकूण बाबांची सुटका झाली तर! ईश्वरा! तूं आमचा खरा पाठीराखा
आहेस. ” करुणा संतोषपूर्ण स्वरांत आकाशाकडे नजर लावून दोन्ही हात
जोडून उद्गारली. मानाजीलाही तितकाच संतोष वाटला. बेराग्याला
झंझारराव हे कोण हें माहीत नसल्यानें त्याने मानाजीपाशीं त्याची चवकशी केली'
व मानाजीनें ' ते राणीसाहेबांचे पिताजी ' एवढेंच सांगितलें.
“ असें का? ते कोणत्या बाजूला सेन्याची जमवाजमव करण्यासाठीं गेळे
आहेत? ” बेराग्यानें विचारिलें.
“ त्यांनीं चार दिवसांनंतर मला श्रीरंगाच्या मंदिरांत भेटण्याचे कबूल केलें
आहे. या गोष्टीला आज एकच दिवस होऊन गेला. ” संभाजी म्हणाला.
“ ठोक आहे. तर मग मीही त्यांच्या साह्यार्थ तिकडे जाणार. ' बेरागी
मानाजीला म्हणाला," बेटा मानाजी, यावनी छळापासून कर्नाटक मुक्त हो-
ण्याची शुभ वेळा अगदीं जवळ येत चालली', तूं आतां धीराने कार्यप्रवृत्त हो,
असा माझ्या श्रीरंगानें मळा काल रात्रींच स्वप्तांत येऊन दृष्टांत दिला. त्या-
अर्थी आतां मला त्याच उद्योगाला लागलें पाहिजे. राणीचें रक्षण करण्याला
तं आतां समर्थ आहेसच. याशिवाय या टापूंत तुला जी काय जागृति करतां
येईल ती तू करावी व अनुयायी मिळतील तेवढे माझ्या नांवावर मिळवून शक्य
'तितक््या लवकर श्रीरंगाच्या मंदिरांत माझी भेंट घ्यावी. यापुढे प्रस्तुतच्या
झगड्याचा सोक्षमोक्ष होईतो आमचें वास्तव्य श्रीरंगाच्या चरणांपाशीं आहें
असें समजावें. तुझ्या भदतीसाठीं येथें माझे दोन शिष्य ठेवून मी आतां माझ्या
नियोजित कार्याची सिद्धता करण्याला निघतों.” असें म्हणून बेरागी तेथून
जाऊं लागला. मानाजी, संभाजी व करुणा यांनीं त्याच्या पायांवर मस्तक
ठेवून त्याचा आशीर्वाद मिळविला. करुणेनें कृतज्ञतापूर्वक विनंति केली
“ गुरुदेव, आपण माझे धर्मपिते आहां. आपल्या कृपेनें माझें मंगल होवो.”
“मुली, तुझें सवेतोपरी मंगळ होईल बरें! कांहीं देखील चिता करण्याचें कारण
नाहीं.” असा तिला आशीर्वाद देऊन बेरागी तेथून प्रसन्न चित्ताने बाहेर पडला.
संकट आले पण ठळलं १४९,
४0१६-४१-८४ ५.४५ ४.” ४५७१७..€
करुणेच्या सुटकेनंतरच्या रहस्याचें निवेदन अगदीं भरांत आलें असतांना
'तिकडे दुलेक्ष करून तो बेरागी निघून गेला. तें पाहुन संभाजीला अंमळ चम-
त्कारिक वाटलें. मानाजीनें तें संभाजीच्या चर्येवरून ओळखले व म्हटलें,
“ गुरुमहाराज म्हणजे एक अवलिया आहेत. सांसारिक सुखदुःखांत अगर राज-
'कारणाच्या भानगडींत त्यांचें मन मुळींच रमत नाहीं. ते पूर्ण विरक्त वृत्तीचे
आहेत; केवळ देशाच्या व धर्माच्या संगलासाठीं अर्थात् विदवमंगलासाठींच
ते शरीर धारण करून आहेत. ”
“ बरे; पण त आतां कोणाचा कसला न्याय देवानें केला म्हणालास? ”
'करुणेनें संभाजीला विचारिलें.
संभाजी सांगूं लागला, मीं त्या पहारेकऱ्याला ठार मारून त्याचा पेहराव
धारण करून तसाच रातोरात गडावर गेलों व एकदम अशी हळ उठवून दिली
को, मुरारराव घोरपडे किल्लेदाराच्या विरुद्ध बोभाटे ऐकून ऐकून चिडून
'गेले असून उजाडण्यापूर्वीच त्यांचा गडाला वेढा पडणार आहे. किल्लेदार-
साहेब सेन्याची जमवाजमव करून गडाच्या पायथ्याशीं बंदोबस्त राखण्याकरितां
'तांतडीनें आतांच तिकडे निघून गेले असून तसाच प्रसंग पडल्यास गडांतून श्चू-
वर मारा करतां यावा म्हणून दारूगोळ्यांचीं कोठारें खुलीं राखून सरबत्तीची
'तयारी राखण्याचा त्यांचा हुकूम आहे. ही हुल उठविण्यांत माझा हेतु दारू-
"गोळ्याच्या कोठारांचा तलास करण्याचा होता, व तो चांगल्या प्रकारे सफल
झाला. सुदेवाची गोष्ट ही कीं, त्यांतले एक कोठार अपरूपाराणी व कोयाजी
:हीं दोघें त्या रात्रीं ज्या महालांत विश्रांति घेत होतीं त्याच महालाखालीं होतें.
मीं पहाटेच्या वेळीं सवेच सामसूम आहे असें पाहून त्या कोठाराला बत्ती ठोकली
आणि तसाच गडाबाहेर किल्लेदार साहेबांना सर्वेच आबादीआबाद असल्याची
खबर देण्यासाठीं म्हणून जो निसटलों, तो पुन्हां माघारा कशाला जातों! गडा-
च्या पायथ्याशी असलेल्या एका खेड्यांत राहून गडाचें पुढे काय होतें तें पहात
-बसळों होतों.
“पुढें काय झालें?” मानाजीनें उत्कंठेने विचारिलें. वास्तविक संभाजी
'सारा वृत्तांत सांगतच होता. परंतु तेवढादेखील मानाजीला धीर निघेना.
"कारण, संभाजी गडावरील दारूगोळ्याच्या कोठाराला बत्ती देऊन चुकला होता!
“ पुढें काय; व्हावयाचे तंच झालें. दारूचे कोठार पेटळें व धाडू धुड्म्
१५८ पेशवाईचे मन्वेतर
अशा आवाजांच्या धुमधडाक््यांत त्या कोठारावरचा महाल कोसळून पडला!
गडावरील सर्व मंडळी घाबरी होऊन इकडे तिकडे सेरावेरा पळूं लागली !
हें सर्वे मला कोयाजीच्याच तोंडून कळलें. महाळ कोसळून पडला तेव्हांच
कोयाजी देखील ठार व्हावयाचा. परंतु त्याचें मरण तेथें नेमलेलें नव्हते.”
“ आणि सासूबाई? त्यांची काय अवस्था? ” करुणेनें भयभीत चित्ताने
प्रन केला.
“ थोरल्या राणीसाहेब त्या धूमधडाक्यांत निजधामाला गेल्या असाव्या हें
मला तरी कोयाजीनें सांगितलें.
“अरेरे! सासूबाई मृत्यूमुखी पडल्या, त्यापेक्षां कोयाजी मेळा असता तर
फार बरें झालें असतें. ” करुणा म्हणाली-
“कां कां? त्या तुमच्या सासूबाई म्हणून? ” मानाजीनें विचारिलें.
करुणा यावर काय बोलणार! अपरूपाराणीची कड घेऊन तिनें तरी कोणत्या
तोंडानें बोलावें! ती संभाजीकडे वळून विचारू लागली, गडाची त्या आगी-
मूळें अगदीं वाताहत उडाली असेल! ”
“ अगदीं वाताहात उडाली, अगदीं राखरांगोळी झाली! बहुतेक सारीं
माणसें कोणी भाजून तर कोणी चेंगरून तर कोणी प्राणभयानें पळतां पळतां
अपघातानें थमसदनाला गेलीं. ” संभाजी म्हणाला.
“अरेरे! फार वाईट झाले! ” मानाजी म्हणाला.
“ तुम्हाला माहीत नाहीं मानाजीराव, फार चांगलें झालें. एरव्हीं कांचन-
गड पाडाव करणें आपणांला फार जड गेलें असतें. दगलबाज मीरकासीमनें
एकजात आपल्या हो ला हो म्हणणारीं भाणसें गडावर भरली होतीं, व त्या
गडाच्या जोरावर दमळचेरीच्या टापूत आपला सवता सुभा स्थापन करण्याचा
त्याचा मानस होता. त्या शत्रूचा बींमोड झाल्याशिवाय आपणाला दमलचेरीच्या
घाटाचा पूर्वीच्याप्रमाणें नव्या मोहिमेंत उपयोग तर झालाच नसता, उलट
घाटांत नाकेवंदी करून दबा धरून बसलेल्या त्या मुसंड्या शत्रूंशी झगडतां
झगडतां आवलें सामर्थ्ये निष्कारण खर्ची पडले असतें. ' संभाजी उद्गारला.
“ असें होतें तर झालें तें फार छान झालें. पण एवढ्या हा: हाः कारांतून
आपला प्रबळ हत्रु कोयाजी तेवढा नेमका जिवंत राहिला, हें माच ठीक झालें
नाहीं. ” मानाजी म्हणाला.
संकट आलें पण टळले १"११
“ नाहीं. कोयाजीदेखील बचावला नाहीं. त्याचा नायनाट करण्यासाठीं
तर माझा सारा हा खटाटोप होता! तो त्या अनर्थांतून बचावला व आपल्या
मंडळीच्या आश्रयाला म्हणून आला, परंतु त्या मंडळीला मीं प्रथमच खोट्या
थापा देऊन दूर पांचचार कोसांवर दोडत जावयाला लावल्याकारणानें तो
अचानक नेमका माझ्या हातीं लागला. मी लगेच श्रीरंगाच्या नांवानें त्याचा
बळी घेऊन मोकळा झालों. एवढें आटोपल्यावर मी ताबडतोब तुमच्याकडे
यावयाचा. परंतु येतांना मार्गांत कोयाजीच्या लोकांनीं मला गांठलें, त्यांना
चुकवीत हिंडतां हिडतां एथे यावयाला मला ही' वेळ उजाडली. ”
“ एकूण माझ्यापायीं सासुबाई आणि कोयाजी यांचे बळी पडले, किल्ले-
दाराचा बळी पडला, कांचनगडावरीळ आणखी केक निरपराधी जीवांचा
सत्यनाश झाला! ” असें म्हणून करुणेने दुःखाश्रू गाळले.
“ झाला हा अनर्थ कांहींच नाहीं, असे अनर्थ आपल्या पायीं यापुढेंही घडून
येतील आणि त्यांना आपण स्वतः साक्षी असाल. ” असे कठोर वाणीनें उद्-
गारून मानाजीनें संभाजीला विचारिलें, “ बरें; आणखी कांहीं खबरबात?”
“ आणखी खबर नाहीं आणि बात नाहीं. आतां आपण प्रथम येथून मुक्काम
हलविला पाहिजे. कारण मीनाक्षी रागी आणि मोहना नांवाची एक रक्षा-”
“ ती श्रीरंगाच्या देवालयांतून सय्यद खानाने बलात्काराने पळविलेली ?”
“ होय! तीच. तिला चंदासाहेबाने सय्यद खानाच्या पश्चात् तेथून आपल्या
रंगमहाळलांत पळवूत नेली होती तीच मोहना. त्या दोघी अकस्मात् त्रिचना-
पल्लीच्या किल्ल्यांतून बेपत्ता झाल्या असून त्यांच्या शोधार्थ चंदासाहेबाचे
सैनिक सवंत्र हिडत आहेत. त्याप्रमाणेंच कोयाजीचे लोकदेखील अगदींच
स्वस्थ बसावयाचे नाहींत. त्यांना जर आमचा सुगावा लागला-विशेषतः
राणीसाहेब आपल्यापाशीं आहेत व त्यांचें आपल्याला रक्षण करावयाचें आहे
आपण यंथून दुसऱ्या एखाद्या सुरक्षित एकान्तस्थळीं ताबडतोब गेलेंच पाहिजे.”
एवढे संभाजी बोलतो आहे तोंच मानाजीच्या एका गुरुबंधूर्ने अर्थात् पूर्वक्त'
बराग्याच्या शिष्यानें येऊन वर्दी दिली,“ मानाजी, आपल्या मकाणाला शत्रचा
वेढा घालण्याचा बेत असून सभोंवार शत्रूचे कोणी दोघे हेर पहाणी करीत
हिंडत आहेत. आतां कसें करावयाचें? ”
कसे करावयार्चे आणि काय करावयाचें! मूर्खा, इतके दिवस गुरुजींच्या
१२ पेशवाईचें मन्वंतर
७५० ५-०४०५-०४०९-४४७०४०/४ ९० ४५५७-०४-०० ४५ ४८५४५ ४८४१००४५१५" ४४१४0४४५४४ फशी ४४४0४७ ४७० ७७ फलकही शिश ७४४०७ कशल
सान्निध्यांत तूं फुकट काढिलेस. हेर हिंडतांना तुला दिसले तर त्यांना ताबड-
तोब केद करून कां नाहीं आणिलेंस? ” मानाजीनें रागारागानें विचारिलें.
“मीं सांगितलें त्याचें हें प्रत्यंतर पाहो! ” संभाजी' म्हणाला, “ आतां प्रथम
राणीसाहेबांच्या रक्षणाची काय ती तजवीज करा.”
“ यांच्या रक्षणाची तजवीज! ” मानाजी नरा डोकें खाजवून करुणेकडे
वळून म्हणाला,” राणीसाहेब, आतां आपणाला कसें काय वाटतें? आपणांला
थोडीशी तरी घोडदोड करतां येईल काय? ”
“ हो! प्रसंग आला खरा. आतां त्याला तोंड न देऊन कसें चालेल! ”
करुणा आंथरुणावर उठन वसतां बसता म्हणाली. तिची प्रकृति फारच क्षीण
झाली होती. परंतु प्राण आणि अब्रू यांच्या भयानें तिच्या अंगांत त्यावेळीं
नव्या धैर्याचा व बलाचा संचार झाला. तिच्या अंगीं होती नव्हती तेवढी सुप्त
शक्ति एकाएकीं जागृत झालो. ती अंगावरील वस्त्र सांवरीत म्हणाली,माझी
तयारी आहे. तुम्हांला काय मार्ग आंखावया'चा तो आंखा. ”
“ तृण आपणाला आतां पुरुष वेष घेतला पाहिजे. सध्यांच्या स्थितींत
आपली ओळख दुसर्या कोणाला पटणें इष्ट नाहीं. ” मानाजी म्हणाला.
“कां? मी तुमच्या बरोबर आहें आणि महाराजांना तुमच्या व माझ्या
वर्तनाचा संशय आला आहे म्हणून काय? ” करुणेने विचारिलें. तोंच “ती
पहा राणी! पहातां काय; पकडा तिला... आणि तो पहा मानाजी... तो संभाजी
...सर्वे चोरटीं बरीं एकत्र सांपडलीं. चला घाला त्यांना गराडा. आपलें काम
फत्ते झालें. ” असे उद्गार काढीत एक मराठा सेनिक पुढें धांवत आला. त्याच्या
मागोमाग बरीच सेनिक मंडळी होती
“ती कोण ती राणी? ” एका तरुण वीरानें विचारिलें.
“ ती करुणा राणी. ” म्होरका उत्तरला. संभाजी, एकदम त्याला ओळ-
खून त्याच्या वर तुटून पडला. मानाजी त्या तरुण वीरावर तुटून पडण्याच्या
पवित्र्यांत उभा होता, तोंच त्या वीरानें त्याला एका हातानें आवरीत म्हटलें,
“ झानाजीराव, भिऊं नका. राणीसाहेब, आम्ही तुमचे शत्रू नसून मित्र आहोत.
“ म्हणजे? ” तो म्होरका त्या तरुण वीराच्या तोंडाकडे संशयित मुद्रेने
पाहृं लागला. पहातां पहातां त्यानें आपल्या कमरेच्या तरवारीला हात घातला
देखील. पण संभाजीने * नीचा, हें घे तुझ्या दुष्कमर्चि बक्षीस! * असें म्हणून
संकट आलं पण टळले १५३
"त्याच्या त्या सरसावत्या हातावर एक वार अक्या शिताफीनें केला कीं, त्या"
-सरसा तो हात एकदम कलम झाला. तो तरुण वीर व त्याचा साथीदार यांनींदी
आपल्या तरवारी म्यानांतुन बाहेर काढिल्या व कोयाजीच्या पक्षांतील लोकांशीं
चांगलीच झुंज मांडली. पण ते दोघे व प्रतिपक्षी दहाबारा त्यामुळें त्या दोघांचा
-त्यांच्या समोर टिकाव लागेना. मानाजीला ते दोघे वीर आपले शत्रू कों मित्र
'हेंच कळेना. म्हणून तो जवळ'च स्तब्ध उभा होता. परंतु करुणेने आपणाला
अभय देणाऱ्या त्या दोघा वीरांचा बचाव करणें हें आपलें कर्तव्य आहे असें
-मानाजोला निक्षून सांगितलें, तेव्हां त्याला तिची आज्ञा मानणें प्राप्तच झालें.
तो मध्यें पडला, म्हणून त्या दोघां वीरांचा बचाव झाला.
११,७१०
प्रकरण २१ वें
दोघा वीरांची ओळख.
मे. दोघे अपरिचित वीर आपल्या साह्यार्थ कोण धांवून आले याचा करुणेला.
उमज पडना, व मानाजीला देखील त्यांची ओळख पटेना. वाचकांना मात्र
एथे सांगावयाला हरकत नाहीं कौ, मुरारराव घोरपड्यांकडे परिचयाचे झालेले
तेच ते वीर होते. मुराररावाचा निरोप घेऊन ते दोघे जे निघाले, ते चंदासाहेबा-
विरुद्ध हिंदु लोकांना चिथावणी देत एकसारखे वणवण हिंडत होते. चंदासाहेबा-.
बाचा अंमल हिदूंनाच केवळ दुःसह झाला होता असें नसून मुसल्मानांनाही तो
अगदीं नको नकोसा झाला होता. हिंदूपेक्षां मुसलमानांना चंदासाहेब कांहीं
जादा सवलती देत असे, नोकरी चाकरी देतांना धर्मभेदाचा विचार अवश्य
करीत असे हें खरें. परंतु तेथेंही पक्षपात होताच, व अनीतिदेखील होतीच.
शिवाय नबाबाच्या मुसलमानी अंमलाच्या आकाद्यांत चंदासाहेब हें एक अशुभ
शेंडेनक्षत्र उगवलें आहे, असाही सर्व हिंदू-मुसलमान रयतेचा ग्रह झाला होता.
मुसलमानांना झाला तरी नबाबाचा अभिमान होता, नबाबाला ग्रासून नवा-
बारचे राज्यवेभव बळकावून बसणार्या चेंदासाहेबाचा त्यांना नुसता दरारा
होता. फार काय, त्या प्रांती जे उसलमान नबाबांच्या चालत्या काळीं त्यांच्या
पदरच्या मुल्ला-मौलवींच्या चिथावणीवजा शिकवणीमुळें मुसलमान तेवढा
बंधु व हिंदु तेवढा काफर असा अज्ञानमूलक दुरभिमान हृदयाशी बाळगून'
तंजावरच्या मराठी राज्याचा-हिडु राजसत्तेचा ते तिटकारा करीत होते, ते-
देखील आतां अनुभवाने म्हणू लागले होते कों, चंदासाहेवासारख्या अन्यायी
व जुलमी नबाबाच्या सत्तेपेक्षां हिंदूंचे रामराज्य शतपटींनीं चांगलें. याचें कारण
हिदु राजांनीं अगर सरदारांनी अमुक एक मुसलमान म्हणून त्याला परका माना
व अमुक हिंदु म्हणून त्याला जवळ करा, हिदूंना वेभवाळा चढवा आणि मुसल-
मानांना भुर्के मारा असला अन्याय कधीं करूं नये. त्यांच्या सेन्यांत, त्यांच्या
राज्यकारभारांत, त्यांच्या किल्लेदारांत-राज्यकाजाच्या ह्रएक बाबींत मुसल--
मानांना हिंदूंभरमाणेंच अधिकाराचें व मानाचे स्थळ होतें. हिंदु राजांच्या उदार-.
दोघा वीरांची ओळख १५५.
कतली 0000 श0ीे00/प१ेशी शीय ण शीणीण णीणीिण पटी णी
मनस्कतेची ओळख दरम्यानच्या नबाबी सत्तेच्या चालत्या काळांत मुसलभान
विसरत चालले असले, तरी चंदासाहेबाच्या अनीतिकारक राज्यकारभारानें
त्या बहुतेकांवर सुद्धां हिंदू राज्य यापेक्षां शतपटीनें बरें ' असें म्हणण्याचा
प्रसंग आणिला होता. त्यामुळें चंदासाहेबाच्या विरुद्ध हिंडू समाजांत चेतना
उत्पन्न करून त्यांना युद्धप्रवृत्त करण्याचा क्रम त्या दोघां वीरांनी आरंभिला,
तेव्हां मुसल्भान बरेचसे आपण होऊन त्यांना साह्य करण्याच्या इराद्याने
त्यांच्या निशाणाखालीं जमा होऊं लागले. |
अगदीं कडवे ऊफ हाडामांसानें देखील मुसलमान असणारे कांहीं लोक मात्र
त्यावेळीं चंदासाहेबाविरुद्ध शस्त्रग्रहूण करण्याला नाखूष होते; मुसलमानी
सत्तेविरुद्ध शस्त्र धरणें व हिंदूंना ऊफ काफरांना कोणत्याही निमित्ताने बंधु-
भावानें साह्य करणें हा मुसलमानी धर्माप्रमाणे “हराम' ऊर्फ अधम होय,
अशी त्यांच्या कांहीं मुल्ला मौलवींच्या आगलाव्या भेदमूलक शिकवणींवरून
चुकीची समजूत झाली' असल्याचा तो परिणाम होता. परंतु सर्वच मुसलमान
कांहीं असे हाडामांसाचे मुसलमान नव्हते, बरेचसे बळजबरीनें बाटविले गेल्याने
शरीरानें बाह्यात्कारी मुसलमान पण अंतरंगानें हिंदु असे होते. त्यांना त्यांची
धर्मातर करण्यांत झालेली चूक नानापरींच्या कटु अनुभवाने आतांच कळूं
लागली होती.
शिवाय आज कर्नाटकांत यवनसत्तेला उतरती कळा लागल्यानें कार्यसाधु
मुसलमानांचा बराचसा ओढा पुन्हां प्ळ होऊं पहाणाऱ्या हिंडु राजसत्तेकडे
वळला होता. जगांतील कोणत्याहि धर्माच्या अनुयायांचें अंतरंग अत्यंत
सूक्ष्म दृष्टीनें अजमावून पाहिल्यास जीवनार्थ कलहाचा व्यक््तिमात्राच्या
धर्माभिमानाशीं निकट संबंध असतो असें हटकून दिसून येतें. कर्नाटकांतल्या
पुर्षोक््त मुसलमानांनाच त्याबद्दल हंसावयाला नको, दिल्लीच्या मोंगल बाद-
शाहीच्या चालत्या अमदानींत अनेक रजपत राजांनीं देखील आपल्या राज-
कन्यांचीं मातवर मुसलमानांशीं-बादशहांशीं, दहाजाद्यांशीं किवा सरदारांशीं
लग्नें लावून दिलीं, त्याच्या मुळाशीं तरी या स्वार्थपरायणतेशिवाथ दुसरें
काय होतें? भीतीनें एकादा मनुष्य असें धर्मनिषिद्ध व नामुष्कीरचे कृत्य कर-
ण्याला तयार झाला तरी' त्या भयाचा उगमदेखील ऐहिक स्वार्थाच्या पोटीं
झालेला असतो, हें कटु सत्य सहसा कोणाला नाकबूल करतां यावयाचे नाहीं
१५६ पेशवाईचें मन्वंतर
असा बहुजन समूहाचा प्रत्यक्ष पाठिबा मिळवीत ते दोघे वीर तंजावर-
चिचनापल्ली-गुत्ती दमल्चेरी वगेरे टापूत हिंडत असतांना त्यांना दमल-
'चेरीच्या आसमंतांतू कोयाजी घाटग्याचे अर्थात् अपरूपा राणीचे सेनिक
करुणा, मानाजी वगेरेविरुद्ध मंडळींच्या शोधार्थ भिरभिर हिंडतांना आढ-
ळले. कांचनगडाचा अकल्पितपर्णे नाश झाल्याचें कळतांच तर त्यांचें
पित्त अगदीं खवळून गले होते. त्यांना मोहून भेटला वब आपण अपख्पा
राणीच्या पक्षाचे असून आमच्या प्रतिस्पर्ध्यांचा शोधे करण्यासाठीं हिंडत
आहोंत असें त्यानें त्या लोकांना सांगितलें, तेव्हां ते लोक फंसले व मोहनबरोबर
प्रतिस्पर्ध्यांचा शोध करीत हिडं लागले. मोहनाला त्या प्रांताची व अपरूपा
वगेरे मंडळींची ओळख नसल्यानें ती ओळख पटवून देणारे लोक त्यालाहि
पाहिजेच होते. अपख्पा व कोयाजी यांचा कांचनगडच्या प्रलयांत नाश
झाल्याचें त्यांपेकी कोणालाच माहीत नव्हतें.
तो शोध करतां करतां करुणा वगरे मंडळी अमूक एकान्त स्थळीं आहे
असा तपास कोयाजीच्या लोकांना लागला असल्याने चुलींतला खोबर्याचा
तुकडा काढून घेण्यासाठीं वानरानें मांजराच्या पंज्याचा उपयोग करून घ्यावा
त्याप्रमाणें मोहननें त्यांचा उपयोग करून घेतला होता. तो त्याचा कार्यभाग
होतांच त्यानें त्या मूर्खांना कशी यभसदनाची वाट दाखवून दिली, हें वाचकांना
मागील प्रकरणांत कळून चुकलेच आहे.
करुणाराणी, मानाजी, वगेरे सारीच मंडळी आपणाविषयीं बुचकळ्यांत
'पडळेली' आहे असें भोहननें पाहिलें, तेव्हां तिच्याजवळ जाऊन तिची सम-
जत करण्याला त्यानें सुरुवात केली, राणीसाहेब, आपण मला ओळखीत तसाल
व म्हणूनच माझ्याविषयीं आपलें मन साक असेल. परंतु तशी शंका घेण्याचें
कांहींदेवोळ कारण ताही. भो आपला पाठोराखा भाऊ आहें असें समजा.
बोलतां बोलतां मोहननें करुणेचा हात आपल्या हातीं घेतला व करुणेने
तो एकदम मार्गे ओढला. आईइचयं हें कीं त्या स्पशरनि करुणेच्या चित्तवृत्ति
'जितक्या थरारल्या तितक्या मोहूनच्या कांहीं थरारल्या नाहींत. मात्र तो
बोलतां बोलतां अंमळ थबकून आपल्या साथीदाराकडे पाहूं लागला एवढें खरे.
“ राणीसाहेब, हा तरुण आपल्या परिचयाचा आहे का? ” मानाजीनें
संदेहपूर्ण वृत्तीने प्रश्न केला.
दोघा वीरांची ओळ्ख १५७
१७५९४१७. ४.” %. €0१..४0१. ४११. “0 “१0% ४४% ४७ /४१% * ७ 0७ »१७ ४७,१४४. ४४७, ४४.४१. ५0४, ५१४८७ ७.७४. .“ ४४ //९.७९.५ 0४.४ ९-५॥९..५0 “0. ७. ४../% ७ ४ ७५ ४. ५0४../ ७.५१ ७ “१४% ५१ ५ ७५१७ ५१.४७ 0७ ४ ७५0४ ४ ७ 00५ ४ फेल वकि
“ नाहीं. ” करुणा उत्तरली.
“ ओळख नसली तरी मला वाटतें राणीसाहेब, पाठीराखा भाऊ या नात्यानें
माझा स्वीकार करण्याला आपणाला कांहींच प्रत्यवाय नाहीं. ” मोहन
निमेल चित्तानें उद्गारला.
परंतु त्याच्या चित्ताची निर्मळता मानाजी व संभाजी यांच्या-फार काय,
करुणेच्या देखील मनाला पटली नाहीं
तं राणीसाहेबांना ओळखीत असशील; तृ त्यांचा हितकर्ताहि असशील
परंतु कुत्रा कितीही इमानी झाला तरी धनिणीचे तोंड चाटावयाला धावून
गेला तर तें कोणी कसें सहन करावें ? एकवार हा अतिप्रसंग मीं सहन केला;
पुन्हां असळे चाळे करशील तर चांगली अद्दल घडेल याद राखून ठेव. ” मानजी
रागारागाने उद्गारला.
परंतु आश्चर्य हें कीं मोहनच्या मनाला त्याचें कांहींदेखील वाटले नाहीं. तो
इतक्या बेफिकीरपणें हंसत तेथें उभा होता कीं पहाणाराला तो एक अति निलेज्ज
माणूस आहे असें तरी वाटावे, किवा करुणेचा आणि त्याचा पुर्वीचा कांहींतरी
निगढ संबंध असल्यामुळेंच तो इतक्या निर्भय चित्ताने वागतो आहे असें वाटावें
पैकीं करुणेची व त्याची ओळख असणें तर शक्यच नव्हतें. तसें असतें तर तिनें
तें लपवून कां म्हणून ठेवलें असतें? इतकेंच काय पण मोहन इतके झालें
तरी हंसत समोर निलंज्जासारखा उभा आहे असें पहातांच करुणेच्या तळ-
पायाची आग मस्तकाला जाऊन झोंबली. ती कपाळाला आंठ्या घालून म्हणाली,
“कोण निलॅज्ज मनुष्य आहे हा ! याला अगोदर एथून हाकलूनद्या पाहु! ”
संभाजी इतका वेळ अगदीं स्तब्ध राहून सर्वे प्रकार अवलोकन करीत होता
तो मोहंनच्या तोंडाकडे संशयग्रस्त मुद्रेने न्याहाळून पहात उद्गारला, “ नाहीं
राणीसाहेब, ह्या माणसाला याप्रमाणें मोकळे सोडणें मला धोक्याचे वाटतें.
प्रथम मळा एक शंका आली आहे तिचा निर्णय करून घेऊं दे. घेऊं का? ”
“ कसली शांका ? ” करुणेने विचारलें
“ याला कांहींतरी बित्तं सुगावा लागलेला दिसतो. ” मानाजी म्हणाला,
“हे बदमाष एथें शत्रूच्या वतीनें हेरगिरी करण्यासाठीं आलेले असावे, व आपल्या
प्राणावर बेतणार असें पाहुन यांनीं आपल्या संवगड्यांना विरवासघातानें ठार
करून आमच्या डोळ्यांत धूळ फेकली.” बेराग्याचा एक शिष्य मध्येच म्हणाला.
१२५८ पेशवाईचे मन्वंतर
“ मला माझ्या शंकेर्चे निरसन करून घेऊं देच! ” असें म्हणून संभाजीने
'एकदम पुढें जाऊन मोह्नच्या मस्तकावरचा मंदिल हिसकावून खालीं ओढला.
त्यासरसा वस्तुस्थितीवर लख्ख प्रकाश पडला. तो मोहन नसून ती मोहना होती.
“ राणीसाहेब, आतां तरी मी आपल्या शरीराला स्पर्श केला यांत कांहीं
अपराध केला नाहीं ना ? आतां आमचें वेषांतर उघडकीला आलेंच आहे.
आतां हातचे राखून ठेवण्यांत मौज नाहीं. राणीसाहेब, मानाजीराव, आमचा
रहस्यभेद कोणापाशींही करगार नाहीं अशी आपण सर्वांनी शपथ दिली तर
मी हें रहस्य याहीपेक्षां जास्त खुलासेवार उलगडून दाखवावयाला तयार
आहें. ” मोहन--नव्हे, मोहना म्हणाली-
“-आपच्यापकीं कोणीही ह्या रहस्याचा भेद करणार नाहीं. खरेंकाय तें
'एकदांचें कळूं दे. ” करुणा म्हणाली.
एणीसाहेब, आतां आपणदेखील खऱया स्वरूपांत प्रगट झालें पाहिजे
ही मंडळी आपणाला कोणी परकी नाहींत. ” असें म्हणत' मोहनेनें आपल्या
साथीदाराच्या मस्तकावरील मंदिल ओढून काढला. तों ती देखील एक स्त्री
.होती-ती राणी' मीनाक्षी होती.
“ काय, राणीसाहेब ?” मानाजीनें आश्चर्यचकित वृत्तीने नेत्र विस्फारीत
'करून मीनाक्षी राणीकडे पहात विचारलें, “ ही कोण आणखी अभागी राणी?
आणि तृ कोण? ”
मीनाक्षीते खिन्न वदनानें खालीं मान घातली. तिनें कोणत्या धीराने
वर तोंड करून पहावें ? तिच्या हातून पूर्वायुष्यांत घडलेल्या चका तिला
'एकीमागन एक आठवं लागल्या. ती मळमळ रडं लागली
मानाजी वगेरे मंडळीने मीनाक्षी राणीचे नांव त्रिचनापल्लीची एक दराचारी
राणी म्हणून अनेकवार एंकलें होतें. तीच ती असावी असा तके करून माना-
जीनें म्हटले, “ ही मीनाक्षीराणी' आपल्या जातिधर्मावर लाथ मारून-
आपल्या उभय कुळींच्या बेचाळीस पूर्वेजाना नरकांत लोटून एका हलकट
मसळमान जाराशीं व्यभिचार करणारी--
किती कठोर शब्द हे !
भ्रकरण २२ वें
शिवगंगेकडे
लो कितात मनुष्याचे शील भ्रष्ट झालें, शरीर भ्रष्ट झालें, तरी मत काय-
मचे भ्रष्ट होतेंच असें नाहीं. आपल्या कृतकर्मांबद्दलच्या पशचात्तापानें पावन
झालेल्या मीनाक्षीला ते अपमानकारक शब्द दुःसह वाटले. वस्तुतः तिनें
मोहनेबरोबर आपली मोकळीक करून घेतली, तेव्हांपासून ती मोहनेला
विनवीत होती को जय मला हंसेल, माझ्या तोंडावर थुंकेल, मी
समाजाच्या उघड्या पटांगणांत वावरणें बरें नाहीं. तरीही मोहतनेनें
तिर्चे शांतवन करून तिला धीर देऊन आत्महत्येपासून तिचें मन परावृत्त
केलें होतें. मीनाक्षी तरीही आत्महत्येच्या निश्चयापासून परावृत्त झाली नसती.
परंतु मोहनेनें तिला जाणीव दिली कीं तुम्हांला मरावयाचेंच आहे तर आपल्या
अखेरच्या पापाची निष्कृति करून मग तरी मरा ! तें अखेरचें पाप म्हणजे
मुरारराव धोरपड्यांना पाठविलेला स्वदस्तुरचा खलिता होय. मोहनेनें
तें पाप किती अघोर आहे व त्या पापाचे निराकरण आतां माणसाकडन होणें
कर्से अशक्य आहे हें अत्यंत परिणामकारक वाणीने मीनाक्षीला पटवन दिलें, व
तेवढा कार्यभाग आटोपून चंदासाहेबाचा एकदांचा नाश झाल्यावर आपण
स्वतःदेखील आत्महत्त्या करून ह्या भ्रष्ट स्त्रीदेहाची इतिश्री करण्याला तयार
आहों असेंही सांगितलें, म्हणून मीनाक्षी तेवढी मनाचा धडा करून मोहने-
बरोबर नाना जागीं हिंडत होती. तरीही मीनाक्षीनें : आपल्या खऱ्या स्वरूपांत
जगाला आपला परिचय होतां कामा नये, तो परिचय होतांच मी माझ्या
जीविताची इतिश्री करून घेईन ' असें मोहनेला पर्वीच निक्षत बजावले
होतें, व मोहनेनेंही तें तेव्हां मान्य केलें होते. आपली सवेस्वीं बेअन्र झाल्या-
मुळे जग आपणाला अत्यंत हीनतापूर्वेक वागवील ह्या भयानें मीनाक्षी असें
बोलत आहे, ठा उद्धेगाचा झटका हळुहळू आपोआप दूर होईल, असा दूरवरचा
अंदाज बांधून निदान मुरारराव घोरपड्यांचा गेरसमज दूर करण्यापुरता तरी
आपण तिचा उपयोग करून घ्यावयाचाच असें मोहनेनें आपल्या मनाशीं
पेशवाईचे मन्वंतर
>€च्ड्ि
81
9
ठरविलें होतें. ह्या व इतर सर्वे घडामोडी सुसंगतीनें आपल्या हातून पार
पडाव्या यासाठींच तिनें व मीनाक्षीने चिचनापल्लीच्या किल्ल्यांतून बाहेर
पडल्यावर पुरुष वेष धारण केला होता. मोहूनेला तो पुरुष वेष फारच खुळून
दिसे; तो एक विशोच्या उमरीचा अद्याप मिशीदेखील न फुटलेला गोंडस
तरुण आहे असें पहाणाराला वाटे. परंतु मीनाक्षी राणीचा पुरुषवेष सहजा-.
सहजी पचला जाण्याजोगा नव्हता. ती मोहनेच्या मानाने वयस्क होती
अझ्या बिन्मिज्लीच्या पण कोमल चर्येच्या प्रोढ पुरुषाला प हुने संशय कोणाला
कसा येणार नाहीं !
मीनाक्षीला ह्या अडचणीची जाणीव होती. म्हणूनच पुरुष वेपांत झालें
तरी प्रामुख्यानें कांहींदेखील न करण्याचें तिनें आपल्या मनाशीं ठरविलें होते.
या'चा अर्थ ती चंदासाहेबाच्या बंदिवासांतील ज्वलज्जहाल मीनाक्षी बंदिवास
कपाळींचा टळल्यावर हेतुपुरस्सर कतंव्यच्युत होऊं पहात होती असा नव्हे.
परंतु कतेव्यनिष्ठेची मोहनेच्या अंत:करणांत तेवणारी ज्योत जितकी तेजस्वी
व शीश्रप्रभादी होती, तितकी मीनाक्षीच्या अंतःकरणांतील ज्योत तेजस्वी
व प्रभावी नव्ह्ती. यार्चें कारण बाह्यतः: जरी मीनाक्षी व मोहना या दोघीही
पतिता असल्या तरी मोहना अंत:करणाने गंगाजलाप्रमारणे निर्मल होती'; -
ती स्त्रीजन्मामुळें प्रतिकूल परिस्थितीशीं टक्कर देतां देतां आपल्या कौमार्याचें
रक्षण करण्याला असमर्थ ठरल्यामुळेंच केवळ वतिता बनली होती. मीनाक्षीचें
तर्से नव्हेते. ती आपण होऊन चंदासाहेवाशीं निषिद्ध मैत्री करून पापाच्या
गतत खितपत पडली होती. पहिला कांहीं काळ तर--चंदासाहेबानें आपला
केसाने गळा' कापला हें तिला स्पष्टपणे कळूं लागे पावेतो-तिळा आपण करतों
हें पाप आहे याचीदेखीळ जाणीव तिच्या मनांत उत्पन्न झाली' नव्हती. उलट
तिला तेव्हां असेंही वाटत असेल कीं मी एवढ्या धनंतर राज्याची धनीण आहें.
ही माझी एकटीची दोलत आहे. या दौलतीचा मीं माझे विलासविहार साजरे
करण्याच्या कामीं उवयोग केला तर त्याविरुद्ध त्र काढण्याचा कोणाला काय
अधिकार आहे. त्यानंतर तिळा उपरति झाली तीदेखील तिच्या विलास-
सेवनांत चंदासाहेबाच्या नीचतेमुळें खंड पडला म्हणून ! मोहनेच्या सहवासांत
तिच्या सद्भावना जागृत झाल्या, ती कांहीं काळ कार्यप्रवृत्त झाली. परंतु
ती प्रवृत्ति अखेरपावेतों कायम टिकू शकली नाहीं याचें कारण तिला आपण
रिवगंगेकडे १६२१
२.४४...”
जगांत कांहीं सत्कार्य करूं यक असा आत्मविश्वास वाटत होता. तशी तिची
मुळींच इच्छा नव्ह्ती असें नाहीं. परंतु खरें कांहीं तरी कार्य करण्यासाठीं
म्हणून जन्माला आलेलीं कांहीं माणसें असतात असें जें आपण म्हणतों त्यांतली
ती नव्हती. ती एक सामान्य स्त्री, तारुण्यांत तिळा विलासविहाराची आवड,
त्या दुदेमनीय आवडीमुळेंच ती तरुणपणीं विधवा झाल्याकारणाने चंदासाहे-
बाच्या नादीं लागली, आणि आतां तिला जें मरण बरेंसें वाटत होतें त्याचें मुख्य
कारण म्हटलें म्हणजे एका बाजूनें चंदासाहेबाविषयीं पूर्ण निराश्या व कट्
अनुभव, दुसर्या बाजूनें ऐहिक सुखवासनेचा भर वयपरत्वे ओसरल्यामुळें
सुचू हागळेला विवेक, तिसर्या बाजूने पश्चात्ताप व त्या पश्चात्तापाच्या ऐन
वेळीं घातलेलें मोहनेनें तिच्या डोळयांत उपदेशाचें झणझणीत अंजन, आणि
चवथ्या बाजूनें स्वत:च्या सारवेत्रिक अध:पातामुळें व परावलंबीपणामुळें आपला
सर्वेनाश झाळा, आतां आपणाला सुखही लाभणगें शक्य नाहीं आणि मानमान्यता
लाभणें तर शक्य नाहोंच नाहीं अशी दुबळ्या मनाची होऊन चुकलेली बालं-
बाल खात्री. अशा स्थितींत मोहनेनें तिला हाताशीं धरलें नसतें तर तितें
यापूर्वीच आत्महत्त्या केळी असती. ती अर्थात् आपल्या हातून घड-
लेत्या अक्षम्य पातकांर्चे परिमाजेन म्हणून केवळ नव्हे, तर जगांत आशेने जग-
ण्याला जागा नाहीं म्हणून !
मोहनेचा विचार मात्र मीनाक्षीला हाताशीं धरण्यांत अगदीं निराळा व
सखोल असा होता. तिला पहिलें भय असें होतें कौ न जाणो, आपण एकट्यानें
कोणत्याही मिषाने मुराररावांकडे जाऊन चंदासाहेबाच्या दुष्ट हेतूविषयीं
त्यांना सावध करण्याचा प्रयत्न केल्यावर देखील त्यांनीं सावध होण्याचें
नाकारले तर! त्यांचा आपणावर विदवास बसेलच असा भरंवसा तिला
वाटत नव्हता, व स्वतः मनांत आणलेल्या सार्वत्रिक मंगलाच्या इच्छेला सफ-
लता प्राप्त होण्यासाठों मुराररावांसारख्या हिंदु धर्माभिमानी तेजस्वी वीरांचे
रक्षण होतें तर तिला अवश्य वाटत होतें. मीनाक्षी राणीने आपण होऊन
मुराररावांपाशीं त्या खलित्याविषयीं रहस्यभेद केल्यास ते त्यावर तरी खास
विश्वास ठेवतील अक्या खात्रीनें मोहनेनें मीनाक्षीला हाताशी धरलें होते.
तो कार्यभाग मीनाक्षीची म्राररावांना ओळख न होतांही पार पडला होता
लोकमत आपल्या बाजूनें तयार करण्याच्या कामीं मीनाक्षीचा उपयोग करून
११
१६२ पेशवाईचे मन्वंतर
घेण्याचाही मोहनेंचा मानस होता. मीनाक्षी' कितीही बहकली असली तरी'
ती' जर लोकोपकारासाठीं समाजांत प्रगटपणणें वावरू लागली, तर चंदासाहे-
बाच्या जुलमी अंमलामुळें सर्वत्र संत्रस्त झालेल्या हिंदु रयतेची तिला सहानु-
भूति मिळेल व चंदासाहेबानें सर्वत्र चालविलेल्या यावनी अत्याचारांचा परि-
णामकारक बंदोबस्त करतां येईल, अशी मोहनला आशा होती. |
परंतु मोहना मीनाक्षीला एथवर तरी कायंप्रवृत्त करूं शकली नाहीं.
मुरारराव घोरपड्यांची संशयनिवृत्ति होईपावेतों ती आपणाकडे कोणाचें
लक्ष जाऊं नये यास्तव पुरुष वेषांत मोहनेचा नव्हे, मोहंनाचा अनुचर या
नात्यानें वागली. पण तो कार्यभाग आटोपतांच तिनें माझें कार्य संपले, आतां
मला माझ्या मार्गानें जाण्याला मोकळीक दे ' असें मोहनेच्या मार्गे ट्मणे
लावलें होतें. मोहना मीनाक्षीच्या मनाची चलबिचल ओळखून वागण्यांत
वाकबगार होती. म्हणूनच ती मिनाक्षीला मुराररावांकडून निघाल्यापासून
आज चार सहा दिवस आपल्या बरोबर राखूं शकली. असें करण्यांत मोहनेचा
हेतु काय होता तें तिचें ती' जाणे !
पण मानाजीच्या एका कठोर वाक्यासरसा मीताक्षीच्या चित्ताचा आलंब
ढांसळला. ती निराशापुर्ण असे उसासे सोडीत कांपर्या स्वरांत मानाजीचें
वाक्य पुर्ण होण्यापूर्वीच मोहनेळा म्हणाली, “ ऐक मोहने, माझ्या अभा-
गिनीच्या जीवितार्चे जगाच्या बाजारांत काय मोल आहे याचा हा दाखला
ऐक ! हें ऐकून घेण्यासाठींच आतां मी जगायचेंना ? ”
मानाजी बोळून गेला खरा. पण ते शब्द इतके मोताक्षीच्या जिव्हारी
झोंबंलेले पाहून त्याला हळहळ वाटली कीं आपण उगाच बोलं नये तें बोललों.
करुणादेखील त्याला म्हणाली, “ मानाजीराव, त्या माउलीच्या दुःखावर तुम्हीं
अशा डागण्या द्यावयाच्या नव्हत्या. ”
“ माझी चूक झाली; त्याबहृल मी त्यांची क्षमा मागतों. ” असें म्हणून
मानाजीनें मीनाक्षीसमोर मस्तक नम्तर केलें. मीनाक्षी त्याला दोन्ही हात
जोडून उद्गारली, “ तुम्हीं माझी क्षमा मागण्याचें कांहींच कारण नाहीं.
तुम्ही बोललां तें अगदीं बरोबर बोललां. जगांतील माझ्या विषयींच्या मताची
पडसाद परमेश््वरानें मला तुमच्या तोंडून ऐकविली. मी तुरुंगांतून सुटल्या-
पासून असे उद्गार ऐकण्याचा हा पहिला प्रसंग मी अनुभवत्यें आहें असें नव्हे.
शिवगंगेकडे १६२
हे सत्योद्यार ऐकतां ऐकतां माझे कान अगदीं किटले आहेत. माझी मला
क्षणोक्षणी अधिकाधिक लाज वाटूं लागली आहे कीं मी जगांतील पतिता
नारींतील अगदीं हलक्या पायरीची' पतिता नारी' आहें. देहान्त शासनार्ने-
देखील माझ्या पापांचें परिमाजन होणार नाहीं, हें मी जाणत्ये. हे विचार
मला अत्यंत दुःसह होत आहेत. मरणाच्या यातना देखील ह्या मानसिक
यातनांहून शतशः सौम्य ठरतील. ” मीनाक्षी मोह्नेकडें वळून म्हणाली,
“मोहने, चांडाळणी, अश्या यातनांच्या नरकांत मला जिवंत ठेवणारी तं माझी
मैत्रीण नव्हेस, हाडवेरीण आहेस. मला आतां तुझाही सहवास नको आणि
ह्या जगांत वास्तव्यही नको. ”
आणि नुसतें वास्तव्य नको म्हणून मीनाक्षी थांबली नाहीं, तिनें तेथून तडक
प्रयाण केलें. मोहना तिचे शांतवन करण्यासाठी तिच्यामागोमाग जाऊं
लागली. पण मीताक्षीनें तिला निक्षून सांगितलें, “मोहने, माझ्या मागोमाग
कोणी याल तर खबरदार! हा पहा हा खंजीर माझ्या हाती आहे. यानें
मी' इथल्या इथें आत्महत्या करून घेईन. ”
“ पूण आपण अशा आतां जाऊन जाणार तरी कुठें ? ” मोहनेने विस्मय-
चकित वत्तीने विचारलें.
“ परमेश्वर नेईल तिथे. ” एवढेंच मीनाक्षी उत्तरली.
“ नाहीों-मी आपणाला अश्या आतताईपणानें जाऊं देणार नाहीं. ” असें
म्हणून मोहना तिच्या मागोमाग धांवत जाऊं लागली.
“ काय; तूं माझी पाठ सोडीत नाहींस ? तर मग ये-माझ्या मागोमाग
ये! ” असें म्हणून मीनाक्षीर्ने खरोखरच आपल्या हातांतील जंबिया छातींत
खुपसून 'घेतला !
जू 2 रे
“ ईश्वरी योगायोगच तसा होता ! ” असें म्हणून मोहना, करुणा, मानाजी
वगेरे मंडळीनें मीताक्षीच्या कलेवराकडे पाहून दुःखाचे उसासे सोडले. आणि
खरोखरच ईरवरी योगायोग तसा होता! मृताला देखील दिव्योषधींच्या संजी-
वनीनें जिवंत करणारा मानाजीचा गुरू अंमळशानें तेथे आला. परंतु
त्यापूर्वी एक घटकाभरच मीनाक्षीची चिता घड्धड पेट्ं लागली होती !
ग्रकरण २३ व
रि
सपाला दूध!
5 पनगडाला अकस्मात अदे लागल्यामुळें विलक्षण हाहाःकार उडाला.
असंख्य होक त्या आगीच्या डोंबाळयांत भाजून मरून गेले. किल्लेदार मीर
कासीम याच्या बहुतेक कुटुंबाचीही तक्षीच दुदेशा झाली. जे कांहीं थोडें
लोक बचावले, ते आजूबाजूच्या भागांत असहाय स्थितींत तिष्ठत राहिले.
दोलतीची तर केवळ राखरांगोळी' झाली.
त्या संकटांतून बचावलेल्या थोड्या लोकांपैकी एक निम म्हातारा पुरुष
व एक निम म्हातारी स्त्री अशीं दोघेजणें कांचनगडापासून बर्याच अंतरावर
एका जलाशयाच्या कांठीं असलेल्या धर्मशाळेत स्वसंरक्षणार्थ थांबलीं असतांना
करुणाराणीला जीवदान देणारा तो बेरागी मनांत कांहीं तरी बेत योजून
तंजावराकडे निघाला होता तो मुक्कामासाठीं आपल्या हनुमान नांवाच्या
अनुचरासह विश्वांतीसाठीं तेथें येऊन उतरला. त्यानें धर्मशाळेंतील त्या
म्हाताऱ्या भाणसाची ती आसच्नमरण स्थिति पाहिली व जवळच्या
बाईला चितामग्न स्थितींत पाहिलें तेव्हां अनुकंपापूर्वक विचारिलें., “ माते,
हा काय प्रकार आहे ? ”
त्या स्त्रीनें बेराग्याला वंदन करून उत्तर दिलें, “ गुरूदेव, आम्ही प्रवासी
आहों. चोरट्यांनी आमच्यावर हल्ला करून माझ्या या सेवकाला मारझोड
केली आणि आमच्या जवळची सारी संपत्ति लुटून नेली. ”
“ मग, तुम्हांला कांहीं द्रव्यसहाय्य पाहिजे काय? ” बैराग्यानें प्रश्न केला.
“ नको. मला द्रव्यसहाय्य नको. परंतु हा परका मुलूख आणि आम्हीं
अशीं हीं अनोळखी. . तद्यांत माझ्या सेवकाची ही दद्या! ” असें म्हणून ती
स्त्री डोळ्यांना पदर लावून स्फुंदं लागली.
बेराग्याला त्या दोघांचीही दया आली. त्यानें त्या माणसाची प्रकृति नीट
तपासून पाहिली, तों तो माणूस बेसुमार मार बसल्यामुळे अगदीं मृत्यूच्या दारांत
घुटमळत पडला होता. त्याच्या शरीरावर झालेल्या जखमा जरी विशेष
भयंकर स्वरूपाच्या नव्हत्या, तरी त्याच्या छातीला मार बसून मेंद्रलाही जरासा
धक्का लागल्यामुळें त्याची अवस्था मोठी कठीण झाली होती.
सर्पाळा दूध! १६५
बेराग्यानें क्षणभर स्वतःशी विचार करून लगेच हनुमानाला कांहीं ओषधी
तेथल्या रानांतून शोधून आणण्याला सांगितले, व तो ती औषधी. घेऊन
येईतों स्वत: आपल्याजवळच्या औषधी दिव्य तेलाचें त्या माणसाच्या शरीराला
मदेन सुरू केलें.
“ तुम्ही कोठून आलां ? ” बैराग्यानें त्या आसन्नमरण म्हाताऱ्याच्या आंगाला
सेळ चोळतां चोळतां त्या बाईला प्रश्न केला.
“आम्ही फार दुरून आलो. ” ती स्त्री उत्तरली.
“दुरून म्हणजे कोठून? ”
बेराग्याचा तो प्रश्न अगदीं साधा व सरळ होता. पण त्या स्त्रीला मात्र
त्याचें उत्तर देणें अवघड वाटं लागलें. ती बुजट वृत्तीने उत्तरली,“ आम्ही
कांचनगडावरून आलों. ?”
“ कांचनगड नुकताच अग्नीच्या भक्ष्यस्थानी पडून तेथें मोठा अनर्थ उडाला
हे..खरें काय ? ? ब्रेराग्यानें विचारिलें.
“होय. पण गुरुदेव, तें आपणाला कसें माहीत झालें? ” त्या स्त्रीने
विस्मयचकित वृत्तीने विचारिलें.
“मला माझ्या माणसांनीं तो प्रकार सांगितला. ”
“ आपल्या माणसांनीं आपणाला काय सांगितलें? ?
“ कांचनगडाला आग लागली म्हणून. ”
“ आणखी कांहीं सांगितलें नाहीं काय ? ? ” त्या स्त्रीने जास्त संशय घेऊन
विचारिलें.
“ नाहीं. आणखी कांहीं सांगण्यासारखे तेथें घडलें काय? ”
“नाहीं. आपले विचारिलें. ”
“ पण तुमच्या विचारण्यांत कांहीं तरी गूढार्थे भरलेला दिसतो. ”
“गूढार्थ कांहीं नाहीं. ”
“तरी पण... ” बेराग्यानें चौकस दृष्टीने त्या स्त्रीच्या दृष्टीकडे पहात
भ्रइन केला, “ तुम्ही कांचनगडाच्या रहिवासी काय? ”
“होय. ” तो स्त्री उत्तरली.
“ तेथें आाणखी आपलीं कोणी माणसें त्या प्रलयांत सांपडली काय? ”
“होय.” ती स्त्री कांहीं क्षण स्वत:शी गोंधळून पण त्या गोंधळलेल्या
१६६ पेशवाईचे मन्वंतर
वृत्तीचा आपल्या चर्येवर भागमूसदेखील दिस न देतां उद्गारली,
आम्ही तेथील रहिवासी नाहीं... ”
“आतांच तुम्ही म्हणालां को, आपण तेथील रहिवासी म्हणून
बेराग्यानें पुर्वोपेक्षां जास्त चौकस नजरेनें त्या बाईकडे पहात विच
“तें मी स्वसंरक्षणार्थ खोटे बोलल्यें, याबहल गुरुदेवांनी मला क्षमा 4
पण आम्ही कांचनगडावरील रहिवासी कांहीं नाहीं. ”
“तुम्ही तेथील रहिवासी असल्याचें दिसतही नाहीं. ”
“बरोबर आहे. पण आपणाला आमच्या करुणाराणीविषयीं कांहीं
कळली काय ? ”
“कां बरें? तुमचा करुणाराणीओीं कांहीं संबंध आहे काय ?
“ होय. आम्ही करुणाराणीचे अनुचर आहों. “ती स्त्री बेरार
चर्यकडे टक ळावून पहात सावधपणाने म्हणाली, “ राणीसाहेबांचे
निमित्ताने कांचनगडावर वास्तव्य घडलें होतें; त्यांच्या तेनातींत आम्ही
इतक्यांत त्या रात्रौ गडावर एकदम भडका उडाला व त्या धांदलींत
गडावरच्या इतर अनेक लोकांबरोबर तेथून वाट सांपडली तसा पळ व
तेव्हां आमची आणि राणीसाहेबांची चुकामूक झाली. राणीसाडहूे
जिवासाठी आम्हांला एकसारखी तळमळ लागून राहिली आहे. ३:
आम्ही तिकडून येणाऱ्या माणसांपाशीं चौकशी करून पाहिली. तों
म्हणाला कों, राणीसाहेब सुरक्षित बचावून आगींतून बाहेर पडल्या, तर
म्हणाला कीं त्या गडावर आपल्या महालांत झोंपीं गेल्या होत्या त्या ख्ज'
जागीं बेसावधपणानें भाजून मृत्युमुखीं पडल्या. पण खरा प्रकारा २
कळत नाहीं.
“तुमच्या राणीसाहेब देवदयेनें सुखरूप आहेत. ”
“सुखरूप आहेत ? ”
“ होय. तुमच्या या संवगड्याची आतां आसन्नमरण अश्शी अवस्थप
आहे, तशीच करुणाराणीचीही झाली होती. परंतु तिच्या आयुष्याची
खबरदार, म्हणून ती तशा स्थितींत मला भेटली. मीं तिला लगेच योग्य स
केळे व परमेद्वरानें माझ्या हातांना यश देऊन तिला जीवदान दिलळें- !
“अस्सें ! ही आनंदाची वार्ता एंकली, एक जीव भांड्यांत पडल्का
सर्पाला दूध! १६७
आतां आमची आणि आमच्या राणीसाहेबांची भेट कुठे आणि केव्हां होईल?”
बेराग्याला वाटलें कीं आपलें वास्तव्यस्थान त्या स्त्रीला सांगून टाकावे,
म्हणजे तेथें जाऊन तिला करुणाराणीची भेट घेणें सोईचें पडेल. परंतु पुन्हा
वयाला वाटलें कौं नको. त्यापेक्षां आपण आपल्या विश्वासू माणसामाफंत
त्यांची भेट करवून द्यावी म्हणजे झालें. तो त्या स्त्रीला म्हुणाला, “ मीच
तुमची आणि करुणाराणीची भेट घडवून आणीन. ”
“कां? आपणाला आमच्याविषयीं संशय येतो काय ? ” त्या स्त्रीने
पंशयी' वृत्तीने विचारिलें.
“असें कांहीं नाही. पण करुणाराणी सध्यां कोणत्या संकटांत सांपडली
आहे याची तुम्हांला माहिती आहे ना? ”
“ रागीसाहेब संकटांत सांपडल्या आहेत ? हें मला माहीत नव्हतें. ”
“म्हणजे ? तुम्ही करुणाराणीच्या सेवकगणांपैकीं ना? ”
“होय. ”
“ कांचनगडावर तुम्ही करुणाराणीपाशीं होतां ना? ”
“होय. ”
“आणि तरीही करुणाराणीवर ओढवलेल्या संकटाची तुम्हांला माहिती
गाहीं ? हें मोठेंच आश्चर्य आहे म्हणावयाचे. ” हे शब्द उच्चारून बेराग्यानें
अशा कांहीं अविश्वासू दृष्टीनें त्या स्त्रीकडे पाहिलें कीं आंगाला आगीची झळ
छागावी त्याप्रमाणें त्या स्त्रीचें तें चित्र बेराग्याच्या त्या तीक्ष्ण दृष्टिपातानें
अस्वस्थ झालें. ती ओशाळलेल्या वृत्तीने बेराग्याकडे पाहुं लागली.
“ गुरुदेव, आपणाला आमचा संशय आलेला दिसतो. ” ती स्त्री म्हणाली.
बेरागी कांहीं न बोलतां गंभीर चर्येनें त्या स्त्रीकडे पहात होता.
ती स्त्री पुढें आणखी म्हणाली, “ आपणाला संशय आला तो बरोबर.
पाझ्या वृत्तींत इतका वेळ तशी धरसोड होती खरी. राणीसाहेबांवरील संकट
आम्हां त्यांच्या सभोवारच्या सेवकजनांना माहीत नाहीं, असें होईल तरी कसें ?
आम्हांला सर्वे कांहीं माहीत आहे. पण असें पहा, तोंड असून बोलायचे नाहीं
आणि डोळे असून पाहायचें नाहीं अशी आमची केंविलवाणी स्थिति सध्यां
झाली आहे. राणीसाहेबांची अ्झू व त्यांचें जीवितही आज मुळींच सुरक्षित
नाहीं. आपण ज्या माणसाशीं बोलावें, तो माणूस तरी विश्वासाला पात्र
१६८ पेशवाईचें मन्वंतर
असेल, तो शत्रुपक्षाचा नसेल, याचा काय नेम ? आपण तसे नाठीं. पण मांजराचे
दुधाने तोंड भाजलें म्हणजे तें ताकदेखील फुकून पिले. आम्हांला यापूर्वी
अनेक वार असे कट् अनुभव आले असल्यानें फार सावधपणानें वागावें लागतें.”
इतकें ती स्वी बोलते तोंच हनुमानाने पाहिजे ती वनौषधि शोधून आणिली.
बैराग्यानें आपल्या तळ हातावर त्यांतला थोडा पाळा चोळून आपल्या जवळ-
च्या वाडग्यांत त्याचा चांगळा चार गोकर्ण भरती उतका रस काढला व
त्याचे चार थेंब त्या आसत्तमरण म्हातार्याच्या नाकांत सोडून बाकीचा रस
त्याच्या छातीला चांगळा चोळला. पाल्याचा जो चोथा होता, तो त्या म्हाता-
र््याच्या शरीरावर जथें जेथे मार बसला होता तेथें तेथें चोळावयाला हनुमानाला
त्यानें सांगितलें.
थोड्याच वेळांत तो म्हातारा हळूहळू शुद्धीवर येऊं लागला. तेव्हां त्या
बेराग्याला आनंद वाटला व त्या स्वीची चर्याही प्रफुल्ल दिस लागली.
“ आणखी थोड्या वेळानें हा चांगला शुद्धीवर येईल. मात्र तुम्ही आणखी
एक दिवस तरी येथून दुसरीकडे जाण्याच्या भानगडीत पडूं नका. हा माणूस
बराच अशक्त झाला आहे व त्याला उरा एक दिवस तरी पूर्ण निश्नांतीची
फार आवश्यकता आहे. ” बैरागी म्हणाला.
“पण आम्हांला राणीसाहेबांची भेट कशी होणार ? ” त्या स्त्रीनें
अधीर चित्ताने विचारिले.
"आजची रात्र व उद्यां दोन प्रहर पावेतो तुम्ही इथेंच रहा; उद्यां हा अगर
सरा कोणी तरी माझा मनुष्य येथे येईल व तुम्हांला तुमच्या राणीसाहेबांकडे
_ नेऊन पोंचवील. ” |
“ इतकी तसदी' आपण घेतली नाहीं तरी चालेल. आपण आम्हांला'
- राणीसाहेबांचा नुसता पत्ता सांगितला तरी आम्ही त्यांचा शोध करीत जाऊं. ”
_ ती स्वी म्हणाली. |
_ परंतु बेरागी पुन्हां म्हणाला,” माझा मनुष्य येऊन तुमची योग्य ती व्यवस्था
तावून देईल. येथे तुमच्या खाण्यापिण्याची कांहीं व्यवस्था करावयाला
_ पाहिजे आहे काय? ”
“कांहीं नको. एवीतेवी आमच्या जवळची पुंजी सारी चोरीला गेलीच
आहे, आतां आम्हांला चोरांपासून भय बाळणण्याचें कांहींच कारण उरलें
"८४५९१५१ “ ७३५७५५७५४७ क ८.७, १००४७ २७४२७, ७७३७ क. मऊ ककी ककी वेत “७८७०५०५५०६
सर्पाला दूध! १६९.
नाही. आमची इतर संवगडी मंडळी आमचा तपास करीत हिंडत असतील-
तीं आम्हांला येऊन भेटतील. तसाच प्रसंग पडला तर मी जवळच्या गांवात
जाऊन गोळाभर अन्न मिळवून आणीन. मात्र आपण आम्हाला राणी-
साहेबांचा पत्ता सांगितला असता तर फार उपकार झाळे असते. आमची
सारी मंडळीदेखीलळ आमच्याप्रमाणेंच त्याच काळजींत आहेत. एकदां रा णी-
साहेबांची भेट झाली असती म्हणजे सर्वांचा जीव हायसा झाला असता. र
बैरागी हनुमानाकडे वळून म्हणाला, “ हनुमान, तू असाच्या असाच
माघारा जा व करुणाराणीला ही वर्दी दे. ” त्यानें त्या स्त्रीकडे वळून विचा-
रिलें, “तुमचें काय नांव राणीसाहेबांना सांगावें म्हणजे त्यांना ओळख पटेल?”
“नांव?” ती स्त्री स्वतःशी अंमळ घोंटाळत म्हणाली, “ झुंक्षारराव
असें नांव सांगावें, म्हणजे राणीसाहेब ओळखतील. |
“< चृण तुमचें नांव काय म्हणून सांगूं ? ” हनुमानाने विचारिलें.
हनुमानाचा प्रश्न अगदीं सरळ होता. पण तो प्रश्न विचारण्याच्या त्याच्या
एकंदर रोंखावरून त्या स्त्रीला वाटलें कीं आपणांविषयीं या माणसाला कांहीं
संशय तर नाहीं ना आला? ती उत्तरली, “ अम्मा असें माझें नांव राणी-
साहेबांना सांगा म्हणजे त्यांना आळख पटेल. ”
“ठोक आहे. ” असें म्हणून वैरागी तेथून निघून गेला. हनुमान मात्र
तेथेंच थांबला. कारण त्याला बेराग्याच्या आज्ञेप्रमाणे करुणाराणीला
निरोप पावता करावयाचा होता.
“* हुनुमान! ” वेरागी तेथून गेल्यावर त्या स्त्रीने हनुमानाला हांक मारून
विचारिलें, “ तूं माझे एक काम करशील काय? ”
“ काय काम करूं? ” हनुमानाने प्रश्न केला.
“ तुला निष्कारण तसदी पडूं नये म्हणून सांगत्ये, करुणाराणीचा पत्ता
त् मला सांग, आणि मग तुला खुद्याळ जावयाचे तिकडे जा. मी त्यांची भेंट
मग घेईन. ”
“गुरुजींची मला तशी आज्ञा नाहीं. ” हनुमान उत्तरला.
“ मला कांहीं जरूरीच्या कामासाठीं शक्य तितक्या लवकर राणीसाहेबांची
भेट घ्यावयाची आहे. ” ती स्त्री पुन्हां म्हणाली, “ तूं एवढें माझें काम करशील
तर मी तुझे श्रम वायां जाऊं देणार नाहीं. तूं मागशील तें बक्षीस तुला देईन. ”
१७० पेशवाईचें मन्वंतर
एवढें त्या दोघांचें संभाषण होतें आहे, तोंच एक सैनिक त्या घर्गशाळेपाशीं
आला व त्या स्त्रीला पहातांच म्हणाला, “ राणीसाहेब, आपण सुरक्षित
आहां ना? ”
त्या स्त्रीने हातार्ने त्या सैनिकाला गप्प रहावयाला खूण केली. तेवढ्यांत
तो सैनिक काय उमजावयाचें तें उमगला. आणि आपली चूक सांवरून घेण्या-
साठीं म्हणाला,“ मळा वाटलें, राणीसाहेब येथें असतील. त्यांचा कांहीं
पत्ता लागला काय? ”
“हो! पत्ता लागला आहे. आपण फार थोर नशिबाची माणसें आहों.
करुणाराणीसाहेब कांचनगडाच्या प्रळयांतून सुखरूप बाहेर पडल्या असून
एका महाभागांच्या कृपेनें आपणांला लवकरच त्यांची भेट होणार आहे.
हा हनुमान-हा त्यांचा-गुरूदेवांचा शिष्य आपणांला राणीसाहेबांपाशीं नेऊन
सोडणार आहे. ” असें म्हणून ती स्त्री हनुमानाकडे अपेक्षापूर्वक पाहुं लागली.
परंतु हनुमान असल्या तोंडचलाखीला फंसणारा नव्हता. त्याला मुळांतच
संशय होता व तो नवखा मतुष्य तेथें येऊन प्रथमच * राणीसाहेब' अशी हांक
मारू लागला त्यावरून तर त्याची खात्रीच झाली होती कीं ही राणी म्हणजे
भपरूपाच होय. अर्थात् तिच्या बरोवरचा तो आजारी म्हातारा म्हणजे
कोयाजीच होय हें हनुमानाने धू्तपणानें ओळखलें. तरीही आपली आणखी
खात्री करून घ्यावी या मनांतल्या संकल्पानें त्यानें आपल्या मनांत काय डाव-
पेंच लढवावयाचे ते लढवून अपरूपाराणीला म्हटळें, “ राणीसाहेब, आपण
आपली ओळख चोरून ठेविली तरी मीं आपणां उभयतांना ओळखले. ”
तो तसाच धैयर्नि कोयाजीकडे वळून म्हणाला, “पण कोयाजीराव, तुम्हींही
मला ओळखले नसेल.!' ”
“नाहीं. मीं तुला ओळखले नाहीं. ” कोयाजी चटकन् बोलून गेला.
हनृमानाची खात्री होऊन चुकली.
भपरूपाराणीलाही आतां आपल्या नांवाचा गुप्तपणा राखणें शक्य नव्ह्तें.
ती आपल्या त्या वेळेपावेतोंच्या वर्तनाची संपादणी' करून नेण्याच्या इरायानें
म्हणाली, ' हनुमान, तूं खरोखरच फार चतुर आहेस. आम्हीं आमची ओळख
अशासाठीं प्रथम दिली नाहीं की,- तुला कदाचित् माहीत असेलच,-चंदा-
साहेब आमच्या वाईटावर टपून बसलेला आहे. त्याचे लोक शिकारी कत्र्यां-
सर्पाला दूध! १७१
क २३ २ २ २ २९ ता ९ ० ९१० २ ९ ताता ताकत
सारखे आमच्या मागावर रानोमाळ हिंडत आहेत. आम्ही या आसमंतात
कोठें तरी संचार करीत आहोंत असा सुगावा त्याला लागला आहे. त्याचा
विशेषतः करुणाराणीवर डोळा आहे. म्हणूनच त्याच्या पापी दृष्टींतून
करुणाराणीला एकदांची बचावून सुखरूपपणें तंजावरला नेण्यासाठीं मी तिला
ेंटण्याला इतकी उतावीळ झालें आहे. आतां तुला आमची ओळख पटलीच
आहे, तेव्हां त॑ जर करुणाराणीची मला ताबडतोब भेट करून दिलीस तर मी
तंजावरला जातांच महाराजांना सांगून तूं म्हणशील ते तुझे मनोरथ पूर्ण
करायला भाग पाडीन. ” |
हनुमानाला कांचनगडावरील सारा वृत्तांत कळला होता, व त्या निमित्ताने
अपरूपा आणि कोयाजी यांच्या राक्षसी कारस्थानाचीही वार्ता कळली होती.
करुणाराणीला पुन्हां संकटांत लोटण्याकरितां अपख्पा तिला भेटण्यासाठी
इतकी उत्सुक झाली आहे हें मनांतून पूर्णपणें ओळखून तो जशास तसें या
न्यायाने तोंडदेखलें म्हणाला,“ आईसाहेब, आपण मला अशी लालूच दास-
विणें म्हणजे माझ्या स्वामीनिष्ठेला कवडीमोलाची ठरविण्यासारखें आहे;
आपण केवळ राजवटीच्या व करुणाराणीसाहेब_ आणि प्रतापासिह महाराज
यांच्या हितासाठीं इतके जीवापाड कष्ट घेत आहां; अश्या वेळीं आपला एक
नम्र राजनिष्ठ प्रजाजन या नात्यानें आपली हीच काय पण याहीपेक्षा अवघड
अशी एकादी आज्ञा असली तरी ती मान्य करणें हे माझें कतेव्यच आहे- त्या-
बद्दल मला कांहींदेखील मोबदला नको आहे. चला. मी आतांच्या आतां
आपली आणि करुणाराणीसाहेबांची भेट करवून देतों.
कोयाजी नुकताच शुद्धीवर येत असल्याने त्याला यापूर्वीचा तेथील प्रकार
कांहींच माहीत नव्हता. तो एकदम आश्चर्यचकित मुद्रा करून तोंड वासून
विचारू लागला,“ औ ! करुणाराणीची मीरकासीमच्या मगरमिठींतून अखेर
सुटका झालीच काय? '
अपरूपाराणीनें कोयाजीळा डोळ्यानें खूण करून म्हटलें, ' होय. राणी-
साहेबांची सुटका झाली व त्या या हनुमानाच्या गुरूच्या कुपेनें सुरक्षित आहेत.
देवदयेने आतां लवकरच आपणांला त्यांची भेट होणार आहे. आपण आतांच
त्यांच्या भेटीला निघालों असतों. पण तुम्हांला इतक्यांत चालवणार नाहीं.
अपरूपाराणीच्या मनांतून हनुमानाला बरोबर घेऊन करुणा राणीकडे जावयाचे
१७२ पेशमाईर्चे मन्वंतर
नव्हते. कारण मग सारेंच कारस्थान उघडकीला आलें असतें. आपण पर-
स्पर आपल्या हस्तकाकडून आपलें वास्तव्य गुप्त ठेवून करुणा व मानाजी,
झुंझारराव वगेरे जे जे कोणी तिचे केवारी सांपडतील त्यांचा एक घाव कीं
दोन तुकडे करून नायनाट करावयाचा होता. तें समक्ष हनुमानसारख्याला
वरोबर घेऊन गेल्याने कसे साधणार ? हनुमानाच्या आतांच्या उद्गारां-
वरून तो अगदीं भोळसट आहे असा अपख्पाराणीचा ग्रह झाला होता.
त्याला चकवून त्याच्याकडून करुणेचा ठावठिकाणा काढून घेण्याच्या हेतूनें
ती त्याला म्हणाली, “ हनुमान, आपणाला आजच्या आज करुणाराणीला
जाऊन भेटतां येईल काय? ?”
“हो! न यायला काय झालें? तें मकाण येथून कांहीं फार दूर नाहीं.
पाहिजे तर कोयाजीरावांना मी पाठंगुळीळा मारून घेतों म्हणजे झालें ”
हतुमान म्हणाला. त्याचा हेतु हा को आपण एकदां या विश्वासघातकी
देशद्रोही दुक्कळीला मानाजी व करुणाराणी यांच्या स्वाधीन करावें, म्हणजे
यांचा योग्य तो बंदोबस्त त्यांच्याकडून टोईळ. हेंही हन॒मानाला दिवस-
गतीवर पडावयाला नको होतें. त्याचा काय नेम! आजचे काम उद्यांवर
गेल्यास तेवढ्यांत ही दुक्कळ आपल्या नजरेआड कोठें तरी काळें करावयाची
व त्यांचीं करुणाराणी वगेरे विरोधी मंडळींच्या नाशाचीं कृष्ण कारस्थाने पुन्हां
नव्या जोमानें सुरू व्हाबयाचीं. त्या क्षणीं एकदां तर त्याच्या मनांत असाह
विचार आळा कौं आपण एथल्या एथे त्या दुक््कलीला ठार करावें. परंतु
अपरूपा काय़ किवा कोयाजी काय, सामान्य मनुष्ये नव्हतीं. शिवाय तसें
करण्याला हनुमानाला त्याच्या गुरूची आज्ञा कोठें होती ? करुणाराणीच्या
मनाची पर्वा त्यानें वेळीं केली नसती. परंतु गुर्वाज्ञा नसतां अशी
कोणतीच गोष्ट करण्याला त्याची तयारी नव्हती.
* एथून तें मकाण कितीसे दर आहे? ” अपरूपाराणीनें करुणाराणीच्या
वास्तव्याचा नक्की तलास हनुमानाच्या तोंडून काढून घेण्यासाठीं मुद्दाम
पुन्हा विचारिलें
“फार तर एका कोसाचें अंतर असेल, ” हनुमान उत्तरला. वास्तविक
करुणा जेथें होती, तें बेराग्याचें निवासस्थान तेथून चांगलें पांचसात कोसांवर
होतें. पण खरें सांगितल्यास अपरूपा व कोयाजी तिकडे जाण्याचा आजचा
सर्पाला दूध! १७३
"€../४%/४ ७.७१, ४, ४0७ » ४७%.» १.४७. ४.७ ७.४ ४८१७ ४७ ७ ७ ,/ ४. / "१५.५ के. /४१५ /90,/ ३.४ ./४१९..४१.४१९१..४0९.४”१%.४ ७०% ४
बेत उद्यांवर टाकतील; असें होऊं नये म्हणून त्यानें मुद्वाम थोडें अंतर सांगितलें.
“म्हणजे कुठेसें १?” अपख्पाराणीनें पुन्हां विचारिलें.
आतां तरी आपणाला नक्की मकाण कळेल अशी अपख्पाराणीची अपेक्षा
होती. पण हनुमान कसला वस्ताद! तो उत्तरला, “त्या गांवाचे अंतर
अगर मकाणारचें नांव मला नक्की माहीत नाहीं. ”
अपरूपाराणी मनांतून हनुमानाच्या भोळसटपणाबददल त्याच्यावर खूप चड-
फडली. पण बाह्यतः शान्तपणाचा आव आणून म्हणाली, मग आपण
असें करू, हा आमचा मनुष्य तुझ्यावरोबर आतां येईल. त्याला तूं तें मकाण
दाखवून ठेव म्हणजे झालें. मग उद्यां, अगर मेण्याची सोय येथें झाल्यास'
आजच्या आजदेखील आम्ही कोयाजीरावांना मेण्यांत वाळून तिकडे घेऊन जाऊं.”
“ टतका कांहीं मी थकळेला नाहीं. मला आतां चांगलीच हुषारी वाटत
आहे. आणि तें मकाणही कांहीं फार दूर नाहीं. आपण तिन्ही सांजांना येथून
निघालों तरी घटकाभर रात्रीला सहज तेथें जाऊन पोंहोच्ं. आतां हा जग-
देव तें मकाण मात्र पाहून येऊं दे.” कोयाजी म्हणाला.
हनुमानाला त्यांच्या त्या चेंगटपणाचा आतां अगदीं वीट आला होता.
असे डावावर प्रतिडाव करण्यांत कांहीं अर्थ नाहीं असें मनांत आणून व कांट्यानें
कांटा कसा काढावयाचा याची कांहीं निश्चित योजना आपल्या मनाशी
ठरवून तो जगदेवाला बरोबर घेऊन जाण्याला तयार झाला. लगेच ते दोघं-
जण निघाले. हन्मान पुढें व जगदेव त्याच्या मागाहून जात होता. जगदेव
झाला तरी अपरूपा व कोयाजी यांचाच अनुयायी. तो मनांत मारे मांडे .
'च्रीत होता कीं आपण तें मकाण हेरल्यावर हनुमानाला एकट्याला अचानक
गांठून ठार केलें कीं काम झालें. पण हनुमान त्याला आपल्या मागोमाग कोठें
नेत होता व त्याचें काय करणार होता हें त्याला काय माहीत !
प्रकरण २9 वें
जगदेवाला देहांत शासन
2 कक मयात,
अअनमानानें आपल्या परीने कोयाजी ब अवख्पा राणी यांना पायबंद लाव-
हव्याची शिकस्त केली. तो त्यांच्यापासून जगदेवाळा बरोबर घेऊन,
करुणाराणीचें मकाण दाखविण्यासाठी म्हणून निघाला, तो जातां जातां
मुद्दाम त्या लोकांचें मार्गात एक भुयारी वसतिस्थान होतें तेथे गेला. जग-
देवाळा तें कायर माहीत! त्या गुप्त स्थळीं हनुमानासारखेच आणखी बरेच
लोक त्या बेराग्याच्या पंथांतील होते. त्या लोकांची कांहीं सांकेतिक भाषाही
आपसांत ठरळेळी होती. जे कोणी देशद्रोही अथवा असाच दुसरा एकादा
महान् अपराध करणारे लोक हातीं लागत, त्यांना देहान्तशासन देण्याची
ग्प्त व्यवस्था त्य़ा भुग्रारांत करण्यांत आळी होती. तें भमार अगदीं गुप्त
होते. वरून त्याचा मागमूसद्दी कोणाला दिसत नसे. तेथे एक मोठा-म्हणजे
फारच मोठा वटवृक्ष होता, त्याच्या बुंख्यांतून भुयारात जावयाची वाट होती-
आंत गेल्यावर एकापुढे एक अशीं दोन प्रशस्त दालने असून दुसर्या दालनाच्या
एका कोपर्यांतून आणखी खालीं जाण्याचा मार्ग आहेगें ञाहेरून दिसे.
पण वास्तविक तो आंत जाण्याचा मार्ग नव्हता. बर बर पाटणाराला पःस-
विण्यासाठीं त्या ' दीनचार पायर्या बांधलेल्या होत्या व त्यांखालीं खोलच
खोळ अशी एक दरी होती. त्या दरींत काटेकुटे, मोडकींतोडकां हत्यारें वगरे
काय काय परब्रद्वा सांचलेळें होतें तें सांगण्याची सोयच नाहीं. शिवाय तेथें
देहान्त शासनाला पात्र झालेल्या अभागी जीवांची प्रेते कुजून दुर्गंध सुटूं नये
यासाठीं बराचसा चुना त्या जागीं कायमचा ओतून ठेवण्यांत आला होता.
हनुमानाने जगदेवासह् त्या भुमाराच्या दाराशीं येंतांच स्वातंत्र्य ' हा
खुणेचा परवल सांगून आंत प्रवेश मिळविला. त्याचे इतर साथीदारांशीं
सांकेतिक भाषेंत पुढीलप्रमाणें संभापण झालें.
“ बरोबर कोण आहे? शत्रू कीं मित्र?”
81 ठ्त्र 3
“त्याचें काय करावयाचें? ”
जगदेवाला देहांत शासन १७५
“ देहान्तशासन . ”
“गुरुजींची अनुज्ञा आहे? ”
“नाहीं. परंतु वेळ अश्ली आहे कीं या वेळीं गुरुजींच्या अनुजेची वाट पहात
बसावयाला वेळ नाहीं. आपल्या देशाचें व धर्माचें समूळ वाटोळे करणाऱ्या
चंदासाहेबाच्या पक्षाचा हा माणूस आहे. याला देहान्तशासन देण्याशिवाय
ठार करण्याला दुसरा मार्गच नाहीं .?”
“ठोक आहे. ”
याप्रमाणें सांकेतिक संभाषण झाल्यावर एकजण नेहमींची जी अपरा-
ध्याला शासन करण्याची रीत, त्या रीतीप्रमाणें पुढें येऊन म्हणाला, “ तुझे
नांव काय? ”
“ जगदेव. ” जगदेव उत्तरला.
“प्रतारणा करणार नाहीं ना?”
“ नाहीं. ”
“ तर मग प्रथम देवीचे दर्शन घेऊन ये.”
“ मला फक्त करुणाराणीसाहेबांचा पत्ता पाहिजे आहे. बाकीच्या
गोष्टींशीं मला कांहींच कततेव्य नाहीं. ”
“ पण राणीसाहेब सध्यां आमच्या आश्रयाला आलेल्या आहेत. त्यांचा
हितकर्ता म्हणून तृ त्यांचें दर्शन घेऊं इच्छितोस ना? ” हनुमानानें विचारिलें.
“ होय. ” जगदेव उत्तरला.
“तर मग तुला आमच्या रिवाजाप्रमाणे देवदर्शनानें प्रथम पावन झालेंच
पाहिजे. तो कोंपर्यांत दरवाजा दिसतो त्या दरवाजाने पायऱ्या उतरून खालीं
जा आणि आंत देवीमंदिर आहे, तिथें जाऊन दर्शन घेऊन ये. आंत आंधार
आहे. परंतु भिण्याचें कांहीं कारण नाहीं. ”
जगदेवानें जास्त आढेवेढे न घेतां हन्मानाच्या सांगण्याप्रमाणे केलें.
हनुमानाने दरवाजा उघडून दिला व त्यानें आंत प्रवेश केला. लगेच त्याच क्षणीं
हनुमानानें त्याला आंत लोटून दिलें व भुयाराचा दरवाजा लावून घेतला.
“ शत्रुसंहार झाला, आतां पुढें काय? ” हनुमान आपल्या साथीदाराला
म्हणाला, आपण तंजावरची दानवी अपरूपाराणी आणि तिचा साथीदार
कोयाजी घाटगे यांच्या देशद्रोही पाशवी लीलांविषयीं इतके दिवस फारच
१७६ पेशवाईचे मन्वंतर
शिल तस्कर यक क कय लकत
बोभाटा ऐकत होतों. खरें ना?”
डि होय. 27
“ त्यांचाच हा गुप्त हेर होता. ” असें म्हणून हनुमानाने करुणाराणी ही'
बैराग्याच्या आश्रमाला आल्यापासून काय काय प्रकार घडला तो तेथल्या
आपल्या सर्वे साथीदारांना निवेदन केला. तो एंकूत हनुमानाचा साथीदार
म्हणाला,“ असें जर आहे, तर अशा वेर्यांना मोकळें सोडणें मुळींच इष्ट नाहीं.”
“झी तरी तेंच म्हणतो. ” हतमान म्हणाला. |
“त यावर काय उपाययोजना सुचवितो आहेस? ”
* पहिला उपाय म्हणजे आपण त्या दोघांनाही अटक केली पाहिजे. मग
त्यांना कोणतें शासन द्यावयाचें, हा प्रश्न गुरुजी, करुणाराणी अथवा प्रताप-
सिह महाराज कसाही सोडवृंद्यात. मात्र त्यांना पकडणें हें सोपें काम नाहीं.
त्यांच्यामागे मनुष्यबळ असेलच. हातघाईला प्रसंग आला तर आपला कित-
पत टिकाव लागेळ याचा विचार प्रथमच केला पाहिजे. एवढ्याचसाठीं मी
त्यांना त्यांच्या पायांनीं आपल्या कह्यांत आणूं पहात होतों. पण त्यांनीं
तें मान्य केलें नाही. आतां हा जगदेव येण्याची वाट पहात तीं दोघेही तेथें
बसलीं असतील. आपण जर आजच्या आज त्यांच्यावर छापा घातला तर
आपला कार्यभाग होण्यासारखा आहे. ”
“ आपलें संख्याबळ अवघें दहा आहे. ” आणखी आपले लोक बोलावून
आणविले पाहिजेत.
“ मग त्याला उशीर कां? ”
हन्मानाच्या संमतीनें लगेच बेराग्याच्या पंथांतील आणखी लोक बोलावून
आणावयाचे ठरून ती योजना ताबडतोब अमलांतही आली. सायंकाळ-
पावेतों तेथें दास्त्रास्त्रांनीं सज्ज असे एकंदर पंचवीस बेरागी वेशाचे पण लढाऊ
पेशाचे तरुण लढवय्ये जमा झाले. तें लहानसे लढाऊ पथक गनिमी काव्या-
च्या थाटानें अपरूपा राणी व कोयाजी यांच्यावर छापा घालण्याचा संकल्प
करून तेथून निघाले.
पण त्या जागीं जाऊन पहातात तों काय; अपरूपा राणी अगर कोयाजी
तेथें नाहींत. त्यांच्या कोणा हस्तकानें शत्रूचा हल्ला होणार अशी बातमी
येऊन सांगितल्यामुळे त्या दोघांनींही तेथून पाय काढला होता. तथापि हनुमा-
जगदेवाला देहान्त शासन १७७
४४१५ ४ ५०७१ १.८९ “" /११ १०/*. ” “२ “" “९. “6१.५ ४. १०५१५७८ ७.७१
ताचें कारस्थान मात्र त्यांना कळलें नसावें. कारण, हनमान आपल्या इतर साथी-
दारांना मार्गे निरनिराळ्या जागीं दबा धरून बसावयाला लावून त्या स्थळीं
ला तेव्हां अपरूपाराणीचा राणोजी नांवाचा एक शिपाई तेथें वाट पहात
उभा असलेला त्याला दिसला. त्याला हनुमानाने विचारिलें, “हें काय?
राणीसाहेब कुठें आहेत? ”
“ कोणत्या राणीसाहेब ? ” राणोजीनें विचारिळें, “ त कुठून आलास?”
हनुमान धाडसी वृत्तीने उत्तरला, भल्या माणसा, मी कोणी शत्रूचा
वाणूस नाहीं ! तुझें भय मी ओळखलें. पण ज्या सत्पुरुषानें कोयाजीरावांना
गीवंत केलें त्यांचा मी शिष्य आहें. मी अपरूपा राणीसाहेबांच्या विनंती-
[रून जगदेवाला तें मकाण दाखविण्यासाठीं गेलों होतों. ”
“ मग जगदेव कुठें आहे? ”
“तें मग सांगतों. अगोदर मला तूं सांग, तृ कोण? ”
“मी अपरूपा राणीसाहेबांचाच सेवक. त्यांनींच मला येथें जगदेवाची
॥ट पहात थांबावयाला सांगितलें आहे.”
“ पण राणीसाहेब कुठें आहेत ? अश्या अणीबाणीच्या वेळीं त्या इथें अवश्य
॥हिजे होत्या. आतां त्या न भेटल्यामुळे शत्रूचा डाव जर यशस्वी झाला आणि
यांच्यावर संकट कोसळले तर त्याला जबाबदार कोण? ”
“कसले संकट? ”
“तें तुला सांगून समजावयाचे नाहीं. ”
“ मी राणीसाहेबांना ताबडतोब तो वृत्तांत कळविण्याची व्यवस्था करीन- ”
हनुमानाने ओळखले कीं राणोजी अपखू्पाराणी व कोयाजी यांचा पत्ता
॥ंगावयाला तयार नाहीं. तेव्हां त्यानें तो विषयच सोडला व म्हटले,“ या
॥ऱ्या आसमंतात शत्रूच्या कारस्थानाचें जाळे विणले गेलें आहे. त्या जाळयां-
न राणीसाहेब व कोयाजी यांची कशी सुटका होणार याची मला फारच
चता वाटत आहे.
* कोणत्या शत्रूविषयीं तू बोलत आहेस? ” राणोजीनें विचारिले.
“कोणता झत्रु म्हणजे ? राणीसाहेबांचा शत्रु आमच्या शज्रूहन निराळा
॥हे कीं काय ? ” हनुमानाने राणोजीच्या प्रश्नांतील गढा्थ ओळखून विचारलें
[परूपा राणीने आपण व करुणाराणी एकच असल्याचें बेरागी व हनमान
२
१७८ पेशवाईचे मन्वंतर
यांना सांगितलें तो प्रकार राणोजीला माहीत नव्हता. त्याच्या दष्टीनें,
राणीसाहेबांचा व कोयाजीचा शत्रुपक्ष म्हणजे करुणा राणी व मानाजी यांचा
पक्ष होय. अपरूपा राणीला तरी हनुमान इतका पाताळयंत्री असेल याची
काय कल्पना ? तिनें आपल्या मतें हनुमानाला चांगळेंच चकविलें होतें व
जगदेव काम फत्ते करून येणार अशी तिची खात्रीच होती. तो आल्यावर
त्याला आपणाकडे पाठवून देण्याची कामगिरी फक्त तिनें राणोजीला सांगन
ठेविली होती
“ तर्से नव्हे. ” राणोजी हनुमानाच्या प्रश्नानें जरा गोंधळन म्हणाला,
मीं उगाच आपलें विचारिलें. पण जगदेव कुठें आहे? ”
जगदेव शत्रूच्या हातून ठार झाला.
“ठार झाला?”
“ होय. मीदेखील त्याच्याबरोबरच यमसदनाला जावयाचा. परंतु
मोठ्या शिकस्तीनें बचावलों. ” न
“कोणीं तुमच्यावर हल्का केला? ” राणोजीनें पुन्हां विचारिलें.
त्याला प्रश्न पडला, करुणाराणीच्या लोकांनीं हें कृत्य केलें कौं काय?
जणूं काय आपण त्या गांवचेच नाहीं असा बहाणा करून हनमान उत्तरला
“कोणीं हल्ला केला म्हणजे ? चंदासाहेबाच्या लोकांनीं हल्ला केला
आणि त्या लोकांनीं जगदेवाला ठार मारले? ” राणोजीने आईइचर्य-
पुवेक विचारिलें. न
“ होय. त्यांत तुला एवढें आरचये कसले वाटलें? ”
“ आइचर्य नाहीं. पण... बर्रे; करुणाराणी सध्यां कोठें आहे? ”
आतां काय उत्तर द्यावें याचा हनुमानाला पेंच पडला. पण त्यानें एकदम
सांगून टाकिले, “ मध्यार्जुनांत मानाजीराव नांवाचा राणीसाहेबांचा सेवक
चंदासाहेबाशीं सामना देण्यासाठीं सेैन्यसामग्रीची जमवाजमव करण्यांत
गुंतला असून राणीसाहेब तिकडेच जावयाला आज रवाना झाल्या. ”
“ठोक आहे. मी थोरल्या राणीसाहेबांना हा वत्तांत कळवितों. त
आतां जा.” राणोजी म्हणाला
पण ताबडतोब कळव्झिलळ ना? मला तुझ्याबरोबर यावयाला
नको ना? ” हनमानानें महाम विचारिलें
"%५५./०४-/४./१४./११./ ४९.५९ “१५४ ६.५४.” ४_/”५ ,/१७ ./१ ५ 7, ४४-"५-/%.४"६-”१५-//४../१५./..”"५.”” >>“
जगदेवाला देहान्त शासन १७९
“ नको. कांहीं आवश्यकता नाहीं. ” राणोजी उत्तरला.
“ठीक आहे तर. मी जातों. मात्र ही बातमी राणीसाहेबांना कळ-
विण्याळा वेळ लावू नकोस. कारण करुणाराणीसाहेब मध्यार्जुनांत देखील
एकाद्या दिवसापेक्षा जास्त थांबतील अशी खात्री नाहीं. अपख्पा राणी-
साहेबांना त्यांच्याकडे जावयाला वेळ लागळा तर चुकामूक होण्याचा फार
संभव आहे. ” असें म्हणून हनुमान तेथून निघून गेला, तो कांहीं अंतरावर
जाऊन तेथें आणखी एक जलाशय होता व त्या जलाशयाला जाळीदार दगडी
तट. असून सभोंवार गर्द वनराजी होती, त्या वनराजींत त्या तटाआड ल्पून
राहिला. तेथून त्याला सभोवारच्या भागांत सर्वे रस्त्यांवर चांगळी नजर
ठेवतां येत होती. राणोजी कोणत्या वाटेनें जातो हें हेरून अपरूपाराणीच्या
मकाणाचा पत्ता काढावयाचा या हेतूनें तो दबा धरून बसला होता.
सुमारें पाव घटकेच्या आंत राणोजी घोड्यावर स्वार होऊन उत्तरेकडच्या
मोठ्या रस्त्याने घोडा फेकीत जातांना हनुमानाला दिसला. तो लगेच तेथून उठला
वे आपल्या साथीदारांना भेटून त्यांच्याकरवीं श्रीरंगाच्या देवालयांत
वेराग्याला व तिकडे करुणाराणीळा या एकंदर घटनेची बातमी देण्याची
व्यवस्था करून स्वत: राणोजीच्या ध्यानीं येऊं नये इतक्या अंतरावरून आड-
गाटेनें मागोमाग पळत सुटला. तेथून अर्ध्या कोसावर त्याला घोडा मिळवितां
ण्याजोगा होता. परंतु इकडे घोडा मिळविण्याला जावें तर राणोजीवरची
जर ढळेल; म्हणून त्यानें पायीं धांवण्याचे कष्ट पत्करले.
सुदवानें थोड्या अंतरावर त्याला एक मराठा शिलेदार कांहीं अनुचरांसह
(का वृक्षाखाली घोडा बांधून विश्रांति घेत पडळेला दिसला. त्या शिले-
राला त्यार्ने पूर्वी कधीं तरी एकदां बेराग्याच्या दर्शनाला तो आलेला
संतांना पाहिलें होतें. तेवढ्या ओळखीवर त्यानें त्याच्यापाशी जरूरीच्या
॥मासाठीं एक घोडा मागितला व त्या शिलेदारानेंही कांहीं आढेवेढे
' घेतां त्याची मागणी पूर्ण केली.
सुमारें सहा कोस अंतर तोडावें लागलें असेल नसेल, तोंच राणोजी मुख्य
स्ता सोडून आडरस्त्याला वळला व घनदाट वनराजींतुून मार्ग आक्रमीत
का रम्य उपवनापाशीं येऊन थडकला. हनुमान त्याच्या मागोमाग होताच.
णोजी घोड्यावरून खालीं उतरून उपवनांत प्रविष्ट झाला, तेवढ्या मुद-
१८० पेशवाईचे मन्वंतर
तींत हनमान जवळच एक भव्य कमासवाज विठिरीवर मोट चाळ होती तेथे
पाणी पिण्यासाठी गेळा. पाणी पिण्याचे हें हनमानारने केवळ मिष केलें होतें.
त्याला खरोखर मळींच तहान लागली नव्ठती. परंतु ज्याअर्थी राणोजी
त्या उपबनांत शिरला ब उपयनाच्या प्रवेशद्वारावर देखील सशस्त्र शिपायांचा
खडा पहारा असळेला जेंव्टां आउळन आला, तेब्टां ठनमानाला साहजिक-
पणेंच दांका आळी कीं या. उपबनांत कोणते रहस्य आठ त॑ आळखाबे तरी!
तो शोध लावण्यासाठी तो तेथे थांबला होता
पाणी वगेरे पिऊन लाल्यावर हनमानाने सज मोठ टांकणाऱ्या रोलक-
ऱयाला धिवारिले फार संदर उपवन विगत, जाणि आंत बाडाहो मोठा
भव्य दिसतो. हा वाडा कोणाचा ? ”
“ठा वाळा? हा वाडा आमच्या महाराजांचा. '' शेतकरी उत्तरला.
महाराज ? कोणते महाराज? ”
“ बोणते महाराज म्हणजे ? आमच शहाजी महाराज!"
“ गुहाजी महाराज?
“ ठोय. तंजावरचे शहाजी मठाराज. ठे सण्यांच्या तंजावरच्या राज्याखूढ
असलेल्या प्रता्षसि्ठ महाराजांचे नेळत बंध. अपरूपा राणीसाठेबांचे पत्र हे
यांना कांहीं काळ राग्यमपदही लाभले टोते. पण त्यांच्या प्रतिस्पर्धी लोकांच्या
कारवाईमळे त्यांना राज्यपदाला मुकांचे लागळे. ते सद्ध्या येथन रट्टातात
अरसे ! छं मला माठीत नाते! ' एनमान म्हणाला, थोड्या वर्षा-
पूर्वी रूपी या नांवाच्या तंजावरच्या राजघराण्यांतील बटकीचा एक पुत्र
अपरूपा राणीने जापला पुत्र म्हणून भासलिला ब त्याला तंजावरचा राजाही
केळें होते, तो प्रकार हनुमानाला एकून माहीत ठोता. परंतु त्याचें तांव काय
व तो कोठें रहातो हे त्याला माहीत नव्छ'
आणि महाराजांच्या आर्ईसाहेबही आज उथे आल्या आहेत ना? “
“* होय. तें तुळा कसें मादीत ? ” झेतकर्यानें संशयी दृष्टीनें हुनुमानाकडे
पहात विचारिलें.
“ मला माहीत आहे. मला त्यांनीं इथेच भेट घ्यावयाला संगितले आहे.”
हनुमान अगदीं साळसूदपणानें म्हणाला, “या वेळीं आईसाहेब अगदीं कामांत
असतील नाहीं? ”
जगदेवाला देहान्त शासन १८१
“ होय. त्या नुकत्याच इथें आल्या आहेत ? ” शेतकऱ्याने संशयपूर्वक
हनुमानाकडे पहात विचारलें, *“ त्यांच्याशीं तुझें काय काम आहे? ”
“ काम तुला सांगून समजावयाचे नाहीं. मी थोड्या वेळानें येऊन त्यांची
मेट घेईन. तोंवर मी थोडा वेळ शेजारच्या खेड्यांत फेरफटका करून येतों.”
असें म्हणून हनुमान आपल्या घोड्याकडे वळला.
शेतकऱ्याला हनुमानाच्या त्या उत्तरानें जास्तच संशय वाटं लागला. कारण,
त्या मकाणाच्या आसपास खेडें असें सहज फेरफटका करून येण्याजोगें एकही
नव्हतें. तो एक जवळ जवळ निर्जन असा जंगलमय प्रदेश होता. तेथें थोडीशी
रानटी होकांची काय ती वस्ती होती. बर्याच म्हणजे शेंपन्नास वर्षापूर्वी
तेथें कोणी एक योगी रहात होता. त्या जागेवर तंजावरच्या सरफोजी महा-
राजांची भक्ति असल्यानें त्यांनीं त्याच्या इच्छेनुरूप त्याला तेथें एक वाडा
बांधून दिला होता. आपणांला संसारी जनांचा उपसर्ग पोहोच नये म्हणून त्या
योग्यानें मुद्दाम ती जागा स्वतःच्या वास्तव्यस्थानासाठीं मुक्रर केली होती.
पुढे तो योगी वारला व तेव्हांपासून तो वाडा अगदीं ओस पडला होता.
त्या गोष्टीला किती तरी वर्षे लोटून गेलीं होतीं. त्यानंतर अपरूपाराणीनें
आपल्या वर्गातील शहाजी नामक दासीपुत्राला तंजावरचा राजा करून,
त्याच्या नांवावर सर्व राज्यसूरत्रे आपल्या हातीं ठेवण्याचें कारस्थान फंसतांच
कोयाजीनें कोणाला न कळत तो वाडा पुन्हां दुरुस्त करवून व सभोंवार बाग-
बगीच्या वगेरे करवून तेथें त्या तोतया राजाला ठेवून दिलें होतें. हनुमानाशीं
बोलणारा शेतकरी हाही त्या तोतया राजाचाच सेवक होता व तो मोट हांकून
बाग शिपीत होता तीही त्याचीच. तंजावरांत हरघडी चालणारीं राजकार-
स्थार्ने जरी त्या शेतकऱ्याला माहीत नव्हतीं तरी या गोष्टीचा कोठें बोभाटा
करावयाचा नाहों एवढा कानमंत्र त्याला कोयाजीकडून पुर्वीच मिळाला होता.
पण त्या वाड्यांत कोण राहतें याची चवकशी करावयाला तरी कोण येणार?
अपख्पाराणी व कोयाजी हीं मनांतून महाराजांची शत्रमंडळी असतील.
पण जनांत दिसावयाला तसा बेबनाव त्यांच्यांत मुळींच नव्हता. दुसरें असें
कों, तंजावरच्या राज्यकारभारांत कोयाजी घाटग्याची चलती असतांना
त्यानें तो वाडा व त्याच्या सभोंवारचा कैक योजनें मुलूख बक्षीस मिळवून
घेतला होता. त्यामुळें तेथें कोण राहतें आणि काय करतें इकडे इतर लोकांचें
१८२ पेशवाईचें मन्वंतर
लक्ष वेधले जाण्याचा कांहींच संभव नव्हता. शहाजी तोतया स्थानभष्ट
झाल्यावर तेथें जाऊन वास्तव्य करून राहृं लागला हें प्रतापसिह महाराज
टॅ नले क रत क कक करक-ळे वी
राजांची सत्ता उलथून पाडावयाची आहे या धोरणानें त्यानें शस्त्रास्त्रे व दारु-
गोळा यांची जमवतजमव अगदीं गप्तपणे तेथे चालविली होती व सेन्यही
बरेंच जमविले होते. तो त्याचा उद्योग अव्याहत सुरूच होता. या उद्योगाला
साजून दिसतील असेच नोकरचाकर वगेरे त्यानें नीट परीक्षेने तेथे ठेवून दिले
होते. आतां त्या शेतकऱ्यासारख्या सामान्य माणसाला या राजकारणाच्या
अंतर्गत उलाढाली काय कळणार? तथापि आपल्या धन्यांचें ब: प्रतापसिंह
महाराजांचे तितकेसे सुत नाहीं हें ओळखण्याइतका धूतंपणा-जो कोणाही
नोकराच्या आंगीं साधारणपणे आपोआप असतो तो त्या शेतकऱर्याच्याही अंगीं
होता. शिवाय स्वामीनिष्ठेच्या जोरावर आपले भाग्य उदयाला आणण्याची
इच्छा प्रत्येक नोकराला असतेच. त्या गेतकऱ्याला ठनुमानाचा थोडासा
संशय येतांच त्यानें हनुमानाला स्पष्ट सांगितलें, गड्या, मला तुझा संशय
येतो आहे. यास्तव मी तुला कोयाजीराव अथवा राणीसाहेब य़रांपेकी कोणाची
तरी परवानगी घेतल्याखेरीज इथून जाऊं देणार गात
प्राप्त प्रसंगाला तोंड कसें द्यावे हें चातुर्य हनुमानाच्या अंगी उपजतच होतें.
शिवया तो त्या बैराग्याच्या-चतुरस्त्र गुर्व्या तालमत तयार झालेला. तो
थोडा'च डगमगतो! तो म्हणाला,” एवढेंब ना ! मग त्याला एवढी घमकावणी
कशाला हवी ? मी स्वसंतोषानें येथें थांबावयाला तयार आहें. तृंच मला
राणीसाहेबांकडे घेऊन जा; म्हणजे तुझा संशय फिटेळ. भाद्र तू आपणाला
सांभाळ म्हणजें झालें. राणीसाहेब तू मला त्रास दिल्या मुळें तुझ्यावर रागा-
वल्या तर माझ्या कानीं हात! ”
शेंतकऱ्याला वाटलें कीं हा भलताच प्रसंग आपणावर येऊन ठेपला. कोणी परका
अथवा ज्याचा अर्थाअर्थी राणीसाहेबांशीं कांहींच संबंध नाहीं, असा मनुष्य
इतक्या आत्मविश्वासाने बोळेळ तरी कसा? तो हनुमानाला म्हणाला,
जगदेवाला देहान्त शासन १८३
४२५४५४ ४१-१४ ८१.८५. ०५.” *“*%-४-४१%८०१४५-१४./ ५.” ४१५५ १.७ ४६.५ ४४१६. ४ “४-४ ४८८४५”. ४7९../ २९.०४ ०४-४१. ४.५१. १९.५१ ./१४ ४१%. ७ ७.५४. /.४ ४१९ /७७,
तू कोणी भलता मनुष्य नाहींस अशी माझी खात्री होऊन चकली आहे
तुला मी प्रतिबंध करू इच्छीत नाहीं. मात्र तं तुझें नांव काय तें मला सांगून ठेव.”
राणीसाहेबांना सांग कीं माझें नांव हनुमान. मी करुणा राणी-
विषयीं महत्त्वाची गुप्त बातमी देण्यासाठीं आलों होतों. व म्हणावें आणखी
प्रह्रभरानें मी माघारा येईन. आतां मला अंमळ बाहेरून हिंडून यावयाला
कांहीं हरकत नाहीं ना? ”
कांहीं हरकत नाहीं. ” शेतकरी म्हणाला.
हनुमान लगेच आपल्या घोड्यावर स्वार होऊन माघारा निघून गेला.
अकरण २५ रवे
गरीब बिचारी ख्पी!
ह त तडा
उयूपरू्पा राणी व कोयाजी हीं दोघें जीं पुवक््ति ठिकाणाहून निघालों, तीं
या एकान्त स्थळा येऊन पोंडोबळी होतीं. येथे येण्यांतील त्यांचा मुख्य
उद्देश करुणाराणीला पकडून आणण्याची जय्यत तयारी करण्याचा होता.
तो वाडा व त्याच्या आसमंतात् असणारा प्रदेश हा कोयाजी व अपर्पाराणी
यांचा जणूं बाळेकिल्लाच होय. तेथे वेलांच अपरूणाराणी घे कोयाजी यांनी
आपल्या एका विदबासू शिळेदाराळा हांक मारून शंभर सगर शिणायांची
एक टोळी आज्ञा होतांच कूच करूं शकेल उतक्या तत्परोने तयार ठेवण्यास
सांगितलें ब लगेच आपल्या बनाबट राजपूमाळा भेटण्यासाठी दोघेही राज-
पुत्राची चोकशी करीत आंत गेलीं.
अपरूपाराणीनें हा जो नवा राजपूनञ तंजावरच्या गादीळा बारस म्हणून
निर्माण केला होता, तो केवळ हीनक्रळोत्पस टोता. उतम नळ व्हे, तर कांहींसा
वेडसरही होता. त्याला शहाणपण घे आवश्यक नेव& व्यवहारज्ञान शिक-
विण्यासाठी निष्णात शिक्षकांची योजना करण्यांत आळी होती खरी, पण
विद्याथि अगदीं मठूठ डोक्याचा भेटल्यावर शिक्षक निथे तरी काय डोकें फोडून
घेणार ! वरे; झिक्षकानें राजेपुच दटाणा ब्हाबा या कळकळीने जरा कडडे-
पणा फत्करिला कीं तें राजपुत्राला सहन व्हावयाचे नाहीं. त्यानें त्या शिक्ष-
काचे सातपाट काढून त्याला घालवून यावें! असे दोन शिक्षक बळी पडल्या-
वर् तिसरा जो शिक्षक मिळाला होता तो मात्र फार धूत व मतलबी असा
होता. आपण राजपुत्राची मर्जी सप्पा होऊं यावयाची नाहीं यापेक्षां दुसऱ्या
कोणत्याही खऱ्या हितकारक गोष्टीकडे त्या शिक्षकाने मुळींच लक्ष दिलें नाहीं.
त्या शिक्षकाप्रमाणेंच तरवारीचे व पट्ट्याचे हात झ्षिकविण्यासाठीं ।
बेंदुकोचा नेम कसा मारावा वगैरे लढाऊ पद्धतीचे शिक्षण देण्यासाठी आणखी
एका सरदाराची धोजना करण्यांत आली होती. त्याचा अनुभव देखील वरील
शिक्षकांप्रमाणेंच होता, व त्यानेंही वरील शिक्षकांप्रमाणेच स्वार्थसाषु-
गरीब बिचारी रूपी ! १८५
पणार्चे धोरण स्वीकारिलें होतें. इकडे राजपुत्राची मर्जी सुप्रसच्न राखा-
वयाची, व कोयाजी, राणीसाहेब यांपैकी कोणीं राजपुत्राच्या प्रगतीची विचार-
पुस केल्यास राजपुत्राची भरमसाट स्तुति करून हातभर लांब दुव्याची सवा
हात लांब बी काढून दाखवावयाची, हा त्यांचा-किंबहुना राजपुत्राच्या तैना-
तीस असलेल्या सर्व मंडळीचा ठराविक सांच्याचा बाणाच बनून गेला होता.
तोच देखावा आज अपरूपाराणी व कोयाजी राजपुत्राच्या समावाराला
जातांच त्यांना पहावयाला मिळाला. राजपुत्राला लिहिण्यावाचण्याला
शिकविणाऱ्या शिक्षकानें सरकार आतां बालबोध वाचं लागले आहेत
असें सांगून अ्या समारंभाच्या सोईसाठी राजपुत्राकडून आगाऊ पाठ करून
घेतलेला हस्तलिखित मराठी रामायणांतील एक उतारा राजपुत्राला वाचा-
वयाला लावला व राजपुत्राने तो वाचून-नव्हे, नांवापुरती हस्तळिखितावर
नजर ठेवून पाठ म्हणून दाखविला. अपरूपाराणी व कोयाजी तें पाहून खूष
झालीं व त्यांनीं शिक्षकाला एक दूपेटा बक्षीस देवविला.
लगेच अपरूपा राणीनें राजपुत्राला युद्धकेळेचें वगैरे शिक्षण देणाऱ्या
सरदाराला बोलावून चौकशी केली, तेव्हां त्या सरदारानें सांगितलें, “ सरकार
आतां पट्टा चांगलाच खेळतात. व नेम तर इतका अचूक मारतात कीं आम्ही-
देखील तोंडांत बोटें घालतों. ”
त्या सरदारानें आपल्या विधानाच्या पृष्ट्य्थ पांचसहा हरिणांचीं कातडीं
एक वाघाचे कांतडे, व एका हत्तीचे सुळे वगैरे साहित्य आणन अपरूपाराणीला
दाखविलें व सांगितलें, “ ही सारी मृगयेची कमाई बहुदा: एकट्या सरकारांचीच
आहे. आम्ही त्यांच्या आजूबाजूंना राहून त्यांच्यावर नुसती नजर ठेवीत
असूं, इतकेच. ”
“ शाबास! ” करुणाराणी प्रसन्न चित्तानें राजपुत्राळा आपल्या जवळ
घेऊन त्याच्या तोंडावरून हात फिरवीत म्हणाली, “ आतां लवकरच आमचे
बाळराजे प्रतापसिहराजांबरोबर उघड्या समरभमींत टक्कर देऊं शकतील
व स्वपराक्रमावर राज्य मिळवू शकतील. ?”
राजपुत्र इतका वेळ गप्प होता. तो आपणावर आपल्या निरनिराळ्या
सेवकांकडून होणार्या स्तुतिवर्षावानें चण्याच्या झाडावर चढूं लागला होता.
ततो लडिवाळपणानें हंसत अपरूपाराणीला म्हणाला, “ आईसाहेब, त्या
१८६ पेशवाईचे मन्वंतर
प्रतापसि्ठ राजाला कोणी जर हातपाय बांधन माऱ्यासमोर आणून उभा
करीळ तर मी त्यांच्याशीं लढाई खेळून त्याचे शीर न डायेगळे करून टाकीन. "
राजपुत्राच्या अंगर्चे खरे पाणी जकस्मान् त्याच्या उद्गारांच्या स्पानें
बाहेर दिसू लागतांच तेथल्या सर्वाच्या आनंदाचा एकदम निरस झाळा. त्यांत-
ल्या त्यांत राजपुत्राला सुद्धकळेनें ब मृगयेने शिक्षण देणाऱ्या सरदाराने तोंड
तर फारच हिरमुसले भाळ. त्यानें सरकारस्थारीच्या म गयानेपुण्याने तके
गोडवे गाउळे होते ती केवळ अतिशयोजितपूर्ण कलित कथा होती. धाग्यांनी
रान उठावे, सावज समोर येतांन मंगसानिपूण सनिकांनी ते अउवन धरावे,
त्याच्यानर गोळया. सारून अथवा तखारी-भाल्यांने घार करून त्या
सावजाला अर्ध मेळे कराधें ब मग त्या सावजाचा जीध जाईला गरवप्रहारांची
आणि बंदुकोच्या गोळधांची सरबत्ती राजपूतताळा करू शाची, टे राजपुत्राच्या
मृगयानेपुण्यांतील रंगित होतें. त्या संवईला अनुसरूनच राजपुताने प्रताप-
सिहराजाशीं आपण कशी लढाई कर याविपयी मलाफळ उधळली होतीं.
तथापि त्या सरदाराला आपला बोज कायम राखण्यासाठी ती वेळ शोभवन
नेणें भाग होतें. तो अपरूषाराणीळा म्हणाळा, आसान, सरकारांना
प्रत्यक्ष लढा्ड कशी खेळतात ठे माहील नाही त्याना ठा परिणाम होय. मी
त्यांना लवकरच मधून मधून ळटपटच्या ळढाईल ळढायसाळा लावणार आहें.
तो प्रत्य अनुभव एकदां सरकारांना आला को उतक्या लदान वयांतही
शजूशी उघडया रणमेदानावर टक्कर देण्याची पावला सरकारांच्या अंगीं स्वास
आहे असें आपल्या निदर्शनाला गेईळ. "
अपरूपाराणीला मुळांलचे राजपुववाच्या कर्लेबंगारीविषयी फारशी आशा
वाटते नव्हती, व कर्तबगार राजपूत्न म्हणून त्याळा तिर्थ जवळटी केलें नव्हतें.
तिला तंजावरच्या गादीवर राजा म्हणून बसविण्याला एक जिवंत बाहुले
पाहिजे होतें ब तेवढीन ती राजपुत्राची किमत आणल्या भनांत ओळखून होती.
तिनें नेभळ्या राजपूत्राचे ते नेभळे बोळ फार आपल्या मनाला लावून घतले
नाहींत. परंतु कोगाजीला मात्र ते बोल ऐकून विररकारानें हंस आले.
कोयाजी जातिवंत लढ़बय्या ब मुत्सही होता. तो मनांत म्हणाला, “ ह्त्
दळभद्ऱ्या ! आम्हीं इतकीं हाडांची काडे करून तुला राज्यावर बसविलें
तरी तू काय रडणार हें दिसतेंच आहे. ” त्याच घेळीं तो स्युनशी समाधानाने
गरीब बिचारी ख्पी ! १८७
मनांत असेंही म्हणाला, “ बाकी, तुझ्यासारखा षंढ राजा गादीवर येण्यांतच
माझें खरे हित आहे. ”
“ आतां आमच्या महाराजांचे लवकरच लग्न करावयाला हवे, नाहीं
का॒कोयाजीराव ? ” अपख्पाराणी त्या विषयाचा आप्रियतेकडे वळणारा
ओघ परतविण्यासाठीं म्हणाली, पण “ आपल्या प्रयत्नांना यश येऊन महाराज
खरेख्रे महाराज होईपावेतों थांबावे. ”
तोंच केस पिजारलेली व वेडसर हातवारे करणारी एक कंगाल म्हातारी
तेथें धांवत आली व थेट तीरासारखी राजपुत्राकडे जात कळवळ्यानें म्हणाली,
“ नको नको. माझ्या राजा, माझ्या जया, तूं मुळींच राजा होऊं नकोस.
राजा होणें म्हणजे सुळावरची पोळी आहे. माझ्या राजा, तूं राजा होऊं नकोस.”
त्या म्हतारीला पहातांच अपरूपाराणी दातओंठ खात सर्वे नोकरांकडे
संतापून पहात ओरडली, “ या बयेला मोकळी कोणीं सोडली ? ”
सर्वे नोकर भयभीत चित्ताने एकमेकांच्या तोंडांकडे टकमकां पाहुं लागले. तोंच
आणखी दोन दासी धांवत त्या म्हतारीमागोमाग वर आल्या व तिला आवर-
ण्यासाठी पुढें जाऊं लागल्या. परंतु राजपुत्राने त्यांना हातानें थोपून राह-
ण्याची खूण करतांच त्या जागच्या जागीं थबकल्या.
म्हतारी तेवढ्यांत राजपुत्राला आपल्या हूदयाशीं कंवटाळून प्रेमातिरे-
कानें त्याचें मुख कुरवाळीत त्याला म्हणाली, “ माझ्या राजा, आज किती
दिवसांनीं रे त् हा मला भेटतो आहेस? तें कांहीं नाहीं. आतां मी तुला
मुळींच सोडावयाची नाहीं. तुला राजा होऊं द्यायची नाहीं. ”
“रूपी, ए रूपी ! हा तूं काय गोंधळ मांडला आहेस ! अगोदर मार्गे
सर पाहूं | ” कोयाजी दरडावणीच्या स्वरांत उद्गारला.
“ मी मागें सरू ? माझ्या बाळाला तुमच्या केदेंत सोडून मी मार्गे सरू?
माझ्या पोटच्या गोळ्याला भेटण्यालादेखील मी चोर ठरल्यें काय?” लगेच
राजपुत्राला पूर्वीपेक्षा जास्त घट्ट मिठी मारून ख्पी म्हणाली, “ नाही-
नाहीं. मी आतां प्राण गेला तरी माझ्या बाळापासून दूर सरायची नाहीं-
आजवर तुम्हीं माझी आणि माझ्या बाळाची निर्दयपणें ताटातूट केलीत आणि
मला वेडी ठरवून खोलींत कोंडून ठेविलेंत, पण मी वेडी नाहीं हो मी वेडी
नाहीं. मी शहाणी आहें ; मी अगदीं पूरी शुद्धीवर आहें. ”
१८८ पेशवाईचें मन्वंतर
जबाब माळा
“ तृ शुद्धीवर आहेस तर हा काय तमाशा मांडला आहेस? ” कोयाजीनें
तिला विचारिलें.
“* हा तमाशा मीं मांडला आहे काय ? तमाशा मीं मांडला आहे ? खासा
न्याय बाबा, हा न्याय खासा ! दोळी जाते जिवानिश्ीं आणि खाणारा म्हणतो
वातड असें म्हणतात त्यांतलाच हा न्याय झाला. माझ्या मुलाला
तुम्हीं माझ्यापासून ओढून नेलेंत, मी नको नको म्हणत असतांही माझ्या -
शब्दाची मुळींच पर्वा केली नाहींत आणि त्यासाठीं माझा जीव तळमळून मी
बोळू लागल्यें तर तो तमाशा होतो नव्हे काय ? ” |
“ यालाच म्हणतों आम्ही वेड ! ” कोयाजी अपरूपाराणीकडे वळून
कावेबाजपणानें स्मित हास्य करीत म्हणाला, “ हिला आम्हीं किती वेळां
सांगितलें कौं तुझा मुलगा केव्हांच मेला, आमच्या युवराजांचा आणि तुझा
कांहींच संबंध नाहीं. तरी हिची खात्री पटत नाहीं! याला आतां काय करायचे?
“माझा मुलगा मेला काय? माझा मुलगा मेला?” रूपी आपल्या मुलावर
घारीसारघी झडप घालून त्याला हृदयाशीं कंवटाळीत म्हणाली, “ माझ्या
राजसा, इडा पिडा टळो आणि अमंगळ दूर पळो ! तुझ्याविषयी अर्से अभद्र
बोलणाराच्या मुखांत भाती पडो ! ” ती कोयाजीकडे खाऊं कीं गिळूं अशा
संतप्त नजरेनें पहात जोराजोराने दांत ओंठ चावीत उद्गारली, “ दृष्टा !
चांडाळा ! तूंच कां मरेनास ! पुन्हां जर कां असलें भलते सलते अभद्र
माझ्या बाळाविषयीं बोललास, तर मी तुझ्या नरडीचा घोंट घेईन, याद
राखून ठेव ! ”
“ अग तुझा मुलगा पूर्वीच मेला ! ” कोयाजीचा एक अनुचर म्हणाला.
“ तृ मेलास गुलामा ! ” असें ओरडून ख्पीर्ने त्या माणसावर झडप
घातली. कोयाजी मध्यें पडला म्हणन बरें. नाहींपेक्षां तिनें त्या माणसाचा
चावा घ्यावयाला कमी केलें नसतें.
रूपी वास्तविक मूळची वेडी नव्ह्ती. परंतु तिला सर्वांनी नाहीं नाहीं तें
बोलून चिडवून तिला जणों बळेंच वेड लावलें होतें. राजवाड्यांत अप-
त्यांची अदलाबदल करण्यांत येऊन रूपीच्या पुत्राला राजपुत्र म्हणून संबोध-
ण्यांत आलें हा प्रकार प्रथमच झाला तेव्हां तो रू्पीच्या संमतीनेंच झाला होता.
तिनें तेव्हां विचार केला कीं अनायासें आपल्या पुत्राचे भाग्य उदयाला येतें
गरीब बिचारी ख्पी! १८९
२.५४. ४-४ 40900. * ७.५ १५.४ ४ ९२-५४. ५/०१..०१७. ४४% » ५,५४५ ४०१५. ४८७ ७०” ४.0 “0. ४.७ 0९.५७ .५१९ .//४५..”/१.
४५.१४” ७.४ 0७ ८. ४0१५ % “४ ० ४0९०५१५ »/५.०९५..००१.० ७ १४ “0.
आहे, त्याला आपण आडकाठी कां म्हणून करा ! तेव्हां ख्पीला अशीही आदा
होती कीं आपला पुत्र राजपुत्र ठरल्यावर गाड्याबरोबर नाळ्याला यात्रा
घडावी त्याप्रमाणें आपलाही राजमाता या नात्यानें बराच बोज वाढेल.
जगाला दिसावयाला अपरूपाराणी ही राजमाता ठरली तरी आपला पुत्र
आपणाला विसरणार नाहीं, असा भरंवसा रूपीला वाटत होता. तिचें
तेवढ्यांतच समाधान होतें. बोलून चालून राजवाड्यांतील बटीक ती !
ती अपख्पाराणीप्रमाणें राजमातेच्या मानासाठीं थोडीच हपापलेली असणार!
बरें ; प्रथमच तिची व तिच्या अर्भकाची ताटातूटही कोणीं केली नाही.
राजपुत्राची दाई म्हणून तिचीच योजना झाली. मात्र शहाजी जसजसा
मोठा होऊं लागला व मातेचें दध सुटले, तसतसा माता आणि पुत्र यांच्यांत
प्रतिबंधाचा आडपडदा उत्पन्न होऊं लागला. शहाजी राजपुत्र ठरलाच होता, व
रूपी बोळून चाळून वटीक असल्यानें तिला मग त्याच तोलानें वागविण्यांत येऊं
लागलें. तो भेदभाव ख्पीला प्रथमच जाणवला. तरीही तिला आपल्या
पुत्राची सेवा करण्यांत आनंदच वाटे व अपरूपाराणी आणि कोयाजी यांच्या
सक्त ताकिदीप्रमाणें ती कधींही आपण त्या मुलाची माता असें कोणाला
ख्रांगत नसे.
तथापि अपत्यप्रेमाचा उमाळा रूपी किती दिवस व कसा थोपवून धरणार ?
मधून मधून अपत्यवत्सलतेच्या भरांत तिच्या हातून अशा कांहीं गोष्टी घडत
कौं त्यांवरून कोणालाही संशय उत्पन्न व्हावा, हीच बटीक अपखरूपाराणीच्या
पुत्राची खरी माता नसेल ना?
त्याबरोबरच शहाजीचेंही त्याच्या जन्मदात्या मातेशी वर्तन प्रथम निसर्गत:च
इतके प्रेमळपणाचें होतें की, तो रू्पीचाच मुलगा असावा असा तके करण्याला
कोणालाही तेवढी एकच गोष्ट पुरली असती.
तो मायलेंकरांचा प्रेमा हां हां म्हणतां इतक्या परिणतीला पोंचला कौं
अपरूपाराणी आणि कोयाजी यांना तें एक नवें संकटसें वाटूं लागलें. लोकांचा
जो समज कीं अपख्पाराणीनें गरोदरपणार्चे व बाळंतपणार्चे ढोंग करून
हा कोठून तरी बनावट राजपुत्र पेदा केला आहे, त्या समजाला बळकटी आण-
णाऱ्या अश्या गोष्टी एकीमागून एगक घडूं लागतांच त्यांना आळा घालणें
अपख्पाराणी व कोयाजी यांना अगदीं अवश्य होऊन बसलें. त्यांनीं तक
१९० पेशवाईचे मन्वंतर
*<€४/४४४/0४*४*१७४-१४-१४ १७-७0 “४ “0 “१ ५ “४४१७ “५४-७४ ५५.५४.” ५१.०५,” “४९५ ५०० /४..७७./११०.” ./0४००९७ ४७.८५ ७७००७ ७७७५ ९७ ४४७, “की २. “४४४५८१५४११
केला कीं रूपीला राजमाता म्हणून आपलें स्तोम पुढेंमागें वाढवावयाचें असेल
त्या धोरणानें तिनें आपल्याला न कळत शहाजीच्या-आपल्या मुलाच्या
जन्माविषयींचें रहस्य त्याच्यापाशी उघडे केलें असेल. त्यामुळें त्यांनीं संगन-
मतानें रूपीला राजवाड्यांतून बाहेर काढून लावलें, व॒ तिची एकाद्या
बटकौला सुखानें जीवन कंठतां यावें अशी अन्नवस्त्राची व्यवस्था अलग
करून दिली. परंतु ख्पीलाही पुत्रविरह् सहन होईना व त्याहीपेक्षा विशेष
म्हणजे शहाजीला मातेशिवाय करमेना ! तो तर आपल्या आईसाठीं-नव्हे,
आईहनही प्रेमळ अक्या त्या दाईसाठीं हट्ट घेऊन बसला. त्याच्या समजुती-
साठीं रूपीला पुन्हां माघारे बोलावून आणून राजवाड्यांत ठेवण्यांत आलें-
परंतु रूपीच्या पूर्वींच्या आणि आतांच्या स्थितींत जमीन-अस्मानाइतकें
अंतर होतें. पूर्वी तिला जें स्वातंत्र्य होतें, तें आतां नव्हतें. तिला स्वतःच्या
पुत्राची भेट घ्यावयाची झाली तरी ती अगदीं क्वचित् व तीही कोयाजी अथवा
अपरूपा राणी यांपैकीं कोणाच्या तरी साक्षीने घ्यावी लागे. तिला कामधंदा
कांहींच सांगण्यांत येत नसे. तिनें खावें प्यावे, आणि राजवाड्यालगतच्या
इमारतींत एका कोठडींत पडून रहावें. हा सासुरवास रूपीलाही अगदीं
असह्य होता. अपरूपाराणीनें तिच्या पुत्राच्या भाग्योदयाच्या रसाळ
गोष्टी सांगून तिर्चे चित्तरंजन करण्याचा प्रयत्न करावा व तेवढ्यानेंही
भागेनासें होतांच तिनें रूपीला धमकी द्यावी, “ याद राख. शहाजी आतां
पूर्णपणें माझ्या ताब्यांत आहे. तृ जर तो राजपुत्र नसून आपला मुलगा आहे
असा बोभाटा करशील अगर तशी वागशील तर मी तुझ्या मुलाला ठार
करायलाही कमी करणार नाहीं. ”
अपख्पाराणी येवढे घोरे पातक करण्याइतकी उरफाट्या काळजाची
खास आहे अशी रूपीची रोजच्या अनुभवावरून खात्रीच होती. म्हणूनच
तिनें मुकाट्याने अपरूपाराणीचें म्हणणें मान्य केलें व स्वतः केवळ स्वत:च्या
मुलाच्या कल्याणाकडे लक्ष देऊन नजरकैद पतकरिली.
असे कांहीं दिवस लोटले. पण शहाजी जसजसा मोठा होऊं लागला,
तसतसा त्याचा आपल्या खर्या आईकडे-रूपीकडे जास्त ओढा दिसूं लागला.
अपरूपा राणी व कोयाजी यांनीं संगनमतानें रूपीला विषप्रयोग करून ठार
करण्याचेंही एकदां मनांत आणलें होतें. पण शहाजी वयांत येईतो त्याला
ररीब बिचारी ख्पौ ! १९१
४0१९6४०१५0 ४ /€५ “५१-७७ ५४७ लो शीक ह हो “र. “८२.९%.०0%६.. ५0४८० ४७७१७० ४.०० ७ ७०.०० १० ८०0 ६ १७७०७० ७५.७० ७०९ ५७० १०0 क ७०५८००० 0.७० ७०० ७०७००. ८००५ ७. ७-० १.” ७७० ७०” ७.” ६.८ ४०० १.०0 ५-० ५.० ५.८ कक ७००७ ४७८४ १५८७०0 ४७० ४७०0 0 पक मल फल
जन्मदात्या आईचा लळा सुटणें शक्य नव्हतें, व त्याच्या प्रकतीवर मातृनिधना-
मुळें कांहीं अनिष्ट परिणाम होईल कीं काय या भयानें रूपीला त्या दोघांनीं
जिवंत ठेविलें होते. तथापि तिला वेडी ठरविण्याला-तिला वेड लागलें आहे
असा सवेत्र बोभाटा करावयाला मात्र त्यांनीं कमीं केलें नाहीं. त्यामुळें तेव्हां-
पासून ती आतां वेडी ख्पो म्हणून सर्वच ओळखली जात होती. शहाजीचाही
सभोंवारच्या त्या कांगावखोर गलबल्यांत असा ग्रह झाला होता कीं आपल्या
जन्मदात्या आईला वेड लागलें आहे. पण वेडी आई झाली म्हणून ती शहाजीला
कधीं अप्रिय मात्र झाली नाहीं. त्यानें आग्रहपूर्वक तिला आपणापाशीं ठेवून
घतले होते. त्यालाही आपल्या आईची ती लाजिरवाणी परवशता कष्ट-
घरद वाटे. परंतु अपरूपाराणी आणि कोयाजी यांच्यापुढे त्याचा नाइलाज
छहोता. आपण बोलून चाटून बटकीर्चे पोर असतांना आपणाला ज्या दोघांनीं
स्वार्थासाठी कां असेना पण राजपुत्र बनविले, त्यांची भीड रहाजीसारख्या
खावळटानें मातेच्या केवारासाठीं तरी एकदम कशी तोडावी !
रूपीला वेडी ठरविण्याचे-तिळा वेड लावण्याचे प्रयत्त अपख्पाराणी व
कोयाजी यांनीं आपल्या हस्तकांकडून अगदीं पद्धतशीर व जारीनें चालविले
होते. त्या प्रयत्नांपेकींच एक म्ह्णजे आज अनेक वर्षांपासून एकसारखे रूपीवर
व्हटु वचनांचे घाव धालण्यांत येत असत, “ तुझा मुलगा केव्हांच मेला,
राजकुमार सवाई शहाजीराजा हा कांहीं तुझा मुलगा नव्हे. ” त्याबरोबरच
वााहाजीची समजूत करण्यासाठीं त्याला अपरूपाराणीनें वारंवार समजावून
सांगावें, ख्पी मूळपासूनच वेडी आहे. तिला तुझा लळा आहे म्हणून ती
तुला आपला मुलगा समजते. पण तिच्या या वेड्याचाळ्यांमुळें तू मात्र हुकनाहक
राजपुत्र नव्हेसा ठरत आहेस. असला गेरसमज समाजांत जास्त फेलावं
न्ये यास्तव तूं प्रथमपासूनच सावधपणे वागलें पाहिजेस.
राज्यळोभ, व अपर्पाराणी आणि कोयाजी यांच्या कारवाईमुळें मूळ-
ष्पासूनच * आपली खरी जन्मदाती आई अपरू्पा असेल अथवा ही खूपीही
स्असेल ” असा झालेला बुद्धिभेद यांमुळे अपरूपाराणीच्या वरील उद्गारांतही
वाहाजीला बरेंच तथ्य आढळून आले, व रूपीला वेड लागलें आहे अशी तर त्याची
खत्ववळजवळ खात्रीच होऊन चुकली. तो तिला पुर्वेवत् सहानुभूतीने पण ती
खेडी आहे या भावनेने वागवूं लागला.
१९२ पेशवाईचें मन्वंतर
आज रूपी मोकळी कशी सुटली याविषयीं दांतओंठ चावून चोकशी करीत
अपरूपाराणीनें दासींना आज्ञा केली, “ हिला अगोर इथून घेऊन जा पाहु
“* मी इथून जाणार नाहीं. राणीसाहेब, मी इथून जाणार नाहीं. माझा
मुलगा चोरून वर मलाच हांकलून देतां काय ? मी इथून जाणार नाहीं.
रूपी पुन्हां शहाजीपाशीं जाऊन त्याला मिठी मारून म्हणाली, “ मी इथून
तुला एकट्याला टाकून कशी जाऊं रे माझ्या राया! ”
“: चल दूर हो ! ” शहाजी रागारागाने रूपीला दूर लोटीत म्हणाला.
त्यालादेखील त्या शोभेचा कंटाळा आला होता. विक्षेषत: अपख्पाराणी
आणि कोयाजी यांचें संगतमत झाल्यापासून त्याला पुन्हां स्वत: राजा होण्या-
ची शक्यता दिस लागली होती. त्याप्रमार्णे राजा होण्याची पूर्वे तयारी म्हणून
त्याला म्हतारीची पिडाटाळ होणें सोईचे वाटत होतें
“ काय? तृंदेखीळ मला दूर लोटूं लागलास ? ज्याचा भार मीं माझ्या
उदरीं नऊ महिने धारण केला- ”
रूपीच्या तोंडचे वाक्य पूर्ण होण्यापूर्वीच शहाजी अधिकाराच्या तोर््यांत
गर्जून ओरडला, “ नोकर माणसें जिवंत आहेत कीं सारीं मेलीं ? या वेड-
पटाला इकडे कशाला लावून दिलें? ”
अपरूपाराणी काय, कोयाजी काय किवा नोकरचाकर काय, सर्वांनाच
जर अंमळ दहशत वाटत असेल तर ती शहाजीच्या-बनावट राजपुत्राच्या
मनाची. तोदेखील रूपीवर अश्या प्रकारें उलटलेला पहातांच भग काय विचा-
रतां ! अपरूपाराणीनें नोकरांना आज्ञा केली, “ या बयेचें वेड आतां जास्तच
बळावत चाललें. हिला इथून हलवा व दूर कोठें तरी नेऊन सोडून द्या पाहूं !
आतां हिला जवळ ठेवण्याची सोय नाहीं.
“ तिच्या पोटापाण्याची योग्य व्यवस्था करून तिला दूर एकाद्या गांवीं
सुरक्षित ठेवून द्या. इथे आमच्याजवळ ही पिडा नको ! ” शहाजी म्हणाला.
दासदासीजन रूपीला आवरण्यासाठीं पुढें झाले. आडठचर्ये हें कीं इतका
वेळ जी खर्पी आकाशपाताळ एक करीत होती, ती आतां अगदीं गरीब गोगल-
गाय बनून त्या लोकांच्या स्वाधीन झाली. मात्र स्वाधीन होतां होतां ती
म्हणाली, “ याला म्हणतात जगाची रीत ! कनक आणि कांता यांच्या-
पुढें कूणाला आईबाप भाठवत नाहींत, कोणी आठवत नाहींत ! पण माझ्या
४%०-/%-४%५४१%-/*-४%" “0 “१-१ -४ 2४% “"- २ ५४.१५. ७४.४७४ ४८४0४
गरीब बिचारी ख्पी ! १९३
"४४४४४५४४५५ ५४४४८ ४४५४४४४ -/१-/१-/५/४/४-/४५/४५१/५- ५८ -.०/२८< “४-८४-०१४४४./४-/४/ ४४ ९.४४. ० ७८ ४० ४५ ५५४ ७.५ ४५४११-” ४१-४४ ४-४0-८११५./१४४५ ४.०४ ४.
बाळा, तुझे जर कल्याण होत असेल तर त्यासाठी ही तुझी आई तुझ्याकरितां
पाहिजे त्या हालअपेष्टा सोसायला तयार आहे... ”
रूपी बोलत असतांनाच तिला दासदासींनीं ओढून नेलें देखील ! अपरूपा
राणीने त्यांच्या मागोमाग जाऊन त्या नोकरांपैकी एकाला बाजूला घेऊन
आज्ञा केली, “ त्या बाईला दुर जंगलांत नेऊन सोड आणि हें कोणाला कळव
मात्र नकोस. जंगलांतल्या श्वापदांना एक दिवस तरी नरमांसाची खादी
मेजवानी मिळू दे! ”
इकडे रूपीची वासलात अशा प्रकारें लागते, तोंच राणोजी' तेथें जाऊन
पोहोंचळा. अपर्पाराणी व कोयाजीराव त्याचीच वाट पहात होतीं. त्यांनीं
उत्सुकतेने विचारिलें, “ काय खबर आणलीस राणोजी ? ”
“ जगदेव शत्रूच्या हातून ठार झाला. करुणाराणीसाहेव सध्यां मध्यार्ज-
नांत, मानाजी चंदासाहेबाशीं सामना देण्याची तयारी म्हणून सैव्य जमवीत
आहे तिकडे गेल्या आहेत. ही बातमी मला हनुमानाने येऊन सांगितली. ”
“ जगदेव ठार झाला काय ? ठीक आहे. आणि तो हनुमान कुठें गेला ? ”
कोयाजीनें विचारिलें.
“तो माघारा गेला. तोच आपणांकडे येत होता. परंतु आपला पत्ता
त्याला मिळू नये म्हणून मींच त्याला कांहीं तरी सांगून टाळले. ” राणोजी
म्हणाला.
“ तें तू योग्य केलेंस. ” अपरूपाराणी लगेच कोयाजीकडे वळून म्हणाली,
“ पण कोयाजीराव, आतां आपण प्रथम मध्यार्जुंनांत जाऊन मानाजी आणि
ती हडळ यांचा बंदोबस्त केला पाहिजे. त्या दोघांना या जगांतून नाहींशी
केल्याखेरीज आपला मार्ग निष्कंटक व्हावयाचा नाहीं. ”
“ ते आलें माझ्या ध्यानांत सारें. त्याविषयी आपण आतां मुळींच काळजी
करूं नेका. ” कोयाजी म्हणाला.
“ आपणापांशीं सध्यां किती सैन्य खर्डे आहे ?” अपख्पाराणीनें विचारिळें.
_ “ सूर्यास्तापावेतों मी दोनशें सेन्य तरी खास उभें करतों. तेवढें मला
वाटतें, मध्यार्जुनावर हल्ला करायला पुरेल . ”
“ पुरेल. कोंब उगवतो न उगवतो तोंच तो खुडून टाकायला त्यावर
कुर्हाडीचे घाव घालायचें कारण नसतें. नुसत्या नखांनींही तो खुडला जातो.”
१३
१९४ पेशवाईचें मन्वंतर
आ
याप्रमाणें अपख्पाराणी व कोयाजी यांचें संगनमत होऊन कोयाजी हा
सैन्याची जमवाजमव करावयाला निघाला व सूर्यास्तापावेतों त्यानें राणीला
शब्द दिल्याप्रमाणें दोनशें सैनिक खडे केलेही. रातोरात तें सैन्य मध्यार्जना-
कडे रवाना झालें. कोयाजीची प्रकृति नादुरुस्त असल्यानें तो व अपरूपाराणी
या दोघांनीं पहांटदेला निघावयाचें ठरलें. मध्याजूनांत तसाच प्रसंग पडल्यास
ऐन वेळीं कुमक व्हावी म्हणून लगेच चंदासाहेबाकडे खलिता देऊन राणोजीला
रवाना करण्यांत आलें.
र डी 3 3
त्याच दिवशीं बरोबर मध्यरात्रीच्या सुमाराला अपख्पाराणी व कोयाजी
यांना सेवकांनीं एकाएकीं झोंपेंतून जागें करून सांगितले, “ आपल्या वाड्या-
सभोंवार शत्रचा गराडा पडला.
अपरूपाराणी व कोयाजी धडपडत उठून महालाबाहेर येतात, तोंच एक
तरूण मराठा सरदार आपल्या' सशस्त्र अनुयायांसह तेथें येऊन थडकला व
आपल्या अन॒यायांना म्हणाला, “ पहातां काय ; पकडा या लोकांना. आणि
तो तोतया राजपुत्र बटकी'चा लेक कुठें दडून वसला असेल त्यालाही हडकन
काढून त्याच्या मुसक्या बांधा
अपरूपाराणीर्ने खवळून विचारिठें, “खबरदार !' कोण मला-या तंजा-
वरच्या राजमातेला पकडण्याची आज्ञा देत आहे? ”
“ मानाजी ! लांवसटी, तुझा दृष्मन मानाजी ! ” तो सरदार तितवयाच
आवेशाने खवळून उद्गारला.
प्रकरण २६ घे
रामस्वामीची कारवाई
नाशक
प्रासादिक तरवारीही तेव्हांच चोरीला गेल्या, त्यामुळें चंदासाहेबाचा
संतापारऱिन जो एकदां प्रज्वलित झाला तो तेव्हांपासून एकसारखा भडकतच
होता.त्या अवर्तांत त्रिचनापल्लीच्या किल्ल्यावरील कित्येक वहिमी लोकांचा ह॒क-
नाहक कडेलोट करण्यांत आला. टेकडीवरील महादेवाचे देवालय-जे त्रिचना-
पल्लीच्या राजवंश्याचें कुलदैवत मानलें जाई, तेथें गोवधासारखे निषिद्ध
प्रकार करून तें ष्ट करण्यांत आलें. अनेक वहिभी नागरिकांना बलात्काराने
बाटविण्यांत आलें. असा किल्ल्यांत सर्वच अगदीं हा: हाःकार उडाला होता.
परंतु इतके करूनही चंदासाहेबाला मोहना, मीनाक्षी अथवा त्या तरवारी
यांपैकीं कशाचाच शोध लागला नाहीं. शोध कसा लागणार? तें च्रिविध
रहस्य जर किल्ल्यांतील कोणालाही माहीत नव्हते, तर कोण कसा शोध
लावून देणार?
तरीही चंदासाहेबाचा अजूनही पूर्वीचाच गैरसमज कायम होता कीं रतन-
सिगाला हा प्रकार माहीत असावा. रतनसिंग हो रामस्वामीप्रमाणेंच त्रिचना-
पल्लीच्या किल्ल्यांतळा फार पुराणा माहितगार होता. त्याने मीनाक्षी
राणीच्या पतीची व त्यानंतर मीनाक्षीराणीचीही कारकीर्द पाहिलेली. तो
मीनाक्षीराणीच्या खऱ्या अमदानींत त्रिचनापल्ल्लीचा किल्लेदार होता व
त्याच्यावर राणीचा पुर्ण विश्वास होता. किल्ल्यांत तो एक बुद्रुक असामी
गणला जाई. तो आपल्या लोकभ्रियतेला साजेसा शूर व स्वाभिमानीही
होता. परंतु परचक्राच्या महाएुरांत त्यानें लव्हाळ्याप्रमाणे नग्नता धारण
करून स्वसंतोषाने चंदासाहेबाची सेवा पत्करिली, व चंदासाहेबानेंही अशा
मानी वीराला दुखवून आपलें कल्याण होणार नाहीं हें जाणून गप्प बसायला
काय घेशील या न्यायानें रतनसिंगाला आपल्या हाताखालीं लहानशा हुद्यावर
ठेविले होतें. परंतु रतनसिगाचा हृदया हलका झाला म्हणून त्याच्या लोक-
भोला व मीनाक्षीराणी अकस्मात किल्ल्यांतून नाहींशा झाल्या व त्या
१९६ पेशवाईचे मन्वंतर
प्रियतेला त्यामुळे थोडीच ओहोटी लागते ! किल्ल्यांतील हिंदू लोकांवर त्याचें
वजन अजून पुर्वेवत् कायम होतें
चंदासाहेबाची कल्पना कीं किल्ल्यांत आपल्या अगदीं घरांत आपल्या
विरुद्ध जो एवढा मोठा कट उभारला गेला आहे, तो रतनसिंगाला माहीत
असला पाहिजे ; किबहुना तो त्या कटाचा एक पुढारी असला पाहिजे.
त्यानेंच त्या प्रासादिक तरवारी कोठें तरी लपवून ठेविल्या असल्या पाहिजेत.
त्याचा छळ करकरून त्याच्या तोंडून सर्वे गोष्टींची कबुली घ्यावयाची या
हेतूनें चंदासाहेबानें त्याला देहान्त शासन देण्याचें मुह्याम लांबणीवर टाकून
त्याचे परोपरीने हालहाल चालविले होते. प्रथम प्रथम रतनसिंगाला पुष्कळ
मारझोड करण्यांत आली. पण त्याला जर कांहींच माहीत नाहीं तर तो
कबूल तरी काय करणार ! त्या मारझोडीचा उलट अनिष्ट असा परिणाम
चंदासाहेबाला न कळत झाला कीं रतनसिंगाला अद्या सेतानी अविधाची सेवा
पतकरल्याबद्दल कमालीचा पश्चात्ताप होऊं लागला व तो मनानें चंदासाहेबाचा
कट्टा वैरी बनला. त्यांतल्या त्यांत त्याळा खेद एवढाच वाटत होता कीं
मनांत बाणलेलें वेर कृतींत उतरून दाखविण्याला त्याला आतां मोकळीक
नव्हती व तशी मोकळीक पुढे सांपडणेंही शक्य नव्हतें. त्याचे हालही चंदा-
साहेबानें इतक्या अमानुषपणे चालविले होते कीं ते सहन करण्यापेक्षा तो
नरराक्षस आपला एकदम जीव घेईल तर फार बरें असें त्याला वाटत होतें.
पण विचाऱ्याचें जिणे व मरणेंही आतां अगदीं परावलंबी होऊन बसलें होतें
चंदासाहेबाने रतर्नासगाचा छळ करण्याचा रोज नवा नवा उपाय शोधून
काढावा. त्याप्रमाणें आज आपल्या वांट्याला कोणते भोग येणार याचा
विषण्ण चित्ताने विचार करीत रतनसिंग तुरुंगांत आपल्या अंधार कोठडींत
बसलेला असतांना खोलींत वर एक भलें मोठे कोळ्याचें जाळें त्याला दिसलें.
त्या जाळ्याच्या मध्यभागीं कोळी बसून जाळ्याच्या कडेला कडीपाटाच्या
फळीसरपटत एक किडा जाळ्यांत गुरफटून कुचंबतो आहे व कोळी भक्ष्या-
साठीं दबा धरून बसलेला त्या किड्याला खाण्यासाठीं सरसर धांवत जात
आहे असा तो देखावा पाहून रतनसिग स्वतःच्या मनाशीं हळहळत म्हणाला,
“ अरेरे ! अभागी कोटका, माझ्याप्रमाणेच तूंदेखीलळ अगदीं परावलंबी होऊत
पडला आहेस कीं रे! ”
रामस्वामीची कारवाई १९७
मनांतून त्या कीटकासाठीं हळहळत रतनसिंग आपण साधल्यास त्या कोटका-
चा कोळ्यापासुन बचाव करावा या सदहेतूनें आपले शुंखलाबद्ध हस्त एक-
मेकांवर भापटून आवाज करूं लागला! यांपेक्षा आणखी कांहींही हालचाल
70८ “00१५०
आता कोळी किड्यावर झडप पाडून त्याला खाणार, इतक्यांत कडी-
तटाच्या फळीच्या आधाराने ७क पाळ दबा धरून बसलेली होती, ती आपले
भक्ष्य अर्थात् तो कोळी फळीजवळ येण्याचीच वाट पहात होती, ती पाल
ततो जवळ येतांच त्याच्यावर दृष्टि ठेवन सरसर पुढे सरकू लागली. कोळी त्या
किड्याला खाण्याच्या मोहांत गुरफटून मिटक्या मारीत असल्यानें आपला वेरी
आपणावर मागाहून झडप घालीत आहे हुं त्याला मुळींच कळलें नाहीं,
व तो अगदीं टप्प्यांत येतांच पालीनें त्याच्यावर अर्धवट शुळती उडी घालून
स्वत:ची क्षुधा शांत केली.
तो देखावा गहुन रतनसिग आपल्या मनाशी म्ह्णाला, “ माझ्या
रक्षणासाठीं असा कोणी त्या उसत्म्या चंदासाहेबाचा वैरी येणार आहे काय?
छे ! तें शक्यच नाहीं. मीं म्लेंछसेवेचें पातक ज आजवर जोडलें, त्या पात-
कारचे प्रायश्चित्त मला मरणाच्या मोलानें मिळावे अश्लीच श्रीरंगा, तुझी
इच्छा दिसते. ”
एवढें रतनसिंग स्वतःशी उद््गारतो आहे, तोंच त्याच्या कोठडीच्या दर-
वाजाबाहेर खडखड असा आवाज आला. त्याबरोबर रतनसिंग दु:खभारानें
आपल्याशी पुटपुटला, “ आले ! यमदूत आले! आतां मला ते त्या काळा-
समोर नेणार आणि तो काळ आज कोणत्या नव्या परीनें माझा छळ करणार
न कळे ! बाकी, आज माझ्यावर एकादा महा दारूण प्रसंग ओढवणार यांत
मुळींच शंका नाहीं. पाहु तर कास नशिबी आहे तें! ”
तोंच कोठडीचा दरवाजा उघडला गेला व चार सरास्त्र मुसलमान शिपाई
दरवाजांत उभे असलेले रतनसिंगाला दिसले. रतनसिंग हा हिंदु व किल्ल्यां-
तील सारे हिंद बिथरलेले, ते नीट नोकरी केरणार नाहींत, फितुरी करतील,
या संशयाने चंदासाहेबानें तुख्गावर व इतरत्रही झाडून सारे पहारेकरी व
शिपाई आपल्या विशवासांतीठ इसळमान नेमले होते. परंतु मुसलमान
१९८ पेशवाईचे मन्वंतर
ही डू -%. १३-४१ “7 0४५.» ४.४ ४-४ % .* ४४.५४ ७. १.४ 9 ४४७ / १.५ ७.४ ६. ७. ७.०७. ४, » 0.० १.०७ » ६ नह
७४०४४ --ध्ट ७१४० १ शप" ४. फेलो ४१४११-१२४ 0. ग “7 १.५ २-2
झाले तरी सारेच चंदासाहेबासारखे क्रूर व पाशवी वृत्तीचे असतात असें
थोडेच आहे ? रतनसिंगाला सकत पहाऱ्यांतून रोज आपणासमोर आणण्या-
साठीं चंदासाहेबानें ज्या शिपायांची नेमणूक केली होती, त्या शिपायांच्या
तुकडीचा नाईक दाऊदखान हा भला माणूस होता. त्याला रतनसिगाचा
रोज रोज होत असलेला भयंकर छळ पाहून हळहळ वाटे. पण करतो काय !
तो हुकुमाचा बंदा पडला.
आज तर दाऊदखानाची चर्या फारच खिन्न दिसत होती. ती पाहुन
रतनसिंगानें त्याला विचारिले, “ का? आज कोणता माझा छळ करण्याचें
तुझ्या धन्यानें योजिले आहे? ”
दाऊदखान गंभीर वृत्तीने म्हणाला, “ रतनसिग, तुला काय माहिती
असेल ती तूं आज तरी सांगावी आणि मोकळे व्हावेंस हें बरे. कारण, आज
तशी आणीबाणीची वेळ येऊन ठेपली आहे. म्हणून मी तुळा आगाऊ सूचना
करीत आहें. याचा तूं राग मानूं नकोस. ”
दाऊदखान शूृद्ध भावाने व कळकळीने बोलत आहे हें रतनसिंग ओळखन
होता. चंदासाहेबानेंही पूर्व दिवशींच त्याला बजावून सांगितलें होतें कीं
उद्यां जर तूं त्या तरवारींचा शोध लावून दिला नाहींस व मीनाक्षी आणि
मोहूना कुठे गेल्या हें सांगितलें नाहींस तर तुझा तुझ्या ध्यानीं मनींही नाहीं
इतक्या कठोर उपायांनी सर्वे नाश करण्यांत येईल. तें सवे आठवून रतन-
सिंगानें दाऊदखानाला म्हटलें, “ दोस्त, मला जर त्यांतले कांहींच माहीत
नाहीं, तरमी तरी काय सांग ? आणि चंदासाहेब करून करून काय करणार?
हालहाल करून माझा जीवच घंणार इतकेंच कीं नाहीं? तर मी मरणाला
मुळींच भीत नाहीं. ”
“ मरणाला तूं भीत नाहींस हें मलाही माहीत आहे. पण मरणाहुनही
भयंकर असा परिणाम आज होणार असला तर? ”
“तो परिणाम काय होणार? ”
“ सरकारांनी आज तुळा बळेंच गोमांस चारून बाटविण्याचा व तूं
बाटल्यानंतर तुला तापलेल्या तेलाच्या कढईत लोटून तळून ठार मारण्याचा
डाव रचिला आहे. यामुळें तुला प्राणापेक्षां प्रिय अश्या स्वघर्माला मुकावे
लागणार. व वर मरण भोगावे लागणार ! त्यापेक्षां-मी म्हणतो, तुला!
रामस्वामीची कारवाई १९९
"४.०४, १५८५४ ७४७७९७. ४002 १. “४४.४ ४७४७ “0.४१ ४५८४७१७००९ ७१७ ७५७० ०५७७
४५८४५४१. 4.११, ७.४१. १४-७९ १७-७७ ७०%.”
*-*“
व्कांहीं माहीत नसलें तरी तुमच्यांतून परागंदा झालेल्या एकाद्याचें नांव खोटेंच
स्वांगून तं आजचा प्रसंग तरी टाळणार नाहींस का? ”
“ प्रसंग अत्यंत आणीबाणीचा आहे खरा. ” रतनसिंग आवेशाच्या भरांत
ख्वोेराजोरानें आपले केंस उपटीत म्हणाला, “ त्या चांडाळानें आज मुहाम
स्वाझा हिंदु धर्माविषयींचा जाज्वल्य अभिमान ध्यानीं घेऊन वड छळ कर-
ण्याला हा उपाय योजिला आहे काय ? नशीब म्हणावयाचें. रर दुसरे काय ? ”
“ म्हणूनच म्हणतों, कोणा तरी तुझ्या एकाद्या वेऱ्यारचें नांव सांगून तूं
म्ाशेकळा हो कसा! ”
“माझ्या जातींत-माझ्या धर्मात माझा वेरी असा कोणीच नाहो.
अहणि वेऱर््याचा झाला तरी अश्या असत्य भाषणानें बळी घेण्याइतका मी
सत्रस्जून माणुसको कोळून प्यालों नाहीं. बस्स ! काथ व्हावयाचें असेल तें
बोऊं दे. मी जर सच्चा माणूस असेन, माझा सच्चेपणा जर श्रीरंगाच्या
व्य रणीं रुजू असेल, तर तोच मला या संकटांतून निभावून नेईल. चला
सुस्ही, मला त्या काळासमोर घेऊन चला. उगाच उशीर लागला तर तुमच्या-
स्त्रिफयीं त्याच्या मनांत आणखी भलताच संशय यावयाचा. ” असें म्हणून
ऱय्त्वक्नसिंग आपण होऊन शिपायांच्या स्वाधीन झाला. दाऊदखानाचा तेथें
अगदीं नाइलाज होता. तो आपल्या साथीदारांसह केवळ कटुकतेव्य म्हणून
्त्वर्नासिंगाच्या दंडाला दोरी बान्धून त्याला चंदासाहेबासमोर घेऊन गेला.
र्चंदासाहेब राजवाड्यासमोरच्या बागेंत उच्चासनासमोर बसला होता,
त्कोे रतनसिंगाला दुरूनच दिसला. तेथें जवळच एक तरणी लिंबासारखी
लेऊ्वस्वी कालवड--तिच्या मानेची सांखळी एका हातांत व पाजळलेला
व्ठस््ष्ळ्खीत सुरा दुसर्या हातांत अल्या थाटाने एक कसाई उभा होता. तो
भयंकर देखावा पाहुन रतनसिंगाला त्याचे भीषण भवितव्य मूतिमंत डोळ्यां-
स्वम्झडेर दिसू लागले. तो त्या प्रसंगाशी धर्मवीराळा शोभेशा धीर वृत्तीने तोंड
सेण््पार्चें बल आपल्याला देण्याविषयी परमेश्वराची प्रार्थना करीत चंदासाहेबा-
सथस्पेर जाऊन उभा राहिला.
““ए॒ काफर! ” चंदासाहेबानें पहिल्याच सपाट्याला रतनसिंगाला
इव्यच्री हांसडून विचारिलें, “ आज तरी तुझें डोके ताळ्यावर आलें आहे काय ?
संदासाहेबाला तोंडचे वाक्य पूणे करण्याचा देखील अवसर न देतां रतनसिंग
२ पेरावाईचें मन्वंतर
/१-१५-/५१.४*-/ १.५४. ८१ /१./”१/१./५ ४२-५०, “१ /”./”६.
क १. १.८ १
शि व १...” ४.५ १.१ १४, -”१. ७ / ४७.” ७ / २.४७ ४२ ७ /7१. *€*.
'७- “१ /0 ४०१ 0१ “१.११ ५.१०. » ७७४
%६८१५.%०९४८/* “१.५१.” १. £८-// 3.
डोळ्यांत आंसवें आणून म्हणाला, “पातक््या, जें क्रूर कर्म करावयाचें तूं
योजिलें आहेस त्याचा उच्चार करून माझें श्रवणेंद्रिय आणि स्वत:ची वाचा
विटाळण्यापेक्षां तुला जें काय करावयाचें असेल तें मुकाट्याने कर कसा! ”
“ एकूण अजूनही तू खरें बोलावयाला तयार नाहींस ! हरामखोरा, तर
मग भोग आपल्या कर्माची फळें. ” असें म्हणून चंदासाहेबानें कसायाला
आज्ञा केली, “ मी खुणा करतांच एकदम त्या गाईची गर्दन छाट, आणि
तिचें रक्त या काफराला पाज. ” तो लगेच रतनसिंगाकडे वळून म्हणाला
“ए बेवकूब ! तुला मी तुझ्या गोमातेच्या रक्तानें प्रथम बाटवून मग तुझा
तापलेल्या तेलाच्या कढईत लोटून जीव घेणार. अजून तरी तं खरें बोला-
वयाला तयार आहेस काय ? सांग, त्या तरवारी तृ कुठे लपवून ठेविल्यास? ”
हा प्रश्न चेंदासाहेबाच्या तोंडून निघावयाला व रामस्वामी दोन तरवारी-
सह तेथें यावयाला एक योग जुळून आला. रामस्वामीनें त्या तरवारी
चंदासाहेबासमोर ठेवून म्हटलें, “ खाविद, आपण हरप्रयत्नांनीं तंजावरच्या
राजवाड्यांतुन मिळविलेल्या या प्रासादिक तरवारी घ्या. ”
तेथल्या सर्व मंडळीला तो प्रकार पाहून विलक्षण आडचर्य वाटलें. स्व
जण रामस्वामीकडे व त्या तरवारींकडे पाहुं लागले. चेंदासाहेबाचा संताप
रसरसलेल्या आगीच्या निखाऱ्यावर एकाएकीं जलवर्षाव झाल्याप्रमाणे
वराच शांत झाला, व रतनसिंगाचा प्रामाणिकपणा आपोआप त्याच्या
मनाला पटू लागून मनोमन अनुतापाला प्रारंभ झाला. दाऊदखानाला रतन-
सिंगाचा अश्या आकस्मिक कारणानें बचाव झाल्याचें पाहून आनंद वाटला.
रतनसिंगाला त्याच्या जिवावरचें संकट टळल्यामुळें अम्मळ हायसें वाटलें
हें खरे, तथापि रामस्वामीची स्वजनद्रोही वृत्ति पाहून त्याला तिरस्कार आला
व तो रामस्वामीकडे तिरस्काराने पाहु लागला.
“ रामस्वामी या तरवारी तुला कोठें मिळाल्या ?” चेंदासाहेबानें विचारलें.
“ खाविद, तो फार मोठा इतिहास आहे. मीनाक्षीराणी आणि मोहना
या दोघी बया आपल्या नाक्यावर उठल्या असून हा सारा त्यांचा उपद्व्याप
आहे. तो वृत्तांत इथें अशा चारचौघांत सांगण्याजोगा नाहीं. इतर बाब-
तींतही आपणाशीं मला बरेंच महत्त्वाचें बोलावयाचे आहे. आपण मेहेर-
बानी करून थोडा वेळ अंतर्महालांत चलावे. ” |
रामस्वामीची कारवाई २०१
“ ५.५१ ८ ../ ७ १४७. /% “00% » १, ७_ ३. 409 / ४ ७४१७ ,» ७.४९”. ./".,७९९ ७ %../५ ४१% /0% ७९% ७४ क
लगेच चंदासाहेब उठ्न आंत गेला. त्याच्या मागोमाग रामस्वामीही
गेला. त्यांना आंत गेलेले पाहून रतनसिंग दाऊदखानाला एंक जाईल एवढ्या
मोठ्यानें म्हणाला, “ असले स्वजनद्रोही स्वदेशद्रोही-कुलांगार जोंवर आम
च्यांत आहेत तोंवर आसच्या मायदेशाला बरे दिवस कसचे येतात! ”
रामस्वामीनें एकान्तांत चंदासाहेबाळा आपल्या समर्थनार्थ काय पाहिजे
त्या गोष्टी सांगितल्या व तरवारोंसारखी महत्त्वाची दुर्मीळ वस्तु रामस्वामीनें
शोधून विश्वासाने आणून दिल्यामुळे चंदासाहेबाचाही त्याच्यावर चांगलाच
विठवास बसला. त्यानें रामस्वामीचा बहुमोळ देणगी देऊन गौरव करून
सांगितळें, “ रामस्वामी, तू ही तरवारींची कामगिरी पार पाडलीस तक्षीच
मोहना आणि मीनाक्षी या दोघींना पकडून आणण्याची कामगिरीही एकदांची
'पार पाड म्हणजे मी तुझ्या ध्यानींमनींही नसेल इतकें तुझें कल्याण करून
सोडीन.
रामस्वामी तें मान्य करून म्हृणाला, “ पण खाविंद, त्या दोघी बाया
सड्या थोड्याच हिडत असणार ! मानाजीराव, झंझारराव वगेरे मातबर
लोकांचें त्यांना पुर्ण पाठबळ असल्यानें लढाई केल्याखेरीज त्या हातीं लाग-
तीलसें दिसत नाहीं. ”
“ मग तुझें काय म्हणणें आहे ? तुला सेन्याची कांहीं मदत पाहिजे काय ?”
“अर्थात् ! त्याखेरीज तें काम शक्यच नाहीं. ”
“ सैन्याची एक तुकडी मी तुझ्याबरोबर देतों. ”
“ पण मी लढवय्या सेनापति थोडाच आहें ? मी आपला साधा सांगकाम्या
एडी, माझ्या ऐवजीं-पण खाविद, रतनसिंगाविषयींचा आपला गेरसमज
प्रातां सारा ट्र झाला ना ? ”
“ होय. ”
“ मग त्याला ती कामगिरी सांगून आपल्या बाजूला वळवून कां घेत नाहीं?
गे कांहीं उपेक्षा करण्याजोगा सामान्य मनुष्य नाहीं. राजवटींतील अशा
[न्या मुरलेल्या माणसांना या वेळीं खाविदांनीं हाताशीं धरणें अवश्य आहे. ”
होय नाहीं करतां करतां चंदासाहेब त्या गोष्टीला कबूल झाला. त्याच्या
नांतीलळ रतनसिगाविषयींचा संशय आतां दूर झाला होता. त्यामुळें
[मस्वामीचे बोल' त्याला पटले.
२०२ _ पेशवाईचे मन्वंतर
“ पण तू रतनसिंगाबरोबर नेहमीं असशील ना? ”
“त्याची आपणाला मुळींच काळजी नको. ”
“ मुरारराव घोरपड्याची आणि मीनाक्षीची गांठ पडण्यापुर्वी मीनाक्षी
पकडली गेली पाहिजे किवा निदान ठार तरी झाली पाहिजे. ”
चंदासाहेबानें जें जें सांगितलें तें तें रामस्वामीनें मुकाट्याने मान्य केलें
लगेच ते दोघेही उद्यानांत रतनसिंग उभा होता. तेथे आले. रतनसिंग
अद्यापि शुंखलाबद्धच होता. चंदासाहेबानें त्याला प्रथम बंधमुक्त करविले
व मग विचारिले, “ रतनसिंग, तुझ्यावरचा वहीम या रामस्वामीच्या काम-
गिरीमुळें आपोआप हूर झाला आहे. तूं माझा राजनिष्ठ सेवक आहेस अशी
आतां माझी खात्री होऊन चुकली आहे; व म्हणूनच तुला मी पुन्हां माझ्या
सेवेत पुर्वेवत् रुजं करून घेऊन तुला एक महत्त्वाची कामगिरी सांगं इच्छितों.
ती कामगिरी तूं निष्ठापुवेक पार पाड्यील ना? ”
रामस्वामीच्या मध्यस्थीमुळें आपली सुटका झाली हें रतनसिंग ओळखून
चुकला होता. तेवढ्यांत रामस्वामीनेंही त्याला डोळ्यांची खूण केली.
रतनसिगानें चंदासाहेबाला त्रिवार अभिवादन करून त्याची सेवा करण्याचें
कबूल केलें. मनांतून मात्र त्याला अचंबा वाटत होता कीं असें कसें झालें ?
"तर मग तूं निवडक शंभर स्वार व आणखी जरूर तेवढी युद्धसामग्री
घेऊन रामस्वामोबरोबर जा. तो मार्गात तुला कामगिरी' समजावून
देईल. कामगिरी फारच महत्त्वाची आहे. तिची कोठेही वाच्यता होणें
उपयोगाचे नाहीं. ”
याप्रमाणें आणखी थोडा वेळ वाटाघाटी झाल्यावर रामस्वामी आणि'
रतनसिंग यांनीं चंदासाहेबाचा निरोप धेतला. रामस्वामीनें रतनसिंगाच्या
चर्यवरून तो त्या घडामोडींतील एकंदर रहस्य जाणण्यासाठी अत्यंत उत्सुक
असल्याचे ओळखून हळूच त्याला सांगितलें, “ किल्ल्याच्या बाहेर गेल्यावर
मी तुला सर्वे कांहीं सांगेन. तोंवर इथें कांहींही चौकशी करावयाची नाहीं. ”
तो दिवस कूच करण्याच्या तयारींत मोडला, व दुसर्या दिवशीं रामस्वामी
आणि रतनसिंग सैन्यासह जावयाला निघण्यापूर्वी चंदासाहेबाची भेट घेण्या-
साठीं म्हणून आले तों अपख्पाराणीकडून क्रुमक मागण्यासाठी चंदासाहेबा-
पाशीं आलेला राणोजी तेथें त्यांना भेटला.
रामस्वामीची कारवाई २०२
“ रामस्वामी, हा एका दगडानें दोन-नव्हे तीनचार पक्षीं मारण्याचा योग
जुळून आला आहे. मीताक्षीराणी व मोहना हस्तगत होणें जितके महत्त्वाचें
आहे, तितकेंच अथवा त्यापेक्षांही जास्त तंजावरची राणी करुणा वब तिचे
साथीदार यांचा बीमोड होणें अवश्य आहे. अपर्पाराणीला करुणाराणीचा
नक्को तपास लागला असून तिला पकडण्याच्या कामीं साहाय्य मागण्या-
साठींच हा तिकडचा हेर आला आहे. ही जबाबदारी तुम्ही शिरावर घेऊन
पार पाडू शकाल काय ? ”
रामस्वामी ती वार्ता ऐकून विस्मयचकित झाला. करुणाराणीवर
ओढवू पहाणारे हें नवें संकट कसेंही करून टाळलेंच पाहिजे व अपरूपा आणि
कोयाजी यांचा पक्का बंदोबस्त केल्याखेरीज हें शक्य नाहीं हें तो ओळखून
होता. त्यानेंही चंदासाहेबाप्रमाणेंच-पण अगदीं विरुद्ध दिदेने-एका दगडाने
चार पक्षी मारण्याचे आपल्या मनाशीं ठरवून चंदासाहेबापाशीं तसें कबूल
केळे. लगेच तसा संदेश अपरूपा राणीला कळविण्यासाठी राणोजी माघारा
रवाना झाला.
दुसर्या दिवशीं रामस्वामी आणि रतनसिंग हे सैन्यासह आपल्या कामगिरी-
वर निघाले. सेन्य पुढें चालत होतें व ते दोघे घोड्यांवर स्वार होऊन सेन्या-
मागाहून कांहीं अंतरावरून चालले होते. थोडें अंतर चालून गेल्यावर राम-
स्वामी पाणी पिण्याच्या निमित्ताने मार्गातील एका भव्य सरोवरापाशीं थांबला.
त्याबरोबर रतनसिंगही थांबला.
“ रतनसिंग, आतां तुझी हरएक प्रकारची संशयनिवृत्ति करावयाला
हरकत नाहीं. ” रामस्वामी आपण होऊन बोलं लागला, “ पहिली गोष्ट,
काल तुला मीं जीवदान दिलें आहे, हें तर तुला मान्य आहे ना? ”
“ होय. पण- ?”
“थांब. माझे नीट ऐकून घे. पहिली गोष्ट, मीं तुला जीवदान दिले,
ते देशाच्या कल्याणाकारणें तुझा जन्म सार्थकी लागावा म्हणून. आणि चंदा-
साहेबापाशीं शब्द खर्चून या कामगिरीवर मो तुझी नेमणूक करून घेतली,
ती त् विश्वासू व जबाबदार माणूस आहेस म्ह्णून. मला किल्ल्यांत येतांनाच
पळ ओढवलेलें संकट लोकांकडून कळलें तेव्हां मळा फार वाईट'
वाटले... ”
२०४ पेशवाईचे मन्वंतर
“तें सारें खरें. परंतु तूं त्या प्रासादिक तरवारी पुन्हां हुडकून चंदासाहे-
बाच्या स्वाधीन केल्यास हें तूं अनुचित क्रृत्य केलें नाहींस काय? ”
“ तुझ्या जिवासाठीं-मित्रा, तुझ्या जिवासाठीं मला तें अनुचित कृत्य करावें
ळागलें. “ रामस्वामी आपले कपडे उतरून ठेवीत म्हणाला, “ मित्रासाठी
असें साहस करावयाचें नाही,तर कोणासाठीं करावयाचें ? "
“ पण तूं हे कपडे कशासाठीं काढतो आहेस ? ” रतनसिंगानें विचारिलें.
“ पाणी पिण्यासाठीं. ” रामस्वामी हंसत हंसत अंमळ थांबून पुन्हां
उत्तरला, ' पण थट्टा करण्याची ही वेळ नाहीं. मी एक परम दिव्य करण्याची
ही मंगळ पुर्वतयारी करीत आहें. त्यापुर्वी मला तुझी नि:शंक मनाची अज्ली
भआणभाक पाहिजे आहे कीं.... ”
“ मायदेशाच्या मंगलासाठीं स्वत:चे प्राण खर्ची घालावे लागले तरी
देखील हा रतनसिंग त्याला आनंदानें तयार आहे. यापेक्षां आणखी कोणती
भाणभाक तुला पाहिजे? ”
“ पुरे. तुझा एवढा शब्द मला पुरे आहे. ” असें म्हणतां म्हणतां राम-
स्वामीने एकदम त्या सरोवरांत उडी मारिली. तो तोल चूकून आंत पडला
कों काय अश्या भीतीनें रतनसिंग त्याला वांचविण्यासाठीं घाईघाईने आंत उडी
घेणार, तोंच रामस्वामी दोन म्यान केलेल्या तरवारी घेऊन वर आला.
“हे काय ? ” रतनसिंगानें आश्चर्यपूर्वक विचारिलें.
“ याच त्या प्रासादिक तरवारी. मीच चंदासाहेबाच्या राजवाड्यांतून
त्या हिकमतीनें हुस्तगत केल्या व त्या इथें लपवून ठेविल्या होत्या. ” रामस्वामी
आपले कपडे बदलीत म्हणाला.
" आणि तूं चंदासाहेबाळा दोन तरवारी दिल्यास त्या ? ” रतनसिंगानें
त्यास विचारिलें.
“ते आतां तूंच ओळख. तें कांहींही असलें तरी तो मूर्ख फंसला ना?,
आणि तुझा बचाव झाला ना? आतां तं एवढेंच कर, ह्या तरवारी ताब्यांत
धेऊन त्यांना जिवापलीकडे जप, व तसाच जिवावरचा प्रसंग तुझ्यावर येऊन
ठेपला तर तुझ्याशिवाय विदवासाच्या कोणाही माणसाच्या हातीं त्या
मोहना, करुणाराणी अथवा मानाजी या नांवाचा तिचा एक साहयकर्ता
आहे त्यापेकीं कोणाच्या तरी हातीं त्या पावत्या होतील असें कर. ही तंजा-
४७-५४ ४.४५ ४-४ ५0४७ »१४.७१४ ४ ४७७७०४ ७४७०४१ ७९ ७,४0१ “४९.४१ ४१५ 2५७०९. “४५८१४ ७० ५... -१५४४"€४५१४८५५-४-४% ४६-५१.” “0१५८” ५ *-८% > ६.४ ६. ८४५”... ०... क
रामस्वामीची कारवाई २०५
ह य
आन/८४॥४/५५४१५%-/५/५/५५०-५ ५०५५७ ७.००... 0४000000५/९७१७१५०५५ ७७ ७८५७८७. ०५०२, ७०”
वरची साक्षात् राजलक्ष्मी आहे, व तंजारवरचें राज्य संकटमुक््त होण्यावरच
आम्हां ह्या प्रांतांतील हिंदूचे भवितव्य अवलंबून आहे, हें विसरू नकोस.
'“* म्हणजे? आतां तं माझ्यावरोबर राहूणार नाहींस काय? ”
“ नाहीं. अशीं आणखी कितीतरी गुतागुंतीचीं कामें माझ्या मार्गे आहेत
तीं मला सपाट्यानेंच पार पाडली पाहिजेत. मात्र अपरूपाराणी आणि
कोयाजी यांच्या उपद्व्यापाचा सोक्षमोक्ष होईतो मी तुझ्याबरोबर आहें.
तोंवर आपण पुढील सारा बेत नक्की ठरव. ”
लगेच ते दोघे पुन्हां घोड्यावर स्वार होऊन मार्गाला लागले.
प्रकरण २७ वें
अपरूपा व कोयाजी यांचा दोवट
प य य जा खय च
*3अुपरूपा राणी आणि कोयाजी यांनीं स्वसंरक्षणासाठी म्हणून जो डाव
टाकला तोच त्यांच्या वाईटाला कारण झाला. शत्रूला अर्थात् मानाजी
ला काळोखांत चकित करून सोडावे, व आपले लोक मग त्याला काळोखांत
गांठून ठार मारतील ह्या हेतूनें त्यांनीं वाड्यांतील सारे दिवे मालविण्याला
सांगितलें. परंतु त्यामुळें तेथें जी दंगळ माजली, त्या दंगलींत कोणाचा पाय-
पोस कोणाच्या पायीं नाहींसा झाला. त्यांतल्या त्यांत शहाजीनें-अपख्पा
राणीच्या बनावट राजपुत्राने तर आपल्या धांदरटपणाची कमालच केली.
माताजीराव आपणाला व अवरूपाराणीच्या सार्याच पक्षाला पाण्यांत
पाहातो हें त्याला माहीत होतें. त्या मानाजीरने हल्ला केला असें
कानीं येतांच आतां आपली धडगत नाहीं असें पाहून तो जो आपल्या शयन-
मंदिरांतून धडपडत जागा झाला, तो मानाजीराव, मी तुम्हांला शरण आलों
आहें. मला मारूं नका' असा टाहो फोडीत सेरावेरा धावूं लागला. त्यामुळें
त्याला पकडणें मानाजीला फारच सोपें गेलें. तेथल्या इतर लोकांची हल्ला
परतविण्याची तयारी होण्यापूर्वीच मानाजीच्या लोकांनीं वहुतेकांचा फन्ना
उडविला होता. तथापि होतां होईतों अपरूपा राणी त्या हल्ल्यांत ठार होऊं
नये अशी' मानाजीची इच्छा असल्यानें त्याने तेथें काळोख पडतांच मोठ्याने
ओरडून राणीला ताकीद दिली होती, “ राणीसाहेब, आपण आमचा प्रति-
कार करण्याच्या भरीस पडाल तर हकनाहूक प्राणाला मुकाल. मुकाट्याने
आमच्या स्वाधीन व्हाल तर् तुमच्या मानाला साजेशा इतमामानें तुम्हांला
तंजावरला पाठविण्यांत येईल. *
तथापि त्या वाड्यांत पुष्कळसे मुडदे पडून बरीच सामसूम झाल्यावर
मानाजीनें मशाली पेटवून राणी व कोयाजी यांच्या शोधार्थ सवेत्र हिंडून
पाहिलें, तों तेथें इतस्तत: विखुरलेल्या प्रेतांत त्याला राणीचें प्रेत दिसून आलें.
त्याबरोबर तो गर्जून म्हणाला, “ राणीसाहेबांचा वध कोणीं केला ?”
अपरूपा व कोयाजी यांचा शेवट २०७
००० -०-०४०-८०५४५५॥॥५-८५-८0४८४५४४५४४१॥/१४१0४१४॥0 १५0४00५१०७ टील हमला टा वट टाप पल ० र पवी
* हच भामरे
पलीकडे पडलेल्या प्रेतांच्या व अधेमेल्या विव्हूळत्या मुडद्यांच्या गद तून
एक आसक्नमरण वीर क्षीण स्वराने उद्गारला, “मीं राणीचा वध केला.
राणी इतकी पातकी होती कीं तिला देहान्त शासन मिळणेंच अवल्य होतें.
हा जर माझ्या हातून अपराध घडला असें सरदारसाहेब, तुम्हांला वाटत
असेल, तर त्याबहल मला क्षमा करा. ”
“ विश्वासघातक्या ! हरामखोरा ! तूं राणीचा खून केलास काय ??
असें आवेशानें उद्गारत अंगावरील अनेक जखमांमुळें रक्तानें न्हालेला कोयाजी
घाटगे बाणासारखा त्या गर्दीतून धांवत पुढे आला व त्यानें तरवारीच्या
एका घावासरसें त्या विव्हळणाऱ्या वीराचें शीर धडावेगळे केलें. संभाजी
भालाजीच्या उजव्या हाताला उभा होता. त्यानें तो प्रकार पहातांच एकदम
कोयाजीवर झडप घातली व आपल्या हातांतील कट्यार त्याच्या छातींत
खुपक्षीत म्हटलें, “ देशद्रोही महापातक्या, कांचनगडावरून तृ अग्निप्रळयां-
तून बचावलास, पण येथें तुझ्या कपाळीं विधात्याने मरण लिहिलें होतें.
हें घे तुझ्या पापार्चे प्रायश्चित्त.
कोयाजीला संभाजीच्या कट्यारीच्या वारानें प्राणांतिक जखम झाली.
तरीही त्याची पर्वा न करितां त्यानें संभाजीवर उलटा वार केला. तो योगा-
योगासरसा संभाजीला लागावयाचा सुटून शहाजीला ओझरता लागला.
तरी बरें कीं तेवढ्यांत मानाजीनें शहाजीला बाजूला ओढलें. त्यामुळें शहा-
जीच्या दंडावर मात्र लहानशी जखम झाली. तेवढ्यांत संभाजीने संधी
साधून कोयाजीवर दुसरा वार केला. त्या वारासरसा मात्र कोयाजी गतप्राण
होऊन खालीं कोसळला.
कोयाजीच्या हातून अपरूपा राणीचा वध करणारा वीर ठार झाला,
तो कोण असावा याची नीटशी ओळख दुरून न पटल्यानें मानाजीनें म्याली-
च्या प्रकाशांत पुढे होऊन पाहिलें तों तो हनुमान ! हनमानाची तशी अखेर
झालेली पाहुन मानाजी व संभाजी या दोघांनाही फार हळहळ वाटली. पण
मृताला जिवंत करण्याचें सामर्थ्यं त्यांच्या अंगीं थोडेच होतें !
अपरूपा राणी धारातीर्थी पतन पावलेली पाहून मानाजीला ती खरी
वीररमणीशी वाटूं छागली. मात्र तिनें निवडलेला राजपुत्र शहाजी-तो
बावळट बटकीचा पोर प्राणभयानें एकदम आपल्याला शरण येऊन आपल्या
२०८ पेशवाईचे मन्वंतर
ज्र स .»7२०८ *-४१- ४-० *«*
४१...» ४४/५०/४१५४ र्त ४ १७ ५१०४८४ ४६७. पिक.
आश्रयानें लपून बसलेला पाहून मानाजीला मनांतल्या मनांत हंसे आवरेनासें
झालें. तो शहाजीकडे पाहून स्वत:शीं म्हणाला देखील, “ एरंडाच्या फळांत
आम्रफलाचें माधुर्य कोठून येणार? बटकीचापोर तो बोळूनचाळून बटकीचा!
म्हणतच तो इतक्या सुलभतेने शरण आला. तें राजबीज असतें तर निदान
आपणांशीं दोन हात केल्याखेरीज तरी तो खास शरण येता ना
मानाजीनें दुसरा दिवस अपर्पाराणी, कोयाजी वगेरे मृतांना ज्याच्या
त्याच्या दर्जाप्रमाणें अग्नि देण्यांत खचे केला. त्यांतल्या त्यांत हनुमानाचा अंत्य-
संस्कार अपख्पाराणीपेक्षांही गौरवानें करण्यांत आला. राणीचें प्रेत कोल्ह्या
कुत्र्यांकडून खावविण्यांत आलें नाहीं, तें प्रतापसिहमहाराजांकडे पाहून. परंतु
हनमानाच्या प्रेताचा गौरव झाला तो मात्र त्याची तशी योग्यता म्हणन !
ती सारी निरवानिरव झाल्यावर मानाजीर्ने शहाजीला संभाजीच्या हातीं
सोंपवन सांगितलें, संभाजी, या तोतयाला तूं महाराजांच्या पायांपा्शीं
नेऊन गजर. ते यांचा काय न्याय करावयाचा तो करतील. ” त्यानें संभाजीला
एका बाजला धेऊन हळूच त्याच्या कानांत सांगितलें, । आणि हें पहा, त्
त्यांना माझा थांगपत्ता कांहींदेखील लाग देऊं नकोस. त्याप्रमाणेंच करुणा-
राणीविषयींही कांहीं खबर त्यांना कळतां कामा नये. आकाशांत दाटलेली
काळीं अभ्रें दर होण्याला प्रारंभ झाला आहे खरा. तथापि तीं पुरीं द्र हो-
ण्याला अद्यापि थोडा अवधि आहे. अपरूपाराणी व कोयाजी यांचा असा
असा दोवट झाला एवढें त्यांना सांगावयाला मात्र हरकत नाहीं. आतां मी
शिवगंगेकडे प्रथम जातों. मात्र तूं जातां जातां श्रीरंगाच्या देवाल्यांत त्या
बेराग्याचा शोध लागला तर पहा.
संभाजी मानाजीची आज्ञा प्रमाण मानून तोतया राजपुत्रासह तेथून निघाला ,
व मानाजी आपणाबरोबरच्या मूठभर लोकांसह मध्यार्जुनाकडे वळला.
त्रिचनापल्लीच्या गादीचा एक वारस वंगारू तिरुमल हा मध्यार्जूनाच्या
आससमंतांत वेषांतरानें हिंडत आहे असें मानाजीच्या कानीं आलें होतें. तो जर
या वेळीं आपणाला सामील झाला तर त्रिचनापल्लींतून चंदासाहेबाचा उठावा
करण्याच्या कामीं त्याचा चांगला उपयोग होईल असा मानाजीचा तके होता-
तोंच त्याच्या गुप्त हेरानें वर्दी दिली , “ चंदासाहेबाचें सेन्य अपरूपाराणी-
च्या साह्या्थ येत आहे. ”
अपरूपा व कोयाजी यांचा शेवट २०९,
%- ८१ “0७. ८७.०१.» ४,४0१. ४0.» १.५ “१.” “४ “४४१७ “00% _ ४२८” ७ “४.0१. ७४ "*. हभ >... ९४.४४ ०१.८ ७५.८१%./४५०”१- ४0१०. ४.०४.
बरें त्या सेन्याला येऊं दे. आणखी काय खबर ? ” मानाजीनें विचारिलें
रतनसिंग या नांवाचा कोणी सरदार 'व रामस्वामी' या नांवाचा त्याचा
एक जोडीदार असे दोघे जण तो डाव खेळत आहेत. त्यांना करुणाराणीसाहेब
मध्यार्जुनांत असल्याचा सुगावा लागला असून त्यांच्यावर हल्ला करण्याची
त्यांची मनीषा आहे. ”
मानाजीला प्रथम ती वार्ता ऐकून जरा चिंतेंत पडल्यासारखे झालें. तथापि
रामस्वामीचें नांव कानीं येतांच त्याची सारी चिंता एकदम दूर झाली. राम-
स्वामीर्ने चंदासाहेबाला गोत्यांत अडकविण्यासाठीं हा कांहीं तरी चक्रव्यूह
रचला असला पाहिजे अशी त्याची खात्रीच होती. तथापि समक्ष भेटींत
आणखी कांहीं महत्त्वाच्या गोष्टी रामस्वामीच्या साहाय्यानें करतां येतील
या इराद्याने त्याने रामस्वामीची' गांठ घेण्याचें ठरविलें.
2 13 अ अ
तोतया राजपुत्र शहाजी याला बरोबर घेऊन संभाजी तंजावरच्या मार्गानें
जात असतां मध्येंच त्याला खबर लागली कों झुक्षारराव श्रीरंगाच्या देवालयाच्या
आसपास कोठें तरी असून सेन्याची जमवाजमव करीत आहे, व त्याची
तसारी आपल्या विरुद्ध चाळली आहे असा झंझाररावाच्या हितडत्रूंनीं
मृद्वाम तंजावरला जाऊन प्रताप्सिह महाराजांचा कलुषित समज करून दिल्या-
मुळें त्याला शासन करण्यासाठीं खुद्द महाराज चाल करून येत आहेत. ती
वार्ता ऐकून संभाजीला चिता उत्पन्न झाली कीं आतां कसें होणार ! प्रताप-
सिहमहाराज स्वतः झंझाररावाचें पारिपत्य करण्याला येत होते ती एकट्या
झंझाररावांची थोरवी नसून तो करुणाराणीचा महिमा होता. तें संभाजी
ओळून होता. झंझारराव, करुणाराणी आणि मानाजी यांना पकडून आण-
ण्याची कामगिरी महोराजांनीं सखोजी नाईकाला सांगितलेली त्याला ठाऊक
होती. त्यामुळें त्याला पेंच पडला कीं झुंझारराव पूर्ण निर्दोषी असून स्वामि-
सेवादक्ष आहे हें जरी खरें तरी महाराजांची तशी खात्री कोणीं कशी करून
यावी ? संभाजीसारख्या यःकदिचत माणसावर महाराज थोडेच विश्वास
ठेवणार होते !
अश्या आणीबाणीच्या वेळीं जर तो बैरागी-मानाजीचा गुरू भेटला, तर
फार छान होईल असें संभाजीला वाटलें. त्यानें त्या बैराग्याची चौकशी
शड
२१० पेशवाईचें मन्वंतर
करावयाला व तो श्रीरंगाच्या देवालयाकडे जातांना भेटावयाला एक गांठ
पडली. संभाजीने बेराग्यालळा नम्मतापूवेक वंदन करून अपख्पाराणी व
कोयाजी यांच्या निधनाचा वृत्तांत त्याला निवेदन केला. त्या घटनेचा प्रत्यक्ष
पुरावा म्हणून तोतया राजपुत्र शहाजी संभाजीबरोबर होताच. बेराग्यानें
त्याच्याकडे वळून विचारिलें, “ वेड्या मुला, राजसिहासन ही सुळावरची
पोळी खाण्याची दुर्बुद्धि तुला कोठून सुचली? ”
शहाजीनें बेराग्याच्या पायांवर लोटांगण घालून त्याची करुणा भाकली,
“ मला तुम्ही वांचवा. मला प्रतापसिंह महाराजांच्या स्वाधीन करूं नका.”
बैरागी सडेतोड वृत्तीने म्हणाला, “ तूं राजद्रोहाचा भयंकर अपराध केला
आहेस. तुला शासन अथवा क्षमा करण्याचा अधिकार माझा नसून तो
महाराजांचा आहे. ”
याप्रमाणें संभाषण चाललें आहे इतक्यांत लोकांचा एक घोळका रस्त्याने
आरडाओरड करीत येत असतांना त्या सर्वांनी पाहिला. बेराग्यानें संभाजीला
तिकडे पाहून विचारिलें, “ हा काय प्रकार आहे? ”
तोंच त्या जमावाच्या तोंडचे अस्पष्ट शब्द त्या सर्वांना एंक आले,
““मारा-मारा त्या थेरडीला. बटीक ती बटीक आणि वर राजमाता होऊं पहाते
काय? ”
लगेच दुसरा तसाच अस्पष्ट ध्वनि एकू आला, “अरे तिला ठार मारूं नका;
तिला पकडून महाराजांपाशीं घेऊन चला. म्हृणजे महाराज तिच्या तोंडून
सर्वे शत्रुकारस्थानांचा पाठ वदवितील व मग तिला काय शासन करावयाचे
तें ते करतील.”
तेवढ्यांत तसाच तिसरा ध्वनि ऐंकू आला, “ तिनें सांगितल्याप्रमाणे
प्रथम तिच्या पोराचा तपास लागतो किंवा कसे तें पाहूं. तपास लागला, ती
आपणापाशीं खरें बोलली असें शाबीत झालें, तर तिच्यावर आपण दया करून
तिला आणि तिच्या पोराला जिवंतच्या जिवंत महाराजांपाशीं नेऊन गुदरूं-
ती खोटें बोलते असें शाबीत झालें तर मात्र तिला इथल्या इथें ठार करूं.
“हे त्या रूपी बटकीचें कांहीं तरी प्रकरण दिसतें. ” संभाजी शहाजीकडे
पहात म्हणाला.
शहाजी विव्हृलवित्त होऊन समोरून चालून येणार्या त्या घोळक्याकडे
अपख्पा व कोयाजी यांचा शेवट २११.
"८४.४ ४.” ४१%.४४%- ४०७ ४७१४ ४१” ७ ४१४४७, १७४१७.”/,५%/१%_ ४७.१. ७१४. ७ .४१७./ ७.७१. ७.४१ ४ ७.४ ४. ४
५.८१४-८१५-- १.८ १४११७, “0४.४0 “४४९४४१... ४४५८४ १०८८८0००७० ४४७४
पहात म्हणाला, “ माझी आई ! -गुरुदेव, माझ्या आईला आपण वांचवा
हो वांचवा. ”
ती खूपीच होती. अपख्पाराणीनें तिला जंगलांत नेऊन ठार मारण्याला
आपल्या सेवकाला सांगितलें, पण त्या सेवकाने भूतदयेनें प्रेरित होऊन तिला
जंगलांत जिवंत सोडून दिलें. तेव्हापांसून ती बिचारी पुत्रविरहानें व्याकूळ
होऊन दाही दिशा वणवण उपाशीतापाशीं हिंडत असतांना कांहीं लोकांनीं
तिला ओळखलें व त्यांनींच तिचा असा छळ मांडला होता. रूपीचा आपला
पुत्र तंजावरचा राजा व्हावा असा आग्रह नसून ती सारी कोयाजी व अपखर्पा
राणी यांची कारवाई होती हें त्या लोकांना काय माहीत !
वैराग्याला व संभाजीलाही त्या रूपीची दया आली. संभाजी भतदयेनें
प्रेरित होऊन आपली तरवार म्यानांतून बाहेर काढून रूपीच्या रक्षणार्थ त्या
छोकांवर धांवण्याच्या विचारांत होता. तोंच त्याला बेराग्यानें आवरून
म्हटलें, “ ते लोक अडदांड आहेत. ते तुला मुळींच आवरणार नाहींत. उलट
तुझ्या प्राणावर मात्र बेतण्याचा संभव आहे. तृ इथेंच रहा, मी त्यांना आवरतों.?”
बेराग्यानें तेथूनच सच्च्विदानन्द असा त्रिवार जयघोष केला. त्याबरोबर
काय चमत्कार, त्या लोकांनींही तसाच जयघोष केला. संभाजीला तें नवल
वाटलें. बेरागी तसाच पुढें गेला व पुन्हां मोठ्याने ओरडून म्हणाला, “माझ्या
शिष्यांनो, त्या गरीब जीवाचा असा छळ करूं नका. ”
“ गुरुदेव, ही स्त्री महान् अपराधी आहे. ”त्या लोकांपैकी एक ओरडला.
“ मला तें सर्व माहीत आहे. पण अपराध्यांना शासन करण्याचा अधि-
कार एका परमेश्वराचा व परमेश्वररूप राजाचा. इतरांनीं तो अधिकार
उतावीळपणें हातीं घेणें म्हणजे पाप करण्यासारखे आहे. माझी तुम्हांला
आज्ञा आहे कीं त्या स्त्रीला ताबडतोब सोडन द्या. तिची काय व्यवस्था
पुढें करावयाची ती मी करीन. ”
बेराग्याच्या तोंडून ती आज्ञा निघतांच सर्वे लोकांनीं त्या क्षणींच रूपीला
बैराग्याच्या पायांपाशीं आणून सोडिलें व वेराग्यानें जा अशी आज्ञा कर-
तांच ते त्याला अभिवादन करून निघून गेले. म्हातारीने रडत रडत व्याकूळ
चित्ताने बेराग्याच्या पायांवर लोटांगण घातलें. शहाजीने आई! आई! ?
अश्या हांका मारीत धांवत जाऊन तिच्या गळ्याला मिठी मारिली. धास्त-
२१२ पेशवाईचे मन्वंतर
“९९.४ ४.४. ४४१४७. ४७४..०७%... १५ ८४/४७/४४१७ ४ ४१४. ४७४९-४१-०५, “70...»७ ५.४ ४.९ ४७/४१/७0९६ ७४0१६ ४४.४ ./४ १५.४ _/९ ७७%, -€४*. १-४ ४८४१७ ५00 “४,७८५ ५१४७७0५११७ ४७.४१ “१४/१४/४१४७ ५ “0९७४११७ ७७” ४९
विक तोच तिची अशी दुर्दशा होण्याला कारण झाला होता. राज्यलोभाला
बळी पडून त्यानें तिला हेटाळलें नसतें तर अपरूपाराणी अगर कोयाजी' यांची
तिला भणंग भिकारणीप्रमाणें रानोमाळ हिंडविण्याची काय छाती होती !
पण रूपी माता पडली. तिच्या कोमल मातृहूदयांत पुत्राच्या प्रमादाच्या
आठवणीला अथवा रोषाला लवमात्र जागा नव्हती. तिला उलट पुत्रदर्शेन
होतांच नवजीवन प्राप्त झाल्यासारखे वाटूं लागलें. सर्वे शारीरिक यातना
ती जणूं पार विसरून गेली व वत्सलतेचें आऊर उरीं दाटून आलेल्या' गद्गद
कंठानें शहाजीला हृदयाशीं घट्ट धरून म्हणाली, “ अखेर माझा बाळ मला
सुखरूप भेटला; माझ्या डोळ्यांचें पारणें फिटलें. बाबा, मी ऐकत होत्यें कों
तुझ्या वाड्यावर शत्रूचा हल्ला होऊन ती अवदसा आणि तो सेतान दोघेंही
ठार झालीं, व तृंदेखील जिवें मारला गेलास असें मला कोणींतरी सांगितलें.
आतां तरी माझ्या बाळा, तुला माझ्या गळ्याची शपथ आहे, तूं राजा होण्याचा
नाद सोड; आणि महाराजांना शरण जाऊन त्यांच्यापाशी जीवदान माग. ”
ती बेराग्याकडे वळून म्हणाली, “ हे बुवादेखीळ जणूं आम्हांला साक्षात् पर-
मेश्वर भेटले. यांनींच मला जीवदान दिलें म्हणून .... ”
“ तेच मलाही जीवदान देतील. ” शहाजी बेराग्याला पुन्हां आदरपूर्वक
वंदन करीत म्हणाला.
“ अनाथांचा वाली परमेश्वर ! ” बेरागी नम्मतापर्वेके निर्भयभावननें
उद्गारला, “ तुम्हां दोघांही मायलेंकरांच्या हृदयांत पश्चात्तापाचा उगस
झालेला परमेश्वराने ओळखून तुमच्या प्रमादाबद्दल तुम्हांला क्षमा कर-
ण्याचें ठरविलें आहे असें दिसतें. माते, तूं ज्या लोकांच्या हातीं सांपडलीस,
ते सारे माझे शिष्यजन होते. म्हणून त्यांच्या हातून तुझी सुटका करतां आली.
आतां मी तुमच्यासाठीं एवढेंच करीन. तुम्हांला महाराजांच्या पायांपावेतों
सुरक्षितपणे पोंचवून तुम्हांला क्षमा करण्याबद्दल त्यांना उपदेश करीन. माझा
शब्द महाराज मोडणार नाहींत असें मला वाटतें. ”
“ गुरुदेव, आपलें कृपाछत्र ज्या जीवांच्या मस्तकीं रुळू लागलें ते महारा-
जांच्याच काय पण कळीकाळाच्याही भयापासून मुक्त झाले. ” संभाजी
कुतज्ञ वृत्तीने म्हणाला.
“ सच्चिदानंद ! सच्चिदानंद ! सच्चिदानंद ! ” बेरागी त्रिवार ईश्वर-
अपरूपा व कोयाजी यांचा शेवट २१३
"€0४-/९४%-४११/-७0४५..४”४-./”
५५४४४१४०४५”... ४७,४१४ .७०७.७ ७
नामाचा पवित्र उच्चार करून कांहीं पळें मिटलेल्या नेत्रांनी उभ्याउभ्याच
ब्यानस्थ झाला व ध्यान पुरें झाल्यावर सर्वांना म्हणाला, “ चला मंडळी
आतां माझ्या मागोमाग चला. ”
रूपीला चालवेना म्हणून बेराग्याच्या सांगण्यावरून संभाजीने तिला
आपल्या पाटुंगळीला घेतलें व सर्वे जण श्रीरंगाच्या देवालयाकडे निघाले.
प्रकरण २८ वें
श्रीरंगाच्या देवालयांत
चेरगी वगैरे मंडळीला श्रीरंगाच्या देवालयांत जाऊन पोंचावयाला जर
घटका दोन घटकांचा अवधि लागला असता, तर खरोखरच मोठा अनर्थ
गुदरला असता.
इकडे संभाजी व बेरागी यांची भेट झाली तेव्हांच तिकडे श्रीरंगाच्या
देवालयाला अकस्मात् प्रतापसिहमहाराजांच्या सेनिकांचा वेढा पडला.
त्या वेळीं झुझारराव आजूबाजूंच्या लोकांना देवालयांत एकत्र करून आपल्या
देशासाठी, धर्मासाठीं व राजासाठीं एकजुटीने व तळहातांवर शिर्रे घेऊन
लढण्याचा उपदेश करीत होता. झुझाररावानें या वेळीं वेषांतर केलें होतें
तो बेरागी बनला होता. तथापि बेरागी बनण्यांतील त्याचा हेतु अर्थातच
आपणाला कोणीं ओळखू नये असा होता. परंतु त्याला सखोजी नाईकाच्या
माणसांनीं ओळखलें व महाराजांपाशीं जाऊन तशी वर्दी दिली. त्यामुळें लगेच
महाराज जातीनें झुझाररावारचें पारिपत्य करण्यासाठीं तेथें उपस्थित झाले होते.
वस्तुतः झुंझाररावार्ने जर तेथून पळ काढावयाचे मनांत आणलें असतें
तर त्याला तें सहज करतां आलें असतें. तो मूळचाच परोपकारी वृत्तीचा
असून शिवाय भाविकांचे मन सहज आपणाकडे आकषिलें जावें असा साधु-
वेष त्यानें धारण केल्यानें तो ज्या ज्या लोकांना भेटावा, त्यांनीं त्यांनी आदर-
भावानें त्याच्यासमोर मस्तक नम्प्र करावें. श्रीरंगाच्या देवालयांत पाऊल
टाकल्यापासून नेहमीं त्याच्या सभोंवतीं हजारों भाविकांचा घोळका जमलेला
असे व त्यांना प्रतापसिहमहाराजांच्या वतीने समरांगणांत उडी घेऊन माय-
देशाच्या मंगलासाठीं जीवाभावाच्या मोबदल्यांत झटण्यापेक्षां तो दुसरा
कोणताही उपदेश करीत नसे. इतका राजाच्या व राज्याच्या आबादीसाठीं
झटणारा तो साधु आणि त्याला शासन करावयाला महाराज कसे उद्युक्त
झाले हें झंझाररावसभोंवारच्या लोकांना पडलेले एक अवघड कोडें होतें-
त्या लोकांनीं झंझ्ाररावाला सुखरूपपर्णे नगराबाहेर काढून देण्याचीदेखील
इच्छा दर्शविली. परंतु झुंझारवारानें त्यांना नकार देऊन सांगितलें, “माझ्या
श्रीरंगाच्या देवाल्यांत २१५
कन्यका मड का “८७४०0४0 0४१५१ 20५७०१७ ७-१ हक ७७ ७कन्कोस्ट
साठीं कोणीं कसलीही चिता करण्याचें कारण नाहीं. मी जर सत्यधर्माला
स्मरून वागत असेन, तर सकदर्शनीं माझ्यावर जें अरिष्ट कोसळत आहिेसें
तुम्हांला वाटत आहे तो आपल्या राष्ट्राला व आपल्या धर्माला शुभशकन-
साचा ठरेल. ”
तरी लोकांचे तेवढ्याने समाधान होईना. त्यांच्या मनांतला झंक्षाररावा-
विषयींचा आदर मात्र त्यामुळे दुणावला. ते त्याला म्हणाले, “ स्वामी-
महाराज, महाराज जर आपणाला शासन करण्याचा हट्ट सोडीनासे झाले,
तरु आपल्या रक्षणासाठी आम्हीं त्यांच्याशीं समर मांडावा काय? ”
यावर झुज्ाररावानें त्यांना उपदेश केला, “ तुमची जर श्रीरंगाच्या ठायीं
खरी विष्ठा असेल, माझ्याविषयीं तुम्हांहा जर खरी कळकळ वाटत असेल,
तर तुम्हीं माझ्या आज्ञेखेरीज महाराजांविरुद्ध करांगुलीदेखीलळ उचलावयाची
नाहीं. इतकेंच काय ; पण मी' कोणी नाहीं, मीही महाराजांच्या प्रजाजनां-
पेक्कींच एक आहे. असें समजून तुम्हीं प्रसंगीं मला बाजूला सारून महाराजांशींच
राजनिष्ठ राहिलें पाहिजे ; त्यांच्या नेतृत्वाखालीं मायदेशयाच्या मंगलासाठीं
प्राणांतापावेतो मनोभावाने झटलें पाहिजे. ”
लोकांनींही झुंझाररावांची आज्ञा अक्षरा: पाळली. खुद्द प्रतापसिह
महाराजांनीं सेन्यासह येऊन श्रीरंगाच्या देवालयाला वेढा दिला, राजसेनि-
काँनीं महाराजांच्या आज्ञेप्रमाणे, तुमच्या ढोंगी' गुरूला आमच्या स्वाधीन
करा” अशी आज्ञा केली, तरी ते हजारों लोक तिथें चित्रासारखे तटस्थ! लगेच
झुझाररावानें त्यांना आज्ञा केली, “ तुम्ही सर्वे बाजूला व्हा आणि राज-
सेनिकांना मार्ग मोकळा करून द्या. ”
सर्वे लोक दुःखातिशायार्ने बाजूला झाले. राजसेनिकांनीं देवालयांत शिरून
झंझाररावाला कंद केलें व प्रतापसिहमहाराज देवालयाच्या प्रांगणांत थांबळे
होते त्यांच्यासमोर नेऊन उभे केलें. इतकें झालें तरीही झंझाररावानें एक
शब्दही मुखावाटं उच्चारला नाहीं, इतकेंच काय पण त्याच्या चर्येवरही राग-
भय-तिरस्कार यांची ओझरतीदेखील छटा उमटली नाहीं. महाराजांना
आईइवचयं वाटलें.
“ झुझारराव ! तुम्हांला मी आतांपावेतों वडिलकीचा मान देत आलों,
तुमचे कृपाछत्र आमच्या मस्तकावर आहे असा आमचा समज होता. परंतु
१५४५४५ /0४७०४१४५९७ (७४५७ होण एटीरल एशिशन्टोननक शकल तोलधतशीण पटका हीण रली हलपी.
२१६ पेशवाईचें मन्वंतर
माझा सर्वनाश करण्याला तुम्हीच कारण आहां, असा आतां माझा सप्रमाण
ग्रह झालेला आहे व त्या अपराधाबहल तुम्हांला देहान्तशासतन मिळावयाचें
आहे. त्यापूर्वी मी एकवार तुम्हांला तुमच्या वतीचा कांहीं खुलासा करावयाचा
असेल तर तशी संधि द्यावयाला तयार आहें.
महाराजांच्या तोंडून “* झंझारराव ' ही हांक ऐक येतांच सभोंवारचे लोक
विस्मयपुर्वक झझाररावाकडे टकमका पाहु लागले. झुझ्ारराव हा महा-
राजांचा इवशुर होय हें सर्वांना माहीत होतें. त्याच्यावर बेरागी होण्याची पाळी
कां यावी हें कोणालाच कांहीं कळेना.
झक्षारराव वीरवत्तीनें गंभीरपणानें उत्तरला, “ महाराज, मी पूर्णे राज-
निष्ठ आहे, व मीं आपला कोणताच अपराध केलेला नाहीं एवढेंच मी या
प्रभ॒ श्रीरंगाला स्मरून आपणांला सांगूं शकतों. यापेक्षां विस्ताराने मी हें
रहस्य आपणाला उलगडून दाखव लागलों तरी आपलें मन पूर्वग्रहदूषित अस-
ल्यानें त्यावर आपला विदवास बसणें या वेळीं तरी शक्य नाहीं. ”
“ असलें मानभावीपणाचें उत्तर मला नको आहे. दगलबाज ! मी विचा-
रतों त्या प्रश्नाचे मला सरळ व स्पष्ट उत्तर दे! सांग, करुणा कुठे आहे?
तो नीच विश्वासघातकी मानाजी कुठें आहे ? त्या प्रासादिक तरवारी कुठें
आहेत ? माझ्याविरुद्ध कट करतां काय ? ” महाराज हातांतील तरवार
म्यानाबाहेर काढीत गर्जे लागले, “ हरामखोरा ! आजारीपणाचें खोटें
निमित्त करून तंच करुणेला पळवून नेली असली पाहिजेस. ”
तरवारी नाहींशा झाल्याचा विषय झंझाररावाला अगदीं नवीन होता.
त्यानें सरळ भावनेने म्हटले, “ महाराज तरवारींविषयीं काय बोलत आहेत
तें मला नीटसें समजले नाहीं. ”
“ विश्वासघातकी दगलबाज ! एवढा गोंधळ करून सवरून पुन्हां कानां-
वर होत ठेवतोस काय ? “ महाराजांनीं आवेशानें तरवार उगारली व आतां
झझाररावाच्या मानेवर तो घाव पडणार तोंच त्या गर्दीतून कोणाचासा स्वर
ऐकं आला, “हां! हां! राजा, असा अविचार करू्नकोस ; निष्ठावंत
स्वजनांचा संहार करून आत्मनाश जोड्ं नकोस. ”
सर्वे लोक एकदम दचकून मागें वळून पाहूं लागले. महाराज हात आवरता
घेऊन तिकडे वळले. झंझ्ारराव मात्र आतां आपला अवतार संपला अद्या
श्रीरंगाच्या देवाल्यांत २१७
भावनेनें दृष्टि मिटून अखेरचें ईश्वरचचितन करीत होता. तोंच त्या गर्दीतून
वाचकांचा पूर्वेपरिचित सच्चिदानन्द बेरागी धांवत आला व त्यानें महाराजांचा
हात धरून प्रथम हातांतील तरवार काढून घेऊन मग म्हटलें, “ राजा, रागावूं
नकोस. परंतु तुला स्वजनांचीदेखील इतकी पारख नसावी, याचें
मला आरचर्ये वाटतें. अरे, ज्यांना अष्टोप्रहर आपल्या प्रभूचे -राजा,
तुझें कल्याण कसें होईल याखेरीज अन्य चिंता नाहीं, तुझ्या कल्याणसाधना-
पुढें ज्यांना स्वतःच्या जीवनाचीदेखील लवसात्र पर्वा वाटत नाहीं, त्यांच्या-
विषयीं अशी भलतीच शंका घेणाऱ्या तुझी मला कींवच करावीशी वाटते.
वास्तविक सच्च्विदानन्दस्वामीची व महाराजांची ओळखदेख देखील नव्हती.
परंतु त्याची निस्पृह वृत्ति, त्याच्या चर्येवर झळकणारें तपरचर्येचे तेज व त्याच्या
वाणींतील अधिकार यांमुळें महाराजांवर तेव्हांच त्याची छाप पडली.
लोकांना तर काय, महाराजांनीं इतकें कठोर भाषण शांतपणानें ऐकून घेतलें
ही एकच गोष्ट स्वामीचा मोठेपणा त्यांच्या मनांना पटण्याला पुरेशी होती.
“ स्वामीजी मला आपला परिचय करून देतील काय? ” महाराजांनीं
विनयपूर्वक प्रश्न केला. तोंच संभाजी, त्याच्या मागोमाग रूपी आणि तिचा
पुत्र-महाराजांचा प्रतिस्पर्धी तोतया राजपुत्र शहाजी हीं तिघेंहो तेथें येऊन
सच्चिदानन्दापाशीं उभीं राहिली. त्यांना पाहातांच तर महाराजांना
विचार पडला, हें गूढ आहे तरी काय?
“ माझी ओळख तुला पाहिजे ? राजा, हा तुझा इतक्या दिवसांचा विरोधी
शहाजी पहा. ही त्याची आई पहा ! -हें सारें काहुर तुझ्याविरुद्ध ज्यांनीं
उठविले होते, तींच चांडाळ माणसें तुझ्या निरपराधी राणीच्या नाशाला
जबाबदार असून तुला कुलदेवताप्रमाणें वंद्य असणाऱ्या त्या दोन प्रासादिक
तरवारींचें अपहरणही त्यांनींच केलें आहे. इतकेंच काय, पण त्यांनीं-विशेषत:
त्या पाताळयंत्री अपरूपाराणीनें मायावीपणानें तुळा फंसविलें आणि तूही
फंसलास. म्हणूनच या झूंझाररावासारख्या उपकारकर्त्याला ठार करावयाला
तूं तयार झालास. या तुझ्या सर्वे चुकांचे परिमाजन होऊन तुझ्यासह सर्वाचे
मंगल व्हावें यासाठीं मनोभावाने झटणारा मी एक ईरवराचा सेवक आहें.
तुझ्यावरील संकटांचे निवारण करतां करतां हे दोन बिचारे निरपराधी जीव
हातीं लागले, त्यांना तुझ्या पायांवर घालण्यासाठीं मी घेऊन आलों आहें. ”
पेशवाईचे मन्वंतर
पण करुणाराणी सध्यां कुठे आहे ? ” महाराजांनीं प्रश्न केला
“£ तो सर्वे वृत्तांत मी तुला सांगेन. परंतु प्रथम तूं या झंझ्षाररावाची क्षमा
मागन त्याला अभय दे. त्याप्रमाणेंच ही रूपी आणि हा तुझा प्रतिस्पर्धी--
बांना अभय दिलें असें वचन मला दे. ”
“ आपल्या आदेशाप्रमाणे मी झंज्ञाररावांना अभय देतों. परंतु या दोघांना
विचार केल्याखेरीज अभय देणें योग्य नाहीं. ”
अरे, मीं तो सर्वे विचार केला आहे. यांची काय मातब्बरी घेऊन बस-
लास ? यांचे बोलविते धनी-ते अस्तनींतील निखारे निराळेच होते. ती
अपरूपाराणी व कोयाजी घाटगे अशी दुक््कल त्यांच्या कर्मांनीं ठार झालीं. ”
“ काय ! आईसाहेब ठार झाल्या? ”
् होय. १2
“त्यांना कोणीं ठार केलें? ”
त्या इथें चव्हाट्यावर बोलण्यासारख्या गोष्टी नाहींत. तें सर्वे वत्त
मी तृला सप्रमाण कथन करणार आहें. पण त्यापूर्वी त् या मायलेंकरांना
अभय दिले पाहिजेस. कारण मीं त्यांना तसें वचन दिलें आहे. एवढा माझ्या-
वर तुझा भरंवसा नाहीं काय? ”
महाराजांना सच्चिदानंदाची ओळख नसल्यामुळें महाराज कां क॑ करीत
आहेत असे पहातांच संभाजी पुढे होऊन अभिवादनपूर्वेक महाराजांना म्हणाला,
महाराज, स्वामीजी सांगतात ती प्रत्येक गोष्ट खरी आहे. आपले भाग्य
थोर, म्हणून स्वामीजींची कृपादृष्टि आपणाकडे वळली आहे. यांच्या-
खेरीज राणीसाहेबांचें रक्षण होणे दुरापास्त होतें व मी-मी पायरी सोडन
बोलतो याबद्दल महाराजांनीं मला क्षमा करावी, परंतु राणीसाहेबांचा सर्व-
तोपरी नाझ करण्याचें-आणि तें कांचनगडच्या किल्लेदार मीरकासीम या-
सारख्या नरपशु अविधाच्या हातून-अपरूपाआईसाहेब व कोयाजी यांनीं
योजिले, त्यांना देहान्तक्यासन परमेश्वराने दिलें तोही न्याय अगदीं यथायोग्य
झाला असेंच आपणाला आपण सर्व वृत्तांत ऐकाल तेव्हां वाटेल. ”
असे हे सारें कारस्थान होतें एकूण ! ” महाराज एकं सुस्कारा सोडून
काह| क्षण स्तब्ध राहिले. रूपी व शहाजी या मायलेंकरांना सच्न्िदानंदानें
तेवढ्यांत हूळूच सूचना केली, “ महाराजांचे पाय धरून त्यांची क्षमा मागा. !*
२१८
१८१९ अभ
श्रीरंगाच्या देवाल्यांत २१९
त्या मायठेंकरांनीं महाराजांचे पाय धरून क्षमा मागितली.
“जा ! तुम्हांला झाल्या अपराधांची क्षमा करण्यांत येत आहे. ” महा-
राज म्हणाले, “ तुम्हांला याउप्पर कोठेंही जाण्याळा पूर्ण मोकळीक आहे.
मात्र पुन्हां जर असल्या फंदांत पडाळ, तर याद राखून ठेवा ! ”
“ नाहीं. अशी चूक पुन्हां माझ्या मुलाच्या हातून कधींच होणार नाहीं.
महाराज, मी आपल्या पायांना स्मरून सांगत्ये, आम्हांला यापुढे
आपले पाय सोडून अव्यत्र कोठेंच जावयाचें नाहीं. मी आपली बटीक,
व बटीक या नात्यानें आपल्या आश्रयाला राहणार. हा माझा मुलगाही
आपला विश्वासू सेवक या नात्यानें आपण आपल्या सेवेंत रुजू करून घ्यावा. ”
शहाजीनेंही महाराजांना तशीच विनंति केली. महाराजांनीं ती मान्य
केली ; व तोतया राजाच्या प्रकरणाचा एकदांचा असा समाधानकारक
शेवट झाला. तेथील मंडळीला मात्र एके काळीं राजा झालेला हा शहाजी
पुन्हां राजाचा हुजऱर्या बनून पूर्वपदावर कसा आला याचें आश्चर्य वाटलें.
अपरूपाराणीनें शहाजीला आपला पुत्र म्हणून गादीवर बसविण्यासाठी
केलेली अपूर्व खटपट ज्यांना माहीत, असे वरेच लोक जे तेथें होते, त्यांनीं
शहाजीप्रकरणाची ही अखेर पाहून अपख्पाराणींच्या उपद्व्यापाबहृल
तोंडांत बोटें घातलीं.
हें एक प्रकरण असें शेवटल्यावर झुझारराव, सच्चिदानन्द व संभाजी
यांसह महाराज आपल्या निवासस्थानीं गेळे. आतां काय होतें व काय नाहीं
इकडे सर्वांचे डोळे लागून राहिले. तों दोन प्रहरांनीं झज्ञारराव-नव्हे,
तो श्रीरंगाच्या देवाल्यांतील बेरागी सेनापतीचीं वस्त्रें धारण करून इतमामानें
श्रीरंगाच्या देवालयापाशीं यावयाला निघाला. त्याच्यापूर्वीच झुंझाररावाला
महाराजांनीं सेनापति नेमल्याचें शुभ वृत्त नौवत झडवून सर्वांना जाहीर
करण्यांत आलें होते. हा कोणत्या दिलजमाईचा परिणाम हें मात्र लोकांना
स्पष्टसें कळलें नाहीं व लोकांनींही ती फारशी चोकशी केळी नाहीं. तथापि
झुझाररावाच्या मर्जीला व विश्वासाला पात्र झालेल्या ज्या कांहीं लोकांना
करुणाराणी व मानाजी' यांच्यावर महाराजांचा झालेला रोष माहीत होता,
त्यांनीं झझाररावापाशीं त्याविषयी विचारणा केली. त्यावर झुंझ्ारराव
एवढेंच मोघम उत्तरला, “ करुणाराणीच्या ललाटीं काय लिहिलेलें आहे
22
२२० पेशवाईचे मन्वंतर
-7-“५४४४५/४५४४४४४४४४४४४0४४४४0१/४४/४शशशेशेश४४४७४४४१/११४४४४५॥/४॥४५--0५-५-५-८-५८-८
५-“४८-/८४”//
कोण जाणे ! परमेश्वराची मर्जी काय असेल ती खरी! ”
झुंझाररावाच्या त्या उद्गारांत पुष्कळच सत्यार्थ सांठळेला होता. स्वतः
त्यानें व सच्चिदानन्दानेंही महाराजांना अपरूपा राणी व कोयाजी यांची फितुरी
सहज पटवून दिली. परंतु करुणाराणी माहेरीं म्हणून निघून गेली तेव्हांच
त्या प्रासादिक तरवारी नाहींशा झाल्या होत्या व तें करुणाराणीचेंच कृत्य
असावें असा महाराजांचा समज झाला होता. तो समज झंझारराव, सच्चि-
दानन्द व संभाजी या तिघांच्यानेंही दूर केला गेला नाही. उलट मानाजी व
करुणा यांचा जिव्हाळ्याचा संबंध त्या घटकेपावेतों असलेला महाराजांना
नव्याने माहीत झाला, व त्या दोघांच्या दुर्वेतनाविषयींच्या संशयाने त्यांच्या
मतांत पुर्वीपेक्षांही खोल मूळ धरलें.
झंझारराव एवढा प्रेमळ व करुणाराणीचा धर्मपिता ना !' पण त्याला-
देखील राणीच्या पवित्र वर्तनाची खात्री देववेना, पण तिला नांवही ठेववेना-
तरी पण त्यानें महाराजांपाशीं त्या विषयाबाबत स्पष्ट बोलून दाखविलें होतें,
“ प्रत्यक्ष करुणा भेटेपावेतों आम्हीं तिच्याविषयीं कोणताच ठाम समज करून
घेणे धोक्याचे होईल. ती भेटली व त्या तरवारींचा तपास लागला, म्हणजें
काय ठरेल तें खरें.” |
तथापि करुणाराणीची ती बाब महाराजांच्या एकट्यापुरती होती. ती
बाब चंदासाहेवासारख्या परठात्रूपासून स्वदेशाचें व स्वधमर्चिं रक्षण करतांना
आड येऊं द्यावयाची नाहीं, असें महाराज व झुंझारराव यांनीं आपसांत ठर-
विलें होतें. त्याप्रमाणें झझारराव सेनापति या नात्यानें शत्रूशी सामना
देण्याच्या तयारीला लागला व त्याच कार्याप्रीत्यथ सल्न्विदानन्द स्वामी
महाराज आणि झुंझारराव यांच्या अनुमतीने बाहेर पडला. त्यानें
संभाजीला मात्र मुद्ाम आपणाबरोबर घेतलें. कारण करुणाराणी
वगेरे मंडळींचा जवळचा व माहीतगार असा माणूस कोणी तरी त्याला आपणा-
बरोबर पाहिजेच होता.
प्रकरण २९ वें
निहालसिंगाचें चातुय
५" ७७
रतनसिंग व रामस्वामि अपरूपा राणीच्या साहाय्यार्थ निघूने गेल्यानंतर
लवकरच मुरारराव घोरपडे त्रिचनापल्लीला येण्यासाठी निघाल्याची'
वार्ता चंदासाहेबाच्या वार्ताहरांनीं आणली व मुराररावांचा स्वमुद्रांकित खलिता
ही येऊन थडकला. आतां मुराररावांना सांपळ्यांत कसें पकडावे याची
कडेकोट तयारी चंदासाहेबानें चाळविली असतांना अपरूपाराणीच्या वतीने
निहालसिंग या नांवाचा तरुण मराठा सरदार चंदासाहेबापाशीं आला व त्यानें
अपरूपाराणीचा खलिता चंदासाहेबाच्या हातीं आणून दिला. “ मराठ्यांनी
समरांगणावर प्रतिपक्षाला तोंड देण्यासाठीं चांगलेच चंग बांधळे आहेत,
त्यांची तंजावरला प्रतापसिहमहाराजांना कुमक करण्याचीही जय्यत तयारी
झाली आहे. मुरारराव घोरपडे देखील जरी मित्रभावानें त्रिचनापल्लीवर
चाळून आले तरी त्यांच्याशीं देखील परिणामीं चांगलीच झुंज खेळावी लागेल
व त्या कामींही रघूजी भोंसळे त्यांचा पाठपुरावा करावयाला चुकणार नाहीं.
पुर्वी अर्धवट राहिळेली दक्षिणेतील मोहीम या वेळीं पुरी करावयाची व पर्ण
वियश्री संपादन करून भगवा झेंडा त्रिचनापल्लीवर रोंवून माघारे जावयाचें
असा मराठ्यांचा निर्धार आहे. अशा या दारुण परचक्रांतून पार पडावयाचे
तर आपणाला अर्काटचे नबाब आपले सगेसोयरे आहेत त्यांचें साहाय्य घेतल्या-
खेरीज गत्यंतर नाहीं. यास्तव आपण अर्काटचा नबाब आपला मेहुणा सफदर
अल्ली आणि त्याचा दिवाण मीर असद यांना विनंतिपत्रे पाठवून दारुगोळा'
व थोडेसें तरी सेन्य यांची कुमक करण्याला लिहावे. या बाबतींत हा खलिता
घेऊन येणारा आमचा विश्वासू सरदार निहाळलसिंग आपणाशी अधिक वाटा-
घाटी करील. ”
खलिता वाचून झाल्यावर चंदासाहेबानें निहालसिंगाला विचारिलें कीं,
“ अपरूपा राणीसाहेब व कोयाजीराव यांच्या साहाय्या्थे मीं रतनसिंग या
नांवाच्या विश्वासू सरदाराला रवाना केलें आहेच. तूं इकडे यावयाला
निघालास तेव्हां तुझी आणि त्याची गांठ पडली नाहीं काय? ”
ररेर पेशवाईचे मन्वेतर
हाच. क य ४ ७ 77% /00%.. »0% ४7 ७५. 1 ही १...०१५..»५../५../५ ०”. १.४४. कनी
१५५१४४७ शी शी.४% ४४.४४. ४५४०५0 १५ € ४५/४” 2 रक
निहालसिंग क्षणभर घोंटाळून म्हणाला, “ नाहो. त्याची व माझी
गांठ पडली नाही.
“ राणीसाहेबांच्या संदेशावरूनच त्याला मीं तिकडे रवाना केलें आहे. ”
“ राणीसाहेबांनीं तशी कुमक आपणांकडे मागितल्याचें मळा माहीत
आहे. परंतु मला राणीसाहेबांना भेटून आठदहा दिवस तरी लोटले असतील.
दरम्यान इतर महत्त्वाची कामे होतीं तीं करीत मी आलों. ”
मग त्याच वेळीं राणीसाहेबांनीं ही सुचना कां केली नाहीं ? म्हणजे
आतां आम्ही तजवीज करणार ती यापूर्वीच करतां आली असती. ”
““ आपण जाणतांच कीं हीं अत्यंत महत्त्वाची गप्त राजकारस्थानें तित-
क्याच जबाबदारीनें व गुप्तपणें पार पाडावयाचीं असतात. राणीसाहेवांना
मामुली मदतीची आवश्यकता भासली असेल व तेवढ्यापुरती ती मागणी
त्यांनीं आपणापाश्लीं केली असेल. मानाजीराव, करुणाराणी व झुंझारराव
वगैरे घरचे शत्रू सभोवतीं घिरट्या घालीत आहेतच. त्यांच्या बंदोबस्ता-
साठीं कुमक मागविली पाहिजे अर्से राणीसाहेब आणि कोयाजीरावही म्हणत
होते खरे. ”
याप्रमाणें परस्पर खुलासा झाल्यावर चंदासाहेबानें विशेष चिकित्सा न
करितां अर्काटच्या नबाबाला मित्रत्वाचा खलिता लिहून तो आणि दुसरा एक
खलिता अपरूपाराणीला असे दोन खलिते मोहनसिगासमक्ष आपल्या एका
विश्वासू जासुदाच्या स्वाधीन केले. निहालसिंगाला संशय येऊं नये व विषाद
वाटूं नये यास्तव खलिता हातावेगळा करतांना तो म्हणाला, “ राणीसाहेबांना
व नबाबाला अविश्वास वाटूं नये यास्तव मी हें काम मुद्राम माझ्या मनुष्याला
सांगत आहें. त्याबद्दल तुला विषाद वाटण्याचे कांहींच कारण नाहीं. ”
“७61 छ! मला त्यांत विषाद कशाला वाटायला हवा सरकार ?
उलट आपण जर हे खलिते माझ्या हातीं दिळे असते तर मींच आपणाला
अशी कांहीं अन्य व्यवस्था करावयाला सुचविलें असते. कारण मळा दरम्यान
आणखी कांहीं महत्त्वाची कामें करावयाला राणीसाहेबांनीं सांगितलें आहे.
तीं आटोपून माघारा जाण्याला मला बराच वेळ लागेल. ” निहालसिंगानें तो
प्रसंग शोभवून नेला. तो वर असेंही म्हणाला, “ आतां मला निरोप घेण्याला
सरकारांची परवानगी आहे काय? ”
निहाळसिंगाचें चातुय २२३
४"२/११-/१0- ४. “५१२-/"*./"१५ “४५.४५ /४% ५१७ ०४१७. ४ ४.५४ ७.४१ ७७०९. £१५ ४
०४%. ४"०/१६.. ४... “४, ४४४१.
“ आमच्या मनुष्याला राणीसाहेबांचा नक्की पत्ता कोण दाखविणार?”
“हो. तेंही खरेंच. मग मी असें करतों. माझा विश्वासू सेवक किल्ल्या-
बाहेर चार कोसांवर थांबला आहे, त्याला मी या जासुदाबरोबर देईन व
मग माझ्या कामाला जाईन- ”
चंदासाहेबाला ती योजना मान्य झाली.
त्याच दिवशीं सायंकाळीं निहालसिंग व तो जासूद असे दोघेजण त्रिचना-
पल्लीच्या किल्ल्यांतून बाहेर पडले. तोंच त्यांना खबर मिळाली कीं रतनसिग
करुणाराणीकडून माघारा येत आहे. तेव्हां साहजिकपणेंच निहालसिगानें
एकवार रतनसिंगाला भेटण्याचें ठरवून व बरोबरच्या जासुदाला सोवतही
द्यावयाची होती त्यासाठीं रात्रभर एका खेड्यांत मुक्काम करावयाचें ठर-
विले. निहार्लसगाचा नोकर तिथें नव्हता. तेथें आपला नोकर थांबला
आहे असें निहालसिंगाला सांगितलें होतें तो कुठें आहे असें जोडीदाराने त्याला
विचारतांच निहालसिंग जरा आजूबाजूला पाहून आला व नोकर कोठें बाहेर
कामाला अगर सहूल करावयाला गेला असेल असें म्हणाला.
त्या रात्री दोघांनींही जेवणाऐवजीं दूधच घ्यावयाचें ठरविलें व जोडी-
दाराला तेथेंच त्या धर्मशाळेंत थांबावयाला सांगून दूध आणण्यासाठीं स्वत:
गांवांत गेला. त्यासाठीं त्याला कांहीं फार दूर जावें लागलें नाहीं. तेथून
जवळच धनगरांची वस्ती होती. तेथें जाऊन त्यानें शेळीचें दूध दोन शेर
मिळविले. आपल्या मकाणाला माघारा येतांच निहालसिंगानें धर्मशाळें-
तील दुसऱ्या एका भिकाऱ्याच्या चुलीवर तें तापविळें. तेवढ्यांत त्याचा
जोडीदार धर्मशाळेच्या आवारांत विहीर होती' तिच्यावरून हातपाय वगेरे
धुवून आला. तों निहालसिंगानें तें दध निरनिराळ्या दोन भांड्यांत ओतून
तयार ठेविळें होते. जोडीदार येतांच त्यांतले एक भांडे उचलून निहालसिंग
तोंडाला लावीत म्हणाला, “ दूध फारच नामी आहे. ”
त्या जोडीदारानेंही दूध पितां पितां त्याची फार वाखाणणी केली.
दूध पिऊन झाल्यावर गप्पागोष्टी करतां करतां सुमारे अर्धीपाव घटका
निघून गेली. निहालसिंगाचा जोडीदार पेंगूं लागला. निहालसिंग त्याला
म्हणाला, “ तुला इतक्या लवकर झोंप येते? ”
“ होय. ” जोडीदार पेंगतच उत्तरला.
२२४ पेशवाईचें मन्वंतर
का टल वाड य वयक हत
आणखी अंमळशार्ने तर जोडीदाराला चांगलीच झोंप लागली. ती झोंप
कांहीं साधी नव्हती. ती काळझोंप होती. निहालसिंगानें त्याला दुधांतूच जलाल
विष पाजलें होतें.
जोडीदार पूर्ण झोंपीं गेला आहे, तो आतां कधींही जागा होणें शक्य नाहीं
असें नीट पाहून तशी खात्री झाल्यावर निहालसिंगानें प्रथम त्या जोडीदारा-
जवळचे दोन्ही खलिते आपल्या ताब्यांत घेतळे व तेथून बाहेर पडतां पडतां
तेथें एक भिकारी होता त्याला तोंडदेखलें सांगितलें, “ मी जरा गांवांत कांहीं
जरूरीर्चे काम आहे तेवढें करून येतों. तोंवर इकडे अंमळ नजर ठेव. माझा
मित्र जागा झाला तर त्याला सांग. ”
भिकारी बर्रे म्हणाला व निहालसिंग तेथून बाहेर गेला. दोघांचे दोन
घोडे बाहेर एका झाडाच्या बुंध्याशी बांधून ठेवलेले होते त्यांतल्या एकावर
स्वार होऊन तो तेथून निघून गेला. तो अर्थात् माघारा येण्याच्या बेताने
निघून गेला नव्हताच.
बाहेर चांदर्णे शुक्र दुधासारखें पडलें होतें. वाराही झुळझुळ वहात होता.
त्या तशा आनंददायक वातावरणांत निहालसिंग राजमार्गानें भरधांव घोडा
फॅकीत चालला होता. त्रिचनापल्लीहून निघाल्यापासून त्यानें रतनसिंगाची
कसून चौकशी चालविली होती व तेवढ्या टापूंत कोठें तरी रतनसिंगाचा तळ
पडला असावा असा नक्को सुगावा त्याला लागला होता. त्याचा शोध करून
त्याला तावडतोब भेटावयाचें असा निहालसिंगाचा मानस होता. वाटेंत
जो कोणी भेटेल त्याच्यापाशी त्यानें चौकशी करावी. असें करतां करतां त्याच
मागर्नि समोरून कांहीं घोडेस्वार दौडत येतांना त्याला दिसले. त्यांना पाहुन
चौकशी करण्यासाठीं निहालसिंगानें आपला घोडा थांबविला व समोरून
येणार्या घोडेस्वारांभैकी एकाला' विचारिलें, “ हे त्रिचनापल्लीच्या रतन-
सिंग सरदाराचें सेन्य काय? ”
त्या घोडेस्वारानें सरळ उत्तर देण्याचें टाळून विचारिळें, “ तू कोण ?
कोठून आलास? ”
निहालसिगानें उत्तर दिले, “मी त्रिचनापल्लीहन आलों. हे रतन-
सिंगाचे लोक असतील तर मला रतनसिंगाची कांहीं जरूरीच्या कामासाठी
भेट घ्यावयाची आहे.”
निहालसिंगाचें चातुये २२५
तोंच एक निमम्हातारा पण रुबाबदार असा घोडेस्वार पुढें आला व
निहालसिंगाला म्हणाला, “तू कोण? ”
“मी निहालसिंग. मी त्रिचनापल्लीहून आलों. तुमचेंच नांव रतनसिंग
काय?”
“ दोस. ” रतनसिंग उत्तरला. चांदण्याच्या प्रकाशयंत दोघे एकमेकां-
कडे न्याहाळून पहात होते. त्याप्रमाणें थोडा वेळ रतनसिंगाच्या चर्येचें सूक्ष्म
निरीक्षण केल्यावर निहालसिंग त्याला म्हणाला, “ तुम्ही जरा बाजूला
याल काय? ”.
“हो! न यायला काय झाले ? ” असें म्हणत रतनसिग घोड्यावरून
खालीं उतरला व म्यानांतील तरवार मोकळी हातीं घेऊन निहालसिंगा-
मागोमाग चाळू लागला. निहालसिंगानें रतनसिंगाचा तो सावधपणा पाहून
हंसत हंसत त्याला म्हटलें, “ तरवारीचा उपयोग करण्याची पाळी तुमच्यावर
बहुधा येणार नाहीं. ” निहालसिंग सेनिकांपासूत जरा दूर गेल्यावर रतन-
सिंगाला म्हणाला, “ तुम्ही खरे हिंदु आहां. आणि त्याच नात्यानें चंदासाहेबा-
सारख्या सेतानी अविधाच्या जाचांतून कर्नाटकाला सोडविण्यासाठीं तुम्ही
प्रयत्त करीत आहां असें माझ्या कानीं आलें आहे. त्यावर मीं विश्वास
ठेवावा काय? ”
“परंतु या प्रश्नाचें उत्तर देण्यापूर्वी मीं तुझा विश्वास काय धरावा?
तृ कोणत्या पक्षाचा आहेस,व कोणत्या हेतूनें मला हें विचारीत आहेस हे मीं
कसे ओळखावे ? ” रतनसिगानें प्रश्न केला.
“ तुमच्या या सावधपणाच्या प्रश्ताबहदळ मला राग मुळींच आलेला नाहीं.
उलट याबहल मी तुम्हांला धन्यवादच देतों. कारण प्रामाणिकपणे वागण्याची
आजकालच्या राजवटींत मुळींच सोय उरलेली नाहीं. दाखवावयाचे दांत
निराळे आणि खावयाचे दांत निराळे, अशी' दुटप्पी वागणूक ठेवल्याखेरीज
तुम्हां आम्हां हिंदेना आजला अविधमय झालेल्या कर्नाटकांत तरणोपायच
नाहोंसा झाला आहे. पण आपण मुद्यावर येऊन बोलं. मी हिदू आहे व
स्वाभिमानाचा नंदादीय माझ्या अंतःकरणांत सदेव तेवत आहे, याविषयीं
तुमची खात्री झांठीच असेल. त्याबरोबरच मी चंदासाहेबाच्या विश्वासाला
पाचर आहें याचा पुरावा तुम्हांला पाहिजे असेल तर हा पहा.
2
१
२२६ परऱावाइचं भन्वतर
निहाळलसिंगानें ते दोन खलिते आपल्या कमरपट्टयांतून काढून रतन-
सिंगाला दाखविळे व म्हटले, “ यांतला एक खळ्टिता अकोटिच्या सवाधाळा
यावयाचा आहे, व दुसरा आपल्या राणीला.
“* अपरूपाराणीला ? ली तर केव्हांच आपल्या पातकी गाधीवागाग-
कोयाजी घाटग्यासह उहलोक सोडन गेळी.
“ हो फार आनंदाची वातमी तुम्हीं मळा सांगितळो. त्यामुळे आपला
कार्यभाग आतां पुर्वीच्यापेक्षां पुष्कळच सोपा झाला आहे. पण-मी नुमच्याशीं
विश्वासाने बोलावे ना? ”
“ बोळ. खुद्याळ बोळ. पण अगोदर मळा सांग, त कोण?
““ मी निहालसिंग- मी एक प्रतापसिद्महाराजांचा पिढीजाद स्वार्गिनिष्ठ
सेवक आहें.
“ प्रतापसिहमहाराजांचा जयजयकार असो. आमचे सारे प्रमत्न तरी
त्यांनाच विजयश्रीर्ने वरावें व ही आमची मायभूमि त्यांच्या स्वासित्त्वाखाळी
परदास्यांतून सुकत व्हावी यासाठीं चाळळे आहेत. ”
“आनंदाची गोष्ट आहे. मला तुमच्या हथा पवित्र हेतूची ओळख पुर्थीच माळी
होती म्हणूनच मी मुद्दाम तुमची भेट घेण्यासाठीं बाट पात होतो. माझे
नीट ऐकून घ्या. हिदू आणि मुसलमान यांच्पांलील छा प्ररतुलचा एथळा जगडा
सामोपचारांनीं मिटणे मुळींच शवय नाहीं. गा सगडयांत सावारकर गराठे
जसे प्रतापसिहमहाराजांच्या वतीने घांबन आळ, तसाच अआणकोडचा नंघाचे
चंदासाहेबाच्या बाजूनें एंन वेळीं धांबून येणार जाटे. यासाठी जापण प्रथम-
पासूनच या गिघाडांते पंख कापळे पाटिजेन. सर्गे ना?"
“ अगदीं खर्रे. ”
“या बाबतींत मळा काय करावयारबे चे मी करतान आहे. परंत आणा गग्ही
एवढेंच करावयाचें, अपरूपारगाणी आणि कोयाजी भागे हॉ. नंदासाटेया-
पुरती आणखी कांहीं काळ तरी जिवले ठेवावयाची, च्यांच्या मायी वार्ता
त्याला मुळींच कळू यावयाची नाहीं. एवळ तुम्ही काटे म्हणजे अकॉटि्या
नबाबाची दाणादाण कणी उडवावयायी साची व्यवस्था मी पाहता, दसरी
एक गोष्ट मी तुम्हांला सुचवावयाची म्हणजे मुरारराजे घोरपडे जिचना-
पल्लीवर चाल करून येणार आहेत. ”
निहाळसिंगाचें चातुय २२७
“५७-९४ ४८४ ४.” ४८४ १५./४ ४./१७ ४४८१५ ४५५१५५ ४.५ ७५४ १.” ४५/४१/०९५४ /९/ १.7९.» ४.०४. १८ ९-./
२.४ ४८/१%./४.» ९.५ ४.१९... , १.४४... %./१५ /४./११..५१५-/ ४-/०”
“ ते त्रिचनापल्लीला मीनाक्षीराणीच्या विनवणीवरून तिच्या साह्यार्थ
येणार आहेत
खरे. पण मी तुमच्याशी खाजगी आपुलकोच्या नात्यानें बोलत आहें.
. मीनाक्षीराणी हा लोक सोडून गेली हें तुम्हांला माहीत आहे काय? ”
“ होय. ” । |
“ असो. तेंही आपण चंदासाहेबाशीं बोलतांना विसरून जावयाचें व
वंदासाहेबी भाषेत बोलावयाचे म्हणजे मरारराव येतांना त्याला किल्ल्यांत
घेऊन त्याचा कोंडमारा करावयाचा. ”
“ म्हणजे ? ”
“ वंदासाहेबाचा डाव तसा आहे, व मीनाक्षी राणीकडून त्यानें गफल-
तीने मराररावांच्या नांवानें लिहन घेतलेल्या पत्राचा आशयही तोच आहे
म्राररावांना चंदासाहेबाचा हा दुष्ट कावा कळून चकला आहे. ते येतील ते
अर्थात् समराच्या तयारीनेंच येतील, व किल्ल्यांत प्रविष्ट होतांच त्या नीचाचा
योग्य तो समाचार घेतील. तुम्ही आतां माघारे त्रिचनापल्लीला चाललां
आहां, त्या तुम्हांला ऐन वेळीं मुराररावाविरुद्ध लढण्याची कामगिरी चंदा-
साहेब सांगेळ. ती कामगिरी कशी पार पाडावयाची हें नीट ध्यानीं घेऊन
तुम्हीं वागावें म्हणजे झालें. तुमचा समर इकडे ऐन रंगांत येतो आहे,
तोंच मी तुम्हाला अर्काटच्या नबाबाविषयींची व तंजावरकडची' महत्त्वाची
बातमी काय असेल ती कळविण्याला स्वतःच येईन. मात्र एवढे ध्यानीं ठेवा,
या गनिमी काव्याच्या लढाईत निरनिराळ्या वेळीं निरनिराळ्या बातम्या
विपरीत स्वरूपांत कानीं आल्या तरी घाबरू नका, व गेरसमजाला बळी
पडं नका. बस्स ! झालें माझें काम. आतां मी तुमचा निरोप घेतों. पण
एक सांगावयाचें राहिलें. माझी आणि तुमची भेट मुळीं झालीच नाहीं असें
सांगावयाचें व अपरूपाराणी आणि कोयाजी यांना जिवंत ठेवावयाला विस-
रावयाचें नाहीं.
“तें सर्व ठीक आहे. परंतु अर्काटच्या नबाबाच्या बाबतींत तुझें कृत्रिम
मात्र फलदायी होणार नाहीं.
“कां बरे? ”
“ नबाब चंदासाहेबाच्या बाजूनें मराठ्यांविरुद्ध दास्च उचलील हें शक्यच
२२८ पेशवाईचें मन्वेतर
हि स हि त 000000:00.0..:00.,0..4.0000000000030.3000000000 0 य या क्या "२.१७."
री
-४-/४./१%-४*-/ ४-४ ४.४ ४%.४% 20२ ७ //१. १. पि
नाहीं. कारण एक तर दमलचेरीच्या घाटांतील युद्धांत मराठ्यांनी नबाबाचा
पुरा मोड करून नबाब दोस्तअल्लीला ठारही मारलें, व तेव्हांपासून त्याचा
मलगा सफदरअल्ली' जरी नबाब म्हणून मिरवीत आहे, तरी खरी सत्ता अशी
त्याच्या हातीं मुळींच नाहीं. बरें, चंदासाहेबाचें व सफदरअल्लीचेंही नीट
नाहीं. बाहेरून ते गोडीनें वागतात, परंतु अंतरंगें निराळीं आहेत. नबाबाचा
पुरा मोड होऊन अर्काटचें राज्यदेखील आपल्या घशांत पडावें अशी चंदा-
साहेबाची इच्छा आहे, व सफदरअल्ली आणि त्याचा दिवाण मीर असद
तो कावा ओळखून आहेत. तेव्हां नबाबाकडून चंदासाहेबाला साहाय्य होणें
बाजूलाच राहून उलट मराठ्यांनाच नबाबाचें साहाय्य होईल, अशीं लक्षणें
स्पष्ट दिसत आहेत. नुकतेंच मला खात्रीलायक असें कळळें कौ सफदरअल्ली
_ मराठ्यांशीं तह करण्याच्या खटपटींत असून इतक्यांतच तो तह होईलही
मग. नवाब अर्थातच चंदासाहेबाविरुद्ध मराठ्यांना कुमक करील.”
“ही फार आनंदाची गोष्ट आहे. हें मला माहीत नव्हतें. ”
“ म्हणूनच मीं सांगितलें. नाहीं तर तू चंदासाहेबाचा माणूस म्हणून
तिथे जावयाचा व तुझा जीव तिथें धोक्यांत पडावयाचा. ”
“ते खरें. परंतु तरीही मी या खलित्याचा चंदासाहेबाच्या नाद्याकडे
उपयोग केल्याखेरीज राहणार नाहीं. ”
“तो कसा काय? ”
“ते मी आधीं सांगत नाहीं. योग्य वेळीं तुम्हांला कळेलच. तूर्त समा-
धानाची गोष्ट एवढीच कीं नबाब ज्या अर्थी तंजावरविरुद्ध उठावणी कराव-
याला तयार नाहीं, त्या अर्थी तंजावर ही रणभूमि होणार नाहीं. ”
“ ते अगदीं निविवाद आहे. तें ध्यानीं घेऊन त्रिचनापल्लींतल्या त्रिचना-
पल्लींतच चंदासाहेबाचा जो काय कोंडमारा करतां येईल, तो करण्यासाठीं
सर्वांनी झटलें पाहिजे. मीं रवूजी भोंसल्यांना या वाबतींत माहीतगारीच्या
चुचना काय करावयाच्या त्या जासूद पाठवून केल्याच आहेत. ही वेळ अज्ली
आणीबाणीची आहे कीं आसमंतात् सारे हिंदू राजेरजवाडे व सरदार पाळेगार
या लढ्याच्या परिणामाकडे डोळे लावून आहेत. मराठ्यांच्या हातून चंदा-
साहेबाचा कायमचा नाझ व्हावा व त्या अविधाधमाच्या जाचांतून आपण मुक्त
व्हावे, असें सर्वांनाच वाटतें आहे. त्यासाठी ते मराठ्यांना साहाय्य करण्या-
निहालसिंगाचें चातुर्य २२९
११.८५ “% ८१-४८” “*/" % ८-८४*../५४५--% “९५-०४ %/१५०//५-./४५..५१४./* १४. ४..५९९, “”../४.४१९४४ ४.” ४.८. / ४५ ८ १७०४१५० ९. ८0४६./७%१/४ ४.” ४.५५. 00४” ५०५६४४४४-- ४५.७ 0१५१५५१ 0१ ४ ही क “४-/१४- *.“% “४५/५५/४४५४ ११५४१७७ ७
लाही कमी करणार नाहींत. मात्र त्यांना भेटून त्यांचें साहाय्य मिळविले
थाहिजे. हें कार्य मला उघड उघड करतां येणार नाहीं. पण तें होणें अवश्य
आहे, म्हणून सहज तुला मीं सूचना केली इतकेंच. तृं प्रतापसिह महाराजांना
सांगून अशी कांद्दींतरी युक्ति लढवावयाला सांग. ”
“ बरें आहे. अपण मला इतकी माहिती दिली याबद्दल मी आपला फार
आभारी आहें. तिचा योग्य उपयोग झाल्याचें आपणाला योग्य वेळीं कळून
येईलच.” एवढें सांगून निहालसिंगानें रतनसिगाचा निरोप घेतला.
प्रकरण ३० व
र पू ल्क | डौ
अखेरीपूर्वीच्या घडामो
*०णणणण पकपकििव्ीध्याणाणा
नंणखी सुमारें पन्धरा दिवसपावेतों चंदासाहेब व त्याचे प्रतिस्पर्धी
मराठे यांच्या भावी समराच्या तयारीनें अत्यंत गुप्त पण अत्यंत धडाडीच्या
हालचाली सर्वच सुरू होत्या. जसजसा एकेक दिवस जाऊं लागला तसतशा
मराठ्यांच्या वाढत्या बलाच्या बातम्या चंदासाहेबाच्या कानांवर येऊं लागल्या.
मराठ्याच
रबूजी भोंतळे वगेरे सातार््याहुन मुद्दाम कर्नाटकांतील अपुरी मोहीम पुरी
करून कनटिकाल्या यवनदास्यांतून मुक्त करण्यासाठीं आलेले वीर शिव-
गंगेला झपाट्याने युद्धाची तयारी करीत होतें, व सर्व हिंदु राजेरजवाडे, पाळे-
गार वगेरे मातबर लोकांकडे आपले वकील अथवा प्रतिनिधी पाठवून त्यांना
या धर्मयुद्धांत भाग घेण्याला उद्य्त करीत होते. रतनसिंगानें निहाल-
सिगाला सर्वे हिदूंच्या एकीकरणाची जी योजना बोलून दाखविली, ती त्या-
पूर्वीच आचरणांत आणण्याला मराठ्यांकडून सुरुवात झाली. सच्चिदा-
नंद वेरागी, झुझारराव, मानाजी ही सारी मंडळी कोणी प्रतापसिहमहाराजांचा
तर कोणी मुरारराव घोरपड्यांचा तर कोणी रघजी भोसल्यांचा खलिता
घेऊन एकेक राजा एकेक पाळेगार गांठून मराठ्यांच्या पक्षाची बळकटी
करीत हिंडत होते. ज्या थोर लोकांनीं अद्या प्रतिनिधींची फारशी पर्वा करूं
नवे, तटस्थ वृत्ति स्वीकारावी, त्यांना सच्चिदानंद स्वत: जाऊन भेटत व त्यांना
वर्मयुद्धांत सामील करून घेत. सच्विदानंदांच्या निस्वार्थी प्रयत्नांपुढे व
त्यांच्या दिव्य तपस्तेजापुढें कोणालाही निमूटपणे मान लववावीच लागे.
मानाजी प्रतापसिंहमहाराजांच्या रोषाला पात्र झाला असल्यानें त्याला महा-
राजांच्या अनुज्ञेने कोणतेंच काम करतां येणें शक्य नव्हेते. तरीही माय-
भूमीच्या सेवेरचें ब्रत त्यानें सोडलें नाहीं. तो आपल्या काया--वाचा-मनानें
महाराजांचे अभिष्ट चिंतीत होता. मात्र उघडपणे आपण महाराजांच्या
वतीने चंदासाहेबाशीं टक्कर देण्याची तयारी करूं लागल्यास महाराजांचे आणि
आपले निष्कारण वितुष्ट आल्याचा सर्वत्र फार गवगवा झाल्याकारणाने
अखेरीपूवॉच्या घडामोडी २२३२
न्य
लोक आपल्या शब्दावर विश्वास ठेवणार नाहींत हें ओळखून मानाजीनें
झंझारराव व सच्चिदानंद यांच्या अनुमतीतें शिवगंगेला जाऊत रघूजी भोंस-
ल्यांची भेट घेतली, व त्यांच्या संमतीनें अर्काटच्या नबाबाला सामोपचारांच्या
उपायांनी काबूंत आणण्याची कामगिरी स्वतः पतकरिली-
तथापि या सर्वे खटपटी व हालचाली मराठ्यांच्या हातखंडा होऊन बस
लेल्या गनिमी काव्याच्या पद्धतीनेच चालल्या होत्या. उदाहरणार्थे रतनसिंग
जो अपरूपाराणीला साहाय्य करूं म्हणून आला त्यानें चंदासाहेबाळा आपली
कामगिरी सांगितली ती अशी : “आपण अपख्पाराणीचा पाठपुरावा केला,
त्यामूळे करणाराणी व तिचे साथीदार यांच्यावर राणी अचानक छापा घालू
शकली. करुणाराणी आपली आतां धडगत ताहीं असे पाहून अपरूपा-
राणीला शरण आली. तिच्या बाकीच्या साहाय्यकाऱ्यांना लढाईत मोक्ष
मिळाला. आम्हीं मीनाक्षीराणी व मोहना यांचें गूप्त वास्तव्यस्थात हुडकून
काढून तेथें छापा घातला. त्या छाप्यांत मीनाक्षीराणी आमच्याशीं लढतां
लढतां धारातीर्थी पतन पावली व मोहनेनें आपली पुढील विटंबना टाळण्या-
साठीं अग्निकाष्ठे भक्षण केलीं.” एवढी फत्ते करून रतनसिंग आला. मग
त्याज्यावर चंदासाहेबाचा विश्वास कसा बसणार नाहीं व तो चंदासाहेबाच्या
प्रीतीला पात्र कसा ठरणार नाहीं ? चंदासाहेबानें खष होऊन रतनसिगाची
आपल्या मुख्य सेनापतीच्या जागीं योजना केली व मुरारराव घोरपडे फसून
मीनाक्षीराणीच्या रक्षणार्थ येतांच त्याचा कोंडमारा करण्याची कामगिरीही
त्यालाच सांगितली. अर्थात् मीनाक्षीराणी अद्याय ह्यात आहे व ती वरिचना-
पल्लीच्या किल्ल्यांतच बंदिवासांत आहे अशी आगाऊ हाकाटी पिटण्याला
चंदासाहेबानें कमी केलें नाहीं व रतनसिंगालाही तसेंच करावयाला सांगितले.
हेतु हा कीं मुरारराव घोरपड्याची दिज्याभूल व्हावी, त्यानें मीनाक्षीराणीला
साहाय्य करण्याच्या मिषाने येऊन फंसावें
पण मुरारराव घोरपडेही कांहीं कमी चतुर नव्हते. ते चांगले शेराला
सव्वा शेंर होते. त्यांना वस्तुतः मीताक्षीराणीच्या आत्महत्येची वार्ता
अगोदरच कळली होती व मोहनेनेंही त्यापूर्वीच मीताक्षीच्या पत्राचा अर्थे
त्यांना नीट समजावून सांगितला होता. तें सर्वे ध्यानी घेऊतच त्यांनीं
आपलें पुढील गनिमी काव्याचे धोरण रघूजी भोंसल्यांच्या सल्ल्याने अगदीं
ाच्टा
२३२ पेशवाईचे मन्वंतर
बेंमाळूम नांषेदे तते ते मीनाक्षीच्या साहार््यार्थ गद्यात ठे विच्नापल्डीकडे
यावयाला निघाले, तेव्हां ही आपली भेट खाजगी प्यस्पाचा जाह, व आपण
राणीच्या भवितव्याविषयीं सामोपचाराच्या ताटाघाडा करण्याला अभतया
दिवशीं येत आहों असेंही त्यांनीं चंदासाहेबात्हा वळविले. च
निहाळलसिगाबरोबर एक जासूद अकाटल्या नवायाला दासाठ्याचा
खलिता घेऊन गेला होता,त्या खलित्याचे उत्तरी थोज्यान 0:
दहाबारा दिवसांनीं चंदासाहेबाला मिळाल. _ "पाथ नवाब शी > टन
चंदासाहेबाच्या मर्जीम्रमाणें तंजावरला वेळा देऊन तेथून प्रतापसिटट महारा-
जांची सत्ता खणून काढण्याच्या कामीं कोयाजी प दाता धरणा
ण्याचे कबूल केलें होते,व त्याखेरीज जिवचनापलडीळाही सेव्याची जा! ग छत्यार
व दार्गोळ्याची मदत करण्याचें कवूळ वेळे होते. त्या खळिऱ्यांल निटाल-
सिगाची ओतप्रोत स्तुति नबाबाकडून करण्यांत आला होली व स्वा: निठाळ-
सिगच तो खलिता घेऊन माघारा आला होता.
"एकूण तूंदेखील माझ्या मलुप्याबरोबर जे हॉटळा गेळा होतासवर !"
चेंदासाहेबानें संतोषपुर्वक निहाळसिंगाळा थिनारिठे. |
निहाळलसिंग उत्तरला, “ सरकार, बायल जा मज्पाथर कपा भयंगार
प्रसंग गुदरला ! मीनाक्षीराणीच्या ळोकांनी जगण्यावर भे पाचवा पसा
केला. त्या हल्ल्यांत माझा जोडीदार ठार मारळा गेळा ब मागी या धुळ्याचे
मार खावा लागला. तरी पण मीं चतुराईने माह्या जोदीदा राक सित
काढून घेतळे व आपल्या आज्ञेप्रमाणे कायगिरी प [र पाठ."
“ नबाब या उत्तरांत तुझी फारच जाखाणणी करनाथ. ”
“तो नबाबांचा थोरपणा आहे त्यापेक्षां त्यांत कांहीच नाही. वाा-
णणी करण्याजोगी अश्ली कोणती कामगिरी माझ्या दोतून झाटा आओ?"
“तरी पण नबाब उगाच तुझी वालाणणी करावयाचे नाहीत. " बाळतां
बोलतां चंदासाहेबाला वाटलें कीं ज्या अर्थी निहार संग टॉ. अपसपाराणोच्या
पदरचा सेवक, त्या अर्थी त्याला लंजावरकडीळ सय मादिली असली पाहिजे.
असा माहितगार व चतुर मनुष्य आपल्या पदरीं असावा असे त्याला बाटले
च तो निहालसिंगाला म्हणाला, “ हं पहा निद्ठाळसिग, तू. माझ्या पदरी स्ट्टा-
वयाला तयार आहेस का? ”
अखेरीपूर्वीच्या घडामोडी २३३
>“
“४८ ८० ८१% / ४५ //४- १.
“0४-५४ > 79 “0 “ ४५.0५ 200५” ४ ८५५. ९ “५ » ७४0 लाच
“ माझ्या धनिणीच्या परवानगीखेरीज तिची नोकरी सोडून मला आपल्या
पदरीं कसें राहतां येईल सरकार ! हां ! एवढे मात्र आहे, तूर्त सध्यांच्या
बखेड्यांचा शेवट होईतो आपणाला जरूर ती माहिती देण्यासाठीं अपरूपा-
राणीसाहेबांनीं मळा आपल्या पदरीं रहावयाला सांगितळें आहे. ”
“तोंवर तरी तूं इथें आहेस ना?”
"होये
र मस कांहीं हरकत नाहीं. त्यानंतर मीं राणीसाहेबांना तुमच्याविषयी
काय सांगावयाचें तें सांगून तुझें जन्माचे कल्याण करून सोडीन. ”
“ आपला संतोष हेंच माझें कल्याण होय सरकार ! ” निठाळसिंग म्हणाला.
त्याच्या मनांतून कांहीं तरी काळ त्रिचनापल्लीच्या किल्ल्पांत चंदासाहेबाच्या
एकूण एक गुप्त हळचालीवर नजर ठेवण्यासाठीं ब ती माहिती त्याच्या शत्रूंना
चेळच्या वेळीं कळविण्यासाठी तेथें रहावयाचेंच होते. तो मनांत म्हणाळा,
“ याला म्हणतात नशीब. आंधळा मागतो एक डोळा तर देव देतो दोन. "
येथें अर्थात् वाचकांना गूढ पडलें असेल कीं अकरटच्या नवावाचा सहानु-
भूतीचा खलिता चंदासाहेबाला येऊं शकला तो कसा?
तें असें झालें कौ, निहाळसिंग चंदासाहेबाचा खलिता घेऊन अर्काटला
जाऊन पोहोचला, त्यापुर्वींच रघूजी भोंसळे व मुरारराव घोरपडे यांच्या
संमतीर्ने व नबाबानें तह करण्याची इच्छा आगाऊ प्रदर्शित केल्यावरून भानाजी
तें तहारचें काम पुरें करण्यासाठीं मराठ्यांचा वकोळ या नात्यानें तेथे जाऊन
पोंहोचला होता. नबाब सफदरअल्लीनें मानाजीला सामोरा जाऊन त्याला
सन्मानपु्वेके राजधानींत आणून त्याला आपल्या अनेक राजवाड्यांपेकीं
एका राजवाड्यांत ठेवून घेतलें होते. निहाळसिंग राजधानोंत जाऊन पोरठॉ-
चचतो तोंच त्याला मानाजी तेथें आल्याची वार्ता वाळली. त्याबरोबर निटाल-
सिंग मानाजीला भेटण्यासाठी प्रथम तिकडेच गेळा.
निहाळलसिंग नांवाचा सरदार भेटीला आला आठे असें मानाजीळा सेबकानें
जाऊन सांगतांच मानाजी प्रयम बुचकळ्यांत पडला. परलु त्या दोघांची
भेट होतांच निहालसिगानें संशयनिवत्ति केली. मानाजीनें त् कोण कोठला
"असे निहालसिंगाला विचारतांच निहाळलसिंगानें न डगमगता उत्तर दिले,
“मोहना आपल्या माहितीची असेल. मीनाक्षीराणीसाहेबांची ती राहवरी
२३४ पेशवाईचें मन्वंतर
होती. राणीसाहेबांनीं आत्महत्या केल्यावर मोहूना भटकतां भटकतां अचा-
नक शत्रूच्या गराड्यांत सांपडली. तेव्हां मी तिच्याबरोबर होतों. मो
तिचा धाकटा भाऊ आहे. निहालसिंग माझे नांव. शत्रूच्या तावडींतून जिवंत
सुटण्याची आशा नाहीं व वेळीं शत्रूने जीवदान दिलें तरी विटंबना आपल्या
वांट्याला येणार हें ध्यानीं घेऊन मोहनेनें स्वतःच्या अब्रच्या रक्षणासाठीं मर-
णाची इच्छा दर्शविली व मलाही तेव्हां अन्य तरणोपाय कांहींच दिसत नसल्यानें
मीं तिच्या इच्छेला मान्यता दिली. तिनें आपलें शीर धडावेगळे करायला
मला सांगितलें द मलाही तिच्या जीवितापेक्षां तिच्या अब्रूचें जास्त मोल वाट-
ल्यामुळें मीं डोळ्यांवर कांतडें ओढून तिळा इहलोकांतील जाचापासून आणि
शत्रूच्या मगरमिठींतून सोडविले. त्याच वेळीं मीं मोहूनेला वचन दिलें
आहे, त्या वचनाअन्वर्ये तिचे जीवितकार्य तिच्याइतक्याच निष्ठेने तडीला
न्यावयाला मी बांधलेला आहें. त्या वचनानुसार मी तेव्हांपासून वागत आहें;
त्यामुळें मी चंदासाहेबाचा बराच विश्वास संपादन करूं शकलो आहें. आप-
णाला जरी या वेळीं कदाचित् माझी ओळख पटली नाहीं, तरी आपल्या अन-
मतीने करुणाराणी सध्यां शिवगंगेला रघूजी भोंसल्यांच्या आश्रयाला गेली
आहे, ती मला पूर्णपणें ओळखते. राणींलाही मी माझ्या वडीळ बहिणीच्या
ठायीं मानतो. ती आपणाला भेटेल तेव्हां आपली खात्री होईलच. परंतु
तूते आपली याहून खात्री पटावयाला पाहिजे असेळ तर... ” असें म्हणून
निहालसिगानें एक मुद्रिका आपल्या डाव्या हाताच्या बोटांतून काढून मानाजीला
दाखविली. ती करुणाराणीची मुद्रिका असल्याबद्दल मानाजीची
खात्री झाली व तो निहालसिंगाशीं विश्वासाने पुढील बेतांबहल वाटाघाटी
करण्याला तयार झाला
हा खलिता मीं चंदासाहेबांकडन तवाबाला मिळवन आणिला आहे. ”
निहालसिंग तो खलिता आपण आपल्या जोडीदाराला ठार करून कसा हस्त-
गत केला वगेरे वृत्तांत सांगून पुढें म्हणाला, “ तेव्हां मळा आपण
हे राजकारण एथवर रंगाला आणल्याचें माहीत नव्हतें. माझा मानस
नबाबाकडून चंदासाहेबाच्या नांवावर कूमक मिळवून ती नेमकी मराठ्यांच्या
गोटांत नेऊन सोडण्याचा होता. तोंच माझी व रतनसिंगाची भेट झाली व
यात मजपाशी सर्व खुलासा केला. आतां अर्थात् या खलित्य़ाचा तादुश कांहीं
अखेरीपूर्वीच्या घडामोडी २३५
उपयोग नाहीं हें खरें. तथापि अद्यापही चंदासाहेबाला झुलवून तोंडघशी
पाडण्याच्या कामीं यांचा उपयोग होण्याजोगा आहे. ”
“ तो कसा काय ? ” मानाजीनें प्रश्न केला.
“तो असा. मीं माझा खरा पुूर्वतिहास आपणाला सांगितला तो आपण
विसरून जावयाचा, व मी आपल्या सेनिकांच्या हस्ते या राजधानींत हिंडत
असतांना पकडला गेलों आहे असें समजावयाचे. अर्थात् हा मजजवळचा
खलिता आपल्या हातीं लागल्यावर आपणाला नबाबाच्या हेतूविपयीं शंका
घेण्याला पुरेसे कारण आहे. आपण जर या खलित्याच्या आधारें नबाब आंतून
चंदासाहेबाला फितुर असल्याचा आरोप नबाबावर केला, तर त्याची नाशा-
बिती नबाबाला करतां यावयाची नाहीं. ती शावितीं करून घेण्याच्या सबबीवर
आपण या खलित्याला अनुकूल असें चंदासाहेबाच्या नांवचें उत्तर मिळवून तें
त्याच्याकडे रवाना करण्याचा बहाणा करा. तेवढें उत्तर माझ्या हातीं पडलें
कों मी पुढचें सारें पाहतो. ”
मानाजी अर्काटला गेल्यापासून उभयपक्षी व्हावयाच्य़ा त्या सार्या वाटा-
घाटी होऊन भराठे व नबाब यांच्यामधील तहनाम्याचा मसुदाही मुक्रर झाला
होता व त्याच दिवशीं दोनप्रहरीं त्या तहूताम्यावर त्या उभय पक्षांच्या सह्या
होऊन दोघांची मेत्री व्हावयाची होती. * तो तहनामा लिहुन देण्यांत नबाब
सफदरअल्ली मराठ्यांना एक प्रकारें बिनशते शरणचिठीच लिहून देत होता.
१-० --५००->-----
* मराठे व अकाटिचा नबाब सफदरअल्ली आणि सुभेदार मीर असद यांच्यांत
ता. १६--११-१७४० रोजीं हा तह पुढीलप्रमाणें झाला :- तहनामा
ब मारफत आजम मीर आसद उल्लाखान सुभेदार ताळके अर्काट व त्रिचना-
पल्ली वगेरे. छळू रमजान सुरू सन इहिंदे आबेन मया व अलफ.
बंदोबस्त ताळुका अर्काट वगैरे तुमचे मुहेमाफक करूं......... कलम १
कर्नाटकर्चे कासकाज जें करणें तें तुमच्या इतल्ल्याखेरीज न करूं....कळम १
त्रिचनापल्लीचा मजकूर आम्ही फोजेनिशीं आलियावरी तुम्हीं भारी
फोजेनिशीं सामील व्हावें. दोघांचे तरतुदीनें जागा घ्यावी व आणीकही पाळेगार
सामील करून घ्यावे. आणीक फत्ते जालियावर किल्ल्यांतील मालमवेसी
पेका असेल तो आम्हीं घेऊन खालीं किल्ला तुमचे हवाला करूं. ताळक्याचे
किल्ले व बंदर व मुलुख जो असेल तो तुमचे हवाला करूं. चंदाखान वगैरे
जे सरदार सांपडतील त्यांजपासून खंडपैका घेऊन त्यांपैकीं तिजाई तुमचे फौजेस
देऊन दोन तकसिमा सरकारांत घेऊं आणि त्यांस तुमचे जिमे देऊं....कलम ९
न पेशवाईचे मन्वंतर
याप्रमाणें आपल्या हातांतील कळसूत्री बाहुले बनलेला नबाब चंदासाहे-
बाचा आपल्या वाटेतील कांटा दूर करण्यासाठीं चंदासाहेबाची दिशाभूल
करणारा खलिता लिहून द्यावयाला कां क् करणार नाहीं अशी मानाजीची
अटकळ होती. तीच शेवटीं खरी ठरली. दोनप्रहरीं मानाजीनें निहाल-
सिंगाच्या शिकवणीप्रमाणें नबाबाच्या भेटीला गेल्या वेळीं तहनाम्याचा
विचार करतांना चांगळेंच आकाण्डतांडव केलें, तें पाहून नबाब सफदरअल्ली
व त्याचा दिवाण मीर असद हे दोघही अगदीं घाबरून गेळे. त्यांनीं आपल्या
परीनें आपली निर्दीाषता सिद्ध करण्याची पराकाष्ठा केली. पण त्यांचें
कांहींच ऐकून घ्यावयाचे नाहीं असा आगाऊ निर्धार करून तेथें गेलेल्या माना-
जीला त्याचें काय होय ?
अखेर होय नाहीं करतां करतां मानाजीनें हळूच निहालसिंगप्रणीत उपाय
सफदरअल्ली व मीर असद यांना सुचविला. इतकें मराठ्यांच्या ताटाखालचें
मांजर होऊन राहणें जरी त्या दोघांनाही अपमानास्पद वाटलें, परी स्वतःचे
राज्य टिकविण्यासाठी व सर्वेनाश टाळण्यासाठी त्यांना मानाजीच्या सूचने-
चंदाखान वगेरे लाखों रुपये देतील तरी गोष्टीवर मन न द्यावे. करारा-
प्रमाणें त्रिचनापल्ली वगेरेचा बंदोबस्त करून तुम्हास द्यावें ...... कलम १
तुमच्या-आमच्या दरम्यान चंदाखान व ताकी ( महमदखान ) वगेरे
बोलीस पुढे जाबसाळास कोणीं नसावें. आपले विरुद्ध मोंगळ गनिम पाळेगार
असतील त्यांस तंबी पोंचवावी. .... ी, .... केळम १
करारबाब जाहला असेल त्याबद्दल येथें मुक्रर केली आहे. त्याबद्दल मीर
आसद यास रवाना केलें असे. त्याबरोबर एक माणूस मातबर पाट-
वावा. जो करार जाला असेल त्यास दरम्यान बेलभंडार, महादेव, श्री-
व्यंकटेश व खंडेराव, विठोबा, श्रीभवानी, पीर दस्तगीर दरम्यान असे.
त्यांस बोली लावून त्यांत तफावत पडणार नाहीं. दरम्यान देव असे .... कलम १
मीर आसद उल्ला अगर ह्र कोणी तुम्हांकडील मातबर कामकाजाबद्दल
येईल त्यास जबाबसालळ करून बिदागी करावी. आवकाश न करावा. शिर
पांव बहुमान देऊन रुकसत लावावें. ..... ... ..... .... कळस ९
तुम्ही आम्ही एक होऊन आणीक स्थळें जीं असतील तेथें जो पैका साधेल
त्याचा हिस्सा तिजाई तुम्हांस देऊं ....... ...... ..... .... केलम १
येकूण कलमें ८. येणेंप्रमाणें करारबाब जाहळा असे. सदरहू प्रमाणें
चालावे. दरम्यान तजावत तफावत करूं नये. छ. मजकूर.
अखेरीपूर्वीच्या घडामोडी २२३७
बरहुकम चंदासाहेबाच्या नांवाचा फेरखलिता लिहून त्याच्या स्वाधीन करणे भाग
पडलें. तोखलिता हातीं पडल्यावर मगच मानाजीनें तहनाम्यावर सही केली !
तो खलिता घेऊन निहालसिग तडक त्रिचनापल्लीच्या किल्ल्यांत आला.
त्याच खलित्यानें चंदासाहेबापाशीं निहालसिगाची मानमान्यता कमालीची
वाढवून त्याला चंदासाहेबाच्या नाकांतळा बाल बनवून सोडलें. त्या मान-
भादी खलित्यांत तबाबानें तंजावरला वेढा देऊन प्रतापसिहमहाराजांचें पारि-
पत्य करण्याचें कबूल करून शिवाय त्याला त्रिचनापल्लीकडे कुमक करण्याचेंद्दी
कबूल केलें होतें, व त्या भरंवश्यावर चंदासाहेब मारे शेफारून गेला होता,
“ नबाब व सी एक झाल्यावर आतां हे मराठे-हे सह्याद्रींतले पाजवे उंदीर
म्हणजे कुठच्या झाडाचा पाला ! मुरारराव घोरपड्याला म्हणावें, मूर्खा,
भोळसटा, मीनाक्षीराणीच्या बनावट पत्रावरून फंसून त् भगितीप्रेमानें विर-
घळलेल्या चित्ताने एकदां ये तर खरा ! कीं तुला घद्यांत टाकून चावण्याचे-
देखील श्रम न घेतां गिळून बसतों. तिकडे सफदरअल्ली आणि मीर असद
तंजावरला वेढा देऊन त्या प्रतापसिहाचा आणि त्याच्या साहाय्याला मारे
शेफारून धांवून आलेल्या रघूजी भोसल्याचा खुर्दा करीतच आहेत. मरा-
ठ्यांना हिदवी-साम्माज्याचा पसारा कर्नाटकांत देखील वाढवावयाला पाहिजे
आहे नाहीं काय ? ठीक आहे. या चंदासाहेबाशीं गांठ आहे म्हणावें... !
त्या दिवसापासून चंदासाहेबाच्या डोळ्यांवर भावी विजयाची धुंदी आगा-
ऊच इतको चढली कीं त्याला ध्यानीं-मनीं-स्वप्नीं विजयोन्मादाखेरीज
कांहींच सुचेना. त्या स्वप्तांत त्याला काय दिसलें नाहीं ? त्याला तो स्वतः
संयुक्त कर्नाटकाच्या-तंजावर, त्रिचनापल्ली, अर्काट वगेरे सर्वे हिदु-मुसल-
मान राज्यें ज्यांत कोणत्या ना कोणत्या स्वरूपार्ने विलीन झालीं आहेत अश्या
कर्नाटक साम्माज्याच्या सिंहासनावर सम्मराट म्हणून विराजमान झालेला
दिसला. श्रीरंग व अशींच महत्त्वाची जीं जीं देवालयें कर्नाटकांत होतीं,
तेथें तेथें मशिदी उभारलेल्या त्याला दिसल्या; मोठमोठ्या हिंदू राजांच्या
राण्या त्यांचे पति ठार झाल्यावर स्वखुषीने मुसलमानी धर्म स्वीकारून आपल्या
बेगमा झाल्या आहेत असलीं खुनशी व हिडीस दृश्येंही त्याला दिसलीं. पण
हा सारा आपल्या उन्मत्तपणाचा काल्पनिक खेळ म्हूणजे निव्वळ पाण्यावरचा
बुडबुडा आहे, हें त्याला काय माहीत !
२३८ _) पेशवाईचे मन्वंतर
पळा वाध म हा हय ६-८ ४८ ५८ ४-५ १-८ १८८ ४७” १८५ ४.५ १५ १५८५ १. ७-४ ७८ ९८० ४. ९.० ४.० ७.० ९.७४ ७. १.५ ७.० १.० ४,” ५.५ ५.५ ६. ४.५ ५.» ० ९.० ९. ५५-०४. ४.०० ५७% ५१५७० ५.०० ४.०
या
या काल्पनिक विजयोत्मादांत चंदासाहेब धृंद असतां व त्याची धुंदी उतर
नये अक्षी खबरदारी निहालसिंग अक्षय त्याच्या सन्निध राहून घेत असतां
मरारराव घोरपडे ससन्य वत्रिचनापल्लीच्या किल्ल्याबाहेर येऊन थडकले
त्यांना किल्ल्यांत घेऊन कोंडावयारचें असा पूर्वेसंकेत चंदासाहेबारने ठरविल्या-
मळे किल्ल्याच्याबाहेर शत्रूच्या कोंडमाऱ्याची जय्यत तयारी करून सावध
असलेल्या रतनसिंगानें त्यांच्याशीं सामना दिला नाहीं हें ओघानेंच घडून आलें
पण मरारराव कसले वस्ताद! गनीमी काव्याने लढाई खेळून हशत्रला जरीला
आणण्यांत निर्ढावलेले मदे मराठेते ! शिवाय सेनापति रतनसिंग जो चंदासाहे'
बार्ने किल्ल्याच्या बंदोवस्तासाठीं नेमिला होता, तो तर बोलून चालून मुरार-
रावांचाच मनुष्य ! रतनसिंगानें मुराररावाला सामोरा गेल्या वेळीं गुप्त-
पणे त्यांना कानमंत्र दिला, “ चंदासाहेब हा अगदीं उरफाट्या काळजाचा
मनष्य असल्यानें आंत किल्ल्यांत-त्या वाघाच्या पिजर्यांत जाऊन त्याच्या-
शीं झगडण्याचें धाडस करणें उचित नाहों. त्यापेक्षां तुम्हीं किल्ल्याला वेढा
घाळून हळूहळू मुंगीळादेखील आंत रीघ नाहों अशी चोफेर बेमाटूम नावे.बंदी
करून आंतल्या आंत शात्रूचा कोंडमारा करा.
प्रकरण ३९ वें
भगवा झंडा फडकला
पय मनन
क दिवस गेला, दोन दिवस गेले, तीन दिवस गेळे, चंदासाहेब मुरारराव
घोरपडे किल्ल्यांत प्रविष्ट होतात केव्हां. व आपण त्याला दग्यानें
यमसदनाला पाठवितों केव्हां याची वाट पहात बसला होता. पण मुरारराव
कांहीं केल्या आंत पाऊळ टाकीनात-.
हें प्रकरण आहे तरी काय याची चौकशी करण्यासाठीं चंदासाहेबानें एके
दिवद्षलीं रतनसिंगाला एकान्तांत बोलावून विचारिलें, ' मुरारराव किल्ल्यांत
येत नाहीं, हा काय प्रकार आहे? ”
“ तो सरळ वृत्तीचा माणूस दिसत नाहीं सरकार! तो दिवसेंदिवस किल्ल्या-
सभोंवारचा वेढा तंग करीत आहे, यावरून त्याचा विचार कांहीं तरी दगा-
फटका करण्याचा दिसतो.” रतनसिंगातें साळसूदपणे उत्तर दिलें. “मला
वाटतें कों आपण इतके दिवस स्वस्थ बसलो हीच चूक झाली.
“ त्याला आपला बेत कळला काय? ”.
“ कोण जाणें! कदाचित कळलाही असेल. किवा मूळपासूनच आपल्या
डावाला प्रतिडाव खेळण्याच्या तयारीने तो आला असेल.”
“* मग आतां याला काय उपाय? ”
“ आपणच आतां उपाय काय तो सुचवावा. ”
चंदासाहेबाचा विश्वासू सेवक निहालसिंग जवळ उभा होता. तो रतन-
सिगाकडे पहात म्हणाला, “ मला वाटतें, मीनाक्षीराणीच्या वतीने त्याच्याशीं
कांहीं तरी संकेत ठरवून त्याला आंत घ्यावें. मीनाक्षीराणी निजधामाला
गेली हें जर त्याला कळलें नसेल तर तो फसून आपल्या जाळ्यांत अडक-
ण्याचा संभव आहे. ”
“ पण मीनाक्षीराणी निजधामाला गेली हें त्याला अगोदरच माहीत झालें
असल्यास तसा निरोप घेऊन जाणार्या जासुदालाच तो दगलबाज समजून
निजधामाला पाठवील. हें सतीचें वाण कोणीं पतकरावें हा प्रश्न आहे. ”
रतनसिंग निहालसिंगाकडे व लगेच चंदासाहेबाकडे पाहून म्हणाला.
पेशवाईचे मन्वंतर
7९.४ ६.५१६. / ९.४%-४-/१५ २” ७ ७.४१ ४४.४७.» ७» ७ ९. ४ / ७ ८१.७५ “0४-८५ १.५९ /९.,४१९.५०१६.४१../४_/१५_/ ./7 ./. “0१-८४
२४०
०“ €
८४१४-४४ ५-४१-/४११॥
“ आपला निहालसिंग तेवढे काम करील. त्याच्याइतका लायक इसम
हें जबाबदारीचें काम पार पाडण्याला मला तरी दुसरा दिसत नाहीं.” चंदा-
साहेव म्हणाला-
“ सरकारच्या आज्ञेचे उल्लंघन करावयाचें नाहीं आणि स्वामीकार्यांत
अंतराय पडूं द्यावयाचा नाहीं म्हणून मी तेवढेंही करीन. सरकारांची आज्ञा
व्हावी.” निहालसिंग निर्भयपणे उत्तरला.
“ एवढ्यानें फंसून मुरारराव आहारीं आला तर कामच झालें. पण
तो जर आहारीं आला नाहीं, तर मात्र आपण त्याच्यावर एकदम हल्ला करून
त्याचा नायनाट केला पाहिजे. ” चंदासाहेब म्हणाला.
निहालसिंगानें एवढ्या मुदतींत किल्ल्यांत जितक्या प्रकारें अंदाधुंदी माज-
वितां येईल व नादुरूस्ती करतां येईल, तितक्या प्रकारें करून ठेविलीच होती;
व किल्ल्यांतील मारगिरीच्या जागांचा अवूक अंदाज मुरारराव व रघूजी भोंसले
वगेरे इतर मंडळी यांना देण्यासाठीं त्याला आतां बाहेर जाणें अवव्य होतें. तें
चोरून जाण्यापेक्षां अश्या राजरोस रीतीनें जाणेंच त्याला श्रेयस्कर दिसत होतें
लगेच त्याच दिवशीं मीनाक्षीराणीचा गुप्त संदेश कळविण्यासाठीं म्हणून
निहालसिंग किल्ल्याबाहेर मुराररावाच्या गोटांत गेला. रतनसिंग व चंदा-
साहेब यांनीं सूर्यास्तापावेतों त्याच्या परत येण्याची वाट पहावयाची व तो परत
न आल्यास एकदम लढाईला सुरुवात करावयाची असा संकेत ठरला होता.
त्याप्रमाणें सर्यास्तापावेतोंच काय पण पुढें दोन घटकांपावेतों निहालसिंगाची वाट
चंदासाहेबानें पाहिली व तो माघारा आला नाहीं असें पहातांच त्यानें रतन-
सिंगाला एकदम मध्यरात्री मुराररावाच्या छावणीवर तुटून पडण्याचा
हुकूम दिला.
रतनसिंगाने मध्यरात्रीला एकदम मुराररावाच्या छावणीवर छापा घातला.
पण मुराररावाशीं त्यापुर्वीच त्याचें संगनमत झालें असल्यानें उभयतांची ती
लुटूपुटीची लढाई दुसर्या दिवशीं सूर्यास्तापावेतों चाळली व सूर्यास्ताला
रतनसिंग शत्रूच्या हातीं केद झाल्याची दुःखद वार्ता चंदासाहेबाच्या कर्ण-
पथावर येऊन आदळली. |
तेव्हां मात्र चंदासाहेवब ओळखून चुकला कीं हा दुखावलेला सर्प आपला
दावा धरून आपणांला डसण्याला आतां कमी करणार नाहीं, आतां चांगलेच
भगवा झेंडा फडकला २४१
रण उभय पक्षी जृंपणार. त्याबरोबर त्यानें प्रथम रातोरात आपल्या कौट-
बियांना गुप्त वेषाने पांडिचरीकडे फरेंचांच्या आश्रयाला पाठवून दिलें, मदुरेला
त्याचा वडील भाऊ बडासाहेब होता त्याला आपल्या कुमकेला येण्यासाठी
तांतडीनें बोलावणें पाठविलें व आपल्या सेन्याचें नेतृत्व स्वत: आणि स्वत:चा
. वडील मुलगा यांनीं पतकरून धडाडीनें लढाई सुरू केली. त्याला अजूनही
आका होती कीं नबाब आपणाला साहाय्य करील, अपरूपाराणी व कोयाजी
मदतीला धांवून येतील, व शिवाय जवळपासच्या सर्व मांडलिकांनाही त्यानें
मराठ्यांविरुद्ध ळढण्याला आव्हान केलें. पण इकडून मदत येईल, तिकडून
मदत येईल असा तो सारा मायेचा बाजार रतनसिंग,मराठे व मुख्यत: निहाल-
सिंग यांनीं चंदासाहेबाची दिशाभूल करण्यासाठीं उभारलेला होता. तो
ऐन वेळीं कसचा कामीं येतो ! त्यांतूनही कांहीं मांडलिक चंदासाहेबाच्या
हांकेला धांवून आळे खरे. पण ते लढतां लढतां बाह्यात्कारी पराभूत होऊन
मराठ्यांत सामील झाले.
यानंतरचे त्या खडाजंगीच्या लढाईचे वर्णन इतिहासाच्या साक्षीने कांटेकोर-
पर्णे निवेदन करावयाचें तर “.... तंजावरचे सैन्यही मराठ्यांच्या मदतीला
येऊन सर्वे संयुक्त सेन्यानें त्रिचनापल्लीला वेढा दिला. त्रिचनापल्ली हें प्राचीन
महत्त्वाचे ठिकाण चंदासाहेबाच्या हातीं राहुं नये म्हणून सर्वे हिंदु सेन्यानें
या वेळीं मोठ्या वीरश्रीला चढून निकराचें युद्ध केलें. चंदासाहेब त्रिचना-
पल्लीच्या बळकट किल्ल्याचा आश्रय धरून मोठ्या हिय्यानें लढत होता.
परंतु मराठ्यांनी सर्वे बाजूंनीं पुरा कोंडमारा केल्यामुळें किल्ल्यांतील सामुग्री
लवकरच संपत आली, त्यामुळें चंदासाहेबाला मराठ्यांशी टक्कर देणें अदक्य
होऊन बसलें. त्यानें अखेर आप्त-स्वकीयांच्या मदतीबद्दल व स्वतःच्या
हिमतीबद्दल निराश होऊन मराठ्यांशीं किल्ला स्वाधीन करण्याबद्दल बोलणें
सुरू केलें. त्याच सुसारालो अगदीं आणीबाणीच्या वेळीं मदुरेहन बडासाहेब
आपल्या सेन्यानिशीं साहाय्यार्थ धावून आळा. परंतु तो त्रिचनापल्लीला
येऊन पोंहोचण्यापूर्वीच मराठ्यांनी अर्ध्या वाटेत त्याला गांठून त्याच्यावर
तुटून पडून त्याला ठार केलें. अशा रीतीर्ने चंदासाहेबाला चोहों बाजूंनी निराश
झाल्यावर च्रिचनापल्लीचा किल्ला मराठ्यांच्या स्वाधीन करावा लागला.” *
_ * इतिहाससंग्रह-तंजावरचे घराणे. _1_1र्र्11001100
१६
२४२ पेरवाइर्चे मन्वेतर
याप्रमाणें चंदासाहेबाचा डाव त्याच्यावरच उलटून पडला. त्याळा उतके
दिवस जीं सुखस्वप्नें पडत असत तीं सारी अगदी उलट्या घटनेने त्याच्या
अनुभवाला आलीं. त्यानें साऱ्या कनटिकारचे साम्राज्य स्वत:च्या हकमतीत
आणण्याचे बाजूलाच राहिले, उलट त्याला स्वतःला स्वतंत्रपणे घटकाभर
तरी वास्तव्य जेथे करतां येईल अशी पाऊलभर देखील सततची अशी जागा
बिचाऱ्याला उरली नाहीं. उतका आपला अचूक पराजय कसा झाला £ गूढ
मात्र चंदासाहेबाला अखेरपावेती उलगडलं नाही. गोप्ट खरी की विळ््यां-
तील त्याचे लोक मराठ्यांना फितुर झाळे, किल्ल्यांत मराठे गुप्त चोरवाटांनी
माहीतगारांप्रमार्णे आंत घुसले, मराठ्यांकडून किल्ल्याबाहेर्न तोफांची व
बंदुकांची सरबत्ती होतांच अग्निवर्षाब नेमका जनसमूहावर ब दारूच्या
कोठारांवर होऊं लागला, पण हें सारे निहोळलसिगाच्या रोषाचे पाळ होय असें
कांहीं चंदासाहेबाच्या अथवा कोणाच्याच ध्यानीं आळे नाहो.
मात्र अखेर किल्ला मराठ्यांच्या स्वाधीन झाल्यावर रामस्वार्मि 9 मरा-
ठ्यांचा प्रतिनिधि म्हणून चंदासाहेबाला बेंदिवासांत लोटण्यासाठी आणा
तेव्हां चंदासाहेबाचे डोळे उघडळे. तो जाणण टोळ प्रथम कांद्रींच बोलला
नाहीं. त्यार्ने फक्त रघूजी भोसल्यांच्या हूर माने आपण तुम्टाला बंदीत
ठेवण्यासाठी आलों आहों असे सांगितले.
चंदासाहेबानें त्या दोघांना पटातांचे दालओंढ खात विचारळे , '' ॥ काय?
एकूण तुम्ही अखेर परितुर झाळां काय? ” |
रामस्वामि आपल्या शिपायांकरवी नंदासाहेबावर गंगिनी रोखून त्याला
त्या खड्या पहार््यांत बंदिबासाकडे नेतां नेतां जणं काय अगदी सहज लोठेनें
म्हणाला, “ काय करायतें सरकार! गरीब माणसें आम्ही, बारा वाटीळ तजी
पाठ फिरविली पाहिजे. मीनाक्षीराणीसाहेबांच्या कारकीर्दीत आम्ही एक-
निष्ठपर्णे त्यांची सेवा केळी. नंतर आपण त्यांचा रसाने गळा कापून श्रिघना-
पल्लीरचें राज्य बळकावून बसलां, तेव्हां स्वामिद्रोहाच्या पातकाची कल्पनाही
मनांत न आणतां आम्हीं आमच्या राणीविरुद्ध सेवा पतकरिळी. आपणाला
आठवत असेलच ! ” रामस्वामि बंदिशाळेपाश्ी येतांच एका विशिष्ट खोली-
कडे-ज्या खोलींत मीनाक्षी राणीला बंदीवान करून कोंडून ठेवण्यांत आले
होतें तिकडे बोट दाखवून म्हणाला, “ आपणच ही खोली आमच्या अभागी
भगवा झंडा फडकला २४३
राणीसाहेबांना कोंडून ठेवण्यासाठी मुक्रर केली व याच रामस्वामीला आपण
राणीसाहेबांना इथें आणून कोंडण्याची आज्ञा केली. ती आपली आज्ञा मीं
तेव्हां स्वामिनिष्ठापूर्वक पाळली. कारण तेव्हां आपण आमचे विजेते-माझें
स्वामि होतां. ” शिपाई त्या कोठडीचा दरवाजा उघडं लागले तेव्हां रामस्वामि
गंभीर चर्या करून चंदासाहेबाकडे पहात उद्गारला, “ आजचे आमचे विजेते
मराठे आहेत ते माझे स्वामि आहेत. आपणाला याच कोठडींत कोंडून ठेव-
ण्याचा त्यांचा मला हुकूम आहे. ”
“विश्वासघातकी! हरामखोर! दगलबाज! ” रामस्वामीच्या नजरेच्या
खुणेसरसे शिपाई चंदासाहेबाला त्या कोठडींत कोंड लागले तेव्हां चंदासाहेब
खवळून मुठी आवळून ओंठ चावीत ओरडला.
“ आपणच माझे गुरु सरकार, भी आपलाच कित्ता गिरवीत आहें. ”
असें म्हणत रामस्वामीनें आपल्या हातानें कोठडीचा दरवाजा लावून घेतला.
त्या कोठडीच्या मोकळ्या खिडकोंतून चंदासाहेबाची पलीकडे दृष्टि
गेली, तों दूर किल्ल्याच्या निशयाणकाठीच्या बुरुजावर त्याचा विदववासू निहाल-
सिंग मराठ्यांच्या भगवा झेंडा रोंवीत आहे, व करुणाराणी, रघूजी भोंसले,
फत्तेसिंग भोंसले, मुरारराव घोरपडे, भानाजी, झुंझ्ारराव, सच्चिदानंद,
संभाजी, रतनसिंग व आणखी इंतर बरेचसे लोक खालीं उभे आहेत असा
देखावा त्याला दिसला. निहालसिंगानें चंदासाहेबाचें निशाण त्या सर्व
लोकांसमक्ष खालीं ओढून काढून त्याच्या फाडफाडून चिध्या चिध्या केल्या
व त्या आपल्या पायांखालीं तुडवून लाथेनें खालीं लोटून दिल्या. लगेच रघूजी
भोंसल्यांनीं पुष्पसंभारयुक््त भगवा झेंडा सच्चिदानंदांपुढें केला. त्यांनीं तो
करुणाराणीच्या हातीं देत म्हटलें, “ सज्जनांचा व गो-ब्राहूाणांचा यथान्याय
प्रतिपाळ करून राष्ट्राला सुखी करणारा हा मराठ्यांचा भगवा झेंडा असाच
यावच्चंद्रदिवाकरौ दिगंतांत फडकत राहो.
त्याच क्षणीं सर्वांच्या तोंडून * हरहर महादेव ! ' असा त्रिवार जयघोष
झाला १ त्या मंगळ जयघोषांत करुणाराणीच्या हातून मराठ्यांचा भगवा
झेण्डा त्रिचनापल्लीच्या किल्ल्यावर फडकू लागला. चंदासाहेबाला तें दृश्य
बघवेना. तो दोव्ही हातांनी आपले डोळे मिदूत्त घेऊन हता चित्ताने मट्-
कन्॒ खालों बसला.
प्रकरण ३२वें
चंदासाहेबाची देना
देवाची गति खरोखरच फार विचित्र आहे. ज्या त्रिचनापल्लीच्या किल्ल्यांत
चंदासाहेब कपटनोतीनें प्रविष्ट होऊन आयत्या बिळांतील नागोबा होऊन
बसला होता, व जेथें त्यानें आपल्या अस्मानी-खुलतानी जोरावर पाणी जाळा-
वयाला कमी केलें नाहीं, त्याच किल्ल्यांत आज तोच चंदासाहेब एखाद्या दीन-
वाण्या भणंगाप्रमाणें केदखान्यांतील एका कोठडींत केद होऊन खितपत पडला
होता ! मीचाक्षीराणीच्या अधःपातामुळें त्रिचनापल्लीचा किल्ला चंदासाहेबाच्या
स्वाधीन झाल्यापासून जे अधिकारी तेथें चंदासाहेबाच्या हुकुमाची तामिली
करीत असत, तेच जधिकारी' बहुशः: आजही कायम होते. परंतु आश्चर्याची
गोष्ट हो कौं त्याच चंदासाहेबावर पहारा करण्याचें कार्य त्यांच्या वांट्याला
येतांच त्यांनीं तें इतक्या सूडबुद्धीनें स्वीकारलें कीं, सर्पाच्या मनांत बारा
वर्षे डाव असतो असें जरी' म्हणतात तरी सर्पाची जातहि दावेदारीच्या बाबतींत
त्या स्वाभिमानी हिंदूंच्या अंत:ःकरणांतील दावेदारीपुढें हार गेली असती.
थोडक्यांत' सांगावयाचें म्हणजे, त्रिचनापल्लीच्या किल्ल्याचा पाडाव
झाल्यावर मराठ्यांचें निश्याण त्या किल्ल्यावर जरी फडकं लागलें व मरा-
ठ्यांचा अंमल जारी झाला, तरी त्या अंमलाची' खरी घडी अजून बसावयाची
होती, व किल्ल्यांत खरा अंमल तेथील पूर्वीच्या अधिकाऱ्यांचाच होता. अर्थात्
ते सर्वे अधिकारी--तेथें अपवादादाखळ असणारे मूठभर बाटगे मुसलमान
सोडून बाकी सर्वे मराठ्यांची सत्ता शिरसामान्य मानणारे होते. त्या रात्रौ
किल्ल्यावर सवंत्र जो अपूर्व विजयोत्साह चालला होता, त्यांत वस्तुतः जेत्या
मराठ्यांचा फारच थोडा अंश असून तो सवे तेथल्या हिंदु जनांचा स्वयंस्फूर्तीचा
खेळ होता. चंदासाहेबानें अर्धभग्त करून भ्रष्ट केलेलें महादेवाचें देवालय
र्जे आज इतकीं वर्षे अंधारांत व अनवस्थेंत कुजत पडलें होतें, त्या देवालयांतील
शिवलिंगाची आजपासून सशास्त्र व॑ समंत्र पुजाअर्चा होण्याला प्रारंभ झाला
होता, व त्रिचनापल्लीच्या किल्ल्यांतील हिदवोसीयांच्या अपूर्व पुनर्जीवनाची
चैदासाहेबाची दैना २४५
उज्ज्वल साक्ष त्या देवाल्यांतील अपूर्व रोषणाईवरून किल्ल्यांतीलच नव्हे तर
किल्ल्यासभोंवारच्या पंचक्रोशींतील हिंदु जनतेला पटत होती. तें महादेवाचे
देवालय म्हणजे किल्ल्याचेंच काय पण सबंध त्रिचनापल्लीच्या राज्याचें सौभाग्य
होतें. तें सोभाग्य त्रिचनापल्लीला आज पुन्हां मिळालेळें पाहून सर्वे हिदु जनांना
आनंदी आनंद वाटल्यास त्यांत नवल काय !
परंतु ह्या आनंदाइतकाच किंवा त्यापेक्षांहि जास्त विस्मय व विषाद मान-
ण्याचें ज्याच्या कपाळीं आलें होतें असा एक अभागी बंदीवान जीव किल्यांत
होता. तो अर्थात् चंदासाहेब होय. त्यानें जो जो अधिकारी भेटेल त्याला
परोपरीनें आपली मुक्तता करण्यासाठीं विनवावें, त्याला निरनिराळीं आमिषे
दाखवावी; पण त्या अधिकाऱ्यानें-तो सभ्य असल्यास त्याच्याकडे नुसत्या
हेटाळणीनें पाहन पुढे जावें, त्याहून प्रखर वृत्तीच्या कोणीं त्याची कटु शब्दांत
संभावना करावी, तर रामस्वामीसारख्या ज्वलज्जहाळ वृत्तीच्या
एखाद्या हिंटूनें मुद्दाम त्या कोठडीवरून फेऱ्या घालून चंदासाहेबाच्या तोंडावर
प्रत्यक्ष थुंकन त्याची विटंबना करण्यालाही कमी करूं नये ! रामस्वामीच्या
वृत्तीची थोडीथोडकीं माणसें किल्ल्यांत होतीं अशांतला प्रकार नव्ह्ता. मुरारराव
घोरपड्यांनीं किल्ल्यावर मराठ्यांचा भगवा झेंडा फडकवितांक्षणींच
तेथल्या अधिकाऱ्यांना सक्त ताकीद दिली' होती कीं, चंदासाहेब जरी केद झाला
तरी तो आमचा राजकेदी आहे. त्याच्या इभ्तीला कोणत्याही रीतीने धक्का
लागेल असें वर्तन कोणींहि केल्यास त्याला जबरदस्त शासन करण्यांत येईल.
परंतु धडधड पेटणाऱ्या वडवानलाला कुडचाभर पाण्याचे काय होय?
खवळलेल्या महासागराला बिचारी टिटवी आपल्या चिमुकल्या चोंचींतील
उपसणीनें कशी आटवृं शकणार ! तीच गत मुरारराव घोरपड्यांच्या
हुकूमाचीहि झाली. खासे मराठे निःपक्षपातपूर्वेक किल्यांत अबादानी करून
गोले खरे; पण त्यांच्या हुकुमाची तामिली करणाऱ्या आंतील अधिकार्यांचा
संतापवन्हि जो इतके दिवस चंदासाहेबाविरुद्ध भडकला होता व जो त्याच्या
एकाहून एक वरचढ पापांनीं रोज रोज जास्त जास्त प्रज्वलित होत होता,
नसत्या वरिष्ठांच्या हुकुमांनीं कसा शांत व्हावा ? अग्नि भडकला कीं तो
भक्ष्य घेणारच. आतां प्रत्यक्ष अग्नि भक्ष्य घेऊन शांत होण्याऐंवजीं जास्त
भडकत असेल व त्याहून हा लोकवन्हि कांहींसा सोम्य असेल, म्हणूनच तो.
२४६ पेशवाईर्चे मर्न्वतर
५६-०१” “७, अ लट ह लके ५. “क 0० “०८७७७ ४५ 2१४९ १७. ७ /७१७ ७0६ ४0१७ १५४0१ “0७७ “७ 09 » 9 ४0७ “ही ७४४ १ ४ न ह 200 ४४ “0७ “0 “0१ 70 ४00४ ७७४0५ “00 ९ >“ ४0 0७.४. ८ “% ८९१ / ७.४५ ७
चंदासाहेबावर गत गोष्टींचा सूड घेऊन शांत होण्याजोगा होता. ती रात्र
अश्या सूडाला हपापलेल्या लोकांना केवळ पर्वेणी अशी' भासली. आपणाला'
जितकी जितकी' म्हणून चंदासाहेबाची विटंबना करावयाची आहे तितकी
आपण आज करून घ्यावयाची अश्या निश्चयाने ते त्या रात्री वागत होते.
परंतु त्या सवे मूर्तामूतं संकटांचें चंदासाहेबाला जेवढे भय वाटत नव्हतें
तेवढें भय त्याला त्या रात्रौ अकस्मात् तेथें येऊन थडकलेल्या एका पुरुषवेषधारी
व्यक्तीला पाहून वाटलें. ती व्यक्ति भय वाटण्यासारखीच होती. मीनाक्षीराणी'
त्रिचनापल्लीच्या किल्ल्यांतून बेपत्ता झाल्यापासून चंदासाहेब त्या व्यक्तीला
जागोजागीं पहात होता तो निहालसिंगच होय्र. परमेश्वराने आपल्या
पापांचें प्रायश्चित देण्यासाठीं हा कोणी काळद्ूतच पाठवला आहे कीं काय, असें
चंदासाहेबाला अगदीं अलीकडे भासत होतें. त्यानें निहालसिंगाला
नामशेष करण्याचे होते नव्हते तेवढे सर्व प्रयत्न करून पाहिले होते. परंतु
त्यांचा कांहीं उपयोग न होतां तो आज ज्या लाजिरवाण्या स्थितीला येऊन
पोंचला होता ती स्थिति केवळ निहालसिंगाच्याच कारवाईचा परिणाम आहे
हें त्याला पूर्णपणें कळून चुकलें होतें. जगांत कांहीं गोष्टी मनुष्याधीन असतात
तर कांहीं देवाधीन असतात. निहालसिंगाचा अनिरुद्ध संचार ही गोष्ट मनुष्या-
धीन नसून देवाधीन आहे असें चंदासाहेबाच्या मनानें घेतल्यामुळेंच नुसती
त्या व्यक्तीची आठवण होतांच त्याच्या हूदयाचें पाणी पाणी' होऊन जाई,
व त्या व्यक्तीला समोर समक्ष पाहतांच तर त्याची स्थिति फांसावर लटकल्या
जाणाऱ्या एखाद्या मरणप्राय जीवासारखी' होई. मराठ्यांशी लढतांना अनेक
आणीबाणीच्या प्रसंगीं चंदासाहेबाची सरशी होण्याचा ऐन रंग आला असतां
लढाईचा सर्व नूर बदळून टाकण्याचे सामथ्ये त्या एका व्यक्तीच्या अंगीं होतें.
हे सवे चमत्कृतिजन्य प्रकार चंदासाहेबानें ज्या डोळ्यांनी पाहिले, त्या
डोळ्यांसमोर त्या रात्रीच्या भयाण वेळीं तीच निहालसिंग नामधारी
व्यक्ति दत्त म्हणून येऊन उभी राहिलेली पाहतांच त्याची काय अवस्था
झाली असेल याची कल्पना करणेंच बरें.
आईदचर्याची गोष्ट ही कीं, चंदासाहेबाचें शिकंदर नश्लीब सर्रास पाया-
खालीं तुडवून त्याची वाताहात उडविणारी ती निहालसिंग व्यक्ति कोण
असावो याची चंदासाहेबाला या क्षणापर्यंत दाद नव्ह्ती. अगदीं प्रथम
चैदासाहेबाची दैना २४७
त्याला असा संशय होता कौं मीनाक्षीराणी आणि मोहना ज्या अकस्मात्
किल्ल्यांतून नाहींशा झाल्या, त्यांनींच हें सूडाचें नाटक आरंभिलें असावें.
परंतु दरम्यान त्या दोघीही ठार झाल्याचें वर्तमान कानीं आल्यामुळे त्याची
ती शंका फिटली होती. आणि म्हणूनच त्या व्यक्तीच्या अज्ञातपणाविष-
ध्रींच्या दंतकथांना उधानाची' भरती आली होती.
असो. यमदृताप्रमार्णे निहालसिंग समोर येऊन उभा राहिलेला पाहतांच
चंदासाहेबानें गभेगळित होऊन खालीं मान घातली. त्याच्या डोळ्याला डोळा
भिडविण्याचें धैय त्याच्या अंगीं मुळींच उरलें नव्हतें. निहालसिंगानें पाया-
पर्यंत झगा धारण केला होता, व डोक्याला मराठशाही पटका बांधला होता.
शरीर पहावें तर नवकिसलयाप्रमाणें कोमल, चर्या पूर्णपणें उमललेल्या पण
पूर्णे ताज्या अश्या गुलाबाच्या फुलासारखी, दृष्टि हरिणीप्रमाणें चंचळ आणि
आकर्षेक; त्याचें बोलणें, त्याचें चालणे, जी जी गोष्ट पहावी ती' ती अत्यंत
मोहक अशीच कोणालाहि वाटे. व अश्या त्या तरुणाचे गेल्या कांहीं महिन्यांतील
अवाढव्य पराक्रम आठवतांच शत्रूच्याही मनांत अशी कोतुकपूर्णे शंका उत्पन्न
होई कौं, या नाजुक फुलाच्या ठायीं रणझुंजाराला आवश्यक असणारा पाषाणी
कठोरपणा आणि पहिल्या दर्जाच्या मुत्सद्देगिरीला आवश्यक असणारी पोलादी
तलवारीच्या पात्यावर खेळणारी तौत्र बुद्धीची ढाल ह्या देणग्या कोठून
कशा मिळाल्या असतील ?
निहाल सिग वेषांतर करून गंभीर वृत्तीने तेथें येऊन चंदासाहेबा-
समोर उभा राहिला. तेथें येतांच चंदासाहेबाचें अधोवदन झालेलें
पाहून क्षणभर त्याच्याकडे पहात तो अगदीं निश्चल उभा राहिला
व दुसर्या क्षणाला मर्मभेदक दृष्टीनें त्याच्याकडे पाहून किचित् गालांतल्या
गालांते हंसला. सभोंवारचे पहारेकरी जरी निहालसिंगाला ओळखू
शकले नाहींत तरी सूर्योदयाबरोबर दिवाभीतांची जी अवस्था होते, अथवा
रामाचे नांव ऐकतांच भूतपिज्ञाच्चांची जी गाळण उडते असे म्हणतात, अशी'
त्यांची अवस्था झाली व त्या सर्वांनी गोंधळलेल्या अंत:करणांनीं त्याला
अगदीं लवून नम्रतापूर्वक मुजरे केले. निहालसिंगाचे त्या मुजर्याकडें
लक्ष नव्हतें. तो पुन्हां गालांतल्या गालांत किचित् हंसत लगेच चंदा-
साहेबाकडे वळला तेव्हां त्याची दृष्टि एकाएकों इतकी उज्वल झाली कों वहात्या
२४८ पेशवाईचे मन्वंतर
८४९.४%..१५./४./५-/१४-€४./४./”१./"५./ -€%./% /१- “१.०”. ४0 “0 “१.0५...
“४. -€१.४%४/१९ /४१..४१ “५.५१ ४५४४. *% /४५४% ५४७ ९ ४४.१... €% ५७.४...
जलप्रवाहांतून अग्निज्वाळांचा लोट निघाल्यासारखें सभोवारच्या नोकरांना
वाटं लागलें.
वेषधारी निहालसिंग पोलादी तलवारीच्या धारेप्रमाणें तीक्ष्ण शब्दांत बोलं
लागला, “ चंदासाहेब, तूं मला ओळखलेंस काय? वाघाचीही' गाय करून
सोडणाऱ्या ह्या तुझ्या मूतिमंत काळाला तूं अजून ओळखलें नाहींस वाटतें !
आजवर हरघडीं तुझ्या दृष्ट बुद्धीचा डोलारा हाणून जमीनदोस्त करणाऱ्या
आणि तुझ्या शत्रूंना पावलोंपावलीं उत्साहाची जोड मिळवून देऊन तुला
गाडण्यासाठी अहनिश झटणाऱ्या तुझ्या ह्या हाडवेरिणीला नीट पाहून घे. ”
निहालसिंग बोलूं लागला त्या वेळीं चंदासाहेबाला त्याच्या शब्दावरून त्याची
ओळखही पटूं लागली, व जखमेवर मिठाचे पाणी शिंपडल्याप्रमाणें त्याच्या दातघा-
विदीणे अंतःकरणाला असहाय वेदना होऊं लागल्या. तो पुरुष नसून ती मोहना
असल्याबद्दल त्याला आतां शंका उरली' नाहीं. मीनाक्षीराणी आणि मोहना
जगांतून नाहींशा झाल्याबद्दल आजवर कानावर आलेल्या सर्व गप्पा खोट्या
असल्याचें त्याला आतां पुर्णपर्णे-निदान अंशत: तरी कळून आलें. तक्या
शतधाविदीर्ण वृत्तींतच त्यानें मोहनेच्या चर्येकडे पुन्हा एकवार भीत भीत
नुसतें न्याहाळून पाहिलें, त्याबरोबरच मोहनेनें त्याला तुच्छतापूर्वक विचारलें,
“मूर्खा, पाहतोस काय? ”
“ काय; आजवर माझा सतत सूड घेणारा आणि मला रसातळाला नेऊन
पोंचविणारा तूं यः:कशचित् बायकोच होतास तर ! अरेरे! काळ फिरला कीं
सामर्थ्येवान् माणसांच्या सामर्थ्यचेही कोळसे होतात व तो दुबळा ठरून
प्रतिकूल परिस्थितीच्या पायांखालीं निष्ठ्रपणें तुडवला जातो तो असा ! ”
तो स्वतःशीं म्हणाला. पुढें त्याच्याच्यानें स्वतःच्या मनाश्ीं देखील बोलवेना.
तरी पण त्याच्या मनांत विचारांचे जे काह्र उसळले होतें त्याचा दृश्य
परिणाम मोहनेला तात्काळ पहावयाला मिळाला.
चंदासाहेबाने मनस्तापाच्या भरांत ताडकन कपाळावर हात मारून घेत-
लेला पाहून मोहना कठोर स्वरांत उद्गारली, “ आतां कपाळावर हात मारून
रडत बसणें एवढेंच तुझ्या वांट्याला राहिलें आहे. आणि त्या बाबतींत
तुला मनःपुर्वक सहाय करण्यासाठींच मी यावेळीं या ठिकाणीं आलें आहें.
आतां तुझें भवितव्य सवेस्वी माझ्या हातीं आहे. पापिष्टाला त्याच्या पापाचें
चेदासाहेबाची दैना २४९
प्रायशिचत्त देण्यासाठीं परमेश्वर कोणाच्या तरी मखीं उभा रहातो, व सृष्टांचें
थालन आणि दृष्टांचें निर्दालन करून सृष्टीची यथान्याय नियंत्रणा करण्याचें
महतूकार्ये विश्वव्यापी आदिशक््तीकडून असेंच पार पाडलें जातें. ती आदि-
शक्ति आज माझ्या ठायीं संचारली आहे; आणि मी--एकदां तुझ्या विलास-
मंदिरांत कोंडून पडलेली ही मोहना आज तुझ्या पापांचे प्रायश्चित्त तुला
देण्यासाठीं नव्या जन्माने येथें आलें आहें. मी नुसता तोंडांतून शब्द काढ-
ण्याचा अवकाश, कौं या क्षणीं हें तुझें मस्तक धडावेगळे होईल. परंतु एवढें
सुखाचें तडकाफडकीं मरण तुला येण्याइतकीं तुझीं पापें हलकीं नाहींत. तुझ्या
मृत्यूला अमानुष छळाची प्रभावळ जोडल्याशिवाय जगांतील परमेश्वरी
न्यायाचे यथावत् चित्र जगाला पहावयाला मिळणार नाहीं. यास्तव मी तुझ्या
आयुष्याचा माझ्या मनाला वाटल तसा शेवट करण्यापूर्वी तुला तुझ्या पापांची
आठवण करून देऊं इच्छिते. ”
“ पण मोहने, मी तुझा असा काय अपराध केला आहे? ”
“ मीनाक्षीराणीला जन्मांतून कोणीं उठविलें ?-विरवासघातानें त्रिचना-
पल्लीचें राज्य रसातळाला कोणीं नेलें ?-महादेवाचें पवित्र देवालय' कोणीं
भ्रष्ट केलें? ”
“ त्याचा केवार तुला घेण्याचें काय कारण? ”
“ काय कारण ?--नीचा, मी भ्रष्ट झालें असल्यें तरी रक्ताची हिंदु आहें.
हिडु जातींत जन्मलेल्या कोणाही स्त्री-पुरुषाला आपल्या मायबहिणींच्या व
आपल्या देवाधर्माच्या रक्षणासाठीं पंचप्राणांची कुरवंडी करण्याच्या निर्धा-
रानें पुढें येण्याला कारण शोधावें लागत नसतें. ”
“ एकूण तूं मोनाक्षीराणीबाबतचा सुड माझ्यावर घेण्यासाठी आजवर
घडपडत आहेस तर! ”
“अर्थात्! ”
“ पण मीनाक्षीराणी कुठे आहे? ”
“कां ? तिला पुन्हा भुरळ पाडावयाची आहे काय ? ”
“ तिच्या व माझ्यामधील जिव्हाळ्याच्या नात्याची तुझ्यासारख्या त्रय-
स्थाला कल्पना येणे शक्य नाहीं. तिला एकवार माझ्यासमोर येऊं द्या; मग
आमचें आम्ही पाहून घेऊ- ”
२५० पेशवाईचें मन्वंतर
“४.१ ५५/१९/१४११.” १./ ९.०७ “१ “४./४९५.८% .”/४ »” ९५८१.//४% //७ /%..”१५./९/१५././/१./ १.८५ "५, “३.”
ह
“नीचा ! ” मोहना धि:कारपुर्वक हंसून म्हणाली, ” तुला अजून भ्रम
आहे कौं आपण मौीनाक्षीराणीला पुन्हा आपल्या मायावी सौंदर्याची भुरळ
पाडू शकू; तिला पुन्हा आपल्या मोहजालांत गुरफटून टाकून आपलीशी करून
घेऊं. पण तो काळ केव्हांच गेला. तुला याची खूणगांठ म्हणन सांगत्ये,
मीनाक्षीराणी हा लोक सोडून गेली पण तिने जातांना तुझ्यावर सूड घेण्याचें
काम माझ्याकडे सोंपविलें आहे. त्यासाठींच मी' आतां इथे आल्यें आहें. ”
प्रकरण ३३ वें
सूड!
| २-० ६ जीवन हेंच सर्वस्व असें न मानणारा प्राणी कोण आहे? सामान्यतः
जगांत धडकांवर धडका घेऊन मृत्यूच्या जबड्यांत प्रविष्ट झाळेला
जातिवंत सर्प देखील शत्रव्र सूड घेण्याचा व स्वतःचे प्राण वाचविण्याचा विचार
एकाच वेळीं निर्वाणीच्या भावनेने करीत असतो. जीवार्चे मोल जनावराला
काय किंवा माणसाला काय, सारखेंच अमोल वाटतें. एरव्ही स्वाभिमान, स्वधर्मा-
भिमान व अब्रू अथवा अश्याच कांहीं अन्य नाजूक भावना यासाठीं पंचप्राणाचें
मोल देणारा लोकोत्तर वीर विरळा. अशा विरळा वीरांपैकीं चंदासाहेब खास
नव्हता. तो शूर होता, वीर होता, परंतु सद्भावनेचा विटाळही त्याच्या
अंतःकरणाला झालेला नव्हता. कट्टा धर्माभिमानी म्हणावा तर खोट्या
मोलाची नागझरी त्याच्या मुखांतून स्रवत असे. पट्टीचा स्वाभिमानी
वीर म्हणावा तर प्रसंगीं कमालीचा लाचारपणा पतकरून प्रतिपक्षासमोर
आपला बचाव करण्यांत त्याचा हातखंडा होता. थोडक्यांत सांगावयाचे
म्हणजे तो एक नीच वत्तीचा दुजेन होता. त्याचा आजवर झालेला पराजय
व त्याच्या वांट्याला आलेली अनेकविध विटंबना ही कोणाही तेजस्वी वीराला
अशा विटंबनेपेक्षां मरण सहस्रपटीनें बरें असें भासविणारी होती. तरी त्याला
स्वत:ला अजूनही वाटत होतें कीं, काय वाटेल तें करून मीं माझा प्राण बचा-
वला पाहिजे. आणि तो कशासाठीं, तर पूर्वेवत् पापांची परवड रचण्यासाठीं,
आणि पाशवी विषयलालसांचें नाना प्रकारचें चोज पुरविण्यासाठी !
इतक्या हलक्या मनोवृत्तीचा चंदासाहेब होता, म्हणूनच त्याला त्या वेरी
स्त्रीजीवासमोर मान नमवण्यांत तितकी नामुष्की वाटली नाहीं. त्याच्या मनांत
त्यावेळीं विचार आले, “ ही एक यःकश्चित् बटीक; हिला माझ्या पायाच्या
कुपेशिवाय गत्यंतर नव्हतें, आणि स्वत:च्या भोगेच्छांचें चोज पुरविण्यासाठी
असले खेळ ज्यानें प्रत्यहि खेळावे, त्या ह्या नरपृंगव चंदासाहेबानें त्या एका
य:कशिचित स्त्रीसमोर आज कशी मान नमवावी ! एवढा सामर्थ्येशाली व
विजयश्याली नबाब चंदासाहेब मी एका यःकरिचत् बटकीसमोर गोगलगाय
बनलों तर तें पाहुन जगाला काय वाटेल! येथल्या माझ्या नोकरचाकरांना
काय वाटेल ! ” परंतु येथवरच त्याच्या उचंबळत्या स्वाभिमानाची मजल
२५२ पेशवाईचें मन्वंतर
१.५५ ५११- ५८४” ६ “५”, £ ४-0 १... १ /, »१ ७१ ०१४. ४% *- "५०८. /”४* “१ » १ /€६ / शी “*. “«. क यो
होती; त्यापेक्षां मरण बरें असें म्हणण्याची त्याच्या मनाची तयारी नव्हती.
त्यानें मनांत भ्याडपणाला शोभेसा विचार केला, “ आज माझा पडता काळ
आहे. आज मला पडती घेऊनच वागलें पाहिजे. पण वेळ आली. म्हणजे
माझें खरें स्वरूप दोडदमडीच्या बटकी, तुळा दिसुन येईल, मरणान्तिक
चेदनांनीं दुखवळेला सर्प जिवानिशीं बचावला' म्हणजे तो मनांत कसा डाव
धरतो आणि योग्य वेळीं संधि येतांच तो आपला डाव कसा साधतो,
याचा अनुभव तुला अजून पटला नसला तर हा चंदासाहेब तो पटवून देईल.
तुझी-एका य:करिचित् बटकीची काय कथा! मीमी म्हणविणारे रघोजी
भोंसले, मुरारराव घोरपडे, यांसारखे पट्टीचे मराठे वीर आज मारे शेफारून
गेले असतील कीं आपण चंदासाहेबाला नेस्तनाबूत केलें. परंतु त्या मूर्खानीं
एवढें लक्षांत ठेवावें कीं, तुम्ही चंदासाहेबाला अर्धमेला केला तरी त्याला
तुमचा चावा घेण्यासाठीं जिवंत ठेवला आहे; तो जेव्हां पूर्ववत् पुन्हां सामर्थ्य-
झाली' होऊन तुम्हांलाच दंश करील तेव्हां तुमचे डोळे उघडतील.” हे सूडाचे
विचार मनांतल्या मनांत घोळीत चेंदासाहेबाने त्याच क्षणीं मोहनेसमोर आपली
मान नमवली आणि दीनवाणीनें उद्गार काढले, “ मोहने, वर्षांचे बाराही
मास सारखे नसतात. आज माझा पडता काळ असला तरी नहमींच तो तसा
राहील असें नाहीं. शरद्क्र्तूमध्यें अवकळा आलेली झाडें वसंतत्रद्वतूंत पुन्हां
हिरव्यागार पल्लवराजीनें विभूषित होतात. अशुभ गोष्टी जबडा पसरून
पुढें उभ्या राहिल्या तर त्यावर कालह्रणासारखा दुसरा उपाय नाहीं. त्या
पहिल्या वहिल्या रात्रीं मीं तुला माझी बेगम करण्याचे वचन दिलें, तें मी
अद्याप विसरलों नाहीं. मी जगामध्ये कुणाचा काहींही अन्याय केला असला
तरी तुला गुलाबाच्या फुलाप्रमाणे अलग तळहातावर झलून धरले होतें, हें
पुला नाकबूल करतां यावयाचें नाहीं. तू माझा सूड घेण्यासाठीं इतकी धडपड
कां करतेस हेंच मला कळत नाहीं. सय्यदखानाच्य' मरणानंतर तुला मीं
साझ्या जनानखान्यांत आणलें, ते तुझ्यावर मीं केवढे उपकार केले बरें !
त्यावेळीं तुला जर माझा आश्रय मिळाला नसता तर सय्यदखानाच्या इतर
नाटकशाळांची जी दुदेशा झाली, तीच तुझीही झाली असती; व आज एखाद्या
शिपाईप्याद्याची बटीक म्हणन राबण्याचें तुझ्या कपाळीं आलें असतें. तो
ट्र
माझा उपकार स्मरावयाचा सोडन मोहने, हें तू काय आरंभिले आहेस ?
९
सूड २५१३
१८-०९४./'१/४ ./ 0९ ७७ १७८०७ ४...” ७४०१९ शोके हीच ॥/0 /४७./४१७ ५७१ “७४% ७७ “९ ७४१५ ० १५ ५४४१. £ ७ ८७ “ ७७/४१./ ६. अच 7१. »€*. ् १ .*१*... ह. ४७/१६/८११४ २.४ १%०/१% ७४% //१६. ७ ५४%. /४ ४७” “हीच “€%./९% “४१...”
हिंदुसमाजांत आपणाला स्थान आहे असें तुला वाटतें काय? त्यापेक्षां मी
अजून तुला पूर्ववत् प्रामाणिक आणि मनमोकळेपणाने सांगतों कों, तूं माझा
छळ करण्या'चें सोड आणि मला मार्ग मोकळा करून दे. इतकी जरी माझी
दुदेशा झाली आहे, तरी मी एकवार मोकळा सुटण्याचा अवकाश,
कौं पुन्हां हां हां म्हणतां संन्यसामुग्रीची जमवाजमव करून शत्रूला धूळ
चारीन आणि तंजावर व त्रिचनापल्ली ह्या दोन्ही ठिकाणची राजलक्ष्मी
तृ माझी बेगम या नात्यानें तुह्या पायावर आणून लोळवीन. मीनाक्षी तिकडे
मसणांत जावो. तिच्याशीं तुला काय करावयाचें आहे? ”
मोहना किंचित् विकट हास्य करून म्हणालो, “ विश्वासघातको नराधमा,
हें वेभवलालसेचें सोनेरी' जाळे तं कोणासभोंवार फेकतो आहेस याची' तुला
जाणीव आहे ? तुला काय वाटतें; ही मोहना श्रीरंगाच्या देवाल्यांतून
त्या नरपशूच्या-तुझ्या दुष्ट व्याह्याच्या जनानखान्यांत संतोषानें आली,
आणि तेथून तूं तिला आपल्या विलासमंदिरांत आणलीस तेव्हां ती हसली,
बोलली, ती' खर्या अंत:करणाने बोलली असें? ” |
“ एकूण मूळपासुनच खरेपणा तुझ्या अंगीं नव्ह्ता म्हणावयाचा तर! ”
चंदासाहेब बापुडवाण्या स्वरांत उद्गारला.
“ नव्हता कां ? होता, ओतप्रोत खरेपणा साझ्या रोमरोमांत त्यावेळीं
सळसळत' होता. आणि अजूनही सळसळत आहे. ही मोहना जी आजवर जगली!
आहे, ती त्या खरेपणाच्या संजीवनीवरच होय. जगामध्ये सत्याचा शेवटीं
जय होतो. ह्या जगांतील महत्त्वावर अजूनही माझा अढळ विश्वास आहे;
आणि स्वतःच्या निःसीम श्रमांनीं सत्यमेवजयते याचा प्रत्यय माझ्या क्षुल्लक
जीवाच्या शक्त्यनुसार जगाच्या निदर्शनाला आणून देणें हेंच ध्येय डोळ्यां-
समोर ठेवून मी इतके दिवस जगले आहें. मी कतेव्यासाठीं जगले आहे;
सुखोपभोगासाठीं नाहीं. ”
मध्येंच चंदासाहेबानें विचारलें “ मग तुझें कतव्य तरी काय? "'
“ माझें कर्तव्य! ” मोहना एकदम चंडिकेचा अवतार धारण करून
क्रोधाने नखशिखांत कांपत उद्गारली, “ माझें कतेव्य काय आहे हें तुला
अजून कळत नाहीं ना? ” सच्छील हिंदु अबला तुमच्यासारख्या पाशवी-
वृत्तीच्या अविधांच्या हातीं सांपडून सर्वस्वाला बुडाली; तिनें आपल्यासारखॅच
२१४ पेशवाईचें मन्वंतर
“१४.५ *-/९५-/१-/ *. “१ ४../0७ “७ /७, ४७ .“ 7१“ १. '“"५-८"५ “१५0४५४ ४५४” ४.४” ३ - “१.४४...” १ / ४-४ / / १.१ ४१-८४ १-८ १. १४ ५,५/% * ७ ५५. “१ /११, / “*% ५-८ ४-४ ४५.” ७.”
*२./१५-/१-४८”९५,/११ €9./.
अनेक भगनींचे धिडवडे निघालेले पाहिले; देवाधर्माची दुर्दैणा देखील तिला
अहनिश .पहावी लागली. ह्या सवे अत्याचारांचें निमूंलन करून, माझा
घर्मे-माझा आवडता हिंदुधर्म, आणि आमची शीलवती, सत्यवती, धर्मवती
स्त्रीजात-स्त्री ही माता आहे हें नराधमा, तूं ओळखत नाहींस, म्हणून तुझ्या-
सारख्या मात्रागमनी दुरात्म्यांना ह्या जगांतून नाहींसे करणें आणि सज्ज-
नांच्या परित्राणांचा मार्गे निष्कंटक करणें हेंच माझे ध्येय; आणि त्या ध्येयाची
पुतेता मी आतां करणार आहें. मला तुझी भाकडकथा ऐकायला नको आहे.
ऐक; ही मोहना आतां पूर्वीची ती दुबळी स्वी उरलेली नाहीं. या क्षणीं तरी
सर्वाधिकार माझ्या हातीं आहे, आणि म्हणूनच मी सांगेन त्याप्रमार्गे तुला
निमूटपणें वागलें पाहिजे. ” असें म्हणून मोहनेनें किंचित् मार्गे वळून आपल्या
बरोबरच्या सशस्त्र शिपायांना आज्ञा केली, “ याच्या मुसक्या बांधून याला
खोलीबाहेर काढा आणि माझ्या मागोमाग याला फरफटत घेऊन चला. ”
आज्ञा होण्याचाच अवकाश, लगेच तिची अस्मलबजावणी' झाली. दोघे
सेवक मोहनेपुढें मशाली धरून चालं लागले व त्याच्या मागोमाग दरवेशानें
चालविलेल्या अस्वलाप्रमाणें बंदिवान चंदासाहेब चालविला जात होता.
त्याचा तो बंदिवानाचा वेष आणि अपमानाने काळवंडलेली चर्या पाहून आजू-
बाजूच्या सर्वे शिपायांना व पहारेकऱ्यांना एक प्रकारचें कौतुक वाटत होतें
नाहीं म्हणावयाला यांत जे कोणी' चंदासाहेबाच्या हंगामी अमदानींत बाटून
मुसलमान होऊन यःकशिचितू ऐहिक स्वार्थाला लालचावलेले, होते त्यांना
किचित् हळहळ वाटली असेल, परंतु ती हळहळदेखील चंदासाहेबासाठीं
नसून आपण त्यांच्या नादाने आपण सर्वेस्वाला बुडालों याची होती; व आतां
नव्या हिंदु अमदानींत आपली' काय दशा होणार अशी चिताही त्या हळहळी-
बरोबरच त्यांच्या मनांत डोकावत होती.
ती विस्मयजनक मिरवणूक रात्रीच्या भयाण वेळीं दोन मशालींच्या उजेडांत
तेथून निघाली ती' एका भागून एकं चौक्या पहारे ओलांडून थेट टेकडीवरील
महादेवाच्या देवालयाकडे वळली. इतका बंदोबस्ताचा तो किल्ला आणि
राजवाडा, रात्रींच्या प्रहरीं हंटकल्याशिवाय कोणालाही तेथें एकसुद्धां चौकी
पहारा ओलांडून पुढे जाणें मुष्कोलीर्चे ! परंतु भगवान् श्रीकृष्णाच्या
जन्माच्या वेळीं ज्याप्रमाणें मुसळधार पजंन्यानें पहारेकऱ्यांचे कणे बधिर
सूड ! २१५५"
करून सोडले आणि दुथडी भरून वहाणाऱर््या यमूनेनें त्या बाल
वासुदेवासाठी वाट मोकळी करून दिली, त्याप्रमाणेंच त्या मंडळीं-
च्या अग्रभागी मोहना आपल्या मर्दानी वेषांत चाललेली पाहून प्रत्ये-
कानें कसलीही शंका मनांत न धरतां व कोणालाही न हटकतां मुकाटपणे
या मंडळींना पुढें जाऊं दिलें, व वर आणखी मोहनेला त्रिवार मुजऱर््यांची
खंडणीही दिली! ज्या चंदासाहेबाला आजवर नुसत्या राजवाड्यांतून
हिडतांना देखील सेवकांचे एकजात शेंकडों मुजरे मिळावयाचे, तेथें आज त्या
बिचार्याच्या वांट्याला एकही मुजरा येईना! अपवादादाखल म्हणून कीं
काय' शेवटच्या चौकी पहाऱ्यावरील पहारेकऱ्यानें गोंधळून म्हणा किवा मना-
पासून म्हणा, मोहनेच्या मागोमाग ती मंडळी' तेथून पार होऊं लागतांच चंदा-
साहेबाला मुजरा केला. तें पाहून मोहनेनें त्याच्याकडे एक तीक्ष्ण अर्थात्
नापसंतीचा नेत्रकटाक्ष फेकला व लगेच आपल्या मागील सहस्त्र सेनिकाकडें
एकवार नजर फेकली. त्या नजरेच्या भरारीसरशीं त्या सेनिकानें आपली
नागवी तलवार निमिषार्धांत त्या पहारेकऱ्यावर चालवून त्याचें शिर धडा-
वेगळें केलें. त्या यःकश्चित् अपराधाबदहल देहांत शासन ही शिक्षा फार
कठोर होती हें तर खरेंच; परंतु चंदासाहेबासारख्या महाशत्रूला नुसता मुजरा
करणें हें देखील केवढे भयंकर पाप आहे याची प्रत्यक्ष दहशत बसवण्यासाठीं
मोहनेनें करविलेल्या त्या शिक्षेला असमर्थनीय तरी कसें म्हणावें !
प्रकरण ३४ वं
तंजावरांत
सहादेवाच्या देवाल्यापाशीं जाऊन पोंचेतों अगदीं झ्यांतपणें मोहना पुढ
आणि ती मंडळी' मागे चालत होती. देवालयापाश्ली जातांच मात्र मोहना
क्षणभर थबकली,', त्याबरोबरच ते शिपाईही थबकले. मशालींच्या उजेडांत
चंदासाहेबाच्या काळवंडलेल्या चेहऱ्याकडे निरखून पहात मोहना म्हणाली,
“ नीचा, तूं याच जागीं उभा राहून महादेवाचे देवालय जमीनदोस्त करण्या-
साठीं हुकूम सोडला होतास ना? याच जागीं तुझ्या आयुष्याच्या अखेरची
बोळवण होणें अवश्य आहे. हिंदूंची देव-देवालये, हिंदु स्त्रिया, हिंदंचीं
राज्यें, हिंदूंची दौलत म्हणजे तुला आजवर पोरखेळ वाटत आला. हें महा-
देवार्चे देवालय त्रिचनापल्ली राज्यांतील सार्या हिंदूंना परमपूज्य आहे. याच
महादेवाच्या कृपाछत्राखालीं हें राज्य उदयाला आलें आणि वैभवशाली बनलें,
आणि ह्याच ईऱवरी शक्तीच्या कोपामुळें ह्या राज्यावर आपत्ति आली.
त्रिचनापल्लीच्या सर्वे राज्याचा व्यवहार आपल्या इच्छामात्रे करून चाल-
विणार्या या' परमपवित्र परमेश्वराची' विटंबना करण्यासाठीं निलंज्जपणें
धजणाऱ्या दुरात्म्या, “-मोहना दीपज्योतीनें प्रज्वलित केलेल्या त्या देवा-
ल्यापलीकडील प्रकाशमान कड्याकडे बोट दाखवून म्हणाली, “ ह्याच
कड्यावरून आज मी' तुझा कडेलोट करणार आहें. शिपाई हो, पहातां काय,
एका क्षणाचाही विलंब न लावतां या शिक्षेची अंमलबजावणी' करा.-पण
थांबा. याच्या घोर पापांना एवढें प्रायश्चित्त देखील पुरेसे होणार नाहीं. ”
ती एकदम चंदासाहेबाकडे वळून म्हणाली, “ चांडाळा, त्या पहिल्या दिवशीं
मला राणीच्या रंगमहालांत कोंडलेंस तेव्हां काय प्रौढी मारलीस ती तुला आठ-
वते? त्या सर्वे दुर्देवी अबलांसमोर तुला मी' प्रथम आपल्या पापांचा पाढा
वाचावयाला लावणार आणि तिथें राजवाड्यांतील य:कश्चित् दासींकडून
तुझी' खेंटरफुजा बांधून मग तुझा कडेलोट करणार. ”
तंजावरांत 2१५५७
सय कनवता नाचर
मोहनेच्या तोंडचें वाक्य पुरें होतें न होतें तोंच मागाहून कोणीतरी
चार पांच माणसें धांवत तेथें आलीं. “बुडत्याला काडीचा आधार या
न्यायाने चंदासाहेबाला वाटलें कौ, आपणाला तारावयाला कोणी आले
काय! मोहना स्तब्धपणें तिकडे पाहूं लागली तोंच तीं माणसे अगदीं
जवळ आलीं.
मोहनेला संशय आला कोौं आपण चंदासाहेबाचा असा शेवट करण्याचें
योजिले आहें हें षट्कर्णी झालें असावें व आपल्यांतीलच कांहीं खाली मंडळी त्या
गोष्टीला प्रतिबंध करण्याला आली असावी. तिनें आपला आतांचा बेत मनांतल्या
मनांत रद्द करून घाईघाईने शिपायांना पुन्हां आज्ञा केली, “ पहातां काय? या.
क्षणाला या चांडाळाला महादेवाच्या कड्यावरून खालीं लोटून द्या- य
हुकुभाची तामिली करण्यासाठीं शिवाई पुढें सरसावणार तोंच मागाहून
येणाऱया मंडळींपैकीं एकानें धांवत पुढें येऊन सांगितलें, ' हां हां ! स्र-
दारसाहेब, आपली आज्ञा कृपा करून मागे घ्या. ह्या राजबंद्याला आजच
मारावयाचें नाहीं असा मुरारराव घोरपडे, रघूजी भोंसले वगेरे खाशा मंड-
ळींचा सक्त हुकूम असतांना तुम्हीं हें काय आरंभिले आहे? ”
चंदासाहेबाला प्रथम जी एक आश्या वाटत होती तीही आतां वाटेनाशी झाली.
“मराठे आपणाला तूत जिवंत ठेवणार तें एवढ्याचसाठीं का? कीं कर्नाटकांतील
विसकटलेल्या राजकारणाची घडी नीट बसविण्याच्या कामीं शक्य तेवढा
आपला उपयोग करून घ्यावयाचा, आणि मग मार्गातून आपला कांटा दूर
करावयाचा ? ” ही शंका आकाशवाणी सारखी सत्य होती. त्याचें प्रत्यंतर खुद
त्याला दुसऱ्याच क्षणाला एंकावयाला मिळालें. मोहना त्या अज्ञात माण-
साच्या. विरोधामुळे कांहींशी रागावून खवळून उद्गारली, “ माझ्या भगीरथ
प्रयत्नांनी गळाला अडकलेल्या माह्यावर मराठ्यांचा खरें पाहूं जातां
कांहींच हक्क पोंचत नाहीं. रक्ताला रक्त आणि सूडाला प्रतिसूड हा जगाचा
न्याय आहे. मो या सावजाला या क्षणीं जिवंत ठेवायला तयार नाहीं.
पूर्वीचा तोच माणूस पुन्हां उद्गारला, “ 8! सरदारसाहेब, हा आत-
तायीपणा चांगला नाहीं. तुम्हांला तेवढा हा शत्रुसा भासतो आणि मराठे
त्याला मित्र समजून कर्नाटकचा नबाब करणार आहेत असें थोडेंच आहे!
परंतु आपल्या ध्यानांत आलेंच असेल कौं सरदारसाहेब, आपल्या धंद्यांत
२ व
२५८ पेशवाईचें मन्वंतर
नि्ढावळेला कुशळ कसाई, कसाईखान्यांत दुभत्या गाईच्या मानेवरून सुरी
फिरविण्यापूर्वी तिच्या स्तनांतील उरलें-सुरलें घोंटभर दूध देखीळ काढून
घ्यावयाला कधीं विसरत नाहीं. माझी उपमा कांहींशी अस्थानी आहे खरी.
मराठे कसाई वृत्तीचे मुळींच नाहींत. परंतु त्यांना जर ह्या कलिपुरुषाच्या
जीविताचें त्याच्या मरणापेक्षांही जास्त मोल मिळावयाचें असेल, तर त्याला
कोणीं कशाला आड यावें! ”
चंदासाहेबाची स्थिति ते उद्गार ऐकून मेल्याहनही मेल्यासारखी झाली.
यांत मराठ्यांचा कांहीं तरी विशिष्ट हेतु असला पाहिजे व त्यांनीं संकल्पिलेल्या
राष्ट्रकार्याला आपण आततायीप्रमाणें खो घालणें बरे नाहीं, असें मोहनला
वाटून तीही किचित् सौम्य वृत्ति धरून प्रत्युत्तरादाखल उद्गारली, “ खाशा
मराठ्यांचीच तशी आज्ञा आहे त्याला माझा नाइलाज आहे. मींही आजवर
जे जे प्रयत्न केले-तुमच्या मुराररावांना आणि रघोजी भोंसल्यांना तुम्ही
सांगा कों मोहना आजवर निर्मम भावनेनें ह्या देशकंटकाला धुळीला मिळ-
वण्यासाठीं अहूनिश झटली ती केवळ वैयक्तिक सूड घेण्यासाठी नव्हे, तर
राष्ट्राच्या कल्याणासाठींच होय. ” ती एकाएकीं थांबली. तिच्या मनांतून
बरेंच बोलावयाचे होतें. परंतु तो ओघ एकाएकीं फल्गू नदीप्रमार्णे गुप्त
झाला. ती एकदम लाजेनें खालीं पाहुं लागली.
तिची अशी अवस्था कां झाली याचें कारण असें की, आजवर तीजी
कर्नाटकच्या मोहिमेंत नाना स्वरूपांनीं स्वैरसंचार करीत आली, ती बहुघा
मोहून व निहाळसिंग या नांवांनींच; व तीं नांवें सर्वांच्या परिचयाचीं होतीं
मोहनेला तत्त्वतः आतां कोणीच आठवीत नव्हृता. कारण मोहूना या जगाला
सोडून गेल्याचे कोणत्याही कारणामुळें असो, सर्वांना विदित झालें होतें. त्या
रहस्याचा स्फोट आपल्याच तोंडाने झाला, व आतां आपणाला अजिबात
निराळ्या परिस्थितींत वावरावें लागणार, था विचारांनींच मोहनेला लाज-
विले. लज्जाविनयसंपन्नता हाच स्त्रियांचा नेसगिक धर्म व हेंच त्यांचें
नेसगिक सौंदर्य होय. बिचारी मोहना तरी त्या नैसगिक नियमाला अपवाद
कशी ठरावी'!
बब्बर कबर
श्रे 1.33 डी |
लवकरच चंदासाहेबाला त्रिचनापल्लीहून तंजावर येथें आणण्यांत आलें,
' तेजावरांत २१५९
४7४५५ /0१५९ ७७४४५४४ ७ ४१५ ४८०४४४ ४ ४४ ४0%
बरा%०”%/४./”%- €४५./१%./९. “४..४0४..४० / ७५११. 20९..४९. ५९७ /९४./0९ -/१४.,/0 ४४.४7.» २./९./०९. .४ ४८५९९०७९५४. ४.४७ ../४४.. ४८५०४५. ७४%... »0%० ५0५.”
वव एक दिवस त्याचा न्याय करण्यासाठीं दरबार भरविण्यांत आला. प्रतार्पासह
महाराज अर्थातच त्या दरबाराचे मुख्य अधिपति होते; व मुरारराव घोरपडे,
रघूजी भोंसले वगेरे मातबर मराठे वीर आपापल्या दर्ज्याप्रमाणें महाराजांच्या
डाव्या-उजव्या बाजूला बसले होते. दरबार प्रतापसिहमहाराजांच्या दर-
बारमहालांतच भरविण्यांते आला होता. जगाला दिसावयाला तो विजय
जरी प्रतापसिहमहाराजांचा होता, तरी तत्त्वत: विजयश्रीर्ने मुरारराव घोर-
पडे, रघूजी भोंसले वगेरे मराठ्यांनाच वरिलें होतें. त्यांच्या पराक्रमा-
शिवाय अर्थात् छत्रपति शाहूमहाराजांच्या साह्याशिवाय आपला तरणोपाय
नव्ह्ता हें ध्यानीं घेऊन प्रतापसिहमहाराजांनीं सर्वे खाशा मराठे सरदारांना
त्या दरबारांत पहिल्या ओळींत मान्यतेचीं स्थाने दिलीं होतीं. सखोजी
वगेरे महाराजांच्या दरबारांतील खाद्यांना दुसऱ्या ओळींत स्थान मिळालें
होतें. मीरअसद, सफदरअल्ली वगेरे शत्रपक्षाकडील पुढार्यांनाही त्या दर-
बारांत मान्यतेचें स्थान मिळालें होतें, परंतु याचें कारण उघड होतें. कांट्यानें
कांटा काढण्यासाठी मराठ्यांनीं ह्या दोन कळसूत्री बाहुल्यांचा प्रस्तुतच्या
मोहिमेच्या कामीं उपयोग करून घेतला होता व त्याबहल त्यांचा हा तोंड-
देखला गौरव चालला होता. ह्या सोहळ्यांत मानाजीराव सामील असलेला
मात्र दिसत नव्हता.
प्रस्तुतच्या मोहिमेत मराठ्यांच्या पहिल्या हल्ल्यांतच नबाबाचा पक्ष
नामोहरम झाला व दमलचेरीच्या घाटांतील तुंबळ युद्धांत नबाबाच्या वर्च-
स्वाला मूठमाती मिळाली, तेव्हां त्या वठलेल्या वृक्षावर जीव धरून राहिलेलीं
जीं कांहीं बांडगुळे मराठ्यांच्या हातीं लागलीं त्यांतीलच सफदरअल्ली व
मीरअसद हीं दोन माणसें होतीं. खरें पाहूं जातां नामुष्कीचा असा तह मराठ्यांशी
करून ते दोघेही पूर्वीच मराठ्यांच्या ताटाखालील मांजरं बनले होते, व
त्यांचा दरबारांत मानमरातब वगेरे ठेवून सध्यां जे देखतभुलीचे देव्हारे
माजविण्यांत' येत होते, त्याचा अ्थेही' आपल्या ताटांखालील मांजरांचे लाड
पुरविण्यापेक्षां निराळा कांहीं नव्हता.
असो. बंदिवान चंदासाहेब तेर्थे प्रविष्ट होतांच एकवार विषण्ण चित्ताने
सभोंवार पाहुं लागला तेव्हां प्रथमच त्याची आणि मीरअसद व सफदरअल्ली
या दोघांची दृष्टादृष्ट झाली. ते दोघे त्याला पाहून कुत्सितपणानें हंसले.
रळ पेशवाईचे मन्वंतर
>“*८०"४५-४८/*-€ “"४/४* “४४१ » १५८७0 कब्जा
त्याबरोबर चंदासाहेबाने तिरस्काराने खालीं मान घातली. त्या दोघांच्या
हसण्याचा अर्थ मुंगी होऊन साखर खावी आणि हत्ती होऊन लाकडे फोडावी
असा होता, तर चंदासाहेबाच्या हुंसण्याचा अर्थ “* धन्याच्या दारीं ठाणबंदी
असलेला कुत्रा कितीही' ऐषआराम भोगीत असला तरी त्याला वनराजाची
योग्यता कधींच यावयाची नाहीं ' असा होता. तो मनांतून त्या दोघांना
फितुरीबद्दल सहुस्रश: दोष देत होता
चंदासाहेब तेर्थे प्रविष्ट होतांच सर्व सभासदांची दष्टि एकदम त्याच्याकडे
वेधली गेली. तसें होणें सहाजिकच होतें. अनेकांना-नळ्ळे बहुतेकांना त्याची
ती शोचनीय अवस्था पाहून आनंदच वाटला. परंतु मुरारराव घोरपड्यांनीं
मात्र लगेच आपल्या बेठकोवरून उठन प्रतापसिह महाराजांना न म्रतापूर्वक
विनंति केली, “ महाराजांनीं चंदासाहेबाला बंधमक्त करावें व त्यांना योग्य
तो मान द्यावा. एकानें गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरू मारणे वरें नव्हे.”
क २-५ /४- फट ऱ्“
प्रकरण ३५ बे
दरबारांतील प्रकार
9 (2३. प्रतापसिहमहाराजांनी' चंदासाहेबाला बंधमुक्त करण्याचा हुकूम केला
व त्याला आपल्या जवळ सामान्य मानकऱ्यांमध्येंच पण अलग असें
स्थान दिलें. ही सारी कारवाई अर्थातच मुरारराव घोरपडे वगैरे खाशा
मराठ्यांची होती. दरवेशी' अस्वलाला खेळवतो त्याप्रमाणें त्यांनीं चंदासाहे
बाचा हा खेळ चालविला होता. परंतु चंदासाहेबाला मात्र कदाचित वाटलें
असेल कीं आपली ही जी विटंबना होत आहे तिला खाक्या मराठ्यांची मान्यता
नाहीं, व म्हणूनच अजूनही आपणाला त्यांच्या साह्यानें वर डोकें काढण्याला
वाव आहे.
चेंचून अर्धेवट जिवंत सोडलेल्या सर्पाला सुडाशिवाय दुसरें काय सुचणार!
'परंतु चंदासाहेबाला आपलें मनोगत तेथें उघड बोलून दाखवितां येणें शक्यच
नव्हतें. थोड्याच वेळांत रीतसर दरबारी कामाला सुरवात झाली. दरबारी
रीतिरिवाजाप्रमाणें सर्वे नित्यनेमित्तिक शिष्टाचार, मुजरे वगेरे पार पडल्यावर
मुरारराव घोरपड्यांनीं रघूजी भोंसल्यांच्या सांगण्यावरून साताऱ्याहून
छत्रपतींकडून आलेला खलिता भर दरबारांत वाचन दाखविला. त्याचा
आशय, चंदासाहेबाला राजकीय केदी म्हणून समजण्यांत येऊन त्याला आजन्म
कैद भोगण्यासाठी सातार्याला पाठवून द्यावे, असा होता. प्रतापसिहमहाराजांना
अर्थातच तो खलिता शिरसावंद्य होता. चंदासाहेबानें मात्र या पूर्वीच कांहीं
दिवसांपासून आपली व आपल्या मुलांची मुक्तता होण्यासाठीं नानापरींचे
प्रयत्न चालविले होते, व त्याबद्दल मराठ्यांना आठ लाखांची जबर खंडणीही
देऊं केली होती. त्याच गोष्टीचा पुनरुच्चार करून तो दरबारांत उद्गारला,
मराठ्यांना पाहिजे असेल तर मी आठ लाखांपेक्षा जास्त देखील खंडणी
द्यावयाळा तयार आहें. पंरंतु त्यांनीं मला आणि माझ्या मलाला बंधमक््त
'करावें. एवढें झाल्यास मी त्यांच्याशीं दोस्तीचा तह॒ करीन व उभथतांच्या
साह्याने एकमेकांना भावी राजकारणाचे प्रश्न अधिक सलोख्याने सोडवितां
येतील शज
२६२ पेशवारईर्चे मन्वंतर
परंतु चंदासाहेबाच्या या शब्दावर तेथें कोण विश्वास ठेवणार ! ताहों
म्हणावयाला बाबूजी नाईकासारखा सावकारीवर महत्त्वाला चढलेला एखादा
भिक्षुक मात्र पेक्याच्या राशींचा भाळावयाचा ! नाईक स्वत: त्या दरबारांत
हजर होतेच. ते एकदां भोसल्यांच्या व लगेच मुराररावांच्या कानाशीं लागून
कुजबुजले, “चिंदासाहेब जर पैसा द्यावयाला तयार आहे, तर त्याच्याकडून
दहा-वीस लाख रुपये धेऊन त्याला सोडून द्या ना कां? सर्पाला दांत पाडून
सोडला म्हणजे त्याचें भय मुळींच रहात नाहीं. आपणालाही' तिकडे नित्य
नव्या नव्या स्वार््यांपायीं खर्चामुळे हेराणगत होते; ती अडचण दहा वीस
लाख मिळाले तर तेवढ्यानेंच मिटेल. 7
रघूजी भोंसले हे हरएक कामांत नाइकांचे साथीदार असल्यामुळें ते त्यांना
कधींही कोणत्याही चुकीबद्दल वर्मी झोंबेल असें बोलत नसत. परंतु मुरार-
रावांना त्यांचा कसला मुलाहिजा ! ज्याला राजकारणाचा श्रीगणेशाही
कळत नाहीं, शोर्याचा स्पर्शही ज्याला कधी झाला नाहीं, असला नाईक हा
एक भिक्षुकी पेश्ाचा सावकार गडी आहे, व तो निष्कारण भोसल्यांच्या
छायेखालीं उभा राहून हरएक राजकारणांत अगांतुकपणें लुडबूड करतो,
ह मुराररावानीं अनेकदां पाहिलें होतें व तयाबद्दल त्यांना तिरस्कारही वाटूं
लागला होता. त्याच नाइकांच्या तोंडाला चंदासाहेबानें देऊं केलेली जबर
खंडणी ऐकून पैशासाठीं पाणी सुटावे यांत मुराररावांना नवल जरी वाटलें
नाहीं, तरी अत्यंत तिरस्कार मात्र वाटला. ते नाइकांच्या कानाशीं लागून
खोंचकपणें हळूच म्हणाले, “पण नाईक, ते दहा-वीस लाख रुपये दक्षणा
म्हणून तुमच्या भिक्षुकी सदरांत जमा होऊन तुमच्या सावकारी पिशवीचे
0५१. ७४०. ४ ७.४१. ७४%
तो प्रसंगच तेरे चूप मेरे चूप असा होता. मनांतल्या मनांत गाळ चोळीत.
स्वस्थ बसण्याशिवाय व जणुं काय आपलो फजिती झालीच नाहीं असें दर्श-
विण्यासाठीं उसने हंसे चेहऱ्यावर दर्शविल्याशिवाय त्यांना त्यावेळीं गत्यंतरच
पुररराव जरी हळू बोलले तरी रघूजी भोंसल्यांना व जवळच्या कांहीं
मंडळींना ते ऐकू गेलें. त्यांनाही त्यामुळें हंसू आलें. परंतु एक तर तो दरबार
दरबारांतील प्रकार २६२
व दुसरें, नाइक हें एक बडे प्रस्थ, म्हणून मोठ्यातें कोणीही हंसलें नाहीं
नाइकांनीं मात्र खाई त्याला खवखवे या न्यायानें चोरट्या नजरेनें आजूबाजूला
पाहिलें, तेव्हां तो एकंदर प्रकार त्यांच्या ध्यानीं आला. त्याबरोबर त्यांनीं
काढेंचिराईत प्याल्यासारखें तोंड करून मान जी खालीं घातली ती कांहीं क्षण
वर केलीच नाहीं.
प्रतापसिहमहाराजांनीं चंदासाहेबाची' विनंति ऐकून अभिप्रायार्थ मुरारराव
व रघूजी भोंसले यांच्याकडे नजर वळविली. त्या पहाण्याचा अर्थ उघड
उघडच ' पुढें काय करावयाचें ' असा प्रश्नार्थक होता. चंदासाहेबारचे भवि-
तव्य सववस्वी साताऱ्याकडून आलेल्या त्या दोन मराठे मुृत्सद्यांच्या धोरणाने
ठरविणें हेंच प्रतापसिहमहाराजांचें त्या वेळचें कतव्य होतें, व तेही राज्य-
'मदाच्या धुंदींत आपल्या कतेव्यांत कुचराई करण्याला तयार नव्हते. मुरारराव
व रघूजी भोंसले या दोघांनींही आपसांत चार दोन शब्दांत कांहींतरी खलबत
करून पुढें काय करावयाचें तें ठरविलें, व चंदासाहेबाच्या विनंतीला मुरार-
रावांनीं उठून उत्तर दिलें, “ आम्हांला चंदासाहेबांची विनंति मान्य करतां
येती तर तसें करण्यांत फार आनंद वाटला असता. परंतु महाराजांची आज्ञा,
तिथें आमचा नाइलाज आहे. शिवाय चंदासाहेब व त्यांचे चिरंजीव यांच्या
जीविताची' किमत आम्हांला इतकी अमोल वाटते कीं आठ लाखांनींच काय
पण दहा-वीस लाखांनी देखील त्या किमतीला मर्यादा घालणें म्हणजे त्या
थोर दर्जाच्या बापलेकांचा अपमान करणें होय. ”
मुराररावांचे ते डावपेंचाचे शब्द सोन्याच्या सुरीप्रमार्णे चंदासाहेबाच्या
जिव्हारी जाऊन झोंबले. तरी पण त्याचा स्पष्ट अर्थे त्या मूढाच्या ध्यानीं
आला नाहीं. तो असें समजला कीं मुराररावांना ही संधी साधून आपणाला
पिळून निघेल तेवढा पैसा काढावयाचा आहे. तो किचित् रागाच्या भरांत
उद्गारला, “ मला ह्या डावपेंचाचा अर्थ कळतो. डोईजड खंडणी मागून
मला भिकारी बनवून सोडण्याचा घोरपड्यांचा उद्देश यांत स्पष्ट दिसून
येत आहे. पण पिजऱ्यांत कोंडल्या गेलेल्या सिहाला खडे मारण्यांत त्यांना जर
एवढा पुरुषार्थ वाटतो तर माझें कांहीं म्हणणें नाहीं त्यांनीं स्पष्ट शब्दांत
किती खंडणी पाहिजे हें मला सांगावें, म्हणजे मी त्याचा विचार करूं शकेन
मात्र पेश्शासाठीं माणुसकीला हरताळ फांसण्याइतका मराठ्यांचा बाणा कच्चा
२६४ पेशवाईचे मन्वंतर
आहे, हें मला आज कळून चुकले, ” |
केवळ संतापाच्या दर्पांत चेंदासाहेब हें बोलत आहे, हें मुरारराव, भोसले
'वेगेरे मर्व मंडळींना तेव्हांच कळून चुकलें व सर्वांना त्याची चीडही आली.
पडत्या काळीं देखील जे वीराग्रणी कोणाचीं असलीं अरेरावीची उणीं उत्तरें
सहून करणारे नव्हते, ते आज विजयश्रीचे धनी शोभत असतां चेदासाहेबाची
ती दर्योकिति कशी सहन करणार ? दरबारचा सर्व रंग चंदासाहेबाच्या
तया उद्गारांनीं पाळटल्याचें मराठे मानकऱ्यांच्या चर्येवरून उघडपणें ओळसतां
येत होतें. त्या निषेधवर भावनेला रघूजी भोसल्यांच्या वाणीनें तोंड फुटले.
तते एकदम संतापाने उभे राहिले व आपल्या नेहमोंच्या खड्या आवाजांत बोलले,
“ मराठ्यांचा बाणा काय आहे हें अजूनही ह्या मराठ्यांच्या चरणधुळींत
लोळत पडलेल्या उपऱ्या नबाबांना समजलेले नाहों. पडलों तरी माझेंच नाक
चर हा बाणा ज्या आरंभ--शूरांचा, त्या असल्या नबाबी' खाक्याच्या झनब्बूंना
मराठी बाण्याची ओळख पटण्याइतको' त्यांची पाचताच नाहीं. मराठ्यांनी
जिथें खुद्द आपले प्रतिस्पर्धी चरणधुळींत लोळवले, तिथें त्यांची संपत्ति त्यांनीं
मनांत आणल्यास टुटून आणण्याला त्यांना कितीसा उज्लीर ! पण जितक्या अरे-
रावीने हा धनलोभाचा आरोप मराठ्यांवर करण्यांत आला, तितवयाच
भपैर जगवून आमच्या अजबखान्यांतील प्रेक्षणीय वस्तु करून ठेवणार आहों.
आप्त आहे. निदान बेमुवतखोरपणानें बोलून मराठ्यांची मेहेरबानी कोणा-
भ्षातारा राजधानींतील बंदिखान्याची हटवा चाखत खितपत पडलेच पाहिजे. ”
“एकूण हा सारा सूडाचा मामला आहे तर! मग तेथें माझा नाइलाज आहे.
परंतु हें मराठ्यांचे कर्तव्य विशवासघाताचें होईल व त्यांच्या सच्चेपणाला
यामुळें चांगलाच बाट लागेल, एवढें त्यांनीं ध्यानांत ठेवावें. मला माझ्या
योग्यतेप्रमाणें वागविण्यांत येईल या भरंवशानेंच मी मराठ्यांच्या स्वाधीन
क्षालों. असल्या नामुष्कोच्या स्थितींत राहण्याचे माझ्या नशिबी आहे हें जर
दरबारांतील प्रकार २६५
मला' पूर्वीच कळतें, तर मीं अश्या प्रतिस्पर्ध्यांची ताबेदारी पत्करण्यापेक्षां
धारातीर्थी मरण हजार पटीनें सुखार्चे मानलें असतें. ” चंदासाहेब आवेशा
आवेद्यानें म्हणाला.
“ हें पहा चंदासाहेब, तुम्ही आमच्या हातीं खुषीने लागलां नाहीं, तर
नाइलाजामुळें तुम्हांला आमच्यापुढे शरण येणें भाग पडलें. हा खरा प्रकार
आमच्यापासून लपवून ठेवून असली वाष्कळ वल्गना तुम्हीं कितीही केली
-तरी तिला एथे अरण्यरुदनाइतकेंही मोळ मिळणार नाहीं. ”
मुराररावांचें पुरतेंपणीं बोलून होण्यापूर्वीच दरबारांतील स्त्रियांच्या
सज्जांतून चिकाच्या पडद्याआडून अकस्मात् उद्गार निघाले, “ इतका जिवाचा
उदारपणा तुमच्या अंगीं होता, तर त्रिचनापल्लीच्या किल्ल्यांत यःकरिचत्
एका स्त्रीसमोर तुम्ही एखाद्या कोंकराप्रमाणें भागबाईसारखी मान कां नम-
विली ? एखाद्या लतकोडय्या कुत्र्याप्रमाणें तुम्ही त्या स्त्रीच्या पार्या
कां पडलां? ?”
प्रकरण ३६ वें
महाराजसुध्दां मोहून गेले
शट ""१""---_"०२-८४५*४ २५५४८४४४४0 क्ट
ल्कापात झाल्याप्रमाणे त्या अज्ञात् उद््गारांचा दरबारावर परिणाम
झाला. तो वागुबाण कोठून निघाला हें जरी सर्वांना कळलें नाहीं तरी
चंदासाहेबाला कळलें; व आणखीही कांहीं खाशा मराठ्यांना कळलें असेल
वाचकांनाही मोहनेनें त्रिचनापल्लीच्या किल्यांत चंदासाहेबाला देहान्त
शासन देण्यासाठीं रचिलेल्या व्यहाची आठवणं असेलच
मरारराव त्या अनाहूत उद्गारांकडे बळेंच दुलंक्ष करून पुढें म्हणाले,
“ आणखी असें पहा, घोडा पेंड खातो तो आपल्या गुणानें खातो. परंतु
सर्पाच्या विषारी मनोवृत्तीप्रमाणें त्याच्या शरीराची स्चनाही विधात्याने
अशी विचित्र केलेली असते कीं त्याला दुधानें पोसले तरी त्या दुधाचे त्याच्या
पोटीं विषच बनावयाचें. तुम्हांला केद झाल्या दिवसापासून आजवर खरो-
खरच आम्ही फार मान्यतेने वागवीत आलों आहोंत. परंतु तुम्ही आजच्या
या भर दरबारांत अपराधी या नात्यानें उभे असतां, आमचा म्हणजे पर्यायातें
छत्रपतींच्या सत्तेचा उण्या-दुण्या शब्दांनी उपमर्द चालविला आहे; त्याबद्दल
तुम्हांला शासन करणें योग्य आहे. दुर्दैवाची गोष्ट ही कीं, छत्रपती सरकारांचा
हुकूम आपणाला बंदिवान करून साताऱ्याला आणावें असा आहे, त्याऐवजी
आपला न्याय-मनसुभा करण्याचा अधिकार जर आमच्या हातीं असता,
निदान महाराजांचा हुकूम जर आमच्या हातीं आला नसता, तर तुमची दशा
यावेळीं अगदीं वेगळी झाली असती. आम्हांला शिळ्या कढीला ऊत आणा-
वयाचा नाहीं. परंतु तुम्ही मराठ्यांवर गेरविश्वासूपणाचा छद्मी आरोप
पावलोपावली करीत आहां, म्हणून तुम्हांला असें कठोर शब्दांनी विचारणे
प्राप्त आहे कीं विश्वास ही चीज तुमच्या गांवीं तरी आहे काय? त्रिचना-
पल्लीच्या विधवा राणीला तुम्हीं फसवून त्रिचनापल्लीचें राज्य बळकावले
तेव्हां विश्वास तुम्हांला कसा आठवला नाहीं? ”
महाराजसुद्धां मोहून गेळे २६७
आतां हें प्रकरण पुन्हां विकोपाला जाणार व चंदासाहेबाची अवस्था फार
बिकट होणार असें जरी सर्वांना वाटलें, तरी त्याबद्दल थोडीफार हुरहुर
ज्यांच्या मनाला वाटणें शक्य होतें असे मीरअसद व सफ्दरअल्ली' हे दोघेच
काय ते त्या ठिकाणीं होते. त्यांना म्हणजे तरी मनांतून चंदासाहेबाविषयीं
प्रेम वाटत होतें असें नाहीं, परंतु पाण्यापेक्षा रक्ताचा संबंध जवळचा असतो
या न्यायानें ते मुसलमान व तो मुसलमान 'न जाणो, अल्लाची खर झाली
तर आज ना उद्यां नबाबाच्या पक्षाला जोर लागेल त्या वेळीं आपण मराठी
सत्तेचीं पाळें-मुळें कर्नाटकांतून खणून काढूं. त्से झाल्यास नबाबशाही
पुन्हां जारी करण्याच्या कामीं चंदासाहेवाचा आपणाला फार उपयोग होईल
अश्या भविष्य काळाविषयीं ते दोघे मनांत मांडे चुरीत होते. सफदरअल्ली त्या
चिघळूं लागलेल्या परिस्थितीला इष्ट अशी कलाटणी देण्याच्या हेतूनें प्रेरित
होऊन मध्येंच उभा राहिला व मुरारराव, रघूजी भोंसळे आणि प्रता्पसहू
महाराज वगेरे सर्वांना उद्देशन म्हणाला, “आपण चंदासाहेबांची सध्यांची
दुबळी स्थिति लक्षांत आणा. त्यांच्याप्रमाणे एके काळीं वेभवशिखरावर
चढलेला पण दुर्दैवाच्या फेऱ्यामुळे आज आपत्तीच्या गर्तेत पडलेला कोणता
माणूस अशा वेळीं मनानें स्थिर राहूं शकेळ? त्यांच्या तोंडून अपशब्द निघाले
असतील तर त्याबद्दल आम्ही आपली माफी मागतो. ”
तोंच चंदासाहेब आपल्या जागेवरून सर्पासारखा फुत्कारत उद्गारला,
“ असल्या कम्बख्त् नामर्दांची शिष्टाई मळा नको आहे. असल्या शिष्टाईवर
जगण्यापेक्षा भला जगण्याचा मोह आवरेनासा झाला तर मी एकदां सोडून
शंभरदां या शर मराठ्यांच्या पायांवर मस्तक ठेवून जीवदयेची भीक मागन.
वीरानें वीरापाशीं दयेची याचना करण्यांत लांच्छन नाहो. परतु अशा नामद
स्वकीयांकडून आपली अशा वेळीं तरफदारी करून घेणें हें मात्र खरोखरच
मला लांच्छन वाटतें.
सफदरअल्ली' पुन्हां म्हणाला, “ चंदासाहेब, आपला दगडाखालीं सांपडलेला
होत हलके हलके कसा काढून घ्यावा ही कला मराठ्यांच्या सहवासापासून
सर्वांनी शिकावी. तुम्ही आमच्या मध्यस्थीचा असा भलताच अर्थ करू नका
आतां ह्या कंटाळवाण्या बडबडीचा एकदां कसाबसा शेवट व्हावा या
उद्देशानें प्रतापसिहमहाराज म्हणाळे, “ परंतु ह्या कोणत्याच गोष्टी येथें
२््ट पेशवाईचें मन्वंतर
य म्मा्याच्या > अ अ “भ ही टीत हीच हीच हळ न्त्य ७४-४० ५११ १ क, कटक "११ ४१ “4 ० 2५. . |... द. ह. ५,९१५. ५४-४१५./१/१..५११..२१
खोलण्याचें कारण नाहीं. शब्दाने शब्द वाढतो व कोळसा उगाळीत बसलें
कीं काळेंच निघतें. यास्तव या विषयावर बोलण्याची आम्ही सर्वांनाच मना
करितों. साताऱ्याहून परमपुज्य श्रीमान् शाहुमहाराजांचें आज्ञापत्र आलें
आहे, तें आम्हांला शिरसावंचय आहे; व त्या आज्ञापत्रानुसार आम्ही चंदासाहे-
'बांना राजबंदी म्हणून एथल्या सातारकर खाशा मराठ्यांच्या स्वाधीन
'करीत आहों. ” एवढें बोलून त्यांनीं लगेच शस्तुतच्या मोहिमेत पराक्रम गाज-
विलेल्या वीरांचे यथोचित् सन्मान करण्याचें कार्य सुरू केलें. प्रथम रघूजी
भोंसले व मुरारराव घोरपडे यांचा वस्त्रालंकार व रत्नखचित तलवारी
देऊन बहुमान करण्यांत आला, के त्यानंतर क्रमाक्रमाने एकेकाचा यथोचित्
गौरव झाला. गाड्याबरोबर नळ्याला याचा या न्यायाने बाबूजी नाइकां-
नाही त्या वहात्या गंगेत हात धुवून घेतां आला हें निराळें सांगावयाला नकोच.
'मीरअसद आणि सफ्दरअल्ली' या दोघांनाही वस्त्रालंकार अर्पण करण्यांत. आले,
व त्यांनीं प्रतापसिह महाराजांच्या सिंहासनासमोर येऊन त्रिवार मुजरे करून
त्यांच्याशीं आजन्म राजनिष्ठ राहण्याची शपथ वाहिली. तो विचित्र प्रसंग
'पाहून चंदासाहेबाच्या नेत्रांतून मात्र खळखळ अश्वु वहात होते. राजसत्तेचा
त्याचा मद अजून जिरला नव्हता. पुसल्मान हेच हिंदुस्थानांतील खरे राज्य-
कर्त आहेत, व उभ्या कनटिकांत नबाबाची राजसत्ता हीच खरी राजसत्ता
असून इतर सर्वे हिंदु सत्ताधीश हे पाण्यावरील बुडबुड्याप्रमाणें अश्याइवत्
आहेत, अश्या घमेंडीने आजवर तो वागत आला होता. हळुहळू सर्व कर्नाटकच
काय, पण साधल्यास आणखीही भुडूस पादाक्रान्त करून दिल्लीच्या मोड-
कळत्या बादशाहीपर्यंत आपल्या सामर्थ्याचा हात पोंचवून, साधल्यास दिल्लीच्या
तक््तावर विराजमान होण्यापर्यंत त्याच्या महत्त्वाकांक्षेची उडी होती. एवढा
ज्याचा दुदंमनीय अभिमान त्यालाच मीरअसद व सफ्दरअल्ली' ह्या नबाबाच्या
प्रभावळींतील खाद्या राजपुरुषांनीं काफरांच्या तक्तासमोर राजनिष्ठेची
शपथ घेतांना पाहून रडूं कोसळल्यास त्यांत कांहीं आश्चर्य नाहीं.
असो. याप्रमाणें तो दरबार बरखास्त झाला. चंदासाहेब आतां कायदे-
शीर रीतीनें मराठ्यांच्या स्वोधीन झाला, व त्याला आतां सातार््याकडे रवाना
करण्यांत येणार हेंही सर्वांना कळून चुकलें. अंमळश्यानें दरबार बरखास्त
होतांच तेथळें व सभोंवारचें वातावरण मराठ्यांच्या विजयसूचक उत्साही
महाराजसुद्धां मोडून गेले २६९
४£*% ०५.४० 70%. &% “५0% -€% /0५ ४0१ €% ७४,५४४ 0 अ "१९ ९४७ “0४ “ह. 7 ५ /“€* “7 “५ १४५ ४०-११. ७ »”%. ./१२./ '* २४% /0% ४१%,» .् 70४. »_ ४२ /1-./ /५ हा ः
मंगळ जयजयकाराने दुमदुमून गेले. विशेषतः: मुरारराव घोरपड्यांच्या
अद्वितीय - पराक्रमाबद्दल सर्वांनी एकमुखानें त्यांच्या नांवा'चा धन्यतापुर्वक
एवढा प्रचंड जयघोष केला कीं मुराररावांनीं आनंदाच्या भरांत रघूजी भोंस-
ल्यांच्या कानाशीं लागून जातां जातां हळूच हंसत हंसत उद्गार काढले,
“ एवढा अपुर्वे मान-सन्मान जनतेकडून मिळविण्यासाठीं मी मृत्यूलादेखील
मिठी मारण्याला आनंदानें तयार होईन. युद्धाचा प्रसंग केव्हांही झाला
तरी अभ्रियच; परंतु या गौरवाच्या लाल्चीनें मनाला असें स्फुरण वाटूं लागतें
कों अविधांनीं आपलें उरलें सुरले बळ एकवटून कर्नाटकांत पुन्हां डोकें वर
काढावें, दिल्ली अटकेपर्यंतच्या त्यांच्या जातभाईनीं त्यांना कुमक करावी
आणि मीं पुन्हां रणांगणावर त्यांचा असाच खासा नक्षा उतरवून दिल्लीचे
बादशाही तक्त डळमळीत करून उखडन टाकावे.
रघूजी भोंसल्यांना देखील तो प्रकार आनंददायक वाटला. त्यांतल्या त्यांत
कोणाला जर किंचित् वाईट वाटलें असेल तर तें एकट्या परोत्कर्षासहिष्णू
नाइकांना |! बिचाऱ्याला मुराररावांचा तो अपूर्वे उत्कर्ष सहन ज्ञाला नाहीं!
परंतु त्यांत जगावेगळे असें कांहींच नाहीं. एखाद्या मनृष्याच्या ठायीं कतेब-
गारीची उणीव ज्या प्रमाणांत जास्त,त्या प्रमाणांत तो मनुष्य क्षुद्र वृत्तीचा
असावयाचाच; व तो नेहभीं दुसर्याच्या उत्कर्षाने दुःखी व्हावयाचाच
दरबार बरखास्त झाल्यावर इतभामाने सर्वे खासे आपापल्या निवास-
स्थानाकडं वळले. नगरांतील सुवासिनी स्त्रियांनी आपल्या सुशुंगारित
घरांच्या दरवाज्यांत ठायीं ठायीं उभे राहून त्यांना पंचारत्या ओंवाळल्या.
हा सर्वे प्रकार विजयोत्साहाळा अनुरूप असाच झाला, मात्र एकच जबरदस्त
जिज्ञासा जी दरबारांतील सर्वे लोकांच्या मनाला लागून राहिली होती ती
हो' कीं, अगदीं एंन वेळीं चंदासाहेबावर वाग्बाणांचा वर्षाव करणारी ती स्त्री
कोण असावी! वाचकांना ती मोहना होती, हें पूर्वीच माहीत आहे.
मात्र प्तापसिहमहाराजांना व इतर अनेकांना हें माहीत नसल्यामुळे सवेत्र
त्या एका गोष्टीची आपापसांत कुतूहेलपूर्वक चौकशी सुरू होती, व प्रतापसिह
महाराजांनींही आपल्या राजवाड्यांत जातांच अगोदर त्या धेर्यश्याली अज्ञात
स्त्रीची चौकशी सुरू केली. त्यांच्यासारख्या तरुण, वेभवश्याली, विलासी
व विजयी भूपालाच्या मनांत त्या स्त्रीविषयीं एखादी कोमल व मधुर लालसा
२ ७० पेशवाईचें मन्बंतर
९८४८९ ५-/४१.४१४६/४../४/९.४ ४.४४ ४९.४४. ९./१४..११./१९. १... ४./१%./४. ५१.१९. ९.५४.
उत्पन्न झाली असली तरी त्याबद्दल त्यांना दोषी कोण म्हणेल ! त्यांच्या
स्थितींतील कोणाही नरवराचें चित्त अश्या स्त्रोकडे वेधले जाणारच; अक्ली
अर्धांगी आपणाला असावी असें त्याला वाटणार! मात्र एकंदर शक््या-
शक्यतेचा विचार न करितां एखाद्या व्यक्तीविषयीं असली अभिलाषबुद्धि
भनांत धरणें जरा उतावळेपणाचे व साहसाचें दिसतें खरें. पण तें कांहीं कांहीं
भसंगीं ज्यांचें त्यांना शोभतेही.
प्रकरण ३७ वें
मधुर मीलन
2200103
मूपरू्पाराणी आणि कोयाजी घाटगे यांच्या लावालावीमुळें व स्वार्थसाध-
पणामुळ तजावरच्या राजधराण्यांत उसळलेलें दुष्ट वादळ आतां आपो-
आपच शांत झालें होते. ज्या मानाजीविषयीं प्रतापसिहमहाराजांनीं अप-
रूपाराणीच्या मायावी बोलांना बळी पडून करुणाराणीच्या नांवानें भलताच
संशय घेतला होता, तोच अखेर प्रस्तुतच्या हढाईत मराठ्यांच्या खांद्याला
खांदा भिडवून लढतां लढतां शरपंजरीं पडलेला पाहून त्याच्याविषयींचा
महाराजांच्या मनांतला रोषही बहुशः कमी झाला होता. तरी पण एक गोष्ट-
अत्यंत नाजूक व जिव्हाळ्याची अशी एक गोष्ट महाराजांच्या अंत:करणांत
शल्याप्रमाणें सलत होती, ती मानाजी व करुणा यांच्या परस्पर नात्याविष-
यींची' होय. अपरूपाराणी आणि कोयाजी यांचे देशद्रोही व राजद्रोही प्रयत्न
सव यथावत् चवाठ्यावर आल्यामुळे करुणाराणी व मानाजीराव' यांच्या
बाबतींत त्यांनीं उठविलेल्या भरमसाट कंड्याही केवळ खोडसाळपणाच्या व
देषमूलकच असल्या पाहिजेत, असें महाराजांचें मन त्यांना सांगे. पण ती
बाबच अशी नाजूक कीं-प्रत्यक्ष सहधमंचारिणीच्या नेतिक वर्तनाविषयीं
पतीच्या मनांत उत्पन्न झाळेला संशय दूर होणें महाकर्म कठीण असतें. त्यांतू-
नही खरोखरच स्थितप्रज्ञ महात्मे जे कोणी असतील, मनष्याची खरी पारख
ज्यांना असेल, आणि समतोल वत्तीनें सभोवारच्या परिस्थितीचा विचार
करण्याचें प्रशंसनीय आत्मबल ज्यांच्या ठायीं असेळ, अशांना आपल्या
सहवासांतील अर्धांगीची ओळख करून द्यावयाला दुसरें कोणी नको असतें.
पण त्याच गोष्टीचा तर येथें अभाव होता. कदाचित आपणावरून जगाची
पारख करण्याइतकी एककल्ली संवय जी सामान्यतः मनुष्यमात्राला निसर्गतः:
जडलेली असते ती संवय प्रतापसिहमहाराजांना असल्यामुळें कीं काय, त्यांना
वाटत असावें कों, सुंदर स्ंदर युवतींचा मोह जर आपल्याला आवरत नाहीं,
जितक्या सौंदर्यवती युवती आपल्या रंगमहालांत सहजासहजीं आणतां येतील
२७२ पेशवाईचे मन्वंतर
तितवया आणून त्यांच्याशीं नानापरींचे विलास करावे असें जर आपणाला
वाटतें, तर राणीलाही तिच्या परीनें तसेंच वाटत नसेल कश्यावरून !
जगामध्ये सुंदर, मोहक, चित्तवेधक असें कांहींही आढळले तरी
तें हवेहवेसे प्रत्येकाला वाटते... मानाजीरावासारखा तरुण, देखणा
पराक्रमी व मायाळू मित्र पहातांच राणीला त्याच्या विषयीं अभिलाष
उत्पन्न झाला तर तें इष्ट जरी नाहीं तरी संभवनीय खास होतें. मातर
म्हणून कांहीं महाराज करुणेला त्या संशयात्मक चुकीची क्षमा करा
वयाला तथार नव्ह्ते. “ती कशी झाली तरी स्वी आहे. ती माझी अर्धांगी
आहे. तिनें असले चाळे केलेले तिच्या आणि माझ्या उभय कुळांना तनरकांत
लोटणारे आहेत. ' अश्या मनांतल्या संणयपरिपाकारचे द्योतक म्हणून एखादा
भयंकर विचार क्षणोक्षणी महाराजांच्या मनांत तांडवनृत्य करूं लागावा व
त्यामुळे त्यांचें मन अत्यंत अस्वस्थ व्हावें. सभोवारच्या परिस्थितीवरून
करुणाराणीचा कोणताही अपराध नाहीं असेंही त्यांना एकदां वाटे. विशेषतः
प्रस्तुतच्या झगड्यांत यश मिळवून देण्यांत करुणाराणींचा देखील बराच
मोठा वांटा होता, हें भहाराजांना माहीत असल्यामुळे त्यांना इतकी कतेव्यतत्पर
राणी दुराचारी कशी असू शकेल असाही सारासार विचार त्यांच्या मनोभूमींत
अंकुरित होऊन वाढीला लागला होता. मानाजीरावासाखा निःसीम
राजनिष्ठ सेवक राजाशी अशी प्रतारगा कशी करूं्शा केळ! तरी पणतो'
संशय--ती राक्षसी संशय दूर होण्याला हीं सर्वे बाह्य उपकरणें अपुरीं पडल्या-
मुळे, महाराज आक्चेनें भवितव्याकडे डोळे लावून होते कीं, “ राणीच्या निर्दो-
षतेविधयीं कोणीतरी माझी सप्रमाण खातरजमा करून देऊं शकेल का? ”
मनुष्याचें मत म्हणजे अनेक बऱ्या-वाईट विचारांचा व कल्पनांचा अजब-
खाना होय. मनृष्य ज्या वेळीं तोंडाने एक गोष्ट बोलत असतो, त्या वेळीं
दुसऱ्या अनेक विरोधी गोष्टींचे काहुर त्याच्या मनांत माजलेळें असतें. प्रताप-
सिहमहाराजांनीं दरबार भरविला, दरबारांत सन्माननीयांचा मानसन्मान
झाला, तरी करुणाराणीविषयींचा विचार त्यांच्या सनांत जो अव्याहत डांचत
होता तो त्यामुळे शस शकला नाहीं. दरबार आटोपून राजवाड्यांत आल्यावर
देखील त्यांना त्या विचारांचा विसर पड़ं शकला नाहीं. उलट त्यांना आतां.
जरूर तेवढें मनःस्वास्थ्य . देवदयेनें लाभल्यामुळे तो सहर्धामिणीविषयींचा
“१/४%.५ ४१% /%.५/१७. ९४.५७.” “0 “0५ ,/7%//% “९,१११ ४ “0९ “चेक १.०१. ४१.४५...
मघर मीलन २७३
विचार त्यांना जास्त जास्त घेरूं पहात होता. तो सबंध दिवस जवळ जवळ
त्यांनीं त्या दारुण चिंतानलांत होरपळत कसाबसा काढला. अखेर आपली
सर्व सारासार विवेकशक्ति एकवटून त्यांनीं मनाचा धडा केला, “ बस्स!
आपण करुणेला बोलावून समक्ष या गोष्टीचा खुलासा विचारावा. ”
परतु हा महाराजांचा विचार कृतींत उतरण्यापुर्वीच त्या दिवशीं सर्यास्ताच्या
समयाला मानाजीराव आणि झ्ुंजारराव हे दोघे अकस्मात् महाराजांच्या
भेटीला आले. ते येतांच मानाजीरावानें शेल्यांत गुंडाळून आणलेल्या दोन
तलवारी महाराजांच्या पायांपाशी ठेवून म्हटले, “ महाराज, युद्धाचा शेवट
देवदयेनें आपल्यासारखा झाला आहे. हया युद्धांत आमच्याकडून घडलेली
फुल ना फुलाची' पाकळी सेवा महाराजांच्या वरणीं रुजू असेल, असा आम्हांला
भरंवसा आहे. आतां महाराजांच्या मनांत जो अनिर्वाच्य विकल्प महारा-
जांच्या मायावी चुलतीनें भरवून दिला आहे, त्याचें निराकरण होणें आमच्याच
काय पण महाराजांच्या दृष्टीनेही आवश्यक आहे. विद्येषतः एक निरपराधी
देवता हकनाहक त्या विकल्पाळा बळी पडलेली आहे. ” बोलतां बोलतां
मानाजीरावाचा कंठ इतका दाटून आला कीं त्याच्याच्यानें पुढें बोलवेना.
शुजारराव इतका वेळ गंभीरपणानें स्तब्ध उभा होता. तो मध्येंच उद्-
गारला, “ महाराज, मी करुणेचा धर्मपिता या नात्यानें त्या शोचनीय प्रकारा-
मुळें मला मरणाहूनही जास्त दु:ख होत आहे. आपण मला फितूर ठरविले,
आपल्या राजसेवकांच्या हातून माझा छळ झाला; तें सर्व दुःख मीं निमूटपणे
आजवर गिळलें. पण माझी लेंक-ती धर्माची असली तरी मी तिला माझ्या पोटच्या
लेंकीप्रमाणेंच मानतों.--ती अशी दुर्वेतेनी' निपजेल, हें कालत्रयींही शक्य नाही.
ती दुर्वेतंनी नाही हें मीच काय पण कोणीही सांगू शकेल. फार कशाला !
सुदेवानें कोणत्याही न्यायान्यायाचा निवाडा करण्याचें साधन आपणासमोर
आहे. ” तो समोरच्या तलवारीकडे अंगुलिनि्देश करून म्हणाला, “ महा-
राजांची पुण्याई थोर म्हणून हें तंजावरच्या .राजघराण्यांतून चोरीला गेलेले
वरिभुवनाच्या मोलाचें देवी वैभव आमच्या हातीं लागलें, तें आम्ही महारा-
जांच्या चरणीं रुजू केलें आहे. महाराजांना आतां माझी हात जोडन विनंति
आहे कीं; मी करुणेला आपणा समोर आणणतों. राणी म्हणून नव्हे, तर अपराधी
म्हणूनच समोर आणून उभी' करतों. महाराजांनीं तिला युक्त तें दिव्य
ऱ्ट
४*-८४-५/४५५-४१-५/१५/- > "*/११-/१४६८५१./%. / '€0१-/१./१५-/%.//_/% . €0८->९१-/१-०१५./%./%
२७४ पेशवाईचे मन्वंतर
करावयाला लावावें. ती त्या कसोटीला उतरली तर सोन्याहून पिवळें झालें.
बरें; ती अपराधी ठरली तर याच क्षणीं याच जागीं महाराजांकडून तिचें
शासन होण्याची बाट न पहातां मी माझ्या हातानें याच तलवारीतें तिचे शीर
एथल्याएथें धडावेगळे करीन. पोरगी म्हणून अपत्यमोहाला मी बळी पडणार
नाहीं याविषयीं महाराजांची खात्री असूं द्या.
चोरीला गेलेल्या त्या प्रासादिक तलवारी पुन्हां कधीं आपल्या हातीं येतील
अशी महाराजांना या क्षणापर्यंत मुळींच आश्या नसल्याकारणाने अकल्पितपणें
तें देवी वेभव पुढें आलेलें पाहून ते आइचर्यानें दिग्मूढ होऊन गेले. त्यांच्या
आनंदाला पारावार राहिला नाहीं. ज्याअर्थी मानाजीराव आणि झंंजारराव
इतक्या निक्षूत करुणेविषयी निर्वाळा देत आहेत, त्याअर्थी तिला आणखी
निराळें दिव्य करावयाला डावणें यांत जसा तिचा अपमान आहे तसाच त्या
दोघांचाही अपमान आहे असें महाराजांना वाटलें. मानाजीविष्यीं त्यांच्या
मनांत असलेला अल्पस्वल्प संशयही त्याच क्षणीं आपोआप दूर झाला. कारण
त्या प्रभावशाली तलवारी हातीं घेऊन निर्भेयपणें बोलणारा मनुष्य अपराधी
असणेच शक्य नव्हतें. अपराध्याचा हस्तस्पर्श होतांच त्या तलवारींचें तेज
लप्त होऊन त्या काळ्या ठिक्कर पडत असत, हा त्यांच्या अंगाचा देवी प्रभाव
सर्वांना महशूर होता. इतका वेळ आपण निष्कारण संशयाच्या पिज्याच्याला
आपल्या मनोसंदिरांत थैमान घालं दिलें याबद्दल स्वतःशी खजिल होऊन
महाराज उद्गारले, “ झुंजारराव, तुमच्या शब्दांवर माझा पुर्ण भरंवसा आहे.
ह्या तरवारी हें तंजावरच्या राजघराण्यांतील जागृत राजवेभव तुम्हीं निष्ठा-
पुर्वक पुन्हा राजगृहीं आणलें, याबद्दल तुमची तारीफ करण्यानेंही तुमचा
उपमदे होईल कौं काय, असें आम्हांला भय वाटतें. इतकी तुमच्या ठायीं वस-
णारी आमच्या विषयींची पूज्य भक्ति थोर आहे, व ती केक पिढ्यांची आहे.
ह्या अमोल कामगिरीबद्दल आम्हीं आजन्म तुमच्याशीं कृतज्ञ राहिले पाहिजे.”
तसेच ते मानाजीरावाकडे वळून शांत मुद्रेने पहात उद्गारले, “ मानाजी,
तूं देखील कोणत्याही प्रकारें मुळींच अपराधी नसून, आमच्या गादीचा एक-
निष्ठ सेवक-नव्हे, तुळा सेवक म्हणणें म्हणजे तुझी योग्यता कमी केल्या-
सारखें होईल.-तूं गादीचा एक सामर्थ्यंवान्ू आधारस्तंभ आहेस. आम्हीं
भलत्याच चुगलखोरांच्या नादीं लागून तुझ्यावर किटाळ आणले याबद्दल तूं
मधुर भीळन २७५
आम्हांला मनःपुर्वक क्षमा केली पाहिजेस.
मानाजीराव हात जोडून गद्गद् कंठाने उद्गारला, “महाराजांच्या मुखां-
तून स्रवणाऱ्या ह्या स्तुतिवर्षावाचा माझ्या माथां भार होतो आहे. महा-
राजांनीं आपल्याकडे कमीपणा धेतला तो घेण्याचें कांहींच कारण नाहीं.
आम्ही महाराजांच्या चरणधुळींत लोळून महाराजांच्या अन्नावर लहानाचे
मोठे झालेले महाराजांचे सेवक; आमची क्षमा ती महाराजांची कशाला
सागायची ? परंतु एक गोष्ट मात्र महाराजांनीं अवश्य केली पाहिजे. राणी-
साहेबांवरील आरोपाचे निराकरण कोणत्याही मार्गाने होईना पण महाराजांनीं
आमसेच्या डोळ्यांदेखत करून घेतलेंच पाहिजे, त्याशिवाय आमच्या मनाला
शांतता मिळणार नाहीं.
मानाजीरावानें बोलतां बोलतां झंंजाररावाकडे पाहिलें. झुंजाररावाला
त्या पहाण्याचा अर्थ तेव्हांच कळून चुकला. करुणाराणीचें नांव जें महा-
राजांसभोंवारच्या ढालगजांनीं हकनाहक बद्दू केलें होतें, त्याची शहानिशा
करून घेणें झुंजाररावालाही अत्यंत अगत्याचे वाटत होतें. किबहुना करूणा-
राणी पूर्णपणें निर्दोषी आहे हें माहीत असूनही झुंजारराव राणीला दिव्य
करावयास लावण्यासाठीं उत्सुक होता. तो महाराजांना त्यांच्या अविचारा-
विषयीं मनांतून दोष देत असेल. पण तें दुसर्या कोणाच्याही ध्यानीं येणें शक्य
नव्हते. महाराजांनीं विचार केला कीं आपल्या ह्या दोघां एकनिष्ठ सेवकांचा
एवढा' साधा आळ आपण कां पुरव नर्ये !! त्यामुळे राणीच्याही मनाला
समाधान होईल, सर्वांनाच त्यापासून संतोष होईल. लगेच त्यांनीं संमतिदर्शक
उद्गार काढले, “तुमची इच्छाच दिसते आहे त्या अर्थी राणीसाहेबांना त्यांच्या
मर्जीप्रमाणे दिव्य करूं द्या. आम्ही मात्र स्वतःच्या मनांशीं याचा इतकाच
अथे घेतों कीं, आमच्या पुनर्मोलनारचे चिरकाल स्मरण टिकण्यासाठीं या
दिव्याचा खरा उपयोग होणार आहे. ”
“आणि न जाणो, कदाचित् महाराजांनाही ह्या दिव्यापासून एखादा धडा
शिकतां येण्याचा संभव आहे. महाराजांची सत्ता थोर आहे, योग्यताही थोर
आहे, पण ह्या सतीच्या पातिब्रत्याची योग्यता त्याहूनही थोर आहे, पण
त्याविषयीं महाराजांनीं निष्कारण संशय घेतला असेल तर ते देखील अपराधी
ठरू दाकतात. मात्र त्या अपराधाबद्दलचें शासन--” बोलतां बोलतां झुंजार-
२७६ पेशवाईचे मन्वंतर
रावार्चे मन त्याला खाऊं लागलें कीं आपण हा अतिप्रसंग केला, बोलं नये तें
बोलून गेलों. आपली पायरी आपण ओळखली नाहीं. तो तोंडातले वाक्य
तसेंच अर्धवट सोडून महाराजांच्या पायांशी नग्न होऊन उद्गारला, “महारा-
जांनीं माझ्या वावग्या बोलांबद्दल मला क्षमा करावी'. ”
परंतु महाराजांनीं झुंजाररावाला आपल्या पायांवर डोकें ठेवण्याची संधि
न देतां वरच्यावर त्याला आलिगनपूर्वके हृदयाशीं धरून सन्मानपूर्वक
आपणादोजारीं बसविले, आणि त्याच्या चरणांना वंदन करून म्हटले,
“ झजारराव, आम्ही' राजे रयतेचे; पण तुम्हांला आम्ही लेंकरूंच आहों.
वयानें म्हणा, अनुभदानें म्हणा, कतेव्यतत्परतेनें म्हणा किवा संसारांतील
नात्यानें म्हणा, कोणत्याही दष्टीनें पाहिलें तरी तुम्ही आम्हांला वंद्य आहांत.
आम्हांला आडमार्गावरून मार्गावर आणण्याचा अधिकार तुम्हांला आहे
आणि तुम्ही आमचे सर्वे अपराध पोटीं घालून आम्हांला उदार मनानें क्षमाही'
केली आहे. यापेक्षां थोर मनाच्या महात्म्यापाशीं आमच्यासारख्या अप-
राध्याला करतां येण्याजोगे दुसरें पवित्रांतलें पवित्र व अत्यंत उचित शासन
दुसरे असेल असें आम्हांला वाटत नाहीं. बरें; राणीसाहेब कुठे आहेत?”
झंजाररावानें नेत्रांवाटे वहाणारे अश्रु पुशीत मनांतल्या. मनांत महाराजांना
व स्वत:ला धन्यवाद देत मार्गे वळून करुणे ! * अशी हांक मारली. थोड्याच
वेळांत अवगंठनवती करुणाराणी' महाराजांसमोर येऊन उभी राहिली. महा-
राज तिच्याकडे प्रेमाने पण किचित् ओशाळ्या नजरेनें टकमक पहात होते.
ती देखील हृदयांत उचंबळणाऱया सर्वे भावनांना आपल्या नेत्रांत एकवटून
महाराजांकडे पहात असेल! पण तिनें तोंडावरून पदर घेतला असल्यामुळें
तें कोणाला दिसणें शक्य नव्हतें.
लगेच मानाजीरावानें उभा राहून प्रथम महाराजांना आणि नंतर त्या दोन
तरवारींना प्रणाम करून प्रार्थना केली, “ माझ्या वाणींत, कृतींत, इच्छेत,
माझ्या प्रत्येक श्वासोच्छ्वासांत जर तंजावरच्या गादीविषयीं व माझ्या सांप्र-
तच्या प्रभूंविषयीं निस्सीम निष्ठा जागृत असेल, धर्मपत्नीला न शोभणाऱर्या
अपकर्तेव्याचा विटाळही जर कधीं माझ्या मनाला, वृत्तीला किवा इच्छेला झाला
नसेल, तर हे खड्गरूपी देवते, तूं आपल्या अपूवे तेजस्वितेनें माझ्या करस्पर्शा-
बरोबर चमकूं लागशील. ” एवढें बोलून त्यानें त्यांतली एक तलवार म्याना-
संघुर मालन २०७
बाहेर काढली. साहजिकपणेंच महाराजांची' दृष्टि तिकडे खिळलेली होती.
त्यांनीं जेव्हां ती तलवार आपल्या तेजाने तळपत असून तिचा प्रकाश त्या
दिवाणखान्यांत प्रभातकाळच्या संधिप्रकाशाप्रमाणें चोहींकडे फांकळेला पाहिला;
त्याबरोबर मानाजीरावाच्या नेत्रांतून आनंदाश्रूच्या गंगायमूना वाहूं लागल्या.
महाराज व करुणाराणी यांनाही आनंदाश्रूंचा पूर आवरेनासा झाला. महा-
राजांनीं त्याच क्षणीं त्याला हूदयाशीं धरून आपल्या कृपाश्रू-वर्षावानें त्याला
न्हाऊं घातलें. त्याच्या मनांतून पुष्कळ बोलावयाचे असेल पण मुखावाटे
एक शब्दही निघेना. कि्चित् वेळाने झुंजारराव मानाजीरावाला म्हणाला,
“* मानाजी, त्या दोन्ही तरवारी म्यान करून राणीसाहेबांसमोर ठेव. त्यांना
दिव्य करूं द्या.
लगेच मानाजीरावानें तसें केळे. झंजाररावाने करुणेला त्या दोन्ही तर-
वारी म्यानाबाहेर काढण्यास सांगितलें. परंतु दुसर्याच क्षणाला त्याच्या मनांत
काय आलें न कळे, तो पुन्हा महाराजांना म्हणाला, “ महाराज, करुणा दिव्य
आपल्या समाधानासाठीं करणार आहे; आपण तिचे संसारांतील सहचर-
तिचे सौभाग्येद९वर या नात्यानें या महृत्कार्यात तिला हातभार लावला
पाहिजे. त्या तलवारी आपण म्यानाबाहेर काढून तिच्या हातीं दिल्या पाहिजेत.
“ जशी तुमची इच्छा. ” असें म्हणून महाराजांनीं त्या दोन्ही तलवारी
म्यानाबाहेर काढल्या. तों काय चमत्कार! भटींतून तापवून काढून निवलेल्या
लोखंडाच्या कांबीसारख्या एकदम त्या काळ्या ठिक्कर पडल्या. महाराजांनीं
तो प्रकार पाहिला, करुणेनेंही पाहिला. सर्वांना तो चमत्कार कळून चुकला.
परंतु आश्चर्य हें कीं त्याचा अचंबा कोणालाच वाटला नाहीं. फार काय,
खुद्द महाराजांनाही अचंबा वाटला नाहीं. सर्वे मंडळी एकमेकांच्या तोंडाकडे
टकमक पाहुं लागली. महाराज ओझाळेपणानें म्हणाळे, “ राणीसाहेबांच्या
बाबतींत आम्ही अनंत अपराधी आहोंत हें आम्हाला पूर्णपणें मान्य आहे;
च त्याच अपराधाची साक्ष ह्या खड्गदेवतांनीं दिली आहे.
झंजारराव आणि मानाजीराव यांना तरी मुख्यतः महाराजांनींच त्यांचीं
बोटें त्यांच्या डोळ्यांत कशीं जातात हें दाखवावयाचें होतें. त्यांना तो प्रकार
पाहून परमसंतोष वाटला. करुणेलाही तसेंच वाटलें असल्यास त्यांत नवल
नाहीं. वास्तविक राणीवर भलभलते आरोप करणारे महाराजच दोषी आहेत
"०७ ४५.५४ ४. १७७१ ४.४ १५७ ७ ४.४७ ७०४४... ७७,७७७ ४१९५ ८७४१७ ७५८७ ७.७७ ४५.४ ७.४७,» ४९८७७४५०७७
२७८ पेशवाईचे मन्वंतर
असा खड्गदेवतेनें एकवार निर्णय दिल्यावर करुणाराणीच्या निर्दोषतेविषयीं
निराळ्या दिव्याची आवश्यकताच नव्ह्ती. तरीही महाराजांनीं त्या तलवारी
आदरपूर्वक तिच्यासमोर करीत म्हटलें, “ राणीसाहेब, आपली परीक्षा
पहाण्यासाठी नव्हे, तर आमच्या स्पर्शाने अपवित्र झालेल्या या खड्गांना
पावन करण्यासाठीं आम्ही हीं आपल्या हातीं देत आहोंत. ”
प्रकरण ३८ वें
करुणेरचे दिव्य
"मम्मे २-० या
रुणेनें त्या तलवारी हातीं घेऊन नतमस्तकपूर्वक त्यांना अभिवादन केलें.
तों पुर्वीसारखाच चमत्कार घडून आला. त्या तरवारी राणीच्या हाताचा
स्पर्श होतांक्षणींच विद्युल्लतेप्रमाणें चमक लागल्या. अस्तप्राय सूर्याचे सोनेरी
किरण त्या महालाच्या झरोक्यांतून आंत डोकावत असलेले त्या तलवारींवर
पडल्यामुळें तर त्यांचें तेज तेथल्या मंडळींना क्षणभर असह्य वाटलें. महा-
राजांनीं लगेच करुणेपुढें मस्तक नमवून उद्गार काढले, “ देवते, पतित्रते,
तूं धन्य आहेस. तुझ्या रूपानें ह्या तंजावरच्या राजघराण्यांत साक्षात् राज-
लक्ष्मी नांदत आहे. तूं आमच्या चुकीमुळें कांहीं काळ परागंदा झालीस,
त्याबरोबर परचक्राची आकादचो कुऱ्हाड आमच्या राज्यावर कोसळली;
आणि तूंच सर्वे आगळिकी विसरून तंजावरच्या राज्याकडे कुपाकटाक्ष फेकू
लागलीस म्हणूनच तें परचक्र टळलें, व आम्ही सर्वेजण हा आनंदाचा दिवस
पहात आहोंत. आजपासून ह्या खड्गदेवतांची पूजा करण्याचा मान एकट्या
तुझा आहे. ” करुणा त्या तरवारी पुन्हां महाराजांसमोर ठेवूं लागली तेव्हां
महाराजांनीं हातानें नकार दशेवीत म्हटलें, “ नको नको, तं त्या देवतांना
तुझ्यापासून दूर लोट नको. त्यांची पाळणूक मोठी कठीण आहे. अंतर्बाह्य
पावित्र्याने नटलेल्या पुण्यवंतांनीं पूजाअर्चा केली तरच हें जागृत देवत आपणावर
प्रस राहील. अद्या पावित्र्याची मूतिमंत प्रतिमा तूंच एकटी आहेस; तूंच
ही जबाबदारी पतकरली पाहिजेस. ”
हा सुखकारक संवाद त्या मंडळींत आणखी कोठवर लांबला असता कोण
जाणें! आनंदसागरांत मनुष्य एकदां पोहुं लागला कीं त्याला पोहावें तेवढे
थोडेच वाटतें. असा एखादा वित्तवृत्ति उचंबळून सोडणारा आनंदाचा प्रसंग
उद्भवला कीं दिवसच्या दिवस व रात्रीच्या रात्री भूक-तहान न म्हणतां-
देखील त्या आनंदांत रंगून रहाण्याची संवय महाराजांना तशीच करुणाराणी-
२८० पेशवाईचे मर्न्वंतर
लाही होती. आजचा हा प्रसंग तर सर्व आनंददायक प्रसंगांच्या मालिकेंत
अग्रस्थानीं शोभण्यासारखा होता. |
त्या आनंदाचा विरस करण्यासाठीं नव्हे, तर तो हिंगुणित, दशगुणित,
शतगुणित करण्यासाठींच कीं काय, द्वाररक्षकानें आंत येऊन अभिवादनपूर्वेक
वर्दी दिली, “ सोहन नांवाचे सरदार महाराजांची एकवार भेट घेऊं इच्छितात.”
मोहन हें नांव एंकतांच तेथल्या सर्वांना मोहिनी पडल्यासारखे झालें.
महाराजांनीं मोहनची शोौर्य-धेर्य-चातुर्याची नुसती कीति ऐकली होती,
त्याच्या अपूर्व चातुर्याच्या रसाळ कथाही एंकल्या होत्या, पण प्रत्यक्ष व्यक्ति
अशी कधींच पाहिली नव्हती. परंतु करुणाराणी, मानाजीराव व झुंजारराव
यांनीं मोहनशीं एक दिलानें वागून बव्हंशी, त्याच्या कल्पकतेच्या व चपळ-
तेच्या जोरावर प्रस्तुतच्या मोहिमेंतील सर्वे डावपेंच यशस्वी केल्यामुळें त्यांना
त्याची खरी योग्यता कळत होती. मात्र आइचरये हें कीं, आनंदी-
आनंदाच्या त्या महोत्सवांत दरबार भरून सर्वे सन्माननीयांचा यथोचित
आदरसत्कार करण्यांत आला त्यावेळीं मोहन हजर नव्ह्ता! तो हजर असता
तर, अर्थातच दुधांत साखर पडल्याप्रमाणें झालें असतें. पण तो हजर नव्हता
म्हणून दरबारचें अडले, असें मुळींच नाहीं. साहजिकच आहे! एक म्हातारी
जेवली नाहीं म्हणून अन्नछत्र थोडेच ओस पडतें!
असो, मोहनर्चे नांव ऐकतांच महाराजांनीं त्याला ताबडतोब आंत पाठवून
दे, असें हाररक्षकाला सांगितलें, व ते स्वतः त्याचा यथोचित आदरसत्कार
करण्यासाठीं आसनावरून उठून दरवाज्यापर्यंत गेले. मोहन दरवाज्यांत
येतांच महाराजांनीं त्याला कडकडून आलिंगन देण्यासाठीं आपले दोन्ही
बाहू पसरले. मानाजीराव व झुंजारराव यांनीं त्याला उत्थापन दिलें. करुणा-
राणी जवळ उभीच होती. ती चांचल्यपूर्ण दृष्टीनें त्याच्याकडे पाहुं लागली.
महाराज गाढालिंगन देण्यासाठीं एक पाऊल पुढें सरले, त्याबरोबर मोहन
चटकन् एक पाऊल मागें सरकला. महाराजांच्या तें ध्यानीं आलें नाहीं.
त्यांनीं दुसरें पाऊल पुढें टाकलें तोंच मोहूननें दोन्ही हात जोडून त्यांना विनंति
केली. “ हां महाराज, आपण कृपा करून पाऊल आवरते घ्या. ” एकाएकीं
धरणीकंपाचा धक्का बसावा त्याप्रमाणें महाराज व इतर मंडळी या सर्वाची
अंतःकरणें मोहनच्या त्या शब्दांनी हादरून गेलीं. मानाजीराव व झुंजारराव
करुणाराणी दिव्य करून आपल्या पाविञ््याविषयीं पतीची स्त
करुणेचें दिव्य २८१
री ८0-00 १.०५ ८
१९४४-४४-४४ ७-४ ४७ ७ “0.७४, ००-0२. ५.५८.” -> २-० १७४४ ४७४१५ “0७४४१५ “९४.० ४७०९५९९..४००४१५८४-४%.-४ ४-०, .४१%० १७७१ ४-४ "४५७५ * ४.०१.” * ७.% ४४% “७ “0, १-० नट चनी
यांना वाटलें, हा महाराजांचा अपमान झाला; आणि वरवर पहाणाराला तो
खरोखरच अपमान होता. महाराजांचे आलिंगन हा प्रसाद सामान्यत:
कोणत्याही माणसाला मोक्षप्राप्तीइतका दुष्कर होता. असें असतां मोहून
इतका तऱ्हेवाईक कसा, हें गूढ कोणालाच उकलेनासें झालें. मात्र महारा-
जाना स्वत:ला त्यांत अपमान वाटला नाहीं. ते शांतपणानें उद्गारले, “ सरदार
मा तुम्हाला दरबारच्या प्रसंगीं विसरलों अशी तुमची' चुकीची समजूत झाली
असावी म्हणून तुम्हीं त्याबद्दल हा सात्त्विक निषेध प्रदर्शित केला, तो स्वाभि-
मान तुमच्या निःस्वार्थी देशसेवेला आणि अपूर्व कर्तबगारीला साजेसाच आहे.
परंतु माझ्या शब्दावर तुमचा विश्वास असेल तर सांगतों, आम्ही' तुम्हांला
विसरलों नाहीं. आम्ही तुमचा पुष्कळ शोध केला, पण शोध लागला नाहीं.
'एवढ्याने तुमर्चे समाधान होणार नाहीं काय? ” मानाजीराव, झुंजारराव
व करूणाराणी ह्या तिघांनींही महाराजांच्या लोकोत्तर उदार औदार्याचें
मनोमन कौतुक केलें. मोहून पुन्हां हात जोडून विनम्र स्वरांत उद्गारला, “नाहीं
नाहीं. महाराज, मी त्या प्रकाराबद्दल आपणाला दोष देत नाहीं. आपण माझी
चौकशी केली हें मळा माहित आहे, पण मीं आपण होऊनच दरबारांत येण्याचे
टाळले. त्याबहल मी आपणाला दोष कसा देऊं! आपण राजपुरुष, आम्हीं
आपली परमेरवराच्या ठायीं एकनिष्ठपूर्वक पुजा करावयाची! आपणाला
दोष देण्याचे पातक माझ्यासारखा स्वामिनिष्ठ जीव कां म्हणन
जोडील ? ” बोलतां बोलतां मोहन नखशिखान थरथर कांपत होता. खवळ-
ळेल्या हरणाच्या चंचल दृष्टीप्रमाणें त्याची दष्टि तरळं लागली होती. तो
निसर्गतःच मदनासारखा सुंदर होता व त्याच्या गालांवर नेहमींच गलाब
फुललेले दिसत. कांहींसें भय, कांहींसे श्रम व कांहींसा विस्मय यामुळें त्यावेळीं
त्याच्या गालांवर नेहमींच्याहाना अधिक लाली आपोआपच फांकली होती.
कोणीही त्या सुंदर मुखकमलाकडे स्तिमितपणें टकमक पहात रहावें इतकी
ही गोंडस चर्या एका क्षणांत कां न कळे किंचित मळल झाली. हा सर्व प्रकार
करुणाराणी, मानाजीराव व झुंजारराव या तिघांनाही दिसून आला
तर मग तुम्ही मार्गे कां सरलां ? तुमच्या मनांत काय असेल तें मोकळ्या
भनानें सांगा. ” महाराज शांतपणें पुन्हां उद्गारले
किचित् अस्वस्थ वृत्तीने मोहन उद्गारला, “ पहिली गोष्ट-ईशवरसाक्ष,
२८२ पेशवाईचें मन्वेतर
महाराजांच्या पायाची' साक्ष, राणीसाहेबांच्या पायाची साक्ष -मध्येंच थांबन
तो चटकन चार पावलें पुढें येऊन झुंजाररावाच्या पायांवर मस्तक नग्न करून
गहिंवरलेल्या कंठानें उद्गारला, “ ह्या पिताजींच्या पायांची साक्ष, आपलें
आलिंगन स्वीकारण्याची माझी पात्रता नाहीं; आणि तो अधिकारही पर-
मेश्वरानें मला दिलेला नाहीं. ” पुढे त्याच्याच्यानें बोलवेना. तो तसाच झंंजार-
रावांच्या पावलांवर मस्तक ठेऊन अश्रूंचा अभिषेक करीत स्तब्ध राहिला.
कोणालाच त्याच्या त्या गोंधळलेल्या मनःस्थितीचा अर्थ कळेना. त्यानें
झुंजाररावाला पिताजी म्हणून त्याच्या पायांवर डोकें नमविले, पण तें कोडें
सोडविण्याला प्रत्यक्ष झुंजाररावही असमर्थ ठरला. प्रत्येकजण एकमेकां-
कडे प्रश्नार्थक दृष्टीनें पाह लागला. पण बोलेना मात्र कोणीच-
अंमळशानें अश्रूंचा पहिला पूर किंचित् ओसरल्यावर मोहन उभा राहिला
आणि महाराजांना हात जोडून विनवू लागला, “ आतां आपल्या सर्वांचे
अंगीकृत कार्य यशस्वी झालेंच आहे. माजलेल्या यवन देत्यांचा मोड होऊन
हिंदवी-साम्गराज्याची मंगल प्रभात येथें उगवलीच आहे. श्रीरंगाच्या कृपेने
आणि आपणासारख्या पुण्यवंतांच्या पुण्याईने आज भूभार हलका झाला आहे.
आतां उरलें सुरले रहस्य माझ्यापुरतें तरी मळा उलगडून दाखविण्याला
हरकत नाहीं असें मला वाटतें. पण त्यापूर्वी माझी महाराजांना अशी अंत:-
करणपूर्वक विनंति आहे कीं, करुणाराणीसाहेब ह्या महा पतिब्रता साध्वी
आहेत. त्यांच्याविषयीं भलता संशय घेणें हें महत्पाप आहे,-असें महाराजांच्या
बाबतींत म्हणण्याचा मला जरी अधिकार नाहीं, तरी महाराजांनीं निःसंशय
मनानें, पुर्ण प्रेमभावानें त्यांना पुन्हां स्वीकारून महाराणीपदावर अधिष्ठित
करावें. ही माझी' मागणी महाराजांनीं प्रथम मान्य केली' पाहिजे. ”
“ त्या संशयाचा समाधानकारक दोेंवट झाला आहे. महाराजांनी परचा-
त्तापपूर्वक राणीसाहेबांचा स्वीकार केला आहे. ” मानाजीराव म्हणाला.
करूणाराणी' मात्र जास्त कावरीबावरी होऊन सभोंवार पाहूं लागली. त्या-
वेळीं तिर्चे मन जर कोणाला न्याहाळून पहातां आलें असतें,तर त्या मनकवड्याला
स्पष्टपणे कळून आलें असतें कीं, मानाजीरावाविषयीं महाराजांनीं जसे एक-
वार भलता'च संशय घेऊन करुणाराणीला वनवासाला पाठविले, तसाच
संशय मोहनच्या बाबतींत महाराजांना पुन्हां येणार नाहीं ना? भोहून
करूणेचें दिव्य २८३
मामाजीरावापेक्षां कितीतरी पटीनें संदर होता; व तो गुणसंपन्न होता हें तर
सिद्धच होतें. अद्या रूपगुणसंपन्न तरुणानें आपल्या सारख्या समवयस्क स्त्रीचा
इतक्या जिव्हाळ्याने गौरव केलेला पाहून महाराजांच्या मनाला कांहीं विप-
रीत तर वाटणार नाहीं ना! त्या तश्ा गोंधळलेल्या मनस्थितींत 'इडा
पिडा टळो आणि अमंगळ दूर पळो ' अशी मनोभावानें परमेश्वराची प्रार्थना
करण्यापलीकडे करुणाराणीच्या हातीं तरी दुसरें तिसरें काय होतें! ती
अश्या काल्पनिक शंकेनें भ्याली; हा तिचा दोष मुळींच नव्हता. दुधाने तोंड
पोळलें कीं मांजर ताक देखील फुंकून पिते. राणीचा जीव एकदां पोळून
निघाला होता. त्या हृदयाच्या जखमा अजून पुर्णपणे बऱ्या झाल्या नव्हत्या.
तिला तसें वाटणें स्वाभाविकच होतें.
राणीचे दुर्भाग्य टळलें ही शुभ वार्ता ऐकून मोहननें हायसा एक उसासा
सोडला. क्षणभर थांबून तो पुढें म्हणाला, “ महाराजांच्या पायापाशीं माझी
दुसरी' फिर्याद अश्ली आहे कीं, चंदासाहेबासारख्या नराधमाला देहदंडाची
शिक्षा योग्य असतां, इतकेंच काय पण निसर्गाची आडकाठी नसती व
त्याला एकाच जन्मांत अनंकदां मेलेला जिवंत करून पुन्हा पुन्हा देह॒दंडाची
शिक्षा देणें हक्य असतें, तर ती शिक्षा त्याच्या अघोर अपराधांना शोभली
असती, असे असतां, तो राक्षस-तो साऱ्या मानव जातीचा शत्रू अजून जिवंत
आहे हें बर्याचें लक्षण नाहीं. ” तो एकदम थबकून किचित् अधोवदन करून
स्वतःशीं कसला तरी गूढ विचार करीत कांहीं क्षण स्तब्ध उभा राहिला व
पुर्न्हा आपल्या गालाकरचे घर्मबिदु पुशीत उद्गारला, “कदाचित् राजकारणाच्या
पुर्वापार परिणामाकडे लक्ष देऊन महाराजांनीं त्याला जिवंत ठेवलें असेल.
परंतु मीं जर फिर्यादी म्हणून माझी वेयक्तिक हृदयद्रावक गाऱ्हाणीं महाराजांना
ऐकविलीं तर ते त्या गाऱ्हाण्यांची दाद घेणार नाहींत काय? ”
““तुमचीं गाऱ्हाणीं काय आहेत?” महाराजांनी प्रश्न केला व ते व झुंजारराव
एकाग्र दृष्टीनें मोहनची चर्या पहात होते. आपण भान विसरून भलतेच
बोलून गेलों असें वाटल्यामुळे कौं काय, मोहन गोंधळलेल्या मन:स्थितींत
त्या प्रश्नाचे उत्तर देऊं शकला नाहीं. तेवढ्यांत झुंजाररावानें चटकन् आपल्या
जागेवरून उठून मोहनापाशीं जाऊन त्याच्या मानेच्या डाव्या बाजूला काय-
सेसें निरखून पाहिलें. करुणेंला तो काय पहातो हें अजमावतां न आल्याने
२८४ पेशवाईचे मन्बेतर
न ०७०५/०४७४९४४९५१५०४५/४८५४१५/४१७५॥४/१४५९%१-१४५ १४/४४/0५2४” ५/४५१४/४५११४१४/५/0५/५४-८५
५.०५ /५५/५८५-५-*-
*४४४/४*४% ४५४४ ५१/४५/५५१०. 0५८/९-/७४०१ ५५५०१५० ९५.०५ ९५०९५०-५०-०५००५००५५०-०५-०--०
- तीही चार पावलें पुढे जाऊन त्याप्रमाणेंच पाहु लागली. मोहनच्या तें तेव्हांच
लक्षांत आलें. तो लगबगीने मान फिरवून किंचित अधोवदन होऊन अस्वस्थ
चित्ताने उभा राहिला. कां बरें?
प्रकरण ३९ वें
मोहना व करुणा बहिणी बहिणी !
“ण्यात तितिलितितकयबळन-ण
आ पा£ं दे,मला तुझ्या मानेवरची ती खूण पुन्हा एकदां पाहूं दे.” झुंजारा
राव दुसर्या बाजूकडे वळून पहात म्हणाला. तेव्हांच करुणा झुंजार-
रावाच्या कानाशीं लागून हळूच उद्गारली, मंगलेच्या मानेवर अशीच काळी
खूण होती. ही मंगला तर नसेल ना! ”
“सोहन हा पुरुष नसून स्त्री असावी असें आज कैक दिवस त्याची कोमल चर्या
मला सुचवीत आहे. ” तो पुन्हां निरखून पहात उद्गारला, “ खास ही मंग-
लाच आहे. हे डोळे, हो तोंडाची वाटोळी ठेवण-ही मंगलाच आहे खास-
मंगळे ! ”
करुणेनेंही जुने पडताळे मनांत आठवून शक्य तेवढें निरीक्षण केले, व ही
मंगलाच आहे असे स्वतःशीं उद्गार काढीत पुढें जाऊन मोहनच्या-नव्हे,आपल्या
परिचयाच्या मोहूनेच्या मस्तकावरील मंदील आपल्या हातानें काढून घेतला.
त्याबरोबरच तो मोहन नसून ती एक तरुणी आहे अज्ली साक्ष सर्वांना
तेव्हांच पटली.
मोहन--पण आतां ती मंगला आहे, हें आपणाला कळून चुकले आहे. मंगला
दोन्ही हातांनीं आपलें वदन झांकून स्फुंदू लागली. करुणाराणीनें तिला आपल्या
हृदयाशीं धरून तिर्चे शांतवन केलें, “मंगले, रडं नकोस. तं कदाचित् मला
ओळखले नसशील. मी तुझी वडील बहीण आहें. ” बोलतां बोलतां करुणा-
राणी स्वतःच हुंदके देऊं लागली. तिला तो गहिवर आवरेना. मंगलेचें
मस्तक करुणेच्या हृदयावर टेकले आहे, तिच्या अश्वधारांनीं करुणेचीं पावलें
भिजत आहेत आणि करुणेच्या अश्रृगंगेंची संतत धार तिच्या मस्तकावर
पडत आहे, असा तो पाषाणालाही पाझर फोडणारा देखावा पाहून सर्वाची
हृदये उचंबळून आलीं. करुणेनें कधीं कधीं महाराजांना आपला पूर्वे वृत्तांत
सांगावा व महाराजांनीं तिचे शांतवन करावें, असे अनेक रोमहर्षेणकारक
प्रसंग त्या प्रेमळ जोडप्याच्या आयुष्यांत पूर्वी घडून आले असल्या कारणानें
२८६ पेशवाईचे मन्वंतर
“१...” '५.६-/”६.. “%),०१./0४.//%_. “२.१४. ४. ४४.५ २ ४1७ /%.१ ४.०१ ,५/% ४५ * वि २८% “*"*//*//१ -“ >“ १. 0४. ॥ १ /%./%.०/५. ५१% /% ४१.५ २ *'%_/ १५ /१७ ४१५ ,४.// /0१../११..””१५./ ४
महाराजांना तें गूढ उकलण्याला आपल्या बुद्धीला फारसा ताण द्यावा लागळा
नाहीं. करुणाराणी मंगळेला रडूं नको म्हणून सांगतां सांगतां, स्वतःच रडूं
लागलेली पाहून तिची समस्या पूर्ण करण्यासाठीं ते आपण होऊन उद्गारले,
“ मंगळे, करुणाराणी तुझी वडील बहीण आहे. ती आतां कोणी सामान्य
स्त्री राहिलेली नाहीं. ती राणी आहे हें तं ओळखतच आहेस. एवढा जबरदस्त
जिव्हाळयाचा आधार मिळाल्यावर तुला आतां जगांत भय कणाचें आहे?
मात्र त॑ हें रहस्य इतके दिवस ग॒प्त राखून आम्हां सर्वांची तारांबळ उडवन
दिलीस. हेंच रहस्य जर तूं राणीची आणि तुझी प्रथम भेट झाली तेव्हांच
उलगडून दाखवले असतेंस, तर तुझ्या आयुष्याचा मार्गे या पुर्वीच सुकर झाला
असता. ”
यावरून वाचकांना कल्पना करतां आलीच असेल कीं मंगला हें मोहनेचें
खरें नांव होतें, व तिच्या कपाळीं अज्ञातवास आल्यानंतर तिची' नांवापुरती-
देखील ओळख दुसर्या कोणाला पटूं नये यास्तव तिला मोहना हें दुसरें नांव
ठेवण्यांत आलें होतें. मोहनाच ह्या एकंदर कारस्थानांत मूळपासून मोहून व
निहालसिग अशा दुहेरी वेषांतरानें वावरत होती.
“ मंगले, इतकीं वर्षे तू कुठें होतीस ? आम्हीं तुझ्यासाठीं त्रिखंड धुंडा-
ळलें तरी तुझा शोध लागला नाहीं. वेडे मुली, आम्हांला सोडून तूं कुठें गेली
होतीस?" झुंजारराव टपूटप् आनंदाश्रु गाळीत मंगलेच्या पाठीवरून हात
फिरवीत जिव्हाळ्यानें उद्गारला.
“बाबा ! ” मंगला आपले अश्रु पुशीत स्फुंदत स्फुदत उद्गारली, “ माझ्या
हृदयाचाच काय पण माझ्या या साडंतीन हात देहाचा-माझ्या सबंध आय॒-
ष्याचा खरें पहातां पाषाण बनलेला आहे. स्त्रीजातीची अब्रू तिच्या पाति-
व्रत्यांत असते. अब्रू हाच स्त्रीजातीचा जिवंतपणा होय. तो जिवंतपणा
परमेश्वरी कोपामुळें यापूर्वीच मी गमावून बसलें आहें. अशा स्थितींत मी
आपणाला हें काळें तोंड दाखवण्याइतकी निलंज्ज कशी बनृं ! झाल्यात्या
गोष्टी होऊन गेल्या. माझ्या मुखानें माझ्या अधःपाताची ती कहाणी मला
वदवत नाहीं. ” ती करुणेची मिठी सोडवीत म्हणाली, “ अध:पाताच्या
खोळ-खोल-सप्त पाताळापेक्षांही खोळ अश्या गर्तेत जन्मावेरीं कुजत पडलेली
जगांतील अत्यंत अभागिनी स्त्री मी आहें. करुणाराणीसाहेब, माझ्या अपवित्र
मोहना व करुणा बहिणी बहिणी २८७
>“ ->€"-€*% >“ -“€९.५ १५.५ ५-५ ५-४१%../४१-/"२. ४.” ४१४.” १.” १.४. ४0५...” ४.४ ४.५ ४.” ५ ४...४ ९८.५९ 0६७४ ७५-४ १५०७ ४५-४१
५५५९. ४-४ १८.४ १८/४१/१५४४. /१०//
स्पर्शाने आपणाला विटाळ झाला तेवढा पुरे. आपण दूर व्हा, मला जाऊंदे. ”
एवढे म्हणून मंगला करुणेची मिठी सोडवून माघारी जाऊं लागली. झुंजार-
रावातें अपत्यस्तेहाच्या भरांत तिर्चे मनगट धरून तिला बळेंच अडविले आणि
विचारलें, “ वेडे मुली, असा अविचार कां करतेस ? माझी बालंबाल खात्री
आहे कीं तू त्यांतली मुलगी नव्हेस. तुझ्या पुर्वेजन्मींच्या पापामुळे परमे-
इ१वर तुझ्यावर कोपला असेल,-होऊं नयेत त्या गोष्टी तुझ्या हातून झाल्या
असतील. प्रतिकूल परिस्थितीच्या भोंवर्यांत सांपडलेलीं दुर्देवी माणसें फंसून
अशींच अज्ञातवासाच्या रखरखीत रानोमाळीं करपत पडलेलीं असतात.
त्याबद्दल मी तुला दोष देणार नाहीं. त॑ कसलीही चिता मनांत न ठेवतां
आणि कसलेही भय न बाळगतां यापुढे वागण्याचा निश्चय करून इथेंच रहा.
मंगळे, तुझ्या आय॒ष्याची अश्ली माती करणारा तो चांडाळ कोण आहे
हें जर आम्हांला कळून येईल, तर त्याच्या रक्तानें तुझ्या नांवाला लागलेला
कलंक धुवून काढण्याला आम्ही कमी करणार नाहीं. ” एवढें महाराज उद्-
गारले मात्र, त्याबरोबर मंगला उल्हसलेल्या अंतःकरणार्ने उद्गारली, “पहा-
महाराज पहा ! आपणाला आपला शब्द मार्गे घ्यावा लागेल. आपण विचार
करा. आपण त्या अपराध्याला शासन केलें तर माझ्या बहिणीची दासी म्हणून
देखील तिच्या पदरीं रहाण्याची माझी तयारी आहे. उरल्या जन्मांत अक्ा
साध्वीची सेवा करण्यानें तरी माझ्या सर्वे पापांचे निरसन होईल आणि मला
सुखाने मरण येईल. पण मी आपणाला याच वेळीं निक्षून सांगते, आपण
जर आपला शब्द मार्गे घेतला तर मात्र ही मंगला कुणाची कोणी नव्हे.
ती किचित् थांबून अंमळ हलक्या पण करारी स्वरांत पुढे उद्गारली, “ माझ्या
उभ्या आयुष्यांतील अनुभव मला सांगतो आहे कीं, सत्ता आणि संपत्ति ह्या
ज्यांच्या दासी आहेत अशा थोरामोठ्या लोकांना शब्दाची' कांहींच किमत
नसते. आपण आपला शब्द खरा करू शकणार नाहीं हें जितके मला माहोत
आहे तितकें हेंही माहीत आहे कीं, तो शब्द खरा करतां आला नाहीं म्हणून
आपणांला विषाददेखील वाटणार नाहीं --
करुणाराणी, झुंजारराव व मानाजी ह्या तिघांनाही मंगलेचे ते कठोर
शब्द ऐकन अचंबा वाटला. साक्षात् महाराजांपुढे अद्या तऱ्हेचे तुसडेपणाचे
आब्द बोलण्याचें त्या तिघांपैकी कोणाच्याच अंगवळणीं नव्हते. खुद्द महा-
२८८ पेशवाईचें मन्वंतर
*.८१-०१./४४१.४९-४१४१-४१-/१.१. १.४१. ९१ -४४-४४१- /१५/१४१४/११-/ ४५४४४ १८४ 0 ४.८१-४१-/१४९८/१९./१.४१५५१४६-/१./४-/९४ ४./५/४९.५.८./७ ८५. /४_४५./५.॥१-/ १./११६../ ४८ ४. ७...» १८/११/ ४-४ ५७४५०/६,४ ४८/१५/70७७
राजांनाही अचंबा वाटल्यार्चे त्यांच्या चर्यवरून स्पष्ट दिसून येत होतें. तशांतही
ती बोलणारी व्यक्ति अन्य कोणी असती तर महाराजांच्या कोपानलांत ती
त्याच क्षणीं होरपळून निघाली असती. परंतु मंगळेच्या मार्गे तिची पुण्याई
सिद्धहस्त उभी होती, त्यामुळें महाराजांना तिचे कटु बोलही गोड मानून घ्यावे
लागले. महाराज शांत चित्ताने तिला म्हणाले, “ मंगळे, तुझा जीव जगांतील
कटु अनुभवाच्या अग्निवर्षावाखालीं भाजून निघाला असल्यामुळें असे पूर्ण
निराशेचे उद्गार तुझ्या मुखांतून निघत आहेत हें आम्ही जाणतों. हा तुझा
आतताईपणा असला तरी तो सदहेतुमूलक आहे. म्हणूनच आम्ही तुला पुन्हा
पूर्ववत् आश्वासन देतों कों तुझ्यावर झालेल्या अत्याचाराचें प्रायश्चित्त तुझ्या
वेऱ्याला देतां आलें नाहीं तर आम्ही राजे हें नांव यापुढें सांगणार नाहीं.सांग,
तुझ्या वेऱ्याचें नांव काय तें सांग. ”
“ माझा वेरी चंदासाहेब आहे. बोला, आतां आपण त्याचें शासन कर-
णार ना? “ मंगलेने विचारलें. महाराज यावर कांहींच उत्तरले नाहींत.
ते स्तब्धप्णे सर्वांच्या तोंडाकडे पाहुं लागळे. झुंजाररावानें महाराजांची
बाजू घेण्याच्या उद्देशानें व मंगळेळा वडीलकीच्या नात्यानें दाबण्याच्या उहदे-
शानें मध्यें कांहीं बोलण्याचा प्रयत्न केला. पण संगला सर्वांनाच हातानें गप्प
रहावयाला सांगून उद्गारली, “ मला इतर कोणाचें कांहींही ऐकावयाला
तको आहे. मी हें अगोदरच ओळखून होतें. पण एवढ्या धनंतर सामरा-
ज्याचे महाराजदेखील यःकशचित् एका अबलेला न्याय द्यावयाला कसे असमर्थ
असतात हेंच मला खुद्द महाराजांना पटवून यावयाचे होतें. ”
“ मंगळे, तूं म्हणतेस तें सारें खरें आहे, पण तुझा एका व्यक्तीच्या हिता-
हिताचा फाजील अभिमान धरून आम्ही राष्ट्रहितावर निखारा ठेवला तर
तो अक्षम्य अपराध होणार नाहीं का? चंदासाहेब तुझा अनन्य अपराधी
आहे हें आम्हांला सहस्रशः कबूल आहे. परंतु राष्ट्रहितासाठीं आज त्याला
जिवंत ठेवणें आम्हांला प्राप्त आहे. राष्ट्रहिताकडे नजर देऊन तृ आम्हांला
आमच्या वचनांतून एवढ्याबद्दल मुक्त करणार नाहींस का? ”
“ आपल्या त्या राष्ट्राला आणि राष्ट्रहिताला घेऊन मला काय करावयाचें
आहे! महाराज, आपण रागावूं नका, पण एका' य:कश्चित् व्यक्तीचें हित
साधण्याला देखील असमर्थ ठरलेले आपण राष्ट्रहित तें काय साधणार? ”
मोहना वब करुणा बहिणी बहिणी २८९
संगळा तश्ीच डोळ्यांना पदर लावून कांहीं वेळ स्फुंदत उभी होती. तोंच
दुसऱया क्षणाला वीज चमकावी त्याप्रमाणे ती चमकून सर्वांग थरारत सावध-
पणें जागच्या जागीं अंग सावरीत उद्गारली, “ बस्स! मला न्याय मिळाला
एवढा पुरे झाला, आतां भाझा मार्ग मला मोकळा आहे. ” ती बोलतां
बोलतां आपल्या वस्त्राखालीं लपविठेला जंबिया सकेन बाहेर काढून
तो आपल्या छातीवर रोंखीत उद्गारली, “या सर्वेच क्षोभकारक
गोष्टींचा शेवट करण्याचें निर्वाणीचें हेंच एक साधन माझें केवारी होय.
आपल्या सर्वांच्या आणि राणीसाहेब, आपल्यादेखील अंतःकरणावरची ह्या
संगलेविषयींची अखेरचीसुद्धां स्मृति धुतली जावी आणि जगामध्यें ह्या मंग-
लेचें नांवदेखील राहूं नये, म्हणून मी हें पहा हें असें माझ्या वेऱ्याच्या पापाचें
प्रायस्चित्त घेत आहे --
बोलतां बोलतां डोळ्याचें पाते लवतें न लवतें इतक्यांत मंगलेनें खसकन
खंजीर आपल्या छातींत खुपसला. मानाजी व झुंजारराव हे दोघे तिचा हात
धरण्यासाठीं शक्य तेवढ्या चपळाईने पुढें सरळे. पण वीज कधींतरी कोणाळा
हाती धरता आली आहे! मंगला त्याक्षणीं हा लोक सोडून गेली. त्या दिवाण-
खान्यांत तिच्या रक्ताचा लाल सडा पडला आतां तिच्या अजब करतेंबगारीची
मंगल स्मृति तेवढी बाकी राहिली होती, व ती मात्र महाराज, करुणाराणी'
वगैरे सर्वांच्या मनांत अगदीं ताजी होती. त्या स्मृतीनेंच त्या सर्वांची मस्तके
मंगलेच्या कलेवरासमोर नमविलीं. सर्वांनी तिच्या रक्ताचा टिळा कपाळीं
लावून तिला धन्यवाद दिले. त्या थोर मनाच्या शयापभ्रष्ट देवतेविषयीं सर्वांच्या
अंतःकरणाला किती हळहळ वाटली असेल याचें वर्णन कोणत्या शब्दांनी करावें!
उपसंहार
ज्र
चनापल्लीच्या लढाईत रतनसिंग व रामस्वामि यांसारखे जे निष्ठावंत
नि दु साह्यक्ते झाले, त्या सर्वांचा मुरारराव घोरपडे व रघूजी
भोंसले यांनीं यथोचित परामर्षे घेतला. त्या सर्वांना त्याच किल्ल्यांत आपल्या
मायघरीं मान-सन्मानानें रहावयाला मिळाल्यानें अत्यंत संतोष वाटला.
सल्च्चिदानंद आपल्या देशसेवेचा सर्वे भार वृद्धापकाळामुळें आपल्या शिष्यावर
सोंपवन तीर्थाटणाला निघून गेले. तोतया राजपुत्र सवाई शहाजी आपल्या
आईसह कोठें तरी सुखाने काळ कंठीत होता
श्र शर ही
ठरल्याप्रमाणे रघूजी भोंसळे वगेरे साताऱ्याकडील मंडळी' प्रतार्पासह
महाराजांशी तह, करार मदार वगेरे शहाजोगपणें आटोपून चंदासाहेबासह
अविलंबानें साताऱ्याला येऊन पोंचली. कर्नाटकांतील ह्या इरेला पेटलेल्या
मोहिमेचा हेवट काय होतो इकडे सर्वांचे लक्ष लागून राहिल्यामुळे शाहुमहाराज
सातार्यांतच होते व नानासाहेब पेशवेही मुह्ाम भोंसल्यांच्या आगमनाची
वार्ता ऐकून तेथेंच त्यांची वाट पहात राहिले होते. भोंसले चंदासाहेबाला
कैद करून बरोबर आणीत आहेत अशी खबर जेव्हां शाहुमहाराजांना कळली,
तेव्हां त्यांना पराकाष्ठेचा आनंद तर झालाच; पण ही मोहीम अर्धवट अपुरी
पडण्याचा संभव असतां नानासाहेबांनीं कांहींशा दुराग्रहानें ती पुढें चालविली
ह्याबद्दल महाराजांना आतां त्या तरुण पेशव्याचें कौतुक करावें तेवढें थोडेसें
वाटूं लागलें. रघूजी भोंसले वगेरे मंडळी नानासाहेबांच्या सक्तीच्या हुकुमा-
न्वयें पुन्हा कर्नाटकांत मोहिमेवर गेल्यापासून त्यांच्या निदकांना त्यांची भरम-
साट निदा करावयाला चांगलेच फावलें होतें; आणि निदापुराण अव्याहत
सुरू ठेवतां येऊन महाराजांच्या मनांत पेशव्यांविषयीं चांगलेंच काळें ओकतां
यावें ह्या हेतूनें कर्नाटकची मोहीम अयशस्वी व्हावी म्हणून केकजण परमे-
वराची प्रार्थना करीत होते. त्या सर्वांना मोहिमेच्या यशस्वितेची वार्ता ऐकून
उपसंहार हक
पेतृनिधनाशत्के दुःख झालें हें निराळें सांगावयाला नकोच. नानासाहेब
जात्याच धूत असल्यामुळें हें सवे कांही जाणत होते. परंतु त्यांनीं असल्या ठुंग्या-
पुंग्यांकडे मुळींच लक्ष दिलें नाही. नानासाहेबांना पेशवाईची वस्त्रे मिळ-
याच्या वेळीं रधजी भोंसल्यानीं कसून विरोध केला व बाबूजी नाइकही मध्यें
भाडवे पडले, तरी तें किल्मिष मनांत न ठेवतां नानासाहेबांनी त्यांच्या स्वागता-
ती अभूतपूर्वे तयारी ठेवण्याची व्यवस्था केली. खुद्द महाराजांनींही एखाद्यादेखील
गरपभवेश्याच्या प्रसंगीं जो गुणगौरव अन्भविला नसेल तो भोंसले, नाईक
गैरे मोहिमेवरून विजयी होऊन आलेल्या मंडळींच्या वाट्याला आला.
॥इकांचा वांटा म्हणजे सोंवळ्याबरोबर बासन एवढाच त्याचा अर्थ ! खुद
हाराजदेखीळ नानासाहेबांसह त्या मंडळीला वेशीपावेतों सामोरे गेले होते.
पांना शृंगारलेल्या हत्तीवरील अंबारींतून राजवाड्यापावेतों मिरवत आण-
यांत आले, आणि लगेच खासा दरबार भरवून त्यांचा मानसन्मान करण्यांत
॥ स्का. अभागी चंदासाहेबाच्या वांट्याला ह्या मानसन्मानापैकीं कांहीं-
खील जरी आलें नाहीं तरी त्याचा पुर्ववेभवाला साजेसा इतमाम राखण्यांत
[नासाहेबांनीं मुळींच कसर केली नाहीं. चेंदासाहेबाला त्यांच्या हुकुमावरून
[बडतोब तेथल्या अजिमतारा किल्ल्यांतील एका राजवाड्यांत नजरकेदी
णून नेऊन ठेवण्यांत आलें, व त्याच्या तेनातीची योग्य ती व्यवस्था करून
ण्यांत आली. याउप्परही चंदासाहेबाला तें मेलेले जिणे मरणापेक्षां दुःसह
टावें यांत कांहीं नवल नाहीं. तो तर मानखंडनेमुळें इतका बेभान होऊन
ला होता कीं यापेक्षां मरण बरें असें त्यानें ज्याच्या-त्याच्यापाशीं बोलून
'खविलें; आणि हेंही खरें को चंदासाहेब जर कोणत्याही निमित्ताने तेव्हांच
गांतून नाहींसा झाला असता, तर मराठी साम्राज्यावरची एक मोठी' आपत्ति
नायासें टळली' असती, आणि कर्नाटकांत मराठ्यांच्या साम्माज्यसत्तेचा चिर-
॥यी' विस्तार झाला असता. पण भवितव्यतेची इच्छा तशी नव्हती. उलट
श्व चंदासाहेबानें पुढें कुऱ्हाडीचा दांडा गोताला काळ होऊन मराठी साग्या-
॥चच्या मानेवर घाव घालावा अक्यी विधिघटनाच होती! तिथें कोण
य करणार !
तो कुऱ्हाडीचा दांडा गोताला काळ पुढें सात आठ वर्षांनीं कर्नाटकांत मराठी
प्राज्याच्या हितविध्वंसाला कसा कारण झाला तें वृत्त पुढें यथाकालीं निवेदन
४-४५/५-८/४५./५-./५.”२.
२९२ पेशवाईचे मन्वंतर
करण्यांत येईल. तूत एवढें खरें कीं फार वर्षांपासून मराठ्यांच्या भनांत डांचत
असलेला कर्नाटकांतील यवनांचा धांगडधिंगा प्रस्तुतच्या मोहिमेमुळे बहुराः
थांबला. उभ्या कर्नाटकांत यवन सत्ता जवळ जवळ नामदेष होऊन गेली
असें म्हटलें तरी चालेल. ल्प्तप्राय झालेलें तंजावरचें राज्य पुन्हा ऊजिता-
वस्थेला येऊं लागून मराठी साम्राज्याच्या विस्ताराचा दक्षिणेतील मार्ग
अश्या रीतीनें निष्कंटक झाला, आणि तरुण नानासाहेब पेशव्यांच्या प्रतिस्पर्धी
ग्रामसिहांचीं तोंडे पेशव्यांच्या ह्या पहिल्याच राजकारणपट्तेच्या बेमालूम
डावाने अगदीं बंद होऊन गेलीं. बाजिरावांच्या निधनाबरोबर पेशवाई ठार '
बुडाली असे अमंगळ उद्गार काढणाऱ्या सर्वांना नानासाहेबांच्या अंगची
ही राजकारणाची अवाढव्य उरक व दुरद्शित्व पाहून मनांतल्या मनांत
आणि जे कोणी निःपक्षपाती होते त्यांना तर जगांतदेखील-कबूल करणें
भाग पडलें कीं पेशवाई बुडाली नाहीं, तर जुन्या पेशवाई कारभाराला कार्य-
क्षमतेचा नवा उजाळा देणारें हें पेठवाईचें मन्वंतर घडून आलें. अर्थात .
हा त्या मन्वन्तराचा केवळ प्रारंभकाळ होय. त्याचा खरा विकास ह्या
पुढील पेशवाई मालेंतील पेशवाईचा पुनबिकास ह्या पुढोल कादंबरींतून
यथावत् निवेदन कऱ्यांत करण्यांत येईलच.
3 तत्सत्
न्या
"६१००८०
यत कद
चकर
2)
> नवड (4 सी,
१०१५५५
र्य १ व्याकरमने
कयी
(४, नो शण
स्त य
(मलिन)
>:
७.६.,, प
री च्य
घर 24)
भा
म्य ग
0०
फण
. जा
कल नमो
नन
ब पपा
>
०-०
की
हह
1.4
(8४
7000000
280)
र
तं
000080
क
">
क.
"मनन ९०५24
स्स्स्स्स्स्स्च्च्ज
म
क
70
|
९
भः
..८ ९9१७,
यर
&
के
सोन >
> ये श्या
५५३
यी
पय
५... 9:
२७ ०
१०) १५च्कळ
१.
प ८
"५ व
"न
चा
'“,
> चक ना
र याणा ५५ यायाचा
पम
> च
य व्या "क
क. क यी वी
र
शः
४8
(0
ह
रह
र
५५",
१७,
००-५५
४] फॉल 2
पप
म सजा
कक
नाना
ह र गी टु
कै
ती वी भे
१५, १) ४१, शण
अ क रोवला न
कण वा जाणा
7२१५ आ अ भा
व जे ी
>>
नय
-”*। जी
च्या
५५५ ४५0)
6.00,
कफ,
री धम तिन न,
म चवीमिम
प मयची
् ५
कण कक ऱ््ञ वी र प्या
या य त ना
की फरक ण यी ण >
पी , क वना, करिन नत ् न्न
क की
. "५ क “क,
े यय ह डल
क मोलेह आ अमिक मेकड की
क ट्ट ५. ८३५५-५७-५५ 0
०० मलहा" ० हाची एप टका धो.
ही 3 ऐश गु र
0. न. कल क ष्ट १ शज. म्य ३५ नू भः र िकण € र
उेण्यळ---बेंट्रेल ब सर्न पती
पड? कच, नु श्र ९५. ईत . र
ह ५ पयाव े
_ ,_ अर्वाचीन महाराष्ट्राच्या इतिहास! ने “शिवशाही” व 'पेशवाई' असे दोन | ४.
: _ भाग प्रमुखतः पडतात. लिवर हवी पहिळी अर दारी आडून पुढे झो
- , येतांच पेरावाई आठवते व ह्या प-वाई) महाराष्ट्रला रूणज्य "ऊत त्ति. | (र
*: , स्थिति-लदात्सक टि यांतून कपकर्ते "१7 नि ग.” रचे न्िस्सयो- | ल.
-: । त्पादक चित्र डॉल्यांसस्नेर उभे राहते. दिव) दीगतर पेंराव्यांच्याय दष्ते । लॉ
-. | हिंदवी स्वर याक पुनः प्रतिष्ठापना झाली; पेणव्यांच्याच इर्स्ते : 0 स्तच्य- क!
:: | बेभव'ःचा कळ सत्य व वेदावार्च्या अखेरच्या अमदानीतच ते 1 (दवी । ३.
:. | स्वराज्य पूर्णपणे ठ्याळ; जःऊन महाराष्ट्राच्याच नव्हे तर अखिल हिंडुस्थानच्य, र
* |, कपाळी परदास्थाची पदळांच्छनें उमटली. असे कर्से झाळें व ह्या इतिहासा- य
र. पासून आजच्या (शी पिढीले काय थंडा घ्यावयाचा, त्यांचें सोपप्रस्तिक । 'अ?
: | विवरण * कार्दवरीमःय पेाबाडे 'मधून उमारें पंचवीस कादंबर््यांच्या द्वारा | ८)
.. | करण्यांत यावयांवे असून आजवर तेरा कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या आहेत. हँ ह
“ ) दार्य जगडूव्याळ तर खरेच पण तें पांहेल्यापासून गकेदुवत् यशस्वी होत | (४)
* | आहे, अर्से अनेक अग्रगण्य मद्दाराष्ट्रवाग्मटांनी व केसरी, नवाकाळ, यांच्या । (तो
?; । सारख्या सर्व प्रमुख महाराष्ट्रीय वृत्त जांनी * कार्दबरीमय पेशवाई 'च्या । |
:. | कार्याची मुक्तकंठाने प्रशंसा करून त्या कार.ठा सुराश न्ितिळें आहे त्यावरून |
: | कोणालाही दिसून येईळ. | कि
: : कांबरीमार” (कावरर मधून स्न्धारण्य: :.. तांन गन एक |.)
ई**.
कागदावर छापत १. 'राबूत डायणीऱची, राचित्र व तर ळा तकात ९१ १.
रूपया अट मरसिड होत असते. * पेशवाईचे पुण्याहजातन हा पडिळी । ६
कादबरा दण किंनतीठा (ट. चै निराळा ) विकट शेकन * कालंबरीमय 8
पेदावाई 'आ्या कादमच्या ग्राइंत नांबे नोंदसि-गरा । । २८३ मधील , ४.
पुढीळ संब कादंबऱ्या पाटणपट किंमतील, “मेळ ट; 7 त्यांनी सर्वे । 2)
कादंबऱ्या घेतल्या पाहिजेत. भं
प
चुर, प्राणिक आणणि
र्ग
७
बुकसेलसे व पब्लिशर्स, मुंबई, नं. ४.
याएमार्णे प्रत्वर कॉरबरी २७५ ते २०० टांच, ..1:. उ: अँटिक |.
१.71!
क ऱ्् पग टॉलिच प रि । र य र क ५5692464 मिड ) |
5, र. 7 ऱ्स्द्र व ज्र पती न्स. . > - डर न्स. ० ० 0 य हल
0 ज्य पती मज क्या जळा वचार स्त्र 5794०0 ख्या ऱ्क श्र शोप. २: * यय ५ पान पडी
प र ज्य हि. र. 9 कन पह पपा ] ऱ्य सा: रु
आ, न ग्ल्ञ भट फा प पय फळ पान पक ्प् पक साड
र कक